Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५४ ] अलीफ. ११ मे १७०७.
सर्व राजात श्रेष्ठ, सर्व उमरावांत थोर, मुसलमानी धर्मरक्षक, राजे शाहू याणीं बादशाही सरकारास संतोष मानून समजावें कीं, महंमद अजीम मारिला जाऊन इकडील फत्ते झाल्यानंतर काय मा। झाले ते लिहिण्यांत येत आहे कीं, खुजस्ते बखतर याचें दैव फिरल्यामुळें त्याणें आपले कामगारांचे सांगणें ऐकून इकडील लोभावर लक्ष न ठेवितां लढाईस आला होता. तो छ १० सफर रोज सोमवारीं आपले पुत्रासुद्धां मारला गेला व कितेक लोक कांहीं कामास आले ऐशियास तुह्मीं या गोष्टीचा संतोष मानून अशी ताकीद ठेवावी कीं, तुमचे फौजे पै।। कोणी पादशाही मुलखांत पैगामा करुं नये आणि रयतेस इनाम देऊन हे सर्वकाळ इकडील लोभास आपले उद्योगाचे कारण समजत जावें. छ १९ सफर, सन १ जुलूस.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४९२
श्री. १७२१
पु।। विनंती उपरी.
करवीरचा मजकूर तरीः येथे श्रीमंत राजश्री सिंदे याजकडे तिकडील बोलणाराचें बोलणें या सर्जेराव घाटगे वगैरे यांचे विद्यमानें पडोन रा।। विस्वासराव घाटगे सर्जेराव यांणीं व राजश्री जोसीराव यांणीं येथें जलदीनें यावें आणि तेहाचें बोलणें बोलावें. तोंवर पंधरा रोज गोळागोळी होऊं नये. ऐसीं पत्रें सिंदे यांजकडील तेथें गेली आहेत ह्मणोन आइकण्यांत आहेत. शिवाय बाजारांत बोलणीं आवाया बोलतात कीं, वीस लाख रुपये करार करावे. पो तूर्त निमे दहा द्यावे. यांत निमे सरकार व निमे सिंदे. या खेरीज कलमें काय असतील ते असोत. परंतु चिकोडीमनोली तालुके राजमंडलाकडे राखावे, अशीं बोलणीं या आवाईत आहेत. याकरितां तुह्मांस फार कळावें, ह्मणून सूचनार्थ लिहिणें आहे. पायाशुद्ध तह जाहालियास, सर्व यथास्थित आहे. परंतु कैसें घडेल, तें पाहावें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४९१
श्री. १७२१
सेवेसी सां नमस्कार विज्ञापना ता। मंदवार पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. काल निरोप घेऊन आलों ते अस्तमानी पोंहोंचलों. चिरंजीव रा. नरहर बापू शहरांत भेटले. त्यांणीं सांगितले कीं, मी कामगिरीस जातों. तेथून आल्यावर पत्र देईन. ते लष्करांतून चंद्रोदयीं निघोन नगरास गेले. फडणीस तेथें होते त्यास नेलें. बरोबर फौज आहे. हें वर्तमान श्रीमंतास आज कळलें, त्याजवरून मर्जी दिक्क आहे. रा. बाळोजीबाबा सकाळीं वाड्यांत जाऊन लष्करांत गेले आहेत. नगराहून बक्षी व बाळोबातात्यास आणावयास सांगितलें आहे. आज गोविंदराव बापू यांचे घरीं हुजरातचे लोक बसले आहेत. दोन आठवडे व येक दुमाही देतों, ऐसा करार परवां करून वाड्यांतून लोक त्यांणीं उठऊन आणिले. त्यास आठ दिवस जाहले. ऐवजाचा फडशा करून द्यावा ह्मणोन बसले आहेत. आबा शेळूकर यांस सुभ्याचीं वस्त्रें परवांचे दिवसीं जाहलीं. साते-यास कारभारास तात्या जोशी पो होते. येथें आणविले आहेत. रावसाहेब यांचा अद्याप मुक्काम आहे. कुच्य जाहालें नाहीं. बाजीपंत आंणाचे लेक तात्या पळोन गेले. बाळोजीबावांनी च्यंदनचा किल्ला महिपतराव मामास सांगितला, काल वस्त्रे दिल्ही. यांची प्रकृति बरी आहे. कंपूचें कुच्य होऊन हडपसरावर गेला आहे. करवीराकडे त्यास मोहीम सांगितली. याप्रों वर्तमान आहे. पिकली पानें पांचशें पा। आहेत. केशर मागाहून घेऊन पाठवितों. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४९०
श्री. १७२१
यादीः शेषाद्री सिंहराज याजकडे नवाब निजाम अल्लीखान बाहादूर यांचे सरकारांतून इनामी गांव वंशपरंपरेनें अनुभव करावा म्हणोन सनद जाली आहे व जातीस जागीर आहे. त्यांस घांसदाणा श्रीमंत राजश्री सेनासाहेबसुभा त्यांजकडील आहे. तो सेनासाहेबसुभा यांणी माफ करून, इनामी गांवचा इनाम वंशपरंपरेनें करून देविला पाहिजे व जातीस जागीर आहे तेथील मा।रनिलेचे जातीचे इनामी सनदा व जातीचे जागीरीच्या अलाहिदा सनदा व्हाव्या. सु।। मयातैन व अल्लफ. गांव तपशील:-
२ इनामी गांव पो पालीक उर्फ बेरनवट सरकार नांदेडपैकीं
१ मौजे फरकंडे
१ मौजे निंबेवाडी
------
२
५ जातीस जागीर देहेसुमार
४ पो च्यार ठाणे सरकारपैकीं.
१ मौजे देगांव.
१ मौजे बेरुळें.
१ मौजे सोनवटी.
१ मौजे पांढरगळें.
-----
४
१ मौजे नांदेडखोड, पो लोहगांव, सरकार पाथरी.
---- ------
७ ५
याचा तनखा रु।।
२०२५ इनामी गांव दोन.
१४५० मौजे फरकंडे.
५७५ मौजे निंबेवाडी.
------
२०२५
४४०० खासगत जागीर.
३००० पो चार ठाणें पौ दोहे चार याचा तनखा एकंदर
१४०० मौजे नांदखेड पो लोहगांव सरकार पाथरी देहे १
-------- ----------
६४२५ ४४००
याजविषयीं सनदा व पत्रें सुमार.
५ इनामी गांवच्या इनाम वंशपरंपरेनें म्हणोन.
१ शेषाद्री सिंहराज याचे नांवें.
१ जमीदाराचे नांवें.
१ कमावीसदार घांसदाणीयांचे नांवें वर्तमान भावी पत्र द्यावें जे, पा। पालीम व लोहगांव येथील घांसदाणीयाचा आद आहे त्या पो दोन गांवचा घांसदाणीयाचा ऐवज सरकारांतून मारनिलेस इनाम करून दिल्हा आहे. त्यास, पा। मारचे चुकोती. पैकी मजरा देऊन, बाकी ऐवज घ्यावा.
२ मुकदमाचे नांवें.
-----
५
२ जागीरीचे गांवाविषयी मा।रनिल्हेचे जातीस सरकारचा घांसदाणा माफ केला असे, म्हणून सदरहू अन्वयें पत्रः
------
७
१ शेषाद्री सिंहराज याचें नावें.
१ वर्तमान भावी कमावीसदार यांचे नांवें.
-----
२
एकूण सात पत्रें श्रीमंतास विनंती करोन सालमजकुरी उपद्रव व ऐवज न देणें पडे, ऐसें व्हावें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
त्यावरी देशकांनीं सत्य स्मरोन वृत्तीचा करीना सांगितला कीं, तर्फ मजकूरचें वतन देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण पूर्वी विठ्ठल माद शेणवी याची, त्यास त्याच्या वडिलावरी पूर्वी दिवाणचा कसाला पडिला तेव्हां रामाजी विठ्ठल शेणवी व कृष्णाजी बाब शेणवी व अंताजी मल्हार शेणवी यांच्या वडिलांनी देशकुळकर्णाची व गांवकुळकर्णाची तिसरी तकषीम विकत घेतली. त्या दिवसापासून तिसरे तकषिमेचा भोगवटा त्यांचा चालत आला आहे, त्यास विठ्ठल माद शेणवी मृत्य पावला, त्याचे पोटीं कोणी संतान नाहीं, अथवा त्यास कोणी दाईज गोत्रज नाही, नकल, वृत्ती दिवाणची, धणियानें तुमास दिली, तरी दोनी तकषिमा विठ्ठल माद शेणवी याच्या देशकुळकर्ण व गावकुळकर्ण तुह्मीं अनभवणें, एक तकषीम देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण विठ्ठल माद शेणवी याच्या वडिली रामाजी विठ्ठल शेणवी व कृष्णाजी बाब शेणवी व अंताजी मल्हार शेणवी यांच्या वडिलास विकत दिली, त्याप्रमाणे विभागाचे गांवहि पूर्वीच वाटले आहेती ऐसें सांगितलें तें मनास आणून. त्याउपरि देशक तर्फ मजकूर व गोत बसवून आह्मांस वतनाचा करीना पुसतां आह्मीं सांगितला कीं, तर्फ मजकूरचे देशकुळकर्ण व गावकुळकर्णे विठ्ठल माद शेणवी याच्या वडिलाचीं असतां त्याच्यापासून आपल्या वडिली देशकुळकर्णाची व गांवकुळकर्णाची तिसरी तकषीम विकत घेतली तदारभ्य आमचा भोगवटा तिसरे तक्षिमेचा चालत आला आहे, आह्मीं काही विठ्ठल माद शेणवी याचे दाईज गोत्रज नव्हे, तुह्मास महाराज राजश्री साहेबी, विठ्ठल माद शेणवी निपुत्रिक, त्याचे वौशीं कोणी नाहीं, वृत्ती दिवाणची ह्मणोन तर्फ मजकूरचें वतन विठ्ठल माद शेणवी याचे, ऐसें समजोन दिल्हें, त्याउपरिं तुह्मीं आपला मुतालीक तिमाजी गोविंद वतनावरी पाठविला, ता वतनाचा कारभार करूं लागला, त्याची आमची कटकट जाहाली, धणी चंदीस दूर प्रांतें असता हा करीना आह्मीं कोणास सांगावा, याकरितां आह्मीं बाहीर पडोन देशावरी गेलों होतों, ऐशियास विठ्ठल गाद शेणवी याच्या दोनी तक्षिमा देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण आमची तिसरी तक्षीम देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण येणेप्रमाणें पूर्वापार भोगवटा आहे, त्याप्रमाणे तुह्मी आपल्या दोनी तक्षिमा वतन अनुभवावे आमची तिसरी तक्षीम आह्मांस द्यावी, ह्मणजे तुह्मीं आह्मीं समाधानरूप असोन आपल्या विभागाप्रमीणें वर्तावें. ऐसें आह्मीं सांगितलें. त्यावरून देशक तर्फ मजकूर व समस्त गोत यांनीं करीना मनास आणून तुह्मांस सांगितलें कीं, याच्या वडिली तिसरी तक्षीम विकत घेतलें आहे, त्याप्रमाणे भोगवटाही चालला आहे, तिसरी तक्षीम देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण पूर्वी विभागही जाहाला आहे, त्याप्रमाणे याचा यास देऊन तुह्मीं उभयतांनीं समजावें. त्यावरून आमच्या वडिलीं वतन विकत घेतलें, भोगवटाही पूर्वीपासून चालत आला आहे, याकरिता आमची तिसरी तक्षीम आह्मांस देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण तर्फ मजकूरची पूर्वील वाट्याप्रमाणें दिली. आह्मीं आपली तिसरी तक्षीम अनुभवून सुखरूप असावें. तुमच्या दोनी तक्षिमा वृत्ती देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण तुह्मीं अनुभवून असावें याप्रमाणे तुह्मी आह्मीं समाधाने असावें. याउपरि तुह्मां आह्मामध्यें कथळा नाही ऐसें करून तुह्मीं आपलें पत्र आह्मांस लिहून दिलें, आह्मीं हें आपलें पत्र तुह्मींस लिहून दिलें याउपरि ज्याकडोन अतर पडेल तो गोताचा अन्यायी पान, मान, तश्रीफ, आधीं तुमची, दुसरी आमची देशकुळकर्णाचा कारभार तुह्मीं आह्मी दिवाणांत करावा दफ्तर तुमचे घरीं असावें दिवाणातून पुढे वतनामुळे तुमा आमास मोडीमोडी होईल तें तक्षिमेप्रमाणें वाटोन घ्यावें सदरहू लिहिलेयाप्रमाणे देशक तर्फ मजकूर व गोत याच्या विद्यमानें तुमी आमी समजलों आणि आपले रजावदीनें एकमेकास पत्रे लिहून दिलीं असेती त्यास अन्यथा नाहीं. हें पत्र. सही छ १ माहे शाभान, सु।। सीत मया व अलफ वळी पत्रलेखन, सुमार १३३, एकशे तेत्तीस. याखेरीज सद वळी ३ तीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४८९
श्रीगणेशायनमः १७२१ फाल्गुन शुद्ध १३
श्रीकुलदेवतायैनमः श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यैनमः श्री जुगादैत्यैनमः श्रीसिद्धेश्वर व श्री विपलेश्वर व श्रीधूतपापेश्वर स्वामीचे सेवेसीः-
चरणरज सिद्धेश्वर महिपतराव चींचलकर कृतानेक सां नमस्कार विज्ञापना तागाईत माघ बहुल सप्तमीपर्यंत स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असों, विशेष. विनंति ऐसिजेः-खासगत लग्नाचा निश्चय फाल्गुन शुद्ध त्रयोदशी सोमवारीं करून शरीरसंमंध वेदशास्त्रसंपन्न राजश्री सिद्धेश्वर दीक्षित ठकार यांसी केला आहे. औशास, आपण सर्व कुलस्वामी व अध्ययांनी येऊन न्यून असेल तें पूर्ण करून कार्यसिद्धी केली पाहिजे. सर्व अभिमान आमच्या स्वामीस आहे. कळावें बहुत काय लिहावें ? सेवेशी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४८८
श्री. १७२१ माघ शुद ५
राजश्री विश्वासराव नारायण गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित दौलतराव शिंदे विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहीत जावें. विशेष राजश्री आपाजी रामचंद्र मालगांवकर यांचा व जोती मोरेश्वर यांचा देण्याघेण्याचा लढा आहे. त्यांस उभयतांची बोलणीं तुमचे विद्यमानें जालीं असतां, हाली जोती मोरेश्वर आपाजी रामचंद्र यांचे घरीं उपद्रव करत आहे, म्हणोन विदित जाहलें. त्याजवरून हें पत्र तुम्हांस लिहीलें असे. तरी तुमचे विद्यमानें बोलणीं जाली असतां, घरी जाऊन उपद्रव करावयाचें प्रयोजन काय ? तरी त्याचीं माणसें यांचे घरीं बसलीं असल्यास, बेमुरवत उठऊन देणें आणि पुन्हां याचे घरीं उपसर्ग होऊं न देणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. रा। छ ४ रमजान, सु।। मयातैन व आलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४८७
श्री १७२१ आश्विन शुद्ध ७
वेदशास्त्रसंपन्न राजश्री नारायण दीक्षित स्वामीच सेवेसी:--
विद्यार्थी बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. तुम्हांकरितां विजयादशमीच पोशाख.
सनगे सुमार.
३॥. तुम्हास
१ तिवट पैठणी.
१ जाफरखानी.
१ महमुदी.
.।।. किमखाप.
------
३॥.
३॥. यज्ञेश्वर दीक्षित यांस.
१ तिवट पैठणी.
१ जाफरखानी.
१ महमुदी.
.॥. किमखाप.
३॥.
----
७
येकूण सात सनगें पाठविली आहेत. घेऊन पावालयाचें उत्तर पाठवणें. जाणिजे. छ ५ जमादिलावल, सु।। मयातैनवअलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४८६
श्री. १७२१ भाद्रपद शुद्ध ३
मा। अनाम देशमुख व देशपांडे, पो आकोट, प्रांत वराड, यांस बाजीराव रघुनाथ प्रधान. सु।। मया तेन व अलफ. मौजे खुडगांव, पो मजकूर येथील निमे अमल रामचंद्र दादो, दी।। राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब, यांजकडे सरंजामास चालत होता. त्यास, ते मृत्यु पावले, सबब सदरहूं अंमल सरकारांत जप्त करून, जप्तीची कमावीस राजश्री त्रिंबकराव अमृतेश्वर यांजकडे सांगितली आहे. ते दूर करून सालमजकुरापासून राजश्री नारायण बाबूराव मौजे मजकूरचा निमे अंमल जातीचे तैनातेंत बदल मुशाहिरा करार करून दिल्हा असे. तरी तुह्मीं मशारनिल्हेसी रुजू होऊन, अंमल सुरळीत देवणें. जाणिजे. छ १ रबिलाखर. आज्ञाप्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३० १६१९
(फारसी मजकूर आठरा ओळी)
महजरनामा अज थाने सुपे सा। जुनर सुबे खुजस्तेबुनियाद सु॥ सन ११०७ बिहुजूर आहालीमवाली बिता।
हजरत काजी शरा माहाराज राजश्री दिवाण
दलसिंगजी फौजदार
पा। मा।र
दा। गिरजोजी आनंदराऊ दा। रामाजी बाबाजी व
आ। देसमुख प्रा। मा।र देवाजी त्रिंबक देसपांडे
प्रा। सुपे
कुतवल व खंडोजी चानगुडे
व मल्हारजी खैरे व काळोजी
भोडवे मोकदम व माहाजन सेटे
का। सुपे
(निशाणी नांगर)
अग्रवादी पश्चमवादी
काकोजी बिन हिरोजी माणकोजी बिन मेऊजी
तकरीरकर्दे अग्रवादी काकोजी बिन हिरोजी आटोले तकरीर केली ऐसी जे आपला मूळपुरुष मेगनाक त्याचे लेक दोगजण वडील साऊनाक धाकला हीरनाक साऊनाक पडिला तो वणगोजी नाइकाचे वेळेस भाडण जाले ते वेळेस पडिला त्याउपरि हीरनाक धाकला होता त्याणे पाटिलकी केली हीरनाक पाटिलकी करिता दस्तूरखाने दिवाणे गर्दन मारिली मग साऊजीचा लेक जैतजी पाटिलकी करू लागला जैतनाक पुणा वणगोजी नाइकाचे भाडणी पडिला पुढे त्याचा भाऊ धाकटा काकोजी त्याणे पाटिलकी केली काकोजीला दाईजाने वीख घातले तो मेला मग माणकोजीचा पणजा मेगनाक पाटिलकी करू लागला तो मेलियावरी आपला बाप हिरोजी गोरा कारभार करू लागला मग गोजेबावीचे मोकदमीचे भांडण पडिले त्याबदल आपला बाप तेथे गेला व माणकोजीचा अजा हिरोजी गावी ठेविला दोघे भाऊ एकमुख होऊन रायाराऊ दौलतमंगळियापासी भांडण पडिले गाव घेतला त्यास पुढे हिरोजी भांडो लागला गोत कात्राबादमांडोगणास घेतले तो राजीक जाले राजिकाकरिता गाव वोस जाला तो तीस वरसे पडिला होता हाली दिवाणे कौल देऊन गाव भरिला आपण गावी आलो भांडत आहो जे आपले वडीलपण खरे हे तकरीर सही
(पश्चमवादी माणकोजीची हि तकरीर अशी च आहे)
सदरहूप्रमाणे तकरीरा हरदूजणी केलीयाउपरि हाजीरमजालसीने पुसिले की तुह्मी कोणे गोस्टीस राजी आला त्यावेरी हरदोजणे गोतमाहास्थळ मौजे पिंपरी गुरो थळ मागितले की आपणास गोत देणे तेथे गोत हरदोजणास सांगेल त्याप्रमाणे वर्तोन ह्मणऊन राजी जाले पिंपरीस जाऊन पांच महिने बैसोन गोते हरदोजणाच्या तकरीरा व कितेक फाते जे मनास आणावयाचे ते आणिले सेवट गोताजवळी गावीचे च सडीस राजी जाले त्यावरून गोते मौजे मजकुरास सडी लिहिली, की समस्त मोकदम व दाही जण व बलुते व मोख्तसर श्रीदेवाचे विहिरीत आंघोळी करून तुळसीच्या माळा गळा घालून आपले लेक हाती धरून तुमचे माथा मागीमाहारीचे अशुध असे चांभारकुंड व डोंबरकुंड व रंगारकुंड वोढून सात मंडले वोढून, त्यात उभे राहाणे श्रीदेवाचे रंगसिळेवर उभे राहाणे तुह्मास गोहत्या ब्रह्महत्या असेती व गुरुद्रोही मात्रागमन सुरापान तुमचे पूर्वज स्वर्गी वाट पाहात आहेत की पुत्र सत्य वदोन उधार करील किंवा लटिके बोलोन नर्की बुडवील धर्मे आपला पिता उधरिला श्रीरघुनाथे पितियाची भाक सत्य केली तैसा तुह्मी आपल्या पूर्वजाचा उधार करून सत्य वदोन नेमस्त करून हरदोजणांत कोणाचे वडीलपण ते लेहोन पाठविणे सडीचे प्रतिउत्तर लेहोन पाठविणे त्याप्रमाणे
१ समस्त भाऊ
१ जथे चौगुले मेळगर
१ कुळे
१ जथे माळी
१ जथे गोलाड
१ बलुते
यानी गाही दिधलिया जे वडीलपण अमक्याचे इ. इ. इ.