Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
२४. बाजीराव व फत्तेसिंग ह्यांच्या मनांत एकमेकांविषयी यद्यपि विकल्प आलेला होता, तत्रापि त्यांनीं एकमेकांविरुद्ध झुंझण्याचा उद्योग आरंभिला नाहीं. बाजीरावाच्या इतर प्रतिस्पर्ध्यांची गोष्ट याहून निराळी होती. कोंकणांतील आंग्र्यांनीं, गुजराथेंतील दाभाड्यांनीं, व-हाडांतील भोंसल्यांनीं व कोल्हापूरच्या राजांनीं शाहूच्या व बाजीरावाच्या विरुद्ध युद्धप्रसंग केलेले इतिहासांत विदितच आहेंत. ह्या युद्धप्रसंगांची मूळ कारणें, व जवळचे व दूरवरचे परिणाम, ग्रांटडफनें आपल्या इतिहासांत दिलें नाहींत. कारणें व परिणाम ह्यांचे खुलासे सुज्ञ वाचकांनीं आपले आपणच करून घ्यावे अशी डफची प्रतिज्ञाच आहे ( Duffs History, preface ). डफची दुसरी प्रतिज्ञा अशी आहे कीं, इतिहासांतील प्रसंगांचे खरेखुरे, तपशील देण्याला मात्र आपल्याकडून कसूर होणार नाहीं. पैकीं ह्या दुस-या प्रतिज्ञेंत कितपत अर्थ आहे ह्याचा खुलासा मी वारंवार करीत आलों आहें. ग्रांट डफचा तपशील अनेक ठिकाणीं विश्वसनीय व प्रमाणबद्ध नसतो ह्या विधानाची सत्यता सिद्ध होऊन चुकली आहे. कारणें व कार्ये ह्यांची जी ही ग्रांटडफनें ताडतोड केली, तीच त्याच्या विपत्तीच्या मूळांशी आहे. कारण व कार्य ह्यांचा घटस्फोट करून इतिहास लिहूं पहाणें अशास्त्र आहे इतकेंच नव्हे, तर तें अशक्य आहे. अनेक कार्ये पुढें आलीं व त्यांतून आधीचीं कोणतीं, मागूनचीं कोणतीं व समकालीन कोणतीं ह्याचा उलगडा करण्याचा प्रसंग आला, म्हणजे मग कारणांचे महत्त्व कळूं लागतें अशा प्रसंगी कारणांकडे पाहिलेंच नाहीं, म्हणजे डफच्या इतिहासासारखा इतिहास तयार होतो. कारणाशिवाय कार्याचे वर्णन देईन हें म्हणणेंच मुळीं असंबद्ध आहे. आश्चर्य हेंच कीं, तें जगापुढें मांडण्यास हा लेखक तयार झाला.
२५. कार्यकारणांची ताडतोड केल्यामुळें ग्रांट डफला मराठ्यांच्या इतिहासाचें रहस्य बिलकुल कळलें नाहीं व कालाचा निर्णय बराबर न केल्यामुळें सामान्य अशी गोष्ट जी कालाचें पौर्वापर्य तेंहि समजलें नाही, ह्या प्रकरणाचा विचार येथपर्यंत केला. आतां ह्यापुढें १७४० पासून १७६१ पर्यंतच्या मित्यांसंबंधानें माझें म्हणणें काय आहे तें सांगतों. १७५० पासून १७६१ पर्यंतचे तक्ते पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेंत मीं दिले आहेत. तिस-या खंडांतील पत्रांचा विचार करतांना १७४० पासून १७५० पर्यंतच्या अवधींतील प्रसंगांचा ऊहापोह करावयाचा आहे, त्यावेळीं ह्या अवधींतील मित्यांचाही छडा लावतां येईल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
परंतु फत्तेसिंगाच्या कामांत पडावयाचें नाहीं हा बाजीरावाचा कृतसंकल्प होता. १७४० पुढें कर्नाटकची व्यवस्था शाहूनें रघोजी भोंसल्याकडे सांगितली. रघोजीचें व बाळाजी बाजीरावाचें फारसें नीट नव्हतें. १७४४ त रघोजीची बाळाजीनें व्यवस्था लाविली. नंतर इतरत्र स्थिरस्थावर झाल्यावर बाळाजी बाजीरावानें आपल्या प्रख्यात अशा कर्नाटकच्या स्वा-या सुरू केल्या. सदाशिव चिमणाजीने बहादूरभेंड्यावर स्वारी १७४६ च्या हिवाळ्यांत केली. तीच कर्नाटकांवरील १७६० पर्यंतच्या स्वा-यांचा श्रीगणेशाय नम: होय. बाजीरावाच्या कारकीर्दीत कर्नाटकावर एकापेक्षां जास्त स्वा-या कां झाल्या नाहींत, व बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत कर्नाटकावर एकसारख्या स्वा-यावर स्वा-या कां झाल्या, ह्याची कारणपरंपरा ही अशी आहे. मराठ्यांच्या मोहिमांना कारणांची बिलकुल जरूर लागत नसे, प्रांतांची लुटालूट करणें हें एकच कारण त्यांच्या प्रयत्नांना बस्स असे, अशी जेथें भावना , तेथें ऐतिहासिक कार्यकारणांची मूळपीठिका शोधीत बसण्याची उठाठेव करण्याचें प्रयोजनच रहात नाहीं; परंतु ही उठाठेव केल्याशिवाय मराठ्यांच्या इतिहासाची फोड यथास्थित होणें अशक्य आहे. १७२६ च्या श्रीरंगपट्टणच्या स्वारीनंतर बाजीरावानें किंवा चिमाजीअप्पानें कर्नाटकांत स्वा-या केल्या असत्या तर, (१) निजामुन्मुलुखाची सत्ता त्या प्रांतांत स्थिर झाली नसती, (२) निजामुन्मुलुखाचे हस्तक, जे अर्काटचे नवाब ते पार नाहीसे झाले असते, (३) तंजावरच्या मराठ्यांना जोर आला असतां, (४) मद्रासेंतील इंग्रजांना व पांडिचेरींतील फ्रेंचांना अर्काटच्या नवाबांच्या द्वारा कर्नाटकांत ढवळाढवळ बहुश: करतां आली नसती, व (५) श्रीरंगपट्टणचें राज्य नष्ट होऊन हैदरासारखा नवीन शत्रु उद्भवला नसता. अकिलिसाच्या रागानें ग्रीस देशावर जशी संकटपरंपरा ओढवली, त्याप्रमाणें बाजीरावाच्या फत्तेसिंगावरील व प्रतिनिधीवरील रागानें कर्नाटकांत ही नवीन कार्यपरंपरा उद्भवून महाराष्ट्रावर पुढें संकटपरंपरा कोसळली. बाजीरावाच्या व फत्तेसिंगाच्या दुहीचा हा असा परिणाम झाला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
त्रिचनापल्लीस मुरारराव घोरपडे व तंजावरास तुळजाजी राजे असल्यामुळें त्यांना मदत करणें जरूर होते. १७२४ त निजामाशीं बाजीरावाचें किंचित् सख्य होणार तों १७२५ त त्याशीं मराठ्यांचें पुन: वांकडे आलें व चोहोंकडून युद्धाला सुरुवात झाली. कान्होजी भोंसले उत्तरेकडून, कंठाजी कदम बांडे व गायकवाड पश्चिमेकडून, चिमाजीअप्पा भागानगराकडून असा चोहोंबाजूंनीं निजामावर मराठ्यांनीं अगदीं दंगा. उसळून दिला. निजामाच्या सुभेदारींत कर्नाटकाचाहि प्रांत अवरंगझेबाच्या स्वारीपासून होताच. तेव्हां त्या प्रांतांत जाऊन निजामाला शह देण्याचा मराठ्यांनी बेत केला व त्या बेताचा परिणाम ही स्वारी झाली. शिवाय सोंधें, बिदनूर, सुरापूर, गदग, लखमेश्वर, श्रीरंगपट्टण वगैरे संस्थानिकांकडून मराठ्यांच्या खंडण्या आज कित्येक वर्षेपर्यंत राहिल्या होत्या, त्या उगविण्याचाहि ह्या मोहिमेंतील एक हेतु होता. फत्तेसिंगाला १७१३ त जहागीर दिली त्यावेळी कर्नाटकाचा अधिकारहि त्याला सोंपिला होता. ह्या कारणाकरितां मोहिमेचें आधिपत्य वरकरणी तरी त्याच्याकडे आलें होतें. नाहींतर तें नि: संशय बाजीरावाकडे आलें असतें ह्या स्वारीची कांहीं हकीकत शकावलीच्या ५३ व्या पृष्ठावर दिली आहे. त्यावरून बाकीच्या दोषांचें निरसन करण्याचें थोडेंबहुत साधन मिळण्यासारखें आहे. ह्या स्वारीचा परिणाम काय झाला, स्वारीच्या शेवटीं संस्थानिकांशीं तह काय काय झाले, वगैरे हकीकत डफनें न दिल्यामुळें, १७२६ पासून १७४० पर्यंत पुढें कर्नाकटाकडे मराठ्यांनीं ढुंकूनसुद्धां कां पाहिलें नाहीं तें समजेनासें होतें. १७२६ पासून १७४० पर्यंत मराठ्यांनीं कर्नाटकाकडे ढुंकूनसुद्धां कां पाहिलें नाहीं त्याचें खरें कारण येणेंप्रमाणें आहे. फत्तेसिंग भोसले, श्रीनिवासराव प्रतिनिधि, बाबूजी नाईक बारामतीकर व रघोजी भोंसले ही सर्व मंडळी बाजीरावाच्या विरुद्ध होती. १७२५ च्या सुमाराला हा विरोध इतका कांही विकोपाला गेला की, शाहूमहाराजांना मध्यें पडून प्रतिनिधीचें व पेशव्याचें एकसूत्र जुळवून देणें भाग पडलें. पुढें १७२५ च्या आगोठीनंतर श्रीरंगपट्टणावर जेव्हां मोहिम करावयाचें ठरलें, तेव्हां केवळ महाराजांच्या आग्रहास्तव बाजीरावाला फत्तेसिंगाच्या आधिपत्याखालीं ह्या मोहिमेस जावें लागलें, मोहिमेचें कार्य जसें निवटावें तसेंच बहुतेक निवटलें; परंतु मराठ्यांच्या सैन्याचे ह्या स्वारींत अतोनात हाल झाले. त्याचें सर्व अपेश, अर्थात्, फत्तेसिंग भोंसले, श्रीनिवासराव प्रतिनिधि व रघोजी भोंसले ह्यांच्या माथ्यावर फुटलें. शाहूला ह्या लोकांच्या कर्तृत्वाचा व ऐपतीचा अंदाज कळला, व बाजीरावावर त्याचा विश्वास व लोभ जास्तच बसला. यद्यपि असा प्रकार झाला, तत्रापि शाहूनें ह्या अपेशी लोकांना अजिबात सोडून दिलें असा प्रकार झाला नाहीं. फत्तेसिंग तर शाहूचा मानीव पुत्र होता व त्याच्यावर त्याचा अत्यंत लोभ असे. प्रतिनिधि व रघोजी भोसले फत्तेसिंगाच्या विश्वासांतले पडले, त्यामुळें त्यांचीहि बाजू बरीच सांवरली गेली. ह्या सर्व गोष्टी बाजीराव पूर्णपणें जाणून होता. फत्तेसिंगाला दुखवावयाचे नाहीं व त्यांच्या कामांत पडावयाचें नाही असा बाजीरावानें पुढें बेत केला. बाजीरावानें १७२६ च्या नंतर कर्नाटकाचें नांव काढलें नाहीं त्याचें कारण हें असें आहे. कर्नाटकाच्या स्वारीचीं सुखें फत्तेसिंगाला पक्की कळून चुकलीं होतीं. म्हणून तोहि तिकडील स्वारीच्या छंदांत पुन: १७४० पर्यंत पडला नाहीं. ह्या दोन कारणांनीं १७२६ च्या पुढें कर्नाटकावर मराठ्यांची स्वारी झाली नाहीं. स्वारी न होण्याचें तिसरेंहि एक कारण आहे. कर्नाटकची मुख्य किल्ली निजामाच्या हातांत होतीं. त्यालाच वठणीस आणिलें म्हणजे कर्नाटक जिंकल्यासारखेंच झालें, ह्या समजुतीवर भिस्त ठेवून बाजीरावानें १७२६ च्या पुढें निजामावर ज्या स्वा-या केल्या त्या सर्व खानदेशांत व माळव्यांत केल्या. बाजीरावाची ही क्लूप्ति कांही वावगी नव्हती; परंतु तिच्यापासून एक तोटा झाला. एकसारखें चवदा वर्षेपर्यंत कर्नाटकाकडे कोणी ढुंकूनहि न पाहिल्यामुळें, निजामुन्मुलुखाला त्या प्रांतांत आपली सत्ता जास्त स्थिर करतां आली, व मराठ्यांना त्या प्रांतांत कोणी ओळखीनासें झालें. १७३९ त मराठ्यांच्या नर्मदेपलीकडील उपद्व्यापाला कंटाळून, निजामुन्मुलुखानें त्यांची खोड मोडण्याकरितां जेव्हां नादिरशहाला दिलीस आणिलें, तेव्हां बाजीरावानें निजामावर एकंदर तीन स्वा-या काढिल्या. एक स्वारी निजामाच्या प्रांतांवर खानदेशांतून चिमाजीअप्पाच्या हातून करविली. दुसरी स्वत: हिंदुस्थानांत करण्याचा बेत केला, व तिसरी फत्तेसिंग व रघोजी भोसले यांच्याकडून निजामाच्या कर्नाटक प्रांतांत करविली. १७४० तील कर्नाटकांतील स्वारीचें हें मुख्य कारण आहे. ही स्वारी चिमाजीअप्पाच्या हातूनहि झाली असती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
२२. बाजीराव, चिमाजीअप्पा व फतेसिंग भोसले यांच्या स्वा-या व त्यांच्यासंबंधानें ग्रांटडफनें केलेल्या चुका ह्यांचे स्पष्टीकरण येथपर्यंत झालें. आतां हे तीन पुरुष १७२० पासून १७४० पर्यंत कोठकोठें होते ह्याचे तक्ते पुढें देतों, म्हणजे हें स्पष्टीकरण जास्त पूर्ण होईल.
तत्क्ता पहिला : बाजीराव बल्लाळाच्या हालचालींचा तक्ता.
तक्ता दुसरा : चिमणाजी बल्लाळाच्या हालचालींचा तक्ता.
तक्ता तिसरा : फत्तेसिंग भोसल्याच्या हालचालींचा तक्ता.
२३. ह्या तीन तक्त्यांपैकीं बाजीराव बलाळाच्या हालचालींचा तत्क्ता १७२० पासून १७४० पर्यंत सबंध भरला आहें कोणत्याहि वर्षाच्या सप्टंबरापासून जुलईपर्यंत बाजीराव कोठें होता हें ह्या तक्त्यावरून स्पष्ट कळून येतें. चिमाजीअप्पाची १७२३ पासूनची हालचाल दुस-या तक्त्यांत दिली आहे, व तिस-या तक्त्यांत पत्तेसिंगाच्या हालचालींचा नुसता सालवारीनें निर्देश केला आहे. बाकी राहिलेल्या सरदारांच्या हालचालींचा पता अद्याप संगतवार तर लागला नाहींच; परंतु कांहीं अपवाद खेरीजकरून अमुक सरदार अमक्या स्थळीं अमुक वर्षी होता असें निश्चयानें म्हणण्यापुरतीहि माहिती मिळालेली नाहीं. ह्या शकावलीपासून फायदा एवढाच झाला आहे कीं, १७२० पासून १७४० पर्यंतच्या पेशव्यांच्या हालचालींच्या मित्या तेवढ्या बिनचुक मिळाल्या आहेत. अमुक मोहिम अमुक महिन्यांत सुरू झाली एवढें ह्या मित्यांपासून समजतें. ह्यापेक्षां जास्त माहिती ह्या शकावलीपासून मिळणार नाहीं. मोहिमांचीं विशिष्ट कारणें, मोहिमांवर गेलेल्या सैन्याची संख्या, मोहिमांचे टप्पे, मोहिमांत झालेल्या युद्धांच्या स्थलांचीं नावें, युद्धांची तपशीलवार हकीकत, मोहिमा संपल्यावर झालेल्या तहनाम्यांच्या नकला वगैरे बाबींची उपलब्धि अद्यापि व्हावयाचीच आहे. ग्रांटडफच्या ग्रंथांतहि ही माहिती बहुतेक बिलकुल नाहीं. हें शेवटलें विधान किंचित् जास्त खुलें करून दाखवितों. १७२६ तील श्रीरंगपट्टणच्या स्वारीच्या माहितीचा आदि, मध्य व अंत्य डफनें येणेंप्रमाणें केला आहे:--- In 1726 the पेशवा was with a very large army under फत्तेसिंग भोसले, which proceeded into the Carnatic, plundered the Districts, and levied a contribution from श्रीरंगपट्टण. ह्या वर्णनांत खालील दोष आहेत. (१) ह्या स्वारीला कारण काय झाले तें दिलें नाहीं (२) ह्या स्वारीला मुळीं कारणच कांहीं नसावें असा एकंदर वाक्याचा बोध होतो. (३) मोठें सैन्य म्हणजे किती मोठें ह्याचा कांहीं एक अंदाज होत नाहीं. (४) कर्नाटकांत पूर्वेस कीं पश्चिमेस सैन्य गेलें ह्याचा पत्ता नाहीं. (५) लुटणें हा शब्द वापरून मराठ्यांच्या संबंधीं तिरस्कार व्यक्त केला आहे. (६) Districts म्हणजे प्रांत कीं संस्थाने ह्याचा निर्णय केला नाहीं. (७) Levy शब्द घालून मराठ्यांचा जुलूम व्यक्त केला आहे. (८) १७२६ हा आंकडा घालून स्वारीची खरी मिति चुकविली आहे. आतां ह्या स्वारीचें खरें कारण असें आहे. १७२० पासून निजामावर मराठ्यांच्या स्वा-या एकसारख्या चालल्याच होत्या. त्यात १७२२ त व १७२३ त निजामुन्मुलुख किंवा त्याचे सरदार कर्नाटकांत अर्काट, त्रिचनापल्लीवर जाणार अशी बातमी आली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
२१. १७२० पासून १७४० पर्यंत ग्रांटडफनें काय काय ढोबळ चुका करून ठेविल्या आहेत व कोणकोणत्या प्रसंगाचा वृत्तांत अजीबात गाळला आहे त्याचा तपशील हा असा आहे. धावडशीकर स्वामींचीं पत्रें, पेशव्यांच्या रोजनिशा, पेशव्यांचीं चिटणिशी पत्रें, सुमारें २५ बखरी व कित्येक तवारिखा इतकी सामुग्री जवळ असून डफनें ह्या अशा चुका कशा केल्या ह्याचें आश्चर्य वाटतें. मिळालेल्या पत्रांच्या मित्यांकडे नीट व बारीक लक्ष न दिल्यामुळें, रोजनिशांचा जितका चोख अभ्यास करावा तितका न केल्यामुळें व बखरी व तवारिखा ह्यांवर फाजील विश्वास ठेविल्यामुळें, डफच्या हातून हा गोंधळ झाला आहे. मराठ्यांच्या इतिहासांत शिवाजीच्या पराक्रमाच्या खालोखाल, कदाचित् कित्येक बाबतींत शिवाजीच्या पराक्रमाच्या तोडीचीं,अद्भुत कृत्यें बाजीराव बल्लाळाच्या हातून घडलेलीं आहेत. ह्या महापुरुषाच्या अचाट व अद्भुत कृत्यांचे रसभरित वर्णन देण्यास प्रासादिकच इतिहासकार पाहिजे, व साद्यंत वर्णन देतां येण्यास मुबलक जागा पाहिजे; परंतु बिनचुक वर्णन देण्यास ह्या दोन्ही गोष्टींची अपेक्षा नाहीं. पहिले दोन गुण तर डफच्या ग्रंथांत नाहींत ही सर्वमान्य गोष्ट आहे; परंतु तिसराहि गुण ह्या ग्रंथांत नाहीं हें वर दाखविलेल्या चुकांवरून निश्चयानें म्हणण्यास बिलकुल शंका वाटत नाहीं. १७५० पासून १७६१ पर्यंतच्या इतिहासासंबंधानें ग्रांटडफ विशेष विश्वास ठेवण्यालायक लेखक नाहीं हे मीं पहिल्या खंडांत सिद्ध करून दाखविलें आहे. १७२० पासून १७४० पर्यंतच्या इतिहासासंबंधानें तर डफवर फारच थोडा विश्वास ठेविला पाहिजे असें आतां ह्या खंडांत म्हणण्याची पाळी आली आहे. १७०७ पासून १७२० पर्यंतच्या महाराष्ट्रांतील यादवीचाही डफला यथातथ्य अंदाज झाला नाहीं. शाहूचे व ताराबाईचे डावपेंच, निरनिराळ्या सरदारांचे लपंडाव, कित्येकांचा अप्पलपोटेपणा, कित्येकांची एकनिष्ठा, मोंगलांचे दुटप्पी बेत, त्यांवर बाळाजी विश्वनाथाचे व धनाजी जाधवाचे शहप्रतिशह ह्या सर्वांचें वर्णन देतांना अलंकारद्वेष्ट्या अशा एखाद्या साध्या लेखकांचाहि लेख प्रसंगानें चमत्कृतिजनक व्हावा; परंतु अंगीकृत विषयाचें रहस्य यथास्थित न कळल्यामुळें, डफचें लिहिणें येथून तेथून सारखेंच नीरस असें वठलें आहे. कालाचा चोख निर्णय न केल्यामुळें, कार्यकारणसंबंध व प्रसंगाचें पौर्वापर्य ह्मा लेखकाच्या जसें ध्यानांत यावें तसें आलें नाहीं. त्याचें सर्व लिहिणें तुटक, व हीनसत्च असें भासूं लागलें आहे. जोंपर्यंत मूळ अस्सल लेखांचा अभ्यास आपल्या इकडे सुरू झाला नव्हता, तोंपर्यंत ग्रांटडफची खरी किंमत करतां येणें शक्यच नव्हतें. परंतु नीळकंठराव कीर्तन्यांच्या टीकेपासून व काव्येतिहास संग्रहकारांच्या यत्नापासून त्या ग्रंथाची खरी किंमत व खरी परीक्षा हळू हळू होत चालली आहे. मराठ्यांच्या इतिहासाची रचना नवीन पद्धतीनें करणे जरूर आहे असा परिणाम ह्या परीक्षेपासून झाला आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
२०. (१) दिलीहून आल्यानंतर बाळाजी विश्वनाथ सासवडास कांही महिने स्वस्थ बसला व नंतर वारला असें ग्रांटडफ म्हणतो. ( Duff, Chap. 13, P.209 ). परंतु तिस-या खंडांतील लेखांक ४५३ वरून व ह्या शकावलीच्या ३८ व्या पृष्ठावरून बेहे येथें स्वारी करून आल्यावर तो वारला हें स्पष्ट आहे. (२) खंडेराव दाभाडे १७२१ च्या सुमारास वारला म्हणून डफ म्हणतो ( Duff, chap, 13, P. 209 ) परंतु ह्या शकावलीच्या ६० व्या पृष्ठावर त्र्यंबकराव दाभाडे यास सेनापतिपदाचीं वस्त्रें १७३० च्या जानेवारीस झाली असें लिहिलें आहे. १७२१ च्या सुमारास खंडेराव दाभाडे वारला असता तर त्याच सुमारास त्र्यंबकराव दाभाड्यास वस्त्रें मिळालीं पाहिजे होतीं. शिवाय १७३० पर्यंतच्या स्वा-यांत खंडेराव दाभाड्याचें नांव वारंवार येतें. ग्रांटडफनें खंडेरावाची समाप्ति १७२१ त केल्यामुळें, १७३० पर्यंतच्या त्याच्या सर्व हालचाली त्यास गाळाव्या लागल्या. १७२६ तील श्रीरंगपट्टणावरील स्वारींत व १७२७ तील निजामावरील स्वारींत खंडेराव होता. (३) १७२० च्या एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंत बाजीराव कोठें होता ह्याचा पत्ता ग्रांटडफला नव्हता (Duff, chap. 13, P. 209 ); त्याचा उलगडा प्रस्तुत प्रस्तावनेंत मीं केला आहे. (४) १७२० तील बारामतीवरील लढाई व १७२१ तील पुरंदर व जुन्नर येथील लढाया, डफला माहीत नव्हत्या. (५) १७२१ तील बाजीरावाची विजापुकडील स्वारी डफच्या पुस्तकांत नाहीं. विजापुराकडे दंगा झाला होता म्हणून तो लिहितो (Duff, 210 ). परंतु बाजीरावाच्या स्वारीमुळें ही गडबड झाली होती हें त्यास माहीत नव्हतें. (६) निजामाच्या सरदारांची १७२२ तील अर्कांटावरील स्वारी डफच्या पुस्तकांत नाही. (७) १७२२ तील ऐवजखानचा पराभव, १३२३ तील अनुपशिंगाची भेट व बाधेलखंडांतील बाजीरावाची स्वारी डफला माहीत नव्हती. (८) १७२३ तील मल्हारराव होळकराच्या बुंदेलखंडांतील स्वारीचा पत्ता डफला नव्हता. (९) हैदराबादेंतील कंबरजखानावरील फतेशिंग भोसल्याच्या स्वारीचा वृत्तांत डफच्या ग्रंथांत नाहीं. (१०) १७२६ च्या श्रीरंगपट्टणच्या स्वारीचा वृत्तांत डफ बहुतेक मुळींच देत नाहीं, तो ह्या शकावलींत बराच दिला आहे. (११) १७२६ च्या नोव्हेंबरच्या, १७२८ तील पालखेडच्या लढाईपर्यंतच्या उलाढालीची हकीकत डफ देत नाहीं, तिचा ह्या प्रस्तावनेंत निर्देश केला आहे. (१२) चिमाजीअप्पा १७२८ च्या नोव्हेंबरांत गुजराथेंत गेला म्हणून डफ म्हणतो. परंतु तसा प्रकार नसून त्यावेळीं चिमाजी दयाबहादरावर माळव्यांत गेला होता. (१३) अहमदखान बंगष व कायमखा बंगष यांचा पराभव बाजीरावानें १७२९ मेंत केला. ग्रांट डफनें बंगषांचा पराभव १७३३ त करविला आहे (Duff, 227 ). १७२८ पासून १७३४ पर्यंतचा डफचा सर्व वृत्तांत येथूनतेथून चुकला आहे. (१४) छत्रसालाची पहिली भेट १७२९ त झाली असून ती ग्रांट डफनें १७३३ त घातली आहे. (१५) १७३० तील चिमाजी अप्पाच्या पायागडच्या स्वारीचा पत्ता डफला बिलकुल नव्हता. (१६) १७३१तील मांडोगडची चिमाजीची स्वारी डफला माहीत नव्हती. (१७) १७३२ त बाजीराव कोंकणांत गेला होता ह्या गोष्टीचा उल्लेख डफ करीत नाहीं. (१८) १७३३ च्या एप्रिलांत बाजीरावानें छत्रसालाची दुस-यांदा भेट घेतली. हीच पहिली भेट असें ग्रांट डफ समजतो. ह्याच भेटींत छत्रसालानें बाजीरावाला तृतीयांश राज्य व मस्तानी दिली असावी. मस्तानीला पहिला पुत्र केव्हां झाला ह्याची मिति कळली असतां, छत्रसालानेंच मस्तानीला बाजीरावाला दिली ह्याचा निश्चय होईल. (१९) कान्होजी आंग्रे १७२८ च्या सुमारास वारला म्हणून डफ म्हणतो (Duff, 230 ) परंतु कान्होजी १७२९ च्या जुलैंत वारला हें निश्चित आहे (खंड ३, लेखांक ३२७ व ३२८) (२०) शेखोजी आंग्राला ग्रांट डफ सखाजी म्हणतो व तो कान्होजीनंतर लवकरच वारला म्हणून लिहितो. परंतु शेखोजी १७३३ च्या सप्टंबरांत वारला (शकावली पृ. ६९). (२१) १७३४ जानेवारीपासून जुलैपर्यंत बाजीरावाने खानडौरावर हिंदुस्थानांत स्वारी केली. ही स्वारी ग्रांटडफनें १७३६ सालांत घातली आहे. (२२) १७३४ च्या नोव्हेंबरापासून १७३५ च्या जुलैपर्यंत पिलाजी जाधवानें कमरुद्दीन वजिरावर स्वारी केली. ह्या स्वारीचा पत्ताच ग्रांटडफला नव्हता. (२३) १७३५ च्या फेब्रूवारीत बाजीराव कोंकणांत गोवळकोटच्या स्वारीस गेला होता. १७३२ पासून १७३५ पर्यंत तीन वर्षे जंजि-यावर मोहीम चालली होती. तींत बाजीराव दोनदां गेला व तींतून परत आला. ह्याचा नीट उलगडा डफला करतां आला नाहीं. हा उलगडा नीट न करता आल्यामुळें १७३४ तील खानडौरावरील स्वारी १७३६ त न्यावी लागली व १७३६ तील स्वारी अजीबात गाळावी लागली. (२४) १७३५ नोव्हेंबरापासून १७३६ जुलैपर्यंत बाजीरावानें अजमीर-पुष्करावर स्वारी केली. ही स्वारी डफनें गाळली आहे. (२५) १७३६ च्या नोव्हेंबरापासून १७३८ जुलैपर्यंत बाजीरावानें भेलशावर स्वारी केली. हिचा वृत्तांत डफनें दिला नाहीं. (२६) फत्तेसिंग भोसल्यानेंहि १७१७ पासून १७४२ पर्यंत निजामावर, चंद्रसेन जाधवावर, कोल्हापूरकरांवर, कर्नाटकांत व कोकणांत एकसारख्या २५ वर्षे स्वा-या केलेल्या आहेत. त्यांचाहि निर्देश, डफने फारसा व सालवार कोठें केला नाहीं. (२७) दमाजी व पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम बांडे, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, कान्होजी भोसले व रघोजी भोसले यांच्याहि १७४० पर्यंतच्या स्वा-यांचा सालवार निर्देश डफनें केला नाहीं. (२८) कान्होजी आंग्रयाच्या समुद्रावरील युध्दांचाही १७०७ पासून १७२९पर्यंतचा ईतिहास डफनें बहुतेक बिलकुल दिला नाहिं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
१९. बाजीरावाच्या स्वा-यांचा वीस वर्षांचा नामनिर्देश वरील पारिग्राफांत केला आहे. ह्या स्वा-या १ निजामुन्मुलुखानें बळकाविलेला प्रांत, २ नर्मदेच्या पलीकडील प्रांत, ३ गुजराथ, ४ साष्टी, ५ जंजिरा, ६ कोल्हापूरकरांचा प्रांत व ७ कर्नाटक इतक्या प्रदेशांवर केलेल्या आहेत. ह्यात १ शाहू, २ फत्तेसिंग, ३ बाजीराव, ४ चिमाजीअप्पा, ५ खंडेराव दाभाडे, ६ त्रिंबकराव दाभाडे, ७ पिलाजी गायकवाड, ८ दमाजी गायकवाड, ९ कंठाजी कदम बांडे, १० मल्हारराव होळकर, ११ राणोजी शिंदे, १२ उदाजी पवार, १३ कान्होजी भोसले, १४ रघूजी भोसले, १५ दावळजी सोमवंशी, १६ अंबाजी त्रिंबक पुरंधरे, १७ बाजी भिमराव रेटरेकर, १८ पिलाजी जाधवराव, १९ आनंदराव सोमवंशी, २० श्रीनिवासराव प्रतिनिधि, २१ कान्होजी आंग्रे, २२ मानाजी आंग्रे, २३ संभाजी आंग्रे, २४ तुळाजी आंग्रे, २५ यशवंतराव दाभाडे, २६ मुरारराव घोरपडे, २७ उदाजी चव्हाण, २८ राणोजी भोसले, २९ फोंड सावंत भोसले, ३० सवाई कटसिंग, ३१ कृष्णाजी पवार, ३२ खंडोजी माणकर, ३३ रामचंन्द्र हरि पटवर्धन, ३४ गोविंद हरि पटवर्धन, ३५ आवजी कवडे, ३६ शंभूसिग जाधवराव, ३७ सयाजी गुजर, ३८ यशवंतराव पवार, व ३९ व्यंकटराव घोरपडे. ह्या इतक्या सरदारांनी १७२० पासून १७४० पर्यंत स्वतंत्र अशा स्वा-या केलेल्या आहेत. त्या प्रत्येकाच्या ह्या वीस वर्षातील हालचालींचा सलवारीनें निर्देश करतां येण्यास जितकी माहिती पाहिजे तितकी अद्याप मिळाली नाहीं. बाजीराव, चिमाजीअप्पा, फत्तेसिंग, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, खंडेराव दाभाडे, कान्होंजी आंग्रे, पिलाजी जाधवराव, वगैरे अत्यंत प्रमुख अशा सरदारांच्या देखील हालचालींचा नकाशा सालवारीनें देतां येणें शक्य नाही. त्यांतल्यात्यांत बाजीराव, चिमाजीअप्पा, फत्तेसिंग भोसले, त्यांच्यासंबंधीं ह्या शकावलींत व इतरत्र इतरापेक्षां बरीच माहिती सांपडते. त्यावरून वरील पारिग्राफांत ह्या तीन सरदारांच्या मोहिमांचा निर्देश केला आहे. निर्देशावरून ग्रांटडफ कोठें कोठें चुकला आहे तें कळून येईल. विशेष ठोकळ अशा चुका १७२० पासून १७४० पर्यंतचा इतिहास लिहितांना डफनें कोठें कोठें केल्या आहेत तें पुढे सांगतो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
चिमाजीअप्पा ग्वालेरीपर्यंत हिंदुस्थानांत जाऊन मांडोगडची स्वारी करून जूनांत देशीं परत आले. १७३१ च्या एप्रिलांत संभांजीशीं तह झाला. १७३१ च्या डिसेंबरपर्यंत दोघे बंधू पुणें व सातारा येथें देशींच होते. १७३२ च्या जानेवारी-फेब्रुवारींत बाजीराव कुलाब्यास गेला होता. तेथून माळव्यांत जाऊन स्वारी आगोठीस देशीं आली. १७३२ च्या जानेवारीपासून जुलैपर्यंत फत्तेसिंग भोसले निजामावर गेले होते. १७३२ च्या डिसेंबरांत बाजीराव निजामाच्या भेटीस गेला, ती १७३३ च्या मार्चात परत आला. १७३२ च्या आक्टोबरांत चिमाजीअप्पा बुंदेलखंडांत जाऊन चापानेर सर करून, १७३३ च्या जुलैंत परत आला. १७३३ च्या मार्चात बाजीराव व फत्तेसिंग भोसले कोंकणांत जजि-यावर गेले ते डिसेबरांत परत आले. चिमाजीअप्पा १७३४ च्या मार्चात कोकणांतून परत आला. १७३४ च्या जानेवारींत बाजीराव खानडौरावर दिलीपर्यंत चालून जाऊन जुलैंत परत आला. चिमाजी १७३४ च्या मार्चापासून जुलैपर्यंत व-हाड खानदेशांत होता. १७३४ च्या नोव्हेंबरापासून १७३५ च्या जुलैपर्यंत पिलाजी जाधवाची स्वारी हिंदुस्थानांत कमरुद्दीन वजिरावर झाली. १७३४ च्या जुलैपासून १७३५ फेब्रुवारीपर्यंत पुणें, सातारा वगैरे स्थलीं राहून बाजीरावाची स्वारी १७३५ च्या फेब्रुवारींत कुलाव्यास गेली. ह्याच स्वारीस गोवळकोटची स्वारी असें म्हणतात. ह्या स्वारीहून पेशवे आगोठीस परत आले. १७३४ च्या जुलैपासून १७३६ च्या मार्चापर्यंत चिमाजी देशींच होता. १७३५ च्या नोव्हेंबरांत बाजीराव हिंदुस्थानांत अजमीरपर्यंत जाऊन १७३६ च्या जुलैंत परत आला. १७३६ च्या मार्चांत चिमाजी कोंकणांत जाऊन १७३६ च्या जूनांत परत आला. १७३६ च्या नोव्हेंबरांत बाजीराव पुन: हिंदुस्थानच्या स्वारीस निघाला तो १७३७ च्या जुलैंत परत आला. हीस भेळशाची स्वारी म्हणतात. चिमाजीअप्पा १७३६ च्या मार्चापासून जुलैपर्यंत कोंकणांत होते. बरोबर मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे व पवार होते. १७३७ च्या आक्टोबरापासून १७३८ च्या जुलैपर्यंत बाजीरावानें भोपाळची स्वारी केली. १७३७ च्या नोव्हेंबरापासून १७३८ च्या जुलैपर्यंत चिमाजी तारापूर-साष्टीकडे होता. १७३८ च्या नोव्हेंबरांत चिमाजी व बाजीराव वसईच्या स्वारीस निघून १७३९ च्या मार्चांत बाजीराव खानदेशांतून नागपूराकडे आवजी कवड्याचा सूड उगविण्याकरितां जात असतां नादीरशहानें दिल्ली लुटल्याची खबर आली. चिमाजी वसई सर करून व बाजीराव दिल्लीच्या पातशहाच्या मदतीची तयारी करण्याकरितां १७३९ च्या जुलैंत देशीं परत आले. बाजीराव व चिमाजीअप्पा नासरजंगावर १७३९ च्या नोव्हेंबरांत जाऊन त्याला १७४० च्या मार्चांत पक्का नरम आणून, बाजीराव अवरंगाबादेवरून खानदेशाकडे गेला व चिमाजी बाळाजी बाजीरावाला घेऊन कोंकणांत मानाजी आंग्र-याच्या साहाय्यास गेला. बाजीराव २८ एप्रिल १७४० त रघूजी भोंसल्याचें पारपत्य केल्याशिवाय व हिंदुस्थानची निरवनिरव केल्याशिवाय वारला. ही बातमी चिमाजीअप्पास कोंकणांत कळली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
१७२२ च्या सप्टेंबरात निजामुन्मुलुखाचे सरदार अर्काटाकडे स्वारीस निघणार अशी बातमी आली. निजामाच्या पाठीवर शह देण्यास बाजीराव १७२२ च्या नोव्हेंबरांत अवरंगाबादेस गेला. तेथें ऐवजखानाचा पराभव करून स्वारी ब-हाणपुरास गेली. १७२३ च्या जानेवारींत बाजीरावाची हांडिया प्रांतांतील अनूपशिंगाशीं भेट जाहली. १७२३ च्या फेब्रुवारीत खुद्द निजामुन्मुलुखाची मुलाखत करून स्वारी बाधेलखंडाकडे गेली. तेथून १७२३ च्या जुलैंत साता-यास येऊन खंडेराव दाभाडे, फतेसिंग भोसले व चिमणाजी बल्लाळ ह्यांच्या साहाय्याला बाजीराव १७२३ च्या डिसेंबरांत गेला. १७२३ च्या डिसेंबरांत अंबाजीपंत पुरंधरे, मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे व नंतर बाजीराव यांनीं माळव्यांत व बुंदेलखंडांत स्वारी केली. हैदराबादकर मोगलांनीं उत्तर व दक्षिण पाईन घाटांत गडबड केली, ती बंद करण्याकरितां १७२३ च्या सप्टंबरापासून १७२४ च्या जुलैपर्यंत खंडेराव दाभाडे, फत्तेसिंग भोसले व चिमणाजी बल्लाळ गुंतले होते. हैदराबादकर मोंगल कंबरजखान व निजामुन्मुलूख ह्यांचा युद्धप्रसंग १७२४ च्या पावसाळ्यानंतर सुरू झाला. ह्या प्रसंगी बाजीरावानें निजामाचें साहाय्य करून कंबरजखानाचा साखरखेडले येथें पराभव १७२४ च्या आक्टोबरांत केला. तेथून बाजीराव माळव्यांत जाऊन १७२५ च्या एप्रिलास साता-यास आला. १७२५ च्या सप्टंबरांत फत्तेसिंग भोसले, त्रिंबकराव दाभाडे, रघूजी भोसले, प्रतिनिधि व बाजीराव त्रिचनापलीपर्यंत कर्नाटकांत स्वारी करून १७२६ च्या मेंत परत आले. ह्या अवधींत चिमणाजी बल्लाळ व कान्होजी भोसले निजामावर चाल करून गेले. निजामानें शाहूच्या विरुद्ध संभाजी प्रतिनिधि वगैरेच्या मनांत विकल्प आणून युद्धाची तयारी केली होती. बाजीराव कर्नाटकांत गेला असें पाहून निजामानें हा डाव आरंभिला होता. परंतु शाहूने माळव्यांतून उदाजी पवार, कंठाजी कदम, पिलाजी गायकवाड ह्यांस फत्तेसिंग भोसले व चिमणाजी बल्लाळ ह्यांच्या साहाय्यास बोलाविलें व बाजीरावासहि परत येण्यास पत्रें पाठविली. १७२६ च्या सप्टंबरांत बाजीराव व खंडेराव दाभाडे पंढरपूरच्या रोखें निजामावर गेले. कान्होजी भोसल्याचा ऐवजखानानें बालाघाटांत पराभव केला. त्याच्या मदतीस चिमाजीअप्पा गेले. बाजीरावानें अवरंगाबादेकडून शह दिला. (का. सं. १६७ व १६९. ) निजामावरील ही स्वारी संपवून बाजीराव १७२७ जुलैंत साता-यास गेला. १७२७ च्या आगस्टांत बाजीराव पुन्हां निजामावर गेला. निजामाला अनेक झुकांड्या देऊन त्याचा पराभव बाजीरावानें १७२८ च्या फेब्रुवारीस पालखेड येथे केला. नंतर १७२८ च्या ६ मार्चास मुंगी येथे तह करून बाजीराव जुलैंत साता-यास आला. ह्या तहांत निजामुन्मुलुखाची व कोल्हापूरच्या संभाजीची कायमची फारकत झाली. १७२८ च्या आक्टोबरांत बाजीराव तुळजापुराकडे व खानदेशांत स्वारीस निघाला व चिमाजीअप्पा माळव्यांत दयाबहादरावर गेला. चिमाजीअप्पा माळव्यांतून १७२९ च्या मार्चांत परत आला व बाजीराव चिमाजीअप्पाच्या जागीं माळव्यांत गेला. बाजीरावानें अहमदखान बंगषाचा पराभव जैतपुरीं ३० मार्चास व कायमखा बंगष याचा पराभव ४ मे १७२९ रोजी केला व १७२९ च्या जुलैंत साता-यास परत आला. १७२९ च्या आक्टोबरांत चिमाजी गुजराथेंत व माळव्यांत स्वारीस निघाला, तो १७३० च्या मार्चांत ढवळकें लुटून पायागड घेऊन जुनांत देशी परत आला. १७२९ त खंडेराव दाभाडे वारला व सेनापतिपद त्रिंबकराव दाभाड्यास १७३० च्या जानेवारींत मिळाले. १७२९ च्या आगस्टापासून १७३० च्या फेब्रुवारीपर्यंत बाजीराव सुपें, पुणें वगैरे ठिकाणीं देशींच होता. १७३० च्या फेब्रुवारींत उंब्रजेस जाऊन कोल्हापूरकरांशीं लढाई वगैरे होऊन स्वारी आगस्टांत पुण्यास आली. १७३० च्या सप्टेंबरांत बाजीराव व चिमाजीअप्पा निजामुन्मुलूख व त्रिंबकराव दाभाडे यांजवर चालून गेले. १७३१ च्या फेब्रुवारींत दाभाड्याचा डभईस पराभव करून एप्रिलांत बाजीराव देशीं परत आला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रस्तावना
शाहू राज्यावर येण्याचे वेळीं निरनिराळ्या सरदारांना ज्या जहागिरीच्या लालुची दाखविल्या होत्या, त्या सतत चालविण्याचा शाहूचा बेत नव्हता असें म्हणण्यास पुरावा आहे. परसोजी भोसले, खंडेराव दाभाडे, कान्होजी आंग्रे यांच्या सरंजामी जहागिरींची पुढील ४० वर्षांत काय काय व्यवस्था झाली ही गोष्ट लक्षांत घेतली असतां वरील विधानाची सत्यता दिसून येईल. १७०७ त सरंजामी जहागिरींची मुसलमानी पद्धत शाहूस जी स्वीकारावी लागली, ती १७३१ पुढें हळूहळू सोडून देण्याचा, त्यानें व त्याचे प्रमुख मुत्सद्दी जे बाजीराव बल्लाळ व बाळाजी बाजीराव पेशवे यांनीं प्रयत्न केला. दिलेल्या जहागिरी परत घेण्याची मुख्य सतेची इच्छा व मिळालेल्या अवाढव्य जहागिरी जाऊं न देण्याची सरदाराची मनीषा ह्या दोन प्रेरणांच्या हिसकाहिसकींत मराठ्यांच्या उत्कर्षांची बीजें सांपडण्यासारखीं आहेत. ज्या सरदाराची जहागिरी परत घेण्याचा प्रयत्न करावा तो सरदार मुख्य सत्तेच्या विरुद्ध नानाप्रकारें उठे; शत्रूंच्या व इतर सरदारांच्या साहाय्यानें आपलें अस्तित्व कायम करी, व तें करण्यास फसल्यास क्वचित् नष्ट किंवा सामर्थ्यहीन होऊन जाई. नष्ट झाला, सामर्थ्यहीन झाला किंवा कायम राहिला तत्रापि त्याची स्थिति त्याला व इतर सरदारांना धड्यासारखी होई व मुख्य सत्ता दुर्बळ करण्याचा निदान विशेष प्रबळ न होऊं देण्याचा, प्रयत्न ते हमेषा करीत.
१८. १७२० च्या १७ एप्रिलास बाजीरावास प्रधानपद प्राप्त झालें. ह्या वेळीं तो खानदेशांत किंवा व-हाडांत अलमअल्लीच्या साहाय्यास गेंला होता, अथवा खरें म्हटलें असतां, बाळाजी विश्वनाथानें त्यास पाठविलें होतें. बाळाजी विश्वनाथाच्या व शाहूच्या बहुतेक स्वा-यांत बाजीराव हजर असे. बाळाजी विश्वनाथ दमाजी थोरातावर चाल करून गेला तेव्हां बाजीराव त्याच्याबरोबर होता. दमाजी थोरातानें दगा कसा केला, ह्याची आठवण शाहूनें बाजीरावाला एका पत्रांत केली आहे (शकावली पृष्ठ ६६). बाळाजी विश्वनाथाबरोबर बाजीराव दिल्लीस गेला होता. तेथून परत आल्यावर बाळाजीपंत नानांनीं त्याला खानदेशांत सय्यदांचा हस्तक जो अलमअल्लीखान त्याचें साहाय्य करण्यास ठेवून दिलें १७२० च्या जुलैंत अलमअल्लीचा निजामुन्मुलुखानें बाळापूर येथें पराभव केला. ह्या लढाईत बाजीराव होता किंवा नव्हता ह्याचा दाखला अद्याप मिळालेला नाहीं. १७२० पावसाळा छावणींत काढून त्या सालाच्या आक्टोबरांत निजामुन्मुलुखाच्या कोण्या एका हस्तकाचा बाजीरावानें बारामतीजवळ पराभव केला. हा पराक्रम करून १७२० च्या नोव्हेंबरांत बाजीरावानें साता-यास पेशवाईचीं वस्त्रें महाराजांच्या हातून घेतलीं. बाजीराव उपेक्षणीय पुरुष नाहीं, अशी पक्की खातरी होऊन निजामानें बाजीरावाची भेट सावर्डिया येथें घेतली, परंतु तिच्यापासून विशेष कांही निष्पति झाल्याचें आढळत नाही. १७२१ च्या आगस्टापर्यंत बाजीराव विजापूर प्रांतात होता. १७२१ च्या सप्टंबर--आक्टोबरांत भडबुंज्या मोगलांशीं पुरंदरास लढाई झाली व नंतर १७२२ प्रारंभीं करीमबेगाशीं युद्ध झालें. निजामाच्या ह्या दोघांही सरदारांचा पराभव करून बाजीराव १७२२ मेंत सुप्यास व जुलैंत साता-यास गेला. ह्या अवधींत निजामुन्मुलुख दिल्लीस जाऊन पातशाहीत ढवळाढवळ करूं लागला.