Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६२ ] पु॥ १०
श्री.
शके १६५३.
सेवेसी विनंति. सासवडचे खंडणीविसीं पत्र पाठविलें तें पावलें. तेंच पत्र नारो आपीजी यांस आज्ञेप्रमाणें दाखविलें. त्याजवरून त्यांनी वेगळे वाटनें च्यार गोष्टी सांगितल्या जे, नानाच्या. आबाच्या लिहिल्यापेक्षां दुसरा प्रकार अधिकोत्तर काय आहे ? परंतु वरकड गांव आमचे निसबतीस आहेत; त्या गांवांवरी दस्तापेक्षां पावणेदुणी चढली. सासवड तनख्याप्रमाणेंहि रुपये देईना. प्रस्तुत दरबारचा प्रकार कसा हें सर्व ते जाणतात. च्यार रुपये त्याचे भिडेनें सोडले, तरी माझे पदरीचे जात नाहींत; अगर, घेतले तरी मजकडेच येत नाहींत. परंतु प्रस्तुतच्या रंगासारखें सर्व गांवांप्रो। निटांत दिसेल, तें करावें, हेंच उचित. त्याचे भिडेनें पांचशे रुपये सोडतों आणि करार करितों, याप्रो बोलिले. आह्मी च्यार रदबदलीच्या गोष्टी सांगणें त्या सांगितल्या; परंतु, त्यांनी थोरल्या डौलाच्या बोलण्यावरी घातलें. तेव्हां काय होणें ? याप्रों। नानांनीं करार केला, त्याची नकल अलाहिदा पाठविली आहे, ते पाहावी. मान्य जालिया आज्ञा करावी, ह्मणजे त्याप्रों। खंडणी कौल करूं. बेजमा वसूल करून घेऊन येतों. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१ ]
पु॥ ११४ श्री. १६१३.
राजश्री सखोबा स्वामींसः-- विनंति उपरि. गांवचे वाणी सारे येथें आले. गुजर बाहेर काढणें ह्मणून फारच आग्रह केला; आणि पूर्वीचा करारहि आहे. त्यांस गुजरास बाहेर काढणें ह्मणून चिटी दिली. त्यास, त्यानें दोन महिने पावेतों राहावें; उधार केला आहे ते उगवावा; दुकान अथवा नवा उदीम करूं नये. दो महिन्यानंतरी गांवांतून बाहेर काढणें. यांत गुंता नाहीं. तूर्त प्रज्यनाचे ( पावसाचे ) दिवस आहेत. यास्तव समजूत काढणें. येथवर बोभाटा दोघांचा न ये तें करणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९५
श्री १६२५ कार्तिक शुध्द ७
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३० सुभानु संवत्सरे कार्तिक शुध सप्तमी गुरुवासर क्षत्रिय कुलवतंस श्री राजा शिव छत्रपती याणी मुकादम व चौघला व रयान मौजे इडमिडे समत निंब प्रांत वाई यासी आज्ञा केली ऐसी जे मौजेमजकूर सदानंद गोसावी याचे मठास इनाम आहे ऐसे असता तुह्मी वसुलास खलेल करिता ह्मणून हुजूर विदित जाले तरी ऐसी बदराहा वर्तणूक करावया तुह्मास गरज काय याउपरी तुह्मी हुशार होणे आणि मौजे मजकुराचा उसूल सुरळीत देत जाणे निदेश समक्ष
रुजु सुरनिवीस
सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६० ]
श्री. शके १६५३ फाल्गुन वद्य १३.
० श्री ॅ
राजाशाहू नरपति
हर्षनिधान बाजीराव
बल्लाळ प्रधान *
आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान ता। बरखंदाज ठाणें पुणें. सु॥ इसने सलासीन मया अलफ. तुह्मांस गाडियाचे कामास पाठविले त्यांस का। सासवड कर्यातीचे गांवचे येणें प्रो। मना केले बि तपशील.
१ मौजे रांक.
१ मौजे कोलोळी.
१ मौजे करखळ.
१ मौजे बाबुर्डी.
सदरहू चारी गांवीचे गाडे मना केले आहेत. त्यांस उपसर्ग न करणें. उठोन येणें. +++ जाणिजे. छ० २६ रमजान.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९४
श्री १६२५ कार्तिक शुध्द ७
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३० सुभानु संवत्सरे कार्तिक सुधसप्तमी गुरुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री सुभेदारानी व कारकुनानी सुभेलष्कर यासी आज्ञा केलीं ऐसी जे मौजे इडमिडे प्रात वाई हा गाव सदानंद गोसावी याचे मठास इनाम आहे तेथे तुह्मी स्वारीशिकारीमुळे येऊन गांवास उपसर्ग देता धामधुम करिता ह्मणून हुजूर विदित जाले तरी गोसावी याचे गावास उपसर्ग द्यावया तुह्मास गरज काय याउपरी जो कोण्ही उपसर्ग देईल त्याचा परिछिन मुलाहिजा होणार नाही निदेश समक्ष
रुजु सुरनिवीस
सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५९ ]
श्री.
शके १६५३ पौष वद्य २.
राजश्री पिलाजी जाधवराउ गोसावी यांसिः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीराउ बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सुहूरसन इसने सलासीन मया अलफ. रा। मळोजी चिताळकर व रखमाजी बजागे तुह्मां बा। पाठविले आहेत. मळोजी चिताळकर यांवरी कसाला पडला आहे, तुह्मांस ठाउकाच आहे. तरी स्वारीमुळें यास पैका पाऊन, याची उठवण मोडे, व उस्तवारी होय, तें करणें. + जाणिजे. छ. १६ रजब.
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहु नरपति * *
हर्षनिधान बाजीराव
बल्लाळ मुखप्र
धान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५८ ]
श्री. शके १६५३ पौष शु॥ ८.
राजश्री बाबुजी नाईक जोशी गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो॥ पिलाजी जाधवराव दंडवत विनंति. सु॥ इसने सलासैन मया अलफ. राजश्री पंतप्रधान यांनी आह्मांकडून गोसावियासी देविले रुपये ७,००० सातहजार हे इ॥ छ ० ७ रजब ता। अखेर सदरहु रुपये औरंगाबादेस दुकानीं प्रविष्ट करून. + फष.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५७ ]
श्रीमार्तंड. शके १६५३ श्रावण शुद्ध ३.
श्रीमंत राजश्री मानाजी केशरकर आ। सरदेशमुख साहेबाचे सेवेसी :-
आज्ञाधारक रघो नरहरी आशीर्वाद विनंति. सारा इसने सलासीन मया अलफ. सुभा पनाळा येथील माहालीचा वसूल वारणेअलीकडील गांव व माहाल आहेत, त्याचा ऐवज या राज्यांत घ्यावा ह्मणऊन हुजुर तह जाला. त्यासी आमचे स्वाधीन सरदेशमुखीचे कमाविशीस सालमजकुरी माहाल दि॥ देखील फुट गाऊ :-
ता। वाळवें ता। अष्टें
१ लागवलवें, १ उरुण, १ कसबा अष्टे, १ तांदळवाडी,
१ बहे, १ कामेरी, १ मालेवाडी, १ कुडलगी,
१ येड, १ गोठखिंड, १ साकळ, १ भडकंबे,
१ खेड, १ पुणदी, १ इटकर, १ ढवळी,
१ येलावी, १ थानपेड, ----------
१ नागठाणें, १ येलूर, ८
१ नागांव, १ देवर्डे, बाजे का।.
शिरगाऊ, १ लाजेगाऊ, १ पेठ, १ कविठे,
१ पळूस, १ कुंडल, १ बावची, १ अंकलखोप,
१ बाहादूरवाडी, -----------
४
-------------------
१९ ता। कागल.
कि॥ रायबाग प्रांत. १ बुरली, १ तुंग,
१ अमनापूर, १ बागणी, १ डिगरज,
--------- -----------
२ ३
ता। सातवें, का। कुरळप प्रांत कोलापूर.
१ मांगले, १ अइतवडे
खुर्द,
१ चिकुर्डे, १ करजवाडी,
एकूण देहे तुमचे हवाला कमाविशीस केले आहेत. त्यासी, सदरहु गावांपौ। नार + + यांजकडे हजुरून परभारें गाऊ वजा पडतील ते खेरीज वजा करून, उरले गांवची कमावीस आह्मी करून, तहाप्रों। सरदेशमुखी देखील जकायत, कमावीस, आकारबेरजेवर हक व कानु बाब वसूल घेऊ. यासी मक्ता : सदर्हु गांवपौ वजा पडतील ते खेरीज करून, बिलकुल मक्ता बेरीज रु॥ १,००० हजार.
तूर्त रसद रु॥ २००. हप्तेबंदी इ॥ श्रावण + +
ता। वैशाखी पूर्णिमा,
भाद्रपद पूर्णिमेपासून, दर-
माहा रुपये ८० ऐशी.
एकूण दसमाही एकूण
रुपये ८००
एकूण रुपये दाहाशे वसूल देऊं. याखेरीज हुजूर खंड होईल त्याचा आलाहिदा वसूल घेणें. हप्त फितुर जाली तरी, सदर्हु बेरीज भरून देऊं. हा कबुल कागद लिहून दिल्हा सही. सफर. केसो शामराम. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५६ ]
श्री
शके १६५३.
चिरंजी(व) राजश्री धोंडोबा यांसिः-
बाजीराऊ बल्लाळ प्रधान आशीर्वाद उपरि. राजश्री आंबाजीपंततात्या यांणीं गहु कैली खंडी ४ चार व तांदूळ खंडी तीन ऐसे देविले आहेत. त्याप्रा। रातोरात आजीगांवकरियांचे पदरीं घालून गहु दळवून, व तांदूळ सडवून, सत्वर येऊं प्रविष्ट होय, ते गोष्टी केली पाहिजे. तूप व तेल जें तुह्मांपाशीं असेल तें पत्रदर्शनी पाठवून देणें. येविशीं अनमान कराल तरी तुह्मांस आमची आण से. जे क्षणीं पत्र पावेल ते क्षणी लिहिलेप्रमाणें सामान पाठवून देणें. गांवामधेंही तूप, तेल, वाणियाकडे, व गांवकरियांकडे, असेल तें मनास आणून सत्वर पाठविणें. ऐसी, राहुजी पाटिलासही लिहिलें असे. जाणिजे. + टाकोटाक जें अनकूल घरांत असेल तें पाठवणें. अनमान कराल तरी आमची आण असे. तांदूळ सडून, गहु दळून, उदईक दोन प्रहराअलिकडे वरचेवर जे होत जाईल अनकूल, तें पाठवीत जाणें. तैसेच पाटलास सांगणें. हा * आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५५ ]
श्री. शके १६५२ फाळगून वा। ८.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री राघोपंत स्वामी गोसावी यांसि :-
पोष्य बाळाजी बाजीराउ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. तुह्मीं पत्र राजश्री अंबाजीपंततात्यांस पाठविलें, त्यावरून कळों आलें. महमद बोहरी, हुजरात याजपासून कमावीसदार यांनी जकाती घेतली; त्याविशीं राजश्री स्वामींनी आज्ञा केली. त्यावरून, मौजे पाडेसर, ता। कर्हेपठार, या गांवावरी रोखा केला होता. त्यास, तुह्मी मौजे मजकूरचे ऐवजी जकाती बाबत रु॥ २६ सवीस चिमाजी जासुदासमागमें पाठविले ते हुजूर पावले असेत. जकातीची चिठी दप्तरी आहे, ते पाठवून देणें. ह्मणून लिहिलें. त्यावरून नकल पाठविली असे. जाणिजे. छ. २२ रमजान, सु॥ इहिदे सलासिन मया अलफ. + बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
या खेरीज रु॥
४ मसालाचि- २६ चिटीदुपट १३
माजीजासूद एकूण.
-॥- देहनगी.
--------- --------
४॥ ३०॥