Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
ह्या साधु व ग्रंथकार सुधारकांनीं तत्कालीन राज्यकर्त्यांचे व कुधारकांचे विचार हाणून पाडण्यास खालील मार्ग स्वीकारले. मुसुलमानांच्या करड्या अमलाखालीं राजकीय लेख लिहिण्याची किंवा राजकीय कृत्यें करण्याची सोयच नव्हती. पूर्वीचे जे जाधव राजे त्यांचे इतिहास व बखरीहि लिहून काम भागण्यासारखें नव्हतें. जाधवांचे राज्य मुसुलमानांच्या हातीं गेलें तें राष्ट्रांत सुखैकपरायणता, आलस्य, मत्सर, हलगर्जीपणा, बेसावधपणा वगैरे दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला असल्याविना गेलें नाहीं हें उघड आहे. जाधवांच्या राजवटीच्या शेवटल्या पांचपन्नास वर्षांचा इतिहास यथातथ्य लिहावयाचा म्हणजे हे सर्व दोष उघड करून दाखविले पाहिजेत. आणि हे दोष उघड करून दाखविले म्हणजे त्या उघडकीनें शहाणपणा शिकावयाचा सोडून देशांत कित्येक प्राणी असे असतात कीं अन्योन्य द्वेष करण्यासच त्या उघडकीचा त्यांना उपयोग होतो. स्वदेशाच्या इतिहासाचें सूक्ष्मपणें मनन करून व त्यांत दाखविलेल्या गुणदोषांतून गुणांचें ग्रहण व दोषांचा त्याग करून, स्वदेशाच्या कल्याणाचा मार्ग न स्वीकरितां, दोषांकडेच तेवढी दृष्टि देऊन, आपले पूर्वज मूर्ख होते व ते एकमेकांचा मत्सर करीत होते, तेव्हां आपणहि हाच मत्सर असाच पुढें चालविला पाहिजे, अशी कुढी व देशबुडवी भावना कित्येक कलिपुरुषांच्या मनात प्रादुर्भूत होते. तेव्हां जाधवांच्या बखरी किंवा चरित्रें लिहिण्याच्याहि भरीस ते प्रायः पडले नाहींत. राज्यकर्त्यात व आपणांत जातिसंबंधानें व आचारासंबंधानें ज्या बाबींत विशेष भेद मूळापासूनच होता त्या धर्माची कास ह्या साधुग्रंथकारांनीं धरली. आचारानें व धर्मानें राज्यकर्त्यांसारखे होऊन व त्यांच्याशीं तादात्म्य पावून राष्ट्रत्व नष्ट होतें हें ते पक्केपणीं जाणत होते. तेव्हां धर्माच्या बाबतींत जित व जेते ह्यांत मूळचा जमीनअस्मानाचा भेद होताच, तो त्यानीं आपल्या ग्रंथांत आणून स्वराष्ट्रत्व कायम ठेविलें. इ. स. १३१८ पासून १६५६ पर्यंतच्या ग्रंथकारांनीं धर्मासंबंधीं ग्रंथरचना मराठींत कां केलीं त्याचें हें रहस्य आहे. तसेंच बखरी व इतिहास न लिहितां त्यांनीं भारत, भागवत व रामायण ह्यांचेच अनेक अनुवाद केले. त्याचें कारण असें आहे कीं, त्यापासून राष्ट्रांतील कुधारकांना परस्पर उखाळ्यापाखाळ्या काढण्यास तर संधि मिळत नाहीं आणि इतिहासाच्या अध्ययनापासून जो नैतिक फायदा व्हावयाचा तो तर बराच होतो. महाराष्ट्रांत १६५६ च्या पुढें बखरी निर्माण कां झाल्या व त्याच्या आधीं भारत व रामायण ह्यांतील कथाच मराठींत प्रचलित कां होत्या, त्याचें कारण हें आहे. भारत, रामायण व धर्म ह्यांवर झालेले मराठी ग्रंथ महाराष्ट्रांत गांवोगांव वाचीत आणि त्यांतील भाषा व्यवहारांतील फारशीमिश्रित मराठी भाषेला आवरून धरी. सारांश, साधुसंतांचे ग्रंथ म्हणजे त्यावेळच्या फारशीमिश्रित धेडगुजरी मराठी बडबडीवर केवळ रामबाण औषध होतें
(१०) फारशीच्या संसर्गानें बिघडण्यापासून मराठी भाषेला हिंदुधर्मानेंहि राखिलें. जेजुरी, पंढरपूर, तुळजापूर, येथील गोंधळी, बाळसंतोष, भाट, चित्रकथी, व भुत्ये तसेच गांवोगांवचे पुराणिक, हरदास व लळितकार, ह्यांची भाषा शुद्ध मराठी असे महाराष्ट्रांतील खालच्या प्रतीच्या रंगेल लोकांचीं एकच वाङ्मयात्मक करमणूक म्हटली म्हणजे श्रृंगारिक व भेदिक लावण्या म्हणण्याची व ऐकण्याची. त्यांचीहि भाषा त्यावेळी शुद्ध मराठी असे. बायकांच्या कहाण्या व पुरुषांच्या भूपाळ्या ह्यांच्यासारखी शुद्ध मराठी तर दुस-या कोंठेच नाहीं. संभावित लोक व वारकरी लोक अभंग व पदें म्हणत व तीं बरींच शुद्ध असत. सामान्य लोकांचें धार्मिक व इतर वाङ्मय हें असें शुद्ध जुन्या मराठींत सांठलें गेल्यामुळें, व्यवहारांत जो त्यांच्या तोंडाला फारशीचा विटाळ होत असे तो बराच धुतला जाई.
इ. स. १३१८ पासून १६५६ पर्यंत फारशीच्या सान्निध्यानें मराठी भाषेंत जे फेरफार झाले त्यासंबंधीं येथपर्यंत चार शब्द सांगितले. आतां, ह्या सान्निध्यापासून मराठीला तोटा झाला किंवा नफा झाला हें पाहणे फार हिताचें आहे. कारण दैवगतीनें मराठीची सध्यां एका यूरोपियन भाषेशीं गांठ पडली आहे. तेव्हां त्या गांठींतून रूपभंग न होता ती कशीं निभावून नेता येईल ह्याचा अंदाज ह्या पहाण्यापासून थोडीबहुत होणार आहे.
फारशीच्या सान्निध्यापासून मराठीला तोटा झाला किंवा नफा झाला हें पहावयाचें म्हटलें म्हणजे, ह्या दोन भाषांच्या मूळ स्वभावाची परीक्षा केली पाहिजे; इ. स. १३१८ पासून १६५६ पर्यंतच्या काळांत ह्या दोन्ही भाषा, भाषांच्या प्रगतीचे जे चार वर्ग आहेत, त्यांपैकीं कोणत्या वर्गांत होत्या हें पाहिलें पाहिजे; आणि ह्या दोन्ही भाषा बोलणा-या लोकांचीं संस्कृति कोणत्या दर्जाची होती हीहि बाब हिशेबांत घेतली पाहिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७२
१५२९ श्रावण शुध्द ९
अज रखतखाने खुदावंद मलीकाने मलीक अंबर मुखलिसान दामदौलतहू बिजानेब कारकुनानी परगणे पांडियापेडगाऊ व हुदेदारानी अजहती मोकासाई हाल व इस्तकबाल व मोकदमानी कसबे चाभारगोंदे पा। मा। बिदानद सु॥ समान अलफ
दामोधरभट बिन नारायणभट रामेस्वरभट बिन नारायणभट सा। आखी मुदगल हुजूर मालूम केले जे आपणासी इनाम जमीन चावर एक १ देखील नखतयाती व बाजे बाबा दर सवाद कसबेमजकुरी देणे मारहम मालोजी व विठोजी भोसले बा। हुजती भोगवटे. तसरुफाती चालिले आहे साहेबाचे खुर्द खत होये मालूम जाले बराये मालूमाती खारितेसी आणौनु दामोधरभट व रामेस्वरभट बिन नारायणभट यासी इनाम जमीन चावर एक १
दर सवाद का। मा। देखील नखतयाती व बाजे बाबा देणे मारहम मालोजी व विठोजी भोसले भोगवटा तसरुफाती बा। मुती चालत असेली तेणेप्रमाणे चालविजे दर हर साल खुर्द खताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असेली फिराउनु दीजे मोर्तब सूद
तेरीख ७ माहे रबिलाखर रुजू सुरनीस
रबिलाखर सुरू सूद
रुजू बार सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
असले कुधारक ह्या देशांत इ. स. १३१८ पासून १६५६ पर्यंत बहुतं निर्माण झाले. फारशी भाषा लिहिण्यांत व बोलण्यांत मुसुलमान लोकांनाहि ते मागें टाकूं लागले. मुसुलमानी धर्मांत मूर्तिपूजा नाहीं, चातुर्वर्ण्य नाहीं अनेक दैवते नाहींत, तेव्हां तीं आपल्या देशांतील धर्मांतहि नसावीं असें या लोकांस वाटूं लागलें व त्याप्रमाणें ते उपदेशहि करूं लागले. चातुर्वर्ण्य नाहींसे झालें पाहिजे, मूर्तिपूजा मोडली पाहिजे व सर्वत्र एकेश्वरी मत प्रचलित झाले पाहिजे, म्हणजे आपला हा देश वर येईल, असा टाहो त्यानीं फारशी भाषेंत चालविला. आपला हा देश वर यावा, हा बोलण्याचा पेंच मात्र त्यांनी कधीं सोडिला नाही; बाकी सर्व कृति त्यांनीं अशी ठेविली कीं, त्यानें भाषा, धर्म व आचार समूळ नष्ट व्हावे. स्वभाषेच्या, स्वधर्माच्या व स्वाचाराच्या निदेनें भरलेलीं भाषणें फारशींतून करण्यानें त्यांना एक वैयक्तिक फायदा असे. तो हा कीं मुसुलमान राज्यकर्त्यांना हे लोक आपल्या मताचे आहेत व कधीं काळीं आपल्या धर्माचेहि होतील, निदान आपल्या राज्याच्या चिरस्थायित्वाचे स्तंभ होतील, असा भ्रम पडे. आणि ह्या भ्रमावर ते त्यांना दरबारीं लहानमोठ्या नोक-या देत. दरबारांत मानमान्यता झाल्यामुळें, देशांतील लोकांनाहि त्यांचा वचक वाटे. असले कांहीं चमत्कारिक कुधारक त्या काळीं फार पिकले होते. दादो नर्सो काळे, दियानतराव, गांगो बाहमणी, वगैरें नावें ह्या तीनशें वर्षांत जीं मुसुलमानी कागदपत्रांतून व तवारिखांतून अधूनमधून चमकतात तीं ह्या कुधारकाचींच होत. फारशी पेहराव, फारशी शब्द, फारशी पीर, फारशी कल्पना, ह्यांचा जो प्रादुर्भाव महाराष्ट्रांत त्यावेळीं झाला, त्याला ह्या कुधारकांची मदत बरीच झाली. परंतु, कुधारकांच्या ह्या मेहनतीनें देश वर यावयाचा तो दिवसेंदिवस खालींच जाऊं लागला. पडता काळ आला असतां राष्ट्रत्वाचीं प्रधान अंगे जीं स्वभाषा, स्वधर्म, व स्वाचार त्यांचें संगोपन व वर्धन करणें हेंच परराज्याखालीं राष्ट्रत्वाचीं बीजें कायम रुचत ठेवण्याचें मुख्य इंगित आहे. स्वभाषा, स्वधर्म व स्वाचार ह्यांच्या पवित्र नांवाखालीं लोकांत जो सुखैकप्रियतेचा, आलस्याचा, विभक्ततेचा व देशकार्यपराङमुखतेचा संचार झालेला असतो व ज्याच्यांमुळे देश प्रथम हातचा गेलेला असतो. त्या संचाराला तोडगा करणें सर्वथा योग्य व इष्ट आहे. परंतु, संचाराला तोडगा न करतां मूळ धर्माला व आचाराला दुखापत करणें केव्हाहि गुणकारक नसतें. त्यावेळच्या कुधारकांचा व राज्यकर्त्यांचा, मूळ धर्माला, मूळ भाषेला व मूळ आचाराला नष्ट करण्याचा विचार होता. तो महाराष्ट्रांतील सुधारकांनीं, साधूंनी व ग्रंथकारांनीं हाणून पाडिला. मूर्ति म्हणजे ईश्वराच्या प्रतिमा आहेत, चातुर्वर्ण्यातील सर्व लोक देव आणि धर्म ह्यांच्यापुढें सारखे आहेत, एकच ब्रह्म सर्वत्र पसरलें आहे, ह्या तीन सिद्धांतांचें निरूपण ह्या सुधारक साधूंनी व ग्रथंकारांनीं योग्य त-हेनें केलें. हे तिन्ही सिद्धान्त आपल्या हिंदुधर्माचे मुख्य स्तंभ आहेत, हें त्यांनीं नानाप्रकारांनी लोकांच्या मनांवर बिंबविले. जात मोडून सबगोलंकार करावा, मूर्ति फोडून झुगारून द्याव्या, देवळें जमीनदोस्त करावीं, वगैरे वात्रट विचार त्यांच्या लेखांत कोठेंहि नाहींत. जात मोडून टाकावी, दगडाचे देव फेकून द्यावे, महाराशीं ब्राह्मणांनीं अन्नव्यवहार करावा, वगैरे अपसिद्धान्तांचे आरोप ह्या साधूंवर कैलासवासी म. गो. रानडे यांनीं आपल्या इतिहासांत केले आहेत. परंतु ह्या वेळची सामाजिक, धार्मिक वगैरे स्थिति रानड्यांस जशी कळावी तशी प्रायः कळली नव्हती. ह्या साधूंचे ग्रंथ मीं लक्ष्यपूर्वक वाचले आहेत. हिंदुधर्माला सोडण्याचा त्यांचा विचार होता, असें त्यांच्या ग्रंथांवरून दिसत नाहीं. दगड म्हणून दगडाला भजणें, किंवा महार म्हणून माणसाला छळणें, किंवा ब्राह्मण म्हणून इतर वर्णांचा धिःकार करणें मनुष्यमात्राला सर्वथा लाजिरवाणें आहे, असें या ग्रंथकारांनीं इतर संस्कृत ग्रंथकारांप्रमाणेंच म्हटलें आहे. परंतु रानडे म्हणतात तसली सुधारणा त्यांच्या ग्रंथांत कोठें दिसत नाहीं. ह्या साधूंना देव, धर्म, देवळें, जाती व स्वभाषा, हीं बिलकुल सोडावयाचीं नव्हतीं. व प्रस्तुतच्या कित्येक विद्वान् देशाभिमान्यांप्रमाणें परभाषेंत ग्रंथ व भाषणें करून स्वदेश वर नेण्याचें ढोंगहि करावयाचें नव्हतें. रानड्यांच्या ग्रंथांतील हें संतांवरील विवेचन अगदीं निराधार व शोधकपणास अयोग्य असें झालेलें आहे; महाराष्ट्रधर्माचा खरा अर्थहि त्यांच्या ध्यानांत आला नाहीं; व संतांच्या स्वप्नींहि नव्हते ते विचार त्यांच्यावर लादले गेले आहेत. संतांचे मूळ ग्रंथ विचारी लोक जसजसे सखोल बुद्धीनें वाचतील तसतसे माझ्यासारखेंच त्यांचेंहि मत होईल अशी माझी खात्री आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७१
१५२८ श्रावण वद्य २
मा। मालोजी व विठोजी भोसले
कारकुनानी माहालहाय व देसमुखानी माहालहाय मा। सर्क मादबर मुताले नुमाइन सु॥ सबा अलफु बार नुमा + + + + + बानि + +
पा।३ कसबे ६ खेरीज इनाम
पा। एळूर कसबे लासूर
पा। देर्हाडी पा। गांडापूर
पा। कन्नरड कसबे आधारसूल
देखील जातेगौ प्रा। अहमदाबाद
वावले मौजे पोरले
खेरीज किलेकोट प्रा। अहमदाबाद
इनाम मौजे पिंपळवाडी
पा। पैठण
गौडगौ उरुफ अहमदाबाद
सदर्हूप्रमाणे दिधले असे बाबमहसुलेसी दुमाला कीजे मोर्तब सुद तेरीख १५ माहे रबिलाखर
रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
(९) फारशीच्या जबरदस्तीनें मराठी भाषा छिन्नभिन्न न होण्याला चवथें कारण म्हटले म्हणजे चौदाव्या, पंधराव्या व सोळाव्या शतकांत झालेले मराठी ग्रंथकार होत. दरबारांत व व्यवहारांत जी मराठी भाषा चाले, तीत यद्यपि फारशी शब्द व प्रयोग बेसुमार शिरले. तत्रापि मराठी ग्रंथकारांच्या ग्रंथांत जेवढे म्हणून कमी फारशी शब्द प्रयोग येतील, तितके आले आहेत. जो शब्द किंवा प्रयोग सामान्यजनसमूहाच्या वापरण्यानें अत्यंत रूढ होऊन गेला, तोच तेवढा ह्या ग्रंथकारांनीं आपल्या ग्रंथांत येऊं दिला. आणि तोहि नियमानें येतच असे, असा प्रकार नाहीं. ला हा फारशी प्रत्यय नामदेवाच्या ग्रंथांत कित्येक ठिकाणीं आलेला आहे; परंतु एकनाथाच्या ग्रंथांत ह्याचा प्रयोग क्वचितच होतो. मागें एकनाथाची अर्जदास्त दिली आहे, तींत अत्यंत रूढ झालेले फारशी शब्द व प्रयोग आले आहेत, हें वाचकांच्या लक्षांत येईल. शिवाय, नरदेहाच्या शाक्त्यांवर रूपक करण्याच्या ओघांत, एकनाथानें तत्कालीन लहानमोठ्या मुसुलमान अधिका-यांचे स्वभाववर्णन केलेलें आहे व हें स्वभाववर्णन करतांना त्याला त्या त्या अधिका-याचें फारशी नांव आणणें जरूर पडलें. एकनाथाच्या भागवतांत किंवा रामायणांत त्याच्या अर्जदास्तीतल्या प्रमाणे फारशी शब्द नाहीत. दासोपंत, मुक्ताबाई, मुंतोजीबोवा, उद्धवचिदघन वगैरे तत्कालीन ग्रंथकारांच्याहि ग्रंथांत फारशी प्रयोग व शब्द अत्यंत कमी आहेत. ह्या सर्व ग्रंथकारांची भाषा जुनी मराठी आहे. आतां कालान्तरानें प्रत्येक भाषेंत सहजपणानें दर शंभर वर्षांत जो फेरफार होत जातो तो ह्या तीनशे वर्षांतील निरनिराळ्या काळी झालेल्या ग्रंथकारांच्या ग्रंथांत झाला आहे. परंतु फारशींपासून जितकें अलिप्त रहावेल तितके हे ग्रंथकार राहिले आहेत. ह्याचा परिणाम असा झाला कीं मराठी भाषेत आतल्याआंत दोन भाषा झाल्या, एक साधुग्रंथकारांची बिनफारशी भाषा व दुसरी व्यवहारांतील फारशीशब्दमिश्रित भाषा. उदाहरणार्थ, शिवाजीच्या वेळच्या किंवा पूर्वीच्या दरबारी पत्रांतील भाषा घ्या व ती तुकारामाच्या किंवा वामनाच्या किंवा रामदासाच्या भाषेशीं तोलून पहा, म्हणजे ही ग्रंथकारांची मराठी भाषा एक निराळीच होती हें लक्ष्यांत येईल. तत्कालीन मराठी ग्रंथकारांची भाषा दरबारी मराठी भाषेहून भिन्न होण्याचें कारण असें होतें कीं, ह्या ग्रंथकारांच्या ग्रंथांचे विषय, दरबारांतील किंवा व्यवहारांतील विषयांहून निराळे होते. ह्या ग्रंथकाराच्या ग्रंथांचे विषय प्रायः धर्म, वेदान्त व पुराणेतिहास, ह्यांपैकीं कोणता तरी एक किंवा सर्व असत. ह्या विषयांत फारशी शब्दांचा व प्रयोगांचा उपयोग करण्याची जरूर नसे. त्यांचें जगच निराळें असे. त्यामुळें ह्या ग्रंथकारांच्या ग्रंथांत मराठीचें मूळ, अस्सल व शुद्ध असें रूप कायम राहिलें. हे ग्रंथकार मुळीं झालेच नसते तर फारशी शब्दांचे व प्रयोगांचें जींत संख्याधिक्य आहे अशी मराठी राहिली असती. अशा मराठीस मराठी ही संज्ञा राहती किंवा नाहीं हाच प्रश्न आहे. साक्सनची फ्रेंचमुळें जशी इंग्रजी बनली किंवा हिंदीची फारशीमुळे जशी उर्दू बनली तशी मराठीची एखादी निराळीच भाषा बनती. आणि निराळी भाषा बनल्यावर मराठ्यांचें राष्ट्र असे शब्द वापरतां आले नसते. इतकेंच नव्हे, तर हे ग्रंथकार न होते, तर सतराव्याः शतकांत महाराष्ट्रांत झालेली स्पृहणीय राज्यक्रांति झालीच नसती.
मराठी भाषा फारशीच्या कचाटींतून शाबूत राहण्याला हे ग्रंथकार व त्यांच्या ग्रंथांतील विषय कारण झाले म्हणून वर प्रतिपादन केलें आहे. हा प्रकार कसा झाला त्याचा पुढें खुलासा करतों. कोणत्याहि देशावर परराज्य आलें म्हणजे त्या देशांतील लोकांचें चरित्र नानाप्रकारें संकुचित होतें. हा संकोच लैकिक म्हणून जे सर्व व्यवहार आहेत त्यांत भांसू लागतो. सार्वजनिक बोलणें, सार्वजनिक लिहिणें, सार्वजनिक कृत्यें करणें ह्या सर्व बाबतींत राज्यकर्त्यांच्या भाषेचा व कृत्यांचा संचार होतो. तो इतका उत्कट होतो की देशी भाषेंत बोलणें व देशी त-हेनें चालणें गौण, लाजिरवाणें तिरस्करणीय आहे असें देशांतीलच लोकांपैकीं कांहीस वाटू लागतें; व ते स्वदेशांतील चांगल्याहि संस्थांना वाईट समजूं लागतात. स्वदेशांतील पोषाकाची त-हा, स्वदेशांतील घरें बांधण्याची त-हा, स्वदेशांतील भाषेची त-हा, स्वदेशांतील धर्माची त-हा, स्वदेशांतींल काव्यांची त-हा, वगैरे सर्व गोष्टी त्यांना त्याज्य वाटतात व परकीय राज्यकर्त्यांच्या वाईट व चांगल्या अशा सर्वच त-हा संग्राह्य भासूं लागतात. उघडच आहे, राज्यकर्त्यांनीं राज्य मिळविलेलें असतें, तेव्हां त्यांच्यांत चांगले गुण असल्यावांचून तें त्यांना मिळवितां आले नसावें असा सिद्धांत लोक सहज करतात. तसेंच, देशांतील लोकांनीं राज्य घालविलेलें असतें, तेव्हां त्यांच्यांत वाईट गुण असल्यावांचून तें त्यांनीं गमाविलें नसलें पाहिजे, असाहि दुसरा सिद्धान्त सहज उत्पन्न होतो. व ह्या दोन सिद्धान्तांची सांगड घालून देशांत कित्येक कुधारक निपजत असतात. ह्या कुधारकांचा समज असा असतो कीं, राज्यकर्त्यांची भाषा, धर्म, पोषाख, व इतर संस्था स्वीकारल्या असतां, आपण राज्यकर्ते, निदान राज्यकर्त्यांप्रमाणें तरी, होऊं. ह्या खोट्या समजावर वाहवत जाऊन, हे लोक देश, धर्म व भाषा ह्या तिहींची अवनति करण्यास कारण होतात.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७०
१५२८ श्रावण शुध्द ३
(फारसी मजकूर)
कारकुनानि समत दौलताबाद बिदानद परगणे कनरड समत मजकूर बा। दर बाब आ की पा। मजकूर सु॥ सबा अलफु दरवज मुकासा बदल मवेजिबु मालोजी व विठोजी भोसले सरगुर्हायाती गुऱ्होथल यास दिधले असे बाबा माहासूलेसि दुमाला कीजे देखील किले व कोट मुकासा नफती व जातेगौ व वाकडी
छ २ माहे रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
(५) फारशींतील कित्येक भारदस्त शब्दांचा मान न राखतां वाटेल तसा उच्चार करून ते मराठींत घेत. पाच्छा, पैजार, माया [पैसा], अबळा, पैरण, खर्चवेच, तक्कया, बबर्ची हे मराठी शब्द फारशी शब्दांच्या उच्चारांच्या हालअपेष्टा करून घेतले आहेत.
मराठीनें हे जे आपले संस्कार फारशी शब्दांवर चालविले त्यांच्यामुळें ह्या फारशी शब्दांचा नूर उतरून गेला व ते इतर मराठी शब्दांप्रमाणें वापरले जाऊं लागले. जिंकणा-या लोकांची फारशी भाषा असतांहि मराठींचे माहात्म्य रहाण्याला मराठीचे व मराठ्यांचे कांहीं गुण कारण झाले. ते गुण येणेंप्रमाणें:-
(६) मुसुलमानी अंमल सुरू झाला तेव्हां प्रथम कांहीं वर्षे सरकारी दफ्तर फारशींत लिहीत असत. परंतु गांवें, पुरुष, स्त्रिया, शेतें, वगैरेंची विशेषनामें फारशींत लिहल्यानें त्यापासून फार घोटाळा होऊं लागला. फारशी अक्षरमालिका इंग्रजी अक्षरमालिकेप्रमाणेंच अत्यंत अपूर्ण आहे. तींत कांही उच्चारांना फाजील अक्षरें आहेत व ब-याच उच्चारांना अक्षरेंच नाहींत. शिवाय, फारशींत हा एक मोठा दोष आहे कीं, तिच्या अक्षरमालिकेंत अ, इ, उ, ऋ, ऐ, वगैरे स्वरांना अक्षरें नाहींत. त्यामुळें फारशी शिकस्ता नांवाच्या मोडी म्हणजे जलद लिहिण्यांत कोणत्या अक्षराला कोणता स्वर लावावयाचा, हें ठरवितां येत नाहीं. हा दोष परभाषेंतील विशेषनामें फारशींत लिहितांना तर फारच भासमान होतो. उदाहरणार्थ, सफर अशी तीन अक्षरें जर फारशींत काढली व त्याचा एक शब्द बनविला, तर त्याचे सफर, सिफर, सफिर, सुफर, सफुर, सिफिर, सुफिर, सिफुर, सुफुर असे अनेक उच्चार होतील. ही अडचण मराठी विशेषनामें लिहिण्यांत फार येऊं लागल्यामुळें, दरबारी जाहीरनामे पुरशिसा, चकनामे, निवाडे, दानपत्रें वगैरे लिहिण्यांत वर फारशी व खालीं मराठी भाषेचा उपयोग होंऊ लागला. मराठीची लिपि देवनागरी असल्याकारणानें, तिचें श्रेष्ठत्व, फारशीहून जास्त भासूं लागलें; व दरबारी लिहिण्यांतहि मराठीचा प्रवेश झाला. दरबारी लिहिण्यांत मराठीचा प्रवेश झाल्यामुळें, तींत पुष्कळ फारशी शब्द शिरले हें खरें आहे. परंतु दरबारांत शिरल्यापासून तिला एक फायदा झाला. तो हा कीं, ती एकीकडे कुजत पडावयाची राहून, तिच्यांत केव्हां तरी उर्जित होण्याची शक्यता राहिली. शिवाय, दरबारांत शिरल्यापासून मराठीला दुसरा एक फायदा झाला. मराठ्यांनी सतराव्या शतकांत स्वराज्य स्थापिलें व सर्वत्र मराठींत लिहिणे सुरू केलें. त्यावेळी दरबारांतील सर्व लिहिणें मराठींत लिहितां येण्यास मुळींच अडचण पडली नाहीं. कारण, सर्व दरबारी शब्द व पद्धती सतराव्या शतकाच्या सुमाराला मराठींत रूढ झाल्या होत्या. दरबारी लिहिण्याचे शब्द मराठींत नाहींत, अशी अडचण शिवाजीच्या वेळेस पडली नाहीं. तर फारशीच्या संसर्गानें मराठीत जे फारशी शब्द दुहेरी झाले होते. ते काढून कसे टाकावे, ही अडचण त्यावेळीं पडली. ही अडचण दूर करण्याकरितां राजव्यवहारकोश तयार करावा लागला.
(७) दरबारांत मराठी भाषा प्रचलित रहाण्याला दुसरें कारण देशस्थ ब्राह्मणांची फर्डी कारकुनी होय. प्रथम जेव्हां महाराष्ट्रांत मुसुलमानी झाली, तेव्हां जाधवांच्या राजवटींतील सर्व पद्धती मुसुलमान अधिका-यांना ब्राह्मण कारकुनांपासून शिकाव्या लागल्या. मजजवळ जमाखर्च लिहिण्याच्या व वसूलबाबींच्या यादीच्या कांहीं जुन्या हेमाडपंती पद्धती आहेत. त्या जुन्या मोडींत लिहिलेल्या आहेत. हें हेमाडपंताचें दफ्तर ब्राह्मण कारकुनांकडून मुसुलमान अधिका-यांना समजून घ्यावें लागे. पुढे पुढें तर अशी स्थिति झाली कीं, ही जुनी पद्धत समजून घेण्याची व हिशेब ठेवण्याची यातायात मुसुलमान अधिका-यांनी ब्राह्मण कारकुनाकडेसच सोपविली. अहमदनगर व विजापूर येथील मुख्य दफ्तरदार ब्राह्मण होते. येणेंप्रमाणें फारशीच्या बरोबर मराठी भाषा दरबारांत अंशतः प्रचलित करण्यास ब्राह्मणांची फर्डी कारकुनी कारण झाली, ही महाराष्ट्रांतील कारकुन मंडळीना मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
(८) फारशीनें मराठीला नेस्तनाबूत केलें नाहीं, ह्याला तिसरें एक कारण झालें. महाराष्ट्रांतील कोट्यवधि लोकसंख्येंत राज्यकर्त्या मुसुलमानांचें प्रमाण शेंकडा एकहि नव्हतें. बाट्यांची संख्या वाढल्यावर हें प्रमाण किंचित् वाढलें. परंतु त्याबरोबर बाट्यांच्या बोलण्यांतील मराठी शब्दांच्या वैपुल्याचाहि परिणाम अस्सल मुसुलमानांवर झाला. ह्या परिणामाची मर्यादा पुढें पुढें तर इतकी वाढली कीं, दक्षिणेंतील मुसुलमान पादशहा व त्याचें अधिकारीमंडळ फारशी बोलावयाचें सोडून दक्षिणी उर्दू बोलूं लागलें. दक्षिणी उर्दू म्हणजे जींत मराठी शब्द पुष्कळ आहेत अशी उर्दू भाषा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३६९
१५२८ श्रावण शुध्द ५
कारकुनानि समत दौलताबाद बिदानद मौजे कोरलें पा। खाडाले बा। * दर बाब आ की मौजे मजकूर सु॥ सवा अलफ दरवज मुकासा बदल मवेजिबु मालोजी व विठोजी भोसले सरगुऱ्होयाती गुऱ्होथल यास दिधले असे बाबा माहासुलेसी दुभाला कीजे मोर्तब सुद
छ २ माहे रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
मुसुलमानांच्या अमदानींत मराठी भाषेवरती केवढें घोर संकट आलें होतें त्याची यथार्थ कल्पना उतरण्यास एक अलीकडील प्रत्यंतर देतों. इंग्रजीचा मराठीला संसर्ग होऊन आज बरोबर पंचायशी वर्षे झालीं. ह्या अवधींत मराठीनें इंग्रजी शब्द व प्रयोग बरेच घेतले. ह्या प्रतिग्रहानें मराठीचें अंतःस्वरूप अद्यापि बदललेलें नाहीं व तिच्या स्वभावांतहि बिलकुल फेर पडला नाहीं. परंतु समजा कीं, and व that हीं उभयान्वयी अव्ययें, किंवा of, to, for, वगैरे पूर्वगामी शब्दयोगी अव्ययें, मराठींत योजिली जाऊं लागली, आणि इंग्रजी धर्तीवर मिशनरी लोकांप्रमाणें वेडेबागडे उच्चार व स्वर मराठी बोलण्यांत आपण आणूं लागलों. असा प्रकार अद्यापि झाला नाहीं व पुढेंहि होईल असें चिन्ह दिसत नाहीं. परंतु, समजा की, दुर्दैवानें असा प्रकार झाला. तर मराठी भाषेची जी स्थिति होईल असें आपणास वाटतें, तीच मुसुलमानी अंमलांत साक्षात् होण्याची वेळ आली होती. of, to, for, by हीं पूर्वगामी अव्ययें मराठी शब्दांच्या पाठीमागें योजावयाचीं म्हणजे विभक्तिप्रत्ययांना फांटा दिला पाहिजे. विभक्तिप्रत्ययांना फांटा दिला म्हणजे शब्दांचें सामान्यरूप करण्याची जरूर राहिली नाहीं. सामान्यरूप लुप्त झालें व विभक्तिप्रत्यय गमावले म्हणजे वाक्यरचना व क्रियापदप्रयोगहि बदलले पाहिजेत. असे एक ना दोन, शेंकडों बदल भाषेंत होऊन, मूळ भाषा कोणत्या थरावर जाईल, ह्याचा पत्ताच राहणार नाहीं. जी दशा नार्मन-फ्रेंच भाषेच्या दपटशाखालीं साक्सन भाषेची झाली, म्हणजे विभक्ति, वचन, लिंग, वगैरेंच्या प्रत्ययांचा लोप होऊन, सध्यांचीं इंग्रजी जशी तुटक भाषा झाली, तशी मराठी होईल. सरांश, असा प्रकार झाला असतां मराठीचा मराठीपणा जाईल व इंग्रजांच्या साक्सन भाषेचीं अधोगति तीस प्राप्त होईल. ही अधोगति चवदाव्या, पंधराव्या व सोळाव्या शतकांत मराठीला येत होती; व ती अनेक कारणानीं टळली. ह्या कारणाचा निर्देश खालीं करतो.
(१) वर अनेक स्थलीं उल्लेख केल्याप्रमाणें फारशीच्या संसर्गानें होणारी मराठीची अधोगति सतराव्या शतकांत झालेल्या व सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊं घातलेल्या राज्यक्रांतीनें टळली. मराठी भाषेवर येंऊं घातलेल्या संकटांचीं जीं अनेक निवारक कारणें आहेत, त्यांपैकीं हें कारण मोठें महत्त्वाचें असून शेवटचें होते.
(२) फारशीची व्याप्ति मराठीवर होऊं लागली असतां, मराठीनेंहि आपली छाप फारशी शब्दांवर ठेवून दिली. वर इसवी सन १५४१ व १५५८ तील दोन लेख दिले आहेत. त्यांत बीतपसीलु, नीमु, कारकून्, अशीं मराठी रूपें बितपसील्, नीम, ऐन्, कारकून् ह्या फारशी शब्दांना दिलेलीं आहेत. फारशी व्यंजनान्त शब्दांना उ हा प्रत्यय महाराष्ट्रांतील लोक लावीत. उ हा प्रत्यय मराठींतून जसजसा जात चालला, तसतसा अ हा प्रत्यय फारशीतील व्यंजनान्त शब्दांना मराठींत लागूं लागला. उदाहरणार्थ, कारकून् हा फारशी व्यंजनांत शब्द, उ प्रत्ययाचा लोप झाल्यानंतर, कारकून असा लिहिण्याचा प्रघात पडला. कारकून हा शब्द अकारान्त आहे, हें त्याला विभक्तिकार्य होत असतांना स्पष्ट होतें. जर कारकून हा शब्द मराठींत व्यंजनांत असता, तर त्याचें चतुर्थीचें रूप कारकुनाला असें न होतां कारकूनला [रा] असें झालें असतें. इंग्रजींतील जे व्यंजनांत शब्द मराठींत रूढ झाले आहेत, त्यांनाहि मराठींत घेण्यापूर्वी हा अ प्रत्ययाचा शिक्का मिळत असतो; जसें, बुक, बुकाला [बुकला नव्हे].
(३) वर सांगितल्याप्रमाणें फारशी शब्द मराठींत घेतल्यावर, त्याला दुसराहि एक संस्कार घडत असे.स्त्री-पुरुषवाचक शब्दांखेरीज फारशींत इंग्रेजी किंवा कानडी ह्या भाषांप्रमाणें इतर शब्द नपुंसकलिंगी असतात. मराठीचा प्रकार जर्मन किंवा संस्कृत ह्या भाषांप्रमाणें फारशीहून निराळा आहे. प्रत्येक शब्दाची प्रथम जात ठरवून, व त्याला स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, किंवा नपुंसकलिंगी बनवून, नंतर त्याच्याशीं विभक्तीचा व्यवहार करावयाचा, असा मराठीचा कायदा आहे. फारशींतील नपुंसकलिंगी हजामत्, सफर, नजर हे शब्द मराठी्त स्त्रीलिंगी ठरवले गेले. तसेंच बाग, पायपोस, खुर्दा, वगैरे नपुंसकलिंगी फारशी शब्द मराठींत पुल्लिंगी बनविले गेले. हा दुसरा शिक्का मिळविल्यावर कोणताहि फारशी शब्द बहुतेक संव्यवहार्य झाला, अशी व्यवस्था होती.
(४) परंतु हे दोन शिक्के घेतल्यावर सगळेच शब्द संव्यवहार्य होत असें नसे. ज्या फारशी शब्दांत हय्, खय्, अयन्, घयन् व काफ ह्या अक्षरांचे कंठ्य उच्चार येत त्यांना देवनागरी ह, ख, अ, व घ उच्चारांची दीक्षा देऊन मग मराठींत घेत. हलवाई, खरीफ, काफला, घारत, कत्तल, अयनेमहाल, ह्या फारशींतून मराठींत आलेल्या शब्दांत हय्, खय्, अयन्, घयन्, व काफ् ह्या अक्षरांचे उच्चार मूळ फारशी शब्दांतल्याप्रमाणें नाहींत. हीं अक्षरें फारशींत घशांतून उच्चारतात. मराठींत वर लिहिल्याप्रमाणें उच्चारीत मीवह्, खरबूजह् ह्या शब्दांचा मराठीत मेवा, खरबूज असा आकारांत व अकारांत उच्चार करीत, क्वचित् खरबुजि असाहि उच्चार होत असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३६८
१५२८ श्रावण शुध्द ३
(फारसी मजकूर)
कारकुनानी मामले अहमदाबाद व बाजे माहाल समत जाफराबाद बिदानद देहाये बाजे कर्याती मामले अहमदाबाद बा। दर बाब आ की देहाये मामलेमजकूर सु॥ सबा अलफ दर वज मुकासा बदल मवेजिबू मालोजी व विठोजी सरगुऱ्हो यासि गुऱ्हो थल यास दिधले असे लाहा माहासूले थल बामजरे मौजे गौडगौ कसबे महमदापुरु
मोर्तबसुद
छ २ माहे रबिलाखर