Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

French was for nearly three hundred years (i. e. from 1066 A. D. to 1363 A. D.) the official language in England. William the Conqueror had conquered England not merely to govern the English, but to dispose of its wealth. He distributed land, offices, and honours to his (Norman) vassals, so systematically that the whole country was enveloped in a close net-work of which every knot represented a barony, a county, a Norman domain. In each town, each rural district, the proprietor, the judge, the eivil or military chief and his vassal constituted a Frech centre. Towards the end of the twelth century the Saxon had accepted a few Frech words. In the fifty-eight thousand lines of Layamon’s Brut there are eighty words of Frech origin. At the end of the thirteenth century we find a hundred (words) in the first five hundred lines of Robert of Gloucester. Nor is this all; the grammatical structure is modified. The case endings are beginning to disappear; the final vowels changed into e mute, are no longer pronounced. The conjugation loses a few more of its shades. The plural terminations of persons are dropped. The noun loses the plurals formed by the weakening of the vowel, as foot, jeet, its genetive plural in eve. The genitive singular in is, es, soon reduced to g, alternates with the prepositions of and to. The adjective is still declined and often forms its plural in e, but the insignificance of these termination cause it to be soon lost &c. &c, In counting all the words in the dictionaries of Webster and Robertson, M. Thommerel has shown that out of 43,566 words, 29,853 come from the classical languages, 13,230 from the Teutonic .

नार्मन-फ्रेंच भाषेच्या दडपणाखालीं साक्सन भाषेची तीनशें वर्षात काय दिशा झाली, त्याची ही अशी कथा आहे. फ्रेंच भाषेच्या दडपणाखालीं बास्क भाषा, किंवा रूसच्या दडपणाखाली पोलीश भाषा, किंवा संस्कृत भाषेच्या दडपणाखालीं भिल्ल, खोंड, वगैरेंच्या भाषा, किंवा लॅटिनच्या दडपणाखालीं एद्रुस्कन भाषा, ह्यांचाहि इतिहास वरच्याप्रमाणेंच आहे. म्हणजे जिंकणा-या लोकांच्या भाषेपुढें जिंकलेल्या लोकांची भाषा नष्टप्राय होते, असा जगांत इतरत्र कोठें कोठें अनुभव आहे. हा अनुभव मराठीला १३१८ पासून १६५६ पर्यंत येत होता. नुसते शब्द व प्रयोग जोंपर्यंत येत होते, तोपर्यंत मराठीच्या अंतःस्वरूपाला फारसें भय नव्हतें. परंतु उभयान्वयी व शब्दप्रयोगी अव्ययें घेण्याचा आणि विभक्तिप्रत्यय व उचार फारशीच्या धर्तीवर बदलण्याचा जेव्हा मराठींत क्रम सुरू झाला, तेव्हांच तिचें अंतःस्वरूप बदलण्यास प्रारंभ झाला. हा बदल सतराव्या शतकांत मराठ्यांनीं स्वातंत्र्यार्थ जे प्रयत्न केले त्यामुळें जास्त व्हावयाचा थांबला. नाहीपेक्षां, जर मराठ्यांची राज्यक्रांति न होती, तर थोड्याच दिवसांत मराठी, उर्दू झाली असती. महाराष्ट्रांत जशी सतराव्या शतकांत क्रांति झाली, तशी उत्तर हिंदुस्थानांत मुसुलमानी रियासतीच्या अव्वलीपासून अखेरीपर्यंत म्हणजे १२ व्या शतकापासून १७ व्या शतकाच्या अखेरपर्यंत केव्हांहि न झाल्यामुळें, हिंदी भाषेची उर्दू बनली. व्यवहाराकरतां उर्दू भाषा मुद्दाम बनविली, असा कित्येकांचा समज आहे. परंतु तो खोटा आहे. मुद्दाम भाषा बनविणें व तीं बनवून प्रचारांत आणणें ह्या गोष्टी मानवी इतिहासांत अशक्य आहेत. कोणतीहि भाषा आपोआप बनत जाते व ती बनण्याचीं कारणें तद्वाह्य असतात. आतां येथें कोणीं असा प्रश्न करील कीं, हिंदीची जर उर्दू बनली, तर अद्याप हिंदी भाषा चालू कशी राहिली? तर त्याला उत्तर आहे. उर्दू भाषा बनत बनत जों जोमांत येते व हिंदी मागसत जाते तों मराठ्यांच्या राज्यक्रांतीनें मुसुलमानांच्या सत्तेला, संस्कृतीला व भाषेला जबरदस्त खो बसला व यच्चयावत् सर्व हिंदुस्थानांतील भाषा बंधमुक्त झाल्या. सिंधी, पंजाबी, हिंदी, मारवाडी, बंगाली, भोजपुरी, रांगडी, गुजराथी, मैथिली, ओढिया, वगैरे उत्तर हिंदुस्थानांतील भाषा मुसुलमानांचे राज्य जर आजपर्यंत रहातें, तर निःसशय मरणाच्या पंथास लागत्या. सारांश, मराठ्यांनीं जुलमी फारशी व उर्दू ह्यांना उखडून पाडल्यामुळे, हिंदुस्थानांतील देशी भाषांना जीवदान मिळालें.

                                                                                लेखांक ३६७

                                                                                                                                                               १५१९ मार्गशीर्ष वद्य १२                                                   

                                                                                        68 2                        

अज रखतखाने राजश्री बाबाजी राजे भोसले दामदौलतहू बिजानेबु कारकुनानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी कसबे पेडगौऊ पा। पाडेपेडगौऊ बिदानद सु॥ समान तिसैन व तिसा मया दरवज इनाम बदल धर्मादाऊ बो।

रामेस्वरभट बिन नारायणभट                                               चिंतामणीभट बिन बाळंभट

सेकिन आखी मुदगल हर्ची जमीन दर सवाद प्रज रामजी चिखलठाणा गज सरायनी चावर १। सवा एदमो नखतयातो वमहसुलु कुलबाब कुलकानू दिधले असे दुमाला कीजे अवलादी अफलादी चालो दीजे दर हर साल खुर्दखताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असेली खुर्दखत इनामदारमजकुरापासी दीजे मोर्तबु

                                                                                                                                                             68 2

तेरीख २५
माहे जमादिलोवलु                                                                    माहे जमादिलोवलु

 

                                                                                 

 

                                                                           सातारा-राजोपाध्ये                    

                                                                              लेखांक ३६६

                                                                                                                                                               १५१४ मार्गशीर्ष शुध्द ९                                                     

                                                                                        68 2                        


अज रखतखाने खुदायवंद खाने अजम फराबाद तुलीदयामदौलतहू बजानीब कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसमुखानी परगणे + + बिदानदसु॥ सलास तिसैन व तिसा मया बो। रामेस्वरभट बिन नारायणभट धर्माधिकरणी सो। आरवी मुदगल हुजूर एउनु मालूम केले की आपणास इनामे दर सवाद मौजे वडिगौ पा। मजकूर जमीन पोलीन रुके बारा .. ची भोएड पाटिल बिन पील पाटील ठोबरा मुजेरी मौजेमजकूर दा। कुलबाब कुलकानू व नखतयाती आपणास इनाम आहे भोगवटा कारकीर्दी दर कारकीर्दी वजिराने ता। खा। दस्तुरखा चालिले आहे हाली परगणेमजकूर साहेबास मुकासा अर्जानी जाला माहाली कारकून खुद्रखताचा उजूर करिताती तरी मर्‍हामती फर्माउनु बदल खैर खुर्दखत दोये मालूमे जाले तर रामेस्वरभट बिन नारायणभट यास सदर्हू इनाम मोजेमजकुरी जमीन पोलीन रुके .. बाराची माहाद पाटेल ठोबरा इनामे आहे भोगवटा वजिराने कारकीर्दी दर कारकीर्दी ता। खा। दस्तुरखा चालिले आहे तुह्मी माहाली तसरुफाती करुनु भटाजी मस्यारुनुइलेचा इनाम दाद कुलबाब कुलकानू व खतयाती बाब महसुलेसी दुमाला कीजे दर हर साल खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक घेउनु असेली इनामदारासी दीजे

तेरीख ७ माहे
रबिलावल                                                                               
                                                                                                                   332

 

                                                                               लेखांक ३६५

                                                                                                  श्री                                                             २६११ आषाढ शुध्द द्वितीया

 

                                                       365 1                               365 2

 

पत्र नियत पारतोसिक मा। येसजी कंक सरनोबत व कृष्णाजी येसजी कंक पदाति नायक शक १२ क्रोधननाम संवत्सरे आषाढ शुध द्वितीया भोमवासर सु॥ सीत समानीन अलफ मा।निलेनी व कृष्णाजी कंक मा।निलेचे पुत्र यां दोघानी फोंडाचे स्वारीस फिरंगी यासि गाठी पडिली तेव्हा बहुत कस्त केली आणि गनीम मारून काढिला ते वख्ती दोघाला हि जखमा लागोन चकचुर जाले कठीण जखमा राजश्री स्वामीनी दृष्टीने पाहिल्या आणि घरासी जावया आज्ञा दिल्ही त्यावरी कृष्णाजी कंक याच्या जखमा फुटोन घरी मयत जाला हाली येसजी कंक हे हुजूर येऊन आपले वर्तमान विदित केले त्यावरून स्वामी कृपाळु होऊन हे कामाचे मर्दाने स्वामीकार्यावरी तत्पर आणि याचा पुत्र हि स्वामिकार्यावरी मयत जाला फोडाचे बकसीस द्यावयाचे होते ह्मणौन छ मजकुरी पारितोषिकाची माईन केली होन पादशाही बेरीज २०००

ए॥ दोनी सहस्त्र होन रास

खासा येसजी कंक सरनोबत                                          कृष्णाजी कंक मा।निलेचे पुत्र स्वामिकार्यावरी
हौन १०००68                                                                  पडिले ह्मणौन दिल्हे होन पा। १०००68

एणेप्रमाणे एक साला ये वर्षी पारितोसिक द्यावयाचा नियत केला असे लेखनालंकार

                                                                                                        148 2

तेरीख ३० रजब
सु॥ सीत
बार

सुरु सुद बार

 

त्यावरी राजश्री स्वामीने हि इमान देऊन डोईवरी हात ठेऊन बोलिले जे भोसल्याचे वशी जो राज्य करील त्याने तुमचे वशपरपरेने चालवावे ऐसा इमान दिल्हा त्यावरी जमाव करून राजश्री समागमे प्रतापगडास गेले अफजलखानाचे भेटीचे समई आपले बाप व चुलते धारकरियामधे नेमून बा। घेतले अफजलखान जिवे मारिला कुल फौज लुटिली ते समई आपल्या वडीलानी बहुत शर्ती करावयाची ते केली ते प्रसगी खडोजी खोपडा पाडाव जाला त्यास राजश्री स्वामीनी शास्ती केली त्यावी शास्तीखान पुणियास आला ते समई राजश्री स्वामी चालोन गेले तेव्हा हि आपले बाप व चुलते समागमे गेले होते तेथे हि शर्ती करणे ते केली त्यावरी राजश्री स्वामीनी हि बोलिल्या बोलाप्रमाणे चालविले पानमान आपला आपणास देत आले त्यावरी राजश्री स्वामी थोरले कैलासवासी दिलीस अवरगजेब पातशाहाचे भेटीस गेले ते समई हि आपले बाप सर्जाराव समागमे गेले होते तिकडून आलियाउपरी राजश्री कैलासवासी स्वामीनी चजीप्राते मोहीम केली भागानगरास गेले तेथून पुढे कर्नाटक हस्तगत केले ते समई हि आपले बाप सर्जाराव जमागमे गेले होते आपल्या वडिलानी कोण्हेविसी एकनिष्टेस अतर केले नाही राजश्री स्वामीनी आपले सर्वस्व चालऊन खोपड्या अगोधर पानमान दिल्हा आहे त्यावरी अवरगजेब पातशाहा तुळापुरास आला त्याचे पुत्र अजमशाह सिरवळनजिक येऊन राहिले होते तेथे किले रोहिडा घ्यावयाचा प्रसग पडिला की किलाची पाने घेणे ते समई आपले बाप सर्जाराव जेधे याणी पाने घेतली नाहीत खोपडीयाने पाने घेतली आणि बाळाजी नाईक खोपडे याने येऊन रोहिड्यास चौकी बैसविली ते समई गडास सिधोजी जाधव किलियास हवालदार होते त्याकडे सर्जाराव जेधे याणी माणसे पाठऊन सामान व गला रातोराती आपले तरफेचा पाठविला हे वर्तमान बालाजी खोपडे यास दखल जाले त्याणी वजीरअली सैदमजली ठाणेदार होता त्यास सागितले त्याची स्वारी मुलुकात आणिली त्याने मौजे करजीये ता। मजकूर येथे येऊन मुकाम केला आणि मौजे नाटबी व करजीये व सागवी तिन्ही गाव लुटून खराब केले बाळाजी खोपडे यास कारीस सर्जाराव यास आणावयास पाठविले त्यास सर्जाराव यास वेथा जाली होती याकरिता आपणास बाळाजी नाईकाचे हाती दिल्हे त्याणी सैदमजली जवळ आणिले त्यास सैदमजलीने ताकीद करावयाची ते केली आणि बोलिले याउपरी तुह्मी फिरवा केला ह्मणजे तुमचे बरे होणार नाही ऐसी ताकीद केली त्यास आपला मुदई बाळाजी नाईक जवळ आहे नस्ते तुफान करील याजकरिता त्या बा। आपणास गडाखाले चौकीस बैसावे लागले खोपड्यामुळे किला सी बद जाला त्यावरी किलेकरी याने पातशाहाकडे राजकारण लाऊन किला नजर केला त्यावरी चंजीप्रांते राजश्री कैलासवासी स्वामी होते तेथे आपले बाप सर्जाराव जाऊन भेटी घेतली त्यावरी राजश्री इकडे आले तेव्हा हि ताबीचे मुकामी आपल्या वडिलानी खोपड्या अगोधर पाने घेतली आहेत हे जातीचा पानामानाचाकरीणा आहे पानमान येणेप्रमाणे घेत आलो आहो त्यावरी प्रतापगड प्रसंग पडिला तेथे निर्वाह जाला नाही आपल्या वडिलानी सदरहूप्रमाणे पानमान घेत आले आहेत

                                                                             लेखांक ३६४

                                                                                             
माहाराज राजश्रीं साहेब कैलासवासी याजवळ स्वारानसी सेवा केली त्यास थोरले राजश्री कैलासवासी स्वामी पुणीयास पाठविले यासमागमे आपले आजे कान्होजी नाईक स्वारानसी दिल्हे याणी एकनिष्टेने सेवा करावयाची ते केली वतनामुळे हि रुजुवातीने राहिले त्यावरी राजश्री दादाजी कोंडदेव सिवापुरास आले ते समई कृष्णाजी नाईक बादल देसमुख ता। हिरडसमावळ बारामावळामधे जोरावारीने बइते घेत होते ते समई आपले आजे कान्होजी नाईक याणी बादलास बइते दिल्हे नाही जोरावारीने तरवारेच्या बले आपल्या माहालात येऊ दिल्हे नाही यावरी राजश्री थोरले कैलासवासी स्वामी कारभार करू लागले ते समई गनीम चालोन आला याकरिता पाईच्या लोकाचा व लष्कराचा जमाव करू लागले आपले आजे कान्होजी नाईक यास बोलाऊ पाठविले तेथे हि आपल्या जमावानिसी गेले त्यावरी मावळे लोकाचा जमाव व स्वाराचा जमाव करून मौजे खलदबेलसर येथे गनीम आला होता त्यावरी राजश्री थोरले कैलासवासी स्वामी गेले याबराबरी आपले बाप बाजी नाईक याणी निशाणाचा भाला घेऊन गेले आपल्या लोकाचे व गनीमाचे भाडण जाले तेथे तरवाराची शर्ती करावयाची ते केली गनीम मारून मोडिला त्यावरून राजश्री कैलासवासी स्वामी मेहरबान होऊन आपल्या बापास सर्जाराई दिल्ही त्याउपरी राजश्री स्वामीनी मातबर जमाव करून राज्ये हस्तगत करू लागले मावळ प्रातीचे गाड किले घेतले ज्या वृधीते होत चालिले त्यावारी अफजलखान राजश्री स्वामीवरी चालोन आला तो वाईस येऊन राहिला ते प्रसगी खडोजी खोपडे पारखे होऊन अफजलखानास भेटले आणि राजश्री थोरले कैलासवासी स्वामीस धरून देतो ह्मणऊन कबुलाती केली ते प्रसगी आपले आजे कान्होजी नाईक याणी आपली माणसे व वस्तभाव पळविली ती तळेगावी नेऊन ठेविली आणि आपण व आपले बाप सर्जाराव जेधे व चुलते सिवाजी जेधे व चांदजी जेधे व नाइकजी जेधे व रायाजी जेधे राजश्री स्वामीचे भेटीस आले तेव्हा राजश्री बोलिले की खंडोजर खोपडे अफजलखानासी भेटले आपली देसमुखी यापासून मागोन घेतली तुह्मी याची भेटी घेऊन आपली देसमुखी जतन करणे ह्मणून बोलिले त्यावरी कान्होजी नाईक बोलिले की आपण देसमुखी साहेबाच्या पायावरी ठेविली आहे साहेबाच्या बर्‍याने आपले बरे हे च निष्ठा आपली आहे ऐसे बोलीले आणि इमान दिल्हा 

                                                                             लेखांक ३६३

                                                                                               श्री

जेधे बांदल याचे जुंज सिवेचे खटले व नदीबदल जाले त्याचा करीणा जेधे याणी चापजी नाईक बांदल याचा नांदगावाजवळ मोडून डोगरास लाविले त्यास कृष्णाजी नाईक याणी बाजी प्रभु देशपांडे ता। हिरडसमावळ यासी बोलावून विचार करून मग दिपाई आवाचे पाईची बेडी तोडून मग दिपाई आवा याणी स्नान करून कृष्णाजी नाईक यास व बाजी प्रभूस वोवाळून यशवत होणे असे बोलून बाजीबावास घोडा बसावयास दिल्हा राजश्री कृष्णाजी नाईक संभु प्रसाद घोड्यावर बसले मग कासारखिडीस ठेऊन बाबाजी पोलास आज्ञा केली जे बाबाजी मामा पाड पाहाणे यात पाड पाहिला तो ++ तेचा निघाला तेव्हा चापजी नाईक यास जमावासुधा बोलाविले नादगावाजवळ वड थोरला होता त्याखाली जेधे ठेऊन नदी पाठीसी घालून बैसले होते तेव्हा सर्व जमाव बादलाकडील एक जागा होऊन जमावास कडवीच्या वर्‍या वाटून देऊन चालून घेतले जुज जाले तेव्हा जेधे मोडून कारीपावेतो नेले गाव लुटून पस्त केला राणीवसा मात्र राखिला तेव्हा माघारे मुरडून चालले तेव्हा कृष्णाजी नाईक याचे डोईचे मुडासे आमलाच्या मदे झोटधरणीत पडले होते ते बाजी प्रभु याणी याद धरून घोडियावरून उचलून तोबरीयात घातले होते तेव्हा कृष्णाजी नाईक बोलिले जे बाजी प्रभू एक दोन लढाया जाल्या परतु आज फते जाली जेधोजीने शीर मात्र नेले तेव्हा बाजी प्रभु याणी उत्तर दिल्हे जे तुह्मी बारा मावलात यशवंत आहा तुमचे इतर काम होईल असे ह्मणौन घोडीयावरून उतरून तोबरियातून मुंडासे काढून दिल्हे तेव्हा मुंडासे बांधून मग बाजीबावास पोटासी धरून नाईक बोलिले जे बाजी प्रभु तुह्मी शर्थ केली

                                                                             लेखांक ३६२

                                                                                               

5 श्री सहश्राय चिरंजीव राजश्री सिउबास व सुभानजीस बाजी सर्जाराऊ देसमुख ता। भोर किले रोहिडा आसिर्वाद उपरी मा। हा। साहेबास अर्ज लि॥ आहे तो पावता करुनी जाब घेउनी पाठविजे व माहाली होन दाहा कारकुनी मागितले आहे तरी ये बाबे रा। स लिहिले आहे त्याची भेटी घेउनी हुजूर अर्ज करुनी रोखा मागोन पाठविजे अमच्या हकात होन ४५ धरिले आहेती आणि मागती तगादा करितात तरी देसकुळकर्णी याचे इनामती खडणीमधे मजुरा घेत ऐसा रोखा मागोनी पाठविजे बुबुचा समाचार पाठविजे हा आसिर्वाद

 

                                      362                                                            137

दायकोजी कृष्ण बाबाजी कृष्ण आसिर्वाद -------- साहेबाची आमची मुलाखती जाहाली सरजामी नाही कळले पाहिजे

मराठीत विशेषण प्रायः विशेष्याच्या आधीं येतें, फारशींत आधींहि येतें व मागूनहि येतें विशेषण विशेष्याच्या पुढें घालण्याची चाल मराठीनें कित्येक स्थलीं फारशीपासून उचलली आहे. इसम मजकूर, पंडित मशारनिले, राव अजम, वडगांव बुद्रुक, नांदगाव खुर्द, बिरादरबुजुर्ग, आंग्रे वजारतमाब, गायकवाड सेनाखासखेल, इंग्रज बहादर, इष्टूर फाकडा, शिकंदर सानी, सालगुदस्त, वतनरोबस्त, हुजरात कुली, वगैरे प्रयोगांत विशेष्य आधीं व विशेषण मागून घालण्याची चाल मराठींत अगर्दी रूढ होऊन गेली आहे. ती इतकी कीं ह्या प्रयोगांत विभक्तिप्रत्यय व सामान्यरूपाचें विकरण विशेष्यास न लागतां विशेषणास लागतात; जसें, इसम मजकुरास, सालगुदस्तां, इंग्रज बहादरास, वगैरे ज्या दोन शब्दांच्या मध्यें षष्ठीची ई असते, त्या दोन शब्दांस विभतिप्रत्यय लावावयाचा असल्यास दुस-या शब्दास तो लावला लातो. जसें, बंदर ई सुरत, बंदर सुरतेस; बंदर ई राजापूर, बंदर राजापुरी; शहर ई पुणें, शहर पुण्यास; वगैरे.

मुसुलमान पातशहांच्या अमदानींत इ. स. १३१८ पासून इ. स. १६५६ पर्यंत फारशी भाषेच्या संसर्गानें मराठी भाषेच्या रूपांत काय काय फेरफार झाले. त्याचा वृत्तांत हा असा आहे. ह्या अवधींत व्यवहारांतील शेकडों फारशी शब्दानीं मराठींत कायमचें ठाणें दिलें. नामांचे व क्रियापदाचें जोड बनविण्याच्या ज्या फारशी पद्धती आहेत, त्यांच्या धर्तीवर शेंकडो प्रयोग मराठींत रूढ झाले. कित्येक फारशी सर्वनामें, क्रियाविशेषणें, उभयान्वयी अव्ययें व उद्गारवाचक शब्द मराठीशीं एकजीव बनून गेले. जीं शब्दयोगी अव्ययें मराठींतील पश्चाद्गामी शब्दयोगी अव्ययाप्रमाणें योजतां येण्यासारखीं होतीं, तीं मराठींत राजरोसपणें प्रविष्ट झालीं. तसेंच, जीं शब्दयोगी अव्ययें पूर्वगामी होतीं, त्यांनाही मराठीनें अद्यापि कांहीं संकुचित प्रदेशांत वावरण्याच्या बोलीवर राहू दिलें आहे. दोन फारशी विभक्त्या मराठींत येऊ पाहत होत्या. पैकीं फारशी षष्ठीच्या ईला प्रायः कायमची गचांडी मिळाली असून, द्वितीयेच्या ला (रा) ला मराठींने उदार आश्रय दिला आहे. शिवाय, व्यंजनान्त शब्द उचारण्याची दुष्ट खोडहि मराठीनें फारशीच्या संगतीनें उचलली आहे. आन् प्रत्यय लावून शब्दांचें अनेकवचन करण्याचाहि बेत मराठीचा होता परंतु शिवाजी व रामदास यानीं वेळींच दाबल्यामुळें, हें एक आणखी लचांड तिनें लावून घेतलें नाहीं. जर आणखी तीनशें वर्षे म्हणजे इ. स. १९०० पर्यंत मुसुलमानांचें राज्य महाराष्ट्रांत रहातें, तर मराठी येथून तेथून सर्व फारशीं पेहरावच करती यांत संशय नाहीं. ह्या विधानाची सत्यता कोणाच्या हृदयाला कदाचित् जशी भासावी तशी भासणार नाहीं. म्हणून साडेतीनशें वर्षांच्या अवधींत पृथ्वीवरील इतर कित्येक भाषांची परराज्याखालीं दैना काय झाली त्याची हकीकत देतों.

परराज्याखालीं भाषेची दैना काय होतें. हे पहावयाचें असल्यास फार दूर जावयाला नको. इंग्लंडांत इसवीच्या दहाव्या शतकांत साक्सन लोक रहात होते; त्यांच्या भाषेला आंग्लोसाक्सन् असें नांव आहे. ह्या साक्सन लोकांना नार्मन लोकांनी इ. स. १०६६ त जिंकिलें. नार्मन लोक फ्रेंच भाषा बोलत असत. इंग्लंडांत नार्मन लोकांचे राज्य झाल्यापासून सरकारदरबारांत फ्रेंच भाषा सुरू झालीं. कायदे, कानू, वगैरे सर्व लिहिणें फ्रेंच भाषेंत होऊं लागलें व आंग्लोसाक्सन भाषा मागें पडलीं. इंग्लंडांत ह्या फ्रेंच भाषेचा अंमल तीनशें वर्षे होता. तेवढ्या अवधींत साक्सन भाषा अगदीं बदलून गेली. नार्मन शब्दांच्या दडपणाखालीं साक्सन भाषा केवळ दडपून गेली एवढेंच नव्हे, तर तिचें अंतः स्वरूपहि छिन्नभिन्न झालें. विभक्तिप्रत्यय प्रथम नाहींसे होऊ लागले. नंतर अंत्यस्वरांनी पोबारा केला. क्रियापदांचीं निरनिराळ्या काळांचीं रूपे नष्ट झालीं. साक्सन भाषेंत अंतःस्वर बदलून अनेकवचनें होत असत, तीं तशीं व्हावयाचीं थांबलीं. विशेषणांवर विभक्तिकार्य होइनासें झालें. is किंवा es प्रत्यय लावून षष्ठीचें एकवचन होत असे, तें नुसते s लावून होऊं लागलें व त्यांचेहि बहुतेक सर्व कार्य of किंवा to ह्या शब्दयोगी अव्ययांच्या योगेंच साधण्याची पद्धति पडली. ene प्रत्यय लागून षष्ठीचें अनेकवचन पूर्वी होत असे, तें ह्या तीनशें वर्षात अजिबात बंद झालें. लिंगवचनांत, उच्चारांत वगैरे सर्व बाबींत जमीनअस्मानाचे फेरफार झाले. ते इतके कीं, १०६६ च्या पूर्वीची साक्सन भाषा १३६६ त मुळीं राहिलीच नाहीं. तिच्या जागीं निराळीच साक्सन व फ्रेंच ह्या भाषांच्या मिश्रणानें बनलेली अशी इंग्लिश भाषा अस्तित्वांत आली. ह्या इंग्लिश भाषेंत साक्सन भाषेंतील कांहीं शब्द तेवढें राहिले आहेत. बाकी साक्सन भाषेंत व सध्यांच्या इंग्रजींत फारसें साम्य नाहीं. साक्सन शब्दहि इंग्रजींत फ्रेंच किंवा लॅटिन शब्दांपेक्षां कमी आहेत. वेब्स्टर व राबर्टसन ह्यांच्या कोशांतील शब्द मोजून, रा. टेम्रिल ह्या गृहस्थानें असें सिद्ध केलें आहे कीं, एकंदर ४३,५६६ शब्दांपैकीं २९,८५३ शब्द फ्रेंच किंवा लॅटिन व १३,२३० शब्द साक्सन, इंग्रजींत आहेत. म्हणजे एक शब्द जर साक्सन असेल तर अडीच शब्द फ्रेंच किंवा लॅटिन असतात. येणेंप्रमाणें नार्मन लोकांच्या दडपणाखालीं साक्सन भाषा अगदीं चिरडून गेली. ह्यासंबंधानें Race and Language ह्या पुस्तकांत M. Andre’ Lefe’vre म्हणतो:-

                                                                             लेखांक ३६१

                                                                                                श्री                                                      १६३३ भाद्रपद वद्य ५

                                                361

 

 

 

 


स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ३८ खरनाम संवत्सरे भाद्रपद बहुल पंचमी गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहु छत्रपति स्वामी याणी रा। मताजी सर्जाराऊ जेधे देशमुख भोर तपे रोहिडखोरे यासि आज्ञा केली ऐसी जे तुह्मी विनतीपत्र पाठविले ते प्रविष्ट जाले लिहिले वर्तमान विदित जाले हरामखोराचे लस्करानी धामधुम बहुत च केली मुलुक वैरान जाला हरामखोराचे लोकामधे आपणामधे जुझ जाले च्यार पाच आपणाकडील पडिले त्याकडील च्यार पाच पडिले सात पाच जखमी जाले स्वामीचे पुण्ये फते जाली अमची निष्टा स्वामीच्या पायासी आहे त्याचा हिसाब धरितो असे नाही ह्मणोन लिहिले हरामखोरास नतीजा दिल्हा उतम केले पुढे हि त्याचा हिसाब न धरिता वरचेवरी टेचगा देत जाणे आपले निष्टेचे वृत्त लिहिले तरी तुह्मीं वतनदार एकनिष्टसेवक आहा तुह्मास स्वामीचे पायावेगले दुसरा अवलब नाही हा स्वामीस तुमचा भरवसा आहे ऐसे असता स्वामीकार्यास अतर कराल हे काय घडो पाहतें हरामखोराचे काहीकाबाड मारून आपले सेवेचा मजुरा करून घेणे स्वामी तुमची सर्फराजी करितील लेखनालंकार

 

                                                                                                  189 1

 सुरु सुद