Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक २६९

श्री. ( नकल ) १७०३ कार्तिक वद्य १ ( शिक्का सवाईमाधवरावसो.)
२ नोव्हेंबर, १७८१

यादी रो महिपतराव विश्वनाथ, सुा इसने समानीन मया व अलफ. तैनात सालिना रुा
४००००    खासा तैनात
३००००    विसाजी कृष्ण
१००००    महिपतराव विश्वनाथ
------------
४००००
७०००     कोरकूनमंडळी दरकदारसुद्धां
३०००      शागीर्द पेशा
२७५००   राऊत
१२५००   पागाचारदा लागवर
             बा मुा सुद्धां.
१०         खाशी घोडी
१५        बारगीर
२६

दर ५०० शें प्रों,
१५००० शिलदार ५० दर
३०० प्रों १५०००
२७५००

२५०० हत्ती सरकारची रतीब लागवड बा
मुा मोघम

८००००
यासी सरंजाज

३९००० दिगर जहागिरीचे गांव
मामले बीड पो राक्षसभुवन वगैरे फुटगांव हरि बल्लाळ याजकडे फौजेचे सरंजामास दिले होते ते दूर करून.

१७५०० परगणे पातशहापूर वेळ गांव निा महिपतराव विश्वनाथ पो कमाल बेरजेचे गांव लावून द्यावे.

१२१०० पो वाळूंज येथील मोकासा मुरारराव जाधव यांजकडे होता तो दूर करून

३२६५ मल्हारराव पोवळ याजकडील मोकाशे सरः | कारांत जप्त आहेत त्या पो

१६९२ तो हवेली संगमनेर

१५७३ ता देपूर

३२६५

६४५९ मौजे कोरेगांव ता बेलापूर तनखा रुपये ७५०९ पो वजा मो.

कामा १०५० बाकी. रुजू पो सावदेव येथील मोकासा मल्हारराव पोवार याजकडील अकरा हजारांचा सरकारांत जप्त आहे त्यापो लावून द्यावे.

२००० देशी गांव मोजून द्यावा. जुन्नर प्रा संसारास उपयोगी.
-------
८०३२४ ऐशीं हजार तीनशें चोवीस रुो बेरजेचा सरंनाम येणें प्रों करार करावे.

सरंजामास महाल                    असाम्या पूर्वीपासोन
गाव दिल्हे आहेत.                   १ किलेनगर,
अमल याचे हवाली                  येथील मजमू.
करण्याविशी सनदा                 १ किल्ले त्रिंबक येव
ताकीदपत्रे देवावी.                   थील सवनिशी.
इनाम गांव जातीस
दोन हजार रुोचा                       २
कमाल बेरजेचा मो-                  दोन असाम्या दूर
जून द्यावा. येणेप्रों                     करून दुसरेकडे
सांकरार करावे.                       गितल्या आहेत. त्या
कुरण पो गवत सु-                    सालमारीं दूर करून
मारी १०००००                          पूर्ववत प्रों दोन्ही
एक लक्ष पुण्याचे सा-                असाम्या करार केल्या
ईचें कुरण पाहून नेमून              आहेत. यांजपासोन
द्यावें.                                     प्रयोजनी घेऊन वत.
                                           न पेशजीप्रो पावत
                                           जाणें ह्मणोन माम.
                                           लेदारास सनदा. त्रिं.
                                           बकची असामी चालते,
                                           कारकूनापासून काम घेतात,
                                           परंतु वेतन देत नाहीं,
                                          -णोन सांगितले. त्यास,
                                          चाकरी घेऊन
                                          वेतन राहिले असे,
                                          तरी सालमजकुरी

                                          द्यावे.पुढे सालमारा.
                                          पासून पावतें करावें,
                                          याप्रों  
सनदेंत
                                          लिहून देवावें.

छ १५ जिलकाद कार्तिक मास. सनदा लिहिणे.

पत्रांक २६८

श्री
१७०३ आश्विन वद्य १३

रा. मल्हारराव सोमवंशी गोसावी यांसी:-

सुा। इसन्ने समानीन मया व आलफ, तुह्मी आपले गांवीं मौजे जवळेपैकीं पारनेर एथें कलाल बाळगून दारू करवीत होता, ह्मणून हुजूर विदीत झालें. त्यास, कलाल यास सरकारांत आणून चौकशी करितां, तुह्मी सरकार आज्ञेशिवाय कलालाकडून दारू करवीत होता, हा अन्याय तुह्मांकडेस लागू झाला. त्यास, सदर्हू अन्याय तुह्मांस माफ करून, नजरेचा ऐवज सरकारांत द्यावयाचा करार केला. त्याप्रमाणें बदला देणें तो रंगो गोपाळ कारकून कुलशिलेदार यांजकडे खासे चाकरीच्या बायकांस व मुलांस व सुनांस सन समानीनचे व सालगुदस्तचे मोईनपैकीं रुपये ४००० हजार रुपये देवविले असत. तरी तूर्त पावतें करून पावलियाचें कबज घेणें, जाणिजे, छ २६ सवाल.

पत्रांक २६७

श्री.
१७०३ चैत्र

......................................................................................................................................................जाहाजें आलीं. त्याजवरील सरदार याचे जबानीवरून मालूम जाहलें. ......मुंतणें नामें भारी जमावानिशी उमदा सरदार जंगी सामान घेऊन मुतआकिब येत आहे. तो आलियावर इकडील इंग्रजांचें एक बंदर राहणार नाहीं. नूरमहमदखान व नरसिंगराव यांसी आपलेपासीं ठेऊन आनंदराव यांसीं कृष्णराव नारायण याजबराबर पाठवावें ह्मणोन मुफसल कलमीं केलें तें हर्कबहर्फ दिलनिषीन जालें. चुनाचे जनरल कूट चिनापट्टणाहून फुलचरी वरून गुडलूर अडचणीची जागा पाहून, तेथें जाऊन, आश्रियास आला व आं मेहरबान मार्गात मुखालिफास घाबरें करीत गुंडलुराजवळ त्याचे फौजेस माहासिरा देऊन राहिले. हे षकल नेक दुरुस्त जाली. त्यास हाच कावू वख्त मुखालिफाचे पायमल्लीचा आहे. आंसाहेबी खुषकींतून व फरासीस येणार व आला तो दरयांतून बंदर किनारियासीं. या बमोजिम निकड जाहलियावर मुखालिफांस खूब सजा पोंहचेल, ऐसें इंजानेवांचे दिलांत वाटतें. विलफैल, इकडील मजकूर तरः गाडर बोरघांटाखालें येऊन तीन चार (पल) टने घांटावर पाठविलीं. त्यांचे मुकाबल्यास मेहेरबान हरीपंत व होळकर आहेत. हा मजकूर पेशजीं कलमीं करण्यांत आलाच आहे. फिलहाल परशराम पंडित मिरजकर बारा हजार व सरंजाम सुद्धां घांटाखालें इंग्रजांचे पिछाडीस रसद बंद करून पिछाडी करून पायबंद द्यावयाकरितां पाठविले. इतकियांत खासा गाडर घांटावर सरंजामसुद्धां आला. दोन तीन पलटणें घांटाखालीं ठेविलीं आहेत. त्यास, पंडतमारनिले यांणी घेराघेरी करून घाबरें केलें आणि दोन हजार बैल व किराणा बाबेचे व उंटें व छकडे वगैरे सरंजाम भरोन रसद जात होती ते मारली. बैल वगैरे लुटून आणिले. हालीं घेराघेरी करून आहेत. गाडर घांटावर आला ते दिवशीं मेहेरबान हरीपंडत व तुकोजीराव होळकर ते तलाव्यास गेले होते. ते वख्तीं इंग्रेज अडचणीची जागा धरून मुकाम करून राहिला आहे. तेथून दोन तीन पलटणें कोस दीडकोस चालून आलीं. त्यांवर सरकारचे तोफा व गाडद व बाणांची मारगिरी होऊन लढाई खुब त-हेनें जाली. इंग्रजांची (पलटणें ) हटाऊन माघारीं घालाविलीं. ते लढाईंत इग्रेजांकडील दोन सरदारांपैकी तोफेचे गोळ्यानें........... व दुसरा बाणानें ठार जाहाले. व कां......पलटणांतील लोक ठार व जायाबंद जाहला. सरकारचे गाडदी वगैरे कांहीं लोक कामास आले व जखमी जाहाले. याबमोजिब लढाई जाली. इंग्रज पक्या अडचणींत घांटावर राहिला आहे. तेथून.......................................तो मयदानांत यावयाचा कस्त करीत नाही. त्याचे लष्करांत रसद घांटावरून व घांटाखालून पोंहचावयाची बंदी आहे. सबब गिरांनीं व बहुत फिकीरींत आहे. ( चिनेहून चाळीस जहाजें, पन्नास लक्षांचा माल भरून इंग्रजी जहाजे येत होतीं. त्यांची व फरांसीसांची लढाई जाहाली. इंग्रजी जाहाजें फरांसीसांनी सिकस्त केली. ) फरांसिस याची गलबल दर्यांत आहे. असें जासुदी.... .........

( याप्रमाणें फतेमारी जासुदी ) जहाज.........मुंबईस आलें त्याणें वर्तमान सांगितलें.........मुंबईंत गलबल आहे. अशी बातमी मुंबईच्या सरकारांत आली. दरींविला, इंग्रजी दाहा पलटणें हिंदुस्थानांतून... .........वांतील दिलांत आणून सिप्रीकाल्हरावर आलीं. ही खबर राव मेहेरबान माहादजीराव शिंदे यांस मालूम होतांच, अवल कांहीं फौज रवानगी त्यारुखें करून मुतआबिक आपणही मातवर फौज बयम तोफखाना व सरंजाम व सरकारचे सरदार वाळाजी गोविंद व शिवाजी विठल वगैरा मेफौज, येकूण तीस पसतीस हजार फौजेचा जमाव करून, इंग्रजी पलटणीचे मुकाबल्यास गेले आहेत व फजल पलटणांची तंबी होईल, तें जुहूरास येईल. गुजराथचे जिल्यांत ( हंगामा ) करण्याविशीं पेषजीं गणेशपंत बेहेरे वगैरे सरकारची फौज दाहा हजार रवाना केली. त्यांणींही इंग्रजाचे तालुकियांत शिरोन हंगामा सुरू केला आहे. खुलस मुखालिफांस, चहूकडोन ताण व घेराघेरी, आजीज होत ऐसी आमलांत आली. आजिबाद होईल ते नमूदास येईल. कृष्णराव नारायण यांची व फौजेची तयारी जाहाली आहे. लवकरच येऊन पावतील; ह्मणोन हैदरअलीखान यास नानांचे नांवें हिंदवी पत्र.

पत्रांक २६६

श्री.
१७०३ चैत्र

xxx ( पल ) टणाचें पारपत्य करून नेस्तनाबूत केले असतील. इकडील मजकूर तरी गाडरनामें इंग्रेज वसईचा किल्ला घेऊन हावभरी होऊन, बोरघाटाच्या माथां येऊन, अडचणीची जागा धरून बसला आहे. त्यास, इकदील फौजा राजश्री हरी बल्लाळ व तुकोजी होळकर त्याचे तोंडावर आहेत. नित्य सडे जाऊन, तोफा नेऊन लागू करून, तोफांचा व बाणांचा मार करितात. दाहा वीस माणूस जायां होतें. घांटाखाली रा परशराम रामचंद्र यांस दाहा बारा हजार फौजेनिशीं पाठविलें. दोन तीन लढाया करून रसदा लुटिली, लोक मारिले, बंदुका वगैरे आणले, व त्यांची रस्त बंद केली आहे. त्याच्या करांत लष्करांत माहागाई आहे व लोक नित्य गोरे व काळे कवाइतींत दाहा पांच नित्य येतात. मैदानांत येता तरी ठीक होतें. त्यास त्यांच्यानें पुढें येवत नाहीं. याचें पारिपत्य लौकरच होईल, अकीटप्रांतीं इंग्रेजांनी कित्तेक ठाणीं, मुलूख घेतला होता. त्यास हैदरखान बहादूर यांणी तिकडे जाऊन, अर्कोट घेऊन फुलचरी व चैनपटण वगैरे जेर केलें. व फरांसीस खानमारनिल्हेनीं आणून इंग्रेजांस जरबेंत आणिला आहे. सारांश, तुम्ही तिकडील पलटणांचे पारपत्य करून हटविलें, पळविलें, किंबहुना पारपत्यही केलेंच असाल. तुह्मांकडील इभ्रतीनें इंग्रेजांची कंबरच बसेल. तुम्ही मातबर सरदार, मातबर मनसुबे करून कित्तेक शत्रू पराभविले. तेथें इंग्रजांचा मजकूर काय ? इंग्रेज साहुकार असतां, त्यांणीं शिपाईगिरीची उमेद धरून लढाईचा कस्त धरितो ! तरी काय चिंता आहे ? तुह्मीं त्याचें पारिपत्यच करालच. तीर्थस्वरूप कैलासवासी नानासाहेब व राऊसाहेब पुण्यवान. त्यांचा आशीर्वाद आमच्या मस्तकीं आहे त्यांचे आशिर्वादें व श्रीकृपेंकरून शत्रूचा पराभव होईल.* *

पत्रांक २६५

श्री.
१७०२ मार्गषीर्ष.

राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री रावजी स्वामीचे सेवेसीं:-

दिवाकर पुरुषोत्तम कृतानेक नमस्कार. विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. लिहिला अभिप्राय कळों आला. पूर्वी जाहलेला प्रकार यजमानांनीं खास दस्तूर पत्रीं लिहिला आहे, त्याजवरून कळलें असेल. फौजेची समजोती होत आहे. चाळीस पंन्नास लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. बाजदबरसात हैदरावरी जाणार, शिंदे, होळकर आपलाले स्थळास निरोप घेऊन छावणीस गेले. उभयतांचें एक्य फार चांगलें जाहलें. ह्मणेन विस्तारें लिहिलें. ऐशियास, पूर्वी श्रीमंत नाना यांचें खासदस्तुर पत्र विस्तारें आलें तें अवलोकनीं संतोष श्रीमंतांस व मजला जाहला आहे, तो पत्रीं कोठवर ल्याहावा? इच्छित प्रकार श्रीहरीनें घडविला, एतद्विशईचा मजकूर पूर्वी लिहिण्यांत आलाच आहे.......चे लिहिल्या वरून तरी कोणताही गुता.........नाहीं. मुख्य श्रीमंत महाराज रावसाहेब यांची एकनिष्ठता, त्याचींच फळें, श्रीनीं दिल्हीं. याउपरी, सर्व बंदोबस्त यथास्थित होऊन येतील. वरकड, इकडील कित्तेक मजकुर पूर्वी लिहिले आहेत व सांप्रत श्रीमंत नाना यांचे सेवेसीं लिहिले आहेत, त्याजवरून कळों येईल. प्रस्तुत माझे शरीरास आराम नाहीं, शूल पंधरा रोजांत जातो, अखंड वायू उदरांत, पोट फुगलेंच असतें, जेवण बंद, दहषतीनें राहिलों, याकरितां श्रीमंतांस विनंति करून क्रव्याधीस अगर आणीक जें मरजीस येईल तें पाठवून द्यावें, हें जरूर करावें. बळवंतरावजीस पुसून ते काय सांगतील तें लिहिणें. वरकड आंगरेज वगैरा वर्तमान व नबाब जफरदोरेचे विशीं रा दादांस सविस्तर सांगितलें ते लिहितील. आजवरी राग मोठा चारीगार होता. एकदां कसेंही अरिष्ट दूर होऊन श्रीमंतांस यश आलें. कुरापत जळून गेली. नाहींतर याच रोगानें आज चारीमास कैसे सख्त दिवस गेले ते श्रीहरीसच ठाऊक ! वरते आपण तीन पत्रें प्रथमचीं पाठविलीं. यावर तर कांहींच इष्ट काजांत नोहती. गावेलगडच दिवस होता. पुढें श्रीहरी काय करवितात तें सर्वत्रास दिसत असे. आतां हें लिहिणे! आबांस रा दादा रोज बोलत कीं, भाऊ देवाजीपंत, मी भाऊ कशाचा ? हें आपणासच लिहिलें होतें आणि तेच दिवस पडावे ऐसें देवानें दाखवून सर्वांची.........सत्यें बाहीर पाडून......आतां तरी नीट बंदोबस्त करावा, हें जर ल्याहावें, तर सर्व बदेबिस्ताविशीं गुरू ! तेथें काय ल्याहावें ? आपलें शरीर आराम जर असेल तर श्रीमंतांपाशीं यावे. श्रीमंत आपासाहेब यांची मरजी फार आहे कीं, श्रीमंत माहाराज रावसाहेब यांस पहावें. तेव्हां, श्रीमंतांच्या भेटी व सर्वांच्या होतील, हें वारंवार बोलतात. मी तर लिहिलेंसें वारंवार ह्मणतात. आंगरेज, शुजायतदौरेचा लेंक व नजफखान व जयनगरवाले हे सर्व एक जाहले, हें ऐकितों. तेथें खबीर काय असेल ती खरी. जफरदौरेविशीं दादानें लिहिलें आहे. यजमानानें त्यांच्या शेफता व पत्रें पाठविलीं, खातरजमा फार केली, हेंही आहे. हे विनति.

पत्रांक २६४


( मसूदा अहिल्याबाईचा )
श्री
१७०२ मार्गशीर्ष वद्य ३

तुकोजी होळकर इंदुराहून निघाले आहेत. त्यांस पत्रें पाठवावीं कीं, बाईची अमर्यादा न करितां, तुह्मीं लिहून सरकार कामावर न्यावें, ह्मणोन पेशजीं आपण राजश्री विठ्ठल शामराज यांस सांगोन लेहविलें. मारनिलेही लिा। त्याजवरून इंग्रजाचे मसलतीस फौज सुद्धां लौकर नमुद व्हावें, ह्मणोन तिकडे पत्रे पाठविली. त्याप्रमाणें ते कूच करून दरमजल सेंधव्यानजीक आल्याचे वर्तमान आले. त्याजवरून जलद खानदेशांत येऊन, केसो कृष्णाचें पारपत्य करून, लांब लांब मजला करून, वसईकडे इंग्रजांनी दाटी करून लढाई सुरू केली आहे, तिकडील उपराळ्यास सरकारच्या फौजा गेल्या आहेत. तुह्मींही जलदीनें जाऊन पोहोंचून सरकार काम करावें. या अन्वयें त्याजकडे पत्रें गेली आहेत. त्याप्रमाणें ते ( जातील. ) तिकडून लिहिल्यावरून त्यास लौकर मतलतीस येण्याविसीं पत्रें पाठविल्यावरून, सरकारमसलतीचे समई तेही आले. परंतु आपली त्याची भेट जाहली नाही. यास्तव दुसरा अर्थ मनांत आणाल तर आणूं नये. पहिले मामलेदार असतील किंवा नवे त्यांणी केले असतील, त्यांची घालमेल करूं नये. मामलेदारांस ताकीद करून वरचेवरी त्याजकडे खर्चाची पुरवणी होय ती गोष्ट करावी. त्यांजकडील पत्रें आलीं. त्यांत व राजश्री बळवंतराव वांकडे व रखमाजी दादाजी आले. त्यांचे सांगण्यांत मातुश्रीबाईची अमर्यादा कर्तव्य नाहीं. सरकार चाकरी करावयाची. आज्ञा होईल तिकडे करावयास गुंता नाहीं, हे अर्थ आहेत, लिहिल्या अन्वयें त्यांचे फौजेची व खर्चाची तरतूद मामलेदारांस ताकीद करून करीत जावी. नवेजुनेची घालमेल करूं नये. विरुद्ध सहसा दाखऊं नये. येथील लिहिलेवरून तुकोजी होळकर निघाले नाहींत. निघाल्यावर तुह्मीं.........इकडून लिहिविल्यावरून त्यांस मसलतीवर येण्याविशीं पत्रें पाठविलीं. ते येतात...... आहे. प्रसंगावर सर्वांचे लक्ष असावें. येथें तुम्हांविशी दुसरा विचार नाहीं. व ते येथें आल्यावर तुमची मर्यादा करीत असाच अर्थ होईल. ते हिकडे आल्यावर, त्यांणीं कमाविसदार ठेविले होते ते तुम्ही दूर केले, दुसरे पाठविणार, असें करू नये. माणूस.........ते सरकार चाकरीस येतात. महालांची जप्ती होते, तेव्हां चाकरीची उमेद कशी राहील? हें ध्यानांत आणावें. पाटिलवावांचें मत, वांकडें दाखवूं नये, असेंच आहे. याजकरितां लिहिलें आहे. कोणतेंही नवेंजुनें करूं नये. तुकोजीबोवा मसलतीस आले. त्यांस विरुद्ध न वाटे असेंच करावें.
( खासदस्तुर ):–प्रस्तुत इंग्रेजांची मसलत सरवादांत कशी पडली आहे आपली दूरदेशीं समज फार आहे. तेव्हा आपण दुसरी गोष्ट करणार नाही, हे खातरजमा आहे. रा छ १७ जिल्हेज.

पत्रांक २६३

श्री.
१७०२ मार्गशीर्ष वद्य ३.

राजमान्य राजश्री विठल शामराज गोसावी यांस:-

सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सुा इहिदे समानीन मया व अलफ राजश्री तुकोजी होळकर इंदुराहून निघाले आहेत. त्यास बोलाऊं पाठवून सरकार कामावर यावें, म्हणून गंगाजल निर्मल अहिल्याबाई होळकर यांणीं तुह्मांकडून हुजूर लेहविलें. त्यावरून इंग्रजाचे मसलतीस लौकर फौजसुद्धा नमृद व्हावे, म्हणून त्याजकडे पत्रे पाठविली त्याप्रो ते कूच करून दरमजल सैधव्यानजीक आल्याचे वर्तमान आले. त्याजवरून जलद खानदेशांत येऊन, केसो कृष्णाचें पारपत्य करून, लांब लांब मजलीनें, वसईकडे इंग्रजांनीं दाट करून लढाई सुरू केली आहे, तिकडील उपराळयास सरकारच्या फौजा गेल्या आहेत, तुह्मीं लौकर जाऊन पोंहचून सरकार काम करणें, म्हणून त्याजकडे पत्रे गेली आहेत. त्यापों ते जातील. अहिल्याबाईनीं तुह्मांस सांगून लेहविलें, त्यावरून मारनिल्हेस लौकर बोलाविलें. सरकारमसलतीचे समई आले. परंतु, त्याची व अहिल्याबाई यांची भेट जाली नाहीं. त्यास, त्याज कडील पत्रें आलीं व रा बळवंतराव वांकडे व रखमाजी दादाजी आले. त्यांच्या सांगण्यांत अहिल्याबाईची अमर्यादा कर्तव्य नाहीं, सरकार चाकरीची आज्ञा होईल तसें करावयास......यामध्येंच अर्थ आहेत. त्यापक्षीं अहिल्याबाईनीं दुसरा अर्थ मनांत आणू नये. पहिले मामलेदार असतील किंवा नवे त्यांनी केले असतील, त्यांची घालमेल करूं नये. मामलेदारास ताकीद करून वरचेवरी मारनिलेकडे खर्चाची पुरवणी होय असें करावें. येविसीं अहिल्याबाईस अलाहिदा पत्रें पाठविलीं आहेत. तुकोजी बावा येथील आज्ञेवरून निघाले नाहींत. इंदुराहून निघाल्यावर त्यास येथील अमर्यादा न होतां सरकार चाकरीवर न्यावें, ह्मणून अहिल्याबाईनीं तुह्मांकडून लिहविलें. त्याजवरून त्यास लिहिलें. ते येतात असें असतां, अहिल्याबाई मनांत वांकडें कां आणतात ? तुकोजीबावा येथें आल्यावर बाईची मर्यादा रक्षीत असाच (उपदेश ) होईल. बाईचे ठाईं येथें दुसरा विचार नसतां, तुकोजीबावा मसलतीस आले. मागें मामलतीच्या धालमेली व जपत्या होऊ लागल्यास त्यास चाकरीची उमेद कैसी होईल ? सरकारांत मसलतीचे उपयोगीं काय पडतील? फौजसुद्धां मसलतीस आले. त्यास विरुद्ध वाटे असें केल्यानें सरकार काम नासतें, हें समजोन कोणतीही घालमेल करूंच नये. या प्रमाणें तुह्मी बाईसीं बोलून, तुकोजी बावांस विरुद्ध न वाटे असें करणें.
( खास दस्तुर ) 'सरकारकामावर सर्वांची दृष्टी असावी. बाईही फार समजतात, तेव्हां वांकडें पडे असें होणार नाही. रा १७ जिल्हेज.

पत्रांक २६२

श्री.
१७०२ आश्विन शुद्ध १३

यादी सदासिव दीक्षित वाजपेय याजी वा शाहूनगर यांस सरकारांतून प्रतिवर्षी दहा हजार रुपये पावत असत, ते सहा वर्षे पैसा पावला नाहीं. कदाचित् आजपर्यंत राहिले ते वजा करून पुढें सालमजकुरापासून कांहीं निर्वाहार्थ ऐवज योजून नेमून घ्यावा.
सिराळ्यापैकीं गाव देविला आहे तो ताकीद करून देविला जाईल. ऐवज देणें राहिला आहे. त्यास, दीक्षिताकडून कारकून आल्यावर किती ऐवज देणें तो समजोन, कांहीं ऐवजाची सोय पाहून, वरात देविली जाईल. येणेप्रों करार करावे.
छ १२ सवाल, इहिदे समानीन, अश्वीन.

पत्रांक २६१

पौ छ ७ सवाल इहिदे.
श्री.
१७०२ आश्विन शुद्ध ९

हरीपंडत फडके सलमलाहुताला

सौ मेहेरबान करमफर्माय मखलिसां बादज षौक मुलाकत मसरत आयात इत्तीहाद माअरबाद येथील खुषी जाणून आपली षादमानी हमेशा कलमी करीत यावें, दिगर, इंगरेजाचे तालुक मातबरगड किल्ले वगैरे घेऊन आर. काडापाशीं उतरलों असतां, चेनापटणाहून जेनराल मंडोर नामें सरदार दोन्ही हजार गोरे फिरंगी व आठसेहे तुरबस्वार व दाहा हजार बार व तीस तोफा सुधां लढाइचे इच्छेनें कंचीस आल्यावरून आह्मीं आरकाडाहून कूच करून कंचीस पोहचून त्याचे फौजेस घेरा दिल्हा असतां, फिरंगीचे कुमकेस गुंदुर व मछलीबंदराहून जनरल बेली नामें सरदार चारीसौंह गोरे फिरंगी व पांच हजार बार व बारा तोफा वगैरे जंगी सरंजाम येण्याची खबर पोहचतांच, त्याचे तंबीकरितां इकडूनही फौज पाठवून मारामारी करविल्यावरून ते जमियत पुढें येऊं न सकतां कंचीस चारी कोसाचे फांसलेनें गढीचा आसरा घेतले. त्याचे उपराळेस कंचीहून जेनराल मंडोरानें आपले इमराहि जमियेतपैकीं होष चुनिंदे पांचसें गोरे फिरंगी व शेंभरी तुरब सवार व निवडक दोन्ही हजार बार व पंधरा सरदार पालखीनिसीमसुद्धां कंचीहून पाठविले. करितां जनरल बेली नामें सरदार पहिले आपणापाशीं होते ते जमियत व कंचीहून गेले ते कुमकी फौजसहित जमाऊन भेऊन इकडील फौजेसी लढाई करीत येणेची खबर आल्यावरून त्याच वख्तीं आह्मी कंचीस आलों. ते कुलाह पोषाची फौजेवरही कित्येक फौज पाठवून खाशी फौज सुद्धां चालून जाऊन, मारामारी करून, जनरल बेलीचे फौजेस कतलआम केलें. खुद जनरल बेलीनामें सरदार याशिवाय मातबर मातबर पालखीनिशीन तीस सरदार व गोरे फिरंगी पाचेसह जित शाबूत सरकारांत दस्तगीर जाहले. पांचेसेहें फिरंगी व दोन हजार बार पावेतों मारले गेले. बाकी बार व तमाम बंदुका व बारा तोफा वगैरे कुल त्याचें लष्कराचें लष्कर लुटून घेतलें. हे खबर कंचीस आली. ते जनरोल मंडोर ऐकून आपले हमराही फौजसुद्धां रातचे वख्तीं फरारी जाहले, सबब, इकडून, भारी फौजा पाठविल्या. करितां यांस त्यांस लढाई होऊन जेनरल मंडोर याचे हमराही जमियत मारून घेतले. जेनराल मजकूर ताव आणतां न सकतां रादेत. आपले हमराही तोफा व रणगाडे व बारुतच्या पुटीया व बाटीर वगैरे सरंजाम टाकीत टांकीत दोन्ही तिन्ही हजाराचे जमियतेचे निसी कंचीहून आठ केसांवर, चेंगलपटनामें गढत त्याचा टाणा आहे, त्या गढीच्या आस स जाऊन पोहचला. इकडील फौजही त्याचा पिच्छा करीत जाऊन त्या ग. दास घेरली आहे. खुदाच्या फजलेकडून त्याचीही तंबी आनकरीव होईल. त्यास कलमी करणेत येईल, आपण दोस्त असा. याकरितां येथे लढाई ज्या प्रकारे जाहली, तो त्याच नसें प्रमाणे मफसल लिहून पाठविले असे, परभारेहा अखबारे करून जहुरांत येईल. हमेषा आपली घादमानी कलमी करीत यावें. ज्यादा लिहिणें काय असे ?

पत्रांक २६०

श्री.
१७०२ भाद्रपद वद्य १४

राजश्री पंतप्रधान गोसावी यांसीः-

श्रीमंतसकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो खंडेराव जाधव कृतानेक साष्टांग दंडवत. विनंती उपरी येथील कुशल ता छ २७ माहे रमजान मुा नजिक कासारबरी यथास्थित जाणून स्वकीय कुशल लेखन करावयाची आज्ञा केली पाहिजे. साहेबांची आज्ञा घेऊन स्वार झालों ते कोरेगांवीं भीमा उतरोन, निंबदेहेरचे घांटे टोक्यावर गंगा उतरोन, मुक्काम मजकुरीं येऊन दोन चार मुक्काम केलें. समागमें पथकें व पागा नेमणूक आहे. त्यांची मार्गप्रतीक्षा केली. परंतु अद्याप कोणीही आले नाहींत. आह्मी येथून घांट उतरोन जावें, तर खानदेशांत तापीतीरीं शंभूंचें प्राबल्य जालें आहे. महालोमहालचा आमल उतरून मामले निघाले. त्याजकडलि जमाव भारी आहे. यास्तव जलदानें जातां येत नाहीं. गांठ पडल्यास सरकारचा नक्ष राहून पारिपत्य जाहलें पाहिजे. याजकरितां पथकाची मार्गप्रतीक्षा येथेंच करीत असों. सेवेसीं वर्तमान श्रत व्हावें, ह्मणोन विनंती लिहिली आहे. पथकें रवाना करावयास हुजरे गेलेच आहेत, आणखी ताकीद होऊन रवाना लौकर जाले पाहिजेत. एक दोन ठाणीं त्यांणी घेतलीं आहेत. त्याजवर हल्ला करून जातांच ठाणीं घेतल्याशिवाय दाब पडणार नाहीं. येविशीं समक्ष विनंती केली होती, साहेबाची आज्ञा जाली कीं, मागाहून च्यार तोफाही रवाना करतों. त्याची रवानगी जाली असल्यास उत्तम. नसली जाली तरी सत्वर तोफा रवाना करावयाची आज्ञा जाली पाहिजे. विशेष काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हें विज्ञप्ति.