Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २८६
श्री. १७०८ आषाढ शुद्ध ६
सेवेसी विज्ञापना, आपली स्वारी येथे असतां टिपूकडील शृंगेरीपंत राजश्री मुधोजी भोसले यांजकडे आला. त्याजबराबर भोसल्यांनी आपलेकडील लालादुल्लभदास देऊन आज्ञा झाली. त्याप्रों मुद्दे सांगून पाठविले. ते अदवानीस टिपूकडे गेले. लष्कराबाहेर अर्ध कोसावर डेरा दिला. तेथें रहावयास सांगितले. दोन दिवस भेट जाली नाहीं. तिसरे दिवशीं सायंकाळीं बलाऊं पा।, पत्र दिल्हें, व वर्तमान सांगितलें. त्यास वरकडे कांहीं नाहीं, सालाबादी पैका राहिला असेल तो देऊं, त्यांत पायमली मजुरी द्यावी, बदामी घेतल्यानें तीस लक्षांची नुकसान झाली, असो, ती आह्मांकडे द्यावी. तुमचा नरगुंदचा किल्ला काळोपंत देतो, त्यानें पेशकसी करारप्रों द्यावी, कितुर तर आमचें खंडणीचे संस्थान, याप्रों भाषण जालें, तीन प्रहरपर्यंत बसोन तेचसमई निरोप दिला. पत्र लेहून दिल्हें. तें घेऊन, श्रृंगेरीपंत व लाला भनूचे मकामापलीकडे गेले. तों सेनाधुरंधर गेले. चिरंजीव येथें आहेत. त्यांजकडे जाऊन पत्र दिल्हें. वर्तमान सांगितले. त्याजवर तें पत्र व लालास आह्मांकडे पाठविलें. लालानें मजकूर सांगितला, तो लिहिलाच आहे. पत्रांत मजकूर स्नेहाचें फार लिहिलें होतें. दुसरें कांहीं नाहीं ! बोलण्याचा मजकूर उभयतांवर घालून लिहिला आहे. तें पत्र पाहून आह्मीं सांगितले कीं, टिपूचा आमचा फासला जवळ आहे. राजकारणांचा भाव समजला. त्यापक्षी, जाब लिहून देऊन लावून द्यावा. त्याजवर आह्मीं लालास पुसलें कीं, काहीं अधिक उणें सांगितलें आहे कीं, काय ? त्यांणी सांगितले की, सांगितला मजकूर इतकाच. तेव्हां रवाना करण्याचा निश्चय ठरला. त्यावर, शृंगेरीपंतानें सांगितले की, मजला मुधोजी बावासीं बोलावयास सांगितले आहे. त्यांची गांड पडली पाहिजे. तेव्हां पुसलें कीं, कागद पाहिला, तुह्मीं मजकूर सांगितला याहून अधिक काय बोलावयाचें ? त्यास, भेट जाली पाहिजे, हाच आग्रह. नाहीं ह्मणावें तर चिरंजीवास वाईट वाटेल, व लष्करांत नसावा, याजकरितां जाणें तर जा, ह्मणून सागितलें. त्यावरून मुधोजीबावाकडेस रा। केला. काय अधिक सांगते पाहावें. लष्करांतून पीडा लाऊन दिली. धुरंधराची गांठ पडल्यावर पत्र आलें ते दृष्टीस पडेल. त्याजवळ अधिक मजकूर काय सांगितला असेल तोही कळेल. राजकारणांचा प्रकार समजलाच आहे. परंतु कच्चें वर्तमान ऐकलें तें सेवेसीं लिहिलें आहे. रा। छ ४ रमजान. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना, लालाबराबर एक हत्ती व चार वस्त्रें पाठविलीं. हत्ती लंगडा आहे. तो चिरंजीवांनीं येथे चालेना ह्मणून ठेऊन घेतला. विदित झाले पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २८५
श्री १७०८ ज्येष्ठ वद्य १३
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री महिपतरावबापू स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. तुह्मीं छ २० साबानचें पत्र पाठविलें तें पावोन लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें, बहुत संतोष जाहाला. प्रकृतीचें वर्तमान लिहावें ह्मणोन लिहिलें. त्यास, तीस महिने जाहाले, वायूचा उपद्रव जाला आहे. मातुश्री ताई येथें आली होती ते समई प्रकृत पाहिली. त्याजवर औषध चाललेंच आहे. त्यास, अधिक उणी प्रकृत होते. अद्यापि ठरली नाहीं. उपाय करीतच आहों. ईश्वर * कृपा करील. तुमची प्रकृती चांगली आहे ह्मणोन लिहिलें. त्यास, ईश्वरानें कृपा केली. श्रीमंतांचे दर्शनास यावयाविशीं पूर्वी लिहिलें आहे. श्रीची आज्ञा घेऊन यावयाचें करावें. रा। छ २७ साबान. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २८४
श्री. (असलबमोजिब नकल.)
१७०८ ज्येष्ठ वद्य ११
विनंती ऐसीजे:-कृष्णापार रायचूरपावेतों नबाबाचे सरदारांसमागमें मी गेलों. श्रीमंत राजश्री गोविंदराव बापू व गोविंदराव भगवंत यांस नबाबांनी त्यांचे समागमेंच ठेविलें. कारण कीं, अदवानीचा महसरा उठविणें, त्यास उभयतांनीं विचार पाहिला कीं, पुढें छावणीचाही बेत उत्तम प्रकारें जाला पाहिजे. म्हणून हेही समागमेंच राहिले. अदवानीचें वर्तमान ऐकून व इकडून पत्रें गेलीं यावरून, श्रीमंत राजश्री तात्यांनी राजश्री आपा व रघुनाथराव व बाजीपंत अण्णा यांची फौजेसह रवानगी अदवानीचे सुमारें केली. हा सर्व तपशील बापूंनीं पेशजीं स्वामीस लिहिलाच आहे. ती पत्रें इंदापुरकडून स्वामीस पावलीं असतील. यानंतर, छ १७ साबानीं रायचुराहन निघोन छ २५ माहे मजकूरीं भागानगरास नबाबाकडे मी आलों. नासिरुलमुलूख व मुगरुलमुलूख व समशुमुलूख यांजपाशीं कोन्हेर बाबूराव यांस ठेविलें आहे. टिपूनें हल्ला केल्या तितक्या मोठ्या जुरमतीनें महाबतजंग यांनी मारून काढल्या. याचा तपशील पेशजी विनंती लिहिण्यांत आलीच आहे.
अलीकडील वर्तमान आलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिलें आहे. त्यावरून ध्यानास येईल. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २८३
श्री १७०८ चैत्र शुद्ध ३
श्री बाळकृष्ण प्रभु चरणारविंदीं.
तुह्मीं विनंतीपत्र फाल्गुन वद्य चतुर्थ, मुकाम नजीक सुरापूर वाघनगीरा श्रीकृष्णाउत्तरतीर येथील पाठविलें, तें चैत्र शुद्ध द्वितीयेस पावलें. कित्तुरावर टिपूचा जमाव फौज व गाडदी मिळून पंचवीस हजार होती. ते राजश्री तुकोजी होळकर व गणेशपंत बेहेरे त्यापासून पंधरा कोसांवर जातांच ते निघोन धारवाडचे आश्रयास गेले ह्मणोन बातमी आली, वगैरे राजकी सविस्तर लिहिले तें श्रीचरणीं निवेदन जाहालें. तुमचीं पत्रें दोन तीन आलीं. त्यांची उत्तरें पाठविलीं तीं पावलीच असतील. रवाना चैत्र शुद्ध तृतीया.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २८२
कदाचित् १७०८
रावसो मुश्फक मेहरबान करमफर्याम मुखलिसां दामकरमहू बाद आर्जूय दर्याफ्त स्वामी मवासलत सरासर बैहजत कैमत ज्याविजुतहरीर तमक शुफजमीर तलतुफ पिजरिबाद. आपलें कृपापत्र आमचे पत्राचा दरजाब पावलें. आह्मांकडील जमियतचे कुमर्दानाची तरतूद होळकराचे लढाईचा शामरावाचे लिहिल्यावरून आपले ध्यानांत आला. व बेहेरे व अनंत एक हजार स्वारांनिसीं होळकराविशईं रवाना केले व आनखीं अवघें मजकूर सखाराम रामचंद्राचे लिहिल्यावरोन कळेल, ह्मणोन पत्रीं आज्ञा. त्यास, सुचनेप्रमाणें होळकर मजकुरासीं सलूख घडून येईल. होळकराचे खंडणीचें व पायमलीचें नुकसान महालातीस जालें त्याचे ऐवजाचे मुकुदम्यांत आपले कृपेचे उमेदवार नारायणराव.....
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २८१
श्री १७०७ माघ वद्य १३
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री शिवाजी विठ्ठल स्वामी गोसावी यांसी पोष्य माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष, संस्थान करोली येथें सरकारचा अमल आहे. त्यास, संवत १८३९ पासून सरकारचे अमलाचा ऐवज येणें, त्याविशीं राजश्री माहादाजी शिंदे यांणीं ठराव करून दिल्हा. त्याजवरून संस्थानिकांनीं ठाणें मौजे कुतघोन व तर्फ मागदील ऐवजांत लाऊन दिल्हीं आहेत. त्यास, मौजे मारीं व तर्फमा।रीं सबलगडाकडील ठाणीं तुह्मीं घालणार, ह्मणोन हुजूर विदित जालें. त्याजवरोन हें पत्र लिहिलें असे. तरी संस्थानिकांनीं आपले संस्थानपैकीं मौजे मा।र व तर्फमजकुर सरकारचे ऐवजीं सरकारांत ठाणीं सुद्धां हवालीं केलीं असतां, तुह्मीं उपद्रव करणार, हें ठीक नसे. तुह्मीं ते प्रांतीं फौजसुद्धां असतां, सरकारचा अमल बसऊन द्यावा तो अर्थ न होतां, जाहाल्या अमलास खलेल करितां, हे गोष्ट उत्तम नाहीं. मौजे मा।रास व ता। मा।रास तुह्मीं कोणेविशीं उपद्रव न देतां, सरकारचे ऐवजाचा झाडा होऊन येई तें करणे. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ २६ रबिलाखर, सु।। सीत समानीन मया व अलफ. बहुत काय लिहिणे ? हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २८०
श्री १७०७ भाद्रपद शुद्ध २
यादी राजश्री रघोजी भोसले सेनासाहेबसुभा व राजश्री मुधोजी भोसले सेनाधुरंदर यांजकडील करारमदाराची कलमें, सु।। सीत समानीन मया व अलफ.
घरचा अगर बाहेरील कसाही प्रसंग पडला तर सरकारचे लक्षाशिवाय दुसरें लक्ष धरणार नाहीं. येणें प्रों करार
तुह्मीं पुत्रसुद्धां सरकारचे लक्षांत असावें, दुसरें लक्ष धरूं नये. येणेंप्रों करार.
इंग्रजांचा बिघाड जाला तर शरीक सरकारचे. येणेंप्रों। करार.
पांच हजार रुपयांचे कापड बाळापूर व वासीमचें सरकारांत दरसाल द्यावें असा करार पेशजींचा आहे. त्याप्रों, सालमजकूर सन सीत समानीनापासून सरकारांत दरसाल पावतें करीत जावें. येणेंप्रों करार.
प्रांत गंगथडी येथील महाल सरकारांत आले आहेत. तेथील वासदाणा. तुमचा. तो तुह्मीं घेऊं नये. याचे ऐवजी प्रां। वरकड येथील सरदेशमुखीबाबतीचा ऐवज सवादोन असावे, लक्ष रु।। तुह्मांकडे दरसालचें येणें तें तुह्मांस माफ केलें. याप्रों करार
सनइसने सितैनींत जाला आहे. व त्या अलिकडे सन तिसा सितैनांत ब्रह्मेश्वराचे सालीं अकरा माहालचा घासदाणा घेऊन एकसा करार आहे. त्याचा फडशा पेस्तर सालीं करावा. येणेप्रों करार.
ब्रह्मेश्वराचे मुकामीं कैलासवासी जानोजी भोसले सेनासाहेबसुभा यांसीं करार जाले आहेत. त्याप्रों चालावें. येणेंप्रों करार.
छ ३० सवाल, सन सीत समानीन, भाद्रपद, मुकाम पुणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७९
श्री. १७०७ ज्येष्ठ
यादी जनरल बाडम यांसीं सरकारतर्फेनें बोलावें. सु।। सीत समानीन मया व अलफ. कलमें.
फरांसिसांचा व तुमचा बिघाड पेशजीं जाला होता. अलीकडे सलूख जाहला. त्यास, निखालसपणानें बेकिलाफ सलुख चालत आहे की कसें आहे ? सरकारांत फरांसिसांकडील बोलणें, टिपूवर सरकारांतून मसलत जाल्यास आह्मीं हमराहा मदतीस चाकरीबद्दल येण्याचें, लागलें होतें. दोनतीन वेळां त्याजकडोन पैगाम आले. परंतु इंग्रजांशीं व सरकाराशीं निखालस दोस्ती. तेव्हां फरांसिसास सामील आणणें ठीक नव्हे. इंग्रजांशीं दारमदार स्नेहाचे झाले आहेत. त्यांचीच वृद्धि असावी. याजवर नजर देऊन फरांसिसांचे बोलणें सरकारांत पसंद न केलें. हाल्लीं टिपूचे पारिपत्यास सरकारांतून फौजा रा। होणार. तेव्हां फरांसिसांचें बोलणें इकडे सरकारांत नापसंद जाल्यामुळें, कदाचित हिंदुस्थानांत आपला फैलाव ज्याजती व्हावयाउमेदीनें फरांसिसानें टिपूशीं सलूख करून, त्याचे मदतीस सामील होण्याचे ठराऊन, त्याचे मदतीस आल्यास, याचा विचार इंग्रज करितात, हे जनरल यास पुसावें. मसलतीचा विचार थोर, तेव्हां विलायती हुकुमाशिवाय कोणताही मनसबा विचार कसा होतो, असें कदाचित् म्हणंतील. तर, विलायतेस लिहून, तेथें ठराव होऊन तेथील हुकूम यांस येऊन, मसलत करणें, त्यास अवकाश बहूत पाहिजे. आणि इकडे तों मसलत प्राप्त जाहाली. उपेक्षा होऊन अवकाशावर पडिल्यास, पुढे दिवसेंदिवस त्यास भारी पडतें. सरकारांत टिपू सुरळीत वर्तोन सरकारमर्जीप्रमाणें सलूख करून मोकळा जाल्यावर, फरांसीस सामील आहे. त्यापक्षीं मसलत इंग्रजांसच जड पडेल. याचा दूरदेश विचार त्यांचे ध्यानांत येऊन, याचे पैरवीचा मनसबा कसा कायम आहे ? सरकारांत तों इंग्रजांचे दोस्तीचे बद्दल खातर. फरांसिसांचे मसलतीस येण्याचें बोलणें ऐकिलें नाहीं. येविशींचे सविस्तर लिहिल्या अन्वयें जनराल यांसीं बोलोन त्याचें उत्तर काय करितात, तें लेहून पाठवणे.
कलम १
मेस्त्र मालिट मुंबईहून कलकत्याले गेले आहेत. हेच पुण्यास वकिलाचे कामावर कलकत्त्याहून आल्यास, सरकारचे कामाचे उपयोगी पडतील व आह्मांपासोनही साहित्य कामकाजाचें घडेल. यास्तव, सरकारांतून कलकत्यास सूचना मालिटचे रवानगीविषयीं जाल्यास चांगलें, म्हणोन जनराल तुह्मांपाशी बोलले. त्याजवरोन कलकत्यास सरकारांतून पाठविलें आहे कीं कलकत्त्याहून पुण्यास वकील रवाना करणार, त्यास मेस्त्र मालिट वाकब आहेत, तेच आल्यास फार चांगलें. येविशीं तुम्ही बोलावें आणि उत्तर काय तें कळवावें, ह्मणोन पत्र गेलें. याप्रमाणें जनराल यांस सांगितले कलम १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७८
श्री. १७०६
यादी आजमास राजमंडळाच्या खर्चासी रु सु।। खमस समानीन जमा रुपये.
६०००० बत्तीससिराळें येथील ऐवज.
१०००० शाहार सातारा छल्या व नकासा व जकात. व पेठा गुरुवार बुधवार व सोमवार व रविवार.
१०००० हत्तीचा ऐवज सचिवपंत यांजकडून.
३५०० इंदापूरचे देशमुखीपैकीं.
३७०० महादजीपंत यांजकडे सावोत्रा वगैरे.
२००० थोरला वाडा करंजेचा ऐवज.
२००० उबार जमीन किल्ला सातारापैकीं.
२००० बळवंतराव बाजी याचा सरंजाम जप्ती.
५० मौजे पळसीची सेरी.
१७०० कुरणाकडे.
१००० किरकोळी पाटिलक्या व से-या व बागा वगैरे.
१५०० दरेकराकडील आहीरवाडी वगैरे.
२५०० चिट्टीमसाला, खंडगुन्हेगारी, कारसाई, व कडबा शिवाय प्रतिनिधीकडील कारसाई तट्टे, भाजी.
------------
१०००००
सदरहूपैकी खर्च अजमास रुपये
२५००० दरमहाचा दरमहा दिल्हा राजमंडलचे लोक आ। ४०० रोजमरा.
५००० कारकून दप्तरचे व राजश्री कडील व दोनी वाड्यांकडील.
३६००० राजवाड्यांतील कापड सुद्धां
१५००० राजश्री
१०००० श्रीमंत आऊसाहेब
८००० उभयतां राण्या २
कापड
-------------
३६०००
४००० खानाजाद व बाइका एकंदर २२५ अंतुश्री
२००० धर्मादाव
१००० राजश्रीकडील नित्या गळ व मोइनीसुधां
५०० आऊसाहेबाकडे
५०० दोन वाडे मिळोन
----------------
२०००
३००० वर्षासनें दोन्ही वाडे व राजश्रीकडील व शाहूमहाराज व आईसाहेब व श्रीमंताकडील कारभारी त्र्यंबकराव याजपासून कृष्णराव परियेंत.
-----------------
७५०००
रोजमारा दुमाहीचा दुमाही द्यावाशिवाय श्रीमंतांकडील स्वार १५० आहेत व सरकारचीं मनुष्यें राजमरेचीं आहेत तीं शाहारची रखवाली करतील, स्वार न पाठविले कोठें तरी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७७
श्री. १७०६ चैत्र शुद्ध ८
आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरंधरविश्वासनिधि राजमान्यराजश्री माधवरावपंडितप्रधान ताहां मोकदम, मौजे कामेरी, ता। वंदन, प्रांत वांई. सु।। अर्बा स. मानीन मया व अलफ, शके १७०६ क्रोधीनाम सवंछरे. राजश्री विसाजी कृष्ण, उपनाम चिंचळकर, गोत्र वशिष्ठ, सूत्र आश्वलायन, मौजे तेरवण, ता। राजापूर प्रांत मजकूर, यांण हुजूर का। पुणें येथील मुकामीं विनंति केली कीं, आपण बहुत दिवस स्वामीसेवा एकनिष्ठपणें केली, कुटुंबवत्सल आहों, योगक्षेम चालिला पाहिजे, यास्तव स्वामीनीं कृपाळू होऊन आपणास कुटुंबाचे योगक्षेमार्थ एक गांव नूतन इनाम करून देऊन चालविले पाहिजे ह्मणोन. त्याजवरून मनास आणितां, यांणीं बहुत दिवस स्वामीसेवा एकनिष्ठपणें केली, कुटुंबवछल आहेत, यांचें चालविणें अवश्यक जाणोन, यांजवरी कृपाळू होऊन, यांस कुटुंबाचे योगक्षेमार्थ मौजे मजकूर हा गांव स्वराज्य व मोगलाई एकूण दुतर्फा देखील सरदेशमुखी दरोबस्त वमय साहोत्रा, कुल बाव, कुल कानू, हल्ली पट्टी व पेस्तर पट्टी, खेरीज हक्कदार व कदीम इनामदार करून, जलतरुतृणकाष्टपाषाणनिधिनिक्षेपसहित इनाम तिजाईसुद्धां सरकारांतुन नूतन इनाम करून दिल्हा असे. तरी, मौजे मजकूर सदरहूप्रमाणें यांचे दुमाला करून देऊन, यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें इनाम चालविणे. दरसाल नवीन सनदेचा आक्षेप न करणें. या सनदेची प्रति लेहून घेऊन, हे अस्सल सनद यांजवळ भोगवटीयास पुरतोन देणे. जाणिजे. छ ७ जमादिलावल. आज्ञाप्रमाण. लेखनसीमा.