Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
(खड ३, लेखांक१८०) येणेंप्रमाणे शपथेच्या कचाटीतून सुटल्यावर स्वामी धावडशीस येऊन सुखरूप पोहोंचला. तेथें त्याची व शाहूमहाराजांची गांठ पडली. कोंकणात झालेली सर्व हकीकत त्याने शाहूला इत्थंभूत सांगितली, व कान्होजीला छत्रपतीच्या भेटीचे साद्यंत वर्णन लिहून पाठविलें. शाहूनें आपली भेट किती मर्यादने व निष्ठेनें घेतली, ती हकीकत लिहून कान्होजीला दरडाविण्याचा स्वामींचा बेत होता. स्वामीच्या ह्या लिहिण्याचा अर्थ कान्होजी समजला व 'जो कोणी स्वामीस न मानी, तोच अविवेकी आहे', असे वरकर्ती नम्रतापूर्वक उत्तर त्यानें त्यास पाठविलें. जंजि-याचा हबशी अविवेकी, स्वामीला न मानणारा आहे, व आपण स्वतः स्वामीचे एकनिष्ठ सच्छिष्य आहों, असा हे पत्र लिहिण्यात कान्होजीचा मनोदय होता 'स्वामीने ते प्रांती जाऊन, सर्व जनांचा उद्धार करून पुन्हां आगमनाचाहि अविलंबेच विचार केला पाहिजे', असें स्तवन करून कान्होजीनें स्वामीस अगत्यपूर्वक गोंजारण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या गोंजारण्यानें स्वामीच्या हृदयांत मार्दवाचा प्रादुर्भाव न होतां कठोरपणाचाच उद्रम विशेष झाला. हत्तीमुळे पंचवीस हजार रुपयाचीं चीजवस्तू गेली, तुमच्याकडील व्याजाचा हिशेब येणेच आहे, वगैरे दुःखाच्या गोष्टी लिहिण्याचा आविर्भाव करून गेल्या दोन महिन्यातील गोष्टी आपण विसरलो नाहीं, व आपण आमचे कर्जदार आहां, हा अर्थ स्वामीनें कान्होजीस पर्यायाने लिहिला [खंड ३, लेखांक १७९]. ह्या अर्थाच्या मननानें नरम होण्याचें एकीकडेच ठेवून कान्होजीनें स्वामीची थट्टाच आरंभिली 'स्वामी तो परमहंस, सुखदुःखातीत, फलाण्यामुळे फलाणे झाले, हत्तीमुळें फलाणे गेलें, हा मोघ मनुष्यास न व्हावा यास्तव श्रुतिस्मृति प्रवर्तल्या, कोणाचें काय गेलें, व कोणी नेलें' असा शास्त्रार्थ सांगून कान्होजीनें स्वामीची निर्भर्त्सना केली. 'भटास दिली वोसरी, तों भट हातपाय पसरी' असेहि मर्मभेदक वाक्य कान्होजीने स्वामीला लिहिलें. स्वामीचें प्रस्थ दहा वीस वर्षे कोकणांत माजूं दिल्यानें स्वामी आपल्याला जुमानीनासा झाला, व दस्तकावांचून शत्रूचा माल प्रांतांतून नेऊ लागला, हा स्वामीचा अत्याचार आहे, असे ध्वनित करण्याचा कान्होजीचा हेतु होता. कान्होजीचा हेतु नीट ध्यानात न आल्यामुळें, व हत्तीच्या ह्या प्रकरणाची हास्यप्रचुर हकीकत यथास्थित उलगडतां न आल्यामुळे, कान्होजीचें हे पत्र साध्या विनोदाचे असावें, असा रा. पारसनीस यांस भास झाला (पारसनीसकृत ब्रह्मेंद्रस्वामीचे चरित्र, पृष्ठ ३३, टीप) अंगीं विशेष कर्तृत्चशक्ति, राजकारणकौशल्य व सारासार विचार नसणारीं माणसें जेव्हा कार्यकर्त्या पुरुषांच्या राजकारणात लुडबुड करू पहातात, तेव्हा त्यांच्या पदरांत जशास तशी सभवना पडल्यास त्याबद्दल यमनियमादि अष्टांगसिद्दि झालेल्या परमहंसांनीं, कान्होजीच्या म्हणण्याप्रमाणें, खरोखरीच खेद मानून घेऊं नये. परंतु हत्तीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल, दिलेल्या कर्जाबद्दल व हत्तीमुळे झालेल्या अपमानाबद्दल स्वामीला आमृत्यु किती वाईट वाटत होतें, ह्याचे दाखले स्वामीच्या अनेक पत्रांतून आहेत. [खंड३, लेखांक २९४, २९६, २९७, ३००, ३३९, पारसनीसकृत ब्र. लेखांक ३१५ ३२२, ३२८ वगैरे] हा शोक ब्रह्मेंद्रानें स्वीकारिलेल्या वृत्तीला अगदीं विसगत होता.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
सर्व अनर्थ कान्होजीनें केला. हबशांचा हत्ती आणावयास सावनुरास जावें. किंवा न जावें ह्याची रवा ब्रह्मेंद्रानें जर आधींच कान्होजीला विचारली असती, तर हे तिहेरी सकट कशास ओढवते? परंतु होणाराला उपाय काय? शेवटीं ओढवलेल्या प्रसगाची परीक्षा करतां स्वामीस एक रामबाण उपाय सुचला स्वामीने आपल्या झोळींतून शिव्यांचें व शापांचें अमोघ अस्त्र काढिले “हत्ती सोडून देणे, नाहींतर तुझे कल्याण होणार नाही” असा शापसवलित मसुदा ब्रह्मेंद्रानें कान्होबाकडे पाठविला. झाली मजा येवढी बस झाली असा विचार करून व स्वामीच्या मसुद्याचा आदर करून, हत्ती बेदिकत सोडून देणें म्हणून सरखेलांनीं हुकूम सोडिला. हबशांचा हत्ती स्वामीने हबशांकडे पाठविला. जंजिरेकर हबशी याला सिद्दीसाताचें हे दुष्कृत्य कळतांच त्यानें त्याला नशेदपत्र पाठवून स्वामीची जिनगी स्वामीकडे पाठवून देण्यास सांगितले. यद्यपि स्वामीची चीजवस्त स्वामीला मिळाली, तत्रापि देवस्थानाचा जो उद्ध्वंस झाला होता तो कांही कोणत्याहि उपायानें नीट होण्यासारखा नव्हता. तशांत सिद्दीसातानें स्वामीवर अनेक बालांटे घेतलीं (पारसनीसकृत चरित्र, पृ २६ टीप). जंजिरेकर हबशांचें सिद्दीसात ऐकत नाही, स्वतः सिद्दीसात आपल्यावर तुफानें घेतो, व कान्होजी आंग्रे आपली मस्करी करतो, अशा त्रिविध अडचणीत स्वामी ह्या वेळीं सांपडला. सर्व लोकांनीं आपल्याला मान द्यावा, ही जी स्वामीची मनापासूनची इच्छा, तिचा ह्या वेळी सर्वस्वी भंग झाला. राजपुरीकरखानाने हुजूर मुलाखतीस आल्यास स्वामीस दोन गावे इनाम देण्याचे अभिवचन दिले. खानाच्या ह्या बोलण्यावर स्वामीचा विश्वास बसेना व खानाच्या भेटीस जाण्याचें त्याला अनुकूल पडेना. याकुतखान व सिद्दीसात ह्यांच्यावरील स्वामीचा विश्वास उडाल्यामुळें, त्याच्या प्रांतांतील परशराम ह्या गांवीं रहाणें स्वामीस शहाणपणाचें वाटेना. कान्होजीसारख्या थट्टेखोर व पाताळयंत्री माणसावर तर स्वामीचा विश्वास बिलकूल बसेना. तेव्हा यवनांसारख्या बोलून चालून दुष्ट माणसांच्या कान्होजींसारख्या आतल्या गाठीच्या मतलबी मराठ्याच्या सहवासात आपल्यासारख्या सीध्या व साध्या माणसाचा बोज राहणार नाहीं, अशी पक्की खात्री होऊन स्वामींनें कोंकणत्याग करून वरघांटीं जाण्याचा विचार केला. हा विचार कान्होजीस कळतांच, स्वामीस भिवविण्याची त्याने एक नवीनच शक्कल काढिली. कान्होजीनें स्वामीस वरघांटी न जाण्याची शपथ घातली (खंड ३, लेखांक१८०). शाप, शिव्या, शपथा, मंत्र, तंत्र, भुते, खेते, ह्याचा प्रभाव स्वामीच्या मनावर अतिशय असल्यामुळे, वरघाटीं जाण्याचा विचार स्वामीस काही दिवस तहकूब ठेवावा लागला. परंतु आपल्याला कोंकणात ठेवून घेण्यांत कान्होजीचा काहीतरी अंतस्थ मतलब असावा, अशी स्वामीस भीति पडली. दिवसेंदिवस ह्या भीतीचा पगडा अनिवार होऊन “गोठण्याहून स्वार होऊन स्वामी सावंतवाडी व गोवे ह्या प्रांताकडे गेले (खड ३, लेखांक१७६)” वरघांटीं न जाण्याची कान्होजीची शपथ सुटली नसल्यामुळें, त्यानें कर्नाटकांत गुत्तीकडे जाण्याच बहाणा केला. कोणीकडून तरी कोंकणपट्टीच्या बाहेर होतां होईल तों लवकर पडण्याचा स्वामीचा मनोदय होता. कोंकणांतील दुष्टांचा व धूर्तांचा सहवास क्षणभरहि न व्हावा हा त्यांचा मुख्य विचार होता. तदनुरूप गोव्याहून तो कोल्हापुरास गेला, तो वाटेंतील दगदगीने त्याला ज्वराची व्यथा झाली, (खंड ३, लेखांक १७५) कर्नाटकांत जाण्याचा रोख सोडून देण्यास ही सबब समर्पक आहे, असें पाहून, त्यानें पालीवरून धावडशीचा रस्ता धरला शपथेला भीक न घालता स्वामी कांही तरी बहाणा करून वरघांटीं जाणार हे कळून चुकल्याबरोबर कान्होजीने आपण घातलेली आण मोकळी केली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
असाहि स्वामीचा बाणा असे. हातीं घेतलेल्या कामांत आपल्याआड येण्याचें कोणास सामर्थ्य नाहीं, अशीहि अहंता स्वामीच्या ठायी वसत होती ह्या अहंतेच्या भरात दंगा होऊन स्वामी कर्नाटकांत दिग्विजय करण्यास व हबशांचा हत्ती घेऊन येण्यास निघाला. प्रांतोप्रांतींच्या सरकारांचीं दस्तकें घेतल्यास हत्ती सुरक्षित आणिता येईल असा सल्ला हबशांने दिला “परंतु तुमचे काय हत्ती असतील ते समागमें येतील, कोणाचे दस्तकाचें प्रयोजन नाही” असे स्वामीने हबशास फुशारकीचे उत्तर दिलें (चरित्र पृष्ठ १४) सामान्य कायदे सामान्य माणसास लागू. आपल्यासारख्या अलौकिक महापुरुषास कायद्याचें बिलकुल बंधन नाहीं, असे ध्वनित करण्याचा परमहंसांचा मनोदय होता. शत्रु असो, मित्र असो, यवन असो, मराठा असो, इंग्रज असो, किंवा पोर्तुगीज असो, वाटेल त्याची कामे, लढाई असो अगर नसो, करावयाची असा स्वामीचा बेगुमान स्वभाव असे. हबशाशी लढाई चालली असतांना आंग्र्यांची परवानगी विचारल्यावाचून, यवनाचा हत्ती सुरक्षित आणण्याचा उद्योग कितपत यशस्कर होईल ह्याची स्वामीस बिलकुल शंका नव्हती. १७२६ च्या हिवाळ्यात कर्नाटकात भिक्षा मागून १७२७ च्या प्रारंभी स्वामी हत्तीसमागमें कोंकणात उतरले व कांहीं लोकांबरोबर हबशांचा हत्ती हबशांकडे दस्तकावांचून मार्गस्थ करते झाले. माखजनच्या मेटापर्यंत हत्ती सुरक्षित आला. परंतु त्या मेटावर कान्होजी आंग्र्यांची चौकी होती तेथे हत्तीला मज्जाव झाला. विशाळगडच्या घाटावर हत्तीला येताना अटकाव झालाच होता. परंतु स्वामींच्या शिफारशीवरून केल्लेदारानें हत्ती पुढे जाऊ दिला. परंतु हत्ती हबशांचा आहे व त्याला दस्तक नाही असे कळल्याबरोबर, माखजनच्या मेटावरील आंग्र्यांच्या चौकीदारानीं हत्ती पकडून ठेविला. इतक्यात, जवळच हबशांचे चौकीदार होते त्यांस बातमी लागून ते हत्तीचा कबजा घेण्यास आले. आंग्र्यांच्या लोकांची व हबशांच्या लोकांची लढाई झाली. हबशांचें लोकांनीं माघार खाल्ली व हत्ती जयगडच्या किल्ल्यांतील आंग्र्यांच्या सैनिकांनीं आपल्याबरोबर नेला. ही बातमी सिद्दीसातास गोवळकोटास कळली स्वामीने आपला हत्ती आंग्र्यांच्या हाती काहीतरी निमित्त करून जाऊ दिला अशी भलतीच कल्पना करून घेऊन त्या बेहोष यवनाने एक चमत्कारिक प्रयोग केला. गेलेला माल वकिलाच्या मार्फत यादी पाठवून परत आणण्याचा, किंवा लढाई सपेतोंपर्यंत वाट पाहण्याचा, किंवा शत्रूला लढाई देऊन आपला हत्ती पकडण्याचा सीधा व सरळ मार्ग सोडून सिद्दीसाताने ब्रह्मेद्रस्वामींचे परशरामचें गांव व देवालय लुटून फस्त केलें आणि गांवांतील व देवळांतील बायकामाणसाची अब्रू घेतली. हा दुर्घट प्रसग १७२७ च्या फेब्रुवारींत शिवरात्रीस झाला (खड ३, लेखांक१) ह्या यवना प्रयोगाची दुर्वार्ता व हत्ती नेल्याची बातमी ब्रह्मेद्रांस बहुतेक एकदमच कळली. आंग्र्यांनें हत्ती नेला व सिद्दयानें गाव लुटले, हा दुहेरी घात स्वामींच्या हृदयाला दुभंग करता झाला. बिगरपरवाना हत्ती आणिला म्हणून आंग्रे रागावणार व तो गमावला म्हणून स्वामींच्या नांवानें सिद्दी हाका मारणार अशा विवंचनेत ब्रह्मेंद्र पडला. ह्या बाहेरच्या विवचनाहूनहि महत्तर अशी जी देवालयोद्ध्वंसनाची घरची विवंचना, तिनें तर स्वामीच्या काळजाचा भेदच केला. एका चुकीचा, एका घमेंडीचा, एक दस्तक न नंल्याचा हा सर्व खेळ झाला!
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
६, १७२६ च्या एप्रिलांत शामळानें निजामुन्मुलुखाच्या चिथावणीवरून पालगडाखालीं येऊन दगा केला. (शाहूमहाराजांची रोजनिशी पृ. ७) निजामुन्मुलुखाचें व मराठ्यांचें ह्यावेळीं युद्ध सुरू झाल्यामुळे निजामाच्या हुकुमाबरहुकूम शामळानें कोंकणात दंगा आरंभिला. निजामुन्मुलूख दिल्लीच्या पादशहाच्या विरुद्ध असल्याकारणाने व शामळ दिल्लीच्या पातशाहाचा नोकर असल्याकारणाने शामळाचे हें कृत्य अगदी गैरशिस्त होतें. दिल्लीच्या पातशहाचे हुकूम अमलांत आणण्याचा पत्कर बाळाजी विश्वनाथाने १७१९ त घेतल्यामुळे शामळाचा हा गैरशिस्त दगा हटविणे मराठ्यास प्राप्त झाले. नियमाप्रमाणे दगा हटविण्याचे काम शाहूने कान्होजी आंग्र्यास सांगितलें. आपापल्या प्रांतांतींल दंग्याधोप्याचें निवारण सरंजामीं सरदारांनीं होतां होईल तों आपले आपण करावें व शत्रू आपल्या शक्तीच्या अतोनात बाहेर आहे असें वाटल्यास हुजुरून सैन्याचीं मागणी करावी, असा शिरस्ता बाळाजी विश्वनाथाने घालून दिलेल्या सरंजामी पद्धतीच्या कलमांत नमूद होता. ह्या कलमान्वयें कान्होजीने हबशांचा दंगा मोडून काढला पाहिजे होता. परंतु आपल्या एकट्याच्यानें ते काम होणें शक्य नाही, हुजुरून सैन्य पाठवून द्यावे, असा मसुदा कान्होजीनें शाहूस लिहून पाठविला (रोजनिशी पृष्ठ ६१) दसरा झाल्यावर म्हणजे १७२६ च्या सप्टेंबर-आक्टोबरानंतर हुजुरून सैन्य पाठवून देऊ, तोपर्यंत स्वामीची स्थळे रक्षार्वी, असे उत्तर शाहूमहाराजांनी वरील मसुद्यास दिलें. स्वामींची स्थळे स्वामींनी रक्षावीं व आपल्यास ह्या मामल्यापासून मुक्त करावें, असेहि कान्होजीने शाहूस विशदर्थे म्हणजे स्पष्ट लिहून पाठविलें होतें. ज्याअर्थी स्थळे स्वामींची आहेत त्याअर्थी साहित्यही स्वामीसच करणें जरूर आहे, हा मुद्दा मान्य करून, कोंकण प्रांताचें सरक्षण काहीं काळपर्यंत करावें अशी शाहूनें कान्होजीस आग्रहपूर्वक विनंती केली व खसम व सीत दुसाला चोवीस हजार रुपये कान्होजीकडे येणे राहिलें होते ते ताबडतोब पाठवून देण्यास हुकूम सोडला. रुपये पाठविण्याचा हुकूम अमलांत आणण्याचें तहकूब करून कान्होजीनें कोंकण प्रांताचें सरक्षण करण्याची विनंती मात्र मान्य केली व हबशांशी लढण्याचा उपक्रम जारीनें हातीं घेतला. हबशांच्या व आंग्र्यांच्या जागोजाग चवक्या बसल्या व एकमेकांचीं गावे लुटण्याचा दोघांनी धूमधडाका चालविला. ह्या लढाईत हबशाला इंग्रज सामील असल्यामुळे इंग्रजांच्याही गलबतावर कान्होजीची दृष्टि होतीच. १७२६ तील ही लढाई ऐन रंगात कोठे येते न येते तो मध्यंतरी एक चमत्कारिक उपाख्यान घडून आले. १७२६ च्या सप्टंबरांत पावसाळा सपल्यानंतर ब्रह्मेंद्रस्वामी कर्नाटकात भिक्षार्थ स्वारीस निघाला. जाताना हबशाने सावनूरच्या नबाबाकडून आपला एक हत्ती प्रांतोप्रांतींच्या राजांच्या तडाक्यातून सभाळून घेऊन येण्यास स्वामीला विनंति केली. शिरस्त्याप्रमाणे ही विनंति ब्रह्मेंद्रानें मान्य केली. अशी दहा पांच फालतू कामे बगलेंत घालून बाहेर पडण्याची स्वामीला जन्माची खोडच होती. लग्नें, मुंजीं, जवाहीर, हत्ती, घोडे वगैरे बाबी ठरविण्यात, विकण्यात व विकत घेण्यांत आपला हातखंडा आहे, अशी स्वामींला घमेंड असे. आपल्याला कोणी फसवू शकणार नाही.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
तेव्हां त्यांची येथे पुनरुति करीत नाहीं. १७१५ त वसईपासून सावंतवाडीपर्यंत पूर्ण स्वतंत्र किंवा अंशतः परतंत्र असे अधिकारी येणेप्रमाणें होते (१) वसई, ठाणे व चेऊल या प्रांतांत पोतुर्गीज लोक, (२) मुंबईस इंग्रज लोक, (३) जंजि-यास हबशी, (४) अलीबागेस आंग्रे, (५) सावंतवाडीस सावंत, (६) मालवणापासून पन्हाळ्यापर्यंतच्या प्रदेशांत कोल्हापूरकर, (७) व गोंव्यास पोर्तुगीज आंग्र्यांच्या व्यतिरित स्वतंत्र असे ५ सत्ताधारी ह्यावेळीं कोंकणातील निरनिराळ्या भागात असल्यामुळे, शाहूराजांच्या वतीने आंग्र्यांस वेळोवेळी ह्या पाच लोकाशीं युद्धप्रसग पडत. त्यातल्या त्यांत, पोर्तुगीज, इंग्रज व शिद्दी ह्यांच्याशी आंग्र्यांचा सबंध विशेष येई. १७१७ त इंग्रजांचें सक्सेस नांवाचे मोठे तारू आंग्र्यानें धरिले, व मुंबईकर इंग्रजांना तो अपमान निमूटपणें सहन करावा लागला. कोंकणच्या किना-यावर मराठ्यांचा पूर्ण हक्क व अधिकार असल्यामुळे त्या किना-याच्या लगतच्या पाण्यांत परदेशचीं जी जी तारवें गैरपरवाना येत, ती ती आंग्र्यांना धरून ठेवणे भाग पडे. हा कायदेशीर हक बजावण्याच्या कामात कान्होजी आंग्रे फार दक्ष असल्यामुळे मुंबईच्या इंग्रजांचा व साष्टींतील पोर्तुगीजांचा त्याच्यावर विशेष लोभ नसे. शाहू राजाच्या वतीने कोंकणकिनारा व्यवस्थित ठेवण्याबद्दल कान्होजी आंग्रे इतर सरंजामी सरदारांप्रमाणें छत्रपतींना पेशकश दरवर्षी देत असे. बाळाजी विश्वनाथाच्या सरंजामीं पद्धतींत कान्होजी आंग्रे आल्यामुळे त्यांचे परराष्ट्रापासून निवारण व स्वराष्ट्रांत अंतर्भाव मोठा नामी झाला होता. परंतु ही सुरक्षितता कान्होजीला मनापासून आवडत होती असे दिसत नाहीं. शाहूराजाच्या व पेशव्यांच्या आज्ञा न जुमानण्याकडे कान्होजीची प्रवृति असे, तत्रापि छत्रपतींना व पेशव्यांना वरकरणी तरी तो चिकटून असे. छत्रपतींना धरून राहिले असतां केवढा फायदा होतो हें, १७१५ त बाळाजी विश्वनाथाच्या साहाय्याने त्यानें शिद्दयाला बहुतेक नष्ट केलें, त्यावेळीं त्याच्या चांगले प्रचितीस आले छत्रपतीनाहि आंग्र्यांचा उपयोग थोडाथोडका होत नसे. पोर्तुगीज, इंग्रज, डच वगैरे दर्यावर्दी लोकांना तोंड देण्यास कान्होजीची सदा तयारी असे. १७१७ त इंग्रजांनीं विजयदुर्ग घेण्याचा प्रयत्न केला. तों हाणून पाडून इंग्रजांचे सक्सेस हे गलबत कान्होजीने मारिलें. १७१९ त खांदेरीवर इंग्रजांनीं हल्ला केला. तेथेहि कान्होजीनें त्यांना यथास्थित चोप दिला. १७२० त इंग्रज व पोर्तुगीज ह्या दोघांनीं मिळून कान्होजीची विजयदुर्गंजवळ पाण्यात गाठ घेतली. परंतु काहीं गलबते जाळून टाकण्यापलीकडे त्यांच्या हातून विशेष काहीं झाले नाही. ग्रांटडफनें आपल्या इतिहासाच्या १२ व्या भागात छापिलेले पत्र ह्या विजयदुर्गाजवळील लढाईला अनुलक्षून आहे. हें पत्र देतांना डफ कान्होजीला चाचा म्हणून नावे ठेवितो, परंतु हा दोष सर्वथैव अवास्तव आहे. राष्ट्रराष्ट्रांत लढाई सुरू असल्यावर, आपलीं गलबतें शत्रूच्या हातांत गेलीं किंवा शत्रूने आपलें नुकसान केलें म्हणून चरफडून त्याला चांचा म्हणणें केव्हांहि गैरशिस्तच आहे. १७२२ त इंग्रजांनीं कुलाब्यावर हल्ला केला; परंतु तेथेंहि त्यांना विजयदुर्गाचाच अनुभव आला. १७२४ त कान्होजीनें विजयदुर्गास डच लोकांचीहि अशीच राळ उडवून दिली. १७२७ त इंग्रजांचें डार्बी नांवाचे गलबत कान्होजीनें गारद केलें. कान्होजीचा हा तडाका असा एकसारखा हमेषा चालला होता. कान्होजीच्या पुढें बाहेरच्या लोकांची कोंकणच्या किना-यावरील बंदराकडे किंवा किल्ल्यांकडे नुसती बघण्याची देखील छाती नव्हती इंग्रज, डच, पोर्तुगीज, हबशी, शामल ह्या सर्वांना वचकात ठेवणारा पुरुष मोठा दर्यावर्दी योद्धा समजला पाहिजे. छत्रपतींच्या आश्रयास असल्यामुळे, इतर शत्रूंपासून भीतीचे कारण न राहून, कान्होजीला हा वेळपर्यंत दर्यांतील आगंतुकाची विचारपूस निर्भडपणें करतां आली. कान्होजीनें व कान्होजीच्या चिरंजीवांनीं छत्रपतींचा आश्रय असाच एकनिष्ठपणे चालविला असता, तर दर्याकिना-यावर मराठ्यांचे नाव असेच विजयी रहाते. परंतु दुर्दैवाने कान्होजीच्या व त्यांच्या सततीच्या हातून छत्रपतीचें व त्यांच्या सरदारांचे सूत्र नीट राखण्याचे काम शिस्तवार न झाल्यामुळें व छत्रपतींच्या सरदारांकडून व महापुरुषांकडूनहि आंग्र्यांचें वर्तन ज्या रीतीने सुधरवून घेतलें पाहिजे होते त्या रीतीने न घेतल्यामुळे, आंग्र्यांचा, सरदारांचा व छत्रपतींचा क्षय झाला. हा प्रकार कसा झाला, त्याचें निवेदन पुढील कथाभागात केलें आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
५ सभाजींच्या कारकीर्दीत कान्होजी आंग्रे फिरते आरमार घेऊन कोंकण किना-याचा बंदोबस्त करीत होता, असा उल्लेख चेऊलच्या बखरींत सापडतो. म्हणजे इ. स. १६८० पासून १६८९ पर्यंतच्या कालांत कान्होजी उदयास येत चालला होता असें दिसतें. १६८० पूर्वी कान्होजी शिवाजीच्या आरमारांत असला पाहिजे हैं उघड आहे सभाजीच्या वेळीं माणकोजी मराठे, उदाजी पडवळ, सुभानजी खराटे व भिवाजी गुजर, खांदेरी, सागरगड, राजकोट व कुलाबा ह्या चार बंदरी किल्ल्यावर अंमलदार होते. बंदरी किल्ल्यावरील अंमलदार आरमारांतील सरदार असलेच पाहिजेत. कान्होजी आंग्र्याकडे ह्यावेळी कोणता बंदरी किल्ला होता तें समजत नाहीं.
१६८९ त सभाजीचा वध झाल्यावर कोंकणपट्टीतील बराच भाग अवरंगझेबाच्या ताब्यात गेला, परंतु मराठ्यांकडेहि थोडाथोडका भाग राहिला असें नाहीं. १६८९ नंतर माणकोजी मराठे, उदाजी पडवळ, व सुभानजी खराटे आपले अंमल सोडून प्रबळगडास गेले. त्यांच्या जागीं भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे हे दोघे राहिले. मुख्य सत्ता उध्वस्त झाली असतां स्वतःच्या कर्तबगारीनें शत्रूला तोंड देणा-या अनेक मराठा सरदारांपैकी कान्होजी असल्यामुळें, त्याला उदयास येण्यास ही वेळ उत्तमोत्तम मिळाली. राजकोट, सागरगड व पाली ह्या स्थलीं मोंगलांचा अंमल बसला, व कुलाबा, खांदेरी व उंदेरी येथे मराठ्यांनीं आपला तळ दिला दुतर्फा अंमल सुरू झाला. शके १६११ त लढाई होऊन व १६१३ त ह्या दोन्ही सत्ताधा-यांमध्ये तह होऊन दुतर्फा अंमल कायम झाला. ह्या दुतर्फा अंमलासबंधाचें भांडण म्हणजेच मराठे व शिंद्दी यांच्यामधील भांडण होय. शिद्याला दिल्लीच्या पातशहाचें जोपर्यंत पाठबळ होतें, तोपर्यंत मराठ्यांना तो फारसा जुमानीत नसे. इ. स. १७०० च्या पुढे दिल्लीच्या पातशहाचा जोर कमी कमी होत गेला व शिद्दी कोंकणपट्टींत एकटाच राहिला. तेव्हांपासून शिंद्याची सत्ता क्षीण होत होत १७३७ त ती अर्धमेली झाली व १७५९ त केवळ धुगधुगी धरून राहिली. १६९८ त कान्होजी आंग्र्यांचें व शिंद्याचें मोठं कडाक्याचें युद्ध झाले. त्यापुढे १७१३ पर्यंत विशेष काहीं नमूद करून ठेविण्यासारखें कोठें लिहिलेलें आढळत नाहीं. १७१३ पर्यंत आंग्रे ताराबाईच्या पक्षाला चिकटून होता. परंतु शिंद्याशीं युद्ध सुरू झाल्यावर शाहूच्या पक्षाला येऊन मिळणें त्याला सोईचे दिसलें. पुढें आंग्र्यांचा व शिंद्दयाचा १७१५ त बाळाजी विश्वनाथानें तह करून दिला. १७१४ तील शाहूशी तह व १७१५ तील शिंद्दयाशीं तह याची कलमें दुस-या खंडांत दिलीं आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
५ उत्तरेकडून, पूर्वेकडून, व दक्षिणेकडून चालुक्य, यादव, राष्ट्रकूट, विजयानगरकर, सोंधेकर, दिल्लीकर, अमदाबादकर, अहमदनगरकर, बेदरकर, दौलताबादकर, सातारकर, कोल्हापूरकर वगैरे देशावरील राजांनी कोंकणप्रांत वेळोवेळीं हाताखालीं घातलेला प्रसिद्धच आहे. त्याचप्रमाणें पश्चिमेकडूनही शक, यवन, पोर्तुगीज, इंग्रज, हबशी वगैरे समुद्रापलीकडील परदेशस्थ लोकांनाहि हा प्रांत काबीज करण्याची आवश्यकता भासली आहे. ह्या प्रांताचें उत्पन्न विशेष नसून प्रत्येक महत्त्वाकांक्षी किंवा आकांक्षाहीन चक्रवर्ती राजाला तो आक्रमण करावा असे का वाटावे ह्याचें अनेक इतिहासकारांना गूढ़ पडलेलें आहे. ह्मा गूढ़ाचे इंगित असें आहे कीं वास्तविक कोंकण म्हणून जो निरुपद्रवी प्रांत आहे त्याला सह्य पर्वताचें सानिध्य आहे. ह्या पर्वतांच्या द-यांत व खो-यांत देशावरील चक्रवर्ती राजांच्या अंमलाला कंटाळलेल्या उपद्व्यापी पुरुषांना हमेषा आश्रय मिळतो. तो नाहींसा करून आपली सत्ता निष्कंटक करण्याच्या इच्छेनें तीं दरीखोरीं ह्या सम्राटांना जिंकावीं लागतात, व ती जिंकण्याच्या कामांत निरुपद्रवी व सालस अशा कोंकणप्रांतालाहि सगतिदोषाचे प्रायश्चित मिळते. ह्या द-याखो-यांत आंगरवाडी म्हणून एक वाडी आहे. तेथूनच आंग्रे ह्यांची अर्वाचीन काळची मूळ पिढी उत्पन्न झाली म्हणून सगतात.
६ आंग्रे यांची वंशावळ अशी आहे
ही वंशावळ मजजवळील व इतर पत्रांतील उलेखांवरून रचिली आहे. कान्होजीला पांच मुलगे होते असे डफ म्हणतो (History, P. 231), ते अर्थात चूक आहे. प्रो फॉरेस्ट यांनी Selections from the Bombay Secretariat, Maratha Series, Vol.1 ह्या पुस्तकाच्या ६६० पृष्ठावर आंग्र्यांची वंशावळ येणेप्रमाणे दिली आहेः-
कान्होजी आंग्रे
काव्येतिहाससग्रहातील ११९ व्या लेखांत येसाजी आंग्र्याने मानाजीला व सभाजीला चिरंजीव म्हटलें आहे. ह्यावरून वरील वंशावळ सबंध चुकली आहे हे स्पष्टच होते शिवाय दवलतराव शिंद्यांची आई मैनाबाई हिचा मुलगा सभाजी होय असे वंशावळीत दाखविलें आहे. ते इतकें गचाळ आहे कीं, त्यावर टीका करण्याची जरूर नाहीं. प्रो. फॉरेस्ट यांनीं दिलेल्या दुस-या कित्येक वंशावळीं अशाच अविश्वसनीय आहेत.
प्रो. फॉरेस्ट यांच्या ह्या पुस्तकांतील अस्सल पत्रांखेरीज बाकीचा एकूणएक भाग असाच कमजास्त अप्रमाण आहे. आंग्र्यांचें घराणे शकपाळ कुळांतील असून अस्सल मराठा आहे. कुलाबा गझेटियरांत आंग्र्यांचें मूळ आफ्रिकेतील आहे असा खोडसाळ उलेख केला आहे; परंतु शहाण्णव कुळींत आंग्रे यांचें घराणे प्रसिद्ध असल्यामुळें ह्या उल्लेखाला यत्किंचितही मातबरी देतां येत नाही. शिवाय आंग्रे यांचे शरीरसबंध भोंसले, शितोळे, दाभाडे, गायकवाड, थोरात, शिंदे, तिखोडे, बरगे, अलक, दिनकरराव, मोहिते वगैरे अस्सल मराठ्यांशीं झालेले असल्यामुळे गझेटियरकारांचे हे विधान सर्वस्वी आगंतुक,अप्रमाण व निराधार आहे. शकपाळ हें आडनांव महाराष्ट्रांत फार प्रसिद्ध असून शिवाजीच्या एका पवाड्यांत ह्या नांवाचा उलेख केलेला आढळतो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
३ ब्रह्मेंद्रस्वामींच्या २३६ पत्रांपैकी १० पत्रें कान्होजीची, २५ पत्रें सेखोजीची, २९ पत्रे सभाजीची, १३ पत्रे तुळाजीची, १५ पत्रे मानाजीचीं, व बाकीचीं मथुराबाई, सतूबाई, लक्ष्मीबाई, गिरजाबाई. बाकाजी नाईक महाडीक, रघुनाथ हरी, गणेश बल्लाळ वगैरेचीं आहेत. ह्या खंडातील २४७ व्या लेखांकाची मिति ३१ आक्टोबर १७३० व २५५ व्या लेखांकाची मिति १९ एप्रिल १७३२ अशी हवी आहे लेखांक २३ हें पत्र जयसिंग जाधवाचें नसून जयसिंग आंग्र्याचे आहे व हें १७४० त लिहिले नसून १७३२ त लिहिले आहे ब्रह्मेंद्रस्वामींच्या पत्रांत ब्रह्मेंद्रासबंधी माहिती बरीच असून, शिवाय आंग्र्यासबंधींही माहिती थोडी नाहीं. ह्या माहितीशीं इतरत्र सांपडणा-या माहितीची सांगड घालून आंग्र्यासबंधीं देववेल तेवढी माहिती पुढें देतों.
४ पनवेल, राजमाची, पेण, चेऊल, बारकोट, महाड, अलीबाग, दाभोळ, सुवर्णदुर्ग, सगमेश्वर, वगैरे कोकणांतील शहरांशीं आंग्र्यांचा सबंध इ. स. १६८० पासून १८४० पर्यंत आहे कोंकणांशी भोसल्यांचा सबंध १६४० पासून सुरू होऊन हाकालपर्यंतहि चालला आहे असे म्हटले असता चालेल १६४० पर्यंत ह्या प्रांतांतील निरनिराळ्या प्रदेशांशीं दिल्लीचे पातशहा, विजापूरचे पातशहा, अहमदनगरचे पातशहा, गुजराथचे पातशहा, पोर्तुगीज लोक, जंजि-याचे शिद्दी, जव्हारचे कोळी, ठाणे, कल्याण, चेऊल व देवगड येथील मराठे राजे यांचा सबंध आलेला आहे १३१८ त देवगिरी घेतल्यावर कोकणाशी मुसलमानांचा सबंध सुरू झाला. १५१२ त चेऊल येथें वखार बांधल्यापासून पोर्तुगीज लोकांचा व १६३८ त राजापूर येथें वखार बांधल्यापासून इंग्रजांचा परिचय कोंकणांतील लोकांना करावा लागला. १३१८ च्या पूर्वी यादव, चालुक्य, राष्ट्रकूट वगैरे दक्षिणेतील घाटावरील राजांच्या अमलाखालीं कोंकण होतें असें ताम्रपटावरून दिसते. सारांशा अलीकडील हजार बाराशे वर्षे कोकण साक्षात् देशावरील राजांच्या किंवा त्यांचे अंकित जे मांडलिक त्यांच्या अमलाखाली आहे. ह्या अवधींत कोंकणांत स्वतंत्र राजा असल्याचे आढळत नाहीं. पौराणिक वीरपुरुष परशुराम ह्याच्या वेळीं कोकण स्वतंत्र असल्यास न कळे कान्हेरी, मंडपेश्वर, घारापुरी, कुडें, चिपळूण, दाभोळ वगैरे ठिकाणच्या लेण्यांवरून असे दिसते की कोकणांत काही काल बौद्धांचे ठाणे होतें. येणेंप्रमाणे अलीकडील अडीच हजार वर्षांचा इतिहास जाणण्याची जीं काहीं तुटपुंजी व असमाधानकारक साधने उपलब्ध आहेत, त्यांवरून पाहतां कोंकण बहुतेक सदासर्वदा कोंकणेतर राजांच्याच अंमलाखालीं असल्याचें आढळून येतें. कोंकणांत एखादा स्वतंत्र व बलिष्ठ राजा होऊन त्यानें घाटावरचे प्रांत जिंकल्याचें उदाहरण एकहि नाहीं. कोकणस्थ असा शककर्ता राजा म्हटला म्हणजे एवढा परशुरामच होय. परंतु तो पौराणिक कालांतील असल्यामुळे ऐतिहासिक कालांतील गोष्टींचा विचार करतांना त्याला विशेष महत्त्व देण्याचें प्रबळ कारण दिसत नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
खैल म्हणजे घोडेस्वाराची पलटण, खास म्हणजे स्वतःची, व सेना म्हणजे फौज मिळून राजाच्या स्वतःच्या घोडेस्वारांच्या पलटणाचा मुख्य असा ह्या शब्दाचा खरा अर्थ आहे हा शब्द सस्कृत आहे असे डफ समजतो परंतु हा शब्द मिश्र आहे. गायकवाडांना हीं पदवी मिळण्यापूर्वी ती इतर कित्येकांना मिळाली होती, हें ह्या पत्रावरून स्पष्ट होते १७१३च्या नोव्हेंबरांत परशराम त्रिंबक प्रतिनिधि कोल्हापूरच्या शिवाजीला जाऊन मिळाला होता असे लेखांक २३९ वरून दिसते ह्याच लेखांवरून कोल्हापूरचा शिवाजी १७१२ त वारला नसावा असा सशय येतो लेखांक २३४ व २३८ वरून परशराम त्रिंबक प्रतिनिधि शाहू किंवा शिवाजी ह्या दोघांकडे नसून १७०८ त कैदेंत होता असें ठरते लेखांक २३८ त वर्णिलेला 'कदीम राज्यांत बहुत कष्टमेहनत करणारा सुंदर तुकदेव' कोण होता व त्याने कामगि-या काय केल्या ह्याचा पत्ता अद्याप लागला नाही लेखांक ५६ त राजारामानें आपल्या नांवापुढे छत्रपति हा शब्द लावला आहे. लेखांक ६४ त १७१० पर्यंतचे शाहूचे कांही मुकाम दिले आहेत १७०७ च्या मेंत शाहू घोडनदीजवळ तुळपुरास होता. १७०८ च्या जानेवारीत साता-यास, पुढें पन्हाळ्यास, नंतर पंचगंगेवर, नंतर रांगण्यास, पुढें वर्षभर म्हणजे १७०९ च्या मेपर्यंत कोल्हापूरप्रांतीं छावणींत, १७०९ च्या मेंत पुरंधरास (लेखांक ६२), व पुढे १७१० त वंदनगडास शाहू होता. १७०६ त वाईप्रांत मराठ्यांच्या हातीं आला असें लेखांक १०१ वरून समजतें सय्यदाशीं तह बाळाजी विश्वनाथाने १७१८ च्या आगस्टापूर्वी केला असे लेखांक ९९ व १०० यावरून ठरते लेखांक १०९ तील पोवाडा १७२५/१७२६ तील कर्नाटकातील स्वारीच्या सुखाचे वर्णन करतो. लेखांक १३४ वरून १७०४ त जावलीप्रांत मराठ्याकडे होता. असे नानाप्रकारचे उल्लेख ह्या खंडातील ५५४ लेखांकांत आले आहेत. ते शोधक व जिज्ञासू अशा इतिहासकाराला मराठ्यांच्या इतिहासाच्या रचनेस अत्यंत उपयोगी पडतील त्या सर्वांचा निर्देश येथें करूं गेल्यास फारच विस्तार होईल. सबब प्रस्तुत प्रस्तावनेंत त्यांपैकी कांहींचाच तेवढा परिचय वाचकास करून देऊन, सगतवार अशी जी ब्रह्मेंद्रस्वामींचीं व कायगांवकर दक्षितांचीं पत्रें, त्यापासून इतिहासरचनेस काय उपयोग झाला ते सांगतो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
१ ह्या खंडांत एकंदर ५६८ लेखांक छापिले आहेत पैकीं, लेखांक १३९ चाफळ येथून, लेखांक १६६ पुणे येथील धडफळे यांजकडून, लेखांक १६७ चाकणाहून, लेखांक १७० वाईतील अयाचिताकडून, लेखांक ५५४ पुणे येथील हसबनिसाकडून, लेखांक ८ व ४७ वाईंतील शेखमिन्याकडून, लेखांक (१४४, १४५, १५७) साता-यातील शिरक्यांकडून, लेखांक (१३६, १६७, १६८, १६९) काव्येतिहाससग्रहकारांच्या दप्तरांतून, लेखांक (९९, १००, १०१, १०६, १०७, १०९, १३४) पांडववाडीतील कोल्हटकरांकडून, लेखांक (१८३-२३४) वाईतील कोल्हटकरांकडून, लेखांक (२३७,२३८,२३९,२४०,२४१,४५३) वाळव्याच्या थोरातांकडून, लेखांक (१३७, १३८, १४०, १४१, १४२, १४४, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५) बावधनच्या खेरांकडून, लेखांक (१२१, १२२, १२३, १२४, १२५, १२७, १३३, १३४) वाईंतील शांताश्रमाच्या मठांतून, लेखांक (५६-६४, ६७-७४, ७६, ७७, १७२) ओझर्ड्याच्या पिसाळाकडून, लेखांक (१४६, १४७, १७१) वाईंतील गोविंदराव भानूंकडून, लेखांक (३७०-५५३) कायगांवकर दीक्षितांकडून, व बाकीचे लेखांक ब्रह्मेंद्रस्वामींचे धावडशी व पिंपरी येथील शिष्य जे भागवत त्यांजकडून, मिळाले, लेखांक ७५ लेखांक ७४ चाच अंश आहे व लेखांक १६७ दुबार पडला आहे बाकीचे लेखांक किरकोळ आहेत लेखांक ५६८ काव्येतिहास-संग्रहकारांच्या दप्तरांतील आहे
२ ह्या पत्रात ब्रह्मेंद्रस्वामींची २३६, कायगावकर दीक्षितासबंधी १८४, कोल्हटकरांचीं ५९, च खेरांचीं २३ पत्रे विशेष नावाजण्यासारखी आहेत ब्रह्मेंद्रस्वामींच्या पत्रात आंग्र्यासबंधीं, दीक्षितांच्या पत्रांत बाळाजी बाजीरावासबंधीं, कोल्हटकरांच्या पत्रात नागपूरकर भोसल्यासबंधीं व खेरांच्या पत्रात गोविंदपंत बुदेल्यासबंधी माहिती आहे लेखांक १५७ त थोरले शिवाजी महाराज यांची मुलगी राजकुवरबाई हिचा उल्लेख आहे ह्या मुलीच्या नव-यास दाभोळची देशमुखी शिवाजीनें देऊं केली होती, असे ह्या लेखांत म्हटले आहे लेखांक १४४ त 'चंदीच्या प्रसगें व मसलतेच्या प्रसगें व समजाविशी निमित्ये वतनाचे कागद ज्याने जसे मागितले तसे दिल्हे' म्हणून उल्लेख आढळतो. सकटसमयीं समाजाविशीनिमित्य म्हणजे आगाऊ पगारानिमित्य शिपाई लोकांस राजारामाने वाटतील तीं वतनें करून दिलीं असा ह्या उल्लेखाचा अर्थ होतो लेखांक १६७ त दाभाड्यांच्या व लेखांक ८ त शेखमि-यांच्या पूर्वस्थितीचें वर्णन आहे. लेखांक ६४ त 'एका जातीच्या दोन जाती पाहिल्या' असे शब्द बाटलेल्या सूर्याजी पिसाळाने काढिले आहेत. लेखांक १०७ त मोरो जिवाजी सेनाखासकील याचें नांव आलें आहे ग्रांट डफने आपल्या इतिहासाच्या १४ व्या भागाच्या एका टिपेत सेनाखासखेल ह्या शब्दाचा Leader of the Sovereign tribe असा अर्थ केला आहे.