Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक २९५.

१७०९


कडील नित्यानीं एकटें दुकटें होऊन भेटतात. आपली फौज जाऊन शामील जाली याजमुळें रामसिंगजीची बाजी सरशी दिसते, बिकानेरकरही अद्यापि भयपक्षीं येऊन शामील जाला नाहीं. राजश्री सवाईमाधोसिंगजी याचा व बख्तसिंगजीचा पूर्वीपासून स्नेहभाव होताच. व सांप्रतकाळींही त्यांजकडील कर्णीदान चारण येऊन ठाकुर पेमसिंगजीचे विद्यमाने मजबुती करून गेला होता. न कळे, कसा काय करार जाहला. एवंच टिका, हाथी, घोडे, वस्त्रें, जवाहीर त्यास पाठवून ऐक्यता जाणविली. कुसळसिंग झालाबेकर याजकडीलही राडा आजि पंधरा सोळा महिन्यांपासून पडून राहून, त्याचा पुत्र कुंवर जसवंतसिंगजी रुसुवा करून घरी जाऊन बसले होते. दिवाण हरि गोविंदजीना पुत्र व कन्हईराम दिवाण या उभयतांसी, त्याजला समजाऊन आणावयानिमित्य, पाठविलें असतां ते न आले. व राजी बसल्यानंतर देवशासीं जाऊन, एकदां वडील कोणी यांचे कुलांत सत्या जाहल्या जाहेत, त्यांचीही पूजा एकदां जाऊन करणें जरूर, ऐशा कित्तेक विचारानुरूप राजश्री सवाईमाधोसिंगजीनीं अजमीरचे रुखें डेरा उभा करविला. व मजसमागमें हठराम धमाई व रविदत्त जाट......रामजीचा पुत्र चिमणराम याजकडून झालावेस ठाकूर कुसळसिंगजी व कुंवर जसवंतसिंगजीस समजाऊन आणावया निमित्य पाठविलें. आजि पंधरा महिने जाले कीं नित्यांनीं येऊं येऊं करित होते. स्वामीचे पुण्यप्रतापेंकरून त्यासीं भाऊबंदसुद्धां तेथून स्वार करून आणिलें, तों सवाईजी डेरे दाखल जाले होते. उभयपक्षीं भेटीगोष्टी करून, त्यांची जागीरपट्टी जें कांहीं पावत होतें तें यथापूर्वक त्यांजवर बहाल करून देऊन, सन्मानपूर्वक सौख्य संपादून दिधलें. पाहतां गती तो बाहेरही निघायाचें कारण इतकेंच होते. परंतु इतकियांत कुंवर सुरजमल जाठ यांसहवर्तमान ठाकूर पेमसिंगजीही येऊन पावले. सुरजमलजीसीं व बख्तसिंगजीसी परम स्नेह. याजकरितां त्यांनीही बहुत कांहीं विचार केला कीं, इतके दिवस दक्षणी चौथाईचे ग्राहीक म्हणवीत होते. आतां सर्वस्व ग्राहीक जाले. आगरियां अमल दखलच केला. राहिली अजमेर. याचीही सनद हाती ठेवितात. फौज रामसिंगजीचे कुमकेनिमित्य गेलीच आहे. तुर्कीनीही तिकडेच डौल दिधला आहे. या गोष्टीची पैरवी आतांपासून केलिया उत्तम. त्यासीं सवाइजीनीं तर हाच जाब दिधला कीं, आमचें तर कांहीं त्यांनीं इतकें अधिक केलें नाहीं व स्नेहभावाचा विचार आपला भिन्न भिन्न आहेच. जरी ये समई केवळ रामसिंगजीकडेच पाहावें तर बख्तसिंगजीनीं जोधपूर घेतलें तें बजोरमर्दीने घेतले. व रामसिंगजी पाहतां नांवारीस. व सरदारांहीं त्याची कुमक विचारली असतां तटस्थच राहणें उत्तम. अथवा सरहद्देवर एखाद्या मातबराबरावर फौज देऊन पाठवावें, जिकडील सरशी पाहावी तिकडील गोष्ट सांगावी, हाही एक तटस्थतेचा विचार आहे. वरकड प्रसंग तर विना सार्वभौमादिकांविराहत होणें दुस्तर, तेव्हां, सुरजमल्लांनीं स्वीकार केला कीं, मजर्शी व बख्तसिंगजशि कोणेही रीतीनें द्वैतार्थ नाहीं. वजीरुलमुमालिकांसी व त्यांसी निपट एकोपा, ते ही निघावयासीं सिद्ध. बलके, सार्वभौमांसींही काहाडतील. या गोष्टीची मजबुती जे करावयाची ते करून घेतली आहे. पण मात्र ठाकूर प्रेमसिंगजी हजार स्वारप्याद्यांनिशीं समागमे दिधलें पाहिजे. ह्मणून राजीहि करून तिनी चारी दिवस पावतों राहून, शिक्रीं राहून, सैदांचा चाळिसां हजारांचा महालसेट मुरारजी व किशनजी यांचे येथें गहाण असतां ते जागा इनाम घेऊन पेमसिंगजी सहवर्तमान रुखसत होऊन गेले. त्यासी याचा मनसुबा हा दिसोन आला कीं, दिल्लीस जाऊन वजीरउमरावसार्वभौमादिकांसी भर भरून बाहेर काहाडून, एकदां काय आगरें व काय अजमेर या जिल्हेंत वजीरासी अथवा सार्वभौमासीं आणून, एकदां राजविराज करून, सर्व जमीदार राजे एकत्र होऊन, पुरुषार्थ करून दाखवावा! समदुःखी तो सकलही जाहलेच आहेत. जाटाचे खातरदारीस्तव यांनी पेमसिंगजीस त्यासमागमें दिधलें कीं, कितेक दिल्लींतील सनदअसनदाचें काम बाकी आहे तें संपादणें जरूर. दुसरें, राज्यीं बसल्यानंतर, दिल्लीस जाऊन सलाम केला नाहीं, बादशहा आहेत, न गेलिया....... यास्तव ऐसें दिसोन येतें जे कांहीं लोक...गेल्यानें राजकारणांचा जमाव जालिया तेथवरही जाऊन सलाम मुजरा करून यावें. त्यास, वजीरजीसीं तूर्त हजुरेंत फसले आहेत. रुकसत होत नाहीं. जावेदखानाशी व वजीरजीसीं अनबनाव. जाटासी वजीरासी स्नेह. त्यासीं हर प्रकारें काहाडून आग-यासी अथवा अजमेरकडे न्यावें, या उद्योगांत आहेत. बख्तसिंगजीसहि आशाबद्ध केलें आहे जे, उभयतांहि दिल्लीस जाऊन लवकरच वजीरासीं अथवा सार्वभौमास अथवा एकाद्या मातबरासीं लवकरच घेऊन येतों, तोंवर उतावळी न करणें. जरी इतकियांत उभयतांत युद्ध होऊन सरसी जालिया, जिकडील सरसी होईल तिकडील तजवीज केली जाईल. नाहीं तर, धीरेधीरें जें कांहीं होतें तें पाहतच आहों. म्हणून जात सुरजमलजी बहुतकरून तरतुदेंत लागलेसे दिसतात. मवाजी राठोड, व ख्तसिंगजीचा मामा, व हरनाथ टपासे हे उभयतां येऊन पावले. त्यांजबराबर सदाशिवभट, सवाई माधोसिंगजचे विद्यागुरु, यांजबराबर दोनी हजारनिशीं बिदा केलें. बाहियार्थी तर हेंच म्हटलें कीं, जेणेंकडून चुलत्यापुतण्यांत सोरप्यता प्राप्त होई....

पत्रांक २९४

श्री. १७०२ चैत्र वद्य ११

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्यराजश्री बळवंतराव दादाजी का।दार प्रांत कल्याण भिंवडी गोसावी यांसीः--

सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार. सु। सबा समानीन मया व अलफ. रा। बाबाजी अनंत ढवळे यांचे तीर्थरूप अंताजी नारायण हे सन ईहिदे समानीनांत इंग्रजाचे लढाईत सरकारकामास आले. सबब, यांस दीडशें रुपये आकाराची जमीन, नूतन इनाम, कल्याण प्रांतीं, यांचे सोईस पडेल तेथें, नेमून घ्यावयाची सालगुदस्तां करार झाला आहे. परंतु सनद सादर जाली नाहीं. त्यास, हाल्लीं हे सनद तुम्हांस सादर केली असे. तरी सदरहु दीडशें रुपये आकाराची जमीन प्रांतमजकुरीं यांचे सोईस पडेल त्या गांवीं, नेमून देऊन, यांचे नांवें पेस्तर सालापासून इनामखर्च लिहीत जाणें आणि चतु:सीमेचा जाबता हुजूर लेहून पाठविणें. त्याप्रमाणीं इनामपत्रें करून दिल्ही जातील. प्रांतमजकूरचे अजमासास सालगुदस्तां व सालमजकूरचा दुसाला ऐवज तीनशें रुपये घ्यावयाची नेमणूक केली आहे. त्याप्रमाणें सदरहू रुपये जमिनीबद्दल यांस पावते करणें. जाणिजे. छ २५ जमादिलाखर,
आज्ञाप्रमाण.

पत्रांक २९३.

श्री. १७०९ चैत्र शुद्ध ५.

मुरलीधर जोतिषी पातषाही यांचे पत्राचा तरजुमाः-

विशेष. फार दिवस कृपापत्र आलें नाहीं. तरी पाठविलें पाहिजे. आह्मी आपले शुभचिंतक जोतिषी आहों. पूर्वी कितेक पत्रें आपणांस पाठविलीं होतीं. हालीं कांहीं विचार शास्त्राज्ञेवरून लिहितों, तो ध्यानांत आणावा. आपले ग्रह बहत चांगले आहेत. तेणेंकरून शरीरीं आरोग्य राहावें, प्रतिष्ठा वाढावी. ईश्वराची कृपा व्हावी. लहान थोर सरदार हुकमीं अनुकूल राहावे. शत्रूचा नाश व्हावा. स्वपरदेशांत विख्यात कीर्तिवृद्धि व्हावी. थोर थोर राजे याणीं आज्ञा मानावी. अनेक नजरा येतील. पेशकशी येतील. स्वामींच्या रूबरू मान वाढावा, दुष्ट, चाहाड, लबाड यांचा नाश होईल. आपल्या फौजांस यश प्राप्त होईल. हैदर-नाइकाचे पुत्रावर हें वर्ष फार वाईट आलें आहे. शनिश्चर मकर राशीचा आहे. कर्नाटक देशाचे राज्यास मारील. पूर्वीही आह्मीं आपल्यास लिहिले होतें तें वर्ष हेंच आलें आहे. त्याचा मुलूकही श्रीमंताचे हातास येतो, घोडे, हत्ती, माल, तोफखाना येईल. च्यारी तर्फेचे फौजेवर श्रीमंताची फौज यशस्वी होईल. राज्यांत आपला अधिकार वाढत जाईल. दोन सरदार आपआपल्यात लढतील. आपल्यापासून सलूख होईल. शरणांगत येतील. राजा आपले इच्छेचें फळ पावेल. पौष-शुद्ध-पौर्णिमेस ग्रस्तास्त-चंद्र-ग्रहण होईल. सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, राहु एका राशीस येतील. त्यांचेही ग्रहण होईल. यांचे फळ हेंच आहे कीं, ज्यालंधर आणि अटक-अयोध्या- X X X ता येथील स्वामी आपल्या ++++ करून मारले जातील; अथवा अक ++++ थोर यांजवर पडेल. राज्य श्रीमंतांचें ++ दक्षणेस ज्या त्या देशावर जागा जागा दाखल होईल. याप्रमाणें शास्त्राज्ञा आहे. फाल्गुन मासीं तेरा दिवसांचा पक्षही पडला आहे. तीन सरदार मारले जातील अथवा मृत्यूंनीं मरतलि-अयोध्येचा स्वामी, कर्नाटक देशचा स्वामी. अटकचा स्वामी. हा विचार शास्त्राचे आज्ञेवरून केला आहे. पुढें ईश्वर-इच्छा बलिष्ठ आहे. एक थोर सरदार शत्रुत्व करील. अंत:करणापासून बिघाड करील. परंतु कांहीं होणार नाहीं. यास्तव, एक-सहस्र चंडीपाठ करवावा, सहस्र कन्याभोजन करवावें. सकल अरिष्ट दूर होईल. आपले घरीं या वर्षात दिव्य संतान होईल अथवा गर्भ होईल. आषाढमासीं आमचे कन्येचा विवाह आहे. तरी कृपा करून साहित्य करावें. आम्ही निरंतर आपणांस लिहीत आहों कीं, श्रीमंतांचा प्रताप वाढेल, अस्त-उदय होय तों राज्य होईल, थोर थोर मुलूक हातांत लागेल. एक चाकर माहादजी शिंदे पाठील याणीं जाऊन अंमल दाखल सर्व केला. गड-किल्ले मुलूक घेतला. परंतु आम्हांस दक्षणा न पाठविली. हालीं कन्येचा विवाह आहे. मि।।

चैत्र- शुद्ध ५, संवत १८४३.

पत्रांक २९२

श्री १७०८ पौष वद्य ५


सेवेसीं वेंकोजी अनंत शिर सां नमस्कार विज्ञापना तारा पौष वद्य ५ पावेतों स्वामींचे कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. आज्ञेप्रों स्वामींचें आज्ञापत्र राजश्री कृष्णाजीपंत यांस प्रविष्ट केलें. त्यांनीही सेवेसीं विनंतिपत्र लिहिलें आहे. त्याचा उद्धार होयसा केला पाहिजे. इकडील वर्तमान तर अविंध तळ कोंकण तलचेरी बंदरावर आहे, त्याची फौज आठ हजार खास पागा व सीलेदार दहा हजार व बार व कर्नाटकी प्यादे मिळोन साठ हजार व तोफा लहान मोठ्या दोनशें, याजपौ पांच हजार स्वार व पंधरा हजार बार वगैरे प्यादे व पंधरा तोफा लहान इतका जमाव सुधा बुरानदीन यास कित्तुरावर पाठविला. त्यानें कित्तुरचें काम करून तेथेंच होता. हालीं आपले फौजेची आवई पडल्यावर अविंधाचे आज्ञेनें हुबळीवर मुक्काम ह्मणून एकंदर परवाना आला आहे. आणखीं दोन परवाने आल्यावर तेथून कूच करून हुबळीस येईल. धारवाड, कोपल, गजेंद्रगड, बदामी, तुंगभद्रातीर धरून, इकडील मुलुकांतील कडबा जाळून टाकणेंविशीं ताकीद व जमीदार जागां जागांचे व त्याचे कारभार करणारास धरून कैद करून ठेवावे आणि उत्तरेकडील फौज कृष्णापार होतांच मुलुक तमाम जाळून जमीदारांस पटणास पाठविणेविशीं एक परवाना आला आहे. प्रस्तुत समय आहे. आवई न घालितां लष्करें तुंगभद्रेवर आलीं तर वैरण काडीही आहे. आणि जमादार लोकांचा बच्याव होत आहे, आणि खुद्द तिकडे शहास गुंतला आहे. चित्रकलदुर्गस आपली फौज येई तोंपर्यंत तो कांहीं इकडे येत नाहीं. तेथील शाह भारी पडला आहे. एक वेळ युद्धप्रसंग जाहला. मोड याचाच जाहला. म्हणून त्यास खोदून काढावें म्हणून बसला आहे. आपली फौज भारी होऊन आल्यास दुर्गचे मैदानांत आपणाकडून आणखी एक सरदार भारी जमावानिशीं पा।. लढाई करावी. तहकीक वर्तमान मुद्दाम ब्राम्हण जाऊन आपाजीरामाची राहुटीस ऐकोन आला. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक २९१

श्री १७०२ पौष शुद्ध ९


बक्षिसनामा शके १७०८ पराभवनाम संवत्सरे पौष शु।। ९ नवमी शुक्रवार ते दिवशी राजश्री बाळाजी जनार्दन, उपनाम भानू , गोत्र काश्यप, सूत्र आश्वलायन, महाजन, मौजे वेळास, ता। वेसवी, सुभा दाभोळ, यांसी न्याहालकुवरबाई, कुचमानसिंग जाधवराव व राव जगदेव उर्फ राजे आनंदराव बिन जाधवराव, देशमुख व देशपांडे सरकार दौलताबाद, वगैरे सुभे खुजस्तेबुनियाद. सु।। सबा समानीन मया व अलफ, सन ११९६ फसलीं. कारणें बक्षिसनामा लिहून दिल्हा ऐसा जेः सन ११८९ चे सालांत राजे मानसिंग जाधवराव देशमुख देशपांड्ये कैलासवासी जाहाले. सबब व नवाबबंदगानअल्ली यांणी माहालानिहायचे वतनाची जप्ती केली. ते सोडून बेवारसे पदरीं सनदा करून घ्याव्या म्हणोन आम्हीं हैदराबादेस गेलों. सरकारचे मुत्सद्दी वगैरे यांचे वि।। जाबसाल लाविला. तों भाऊबिरादर मानसिंग जाधव वल्लद यशवंतराव जाधव हे वृत्तीसंबंधें वादास आले. आम्हांकडील विठ्ठल बयाजी दिवाण माहितगार पुरातन होते, त्यांचा काळ जाहाला. सर्व प्रकारें गोष्ट विलग पडिली. वतनाचे खटपटीस माहितगार जाबसालीं माणून कोणी पदरीं नाहीं हें संकट जाणोन तुम्हांकडे पैगाम लाविला कीं, आपण श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांचा राज्यकारभार सर्व चालवितां, नबाब बंदगानअल्ली यांस तुमचा स्नेह बहुत आहे, त्यांजपाशीं वकीलकीचे कामास राजश्री जिवाजी रधुनाथ आहेत, त्यांजली आम्हांविशीं लिहून त्यांजकडून हरएकविशीं आमचें साहित्य होय आणि वतनाच्या सनदा मोकळीविशीं आम्हांस प्राप्त होत, तें करावें. याप्रों आमचें बोलणें ऐकून, आमचे घरोब्यावर व थोरवर्तनाचें संरक्षण करावें यांत इहपर पुण्य पुरुषार्थ आहे हें जाणोन, आपण जिवाजीपंत यांस लिहून आमचे साहित्यास अनुकूल केलें. त्याजवरून जिवाजीपंत यांणीं नवाब बंदगानअल्ली यांचे दरबारीं साहित्य करून, पूर्ववतप्रों वतनाचे बहालीच्या सनदा आमचे नावें करून ठेविल्या. वतनाचा भोगवटा पूर्वीपासून आपले वडीलवडील करीत आले त्याप्रें।। आपणही अनुभऊं लागलों. गेलें वतन पुन्हां प्राप्त जालें हा लाभ आह्मीं चित्तांत आणून, आपला उपकार बहुत जाहला याचें उत्तीर्ण काय व्हावें याचा विचार करितां, शिवाय वतन द्यावयाजोगा अर्थ दिसत नाहीं हें जाणोन, पो वरूळ ऊर्फ राजपुर येथील देशमुखदेशपांड्येपणाची वृत्त पूर्वीपासून आपली आहे, त्यांपैकीं देशपांड्येपणाचें वतन पेशजीं जिवाजी रघुनाथ यांचे पुत्र खंडेराव व अमृतराव जिवाजी यांस देऊन देशमुखीची वृत्त आपणाकडे चालत होती ते आपणांस दिल्ही. यानें कांहीं उपकार फेडिलासा जाणोन, देशमुखीची वृत्त देहे एकतीस द्यावयाचा करार करून, हें बक्षीसपत्र तुह्मांस आत्मसंतोषें लिहून दिल्हें असे. तर सदर्दू एकतीस देहे येथील देशमखीचे वतन व वतनसंबंधें हक्क रुसूम वगैरे भोगवटा द्यावयाची कलमें बितपशील:-
१ हक्क रुसुम दर गांवास तनखे             १. भेटी दर गांवास दोन, तुम्हीं
यास दरसदे रु।। ३ द्यावयाचा                व तुम्हांकडील गुमास्ता प्रों मजकूरचे
शिरस्ता आहे त्यापौ देशपांडे रु।। १         कामकाजास ठेवाल त्यांणीं घेत
घेतील. बाकी रु।। २ तुम्हीं घेत जावे.        जावी. कलम.
१ सिरपाव सरकारांतून अगोदर              १. धनगरांचे माग ज्या गांवीं असेल
तुम्हीं घ्यावा, मागाहून देशपांडे घेतील.     त्या गांवीं दरसाल चवाळें एक
१ वतनी कागदावर वगैरे दसकत            घेत जावें.
तुम्ही आपले नावें करावें. तुमचे              १ चांभाराकडील जोडा दर गांवास
बाजूस देशपांडिये दसकत करितील.       वासदरसाल एक घेत जावा.
                                                      १ कसबे मजकुरीं सायरान हक्क
१ भेट तुम्हीं अगोदर हकीमापुढें             आहे तो घेत जावा.
ठेऊन, मग देशपांडे याणी ठेवावी.         १ शाहा दावलपिदर याचे मुजी-
१ विडा सरकारचा वगैरे अगो.               वरापासून दरसाल तबरुकाबाबत रु।।
दर तुम्ही घेऊन, मागाहून देशपांडे          ३ तीन घ्यावयाचा शिरस्ता आहे.
यांणी घ्यावा.                                       त्यांपैकीं देशपांडे यांचा रु।। १, बाकी
१. वरकड हरएक मानपान वतनसंबंधें     दोन तुम्हीं घेत जावे.
अगोदर तुम्ही, मागाहून देशपांडे             १. भाकरीबाबत ऐवज गांवगन्ना येईल
यांणी घेत जावे.                                   तो निमे देशपांडे यांस देऊन बाकी
१. देशमुखीचे वतनाबाबत वाडा               निम्मे तुम्ही घेत जावा.
कसबे मजकुरीं आहे, तेथें इमारत            १. कलावंत थेर भोरीप वगैरे यांस
बांधून नांदावें.                                     त्याग अगोदर तुम्हीं, मागाहून
१. कसबे मजकुरीं वगैरे हरएक                देशपांडे यांणीं द्यावा.
गांवीं बाजार भरेल तेथें शेर                    १. प्रों मा।रीं हरएक कामकाजमुळें
तुम्ही घेत जावी. प्राप्त होईल तें तिसरा हिस्सा
१. इनाम जमीन जिराईत, बागाईत,         देशपांडे यांस देऊन, दोन हिस्से तुम्हीं
पूर्वीची आहे ते                                    तुम्हीं घेत जावें.
अनुभवीत जावी.                                 १. परगणें संबंधें सरकारचें देणें
१. सणाची मोळी माहारांकडील             वगैरे पडेल तें तिसरा हिस्सा देशपांडे
दर गांवास घ्यावी.                               व दोन हिस्से तुम्हीं देत जावें.
१. संक्रांतीचे तीळ व पित्रांचें
तूप दर गांवास घेत जावे.
सदरहूप्रें।। कलमें करार करून दिल्हों आहेत. त्याप्रें।। व तुह्मीं आपले कारकिर्दीस नवीन संपादन कराल ते तुह्मी आपली मिरास मुस्तकीम जाणून तुह्मीं व तुमचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेनें भोगवटा घेत जावा. वतनास दुसरियाचा अधिकार नाहीं. कालक्रमें कोण्ही वारीसदार मुजाहीम जाला, तर आपण त्यासी वारूं. तुम्हांस तोशीस लागों देणार नाहीं. सदरहू कारास आमचे वंशांचा कोण्ही दिक्कहरकत करील त्यास कुळस्वामी व पूर्वजांची शपथ असे. हा बक्षिसनामा लिहून दिल्हा. सही.

पत्रांक २९०

श्री. १७०८ आश्वीन वद्य १२

राजश्रीयाविराजित राजमान्यराजश्री महिपतराव बापू स्वामीचे सेवेसीं:-

पो हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष तुह्मी छ १७ जिल्हेजचें पत्र पाठवलें ते पावोन संतोष जाहाला. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. फार दिवस पत्र आलें नाहीं, विस्मर जाहालें, ह्मणोन पत्र लिहिलें. ही गोष्ट खरी आहे. परंतु माझे शरीरास सावकाश नाही. यामुळें पत्र पाठविण्यास विस्मरण पडलें खरें. राजश्री रामचंद्र नाईक यांजवळ आपले प्रकृतीचें वर्तमान पुसत असतों तेही सांगत असतात. तेव्हां विस्मरण नाही. तुमची प्रकृती नीट असावी अशीच प्रार्थना ईश्वराजवळ आहे. तुह्मीं लिहिलें की, श्रीदेवाजवळआल्यापासून वीस दिवसांत सांप्रत बरी आहे. त्याजवरून अति संतोष जाहला. तुमची निष्ठा श्रीजवळ आहे. तेव्हां ईश्वर कृपाच करील. संदेह नाही. सेवा चालते त्याप्रों चालों द्यावी. सदैव पत्रीं कुशल वृत्त लिहीत जावें, आमचें प्रकृतीचें वर्तमान तर पोटांत दुखत असतें. उपाय करितों. चार दिवस बरें वाटतें, फिरोन नीट नाहीसें होतें. इलाज करीतच आहें. कळावें. रा। छ २५ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंती. छ ४ मोहोरम.

पत्रांक २८९

( नकल ) १७०८ भाद्रपद वद्य १२

पौ छ ११ जिल्हेज सबा समानीन.
राव अजम अकरम लक्ष्मणराव रास्ते सलमलाहुताला.

सो मुषफक मेहेरबान कदरदां करमफर्माय माखलिसां बादज षौक मुलाकत मषहुद जमीर मुजीरत बेहुदतखमीर नमुदा मा आयद. येथील खुषी जाणोन आपली षादमानी हमेषा कलमी करीत आलें पाहिजे. दरींविला छ ७ जिल्कादचें खत अजराहे मेहेरबानगी पाठविलें तें पोंहचून खुषी हांसल जहाली. तुम्हीं उभयतां येथें होतां. येथील बोलण्याचा जातेसमई सर्व मजकूर रुबरु सांगितला होता. व तुम्हीं येथें असतां तुम्हांकडून वारंवार पत्रें लिहून पाठविलींच होतीं. तुम्हीं तेथें जाऊन पोंहचल्यानंतर उत्तम प्रकारें बोलून तहाचें पर्याय कांहींच न लिहिले. यावरून अपूर्व दिसून आलें. अमुक प्रकारचा तह करावयाचा म्हणून तपसील लिहून पाठवावा म्हणून लिहिले होतें. तर, आह्मीं तेथून येते समई पेशकसचा ऐवज व दरबारखर्चचा ऐवज सहित दिल्हे. या तरफैनची दोस्ती मजबूत होत आहे ह्मणून अण्णा सो सांगितला होता. त्याप्रमाणें आमचे खाविंद खुदावंदन्यामतांस जाहीर केला. त्यास, पेशकसीचा ऐवज देणें. सर्वाकडून तकरारच नाहीं. वाजबी जें देणेच असेल तें दिलें जाईल. दरबारखर्चाचे मजकूर लिखापढी नाहीं. मुनासीब देणेच असेल तें देऊं. या विरहीत तरफैनचे दोस्ती मजबूद जाहल्यावर, आणखी ज्यां ज्यांस मुनासीब जेथपर्यंत करणेंच तेथपर्यंत केला जाईल, ह्मणोन फरमाविलें. आपण दाणा व दूरंदेष आहेत. सहज कामाकरितां आपले खाविंद श्रीमंतांसीं करोडोचे पेंचांत न द्यावा आणि तफैंनचा खल कुळाच्या रफाईवर नजर देऊन मदारुलमहाम यांस ज्याप्रकारें बोलावें कीं त्याप्रमाणें बोलून तफैनचे दोस्ती मजबूत होत असें करून इतिल्ला द्यावा. तरफैनचे दोस्तीचे कामास सिवाय तफैनचे उमदा लोक दरम्याने आले. अगर दहा वर्षे ऐसेच कज्या खटपट असलियाही फैसल्ला पावणार नाहीं. साबक पंचवीस तीस वर्षा खालें कैलासवासी रघुनाथराव व माधवरावसाहेब असतांना, इकडून मातबर वकील खाननुरुल्ला व करीमखान गेले होते. त्यास, उभयतां रावसाहेबांनी ताजीमतवाजू देऊन मानपान केले होते. त्याजप्रों तिकडूनही आनंदराव निंबाजी येथें होते. त्यास, आज इ।। मुलाकत तारा।गीन्यावस्ती त्यांनीं हुजूरदरबारास आले. त्यावख्तीं ताजीम व अत्तरदान पानदामचामुदार होत होते. हे मजकूर आम्हीं आपणास जाहीर केला होता. बोललो. आतांहि आनंदराव निंबाजी हमराही लोक असतील ते आपणाला जाहीर केलेंच असतील. आम्हीं आलों असतां श्रीमंतांकडून मानपान जाहाले ते आपणास जाहीर आहे. श्रीमंतांचे व सरकारअसदुल्ला हीच दोस्ती मजबूत जाहाल्यावर हमेषा तिकडून उमदा लोक येथें यावा, येथील उमदा लोक तेथें यावा. त्यास, मानापानांत फरक आलिया कैसे येतील ? याकरितां तेथें मदारुलमहाम यांसीं वगैरे बोलून, येथून उमदा शखस आलिया श्रीमंतांकडू ताजीम देणेंचेंही मा।र ठराऊन लिया पाठविलिया, येथें आम्हीं हुजुरांत अर्ज करून येथून उमदा शखस पाठविला जाईल. आसाहेबांकडील खैरआफियतेचे खबर निगारष करीत आलें पाहिजे. रा। छ २५ जिल्काद. ज्यादा काय लि।।. हे किताबत. १७०८.

पत्रांक २८९

( नकल ).

१७०८ भाद्रपद वद्य १२

पौ छ ११ जिल्हेज सबा समानीन.
राव अजम अकरम लक्ष्मणराव रास्ते सलमलाहुताला.

सो मुषफक मेहेरबान कदरदां करमफर्माय माखलिसां बादज षौक मुलाकत मषहुद जमीर मुजीरत बेहुदतखमीर नमुदा मा आयद. येथील खुषी जाणोन आपली षादमानी हमेषा कलमी करीत आलें पाहिजे. दरींविला छ ७ जिल्कादचें खत अजराहे मेहेरबानगी पाठविलें तें पोंहचून खुषी हांसल जहाली. तुम्हीं उभयतां येथें होतां. येथील बोलण्याचा जातेसमई सर्व मजकूर रुबरु सांगितला होता. व तुम्हीं येथें असतां तुम्हांकडून वारंवार पत्रें लिहून पाठविलींच होतीं. तुम्हीं तेथें जाऊन पोंहचल्यानंतर उत्तम प्रकारें बोलून तहाचें पर्याय कांहींच न लिहिले. यावरून अपूर्व दिसून आलें. अमुक प्रकारचा तह करावयाचा म्हणून तपसील लिहून पाठवावा म्हणून लिहिले होतें. तर, आह्मीं तेथून येते समई पेशकसचा ऐवज व दरबारखर्चचा ऐवज सहित दिल्हे. या तरफैनची दोस्ती मजबूत होत आहे ह्मणून अण्णा सो सांगितला होता. त्याप्रमाणें आमचे खाविंद खुदावंदन्यामतांस जाहीर केला. त्यास, पेशकसीचा ऐवज देणें. सर्वाकडून तकरारच नाहीं. वाजबी जें देणेच असेल तें दिलें जाईल. दरबारखर्चाचे मजकूर लिखापढी नाहीं. मुनासीब देणेच असेल तें देऊं. या विरहीत तरफैनचे दोस्ती मजबूद जाहल्यावर, आणखी ज्यां ज्यांस मुनासीब जेथपर्यंत करणेंच तेथपर्यंत केला जाईल, ह्मणोन फरमाविलें. आपण दाणा व दूरंदेष आहेत. सहज कामाकरितां आपले खाविंद श्रीमंतांसीं करोडोचे पेंचांत न द्यावा आणि तफैंनचा खल कुळाच्या रफाईवर नजर देऊन मदारुलमहाम यांस ज्याप्रकारें बोलावें कीं त्याप्रमाणें बोलून तफैनचे दोस्ती मजबूत होत असें करून इतिल्ला द्यावा. तरफैनचे दोस्तीचे कामास सिवाय तफैनचे उमदा लोक दरम्याने आले. अगर दहा वर्षे ऐसेच कज्या खटपट असलियाही फैसल्ला पावणार नाहीं. साबक पंचवीस तीस वर्षा खालें कैलासवासी रघुनाथराव व माधवरावसाहेब असतांना, इकडून मातबर वकील खाननुरुल्ला व करीमखान गेले होते. त्यास, उभयतां रावसाहेबांनी ताजीमतवाजू देऊन मानपान केले होते. त्याजप्रों तिकडूनही आनंदराव निंबाजी येथें होते. त्यास, आज इ।। मुलाकत तारा।गीन्यावस्ती त्यांनीं हुजूरदरबारास आले. त्यावख्तीं ताजीम व अत्तरदान पानदामचामुदार होत होते. हे मजकूर आम्हीं आपणास जाहीर केला होता. बोललो. आतांहि आनंदराव निंबाजी हमराही लोक असतील ते आपणाला जाहीर केलेंच असतील. आम्हीं आलों असतां श्रीमंतांकडून मानपान जाहाले ते आपणास जाहीर आहे. श्रीमंतांचे व सरकारअसदुल्ला हीच दोस्ती मजबूत जाहाल्यावर हमेषा तिकडून उमदा लोक येथें यावा, येथील उमदा लोक तेथें यावा. त्यास, मानापानांत फरक आलिया कैसे येतील ? याकरितां तेथें मदारुलमहाम यांसीं वगैरे बोलून, येथून उमदा शखस आलिया श्रीमंतांकडू ताजीम देणेंचेंही मा।र ठराऊन लिया पाठविलिया, येथें आम्हीं हुजुरांत अर्ज करून येथून उमदा शखस पाठविला जाईल. आसाहेबांकडील खैरआफियतेचे खबर निगारष करीत आलें पाहिजे. रा। छ २५ जिल्काद. ज्यादा काय लि।।. हे किताबत. १७०८.

पत्रांक २८८

श्री १७०८ श्रावण शुद्ध ११

राजश्री हरीपंततात्या स्वामीचे सेवेसीं :-

विनंति उपरी. भोंसल्यांचे दरमहाचे तीस हजाराहून मी अधिक बोलिलों नाहीं, व बोलत नाहीं. इतके द्यावे लागतील. देऊं. खासा पुण्यास येतील. त्यांस येथे मेजवानी स्वामींनीं केली. त्यांनीं आपणास केली. त्याजवर फिरोन गांट पडत्ये, तेव्हां श्रीमंतांचा निरोप व आपला घराऊ निरोप द्यावाच लागेल. दसरा जाहल्यावर मी येतों, अगर सेनासाहेबसुभा यांस पाठवितों. ऐसें शपथ पूर्वक बोलून, आपलें काळीज आमच्या हवालीं करून गेले आहेत. शफत वाहिली, याजमुळें करतीलसें दिसतें. स्वामीची गांठ पडल्यावर या गोष्टी निघतील. फिरोन खचित करून घ्यावें, याचा उपयोगअनुपयोग फारकरून समजला. परंतु, मसलतीवर दृष्ट, त्यापक्षीं च्यार खरकटीं बाळगलींच पाहिजेत. मंडल्याविशीं श्रमी आहेत. येविशीं बुंदेल्यांस निक्षून लिहून, यांचे स्वाधीन होय, तें करावें, सर्व अर्थ ध्यानांत आहेत. ल्याहावेंसें नाहीं. ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळलें. त्यास, धुरंधर येथें आले. श्रीमंतांचा निरोप व आह्मीं आपला घराऊ निरोप, वस्त्रें, जवाहीर, हत्ती, घोडे योग्यतेप्रमाणें केले. त्याणींही आपल्या योग्यतेप्रमाणें केलें. येविशींचा वगैरे सविस्तर मजकूर छ २७ रमजानीं लिहून तुह्मांकडे पाठविलाच आहे, त्यावरून कळेल. खरकटीं बाळगावयाची संवय तुह्मांस आहेच. त्याप्रों घडतही आहे. मंडळ्याविशीं पत्रें लिहून कारकून व हुजरे हाल्लीं रवाना केले. रा। छ २ सवाल. हे विनंति.
पो। छ १० शवाल, प्रातःकाल, श्रवण, सबा समानीन.

पत्रांक २८७

श्री १७०८ आषाढ वद्य ३


राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री महिपतरावबापू स्वामीचे सेवेसीं:-


पोप्य हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. पत्र पाठविलें तें पावोन बहुत समाधान जाहलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. शरीरप्रकृतीविशीं लिहिलें. त्यास औषध घेत असतों. मातुश्री ताई तेथें आली होती. त्यांणीं प्रकृति पाहिली त्यापेक्षां आतां प्रकृति दिवसेंदिवस चांगली आहे. श्रीकृपेंकरून आरोग्य होईल. तुह्मीं येण्याचा मजकूर लिहिला तो कळला. श्रीस प्रार्थना करून यावयाचें करावें. मुरबा कोहळ्याचा पाठविला तो पावला. वैद्यास पुसून घेतो. कळावें. रा। छ १७ रमजान, बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंती.