Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ११८

श्री.
१६९६ चैत्र वद्य ६

आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता चैत्र वा ६ मंदवासर मुकाम मोहोल क्षेम असों. विशेष. आपण पत्रें शुद्ध एकादशीचीं व पौर्णिमेचीं पाठविलीं ती काल परवां पावलीं. लिहिलें वर्तमान कळलें. मुकारनामक वे मातुश्रीच्या सूत्राचा प्रकार लिहिला तो कळला. येथें सूत्रें पाटणकर वगैरे यांचे विद्यमानें आहेत. ह्मणून बातमी आली आहे. त्याचा शोध करून वरचेवर बंदोबस्त करीत जावा. म्हणोन लिहिलें. त्यास सूत्रें बहुत. नानाप्रकारे येतात. परंतु यांची कायम मिजाज आहे. आणि पुर्तेपणीं समजलें आहे कीं, क्षणभंगुर कारभार; व आह्मीही वरचेवर सावध करीतच आहों. तेणेंकरून सूत्रें लागत नाहीं व समजलेंही आहे कीं जर करितां अविलंबीली मसलत सिद्धीस जात नाहीं, तरी परिणाम लागत नाहीं. प्राण वांचणें होणें कठीण. अपकीर्तीस पात्र याजकरितां कोणेंही प्रकारें मसलत सिद्धीस जांवी हाच मनोमानसीं भाव आहे. दुसरा अर्थं किमपि नाहीं. यांचा कारकून तिकडे गेला म्हणून आइाकतों, ह्मणून लिहिले. त्यास, यांजकडून कोणी तिकडे गेला नाहीं व सूत्रे येतात त्यांसही साफ उत्तरें देतात. लाऊन ठेवीत नाहींत. इकडील बंदोबस्त आहेच. गुंता नाहीं. राजश्री मामांनीं उतावळी करून यश त्यांस दिलें. ईश्वरास करणें ! उपाय नाहीं! एक दिवस गांठ घातली नसती तर दुसरे दिवशीं हे पोंचले असते. मग गांठ घातल्यास चिंता नव्हती. व दुसरें, निजामअल्ली यांचा जांवई बसालतजंग याचा लेंक आदवानी कडून नबाबाकडे येत असतां मोहलेवर आला. श्रीमंतांस बातमी लागली. त्यांजवर धांवले. हे वर्तमान नवाबास कळलें, लांब मजल केली. जाऊन आटोपावें तों त्यांच्याने दम धरवला नाहीं. एक दिवस झुंजला. निदानीं हस्तगत जाहला. हेंहि काम वाईट जाहलें. त्याजवर गुरुवारीं जाबीतजंग, धौसे, राजश्री हरीपंत तात्याचे डेरेयास आले होते. सरदार इकडील सर्व एकत्र होऊन निश्चय ठरविला जे, मामा गेले ह्मणोन कांहीं गेलें नाहीं. अविलंबिली मसलत सिद्धीस न्यावीच न्यावी. एतद्वविषयीं इमानप्रमाणपूर्वक भाषणें परस्परें होऊन मुकाम मजकुरीं आले. आज कूच होऊन पुढें जात आहेत. श्रीमंतांनीं काल कूच करून मोड्याहून पुढें गेले. यांस त्यांस वीसा कोसांची तफावत आहे. गांठ लवकरच पडावी, ऐसें आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे आशिर्वाद.

पत्रांक ११७

श्री.
पौ चैत्र वा २ मंगळवार,
१६९६ चैत्रशुद्ध १४

अपत्यें तात्यानें चरणावर मस्तक ठेवून सां नमस्कार विज्ञापना. ता चैत्र शुध १४ रविवासर मुक्काम नजीक नाझरें वर्तमान यथास्थित असे. विशेष, श्रीमंतांची व रा मामांची गांठ काल मंदवारी दोन प्रहरां पडली. होणाराप्रों उतावळीनें हा प्रकार जाहला. सविस्तर वृत्त राजश्री हरपिंत तात्यांनीं लिहिलें आहे त्यावरोन कळेल. श्रीमंत राजश्री साबाजी भोंसले, सेनासाहेबसुभा, मंदवारीं वीस कोस नाझरेयानजीक माणेवर संध्याकाळच्या साहा घटका दिवसास आले. मामांनी माणेच्या व भिंवरेच्या संगमीं मुकाम करावा तो न केला. याजकरितां येथें मुक्काम केला. तों सूर्यास्तीं लढाई होऊन फौजा निघाल्याचें वर्तमान आले. तेव्हां मुस्तकीम होऊन राहिले. रात्रौ मामाकडील बुणगे वगैरे आले. ते आपणाजवळ उतरविले. आज तात्या व सर्व सरदार येथें आले. फौजेजवळ फौजेचा मुकाम जाहला. नबाबाकडे रात्रौ दोन तीन पत्रें पाठविली. त्यांनी अकरा कोशांचे कूच केलें. चौ घटकांनी एथें येतील उपरान्त सर्व एकत्र होऊन उदईक श्रीमंताच्या तोंडावर जातील. मामांनी उतावळी केली. इतक्यानें त्यास यश आलें. कांहीं लढाई चांगली जाहलीच नाहीं. ईश्वरीकृपेनें चिंता नाही. सर्व गोष्टी मनोदयानुरूपच घडतील. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विज्ञापना.

पत्रांक ११६.

श्री.
पौ चैत्र वद्य २ मंगळवार,
१६९६ चैत्र शुद्ध १४

आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता चैत्र शुद्ध १४ रविवासर मुकाम नजीक नाझरें वर्तमान यथास्थित असें. विशेष. इकडील सविस्तर वृत्त राजश्री हरीपंत तात्यांच्या पत्रावरून कळेल. श्रीमंत राजश्री सेनासाहेबसुभा काल वीस कोस मजल करून आले. कारण जे मामाची गांठ पडावी. त्यास, मोमांनी उतावळी केली. यामुळें यश त्यास आलें. नबाबाकडे दोन तीन सांडणीस्वार रात्रौ पाठविले. त्यांनीं अकरा कोसांचें कूच करून ये फौजे शेजारीं येऊन आज उतरतील. सर्व सरदार एकत्र होऊन उदईक त्यांचे तोंडावर जातील. सर्व गोष्टी मनोदयानुरूपच घडतील. चिंता नाहीं. नबाबाची व आपले यजमानाची कायमता आहे. चिंता नाहीं, राजश्री हरीपंत तात्या वे सरदार सर्व येथें आले. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे आशीर्वाद.

पत्रांक ११५

श्री.
पौ चैत्र वा २ मंगळवार,
१६९६ चैत्र शुद्ध १५

राजश्री नानाजी कृष्ण जोशी व बापूराव वैद्य गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. राजश्री रघुनाथराव दादा मागें पंढरपुरच्या सुमारें चालिले ह्मणोन त्रिंबकराव मामा सडे होऊन त्यांजमागें गेले. पंधराची संप. मुसलमान लोकांचा गुंता. याजबद्दल एक दिवस आह्मी मागे राहिलों, छ १३ मोहरम शनिवारीं वेणूनाद गोपाळपुरावर दादांचा मुकाम होता. कासेगांवीं सेनाधुरंधराची फौज होती. मामा तेथें गेले. दादा तोफखाना व फौजसुद्धा कासेगांवास आले. इकडून उतावळी जाहली. सारांश, जुझाचा प्रसंग न बनला. मामा जखमी पाडाऊ गेले, आह्मी वास.कोस मजल करून माणेवर नाझरे याखालीं दोन कोस मुकाम केला. तों संध्याकाळीं हें वर्तमान व फौज व राजश्री हरीपंत तात्या आले. एक मामा मात्र निशाण हत्ती वगैरे समेत गेले. वरकड वामनराव व रास्ते, नारोशंकर यांचें पथक व शिवराम विठल अवत्र फौज आह्मांजवळ आली. नबाबही सा चौ घटकांनी येथें येत आहेत. दादांनी आज मुकाम करावा. वरकड देव सर्व घडवील, राजश्री बापू व नाना यासीं आपण खातरजमा करून सांगावें. आह्मींही त्यांस लिहिलें आहे. व रा हरीपंत तात्या व तात्या यांणीं लिा आहे. त्याजवरून कळेल, चिंता न करावी. मामा कांहीं घेऊन गेले नाहींत. रा छ १४ मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसूद.


पत्रांक ११४

श्रीशंकर
१६९६ चैत्र शुद्ध १३

तीर्थरूप राजश्री नानाजोशी व बापूराव वैद्य स्वामींचे सेवेसीं:-

अपत्यें कृष्णराव नारायण जोशी सां नमस्कार, विनंती उपरी. राजश्री साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा यांनी अजम शादीखान पन्ही सौदागर यांस रुा ३००० तीन हजार देविले आहेत. त्यास, खान मारनिल्हे यांनी सदरहू ‘तीन हजार रुपये नवनीतखान पन्ही सौदागर यांस देविले आहेत. तरी चिठी पावलिया रोजां जा जा उत्तरीं ठावठिकाणा चौकस करून पावलियाचें कबज घेउन सदरहू तीन हजार रुा द्यावे. मिती शके १६९६ जयनाम संवत्सर चैत्र शुध १३ बहुत काय लिहिणे ? हे विनंती.

                                                                             लेखांक ३५२

                                                                                                श्री                                                        १६१३ भाद्रपद वद्य १३

स्वस्ति श्री राज्याभिषेकशक १८ प्रजापति नाम संवत्सरे भाद्रपद बहुल त्रयोदसी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणी समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री शंकराजी पंडित सचिव यासी आज्ञा केली ऐसी जे बेरड व कोळी किले पुरंधर हस्तगत करून द्यावयाची उमेद धरिली आहे तरी स्वामीने त्यास अभयपत्रे करून दिल्ही पाहिजेती ह्मणोन सर्जाराव जेधे देशमुख रोहिडखोरे याणी विदित केले त्यावरून स्वामीने बेरडास व कोळियास अभयपत्रे दिल्ही आहेत तरी तुह्मी त्या कोळ्याचे व बेरडाचे दिलासे करून पुरंधरची हवी करवणे आणि जे अनुकूलता करावयाची ते करून देऊन गड हस्तगत होए ऐसे करणे कोळियाची व बेरडाची सरफराजी कार्य सिध जालियावरी जे करावयाची ते करणे याचे चालवायास अंतर पडे न देणे जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा

                                                                                                                                                                  189 1

                                                                             लेखांक ३५१

                                                                                                श्री                                                        १६१३ भाद्रपद वद्य १०

स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १८ प्रजापतिनाम संवत्सरे भाद्रपद बहुल दशमी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणि समस्त सेनाधुरंधर राजमान्यराजश्री संताजी घोरपडे सेनापति यासि आज्ञा केली ऐसि जे मा। सर्जाराऊ जेधे देसमुख ता। रोहिडखोरे हे स्वामीसनिध येऊन मावलप्रांतीचे व पुरंधर व जुनर या प्रांतीचे कितेक वर्तमान विदित केले त्यावरून यास त्या कार्यभागाची आज्ञा करून राजश्री शंकराजी पंतसचिव यास पत्रे देऊन पाठविले आहेत हे जो कार्यभाग करायाचा तो करितील त्या प्रसंगी सेनेकडून साहेता पाहिजेसी होईल तेव्हा तुह्मास लेहून पाठवितील ते करणे आणि कार्यसिध होय ऐसें करणे येविशीं अंतर पडो न देणे जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सूज्ञ असा

                                                                                                                                                                  189 1

पत्रांक ११३

श्री.
पौ छ ११ मोहरम.
१६९६ चैत्र शुा १२

आशिर्वाद उपरी. याचे फौजेंत पोटाचा गवगवा तीन लक्षपर्यंत दरमहा लागतात. त्यास, लक्ष रुानें काय होतें? हाल मामांनी सव्वालक्ष द्यावयाचा करार केला आहे. त्यांस निदानीं दोन तरी पाहिजेत. त्याविषयीं दोन तीन वेळ लिहिलें होतें. त्याचें उत्तर आलें कीं, दरमहा नेमावें, तेव्हां पन्नास हजार देऊं ह्मणतात. ह्मणोन लिहिलें. त्यास मसलत भारी. कराराप्रों विभागणी होईल, ह्मटल्यास कैसें होतें ? प्रसंगोपात्त खर्च केल्यास कैसें होईल ? आपण दरमाहा नेमावें ऐसा लाभ आपणास कोणता ? आपण चाकरी करावी तें करित असतों. दरमहा नेमावें ह्मणतात. तेव्हां अपूर्व आहे. एवढी सरदारी त्यांचें लक्षीं असतां आणि ते जबरदस्त असोन दरमाहानें मागतात, हें काय आहे ? त्यांनींच द्यावी, हें त्यांस उचित. दोन लक्ष रुपये दिल्यानें कांहीं बुडतात ऐसें नाहीं. आणि दिल्याखेरीज यांचे नीट पडणार नाहीं. याजकरितां एकदोन वेळ मर्जीनुरूप ह्मणोन पहावें. न देतील तरी उपाय काय ? हर कैसें तरी चालेल, परंतु वाईट दिसेल याजकरितां वरचेवर लिहितों. उत्तर निविष्ट पाठवावें. बहुत काय लिहिणे ? लोभ किजे. हे आशिर्वाद. कराराची यादी सरजामाची पाठविली आहे. त्यावरून कळेल. हे आशिर्वाद.

राजश्री नाना स्वामीस साष्टांग नमस्कार. विनंती. राजश्री तात्यांनी लिहिलें आहे त्यावरून कळेल. हे विनंती. मामाच्या भाषणेंकरून नबाब अजुर्दा व हेहि अजुर्दा ! हें ठीक नाहीं. आपण ह्मणतील कीं, मामा राज्यांत शहाणे त्यास हे खरें. परंतु सत्तेचें शहाणपण आहे ! प्रसंगोपात विचारणा दिसत नाहीं. हे दिवस जबरेचे नाहींत. समाधानानेंच करून सर्व गोष्टी नीट पडतील. त्यास, ती गोष्ट येथें नाहीं. कळावें, हे विनंती.

पत्रांक ११२

श्री
१६९६ चैत्र शुद्ध ९

अपत्ये तात्याने दोनी कर जोडून सां नमस्कार, विज्ञापना. राजश्री सेनासाहेबसुभा यांनीं आह्मांस साल गुा चे ऐवजीं खर्चाबद्दल तेथून रुा पांच हजार साडेआठशांची चिठी देविली आहे. त्यावरून राजश्री बाळाजी गणेश यांचे नांवाची चिठी पा आहे. तर, सदरहू ऐवज घ्यावा. एकूण ऐवज सारा आठावीस हजार साडे आठशांच्या चिठ्या जाहल्या. येणेंप्रमाणे ऐवज दिलाच असेल. व हालींहि लिहिल्याप्रमाणें द्यावा. हा अर्ज कर्ज दाखल द्यावासें असल्यास लिा पाठवावें. त्याचे नांवचें खत लिा पा द्यावें. कदाचित् कर्ज नच द्यावेंसें असलें, तरी ऐवज पुढें सफरचें ऐवज घ्यावयास येईल. सारांश, चिठ्या माघाया न फिरत तो अर्थ करावा. राजश्री बाबूरावजीची यादी कराराची तैनात रुपये पंधरा हजार रुपयांची करून घेतली आहे. देणे मात्र व्हायचे आहे. आज करून घेतो. वकिलियाचे तर्फेची त्या दरबारी करार जाहली आहे. पूर्वीचा दाखला नाहीं. सांप्रत उपयोगी पडिलें सा, ह्मणून यादी करून घेतली आहे. सदरहू ऐवजाचा सरंजाम लाऊन घ्यावा.. याप्रमाणे करार आहे. कळावे. यादीची नकलही पाठविली आहे. कळावे. बहुत काय लिहिणे ? पोद्दारीचें भाषणांत आले आहे. ऐवज आपणाकडे घेऊन चिट्या आपणावर करून घेणे ठीक नाहीं. याजवरी पोद्दारी ऐवज मात्र कराराप्रा घेतों. बहुत काय लिहिणे ? हे विज्ञापना.

पत्रांक १११

श्री. ( नकल )
पौ छ ११ मोहरम
१६९६ चैत्र शुद्ध ८

यादी करार सरकार राजश्री साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा सुा अब सबैन मया व अल्लफ. राजश्री बाबूराव विश्वनाथ वैद्य. तुह्मीं पुरातन पदरचे, कैलासवासी तीर्थरूप बाबासाहेब यांणीं तुमचें व वडिलांचे चालविलें. अलिकडे तुमचा सरंजाम चालत नव्हता. त्यास, होलीं तुह्मीं दौलतीचे उपयोगीं पडलां. तुमचें चालवणें आवश्यक. याजकरतां तुह्मांस वतन रुपये १५००० पंधरा हजार करार केले असे. तरी, याचा सरंजाम तुमचा पेशजी आहे तो अगर त्याचे मुबदला आणखी लाऊन देऊ. व पां रामटेक येथील देशपांडेपण वतनी तुमचें आहे, तें तुमचें तुह्मांकडे चालेल. छ, ७ मोहरम. सदरहूपों करार करून द्यावयाविशीं आज्ञा देणें.