Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
१६. १७१४ च्या मार्च एप्रिलापर्यंत कृष्णराव खटावकराची व्यवस्था लावण्यांत बाळाजीचा काळ गेला. गुदस्त सालीं आंग्रयाच्या तहांत शिंद्याचा कांहीं प्रांत शाहूकडे आला, त्यामुळे आंग्रयाचें व शिंद्याचें युद्ध लागलें. तेव्हां आंग्रयाचे कुमकेस बाळाजी विश्वनाथ जाऊन शिंद्याशीं तह १७१५ च्या ३० जानेवारीस झाला. पुढें पुणें प्रांतांत अंमल बसवून बाळाजी सातान्यास आला, तों दमाजी थोरातानें नारो शंकर सचिव यास अटकेंत ठेविलें असें कळलें. सचिवाला सोडविण्याच्या खटपटीत पेशव्यांना पुरंदर किल्ला मिळाला. ह्याच अवधींत रावरंभाजी निंबाळकर फितून मोंगलांकडे गेला. त्या मोंगलांचा पराभव खंडेराव दाभाडे यानें बेदम केला. इतक्यांत १७१६ च्या सप्टंबरांत पेशवे स्वारीस निघाले असतां, दमाजी थोरातानें त्यांस पुरंधराखालीं जाधवाच्या वाडीस पकडलें. तेथून सुटून, १७१७ च्या आरंभीं खंडेराव दाभाडे यास सेनापतिपद देऊन खंडेरावानें पराजित केलेल्या सय्यदांशीं तहाचें बोलणें करण्यास बाळाजी गेला. तहाचें बोलणें कायम केल्यावर बाळाजीनें दमाजी थोराताचें पारिपत्य केलें व १७१७ जूनमध्यें सचिवाची सुटका केली. १७१७ च्या आक्टोबरांत बाळाजी इसलामपुराकडे कोल्हापुरकरांवर गेला होता. [खंड ३, लेखांक ४५३] तेथून १७१८ आक्टोबरापर्यंत देशाचा बंदोबस्त करून स्वारी सय्यदांच्या साहाय्यास दिल्लीस निघाली. तेथें नवीन पातशहा स्थापून १७१९ च्या जूनांत साता-यास तो परत आला. १७१९ च्या आक्टोबरांत स्वारीस निघून इसलामपुराकडे गेला व बेहें येथें लढाई करून १७२० च्या २ एप्रिलास वारला.
१७. सय्यदांशीं तह करून शाहूचा दरारा वाढला. परंतु कोल्हापुरकरांच्या बाजूचे चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर वगैरे सरदार जास्त जास्त प्रबल होत चालले. त्यांनीं सय्यदांचा शत्रु जो निजामुन्मुलूख त्याचा पक्ष स्वीकारिला. शाहू, बाळाजी विश्वनाथ, खंडेराव दाभाडे, कंठाजी कदम बांडे, कान्होजी भोसले, चिमणाजी दामोदरजी, कान्होजी आंग्रे व सय्यद बंधू असा एकपक्ष झाला; व कोल्हापूरचा संभाजी, अमात्य, चंद्रसेन जाधव, निंबाळकर, चव्हाण व निजामुन्मुलूख असा दुसरा पक्ष झाला. ह्या दोन पक्षांची चढाओढ म्हणजेच १७२० पासून १७३१ पर्यंतचा इतिहास होतो. त्यांत शाहूकडील बाजीराव हें पात्र प्रमुख आहे व दुस-या पक्षाकडील निजामुन्मुलूख हें पात्र प्रमुख आहे. शाहू व बाजीराव ह्यांचे हितसंबंध अगदी एक होते. संभाजीचे व निजामुन्मुलुखाचे हितसंबंध अगदीं भिन्न होते. संभाजीला आपला वाटा मिळावा एवढीच आकांक्षा होती. निजामुन्मुलुखाला दक्षिणेंत राज्य स्थापावयाचें होतें. हे कार्य साधण्याच्या हेतूनें निजामुन्मुलुखानें संभाजीस हातीं धरिलें होतें. जाधव व निंबाळकर हे जहागिरीच्या आशेनें निजामुन्मुलुखाला मिळाले. त्यांच्या ऐपतीजोगी जहागीर संभाजीकडून मिळणें अशक्य असल्यामुळें, ते निजामाचे पूर्ण हस्तक बनले. शाहू व बाजीराव यांच्या मनांत निजामुन्मुलूख, संभाजी; जाधव, निंबाळकर, सय्यद, दिल्लीचा पातशाहा ह्या सर्वांस संपुष्टांत आणून सर्वत्र महाराष्ट्र-धर्माची व महाराष्ट्रराज्याची स्थापना करावयाची होती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
१३. बाळाजी विश्वनाथास सेनाकर्तृत्च मिळाल्यापासून शाहूच्या सुदैवाला प्रारंभ झाला. १७११ त चंद्रसेन जाधवाचा हैबतराव निंबाळकरानें पराभव केला. १७१२ च्या मेंत कोल्हापूरचा शिवाजी वारला. १७१२ च्या नोव्हेंबरांत शंक्राजीपंत सचिवानें जलसमाधि घेतली. सारांश १७१२ च्या शेवटीं व १७१३ च्या प्रारंभाला ताराबाईचा पक्ष अगदीं बुडाल्यासारखा झाला. १७१३ त कृष्णराव खटावकर व कान्होजी आंग्रे साता-यावर चाल करून आले. कृष्णरावावर प्रतिनिधि व आंग्रयावर बहिरोपंत पिंगळे यांस शाहूनें पाठविलें. पेशव्यांच्या मदतीनें प्रतिनिधीनें कृष्णरावाची समजूत काढिली. आंग्रयानें बहिरोपंत पिंगळ्यास कैद केलें. तेव्हां बाळाजी विश्वनाथानें आंग्र्यावर चालून जाऊन पिंगळ्याला सोडविलें व तह करून आंग्रयाला शाहूच्या बाजूला वळविलें. ह्या कामगिरीबद्दल बाळाजी विश्वनाथास शाहूनें मुख्य प्रधानकी किंवा पेशवाई १७१३ च्या नोव्हेंबराच्या १६ व्या तारखेस दिली. ह्याच वर्षी पेशव्यांचा दक्षिणेकडील प्रतिस्पर्धी जो निजामउल्मुलुख यास दक्षिणेची सुभेदारी मिळाली.
१४. बाळाजी विश्वनाथास पेशवाई मिळाली तेव्हां शाहूनें त्याला ब-याच कामगि-या सांगितल्या. आंग्रयाशीं समेट केल्यानें कोकणांत स्वस्थता झाली. शंक्राजीपंत सचिव वारल्यावर साता-याच्या व पुण्याच्या मधील मावळ प्रांतांत कांहीं बखेडा उरला नाहीं. कृष्णराव खटावकराला इनाम देऊन कृष्णेच्या पलीकडील माण देशांत शांतता झाली. येणेंप्रमाणें स्वराज्यांतील साता-याभोंवतील कांहीं प्रांत अगदी निर्धास्त झाला ह्या निर्धास्त प्रांतांच्या पलीकडील टापूंत अंमल बसविण्याचें काम अद्याप राहिले होतें. पुण्यापासून जुन्नरापर्यंतचा प्रदेश व क-हाडापासून बेळगांवापर्यतचा प्रदेश शत्रूच्या हातांतच होता. खानदेश, व-हाड, गुजराथ, मावळा, पेडगांव, अक्कलकोट, तंजावर, कर्नाटक, कोल्हापूर, वगैरे प्रांतांत अद्याप अंमल बसवावयाचाच होता. सारांश साता-याभोवतील कांही तालुक्यापलीकडे शाहूचा अंमल बसवावयाचें काम अद्याप सबंद उरकावयाचें राहिलेंच होते. हें काम १७१४ पासून १७२० पर्यंत बाळाजी विश्वनाथ करीत होता. त्यांत त्याला बरेंच यश आलें.
१५. १७०७ पासून १७१४ पर्यंत ग्रांटडफनें दिलेला वृत्तांत व मीं हा वर दिलेला त्रोटक वृत्तांत ह्यांत मित्यासंबंधानें व मजकुरासंबंधानें बरीच तफावत वाचकांस दिसून येईल. अमुक स्थलीं ग्रांटडफ चुकला आहे असें प्रत्येक स्थळीं म्हणण्याचें विशेष प्रयोजन दिसलें नाहीं १७१४ पासून १७२० पर्यंतच्या वृत्तांतांतही प्राय: हाच क्रम स्वीकारणे इष्ट दिसतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
११. धनाजी जाधव वगैरे सरदारांच्या साहाय्यानें १७०७च्या जूनांत शाहूचंदनवंदनाखालीं येऊन उतरला; व तेथून त्यानें सातारच्या किल्ल्यावरील परशराम त्रिंबक प्रतिनिधि वगैरे ताराबाईकडील सरदारांशीं बोलणें लावलें. हे सरदार लवकर वश होतील असें दिसेना. सबब वाई येथील शेखमिरे ह्यांचा फितुर करून शाहूनें तो किल्ला १७०७ च्या डिसेंबरांत काबीज केला, व पुढें एका महिन्यानें म्हणजे १७०८ च्या जानेवारींत तो राज्याभिषित्त्क झाला. परशराम त्रिंबक कैर्देत असल्यामुळें गदाधर प्रल्हाद यास प्रतिनिधिपद मिळाले; बहिरोपंत पिंगळ्यास पेशवाई मिळाली; सखो विठ्ठलास न्यायाधिशी व होनो अनंत यास सेनाकर्तेपद प्राप्त झालें. धनाजी जाधव यास सेनापतिपद व हैबतराव निंबाळकरास सरलष्करपद मिळालें. सचिव अमात्य वगैरे जे सरदार ताराबाईबरोबर साता-याहून पन्हाळ्याकडे गेले त्यांचे हुद्दे अर्थातच शाहूनें काढून घेतले.
१२. साता-यास राज्यव्यवस्थेची अशी विल्हेवाट लाविल्यावर,शाहूनें बहि: शत्रूंकडे आपली दृष्टि फेकिली. शाहूचा पहिला शत्रु म्हटला म्हणजे कोल्हापुरचा शिवाजी व त्याचे सरदार हे होत. ह्या सरदारांनी पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश व सर्व कोंकणपट्टी अडवून टाकिली होती. ह्या प्रदेशांत दंगा करण्याचें व्रत त्यांनीं बरींच वर्षे पतकरलें होते. शाहूचा दुसरा शत्रु म्हटला म्हणजे दक्षिणेंतील मोंगल अधिकारी होत. दिल्लीच्या पादशाहानें शाहूस सोडून दिलें खरें. परंतु पातशाहाच्या अंमलदारांनीं स्वराज्यांतील बराच प्रांत शाहूस घेऊं दिला नाही. तेव्हां स्वराज्यांतील जेवढा प्रांत मोगल अंमलदारांनीं बळेंच हाताखाली घातला होता, तोहि सोडविणें शाहूस भागच होतें. येणेंप्रमाणें १७०८ च्या पावसाळ्यानंतर शाहूस चोंहोकडे शत्रूंना तोंड देणें प्राप्त झालें. १७०८ च्या आक्टोबरापासून १७१० च्या जूनापर्यंत शाहू पन्हाळा, रांगणा, कोल्हापूर, इस्लामपूर, क-हाड वगैरे ठिकाणीं छावणी देऊन होता. [खंड ३, लेखांक ६४]. ह्या अवधींत धनाजी जाधवानें तुळजापुराकडे, परसोजी भोसले, नेमाजी शिंदे, चिमणाजी दामोदर, खंडेराव दाभाडे ह्यांनी व-हाड, खानदेश, गुजराथ वगैरे प्रांतांत अंमल बसविण्याचा उद्योग चालविला होता; परंतु शाहूच्या राज्याची स्थिरता कोल्हापूरच्या शिवाजीला गप्प बसविण्यावर विशेष होती. शाहूचे सर्व सरदार मोंगलांच्या प्रांतांत मोहिमा करण्यास एका पायावर तयार असत. परंतु कोल्हापूरच्या शिवाजीवर व ताराबाईवर जाण्यास कोणीहि सरदार धजत नसे. हें अलीकडील काम ते शाहूच्याच अंगावर लोटून देत १७०८ पासून १७१० च्या जूनापर्यंत शाहू पन्हाळ्याकडे स्वत: छावणी करून बसला होता, ह्यांतील अर्थ हा आहे. १७१० च्या जूनांत धनाजी वारणातीरीं वारल्यावर शाहूनें सेनापतिपद त्याचा मुलगा चंद्रसेन जाधव यास दिले; परंतु ह्या मनुष्याचें लक्ष शाहूकडे बिलकूल नव्हतें. त्यानें लवकरच ताराबाईकडे व मोंगलाकडे संधान बांधिलें, व शाहूचा पक्ष अगदी दुर्बल करून सोडिला १७१० च्या जूनापासून १७११ च्या आगस्टपर्यंतचा शाहूचा काल फारच संकटाचा गेला. शाहूपाशीं म्हणण्यासारखें फारसें सैन्य राहिलें नाहीं. शाहूचे राज्य आधारहीन होतें कीं काय अशी भीति पडली. अशा वेळीं नवीन सैन्य तयार करून बाळाजी विश्वनाथानें शाहूची बाजू उत्तम राखिली. ह्या सेवेबद्दल होनो अनंताचे सेनाकर्तेपद शाहूनें बाळाजी विश्वनाथास दिलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
९. शाहु मोंगलांच्या लष्करांतून निघाला तो स्वतंत्र एकटा असा निघाला नाही; त्यानें आपल्याबरोबर एक पातशाहि सुदर्शन घेतलें. मोंगलाच्या लष्करांतून सुटतांना स्वराज्याची पातशाही सनद शाहु आपल्याबरोबर घेऊन आला. मुख्यत: ह्या सनदेच्या जोरावर म्हणजे पादशहाचा मांडलिक ह्या नात्यानें शाहु स्वराज्याला हक्क सांगण्यास आला. वारस ह्या नात्यानें शाहूचा राज्यावर हक्क होताच. परंतु तो हक मराठमंडळांत कितपत मानला जातो ह्याचा त्याला संशय होता. व-हाडांत आल्यावर, परसोजी भोसले, चिमणाजी दामोदर, नेमाजी शिंदे, अमृतराव कदम बांडे, खंडेराव दाभाडे, बगैरे मराठे सरदारांस जहागिरीची लालुच दाखवून त्यानें वश करून घेतलें. ह्याच लालुचीला भुलून धनाजी जाधव, मानसिंग मोरे, हैबतराव निंबाळकर, वगैरे दक्षिणेकडील सरदार शाहूच्या पक्ष्याला मिळाले. १६८९ पासून १७०७ पर्यंतच्या धामधुमींत परसोजी भोसले, धनाजी जाधव, वगैरे सरदार पातशाहींतील काबीज केलेल्या प्रांतांतून स्वतंत्रपणें अधिकार करावयास व उत्पन्न खावयास शिकलेले होते. अवरंगझेब पातशहाच्या मरणानंतर ताराबाईचें राज्य निष्कंटक होऊन आपला स्वतंत्र अधिकार रहाणार नाही, अशी भीति ह्या सरदारांस वाटूं लागली व जहागिरीं देऊं करणा-या शाहूचा पक्ष स्वीकारणें त्यांस फायद्याचें दिसलें. येणेंप्रमाणें शाहूच्या येण्यापासून मराठ्यांच्या राज्यव्यवस्थेंत दोन नवीन तत्त्वें शिरलीं:-----(१) भोसल्यांना दिल्लीच्या पातशहाचें अंकितत्च प्राप्त झालें, व (२) सरंजामी जहागिरीची पद्धत महाराष्ट्रांत व महत्तर राष्ट्रांत नव्यानेंच उद्भवली.
१०. दमाजी थोरात, शहाजी निंबाळकर, रामचंद्रपंती अमात्य व शंक्राजी पंतसचिव वगैरे जे सरदार ताराबाईला धरून राहिले, त्यांना दिल्लीपतीचें अंकितत्व बिलकूल पसंत नव्हतें व जहागिरी मिळविण्याचीही विशेष हांव नव्हती. शिवाजीनें व राजारामानें घालून दिलेला कित्ता त्यांना सर्वस्वीं गिरवावयाचा होता. ताराबाईला व तिच्या ह्या सरदारांना यश येतें, तर शिवाजीनें स्थापिलेल्या स्वराज्याचें फारच हित होतें. परंतु शाहूला मिळालेल्या बड्या बड्या सरदारांच्या पुढें, ताराबाईसारख्या स्त्रीचें व ह्या लहान सरदारांचें तेज फारसें पडलें नाहीं; व महाराष्ट्र राज्यव्यवस्थेंत बेबंदशाहीचें बीज अप्पलपोटेपणाच्या तडाक्यांत कायमचें पेरलें गेलें. ताराबाईच्या पक्षाला मिळणारे सरदार दुहेरी कचाटींतं सांपडले. राज्याच्या ख-या वारसाविरुद्ध उठल्याचा एक आरोप त्यांच्यावर लादला जाई, व पातशाही सनदा न जुमानण्याचेंहि पाप त्यांच्या पदरीं पडे. शाहूचे बखरकार ह्या सरदाराना पुंड, बंडखोर वगैरे ज्या संज्ञा देतात, त्या ते ह्या पातशाही सनदांच्या जोरावर देतात.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
७. अवरंगझेब बादशहा हा १७०७ च्या फेब्रुवारीच्या २० व्या तारखेस वारला ह्यावेळीं परसाजी भोसले नागपुराकडे, चिमणाजी दामोदर दक्षिणव-हाडांत, कठसिंग कदमराव खानदेशांत, खंडेराव दाभाडे गुजराथेंत, कान्होजी आंग्रे कोकणांत, उदाजी चव्हाण मिरजेकडे, हिंदुराव घोरपडे कर्नाटकांत, दमाजी थोरात बार्शीपानगांवकडे, धनाजी जाधव, हैबतराव निंबाळकर व मानसिंग मोरे उत्तर व दक्षिण पाईन घाटांत व स्वराज्यांत, ताराबाईच्या म्हणजे मराठ्यांच्या वतीनें मोंगलाच्या म्हणजे अवरंगझेबाच्या विरुद्ध लढत होते. ह्याखेरीज प्रांतोप्रांतीचे बहुतेक सर्व मराठे एकजुटीनें मोंगलाची सत्ता हाणून पाडण्यास जिवापाड मेहनत करीत होते. ही जूट इतकी कांहीं बेमालूम जमली होती कीं, तिनें अवरंगझेबासारख्याहि मुत्सद्यांस हताश करून सोडिलें. तीस वर्षे सारखी मेहनत करून दक्षिण जिंकण्याचे अवरंगझेबाचे विचार जागच्या जागीं जिरून गेले; आणि दु:खानें, पराभवानें व चिंतेने करपून जाऊन तो दुर्दैंवी पातशाहा समाप्त झाला. समाप्तीच्या सुमारास मराठ्यांना जास्तच जोर आला व त्यांनीं पातशाही प्रांतांत आपला अंमल बसविण्याचा जास्तच हुरूप धरला. हा हुरूप विझविण्यास मराठ्यांची एकजूट फोडणें एवढाच एक उपाय राहिला होता. तो तोडगा अवरंगझेबानें मरतां मरतां करून ठेविला. त्यानें शाहूला स्वराज्यांत जाण्यास परवानगी द्यावी असा बूट काढिला; व तो बूट त्याच्या मरणोत्तर अमलांत आला. शाहूच्या सुटकेनें मराठ्यांची एकजूट फुटली व त्यांच्या घरांत कलीनें प्रवेश केला.
८. १७०७ च्या मार्चांत शाहु माळव्यांतील अजमशहाच्या लष्करांतून निघाला व मे च्या सुमारास खेडाजवल आला. ताराबाईकडील मराठ्यांचा व शाहूचा त्या स्थळीं युद्धासारखा कांहीं प्रसंग झाला व त्यांत ताराबाईकडील बरेंच सैन्य शाहूला येऊन मिळालें. उत्तरेकडील परसोजी भोसले, चिमणाजी दामोदर व खंडेराव दाभाडे व दक्षिणेकडील धनाजी जाधव, हैबतराव निंबाळकर व मानसिंग मोरे असे प्रमुख प्रमुख सरदार खेडाजवळ एकत्र झाले. मोगलांची कांहीं कालपर्यंत मराठ्यांच्या उपद्व्यापी पराक्रमापासून सुटका झाली. महाराष्ट्राच्या उत्तरेस, पश्चिमेस व दक्षिणेस मराठ्यांनीं मोंगली प्रांत काबीज करण्याचा जो प्रयत्न चालविला होता, तो कांहीं वेळ थंडा पडला व आपसाआपसांत यादवी करण्यास त्यांनीं आपली सर्व मेहनत खर्ची घातली. अप्पाजी थोरात, दमाजी थोरात, शहाजी निंबाळकर, संताजी पांढरे, रामचंद्र नीळकंठ अमात्य, खेम सावंत, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, शंक्राजी नारायण सचिव व परशरामपंत प्रतिनिधि ताराबाईच्या पक्षाला मिळाले; आणि परसोजी भोसले व धनाजी जाधव वगैरे सरदारांनीं शाहूचा पक्ष स्वीकारिला. ही मराठ्यांची यादवी १७३१ पर्यंत चालली व तोंपर्यंत त्यांना मोंगलांच्या प्रांताकडे दृष्टि फेकण्यास फारशी फुरसत सांपडली नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
५ ग्रंथकर्त्याचें ज्ञान अत्यंत विस्तृत असल्यानें जितके वाचक बुचकळ्यांत पडतात तितकेच त्याचें ज्ञान आकुंचित असल्यानेंही तोच चमत्कार होतो. 'मोहरम महिन्यांत बारामतीवर लढाई झाली' असें ४४ व्या पृष्ठावर, 'भडबुंजा मोंगलाचा पराजय केला,’ व 'करीमबेगाशीं युद्ध जुन्नर मुक्कामीं झालें' असें ४६ व्या पृष्ठावर लिहिलें आहे. बारामतीवर कोणाशीं लढाई झाली, भडबुंज्या व करीमबेग हे कोण होते, ह्यांचा निर्देश लेखकानें केला नाहीं. पुढें जेव्हां एखादें अस्सल पत्र सांपडेल व त्यांत ह्या नांवांचा उल्लेख येईल, तेव्हां ह्या तीन प्रसंगांचा साद्यन्त अर्थ कळेल. तोंपर्यंत साशंक स्थितींतच वाचकानें राहिलें पाहिजे. सारांश, वाचकांचीं मनें शंकाकुल करणा-या अशा मित्या ह्या शकावलींत ब-याच आहेत.
६ कोणत्याहि शकावलींत मित्यांचाच समूह तेवढा देण्याचा परिपाठ असल्यामुळें, सांगोपांग इतिहासाशीं तिची तुलना करणें बरोबर होणार नाहीं. काल, स्थल व व्यक्ति ह्या तीन घटकांच्या संमेलनानें ऐतिहासिक प्रसंगाची निष्पत्ति होते. पैकीं कालाचा प्रामुख्यानें निर्देश करणें कोणत्याहि शकवलीचें मुख्य प्रयोजन असतें. ह्या दृष्टीनें पाहिलें म्हणजे, प्रस्तुत शकावली इतिहासकाराला फारच उपयोगाची वाटेल. दफात्यांत निरनिराळ्या सालाखालीं जी जी मिति ग्रंथकर्त्याला महत्त्वाची अशी दिसली ती ती त्यानें ह्या शकावलींत उतरून घेतली आहे. दस-यापासून आगोठीपर्यंत प्रत्येक वर्षी पेशवे कोठें कोठें केव्हां केव्हां होते ह्याचा तपशील देण्याचा ह्या शकावलींत प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न बाळाजी विश्वनाथाच्या व कारकीर्दीसंबंधानें फारच तुटपुंजा आहे. परंतु बाजीराव बल्लाळाच्या व बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील मित्या ब-याच भरपूर अशा दिल्या आहेत. ह्या मित्यांवरून, व ह्या मित्यांशीं स्वतंत्र पत्रांतील मित्यांची सांगड घातली असतां असें दिसून येतें कीं, ग्रांटडफनें बाजीराव बल्लाळाच्या व बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील ब-याच मित्यांचा घोटाळा केला आहे. मित्यांचा घोटाळा झाला म्हणजे प्रसंगांच्या पौर्वापर्याचा घोटाळा होतो; व येथून तेथून सर्व हकीकत चिताड होऊन जाते. एक मिति चुकली असतां ती चार प्रकारची अडचण करते. (१) जेथें ती मिति हवी असते तेथें ती नसते (२) जेथें ती नको असते तेथें ती येते; (३) जेथें ती चुकून आणलेली असते तेथील ख-या प्रसंगाचें उच्चाटण ती करते; (४) व जेथून ती आणलेली असते तें स्थळ रिकामें टाकावें लागतें किंवा एखाद्या निराळ्याच प्रसंगानें भरून काढावें लागतें येणेंप्रमाणें एका मितीच्या अव्यवस्थित मांडणीनें हा असा चतुर्विध घोटाळा होतो. बाळाजी विश्वनाथाच्या, बाजीराव बल्लाळाच्या व बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील कोणत्या मित्यांसंबंधानें ग्रांट्डफनें हा असा घोटाळा करून ठेविला आहे, तें ह्या तिन्ही पेशव्यांच्या कारकीर्दीचें नवीन माहितीप्रमाणें अत्यंत त्रोटक वर्णन देऊन स्पष्ट करून दाखवितो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
शकावलीच्या ३८ व्या पृष्ठावर 'बेहे येथें स्वारी करून' इतकाच अपूर्ण उल्लेख आहे. शकावलीकर्त्याला मिळालेलीं दफातीं अपूर्ती होतीं ह्याला दुसरा पुरावा तिस-या खंडांतील १३५ व्या लेखांकाचा आहे. ह्या लेखांकांत १७१९ त सुमंत पदावर महादाजी गदाधर व न्यायाधिकारी सखो विठ्ठल होते असा उल्लेख आहे. प्रधानमंडळांत वेळोवेळीं झालेल्या फेरबदलाचा निर्देश शकावलींत तर केला नाहींच; इतकेंच नव्हे तर विशेषनामांचाहि नीट निर्देश केला नाहीं. शकावलीच्या २१ व्या पृष्ठावर महादाजी गदाधर ह्या नांवाबद्दल महादाजी गंगाधर व सखो विठ्ठल ह्या नांवाबद्दल शिवो विठ्ठल असें लिहिलें आहे व तें अर्थात् चुकलें आहे. दफात्यांच्या अपूर्णतेची तिसरी साक्ष तिस-या खंडांतील लेखांकाची आहे. ह्या लेखांकांत “ फत्तेसिंग बाबा भोंसले तुळजापूराजवळ भारी फौजेनिशीं ” १७१७ त ” होते ” म्हणून लिहिलें आहे. १७१७ त फत्तेसिंग भोंसले लहान पोर असावा अशी शकावलीकर्त्याची, इतर सर्व लेखकांप्रमाणें समजूत असल्यामुळें, त्याचा उल्लेख त्यानें १७२६ तील कर्नाटकच्या स्वारीच्या आधीं केव्हांही केला नाहीं. परंतु लेखांक ४५३ वरून १७१७ त फत्तेसिंग भारी फौजेचें सेनापतित्व करण्यास योग्य होता असें स्पष्ट दिसत असल्यामुळें, त्याच्या नांवाचा अनुल्लेख शकावलीकर्त्याला मिळालेल्या साधनांच्या अपूर्तेपणाचाच परिणाम होय, असें म्हणावें लागतें. सारांश, बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीसंबंधीं शकावलीकर्त्याची माहिती बरीच अपूर्ती आहे ह्यांत संशय नाहीं. ग्रांट्डफच्या माहितीपेक्षां ती जास्त आहे. परंतु आधुनिक जिज्ञासूला जितकी विस्तृत माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे तितकी ती नाहीं हें स्पष्ट आहे.
४ शकावलींतील अपूर्णता केवळ दफात्यांच्या अभावाचा किंवा अपूर्तेपणाचाच परिणाम आहे असें नाहीं. तत्कालीन कर्त्या पुरुषांच्या वरिष्ठकनिष्ठतेसंबंधींही ह्या लेखकांची कल्पना कोती होती असें दिसतें. तिस-या खंडांतील ४५३ व्या लेखांकावरून १७०७ पासून १७२० पर्यंत शाहूमहाराजांनीं स्वत: ब-याच मोहिमा कोल्हापूरच्या संभाजीवर केलेल्या असाव्या असें स्पष्ट सिद्ध होतें; परंतु शाहूचें नांव शकावलीकर्त्यानें मोहिमेसंबंधीं कोठेंहि काढिलेलें नाहीं. संभाजीवर शाहूनें स्वत: स्वा-या केल्या; परंतु मोंगलावरती शाहू स्वत: कां गेला नाहीं, ह्याचाही उल्लेख त्यानें केला नाहीं. शाहू पातशहाचा व पातशहाच्या अंमलदारांचा मिंधा होता व त्यामुळें मोंगलावर स्वत: जाण्यापेक्षां सरदारांना पाठविणें त्याला योग्य दिसलें, वगैरे संबंध शकावलांच्या लेखकाला समजलेले नव्हते. तसेंच, इतिहासाची व्याप्ति मोहिमांच्या पलीकडे नाहीं अशीही ह्या लेखकाची समजूत असावी असें वाटतें. प्रत्येक मोहिमेंतील निरनिराळ्या प्रसंगांच्या मित्या ह्या लेखकानें दिल्या असल्या तरीदेखील त्याच्या उद्योगाचें चीज झालें असतें; परंतु आकुंचित अशा दृष्टीनें इतिहासाचें अवलोकन करण्याचें त्याच्या नशीबीं आल्यामुळें प्रस्तुत शकावली नानाप्रकारें अपूर्ण उतरली आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
१. प्रस्तुत शकावलींत खमसअशर सालापासून म्हणजे इ.स. १७१४ च्या मे पासून इहिदेसितैनच्या जमादिलाखरापर्यंत म्हणजे १७६१ च्या जानेवारीपर्यंत घडलेल्या ठळक ठळक प्रसंगांच्या मित्या दिल्या आहेत. शिवाय प्रथमारंभीं १७१४ च्या आधींच्या कांहीं प्रसंगांचाही क्वचित् धरसोडीचा उल्लेख केला आहे.
२. ह्या शकावलींत प्राय: पेशव्यांच्या मोहिमांचाच तेवढा निर्देश केला असल्यामुळें, इतर सरदारांच्या मोहिमांची माहिती हींत फारशी सांपडावयाची नांहीं. पेशव्यांच्या देखील सर्व मोहिमांच्या मित्या हींत दिल्या आहेत असें नाहीं. बाळाजी विश्वनाथाची बहुतेक कारकीर्द बिन मित्यांचीच ह्या शकावलींत सांपडेल. आतां इतकें खरें आहे कीं, बाळाजी विश्वनाथाच्या कांहीं हालचालींच्या मित्या ह्या शकावलींत दिल्या आहेत; परंतु ह्या मित्या इतक्या थोड्या आहेत की, सबंध महिनेच्या महिने बाळाजी विश्वनाथ कोठें होता व काय करीत होता, ह्यांचा नक्की पता अद्यापि लागावयाचाच आहे. समाधान एवढेंच मानावयाचें कीं, आतांपर्यंत ग्रांटडफादि बखरकरांच्या ग्रंथांत जेथें जेथें मुळींच कांहीं माहिती नव्हती, किंवा जी कांहीं थोडीबहुत माहिती दिलेली आहे, ती जेथें जेथें असंबद्ध, परस्परविरोधी व अपूर्ती होती, तेथें तेथें ह्या शकावलींतील मित्यांच्या साहाय्यानें जास्त तपशिलावर, संगतवार व निश्चयात्मक माहिती मिळण्याचा संभव उत्पन्न झाला आहे. बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीतील मित्यांना ज्या टीपा दिल्या आहेत, त्यांच्याकडे लक्ष पोहोंचविलें असतां माझ्या म्हणण्याचा अर्थ उघड होईल.
३. शकावलीच्या कर्त्याला पेशव्यांचें सर्व दफ्तर खुलें असून, बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीतील मित्या त्यानें इतक्या थोड्या कां दिल्या असा प्रश्न साहजिक उद्भवतो. त्याला उत्तर असें आहे कीं, पेशव्यांच्या दफ्तरांतील जीं दफातीं शकावलीकर्त्याला पहावयाला मिळालीं, त्यांतच मुळीं बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीच्या मित्या थोड्या आहेत, अथवा खरें म्हटलें असतां, मुळींच नाहींत. एक तर बाळाजी विश्वनाथाच्या वेळीं दफातीं ठेवण्याची वहिवाट मुदलांतच नव्हती असें तरी म्हटलें पाहिजे; किंवा दफातीं ठेवण्याची वहिवाट होती असें समजल्यास- आवकजावकाचें दफातें ठेविल्याशिवाय कोणताही कारखाना व विशेषतः राजकीय कारखाना चालणें अशक्य आहे, ही गोष्ट लक्षांत घेतली असतां हाच समज जास्त संभवनीय ठरतो-- तीं दफातीं कोणत्या तरी कारणानें नाहींशीं झालीं असावीं असें म्हणणें अवश्य होतें. कसेंही असो, ह्या शकावलींत बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीतील मित्या फारच थोड्या व अपूर्या आहेत ह्यांत बिलकूल शंका नाहीं. ह्यास दहापांच प्रत्यंतरें देतां येण्यासारखीं आहेत. तिस-या खंडांतील ४५३ व्या लेखांकांत “ इसलामपुरास बाळाजी विश्वनाथ होते ” असें लिहून, नंतर पुढें “थोरले पंतप्रधान दिल्लीहून सातारेस आलेवर महाराजांनीं दक्षिणप्रांतीं मोहीम सांगितली,” वगैरे मजकूर दिला आहे. ह्या लेखांकांत कोल्हापुरच्या संभाजीच्या व सातारच्या शाहूच्या कांहीं झटापटींचें वर्णन आहे व त्यांत बाळाजी विश्वनाथाच्या हालचालींचाही सहजासहजीं उल्लेख केला आहे. त्या उल्लेखावरून असें दिसतें कीं १७१७ त सय्यदांशीं तह केल्यावर बाळाजी इसलामपूर व वाळव्याकडे कांहीं वेळ होता. आणि तेथून १७१८ त तो दिल्लीस गेला व दिल्लीहून परत आल्यावर पुन्हां कोल्हापूरकरांवरील मोहिमेंत तो सामील झाला. शकावलींत सय्यदांशीं तह होण्यापूर्वीच्या बाळाजी विश्वनाथाच्या कोल्हापुरावरील मोहिमांचा बिलकुल उल्लेख नाहीं; दिल्लीहून परत आल्यावरच्या मोहिमेचा मात्र लहानसा उल्लेख आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६४
राजीनामा बे॥ देसमुखान व देसपांडियानी व मोकदमानी व माहाजनानि व सेटिये व रयानि पा। पुणें स॥ जुनर आं की सेख जाफर + + ई ज्यांहानखान फौजदार पा। मा।र आ ++ ता व सीतम लुटून घेतले महलग मुतसरफ होउनु बेहती र्यायायत केले प॥ वैरान जाला व कसबेमजकुरीची रयत कैद केले कितेक जमीदारांचे तर्फेने किले अ ++ डी व कोंढाणा कैद होते जे वख्ती ++ खानजी पोहचले ते वख्ती खलासी जाली आ++ आपण बखिजमती जिल्हे मुस्तताह फरोजजंग एउनु पोहचलो की फौजदार दीगर होए व इलाने एक आदमी बपरगणे नमेमानद दरीविंला बनजर आबादानी व मामुरी पाहाडखान फौजदार प॥ मजकुरी मोकरर जाले यासि आपण तमाम रयानि बादशाही राजी व शामीर असो.
----------
समाप्त
----------
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६३
(पहिला बंद गहाळ)
होता ते वेलेस नागोजी बिन हिरोजी बदअमल वर्तला त्याजवरून पठाणमजकू याणे अर्जी लेहून बेदरास पाठविली तेथून नागोजीस धरणी आली. तो गावातून पलोन आलंद्यास बांदलाची पाठ निघावयास जात होता तेव्हां गुंजवणी अलीकडे श्वारीस सापडला तेथेंच डोसके मारिले मग गोजावा त्याची बायको अग्नि घ्यावयास लागली ते वेळेस आपले वडील हारजी व गोमाजी मौजे मजकुरी नांदत होते त्यास हारजी साहाजी माहाराजाकडेस चाकरीस गेला होता व गोमाजी गावावर नांदत होता ते वेळेस गोजावाचे समाधान केले की तू आग निघू नको. मूल जतन करून गावचा कारभार करून राहणे त्याजवरून ती राहिली त्याजवर हारजी व गोमाजी बावास देवआज्ञा जाली. त्यावर दादो कोंडदेव या प्रांती आले मुलकास कौल दिल्हा त्यांचा चाकर नावडकर मौजे धागवडीस कमाविसी ठेविला त्याने आपली सीव मनाईची पहिली होती ती अलीकडे रेटून घातली त्यावर दादो कोंडदेव सावरदरियाचे मुक्कामी आले तेव्हां गोजावा जाऊन सावरदरकर पाटिल याच्या हाते भेटली तेथे पाटिल मजकुराचा कांहीं कजिया होता तो विल्हेस लाविला त्याजवर दादो कोंडदेव बोलिला जे, गोजावा कर्ती माणूस आहे. तेव्हा गोजावाने अर्ज केला ज आमची सीव दागवडकर याणी रेटिली मग सावरदरकर पाटिल बोलिले की इची समजावीस कांहीं देऊन करावी मग दादो कोंडदेव कृपाळू होऊन गावची वाहातीची जमीन बारा रुके दील्ही अगोदरचे इनामती रुका होता तो गोजावाने व अवध्यानी टाकला त्या ता आपला भोगवटा राहिला त्यावर सिवाजी माहाराज या प्रांतास आले त्याजबरोबर आपले राजे त्रिंबकजी व मलकोजी रायगडास आले तेव्हां त्रिंबकजी माहाराजा जवळ राहिला व मलकोजी पुरंधरास सरनोबती करावयास माहाराजानी पाठविला. मग बापोजी व चापाजी व भानजी गावावर आले तेव्हां मलकोजीस सरनोबती पुरंधरची जाली ह्मणून वर्तमान कळले मग भेटावयास पुरंधरास गेले जाऊन भेटले तेव्हां यास वस्त्रें देऊन गावास पाठविले यावर वरसाभरा मलकोजी गावावर गाव पाहावयास आले तेव्हां चापाजीस पुसिले की होळीस पोळी कोण लावितो त्याजवर चापाजी बोलिला की गोमाजी बावानें गोजावास कामकारभार सांगितला आहे त्यावरून हाली बापोजी होळीस पोळी लावितो त्याजवर बापोजीची व मलकोजीची कटकट जाली. मग बापोजी बोलिला की तुह्मी वडील आहात गोमाजीबावानी आपल्यास गावचे कामकाज सोपले ह्मणून आपण होळीस पोळी लावीत होतो त्यास तुह्मी गावावर एऊन राहणे मग काय तुह्मी सांगाल त्याप्रों। वर्तूं. त्याजवर मलकोजीने मोकदमीचे वाडे व सेतपट्या सुमार ८ पैकी निमे ४ बापूजीकडे व च्यार आपणाकडे व वाडा सुमार हात १०० शंभर पैकी निमे आपणाकडे निमे त्याजकडे येणेप्रमाणे वाटून घेतले यावर तान्हाजी भालेघरे यास होन साठ देऊन दगड धोंडा आणविला त्याजवर धोंडे घेऊन आले विहीर पडित पाडिली आणि गोठा हि तेथे बांधिला पुढें इनाम पासोडी हक्क लाजिमा याचा बंदोबस्त करून घ्यावा तो रायगडचे बोलावणे माहाराजाचे आले त्याजवर ते चाकरीस गेले ते तिकडेस वरीस साहा महिने राहिले पुढे पातशाही गर्दी जाली. मुलूक उज्याड जाला त्यावर त्रिंबकजी व मलकोजी यांस देवआज्ञा जाली पुढें न्याहारखान या प्रांतास आला त्याणें मुलकास कौल दिल्हा त्याचा अंमल दोन च्यार वरसें चालिला पुढें हायबतराव निंबाळकर याचा दंगा जाला ते वेळेस अर्जाजी हाटे याणी बहिरजीस होळीच्या पोळीस दोही दिल्ही कजिया मातबर जाहाला पुढें बिल्हेस लागावा तो मुलूक उज्याड जाहाला तेव्हां तैसेच राहिले त्याजअलीकडे विठोजीची व आपली कटकट जाहाली त्यावर मोरोपंत देशमुख गावास आले उपरांतीक विंगास गेले इ.इ.इ.