Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक १४३

पौ अधिक वद्य ४ शुक्रवार,
श्री. १६९६ अधिक वैशाख शुद्ध १३

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूराव स्वामीचे सेवेसीः-

पोष्य जिवाजी माहादेव काणे कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत. जाणें. विशेष. आपणांकडील पत्रें बहुत लोकांस येतात. परंतु आमचें स्मरण होऊन पत्र येत नाहीं. याजवरून अपूर्व वाटलें. तुमचा आमचा स्नेह तैसा नाहीं जें विस्मरण पडावे. परंतु कालमहिमा आणि कारभारसंबंध याजमुळें विस्मरण जाहालें असेल! तरी ऐसें न करितां हरिघडी कृपापत्रीं संतोषवीत जावें. आमचें वर्तमान तागाईत छ १२ माहे सफर पावेतों सैन्यांत सुखरूप असों. स्मरण करून पत्र पाठवीत जावें. येथें लक्षुमणपंत आहेत, त्यांशीं बहुत स्नेह आहे. सर्व प्रकार तुह्मांकडील ल्याहावा. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.

पत्रांक १४२

पौ अधिक वा ४ शुक्रवार.
श्रीशंकर. १६९६ अधिक वैशाख शुद्ध १३

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामीचे सेवेसीं:-
पो कृष्णराव नारायण सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता छ १२ सफर जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. आपण पत्र तीर्थरूपांस पाठविलें तें पावोन लिखितार्थ कळों आला. श्रीमंत मातुश्री गंगाबाईस पुत्र जाहाला, ह्मणून लिा. त्यावरून संतोष जाहाला ! त्याचा विस्तार कोठवर ल्याहावा ? जगन्निवासे प्रजेचें पालण करणार उभे केले ! आतां योजिलें कार्य थोडेच दिवसांत घडोन येईल ! वरकड सविस्तर राजश्री लक्ष्मणपंतदाद यांनी लिा आहे, त्यावरून कळों येईल, तीर्थरूप राजश्री नानासाहेब अद्यापि येथें येऊन पावले नाहींत. एक दोन रोजीं येतील. टोंक्यास आलियाची बातमी आली होती. सत्वरच येतील. राजश्री बापूंचा व नानांचा कागद राजश्री सेनासाहेबसुभा यांस आला नाहीं. पुत्र जोहालियाचें वर्तमान राजश्री हरीपंत तात्यांनी सांगून पा होतें व आपलें पत्रही आलें, त्यावरून त्यांसही फारच संतोष जाहाला. हाल्लीं उभयतांची पत्रें यजमानास पा द्यावीं. वरकड़ रा दादांनीं लिा आहे, त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा. हे विनंती.

स्वामीचे सेवेसीं पोष्य बाळाजी गणेश कृतानेक साष्टांग नमस्कार, विनंती. लिा वरून सविस्तर कळों येईल. आपलीं पत्रें येतात. परंतु माझें स्मरण पत्रीं होत नाहीं. सेवकास उमेद तों मोठी होती. परंतु पत्रींच विसर ! तेथें वरकड गोष्टी कशा घडतील ? मर्जीस आलियासी कृपापत्रीं सांभाळ करीत जावा. सुज्ञांस विस्तार लिहिणें लागत नाहीं. बहुत काय लिहिणें? कृपेची वृद्धी करावी. हे विनंती.

सेवेसीं गणेश नारायण सां नमस्कार विनंती लिा परिसोन सेवकांचे विस्मरण नसावें. हे विनंती.

पत्रांक १४१

श्री. १६९६ अधिक वैशाख शुद्ध १३

आशिर्वाद उपरी, खंडू लिजमतगार यास इनाम पंचवीस रुपा सरकारांतून दिल्हे. त्यास, वाटेने गडबड. याजकरिता येथे आह्मांपाशीं दिल्हे आहेत. त्यास, यास रु २५ पंचवीस तुह्मीं तेथे द्यावे. मिती अधिक शुद्ध १३, जय नाम संवत्सरे. हे आशिर्वाद.

पत्रांक १४०

पौ अधिक वद्य ४ शुक्रवार
श्री.
१६९६ अधिक वैशाख शुद्ध १३

राजश्री बाबूराव विश्वनाथ वैद्य गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नौ साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय कळला. मातुश्री गंगाबाई अधिक वैशाख शुद्ध ७ सप्तमी इंदुवारीं प्रसूत जाहाली. पुत्ररत्न जाहालें, ह्मणोन लिहिलें. त्यास गुरुवारीं प्रातःकाळीं में संतोषाचें वर्तमान राजश्री हरी बल्लाळ यांजकडे आलें. श्रवण होतांच आनंद, श्रुष्ट * भरून उरवरीत जाहाला. त्याचा तपशील काय लिहावा ? उछाव आज दोन तीन दिवस; नौबती, सरबत्ती, यंत्रांचा गजर, व शर्करा लष्करांत वांटिल्या. नबाब निजामुद्दौले आदिकरून समारंभ जाहाला. जगदात्मा कृपावंत होऊन कुलदीप उदय केला. त्यास आयुष्यवृद्धी करो ! सर्वांस आधार : देवानें केला. जगन्निवास पुढें उत्तम उत्तमच करील! येथून दरकूच कार्योद्देशास जात असों. राजश्री नानाजी कृष्ण अद्याप पावले नाहींत. उदयीक येणार, भेटीनंतर कळेल. या छ १२ माहे सफर. बहुत काय लिहिणें? हे विनंती.



पत्रांक १३९

पौ अधिक वा ४ शुक्रवार
श्री.
१६९६ अधिक वैशाख शुद्ध १३

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी दादा स्वामींचे शेवेसीं:-

पौष्य भवानी शिवराम कृतानेक सां नमस्कार विंनती उपरी येथील कुशल अधिक शुद्धत्रयोदशी रविवार मुा नजीक सिंखेड जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय यजमानसाहेबांच्या पत्रासह कळला. श्रीमंत मातुश्री गंगाबाई यांसीं सप्तमी इंदुवासरीं पुत्ररत्न जाहलें, ह्मणोन लिा. त्यास विद्यानगरी एक वेळ सुवर्णवृष्टी जाहली ! अह्मांवर वारंवार देव करितो हाच उल्हास आहे !! परवां गुरुवारीं राजश्री तात्यांस सदरहु वर्तमानाचें पत्र आलें. त्याजवरून श्रीमंत राजश्री नांनासाहेबीं व नबाबांनीं व तात्यांनी पृथक पृथक् नौबतखाने सुरू केले. तोफ, यंत्रें, सरबत्त्या केल्या. अंबारिया व नौबता गजस्कंधीं टाकून शर्करा घांटिल्या. नृत्यादि समारंभ, गजर उछाह जाहाले. संतोष अपरंपार जाहला ! त्याचा तपशील काय लिहावा ? कुलदीपक देवानें लाविला! आमचे साहेबांस आनंद अन्योन्य जाहला ! देव त्यांस आयुष्य यथेष्ट करील ! सर्वांचे जीवन आहे. आह्यांस आधार बळकट जाहाला. आपण सर्व जाणतात. राजश्री नाना अद्याप आले नाहींत. उदयिक येणार, त्यांचे भेटीनंतर कळेल. येथूनही सविस्तर लेहूं. दरमजल नेमिल्या कामांस जात असों. कळावें. श्रीमंत राजश्री बापू व नाना यांसीं पत्रे लिहित होतों. परंतु राजश्री नानाजोशी येणार, त्यांची भेट होऊन त्या हातीं या अर्थी न लिहिलीं. आमचा साष्टांग नमस्कार सांगावा. सर्व प्रकारें या स्थळीं स्थापित आहों. आपण आमचा समाचार वारंवार घेत जावा, पदरचे असों. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.

इसवी सन १३१८ त अशी वस्तुस्थिति असल्यामुळे मुसुलमानांजवळ मराठ्यांना शिकविण्यासारखे कांहींच नव्हतें. ते राज्याधिकारी होते व त्यांची भाषा फारशी होती, तेव्हां व्यवहार चालण्याकरितां फरशीचा उपयोग दरबारांत होऊं लागला. पहिलीं पांच पन्नास वर्षे कोण्याहि ब्राह्मणानें, मराठ्यानें, किंवा कुणब्यानें ह्या मुसुलमान अधिका-यांची खासगी किंवा सरकारी कसलीही नोकरी केली नाहीं. मुसुलमानांची खासगी नोकरी चातुर्वर्ण्यांतींल मनुष्याकडून होणें अशक्यच होतें. परंतु द्वेषानें व अभिमानानें सार्वजनिक नोकरीहि कोणी करीत नसत. ह्याचमुळें मुसुलमानी अमलांत वेठीची जुलमी पद्धत अमलांत आली. वाटेल तें सार्वजनिक काम पाहिजे तेव्हां हव्या त्या माणसांकडून जुलमानें करून घ्यावयाचें हा वेठ या शब्दाचा अर्थ आहे. ही वेठ जेव्हां सुरू झाली तेव्हां संभावित ब्राह्मण व मराठे कालान्तरानें व निरुपायानें सरकारी नोकरी करूं लागले, व अर्थात् फारशी शब्दांचीहि ओळख करून घेऊं लागले. ह्यावेळी महाराष्ट्रांतील तालुक्यांच्या कमाविसदरांजवळ दुभाषांचे काम हिंदुस्थानांतील कायस्थ लोक करीत. इसवी सन १४१६ तील जे फारशी-मराठी कागद आहेत त्यांवर ह्या कायस्थ दुभाषांची नावें आहेत. महाराष्ट्रांत हे मुसुलमान आले ते येथें कायमचे राहिले व त्यांनी शंभर दीडशें वर्षांत बरेच लोक बाटवून मुसुलमान केले. शेवटी ह्या बाटविण्याची मर्यादा इतकी वाढली कीं, प्रत्येक खेडें, ओढा व डोंगराचें शिखर ह्याच्या आंत, जवळ किंवा वर मस्जीद, दर्गा किंवा पीर स्थापन झाला. हिंदूंचीं देऊळें व मुसुलमानांचे तकिये एकमेकाला येऊन भिडले. बाट्यांच्या, मुसुलमानी अधिका-यांच्या व फकिरांच्या तोंडून निघालेले फारशी शब्द महाराष्ट्रांतील सर्व लहानमोठ्या जातींतील लोकांच्या कानावरून हमेश जाऊं लागले व व्यवहारांत जिकडे तिकडे फारशी शब्दांचा सुळसुळाट झाला. शास्त्र, धर्म, नीति, आचार इत्यादि महत्त्वाच्या प्रांतांत फारशी शब्द मुळींच शिरले नहींत. वल्के, बाजार, दरबार, फौज, अदालत, सराफी, जमीन, जुमला, सावकारी वगैरे कारभाराच्या जागीं बोलल्या जाणा-या जबानींत फारशी शब्दांचा अंमल मामूर झाला. उदाहरणार्थ, घरासंबंधीचे कांही देतों. खाना, दार, सराई, इमारत, झनाना, दिल्ली दरवाजा, दरवाजा, दालन, हौद, दिवाणखाना, ओसरी, महाल, ऐनेमहाल, रंगमहाल, संदुकखाना, मुदबखखाना, आतषखाना, दिवाळ, देवळी, कप्पी, घुमट, जमीन, फारशी, तक्त, तक्तपेशी, हलका, कुलुप, खलबतखाना, किल्ली, छपर, आरक, घुसलखाना, तालीमखाना, तावदान, खजीना, अंबार, कारंजें, आबदारखाना, फवारा, बुरुज, गच्ची, चुनेगच्ची, पिंजरा, पलंग, खुर्ची, मेज, वगैरे. बाजार, दरबार, फौज, जमीन, वगैरे संबंधानेंहि असेच शेंकडो फारशी शब्द तेतां येतील. ते कोणच्याहि फारशी किंवा मराठी कोशांत सांपडण्यासारखे आहेत. मराठींत फारशी शब्द शिरले आहेत हें जगजाहीर आहे. परंतु ते कोणत्या बाबीसंबंधानें विशेष शिरले आहेत. त्याचा तपशील वर दिला आहे.

फारशी बोलणा-या मुसुलमानांचे राज्य महाराष्ट्रावर ३५० वर्षे होतें. त्याअर्थी मराठींत फारशी शब्द यावे ही सामान्य गोष्ट आहे. फारशीच्या व मराठीच्या सान्निध्यांत विशेष जो आहे तो निराळाच आहे. तो विशेष हा मराठींत बरेच विशिष्ट प्रयोग फारशीवरून आलेले आहेत. शफथ खाणें असा एक प्रयोग मराठींत करतात. शपथं गृह् असा प्रयोग संस्कृतांत आहे. शफथ घेणें असा मूळचा मराठी प्रयोग पूर्वी होता व सध्यां चालू आहे. परंतु खाणें ह्या क्रियापदाचा शफथेशीं जोड देण्याची कल्पना फारशी प्रयोगावरून मराठीत आली आहे फारशीत कसम् खुर्दन् असा प्रयोग असतो. कसम् = शफथ; खुर्दन = खाणें. हाक मारणें असा एक मराठी प्रयोग आहे. ह्याला जुन्या मराठींत बोलावणें व संस्कृतांत निमंत्र् असे शब्द आहेत. उचैःनिमंत्रणं कृ असाहि संस्कृत प्रयोग होईल. परंतु निमंत्रणं मारयति किंवा प्रहरति असा प्रयोग संस्कृतांत नाहीं. बांग जदन् म्हणून फारशीत प्रयोग आहे त्यावरून मराठीत हाक मारणें असा प्रयोग घेतलेला आहे बांग = हाक किंवा आरोळी; जदन् – मारणें. तसेंच याद राखणें असे मराठी संयुक्त क्रियापद आहे. तें याद दाष्तन् ह्या फारशी प्रयोगापासून घेतलें आहे. याद = आठवण; आणि दाष्तन् = राखणें. असें शेंकडो प्रयोग फारशीवरून मराठींत घेतलेले आहेत. उदाहरणार्थ खालीं कांहीं प्रयोग देतों. (तक्ताः पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पत्रांक १३८.

पौ अधिक वा ४ शुक्रवार
श्री.
१६९६ अधिक वैशाख शुद्ध १३

आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता अधिक शुद्ध १३ रविवासर मुा नजीक सिंखेड वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्रें खंडूबरोबर नवमीचीं पाठविलीं तीं काल मंदवारीं पावलीं. लिहिलें वर्तमान कळलें. श्रीमंत राजश्री सेनासाहेब सुभा यांस व भवानी शिवराम यांस पत्रें पाठविलीं तीं त्यांस दिल्हीं, उत्तरें पाठविलीं आहेत. पावतील. श्रीमंत मातुश्री गंगाबाई यांस पुत्ररत्न जाहालें, ह्मणोन लिहिलें. त्यास, तुमच्या पत्रापूर्वीं तीन दिवस तोफखाने यांचा सांडणीस्वार पत्रें घेऊन आला. त्यावरून संतोषाचें वर्तमान आईकोन, निजामुद्दौले व सेनासाहेबसुभा व हरीपंत तात्या व सर्व सरदार आबालवृद्ध यांस संतोष जाहाला! तो पत्रीं लिहितां येत नाहीं ! सरबत्ती व नौबतखाना सुरू करून शर्करा पृथक् पृथक् वांटल्या! ईश्वरें अमृतवृष्टी करून वंशावळी प्रस्पुलित केली ! तशांत, भगवंतास प्रजेचें पालण आणि धर्मसंस्थापना कर्तव्य आहेच आहे हा निःसंदेह जाहाला ! पुढें सर्वांचे मनोरथ सिद्धीस जातील, हे उमेद कुलवाद जाहाली! इकडील वर्तमान तरीः शहरपर्यंत मजलदरमजल नबाबसुद्धां आले. नबाबाचा मुकाम शहरासमीप जाहाला. वरकड फौजा चिखलठाणावर राहिल्या. दुसरे दिवशीं मुकाम नबाबामुळें सर्वांचे जाहाले, तिसरे दिवशीं राजश्री तात्यांनीं कूच करून फुलबारीवर गेले. सेनासाहेबसुभा यांचा मुकाम गवगव्यामुळें जाहाला. नबाबांनी शहरीं सावकारांपासून पट्टी करून घ्यावयाकरितां मुकाम केले. तात्यांनी फुलबारीवर मुकाम केला. सेनासाहेबसुभा कूच करून तात्यापाशीं आले.
नबाबही तिसरे दिवशीं आले. काल कुच सर्व फौजेचें तेथून जाहालें. आजही कूच जाहालें. मजलदरमजल योजिल्या कार्यास जात आहेत. परंतु श्रीमंत फार लांबले. गांठ कधीं पडत्ये तें पहावें. राजश्री आपाजीराव पाटणकर व वणगोजी नाईक व राजश्री नाईक निंबाळकर मध्यस्तीस श्रीमंतांकडून आले. तों उत्छाहाचें वर्तमान आलें. तेव्हां त्यांचें बोलणें निमे जाहालें, बहुधा वरपंग मध्यस्तीचा प्रकार, ऐसेंच दिसतें. समागमेंच आहेत. वरकड वर्तमान अधिकोत्तर ल्याहावें ऐसें नाहीं. बारशें जाहाल्यावर पेशवाईचीं वस्त्रें होतील. उपरांत फौजेंत यावयाचा मजकूर श्रीमंत राजश्री बापू व नाना यांचा होईल. उभयतां आल्यास आपलें येणें होईल. उभयतांचें येणें न झाल्यास एकटे बापूच आले तरी त्यांसीं येथील बंदोबस्त करून बोलोन घ्यावें. कामकाज होणें यथास्थित ममता करून दिल्यास पुढें नीट पडेल. याजकरितां सूचना लिहिली आहे. राजश्री हरीपंत तात्या कृपाच करितात. प्रस्तुत यांचे फौजेंत रोजमरेयाचा गवगवा आहे. सवालक्ष देतात. परंतु यांचें कांहीं होत नाहीं. ऐसें आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ किजे. राजश्री नानाचें पत्र नगरचें आलें. सत्वरच येतील. हे आशिर्वाद. सरकारची पत्रें सेनासाहेबसुभा यांस नाहींत. हें काय तें ल्याहावें. हे आशिर्वाद.

आतां मराठीत कोणत्या प्रकारचे फारशी शब्द विशेष शिरले तें पाहूं. ब्राह्मणी राज्याच्या पहिल्या अमदानींत महाराष्ट्रांत मुसुलमान सरासरी एक लाखापेक्षां जास्त नसावे. देशांत शांतता राखण्याकरितां आणिलेलें सैन्य बहुतेक मुसुलमानांचेंच होतें. तसेंच काजी, मुन्सफ, कमावीसदार, दिवाण वगैरे दरबारी, मुलकी व दिवाणी हुद्देदार मुसुलमानच होते. शिवाय कांहीं निरनिराळ्या धंद्यांचे म्हणजे तबीवी, सराफी, मुजावरी, वगैरे धंद्यांचेहि लोक मुसुलमानच होते. अशी ही मुसुलमानांची छावणी देशांतील राज्यकारभार चालविण्यास, शांतता ठेवण्यास व स्वकीयांच्या लहान मोठ्या गरजा भागविण्यास एक लाखापेक्षां फारशी जास्त नसावी.

ह्या एक लाख लोकांपैकीं सत्तर ऐशी हजार आडमुठे शिपाई व खालच्या दर्जाचे सेवक वगळले म्हणजे बाकी राहिलेले जे वीस पंचवीस हजार वरिष्ठ प्रतीचे संभावित मुसुलमान त्यांना महाराष्ट्रांत राज्य चालवावयाचें होतें. राज्य चालवावयाचें म्हणजे जमीन व धंदे ह्यांच्या वरील कर गोळा करावयाचा, आणि तत्प्रीत्यर्थ न्याय द्यावयाचा व बंदोबस्त ठेवावयाचा होता. न्याय देणें व बंदोबस्त ठेवणें ही दोन कामें कर उकळण्याच्या मुख्य कृत्याला केवळ आनुषंगिक होती. ह्या कर गोळा करण्याच्या कृत्याशिवाय दुसरें मोठे कृत्य जें मुसुलमानांना करावयाचें होतें व जे आपल्या येण्याचें ते मुख्य कारण सांगत तें हिंदुलोकांना बाटविण्याचें होतें. ह्या व्यतिरिक्त तिसरें काम ह्या म्लेच्छ लोकांना कोणतेंच कर्तव्य नव्हतें. वस्तुस्थिति अशी होती की, त्या वेळच्या हिंदुलोकांची संस्कृति मुसुलमान लोकांच्या संस्कृतीहून श्रेष्ठ होती. मुसुलमान लोकांना माहीत नव्हते असे धंदे, कला, शास्त्रें, विद्या ह्या देशांत अनेक होत्या. आचारानें ह्या देशांतील लोक मुसुलमानांपेक्षां स्वच्छ व श्रेष्ठ होते तर्कशास्त्र, ज्योतिषविद्या, वेदान्त, वगैरे विचारांच्या प्रदेशांतहि मुसुलमानाच्या वर मराठ्यांची कडी होती. फलज्योतिषावर मराठ्यांचा जितका विश्वास होता तितकाच मुसुलमानाचाहि होता. एका मात्र बाबींत मराठ्यांचा मोठा कमीपणा होता. यादवांच्या अमदानींत म्हणजे इसवीच्या तेराव्या शतकाच्या उत्तरार्धांत मराठ्याचे सर्व लक्ष परमार्थाच्या नांवावर ऐहिक उपभोग घेण्याकडे लागले होतें. तेराव्या शतकातील अत्यंत मोठा असा मानिलेला ग्रंथ म्हटला म्हणजे हेमाद्रीचा चतुर्वर्गचिंतामणि हा होय. ह्या ग्रंथात दर दिवसाला व दर तिथीला दहा दहा पांच पाचं व्रतें सांगितली आहेत व त्या त्या व्रताला कोणत्या देवाची कोणतें पक्वान्न करून व किती ब्राह्मण घालून प्रीति संपादन करावी ह्याचा स्मृति, श्रुति व पुराणें ह्यांतून उतरे देऊन, गंभीरपणे निर्णय केला आहे. हेमाद्रीच्या व्रतखंडावरून पहातां वर्षाच्या ३६५ दिवसांची एकंदर २००० व्रतें व्हावीं असा अंदाज होतो. लोकांचीं व्रतें करण्याकडे, ब्राह्मण-भोजनें घालण्याकडे, पक्वान्नें खाण्याकडे व तद्वारां मोक्ष मिळतो अशा मतांकडे अतोनात प्रवृत्ति असल्याविना हेमाद्रीनें हीं व्रतें, केवळ पांडित्य दाखविण्याकरितां किंवा करमणूक करण्याकरितां, सांगितली असतील, हें संभवत नाहीं. तेव्हां व्रतें करणें व पक्वान्नें खाणे ह्या दोन गोष्टी लोकांच्या आंगवळणी त्याकाली फार पडल्या होत्या हें निश्चित आहे. पक्वान्नं आणि व्रत ह्यांची फारकत हेमाद्रीनें एकाहि ठिकाणीं केली नाहीं. एवढीं दोन हजार व्रतें ज्या ग्रंथांत सांगितलीं आहेत असा पृथ्वीवरील दुस-या कोणत्याहि भाषेंत कोणत्याहि काळीं एकहि ग्रंथ अद्यापपर्यंत निर्माण झाला नाहीं! व्रतें करण्याकडे ज्याअर्थी महाराष्ट्रांतील लोकांची तेराव्या शतकांत एवढी बेसुमार प्रवृत्ति झाली होती त्याअर्थी त्यापासून दोनच अनुमानें स्थूलमानाने करणें रास्त आहे. एक, लोकांजवळ पैसा अतोनात झाला होता, व दुसरें, व्रतांप्रीत्यर्थ खर्चिण्यास लोकांजवळ मुबलक वेळ होता. ह्या दुस-या अनुमानाचा अर्थ असा होतो कीं, राष्ट्रांतील सुखवस्तू लोकांना व त्यांचे लहान प्रमाणावर अनुकरण करणा-यांना कष्टप्रचुर असे मर्दुमकीचे, यातायातीचे, मेहनतीचे, लष्करी व इतर धंदे करण्यास फुरसत नव्हती. अशी वस्तुस्थिति असल्यावर, म्हणजे परशत्रूपासून व अंतःशत्रूंपासून संरक्षण होण्यास कराव्या लागणा-या मेहनतींपासून लोक परावृत्त झाल्यावर आणि अशा व्रतैकदृष्टि किंवा सुखैकदृष्टि लोकांच्या हातीं मुबलक पैसा असल्यावर, त्यांच्याकडे बुभुक्षु, मेहनती, साहसी व निर्धन अशा लोकांचे लक्ष जावें ह्यांत अजब असें कांहींच नाहीं. ही जशी वस्तुस्थिति नसती, तर संस्कृतीनें कोणत्याहि प्रकारें श्रेष्ठ नसणा-या मुसुलमानांना त्यावेळी मराठ्यांना जिंकतांच आलें नसतें. मराठे जातीचे शूर नव्हते अशीहि स्थिति नव्हती. मराठ्यांच्याकडून माळव्यापासून रामेश्वरापर्यंतचे प्रांत इसवी सन १२४० च्या सुमाराला सिंघणानें जिंकविले. सतराव्या शतकांत जसा शिवाजी तसा तेराव्या शतकांत हा सिंघण झाला. सिंघणाला मरून ५० वर्षे झालीं नाहींत तों मुसुलमानांच्याकडून मराठ्यांचा पराजय होतो. अर्थात् हा असा चमत्कार होण्यास मराठ्यांच्या शीलांत व चालीरीतींत काहीं विलक्षण फरक पडला असला पाहिजे. हा फरक कोणता तें हेमाद्रीच्या व्रतखंडावरून स्पष्ट ओळखता येते सिंघणादि वीरांच्या विजयानें लोक अत्यंत धनसंपन्न होऊन, व्रतें, उद्यापनें करण्याच्या मिषानें सुखैकपरायण व विलासनिमग्र झाले. मराठ्यांच्यापेक्षां मुसुलमानांजवळ कांहीं निराळीं हत्यारें होतीं किंवा मराठ्यांना माहीत नव्हत्या अशा व्यूहरचना मुसुलमान करीत असत, असें म्हणण्यालाहीं काहीं एक प्रमाण नाहीं. दोघांहि जवळ सारखींच हत्यारें होतीं, अशी ज्या अर्थी स्थिति होती त्याअर्थी सुखैकपरायणता व विलासमग्रता हींच मराठ्यांच्या नाशाचीं तेराव्या शतकांत कारणे होतीं. परमार्थाच्या नावाखालीं ही जी सुखैकपरायणवृत्ति नांदत होती तिचा फायदा घेऊन मुसुलमानांनीं मराठ्यांचा पराभव केला.

पत्रांक १३७.

श्रीगणेशायनमः
१६९६ अधिक वैशाख शुद्ध ८

स्वस्ति श्रीमत्संवत् १८३१ श्रीमत्छकः १६९६ जयनाम्नि संवत्सरे उत्तरामाणे वसंतर्त्तौ मासोत्तमे प्रथम वैशाख शुद्ध ७ इंदुवासरे २६।४२ अदितिभे ३२।२० धृतौ योगे ५५।५८ वणिजकरणे तत्र मेषार्क गतांशाः ७ भोग्यांशाः २३ तत्र श्री सूर्योदयादिष्टकालः १७।३० तत्र समये कुलीरलग्नोदये श्रीमतां सवाईमाधवरायसंज्ञकानां प्रभुवर्याणां जन्मकुंडलीयम्

पत्रांक १३६

पो. अधिक शुद्ध १४.
श्रीशंकर
१९९६ अधिक वैशाख शुद्ध १०

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री सखारामपंत बापू स्वामीचे शेवेसी:-
पो आपाजीराम कृतानेक सां नमस्कार विनती येथील कुशल ता अधिक

शुा १० गुरुवासर मुा का जामखेड पा आंबेड येथें सुखरूप जाणून स्वानंद कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष आपणाकडून पत्र आलें तें को मारीं काल दोन प्रहरां प्रविष्ट झालें. पेशजीं पत्रीं आम्हीं राजराजकी वर्तमान लिहिलें. येथील खर्चवेंचाचा मजकूर लिहिला होता. त्याचा तपशीलवार जाब न पाठविला. इकडिल वर्तमान तरः श्रीमंत राजश्री दादासाहेब टोक्यास आले होते ते पेशजीं लिहिलें होतें. तेथून मज़लदरमजल पिंपरी परगणा एकतुणी पासून तीन कोसांवर आले दोन मुकाम जाले. आह्मीं शुा प्रतिपदेस ठाणें सोडून जामखेड येथें आलों. पाटील, कुळकर्णी, रयत साडेतीन गांवचे येथे आले. कांहीं आपलाले सोईनें गेले. गांव दरोबस्त कसब्यासुद्धा पायमल्लींत आले, लोक घाबरेपणें सडेमात्र पळोन आले, घरेदारें अगदीं तसनसींत आलीं. श्रीमंतांचे सैन्याचा दंगा चार दिवस जाला. आसपासचे गांव कित्येक जाळले. माणसें मारली, तो दंगा कोठपर्यंत ल्याहावा ? त्याजउपर मोंगलाई फौज व भोंसले व स्वसैन्य हा आकांत ! त्याचे मजलीनें आली. त्यांचा दंगा अद्याप आहेच. तात्पर्य, गांव अगदीं पायमल्लींत आले. पेस्तर सालची तरतूद होऊन लावणी होणें संकट आहे. वाकळूजची गुरेढोरें व बैल देखील गेले. कसब्याचीही बैलढोरे गेली; व हे गांवची तसनस बहुत जाहली. घरे, गांव अगदीं परागंदा जाले. ईश्वरे मोठें संकटांत घातलें आहे. आह्मी घोड्यांचे चंदीकरितां सात आठ पल्ले हरभरे व पांचसात पल्ले बाजरी व पांच हजार सरम घेतला होता. तो सरंजाम अगदीं गेला. दीडशां रुपयांची नुकसानी जाली. आता पुढे घोड्याचे दाण्यावैरणीची व आमचे खर्चाची तर्तुद होणे कठीण जाले आहे. या दंग्यांत कोणी कर्जवामही देत नाहीं. ऐसा योग प्राप्त जालाआहे. अरिष्टही निवारलें नाहीं. पुढें योगक्षेम कसा करावा? आतां यो सालांत वसूल घ्यावयास जागा नाहीं. पुढें तर्तुदीस जागा नाहीं. याचे काय करावें हे आज्ञा, ल्याहावी. त्याप्रमाणें वर्तणूक करू, ठाणें टाकून घोडीं पिढीं घेऊन या ह्मणाल तर घेऊन येतों. अथवा कसें करावें हें विस्तारपूर्वक ल्याहावे. आह्मी तर मोठे संकटांत आहोंत, जीव रक्षावयाचें कठीण पडलें आहे. भगवत् इच्छेस उपाय नाहीं, तुह्मांकडील पत्र येतें तेथें मजकूर उगडून लिहीत नाहीं. त्यास, तपशीलवार उगडून ल्याहावें कीं, तुमचे आज्ञेप्रमाणें वर्तणूक करावयास येईल. तुह्मीं मोघमं लिहिल्यास, आह्मीं काय समजावें? साल मारीं परगण्यांत वसूल नाहीं. परंतु सालापेक्षां महाल मा अधिक पडला. व पुढेंही पाहिजे. होण्याचा ऐवजहि खर्चाचे भरण्यास गेला. चार तट्टें जगलीं पाहिजेत व चार माणसे संग्रहीं पाहिजेत. ऐसा योग घडला आहे. श्रीनें काय योजना केली असेल ते नकळे. पत्रीं कोठवर रड ल्याहावा ? राजक्रांत बहुत कठीण आहे. आतां पाटील व लोक ममतेंत घेऊन गांवावर वस्तीस न्यावी तर अरिष्ट निवारलें नाहीं. कोण्हे समयीं परतून येईल हें तथ्य नाहीं. मोंगल अद्यापी शहरींच आहे. चोर, राउत नित्य लूट लबाडी करितात. रा हरिपंत फडके यांचे निसबतीचे सैन्य व साबाजी भोसले यांचे सैन्य चौक्याची घांटी उतरून फुलमरी परगण्यांत गेले आहेत. मोंगल व दर्याबाई भोसली ही दोन पथकें शहरावर' आहेत. श्रीमंत फर्दापूरघाटें उतरून खानदेशांत गेले, ऐसें आहे. पुढें काय होईल हें नकळे, घोडीं पिढीं जगून तुह्मांजवळ येणेंचें संकट पडलें आहे. येथें आहेत यांचाही भरंवसा येत नाहीं. ऐसें जालें आहे. पुढें काय करावें ? वर्तमान कोण्हास ल्याहावें ? हें ठिकाण राहिलें नाहीं. जिवावर गोष्ट आली आहे. भगवंत पार पाडून तुमची भेट घडवील तेव्हां खरें. अस्तु. आपला उपाय नाहीं. घोडी घेऊन तुह्मांकडे यावें, ऐसें आहे. येथें राहिल्यास खर्च चालला पाहिजे. याची आज्ञा काय ते लिहिणें. त्याप्रों वर्तणूक करावयास येईल. ठाणें मोकळें सोडून यावें की बंदोबस्त करून यावें, हें लिहिणें. पुढें गांवचा बंदोबस्त व पेस्तर सालची तर्तूद कोणते अर्थी कसी करावी, हें उगडून ल्याहावें. या पत्राचें उत्तर ये तोपर्यंत ठाण्यांत अथवा आसपास आहोंत. उत्तर आल्यावर मग जे आज्ञा होईल त्याप्रों करू. या प्रांतीं कांहीं बाकी राहिली नाहीं. अगोदर पर्जन्याची आफती, त्याजवर फौजांचें उपसर्ग जाले. याजमुळें अगदीं काम बुडालें. ईश्वर इच्छेस उपाय नाहीं. विस्तारे ल्याहावयास कांहीं सुचत नाहीं, बहत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती.

सेवेसी निलकंठ पिलदेव सां नमस्कार. लिा धारें निवेदनांत येईल. ईश्वरें मोठे घोरांत घातलें आहे. निर्वाह होणें संकट आहे. असो. उपाय नाहीं. आपणाकडील सविस्तर ल्याहावें. लोभ करावा. हे विनंती.