Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५ १६०९ । १६०९
तुमार बरदास्ती बजोर ताजदी देहाय प॥ सुपे स॥ जुनर खालिशे शरीफे माहाल पायबाकी सु॥ सन हजार १०९७ कारणे तहवर दस्तगाहा व एक बलपनाह काकडखान फौजदार प॥ पुणे स॥ मजकूर याने बजोर ताजदी करून धरून नेऊन पैके घेतले तहसील बमारुफाती सीवाजी सेडगे मु॥ लोणी गु॥ माइले मा। वसूल
रुपये
२०७४ ll=
दोनी हजार चोर्याहतर रुपये रास
दा। देशपांडे पा। सुपे
देहबदेह
११५७।. माळशिरस ८१= अबी बु॥
३२५ कोथले २९ नायवली
२७५ कुंभारवलन २० नाझरे
११४ रिसे ४८ खळद
--------- २५ कोलवीरे
१८७१l. ----------
२०३=
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४५०
श्री १७१८
यादी विठोजी भोईटे आरडगावकर, सु।। सबा तिसैन मया व अलफ. मलजी भोईटे यास पुत्र संतान नव्हतें. याकरितां त्यांणीं आम्हांस दत्तपुत्र येऊन आमचे लग्न केलें. हाली मलजी भोईटे मृत्यु पावले. नंतर त्याचे सरंजामाची वहिवाट करावयास लागलों. तों माहादजी भोईटें यांणीं राजश्री बालोबा पागेनीस यास गैरवाखा समजाऊन, मलजी भोईटे याच्या हिशोबाचे सरंजाम वगैरे पौ मा।री येथील अमल माहादजी भोईटे याजकडे चालवणें. पुढें मनास आणोन आज्ञा करणें ते केली जाईल, म्हणोन पत्रें सरकारचीं मशारनिलेनें घेतली. त्याजवरून सरकारांतून राजश्री नारोपंत चक्रदेव यास सांगितले कीं, माहादजी भोईटे व विठोजी भोईटे यांचे मनास आणणें, त्याजवरून बलवंतराव नागनाथ यास उभयतांचे मनास आणण्यास नारोपंतांनी सांगितले. तेव्हां, विठोजी भोईटे बलवंतराव नागनाथ यांसी रुजू होऊन आपला मा।र सांगितला. याप्रमाणें सरकारांतून मनास आणावयास सांगितलें. तें आम्हांस माहादजी भोईटे यांणीं न सांगतां, विठोजी भोईटे यास तसदी पोचऊन आणविलें कीं, विठोजी भोईटे यांणीं क्रियेस जावलीस राजी व्हावें. त्याजवरून विठोजी भोईटे क्रियेस राजी जाहले. माहादजी भोईटे क्रियेस सरले, म्हणोन हें पत्र सादर केलें असे. तरी, परगणे मजकूर येथील अंमल मलजी भोईटे याच्या सरंजामाचे हिश्शाचा विठोजी बिन मलजी भोईटे याजकडे देणें.
म्हणोन-----------------------------------पत्रें
१ पौ नसिराबाद येथील हिश्शाचा अमल देणें म्हणोन पत्र.
१ देहे--हाय दरोबस्त यांस पत्र.
१ मौजे जलगांव.
१ मौजे सुनसगाव.
१ मौजे खडकी.
१ मौजे तुळसुंबे.
-----
४
------------------------------------------------पत्र
१ देहेहाय येथील हिश्शाचा अंमल देणे, म्हणोन पत्र.
१ मौजे उमाले.
१ मौजे धानवड.
-----
२
------------------------------------------------पत्र
१ सुभेयास पत्र.
१ कमावीस-दार, का। नसिराबाद, यास.
१ देशमूखदेशपांडे, का। नसिराबाद, यास पत्र.
१ रघुनाथपंतआबा, किल्ले असरीचे सुभेदार, यास पत्र.
१ मौजे वाठार, पा। वाई, येथील हिश्शाचा अंमल देणें, म्हणोन पत्र.
-----
८
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४९
श्री. १७१८
यादी--------------------------
१ कसबे रहिमतपूर, प्रां। वाई, येथील मोकदमाची व शेटेमहाजन यांसी पत्र कीं: कारकून व हुजरे व स्वार कसबे मजकूरचे जफ्तीस पाठविले
आहेत. तरी, यांसी रुजू होऊन सालमजकूरचा वसूल राहिला असेल तो पेशजीच्या जफ्तीदारापासून रुजू घेऊन सुदामतप्रमाणें देत जाणें, कलम १.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४ १६०९ ता।
तसलमातरोखा सामराज काटे मनसबदार देसमुख व देसपांडे प॥ सुपे सन हजार १०९७ तसलमातरोखा ऐसा जे रुपये ३०० तीन से बाबत महसूल माहाल पायबक सरकार अहमदनगर वगैरे बाबत तहसील मसीखतपना महमद शरीफ करोडी सरकार मजकूर आपणापासी अमानत आहेत एकरार केला ऐसा जे सदरहू रुपये बद्दल खजाना अमरे सुबे अवरंगाबाज करून बमोहर मदसदियान खजाने आणून करोडियास देऊनल गोस्टी हिला व उजूर न करून हा तसलमातरोखा सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४८
श्री लक्ष्मीकांत १७१८ फाल्गुन वद्य ३०
राजश्री नारायण बाबूराव गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती. उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुम्हीं पत्र छ १६ रमजानचे तारखेचे सातारियाचे मुकामींहून पाठविलें ते पावलें. लिहिला मजकूर कळला. राजश्री बाळाजीपंतनाना राजश्री बाजीराव यांचा निरोप घेऊन श्रीमंत छत्रपती याजवळ वस्त्राचे योजने करितां आलें. समागमें मीहि आलों. मागाहून राजश्री बाजीराव वस्त्रें घेण्याकरितां येणार, आपणास बातमी असावी, म्हणोन राजश्री नानांनीं चिठी लिहून श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव यांजकडेस पाठविली असे. उभयेतां सविस्तर लिहितील. सांप्रत दिवस अडचणीचे. कैसेंही बनल्यास आपली दिष्ट इकडेस, हें वारंवार उपरोधिक काय ल्याहावयाचें आहे, म्हणोन तपसिलें लिहिलें तें विस्तारें कळलें, व राजश्री बाळाजीपंतनाना यांनी चिठी पाठविली ती राजश्री श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव यांनी इकडेस पाठविली. याजवरून व उभयतांचे लिहिल्यावरून सर्व समजलें. त्यास, राजश्री बाळाजीपंतनाना यांचे जातीशी दुसरा भाव ठेवलाच नाहीं... त्याचा इशारा यावा त्याचप्रों घडावें, हें पहिलेंहि घडलें आहे पुढेंहि याचे इशा-याप्रमाणें घडेल. येविसीं तुह्मीं खातरजमा करावी. सर्वात्मना लक्ष राजश्री बाळाजीपंतनाना यांजकडेस आहे. प्रसंग अडचणीचे आहेत. जेथें हिम्मत बाहाल आहे, तेथें येविसींची चिंता कांहीं असत नाहीं. श्रीदयेनी चांगलेच घडेल. जे वेळेस राजश्री बाळाजीपंतनाना यांचा इशारा येईल, ते वेळेस त्यांचे जवळच समजावें. यांत सर्वथैव दुसरें नाहीं. यांत सर्व अर्थ आले. राजश्री बाळाजीपंतनाना यांचे चिठीचें उत्तर लेहून, राजश्री श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव याजकडेस पाठविलें आहे व उभयतांसहि सविस्तर लिहिलें आहे. त्याप्रमाणें तुम्हाकडेस चिठीचें उत्तर पाठवितील व इकडिल तपसिलें अर्थ तुम्हांस लिहितील. त्याजवरून समजेस पडेल. दिवस नाजूक आहेत. तेव्हां यावेळेस वरचेवर तुमचेकडून पत्र येऊन वर्तमान कळत जावे. राजश्री नानाचे चिठीचें उत्तर तुम्हांजवळ येतांच, तुह्मीं प्रविष्ट करावें, आणि इकडीलविसींचे प्रकारहि बोलण्यांत आणावें. फार काय ल्याहावे ? सारांष हेंच कीं, राजश्री बाळाजीपंतनाना यांचे जातीशीं एक विचार ठेविला आहेत. यांतच दौलतेचें कल्याण व उपयोग आहेत. जवळ फौज किती आहे, पेंच आंगावर कैसा, हें तुम्हांसहि समजोन आहे... ...ही दूर राजश्री बाळाजीपंत नानाच करितील. ही खातरजमा पक्की ठेऊन असें।. तेव्हां याचा बयान काय ल्याहावा ? तुम्हाकडून कोणते एक समजणें तें यथातथ्य समजावें. त्याजप्रों इकडूनहि घडेल. राजश्री नानाचे जातीवर कोणतेहि गोष्टीची काळजी न ठेवितां, निश्चिंत असो. फार काय ल्याहावें ? रा। छ २८ माहे रमजान. *सर्वात्मना लक्ष राजश्री नानाचे जातीकडे लागोन राहिले आहे. जेथें हिंमत आहे तेथें श्रीजी सर्व उत्तमच घडवील. राजश्री नानाहि दूरदेशे आहेत. व इकडीलविसीं त्याजला अगत्यावाद आहे. व भरंवसा ठेवितात. तैसाच येथील भाव आहे. याचा तपशील पत्रांत लिहिणें लागत नाहीं. सर्व तुमचे ध्यानांत आहे. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४७
श्री लक्ष्मीकांत. १७१८ फाल्गुन वद्य ३०
राजश्री बाळाजीपंत नाना गोसावी यांसीः--
दंडवत विनंती उपरी. आपण चिठी पाठविली ती पावोन लिहिला मजकूर कळों आला. राजश्री बाजीराव यांचा निरोप घेऊन सातारियास आलों. येविशींचा मजकूर राजश्री श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव लिहितील. प्रस्तुत कित्तेक गोष्टी अडचणीच्या दिसतात. परंतु ईश्वरकृपेनें उलगडतील. आपली दृष्ट इकडे असावी म्हणोन लिहिलें. आपलें जाणें सातारियास जालें, तेव्हां रावमशारनिलेनीं बहुतां प्रकारें खातरजमा करून निरोप दिल्हा. आपणहि बंदोबस्तानसीं आहेत, म्हणोन उभयतांचे लिहिल्यावरून कळों आलें. ऐशियास, आपले * दूरंदेशीनें लोभ संपादून साता-यास जाणें घडविलें. येनेंकडून मसलतीचे बहुत उपयोग आहेत. इकडे द्रीष्ट असावी. याजविसींचा प्रकार पूर्वीचा रुनानुबंध आहे, तेव्हां ल्याहावें ऐसें नाहीं. पूर्वी आपल्या इशा-या प्रों घडलें व पुढेंहि तैसेंच घडेल. याजविसींचा मजकूर पूर्वीपासून उभयतां आपल्यापाशीं बोलतच आहेत. व आतांही बोलतील. हिंमत बाहाळ असावी. येनेंकडून श्रीकृपेनीं सर्व उत्तमच घडेल. गा छ २८ माहे रमजान, बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंती. मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २३ १६०९
तुमार बरदास्ती बजोर ताजदी देहाय प॥ सुपे स॥ जुनर माहाल पायबाकी खालिशे शरीफे सु॥ सन हजार १०९७ कारणे रफायतपनाह हणमंतराऊ ठाणेदार त॥ बारामती प॥ मजकूर याने बजोर ताजदीने धरून नेऊन पैके घेतले बमारुफाती म॥ इ॥
रु॥
१२७३
(नांगर)
मो। बारा सें त्रिहत्यार रुपये रास
देह बदेह
३४२ क॥ सुपे ४४३ सोनवडी
४८८ कार्हाटी
--------
८२०
४४३
द॥ देसपांडे प॥ सुपे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२ १६०९ श्रावण शुध्द १
श्रीसके १६०९ प्रभव नाम संवछरे सुध पाडवा तदिनी गोपजी बिन रागोजी यादव मौजे माळशिरस पा। सुपे यास मालजी बिन रामजी यादव मोकदम मौजेमजकूर आत्मसंतोसे लेहोनु दिधले वृत्तिपत्र ऐसे जे काळ थोर पडिला याकरिता गाव खराब जाला लोके कितेक सुजोन मेली कितेकाची घरे बुडाली कितेक उठोन देसावेरी गेली आपला लेक रामाजी तो देसावेरी सुजोन गेला एक लेक सुभानजी आपणापासी होता तो हि पोटासाठी सुजोन मेला आपली बाईल हि मरोन गेली आपण व आपली सून दोघे उरलो अन्न मिळेना हातपाय सुजले कोण्ही हाती धरी ना मग आपणापासी मोकदमीची सनदा व वतनाचे कागद होते ते दरम्यान बुडतील ह्मणऊन हरकोण्हास मोकदमी नावनागर वतनाचे कागद व सेत घर देऊन आपला जीव वाचऊ ह्मणऊन जात होतो मग मागती आपण आपले मनेसी विचारून पाहिजे तो तुह्मी आपला बाप भाऊ तैसा च आहेस ह्मणऊन मग देसमुख व देसपाडे व गावीचे जे कोण्ही वाचली आहेत त्याचे गोहीनसी व हामशाही गावीचे मोकदमाचे गोहीनसी मोकदमी व आपले वडीलपण नाव नागर व घर सेत कुल आपले वडिलाची जे मिरासी हकलाजिमा आहे तो तुह्मास दिधला असे आपण वाचलो तरी जोवेरी वाचोन तो अन्नवस्त्र देणे व मेलियावेरी मुठीमाती देणे आणि वतन आपली जे मिरासी आहे ते तुह्मी खाणे आपणास वतनास संबंधु नाही आपले घरातील आपले भाऊबंद व आपला लेक वाचोन आला तरी त्यासी मोकदमीस समंधु नाही तुह्मी सुखे लेकराचे लेकरी काळीवेरी पाढरी तोवेरी वतन खाणे आणिकास वतनास समंधु नाही बिलाहरकती करील तो दिवाणीचा गुन्हेगार व गोताचा अन्याई
गोही
सामराज देसमुख देसपांडे पा। मा।
प॥ म॥
नाईकवाडी सीऊजी खोमणा मोकदम
तान्हाजी इतबारखान मौजे जळगाऊ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४६
श्री ( नकल ) १७१८ फाल्गुन वद्य ११
यादी राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा याजकडील मतलब सु।। सबा तिसैन मया व अलफ. राजश्री बाजीरावजी यांचे बरें होण्याचे मतलबसंबंधी राजश्री बाळाजीपंतनाना यांनीं माहाडास करार करून दिल्हा तीं कलमें, त्यास हाली ठरावाचीं कलमें.
मंडले आमचे नांवे देऊन सनदा तीन वर्षे फौजचा खिसारा
आमचे नांवे द्याव्या. कलम १ अतिशय जाला हें वारंवार बोलण्यांत
मंडले रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा येत होतें. त्यास, सांप्रत कांहीं देण्याचा
यांचें नांवे करार करून द्यावे. मुद्दा घालावा असा नाहीं.
येणेप्रमाणें करार करावे. करार. लाचारी आहे. दाहा लक्ष रुपये देण्यांत
चौरागड बमय त्याजखालीलसरं- ण्यात येतील ऐसे बोलण्यात आले आहे.
जाम आहे त्यासुद्धां द्यावा. कलम १ आहे. त्याच्यांनी बेहेबुद्धी होत नाहीं,
चवरागड पन्नास हजार रुपयांचा सबब पोक्त सरंजाम पाहिजे, याजकरितां
सरंजाम खालीं आहे त्यासुद्धां द्यावा, रिता खर्चापुरती बेगमी जाली पाहिजे.
येणेंप्रमाणें करार करावें. करार. हिजे. कलम १
फौज तीन हजार याणीं चाकरी मसलत संबंधे खर्चाबद्दल येतांना
करावी हा पूर्वीचा तह आहे. तो माहालीं आठ लक्ष रु।। द्यावे व भेट
करार सेनाबाहादर यांचा होता. जाहलियावर सातलक्ष. एकूण पंधरा
आतां आह्मांस कृपा करून मंडले लक्षांचा करार. त्यापैकीं माहाली
देण्यांत येत आहे. तेव्हां फौजेची येतांना च्यारलक्ष रु।। तुह्मी घेतलें.
चाकरी माफ करावी. कलम. १ बाकी अकरा लक्ष रुपये द्यावयाचे. हा
तीन हजार फौज सरकारांत मस- लत ऐवज मंडल्याचे नजरेचा ऐवज तुम्हांकडे
असतां चाकरीस यावी. मसलत येणें, त्यांत मजूरा दिला असे.
नसतां माफ केली जाईल. मातबर येणेप्रमाणें करार करावें, करार.
मसलतीस सेनासाहेबसुमा यांणीं खाशानीं नवाब निजामअल्लीखाबहाद्दर
यावें, हा करार पेशजीचा आहे तो आहेच. याजकडील तह खङर्याचे मुकामीं
येणेंप्रमाणें करार करावें. करार कैलासवासी रावसाहेबांनी करून
संस्थानिक व विसाजी बल्लाळ दिल्हा आहे. कदाचित् नबाबाचा व
नवस आदीकरून अठ्ठेचाळीस आपली तह जाला कीं, कमती करून
हजार रु।। ठराऊन मनमाने तह करावा तर आमचे कडील जे
तैसे याचे परगणे अमुके द्यावे ऐसा जाबसाल ठरले आहेत ते झाडून
करार करून घेतले आहेत. त्यास, उगऊन द्यावे. त्यांत कमती होऊं नये
येथें वाकीफगारी नव्हती. त्यास दहा कलम १
बारा हजार रुपये ठराऊन आह्मांस आपल्याकडील नवाबासी तह ठरला
सांगावें. म्हणजे एका परगणियात आहे त्याप्रों नबाबासीं बोलून
नेमणूक करून देण्यांत येईल. कलम १ तह चालेल, येणेंप्रों। करार करावें.
संस्थानिक व विसाजी बल्लाळ व करार.
ननस आदिकरून अठ्ठेचाळीस हजार सरकारचे माहालांत घांसदाणा
तीनसें रु।। पेशजीचे करारांत आहेत घेऊं नये. त्याचेबद्दल सरदेशमुखी
त्याप्रों सरकारांत माहाल मंडले पो प्रांत वराड आहे. तहाशिवाय नवाबा-
लाऊन द्यावा. येणेंप्रों करार करावें. कडून घांसदाण्याचा करार अधिक
करार. कसा होईल, येणेंप्रों करार करावे.
गंगाथडीबद्दल दस्ताऐवज कैलासवासी करार.
आप्पासाहेबांचे व आमचे आहेत मार्गात येतांना सरकारचे महालांत
ते न मागतां माघारें द्यावें. कलम १ कोठकोठें ऐवज घेण्यांत येईल. त्या स
दस्ताऐवज माघारे द्यावें. सरकार जो करार जाला आहे त्यांत मजरा
माहालीं घासदाणा घेऊं नये. येणेंप्रों। घेऊं नये. कारण फौजेचा स्विसारा
करावे. करार. अतिशय जाला. सर्व प्रकारें
मंडल्याबद्दल चोवीस लक्ष रुपये, लाचारी आहे. कलम १
वर्तळ्याबद्दल दोन लक्ष द्यावे, ऐसा मसलतसंबंधें खर्चाचे ऐवजाची
करार आहे. तेव्हां सवीस लक्ष रु।। मखलासी सदरीं जाली आहे. त्यास
लोभें करून माफ करावें. कलम १ सदर्हू कलमांची मखलाशी उगवली
पेशजीं मंडल्याबद्दल ऐवज घ्यावयाचा असे. येणेंप्रमाणें करार करावें. करार.
करार जाला आहे. ती बेरीज रुपये. मौजे सिरापूर भीमातीरीं आहे.
२५००००० ऐन नजर. तेथें कुरण आहे. पागेचे उपयोगी असे.
२००००० वर्तळ्या बाबद. याजकरितां दरोबस्त गांव देवावा.
------------------
२७००००० कलम १ वरकड कलमें पेशजी परस्परें
पौ वजा रुपये करारांत आहेत त्याप्रमाणें बहाल व हर
३००००० बुंदेल्यास पेशजीं शिबं. करार, येणेंप्रमाणें करार करावें. करार.
दीबद्दल देविले आहेत मंडले व चौरागड सरकारांतून
ते रुपये. रघूजी भोंसले सेनासाहेबसुभा यांस
११००००० हालीं मसलतीबा। सरकारांतून दिल्हा, त्याविशीं बाळाजी गोविंद
द्यावयाचा करार बुंदेले यांस सनद वे जमीदार यांस
रु।। १५०००० पत्रें लागतील तीं देवावीं. देणें.
पौं महालापासून घेतले
४००००० बाकी रु।।.
-------------------------------
१४००००० बाकी रु।। १३००००० तेरा लक्ष रु।।
सरकारांत सेनासाहेबसुभा यांनी द्यावे.
येणेंप्रमाणें करार करावे. करार.
छ. २४ रमजान, सन सबा तिस्सैन मया व अल्लफ, फाल्गुन मास, मुकाम पुणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४५
श्री १७१८ फाल्गुन वद्य ५
सरकारचें पत्र जेः तुझी पेशजी एक दोन पत्रें सरकारांत पाठविलीं. त्यावरोन खातरजमेचीं पत्रें सरकारांतून पेंशजी रवाना केलींच आहेत. हाली तुह्मी
पत्रें सरकारांत व राजश्री रायाजी पाटील याचें नांवें पाठविलीं. त्यांस, पाटलाचे व सरकारचें पत्र परस्पर राजश्री धोंडीबा जामदार याचे मारफतीनें राजश्री कृष्णाजी सेटे याचे विद्यमानें मनन केलीं. त्यांत लिहिलें कीं: पहिल्या सरकारच्या पत्रांवरून लस्करांत यावयाची सिद्धताच केली होती. परंतु आग-याचे किल्याची बदनजर धरली, म्हणोन येथें कोणी समजाविलें. त्यांस लोकांनीं लहानमोठ्या चाक-या केल्या. त्यांस बक्षिस वगैरे मिळालें व आह्मी सरकार चाकरी आग-यास व मारवाडांत वगैरे केली व वरचेवर करित असतां, परिणामीं हरामखोरी बक्षीस प्राप्त जाहली. व फौजेतून निघाल्यास माघे दतियेवालें यांणीं एक दोन गांव खालशाचे मारले, त्यामुळें चैन पडत नाहीं. त्याचें पारपत्य करून, पुढें दोन महिन्यानंतर हुजूर यावयास आज्ञा पाहिजे. म्हणजे समक्ष विनंति करून कितेक निखालसतेच्या गोष्टी समजावीन. पुढे सरकारांतून करणें तें करावें. म्हणोन लिहिलें. त्यांस सैन्यांतून तुह्मी निघोन जावें, असा सरकारचा पेंच तुम्हाकडेस नाहींच. तुह्मी गेलो तेव्हां आग-याचा वगैरे बंदोबस्त सरकारांतून आलाहिदा करणें पडतो. ऐसीयासी, पहिल्यापासून सरकारचाकरी तुह्मी येकनिष्ठपणें केलीच आहे. त्याप्रमाणें आतां करावी. आणि हें पत्र पोहचलें म्हणजे तुम्ही खातरजमेनसी फौजेंत येऊन सरकारचाकरी पहिल्याप्रमाणें करीत जावी. येथें सरकारचाकरीच्या उपयोगाच्या माणसाचीच गरज आहे. तेथील वर्तमान वरचेवर कच्चें धोंडीबा जामदार व कृष्णाजी सेटे यांचे विद्यमानें सरकारांत लिहीत जावें. येथें फौजचा वेढा, तेव्हां परिणाम कसा लागेल ? तशांत, दरबारांत वशिला नाहीं, असे अंदेशे कराल, तर चिंता न करावी. येथून तुमच्या लिहिल्या अन्वयें पुरवणी होईल. आग-याचें कामकाज पहिलेप्रमाणें तुम्ही लस्करांत आला म्हणजे सनदा करून पाठऊं; व राजश्री देवजी मुकुंद यासहि तुमच्या जाण्यामुळें प्रतिबंध सरकारांतून केला होता तोहि दूर होईल. या लिहिल्याची खातरजमा ठेऊन लस्करात यावें. तुम्हाविसीं कोणी येथें हरएकविसी गैरवाका समजविल्यास येथें गैरवाका समजल्यांत येणार नाहीं. चिंता न करावी. म्हणोन पत्र.
परवानगी समक्ष कृष्णाजी व धोंडीबा जामदार, छ १७ रमजान, सन सबा.