Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ८७ ]

श्री. शके १६५५ आश्विन शुद्ध ८.

पुरवणी राजश्री साबाज़ी प्रभु चिटनीवीस गोसावी यांसिः-

उपरि, शामळाचे कलहावरून समीपवर्ति मामलेदारी दुर्बुद्धीस प्रवर्तोन शामलाचें निमित्य पुढें करून, तमाम प्रांत उद्वास केलियाचें वृत्त तुह्मांस लेहून गेलेंच आहे. वरकड, शामळाची कुवत होती ते कळलीच होती ! असो ! जें जालें तें उत्तमांतच मानोन, सांप्रत शामळाचा दुराग्रह थळचे कोटाविसी आहे. त्याविशीं इंग्रेजांस मध्यस्त ह्मणोन भीड घालोन स्थळ विच्छिन्न करावयाचा संदर्भ लावला. खारियावाडियांचा दुराग्रह दूर होईल ऐसा अर्थ पाहून, शामळाचें सौरभ्य करून घेतल्याविना मुलकाची आबादानी व माहास्थळाचा सरंजाम होणार नाहीं. राज्यभारियाचा भरवसा तरी कनिष्ठांचा विचार सर्व तुह्मी लिहितच आहां. तोहि विचार ध्यानात आणून मनसबियाचे विचारें माहास्थळाचे बेहबुदीचा विचार असेल तो पाहावाच लागतो. ऐसे चारी विचार चित्तांत आणून, जागा विच्छिन्न करावा ऐसा करार करून, शामळाचें उपशमन व्हावें ऐसा ठराव करून, इंग्रेजांस जाबसाल होऊन निश्चय जाला आहे. शामळ आह्मी समजलों, जागा दूर केला, यावरून मामलेदार नानाप्रकारें इस्किल घालून लिहितील; उभयतांचे चित्तांत किंत घालतील. याजकरितां तेथें उभयतांस श्रुत होऊन तुमचें उत्तर येई इतका अवकाशाचा करार केला आहे. वरकड उभयतास पुसावें. असेंहि अंत्र पहातां, जेष्टांहीं साक्षी-उपसाक्षींत वानर्याचे कोटाचा दाखला देऊन तुह्मांस जाबस्वाल केलाच होता. तथाप पुसोन केला ह्मणजे बरें. यास्तव तुह्मास लिहिलें आहे. कदाचित् तेथून अनमा नाचीहि गोष्ट असली तरी, शामळामी कलह असल्यास कार्याचें नाहीं, हेंच प्रमाण असे. परंतु दोन्ही गोष्टी रक्षाव्या ह्मणोन सविस्तर लिहिलें आहे. तेथील आज्ञा व तुमचा विचार कळला पाहिजे. तदनुरूप कर्तव्यार्थ घडोन येईल. तुर्त कलह स्तब्ध पाडून घेतला आहे. व मुलकांतील रयत परागंदा जाली आहेत, जागाचे जागा येऊन आबाद होय, ऐसाच विचार केला आहे. पत्रें तुह्माजवळ जाऊन पावतांच उत्तर अविलंबे पाठवणें. जाणिजें. रा। छ. ७ माहे जमादिलोवल. बहुत काय लिहिणें ? उभयता दाजींस पत्रें लिहिली आहेत. आपले विचारास आलीं तर प्रविष्ट करावीं; नाहीं तर न द्यावीं. तुमचे विचारास कसा काय विचार येतो तो सत्वर लेहून पाठवावें. जाणिजे. छ. मजकूर.

मोर्तब 

सूद.

                                                                                   लेखांक २००

                                                                                                       श्री                                                            १६२७ चैत्र वद्य १०
                                                                                                                                                                       
                                                                           193

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३१ पार्थिवनाम संवत्सरे चैत्र बहुल दशमी मदवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री मुद्राधारी किले चंदनगड यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे पा। वाई हा गाव राजश्री सदानंद गोसावी याच्या मठास इनाम आहे त्यास तुह्मी उपसर्ग देता ह्मणून हुजूर विदित जाले तरी ऐसी बदराहा वर्तणूक करावया तुह्मास गरज काय हे रीत स्वामीस मानत नाही हे जाणून याउपरी मौजे मजकुरास येकजरा उपसर्ग न देणे रोखापोखा काही न करणे फिरोन हुजूर बोभाट येऊ न देणें जाणिजे लेखनालंकार

                                                               190   

रुजु सुरुनिवीस
सुरुसुद बार

                                                                      



[ ८६ ]

श्रीमोरेश्वर. शके १६५५ अधिक आषाढ
शु॥ १५ शनवार.
छ० १६ मोहरम सोमवार
दोनप्रहर.

श्रीमंत राजश्री दादोबा स्वामी गोसावी यांसिः--

सेवक बाबुराऊ विश्वनाथ कृतानेक नमस्कार विनंति. उपारि. येथील वर्तमान तरः पांडुरंग गोविंद परभु राजश्री स्वामींनी जंजिरियास पाठविला होता. तो काल शुक्रवारी संध्याकाळी आला. त्यानें वर्तमान निवेदन केलें की, राजश्री पंतप्रधान शामळास सांगोन पाठवितात कीं, तुह्मीं चिंता न करणें, तुमचें अधिष्ठान मोडित नाहीं, आपण कांहीं तुमच्या वाटेस जात नाहीं, पाहिलेयानें आपण कांहीं येत नव्हतों, परंतु खावंदाच्या आग्रहास्तव आलों, परंतु तुह्मीं कोणे गोष्टीची फिकीर न करणें.

आपण तुमच्या वाटेस जात नाहीं. ऐसें शामळास सांगोन पाठवितात. तेणेंकरून शामळ खुशाल आहेत. जंजिरियांत मनुष्य तर पांचशें आहे. ऐसें सामान्य वर्तमान पांडुरंग गोविंद याणे राजश्री स्वामीजवळ सांगितलें. तेणेंकरून बहुत श्रमी जाले. राजश्री नारबावाहि बहुत श्रमी जाले की आजपर्यंत कोंकणस्थांचा लौकिक बेरा जाला. परंतु या गोष्टीनें भ्रम गेला. याजकरितां श्रमी आहेत. येथें तजवीजा होत आहेत कीं राजश्री स्वामी आपण खुद्द रायेगड़ी राहणार. राजश्री नारबावास राजपुरीस पाठवणार. यमाजी शिवदेव व उमाजी चवाण ऐसे अंजनवेलीस पाठवणार. ऐशा तजवीजा होत आहेत. मुख्य गोष्ट कीं राजश्री स्वामी बोलले कीं राजश्री अंबाजीपंत राजपुरीस गेले आहेत. हे चार गोष्टी राजश्री प्रधानपंतास सांगेन कार्य होऊन येई ऐसें जालें तर उत्तम आहे. मूळ गोष्ट कीं राजश्री तात्याच्या कागदाची वाट पाहत आहेत. ऐसें वर्तमान येथील आहे. तुह्मास कळावें ह्मणून लिहिलें असे. राजश्री प्रतिनिधीकडील बहूमान बराच होत आहे. कार्यकर्ते तर तेच. विश्वासनिधी तर तेच. ऐसें घडोन आले. कळलें पाहिजे. खानदेशची बोली करून घेणें. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति. राजश्री प्रतिनिधीस बहुमान कडी व तोड़े व वस्त्रें पाठवूं लागले. तेव्हां राजश्री नारबांहीं व यमाजीपंतीं बहुतशी रदबदल केली कीं प्रधानपंतास बहुमान पाठविल्याखेरीज राव घेणार नाहींत. ऐसी रदबदल केली. तेव्हां यांनी रदबदल केली ह्मणून कड़ीं व तोडे व वस्त्रें बहुमान पाठविला. या उभयतांच्या आग्रहास्तव पाठविला. कळलें पाहिजे. हे विनंति.

[ ८५ ]

श्री. शके १६५५ ज्येष्ठ शुद्ध १४.

राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांसी आज्ञा केली ऐसी जे:--

तुह्मी विनंतिपत्र छ. ७ जिल्हेजीचें पाठविलें छ. ११ मिनहू प्रविष्ट जालें. लिहिलें वर्तमान कळों आलें. व सविस्तर चिरंजीव राजश्री फत्तेसिंग भोसले यांणी लिहिलें, त्याजवरून विदित जालें. किल्ले बिरवाडी व अवचितगड व सुरगड व घोसाळा व मदगड व बाणकोट हे सहा किल्ले फत्ते जाले. उत्तम गोष्टी जाली ! स्वामी संतोष पावले ! वरकड किल्ले यांची सूत्रें लागलीं आहेत, ह्मणून चिरंजीवांनी लिहिलें. तरी, तुह्मीं कार्यकर्ते, बुद्धिमंत; सेवक आहां. जेणेकडून कार्यसिद्धि होऊन ये तोच अर्थ संपदाल, हा स्वामींस निशा आहे. वरकड साहित्याचा अर्थ तरी तुह्मी व चिरंजीव ऐसे उभयतां महत्कार्याचा अंगेज करून गेले आहां. श्रमसाहस स्वामीचे राज्याभिवृद्धिनिमित्य करितां. ऐसे असोन, स्वामी साहित्य न करीत; हें काय घडो पहातें ! मुख्य स्थळाची कुमक या दिवसांत कोठूनहि होणें नाहीं. त्याहिमध्यें जेथें जे आहेत त्यांस आपलेंच जगावयाची फिकीर येऊन पडली आहे. तुह्मी साम-दाम-भेद-बुद्धि कर्तव्य तैसी करून महद्यश संपादणें. सेखजी आदिकरून मोकाशी जे भेटले असतील त्यांचे दिलासे यथायोग्य केलेच असतील. आणखी जे लोक यावयाचे असतील तेहि इलाज करून आणवणें. सर्वांचे मनोधारण करून कार्यसिद्ध करणें. वरचेवरी संतोषाचें वर्तमान लिहित जाणें. तेथें जे मराठे लोक भेटले असतीच त्यांचा बहुता प्रकारें दिलासा करून, जमानसाखळी करून घेऊन, तेच स्वामीकार्यावर सादर होत तो अर्थ करणें. बरकंदाज पाठवावयाविसीं लिहिलें. तरी लोक जमा करीत आहों. वरचेवरी जमा ज़ाले ह्मणजे रवाना केले जातील. राजश्री श्रीनिवास पंडित प्रतिनिधीकडील जमाव व राजश्री सचिवपंतांकडील जमाव तुह्मांसन्निध आहे. त्यांचा दिलदिलासा करून खर्चावेंचास देत जाणें. खर्चाविसीं अंतर न करणें. उभयतां एका मतें वर्तोन, स्वामिकार्य सिद्धीस पावून, आपले सेवेचा मजुरा करून घेणें. सविस्तर चिरंजीवास लिहिलें आहे त्याजवरून कळों येईल.+ सुज्ञ असा.

[ ८४ ]

श्री. शके १६५४.
राजश्री सुभेदार गोसावी यांसि :-

 अखंडितलक्ष्मिअलंकृत राजमान्य.

स्नो। विसाजी दादाजी आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करावयाची आज्ञा केली पाहिजे. विशेष. रा। गोविंद बल्लाळ यांजविशीं, आपण येथें आले होते तेव्हां, श्रीमत् राजश्री आपांस विनंति केली होती. त्याप्रमाणें हल्ली त्यास पुसोन आपल्या नांवें सनद लेहून पाठविलीं आहे. त्याप्रमाणें आपण त्याचे विल्हेस लाविलें पाहिजे. वरकड रा। बाळजी मा।रनिल्हेकडून आले आहेत. हे सांगतील त्यावरून विदित होईल. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

राजश्री बाबुराऊजी स्वामींस सा। नमस्कार. लि॥ परिसीजे. रा। बाळजीची रवानगी लौकर केली पाहिजे. हे विनंति.

[ ८३ ]

श्री. शके १६६४ माघ शु॥ ११.

स्वस्तिश्रीराज्याभिषेक शके ५९ परिधावी संवत्सरे माघ शुद्ध एकादशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शाहुछत्रपति स्वामी यांणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांसि आज्ञा केली ऐसी जे :-

तुह्माकारणें संक्रमणाचा तिळगुळ पाठविला आहे. घेणें. जाणिजे. * बहुत लिहिणें, तरी सूज्ञ असा.

मर्यादैषा
राजते.
              बार बार बार बार बार.
              पो छ० ११ रमजान.

[ ८२ ]

श्री. शके १६५४ भाद्रपद वद्य १०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री कृष्णराउ महादेउ
स्वामी गोसावी यांसिः-

पोष्य बाजीराउ बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. प्रांत जवार, रामनगर, व पेठ वासवे, किल्ले कोहज. हा मामला तुमचे स्वाधीन केला आहे. त्यापैकीं राजश्री पिलाजी जाधवराउ यांसी रुपये १,७०० सतरासे पावत असतात. तेणेंप्रमाणें सतरासे रुपये तुह्मांकडून मा। ३,४०० पैकीं सदरहू सतरासे रुपये देविले असेत. मा।रनिल्हे ( स ) पावते करणे. जाणिजे. छ० २२ रबिलोवल बहुत काय लिहिणें ? + हे विनंति.

बार.

[ ८१ ]

श्री. शके १६५४ भाद्रपद शुद्ध ६.

० श्री ॅ
राजा शाहू नरपति
हर्षनिधान बाजीराव
बल्लाळ प्रधान.

 मा। अनाम देशमुख व देशपांडे का। सासवड यांसिः-

बाजीराउ बल्लाळ प्रधान. सा। सलास सलासीन मया अलफ. मौजे कारखेल का। मजकूर व मौजे देऊळगांव पा। सुपे या हरदू गांवचे शिवेचा कजिया आहे. तोबर हक्क गोतमुखें निवडावयाविशीं राजश्री त्रिंबक हरी सुभेदार पा। सुपें यांस आज्ञा केली आहे. तरी तुह्मी भवरगांवचे गोत जमा करून, कोणाची भीड मुरवत न धरितां, रास्ती इनसाफ करणें. जरी कोणाची भीड धरून इनसाफ कराल, तर तुमचा मुलाहिजा होणार नाही. हें पष्ट समजून वर्तणूक करणें. तुह्मीं गोत घेऊन मारनिलेकडे जाणें. जाणिजे. छ० ४ रबिलोवल. पा। हुजूर.


लेखन
सीमा

[ ८० ]

श्री. शके १६१४ जेष्ठ शु॥ ९.
पा छ. ९ जिल्हेज मघा नक्षत्री.

श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री महादेवासः-
प्रति अंबाजी त्रिंबक आशीर्वाद उपरि. आह्मी ता। छ० ८ जिल्हेज परियंत कुशल असों. विशेष. राजश्री आनंदराउ सोमवंशी सरलश्कर यांणी आह्मांस पत्र पाठविलें. तेंच पत्र तुह्मांकडे सोनारासमागमें पाठविलें, तें पावलेंच असेल. त्यास, तुह्मी सत्वर येणें. सरलश्कर यांणीं राजदर्शनाविशीं राजश्री स्वामींस पत्र पाठविलें होतें. त्यास, जेष्ठी पौर्णीमा जाहलियावर द्वितियेपावेतों मुहूर्त सरलश्करास नाहीं. बुधवारी मुहूर्त भेटीचा आहे. तरी तुह्मी पत्र पावतांच येणें. अनमान न करणें. बहुत काय लिहणें ! तुह्मी आपल्यासमागमें गणेश ब्राह्मण घेऊन येणें. आणि विठोबास घरीं ठेवणें. + हा आशिर्वाद.

[ ७९ ]

श्री. शके १६५४ वैशाख शु॥ १.

राजश्री बाजीराव पंडित प्रधान गोसावी यांसिः--

७ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
प्रीतिपूर्वक उमाबाई दाभाडे दंडवत विनंति उपार येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. चिरंजीव राजश्री बळवंतसिंग विश्वासराव टोके यांस तुह्मीं पत्र लिहिलें, त्याजवरून वर्तमान अवगत जालें. ऐसियास, आपण कोण्हाच्या सांगितल्यावरून गोष्टी लेहावी एसें नाहीं. उंटाचा विचार आह्मी मनास आणिला. तो रातची उंटें सुटून चांदोरीच्यामागें लश्करापासून दोंकोसांवर गेली. तिकडून यांचे राउत यांचे समागमें माणसे पाठवितां उंटें लश्करांत ( परत आली. ) + + रोज होतीं. कोणाचा बोभाट न आला. याजकरितां गांवास पाठविलीं. सांप्रत, तुमच्या पत्रावरून उंटें त्यांच्या स्वाधीन केली. आपणांस कळावें याजकरितां लिहिलें असे. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. छ० १९ माहे जिल्काद. हे विनंति.