Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

जैन, लिंगायत व मानभाव ह्यांच्यांत कमजास्त प्रमाणानें जातिभेद व्यवहारांत मानीत नाहीत. संताळ्यांत विठोबाच्या मंदिरांत तेवढा जातिभेद मानीत नाहींत, व्यवहारांत मानतात. ह्या भक्तिपंथाची स्थापना महाराष्ट्रांत तेराव्या शतकांत झाली. संताळ्याची ही स्थापना झाल्यावर कांहीं कालानें देवगिरी येथील मराठ्यांचें राज्य नष्ट झालें व यवनांची सत्ता महाराष्ट्रांत तीनशे वर्षे, म्हणजे शके १२४० त देवगिरी घेतल्यापासून शके १५४० अहमदनगरची मनसबगिरी शहाजीला मिळेतोंपर्यंत, बहुतेक अव्याहत चालली. ह्या तीन शतकांत संताळ्याचेंच प्राबल्य महाराष्ट्रांत फार होतें. संत म्हटला म्हणजे अत्यंत पंगुपणाचा केवळ मूर्तिमंत पुतळाच होय. संतला खाणें नको, पिणें नको, वस्त्र नको, प्रावरण नको, कांही नको, एक विठोबा मिळाला म्हणजे सर्व कांही मिळालें. ऐहिक सुखदुःखें, ऐहिक उपभोग, ऐहिक व्यवहार, त्याच्यांत मन घालणें संताचें काम नव्हें. इहलोक हा संताचा नव्हेच. राजा कोणी असो, सारा कोणी घेवो, संताला त्याचें कांही नाहीं. असल्या ह्या संतमंडळींच्या हाती विचाराची दिशा जाऊन, महाराष्ट्र तीन शतकें पंगू बनून राहिलें. सनातन धर्माला त्रासून महाराष्ट्रांतील लोकांनीं जीं धर्मक्रांती केली तिचें स्वरूप हें असें होतें. ह्या धर्मक्रांतीनें धर्मोन्नती, राष्ट्रोन्नती होण्याचें एकीकडेच राहून उलटी धर्मावनती, राष्ट्रावनती मात्र झाली. कालांतरानें यवनाच्या अमलाखालीं पायमल्ली झालेली पाहून, मराठ्यांचे डोळे उघडले, ह्या पंगू संताळ्यांचा त्यांना वीट आला, आणि सनातन धर्माकडे, गो-ब्राह्मण प्रतिपालनाकडे व चातुर्वण्याकडे त्यांनीं पुन्हा धाव घेतली. ह्या उपरतीच्या वेळी, रामदासस्वामी, रंगनाथस्वामी, मोरया देव वगैरे सनातनधर्माभिमानी विचारी साधू पुरुष झाले व ते महाराष्ट्रास महाराष्ट्रधर्माचा उपदेश करते झाले. ह्या सनातन धर्माभिमानी साधुपुरुषांच्या वेळीं संताळे आपला संथ मार्ग आक्रमीतच होते. परंतु इहलोकीचे अर्थ साधण्यास संताळ्याचा उपयोग कांही नाहीं हे तुकाराम पूर्णपणें जाणून होता. शिवाजी तुकारामाकडे उपदेश घेण्याकरितां गेला असतां त्या प्रामाणिक साधूनें आपल्यासारख्या पंगू माणसाकडे न येतां समर्थांच्याकडे जाण्यास शिवाजीस उपदेश केला. संताळ्यांतील पंगुत्वाला उपरोधूनच समर्थ हें नाव अस्तित्वांत आलें, हे लक्षांत घेतलें असतां, तुकारामाच्या उपदेशाचें महत्त्व व त्यानें स्वतः स्वीकारलेल्या पंथाचे लघुत्व कळून येईल. संताळ्याच्या उपदेशानें महाराष्ट्रांत नवीन जोम आला म्हणून न्यायमूर्ती रानडे म्हणतात तो खरा प्रकार नसून, समर्थांनीं काढिलेल्या नवीन रामदासी पंथाच्या उपदेशानें तो चमत्कार घडून आलेला आहे. निवृत्तीकडे ज्यांचे डोळे लागले त्या संतांच्या हातून हें प्रवृत्तिपर कृत्य व्हावें कसे? “समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळीं कोण आहे!” असली धमकी देणा-या समर्थांच्याच महोपदेशाचा तो परिणाम होय.

समर्थांनी नवीन बनविलेल्या महाराष्ट्रधर्म या शब्दाचा नीट अर्थ न कळल्यामुळें, न्यायमूर्तीनीं रामदासांच्या महाराष्ट्रधर्माची व संतांच्या भक्तिमार्गाची तद्रपता कल्पिली व एकाच्या गुणाचा आरोप दुस-यावर केला. ह्या अवस्त्वारोपामुळें न्यायमूर्तीची कार्यपरंपरा चुकली व असमर्थ कारणापासून समर्थ कार्याची उत्पत्ति झाली असें चमत्कारिक विधान त्यांच्या हातून पडलें गेलें. श्रीमदाचार्यप्रणीत सनातनधर्माच्या कठोर आचाराला कंटाळून त्याच्या विरुद्ध झालेली जी धर्मक्रांति ती संताळ्याचा भक्तिमार्ग होय. ह्या पंगू भक्तिमार्गाच्या किंचित् विरुद्ध झालेली जी धर्मशुद्धि ती समर्थांच्या प्रवृत्तिपर महाराष्ट्र धर्माच्या साहाय्यानें पुनरुज्जीवित झालेला सनातनधर्म होय. (१) श्रीमदाचार्यप्रणीत सनातनधर्मं (२) संतप्रणीत भक्तिमार्ग व (३) श्रीसमर्थप्रणीत महाराष्ट्रधर्मोज्जीवित सनातनधर्म, अशी खरी परंपरा आहे. प्रवृत्तिपर धर्माला सोडून मराठ्यांनीं निवृत्तिपर भक्तिमार्गाचा अवलंब जेव्हां केला तेव्हां त्यांची राज्यावनति झाली; व निवृत्तिपर भक्तिमार्ग किंचित् सोडून प्रवृत्तिपर सनातन धर्माला पुन्हां येऊन मिळण्याचा प्रयत्न जेव्हां त्यांनी केला तेव्हां त्यांची राज्योन्नति झाली; असा ह्या परंपरेचा अर्थ आहे.

“Saints and prophets of Maharashtra” म्हणून जो ऐतिहासिक निबंध न्यायमूर्ती रानड्यांनीं लिहिला आहे, त्यांत “मराठा तेवढा मिळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा,” ह्या वाक्याचें भाषांतर, “Unite all who are Marathas together and propogate the Dharma (Religion) of Maharashtra,” असें दिलें आहे. धर्म ह्या शब्दाचा ‘आत्यंतिक दुःखध्वंसाचा मार्ग’ म्हणून जो चवथा अर्थ आहे, तो न्यायमूर्तीनीं स्वीकारिला आहे, व तो अर्थात् चुकलेला आहे. सतराव्या शतकाच्या शेवटल्या पादांत महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा उपदेश रामदासानें संभाजीला केला व त्यावेळीं महाराष्ट्रधर्म हा शब्द रामदासानें प्रथमच योजिला, असेंहि सुचविण्याचा न्यायमूर्तीचा कटाक्ष दिसतो. परंतु तोहि निराधार आहे. शके १५७१ त शिवाजीला रामदासानें जें पत्र पाठविलें आहे, त्यांत “महाराष्ट्रधर्म राहिला कांही, तुम्हांकरिता” म्हणून रामदासानें स्पष्ट म्हटलें असल्याकारणानें, महाराष्ट्रधर्म हा शब्द शके १५७१ तच रामदासानें बनविला असें म्हणावें लागतें. अर्थात् महाराष्ट्रधर्माचें नामकरण शके १६०३ त प्रथम झालें अशी गोष्ट नसून, तें चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे शके १५७१ तच झालें होतें. शिवाजीच्या वेळीं झालेल्या राज्यक्रांतीचें मूळ तत्कालीन धर्मसमजुतींत होतें, हें मला कबूल आहे. परंतु न्यायमूर्ती रानडे जी धर्मक्रांती म्हणतात, तिचा वाचक महाराष्ट्रधर्म हा शब्द नव्हता, हें मला मुख्यतः सांगावयाचें आहे. तसेंच शिवकालीन धर्मसमजुतीला न्यायमूर्ती धर्मक्रांती म्हणून संज्ञा देतात; परंतु तेंहि निराधार आहे. एका धर्माचा लोप होऊन दुसरा धर्म स्थापिला गेला असतां धर्मक्रांती होते; किंवा एकाच धर्मातील एकाच शाखेच्या दुष्ट मतांचा नाश करून दुस-या शाखेच्या मतांजी जी स्थापना होते, तिलाहि धर्मक्रांती म्हणून म्हणतां येईल. ह्या दोन्ही प्रकारच्या धर्मक्रातींपैकीं, एकींतहि शिवाजीच्या वेळच्या धर्मसमजुतींचा अंतर्भाव होत नाहीं. शिवकालीन धर्मसमजुतींचें स्वरूप न्यायमूर्ती म्हणतात त्याहून अगदींच निराळें होतें. हिंदुधर्म, सनातनधर्म, भक्तिमार्ग, उपासनामार्ग, ह्यांचा पंधराव्या शतकापेक्षां सतराव्या शतकांत मराठ्यांना अत्यंत उत्कट अभिमान उत्पन्न झाला, तो इतका उत्कट झाला की, हिंदुधर्माचा, सनातनधर्माचा, भक्तिमार्गाचा पूर्ण द्वेष्टा जो यवनांचा महमदीधर्म तो हाकून लावण्यास मराठ्यांना तिनें उद्युक्त केलें. सनातनधर्माच्या विरुद्ध भक्तिमार्गाचा उदय होऊन मराठ्यांच्या मनाचा कोतेपणा नाहींसा झाला व तेणेंकरून चोहोंबाजूनें स्वतंत्र होण्याची उत्कट इच्छा मराठ्यांच्या मनांत बाणली व मराठ्यांनीं स्वराज्य स्थापिलें, अशी कार्यपरंपरा न्यायमूर्तींनीं जोडिली आहे; परंतु ती मुळापासून अशास्त्र आहे असें मला वाटतें. ही कार्यपरंपरा अशास्त्र कशी आहे तें स्पष्टपणें सिद्ध करण्यास भक्तिमार्गाच्या उत्पत्तीचा व प्रगतीचा इतिहास सक्षेपानें सांगितला पाहिजे.

बौद्ध धर्माचें प्राबल्य उत्कट होऊन सर्व भारतवर्ष त्या धर्माच्या आवरणानें गुरफटून जात असतां, श्रीमच्छंकराचार्यांचा उदय होऊन सनातन धर्माची स्थापना इसवी सनाच्या सहाव्या, सातव्या व आठव्या शतकांत हिंदुस्थानाच्या व महाराष्ट्राच्या ब-याच भागांत झाली. ह्या तीन शतकांत भारतवर्षांतून बौद्ध धर्माचें निष्कासन यद्यपि बहुतेक झालें, तत्रापि बौद्ध धर्मासारखाच जो जैनधर्म तो गुजराथेच्या उत्तरेस व महाराष्ट्रांच्या दक्षिणेकडील कोल्हापूर वगैरे प्रांतांत दहाव्या व अकराव्या शतकापर्यंत बराच प्रबल होता. बाराव्या शतकाच्या सुमारास जैनधर्माच्या विरुद्ध लिंगायतांचा पंथ व मानभावांचा पंथ महाराष्ट्रांत सुरूं झाला. जैनांच्या, लिंगायतांच्या व मानभावांच्या संसर्गानें सनातन धर्माच्या गोटांतील लोकांच्याहि मनावर कांहीं परिणाम झाले, व त्यांपैकी कांहींनीं भक्तिमार्ग, उपासनामार्ग, ह्या नांवाखालीं मोडणारी सनातनधर्माची एक निराळीच शाखा स्थापिली. ह्याच शाखेला संतमंडळीचा अथवा संताळ्याचा भक्तिपंथ म्हणून म्हणतात.

बाकी ज्या मल्हार रामरावाच्या आधारानें ग्रांट डफनें आपल्या बखरीची रचना केली त्या मल्हाररावाच्या बखरींत ह्या महाशब्दाचा उल्लेख झालेला आहे. हा महाशब्द न्यायमूर्ती रानडे व प्रो. राजारामशास्त्री भागवत ह्यांच्या लेखांनीं आधुनिक वाचकांस प्रथम माहीत झाला. इतकेंच कीं ह्या महाशब्दाचा खरा अर्थ ह्या दोघांहि इतिहासज्ञांच्या ध्यानांत जसा यावा तसा आला नाहीं. ह्याचें कारण असें झालें कीं ह्या दोघांहि शोधकांना हा शब्द प्रथम समर्थांच्या दासबोधांत प्रमुखत्वानें उच्चारलेला सांपडला व तेवढ्यावरच समाधान मानून ह्या शब्दाचा अर्थ करण्यास ते लागले. शिवाय ह्या शब्दाचा अर्थ करतांना, ह्या दोघांहि शोधकांच्या धर्मसमजुतीची पूर्वग्रहात्मक छटा ह्या शब्दाच्या अर्थावर आपला ठसा प्राबल्येंकरून उठविती झाली. सोळाव्या शतकांत पश्चिम युरोपांत क्याथोलिक धर्माविरुद्ध जी क्रांति झाली तिचे वृत्तांत वाचून ह्या शोधकांची मनें तल्लीन झालेलीं आहेत. व उत्तर हिंदुस्थानांत व महाराष्ट्रांत दहाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत जीं भागवतधर्माची किंवा भक्तिमार्गाची लाट उसळली ती सनातन धर्माच्या विरुद्ध क्रांतीच होती असें ह्या शोधकांचें मत आहे. हें मत खरें आहे किंवा खोटें आहे, हें पारखण्याचें हें स्थळ नव्हें. येथें इतकेंच सांगावयाचें आहे कीं, युरोपांतील प्रोटेस्टंट धर्मांत व महाराष्ट्रांतील भक्तिमार्गांत कांहीं, कदाचित् बरेंच, साम्य आहे असें ह्या शोधकांस वाटलें. क्याथोलिक धर्माविरुद्ध क्रांती करूं भासणा-या धर्मास भागवत धर्म, भक्तिमार्ग, उपासना मार्ग, वगैरे एकाहून जास्त संज्ञा असतां, महाराष्ट्रधर्म हा नवीन शब्द भेटतांच तोहि ह्या क्रांतिरूप धर्मकल्पनेचा वाचक असावा, अशी ह्या शोधकांनी आपली समजूत करून घेतली. महाराष्ट्रधर्म ह्या शब्दाचा वास्तविक अर्थ बखरकरांच्या व रामदासाच्या म्हणण्याप्रमाणें काय आहे तें पाहिलें असतां व ऐतिहासिक परंपरेने ह्या शब्दाचा अर्थ काय होतो हें लक्षात घेतले असतां, न्यायमूर्ती रानडे व प्रो. भागवत ह्यांनी केलेला ह्या शब्दाचा अर्थ बरोबर नाहीं, हें स्पष्ट होईल.

धर्म ह्या शब्दाचे अर्थ मराठी भाषेंत चार आहेतः- (१) धर्म म्हणजे गुण, (२) धर्म म्हणजे कर्तव्य, (३) धर्म म्हणजे दान, व (४) धर्म म्हणजे आत्यंतिक दुःखध्वंसाचा मार्ग पैकी चवथा अर्थ महाराष्ट्रधर्म. ह्या शब्दांतील धर्म ह्या पदाचा करून महाराष्ट्रधर्म म्हणजे सनातन धर्माच्या विरुद्ध असा एक धर्मपंथ असावा अशी ह्या दोघां इतिहासज्ञांनी आपली समजूत करून घेतली आहे. परंतु रामदासाची व बखरकरांची तशी समजूत नव्हती. रामदासानें क्षात्रधर्म, सेवाधर्म, राजधर्म, स्त्री-धर्म, पुरुषधर्म, वर्गैरे जे शब्द योजिले आहेत त्यांत धर्म ह्या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा स्पष्ट आहे. तोच प्रकार महाराष्ट्रधर्म ह्या शब्दाचा आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे सर्व महाराष्ट्राचा, सर्व मराठा समाजाचें कर्तव्य असा रामदासाचा आशय आहे. ‘मराठा तेवढा मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा,’ ह्या वाक्यांत रामदासानें आपला आशय स्पष्ट करून दाखविला आहे. भारतवर्षांत मराठा म्हणून जेवढा असेल-मग तो महाराष्ट्रांत असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असो, शिवाजीच्या पदरीं असो, किंवा विजापूर, भागानगर, अमदाबाद, किंवा दिल्ली येथील यवनांच्या सेवेंत असो,- तेवढा सर्व एक करून महाराष्ट्रधर्माची व्याप्ती सर्व मराठमंडळांत करावी, असा रामदासाचा उपदेश होता. महाराष्ट्रधर्मात मराठा जेवढा असेल तेवढ्याचीच व्याप्ती करावी, असा रामदासाचा कटाक्ष होता. महाराष्ट्रधर्म हा राजकीय उन्नतीचा मार्ग नसून धर्मोन्नतीचा जर पंथ असता, तर त्यांत भारतवर्षांतील इतर हिंदूंचाहि समावेश करावा असा रामदासांनी स्पष्टोल्लेख केला असता. संतमंडळींचा जो भक्तिमार्ग, त्यांत हिंदु, मुसलमान, ब्राह्मण, अतिशूद्र, वाटेल तो खपत असे. परंतु मराठ्यांचा जो महाराष्ट्रधर्म त्यांत अस्सल मराठा जो असेल तोच सामावला जाई. धर्म, धर्मस्थापना, हिंदुधर्म हे शब्द जेथें जेथे दासबोधांत योजिले आहेत, तेथें तेथें धर्म हा शब्द दुःखध्वंसाचा मार्ग ह्या अर्थीच योजिलेला आहे. परंतु सेवाधर्म, राजधर्म, स्त्रीधर्म, महाराष्ट्रधर्म हे शब्द जेथें जेथें दासबोधांत योजिले आहेत, तेथें तेथें धर्म ह्या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा बिनचूक आहे.

घटकत्रयीचा संघात कसा झाला, हें त्यांना कळलें नाही व अर्थात् महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आत्म्याची ओळख त्या्ना बिलकुल झाली नाहीं. घटकत्रयीचा पत्ता नीट न लागल्याकारणानें आत्मिक इतिहासाची ओळख ह्या इतिहासकारांना झाली नाहीं एवढेंच नव्हे, तर अर्थात् तत्कालीन लहानमोठ्या व्यक्तींच्या चरित्रांतील अनेक गोष्टींचे अज्ञान त्यांचें ठायीं कायम राहिलें. राष्ट्रांतील मोठमोठ्या व्यक्तींचीं चरित्रें म्हणजेच राष्ट्रांचा इतिहास होतो, असें एक विधान आहे व तें बव्हंशीं खरें आहे. व्यक्ती ह्या समाजाच्या घटक होत व मोठ्या व्यक्ती समाजाचे मोठे घटक होत. अर्थात्, मोठ्या व्यक्तींचीं चरित्रें काहीं एका अंशानें समाजाचा इतिहास होत. लहान व्यक्तींचीं चरित्रें व मोठ्या व्यतींचीं चरित्रे मिळून समाजाचा संपूर्ण इतिहास होतो. समाजांत मोठ्या व्यक्ती केव्हांही थोड्या असल्यामुळें मोठ्या व्यक्तींच्या इतिहासाला लहान व्यक्तींच्या म्हणजे बहुजनसमाजाच्या इतिहासाचा जोड द्यावा लागतो. केवळ मोठमोठ्या व्यक्तींच्याच चरित्रानें समाजाचा इतिहास संपूर्ण होत नाहीं, हें पक्कें समजून पाश्चात्य इतिहासकार बहुजनसमाजस्थितिसंबंधी देववेल तितकी सशास्त्र व सप्रमाण माहिती आपापल्या इतिहासांतून देत असतात. मराठी बखरकारांना व ग्रांट डफला मोठमोठ्या व्यक्तींच्या चरित्रांतील बहुतेक प्रत्येक प्रसंगाची माहिती अपुर्ती, त्रोटक, तुटक व अव्यवस्थित देऊन समाधान मानणें जेथें भाग पडलें, तेथें त्यांच्या ग्रंथांतून तत्कालीन बहुजनसमाजाच्या स्थितीचें वर्णन वाचण्याची अपेक्षा करणें म्हणजे अयोग्य स्थलीं अपेक्षित वस्तूचा शोध करण्याचा व्यर्थ परिश्रम करण्यासारखेंच आहे. बखरकारांच्या व ग्रांट डफच्या ग्रंथांची यद्यपि अशी स्थिति आहे, तत्रापि इतिहासकाराच्या उच्च कर्तव्याचें स्मरण अधूनमधून त्यांना झालेलें दृष्टोत्पत्तीस येतें. अशीं स्थलें फार नाहींत, थोडींच आहेत, परंतु आहेत. ह्या स्थलांचा प्रस्तुत शंकास्थानांत विचार कर्तव्य आहे. पहिल्या तीन शंकास्थानांत मजकुराच्या अनुक्रमासंबंधीं व तपशिलासंबंधीं, म्हणजे काल, स्थल व व्यक्ती ह्यांच्या संबंधीं, ह्या लेखकांनीं काय काय गफलती व दोष केले आहेत ते दाखवून कैफियत देण्याच्या व रचण्याच्या कामीं हे ग्रंथकार किती पंगू आहेत ह्या बाबीचा खल झाला. आतां ह्या व पुढील शंकास्थानांत ऐतिहासिक सामान्य सिद्धांत स्पष्टपणें सांगण्याच्या व मोठमोठ्या व्यक्तींचें स्वभाववर्णन करण्याच्या कामीं ह्या ग्रथंकारांची ऐपत कितपत आहे, त्याची परीक्षा करतो.

सामान्य सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें, मल्हार रामराव चिटणीसानें व ग्रांट डफनें स्वतंत्र असा फारच थोड्या स्थलीं केला आहे, व इतर बखरकारांनीं मुळीच केला नाहीं. शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें व मल्हार रामरावानें सतराव्या शतकाच्या पहिल्या व दुस-या पादांत हिंदुधर्माच्या दैन्यावस्थेचा उल्लेख कोठें कोठें प्रसंगोपात्त केला आहे. ह्या पलीकडे समाजाला सजीव करणा-या महाकारणांचा उल्लेख ह्या बखरनविसांनी केला नाहीं. ग्रांट डफला तर इतक्या खोल पाण्यांत शिरण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकताच भासली नाहीं. सतराव्या शतकांत महाराष्ट्रांतील मोठमोठ्या व्यक्तींना ज्या महाविचारानें हलवून सोडिलें, त्यांचें सविस्तर किंवा संक्षिप्त प्रतिपादन बखरनविसांनीं केलें नाहीं हें खरें आहे; परंतु त्या महाविचाराचा द्योतक जो शब्द त्याचा उच्चार वारंवार त्यांनीं केलेला आहे. ग्रांट डफला ह्या महाशब्दाची ओळखहि नव्हती. ज्याला तत्कालीन प्रसंगांची व्यवस्थित, मुद्देसूद व सविस्तर हकीकत देण्याची अडचण पडली, त्याला तत्कालीन महाविचार व तद्वाचक शब्द धुंडाळीत बसण्याला अवकाश नव्हता हें रास्तच झालें.

शंकास्थान चवथें.
मानवी इतिहास काल व स्थल ह्यांनीं बद्ध झालेला आहे. कोणत्याहि प्रसंगाचें वर्णन द्यावयाचें म्हटलें म्हणजे, त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखविला पाहिजे. प्रसंगाचा परिष्कार कालानें व स्थलानें विशिष्ट कसा झाला आहे, हें दाखवितांना त्या कालीं व त्या स्थळीं कोणत्या व्यक्ती प्रामुख्यानें पुढें येतात हेंहि इतिहासकाराला स्वाभाविकपणेंच सांगावें लागतें. सारांश, काल, स्थल व व्यक्ती ह्या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देतां येते. कोणत्याहि बखरींत किंवा इतिहास हें प्रौढ नांव धारण करणा-या ग्रंथांत जेथें ह्या त्रयींतील एकाची किंवा सर्वांची गफलत अगर लोप केलेला असतो तेथें ऐतिहासिक प्रसंगाची यथास्थित व सशास्त्र मांडणी झाली नाहीं असें म्हणावें लागतें. परीक्षेकरितां घेतलेल्या बखरींत व इतिहास हें प्रौढ नांव धारण करणा-या ग्रांट डफच्या ग्रंथांत योग्य आधार न मिळाल्यामुळें किंवा योग्य आधार मिळविण्याची खटपट न केल्यामुळें, किंवा शिक्षणाभावामुळें किंवा केवळ अज्ञानामुळें वर सांगितल्या त्रयींतील एकाचा किंवा अनेकांचा लोप वेळोवेळीं झालेला वाचकांच्या नजरेस आणून दिला आहे. ज्यानीं प्रसंग घडवून आणिले, त्या व्यतींच्या नांवांचा लोप किंवा गफलत, जेव्हां प्रसंग घडले त्या कालचा लोप किंवा गफलत, व जेथें प्रसंग घडले त्या स्थलांचा लोप किंवा गफलत बखरकारांच्या बखरींत व ग्रांट डफच्या इतिहासांत अनेक प्रसगीं झाल्याकारणानें प्रसंगाचा कालानुक्रम, त्याचे व्यक्तिमाहात्म्य, व त्यांचें स्थलवैशिष्ट्य व्यवस्थित रीतीनें ध्यानांत येणें मुष्कील होतें व इतिहासाच्या अस्तित्वाचें मुख्य प्रयोजन व हेतू निष्फल होतात. व्यक्तींच्या हातून विशिष्ट कालीं व विशिष्ट स्थलीं घडलेल्या अनेक प्रसंगांचे मुद्देसूद, तपशीलवार व व्यवस्थित वर्णन देतां देतां विशिष्ट कालीं व विशिष्ट देशांत कोणत्या महाविचाराची कशी उत्क्रान्ति झाली व काय परिणाम झाले, हें वर्तमान व भावी पिढ्यांना दाखवून देण्याचें भूत व वर्तमान इतिहासाचें मुख्य प्रयोजन आहे. हें प्रयोजन मराठी व मुसलमानी बखरींतील व ग्रांट डफच्या ग्रंथांतील मजकुरांवरून व्हावें तसें साध्य होत नाहीं. ह्याला मुख्य कारण ह्या ग्रंथांत कालाचा, स्थलांचा किंवा व्यक्तींचा योग्य व व्यवस्थित निर्देश झाला नाहीं हें होय. अर्थात् इतिहास व तज्जन्य उपदेश ह्या बखरींतील व इतिहासांतील मजकुरापासून उदभूत होत नाहींत. विशिष्ट काल, विशिष्ट स्थल व विशिष्ट व्यक्तींचें आचरण ह्या तीन घटकांचा संघात झाला असतां प्रसंग ही वस्तू बनली जाते व अनेक प्रसंगांच्या व्यवस्थित संततीपासून इतिहास म्हणून ज्या वस्तूस म्हणता येईल तिची निर्मिती होते. ही निर्मिती होत असतां अनेक कालांशांनीं घटित जो कालाचा महाभाग- ज्यास epoch, age, मन्वंतर वगैरे संज्ञा देतात, त्यांत कोणत्या विचाराचें प्राधान्य आहे हें सहज समुद्भूत होतें. ह्या विचारापासूनच वर्तमान व भावी पिढ्यांना गतकालीन पिढ्यांच्या कर्मसंततीचें ज्ञान होतें. कोणती कर्मसंतती घेऊन आपला समाज जन्माला आला आहे व कोणत्या दिशेचें आचरण ठेविलें असतां, वर्तमान व भावी समाजाचा कर्मलोप होऊन समाज आत्यंतिक सुखाचा वाटेकरी, कालान्तरानें का होईना, पण होईल हेंहि ह्या गतकालीन विचारापासून अंशतः कळूं लागतें. गतकालीन पिढ्यांच्या कर्माचें जे ज्ञान-ज्यास युगमाहात्म्य, Spirit of the age, Esprit d’epoc, वगैरे निरनिराळ्या भाषांतून समानार्थक संज्ञा आहेत-त्यासच इतिहासाचा आत्मा म्हणतात, किंवा इतिहासाचा आत्मा अशी औपचारिक भाषा योजण्यापेक्षां, त्यासचं इतिहास हा व्यपदेश सामान्येंकरून देतात. हें युगमाहात्म्य, हें कालमाहात्म्य, हा इतिहासाचा आत्मा दाखवून देण्याचें अवघड काम अद्यापपर्यंत महाराष्ट्रांत कोण्याहि इतिहासकारानें यथास्थित केलें नाहीं. कां की, वर निर्दिष्ट केलेल्या घटकत्रयीचा पत्ता क्रमवार ह्या इतिहासकारांना लागला नाहीं.

सभासदांची बखर केवळ स्मृतीवर हवाला ठेवून दूर प्रातीं लिहिली असल्यामुळें तींत कालानुक्रमाची व्यवस्था राहिली नाहीं. परंतु लेखकानें शिवाजीची कांही कारकीर्द स्वतः अनुभविली असल्यामुळें ज्या प्रसंगाची हकीकत त्यानें दिलीं आहे तें प्रसंग खरोखरीच घडले, एवढें कबूल करावें लागतें. हकीकतींतील तपशील तसा दिला आहे तसाच असेल किंवा कसें, ह्याबद्दल मात्र संशय येतो. मल्हार रामराव चिटणीसाच्या बखरींत जुन्या टिपणांचा उपयोग केला आहे, कोठें कोठें मित्याहि दिल्या आहेत व एक दोन स्थळीं जुन्या ग्रंथांतील उतारे दिले आहेत. हाच प्रकार शिवदिग्विजयांतहि विशेष झालेला दिसून येतो. त्यावरून शिवाजीच्या चरित्रांतील कित्येक प्रसंगांसंबंधानें असे विधान करता येतें कीं, ह्या दोन बखरींतील कांही वाक्यें सभासदी बखरींहून जुनीं आहेत. बाकी शिवाजीच्या चरित्रांतील पुष्कळ प्रसंगांचा कालानुक्रम व हकीकतींचा तपशील सभासदी बखरीप्रमाणें ह्याहि दोन बखरींत संशययुक्त आहे. चित्रगुप्ताच्या बखरीसंबंधीं माझे म्हणणें काय आहे तें मीं पूर्वी सांगितलेंच आहे. बाकी राहिलेल्या तीन बखरी अधूनमधून बघण्यासारख्या आहेत. अलीकडे भारतवर्षांत शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर छापिली आहे, तिच्यासंबंधीं विशेष कांहीं सांगण्यासारखें आहे असें नाहीं. येथें आक्वर्थ व शाळिग्राम यांनीं छापिलेल्या पोवाड्यांसंबंधी व रा. मुजुमदार यानीं छापिलेल्या प्रभुरत्नमालेसंबंधीं दोन शब्द लिहिणें प्रासंगिक दिसतें. आक्वर्थ व शाळिग्राम यांनीं छापिलेल्या पोवाड्यांपैकीं तीन पोवाडे शिवरजीसंबंधानें आहेत. पैकीं अफजलखानाचा व बाजी पासलकराचा पोवाडा अस्सल आहे. अर्थात् ते ते प्रसंग झाल्यावर लागलेच लिहिलेले आहेत. परंतु तानाजी मालुस-याच्या पोवाड्यांतील काहीं भाग तो जगप्रसिद्धच प्रसंग झाल्यावर लगेच लिहिला नाहीं, हें खात्रीनें सांगता येतें. कां की, सिंहगड किल्ला औरंगझेबाच्या हातून शिवाजीनें घेतला असें असून तो विजापूरकरांच्या हातून शिवाजीनें घेतला असें दाखविण्याचा शाईराचा रोख दिसतो. पहिल्या कडव्यांत मोगल हा शब्द योजून पुढें त्याच कडव्यांत विजापूरचें नांव कवीनें घेतलें आहे. त्यावरून असें दिसते कीं, ह्या कडव्यांत तानाजी मालुस-याच्या एका जुन्या पोवाड्यांतील कांहीं ओळींचा कोण्या नवीन तत्कालीन इतिहास माहीत नसणा-या कवीनें आपल्या कवितेशी जोड बनविला आहे. तसेंच ह्या पोवाड्याच्या २६ व्या कडव्यांत 'ग्याट' हा शब्द योजिला आहे, त्यावरून तर ह्या कडव्यांतील ही ओळ क्षेपक असावी, असें निःसंशय ठरतें शिवाय, ह्या पोवाड्याच्या शेवटल्या कडव्यांत “हजार रुपयांचा तोडा । हातामधीं घातला । त्यारे तुळशीदास शाहीराच्या” अशी तुळशीदास शाहीराहून निराळ्या अशा तिस-याच कवीची उक्ति आहे. सारांश तुळदास कवीच्या मूळ पोवाड्यांत नवीन भर घालून हा पोवाडा तयार केलेला आहे. पोवाड्यांना टीपा दिल्या आहेत. त्याहि पुष्कळ ठिकाणीं चुकलेल्या आहेत उदाहरणार्थ, ‘साखरे हे गांव कुलाबा जिल्ह्यांत आहे’ म्हणून एक टीप ३३ व्या पृष्ठावर दिली आहे. साखरें हें येल्याच्या पेठेच्या जवळ राजगडासमोर मावळांत आहे, कोकणांत नाहीं. तात्पर्य, सदर पोवाडे पारखून व तपासून काळजीनें छापिलेले नाहींत. प्रभुत्नमालेंतील परिशिष्टांखेरीज बाकीचा मुख्य भाग पुनरुक्त, अतिशयोक्त, अप्रमाण व बालिश असा आहे. परिशिष्टांत यद्यपि अस्सल असे लेख छापिले आहेत तरी त्यांत अशुद्ध असा भाग बहुत आहे. उदाहरणार्थ, चवथ्या परिशिष्टांतील “सु सितैन सबैन अलफ” ही अक्षरें चुकलेलीं आहेत. पांचव्या परिशिष्टांत बहुल चतुर्दशीला २१ चंद्र दिला आहे तो अर्थात चुकला आहे. कारण, वद्य १४ ला २१ वा चंद्र कधींच नसतो. तसेंच ह्याच परिशिष्टांत राज्याभिषेक शक २९ ला संवत्सर सर्वजित् सांगितला आहे, व राजा शाहू दिला आहे! तात्पर्य, प्रभुरत्नमाला हें पुस्तक बहुत स्थळीं अप्रमाण आहे. पोवाडे व प्रभुरत्नमाला ह्या पुस्तकांची परीक्षा ह्या स्थळी अशाकरितां केली कीं, दोन्ही पुस्तकांतील कांहीं भाग शिवाजीच्या कारकीर्दीतील प्रसंगांना अनुलक्षून आहेत.

ह्या तीन शंकास्थानांत बखरींतील काहीं भागांची परीक्षा करून दाखविली आहे, त्यावरून बखरींतील मजकुराच्या अनुक्रमाच्या व तपशिलाच्या विश्वसनीयतेची इयत्ता साहजिकच कळून येईल. सर्व बखरींतील सर्व मजकुराची परीक्षा करण्याचें विशेष प्रयोजन नसल्यामुळें व प्रकृत स्थळ त्या कामाला अपूर्ते असल्यामुळें ह्यासंबंधीं जास्त विस्तार येथें करीत नाहीं.

सु ॥ इसने अशरीन मया व अलफ, सन ११३१ फसली,
अवल साल छ ८ साबान, २६ मे १७२१,
वैशाख शुध्द ९ शके १६४३.

महादाजी अंबाजी यास पोतनिशी सांगितली, छ ८ सवाल (२४ जुलै १७२१). छ १२ जिलकाद रोजीं (२६ आगस्ट १७२१) विजापुराहून निघून छ १४ जिलकाद रोजी (२८ आगस्ट १७२१) साता-यास परत आले. छ २० मोहरम रोजी (३१ अक्टोबर १७२१) साता-याहून निघून छ २१ माहे मजकुरीं (१ नोव्हेंबर १७२१) पिंपरीस आले. छ २८ सफरऊर्फ मार्गशीर्ष वद्य १३ सह १४ मु ॥ सातें त ॥ नाणेमावळ येथे बाजीरावासाहेब पेशवे यांस पुत्र नानासो ॥ ऊर्फ बाळाजी बाजीराव झाला. घटी ४१ पळें ५२ जेष्ठा नक्षत्र, प्रथम चरण लग्नकुंडली खाली लिहिली आहे. खासा स्वारी पुरंदरपर्यंत जाऊन तेथें भडभुंज्या मोंगल जंगी सामान घेऊन आला होता. त्याशीं लढाई करून त्याचा पराजय करून त्यास लुटले. मुलखास कौल दिल्या प्रे ॥ चालून या सालीं भुजंगशेठ जेष्ठ राशीनकर, व दर्यापा अदलकर व बाळापा जदवे वाणी यांस कौल देऊन आणविलें. पुण्यास अमदानी करण्याचे कारभारावर संभाजी जाधव यास मागें ठेविलें होतें. करीम बेग याशी युध्द १८ जुन्नर मुक्कामीं झालें. 

नानासाहेब यांची जन्मकुंडली :-

ह्या उता-यावरून एवढें खास आहे कीं, शिवाजीनें मारिलेल्या सरदाराचें खरें नांव अफजलखान होतें. हा अफजलखान विजापूरच्या महमद आदिलशहाचा दासीपुत्र असावा, असें वरील उता-यांतील “महमदशाही” ह्या पदावरून वाटतें याची आई भटारीण असावी, असें अफजलखानाच्या पोवाड्याच्या २९ व्या कडव्यांतील “तूं तर भटारनीका छोरा” ह्या ओळीवरून व चित्रगुप्ताच्या “भटारीच्या पोरा परम कपटीया” ह्या ओळीवरून (चित्रगुप्त पृष्ठ २७) स्पष्ट दिसतें. मजजवळील अफजलखानाच्या ११ हुकुमनाम्यांपैकीं अगदीं अलीकडला हुकुमनामा मार्गशीर्ष शु॥ १५ शके १५८० चा आहे व अगदीं पलीकडला शके १५७१ तील वैशाख व॥ ३ चा आहे. मिळालेल्या लेखांवरून, व तेवढ्याच पुरतें, असें म्हणावें लागतें कीं, रणदुल्लाखान शके १५७१ च्या चैत्राच्या आधीं वारल्यावर वांईची सुभेदारी अफजलखानास मिळाली. ती सुभेदारी शके १५८० च्या मार्गशीर्षापर्यंत व, अर्थात् वध होईपर्यंत त्याजकडेसच होती. शके १५८० च्या मार्गशीर्षाच्या सुमारास शिवाजीनें रेटल्यामुळें अफजलखान विजापुरास तक्रार करण्यास गेला, तो सैन्य घेऊन शके १५८१ च्या आश्विनांत शिवाजीवर स्वारी करण्यास सिद्ध झाला. बखरींतून अफजलखानाला वजीर म्हटलें आहे तें अर्थात्, अविश्वसनीय दिसतें. वजिरी करण्यास शके १५७१ पासून शके १५८१ पर्यंत अफजलखान सतत विजापुरी कधींच नव्हता. विजापूर, तुळजापूर, माणकेश्वर, करकमभोसें, शंभू महादेव, रहितमतपूर, वांई, रडतोंडी, प्रतापगड अशा टप्प्यांनीं अफजलखान प्रतापगडापर्यंत गेला. वांईस आल्यावर वांईचा कुळकरणी कृष्णाजी भास्कर म्हणून होता त्याला त्यानें शिवाजीकडे पाठविले. सध्यांच्या वांईच्या कुळकर्ण्याचा कृष्णाजी भास्कर हा पूर्वज होय. अफजलखान वाईस सुभेदार असल्यामुळें कृष्णाजी भास्कर कुळकर्ण्याचा व अफजलखानाचा परिचय विशेष होता हें उघड आहे. कृष्णाजी भास्कर शिवाजीकडे गेल्यावर पंताजी गोपीनाथ यास शिवाजीनें अफजलखानाकडे पाठविलें. पंताजी गोपीनाथ हा शिवाजीच्या पदरचा कारकून होता. सातारा येथील बहिरोपंत पिंगळे यांच्या कुळकर्णाच्या दप्तरांत पंताजी गोपीनाथ सरसुभेदार हें नांव एका हुकुमनाम्यावर आहे. हा हुकुमनामा यद्यपि शके १५८१ नंतरचा आहे, तत्रापि पंताजी गोपीनाथ शिवाजीच्या पदरचा होता हें खास आहे. कृष्णाजी भास्कराच्या निरोपावरून व पंताजी गोपीनाथाच्या शिष्टाईवरून अफजल प्रतापगडास गेला व तेथें कृतकर्माचा झाडा देतां झाला. येणेंप्रमाणें अफझलखानी प्रकरणाचा खरा इतिहास आहे. सभासदी बखरींतील व मल्हाररामरावाच्या चरित्रांतील आशय मी म्हणतों असाच आहे. पवाड्यांतीलहि हकीकत बहुतेक माझ्या म्हणण्याला पोषकच आहे. अस्सल कागदपत्रांचा उपयोग करतां आला नसतां, तर हा खरा इतिहास देतां आला नसता. नुसत्या बखरींतील तपशिलावर इमारत रचण्याचा प्रयत्न करण्यास गेलें असतां रा. कार्कारियाप्रमाणें व्यर्थ जलताडन करीत बसण्याचें श्रेय मात्र पदरीं येतें. मी दिलेल्या वरील वृत्तांतावरून कोणत्या बखरींतील मजकूर खरा आहे, व कोणत्या बखरींतील खोटा आहे, हें सहज समजण्यासारखें आहे.

तपशिलाच्या विश्वसनीयत्वासंबंधानें मला जें कांहीं दाखवून द्यावयाचें होतें, तें वर स्पष्ट झालें आहे. अनुक्रमासंबंधानें विचार दुस-या शंकास्थानांत केलाच आहे. त्यावरून अस्सल कागदपत्रांच्या कसोटीखेरीज कोणत्याहि बखरींतील मजकूर खरा धरून चालूं नये असा सिद्धांत ठरतो. अस्सल पत्रांच्या साहाय्याखेरीज वादविवाद करणें अगदींच निरुपयोगी आहे असेंच केवळ माझें म्हणणें नाहीं; वादविवादानें तपशिलांतील शंकास्थानें कोणतीं व अस्सल पत्रें कोणत्या मुद्यावर हवींत, ह्याचा उलगडा होण्यासारखा असतो. तेव्हां तो तर हवाच आहे. परंतु मुख्य धोरण अस्सल पत्रें शोधून काढण्याकडे असलें पाहिजे. त्यावांचून इतिहासाची फोड यथास्थित व मनाजोगती कदापि होणें नाहीं. येणेंप्रमाणें बखरींतील मजकुराच्या कालानुक्रमासंबंधानें व तपशिलासंबंधानें शंका काय येतात त्यांचें निरुपण झालें. (१) सभासद बखर, (२) चित्रगुप्ताची बखर, (३) चिटणीसांची बखर, (४) शिवदिग्विजय, (५) शिवप्रताप, (६) रायरी येथील बखर व (७) दलपतरायाची बखर, अशा सात बखरी परीक्षणार्थ निवडल्या होत्या. पैकीं सभासदी बखर, चिटणीसांची बखर, व शिवदिग्विजय ह्मा बखरींनाच विशेष महत्त्व देणें भाग पडलें.

पेशव्यांची शकावली
इ. स. १७२० पासून १७४० पर्यंत.

बाजीराव बल्लाळाची हकीकत.

सु ॥ इहिदे अशरीन मया व अलफ, सन ११३० फसली,
अवल साल छ २७ रजब, २५ मे १७२०,
वैशाख वद्य १३ शके १६४२.

खंडेराव दाभाड्या मेला. त्याचा पुत्र त्र्यंबकराव दाभाडे याशीं सन १७२१ में महिन्यांत सेनापतीपदाची वस्त्रें झालीं. उमाबाईचे मदतीने चालविले. गुजराथ, काठेवाड वगैरे अंमल सांगितले. खंडेराव मरण्याचे अगोदर त्याचा सरदार दमाजी गाइकवाड होता. त्याने मोठे शौर्य केले. ह्मणून खंडेराव याणें शाहू महाराजास सांगितले. सबब शाहू महाराज यांनी खंडेराव याचे हाताखाली दुसरा अधिकार देऊन समशेर बहादूर असा किताब दिला. तो बडोद्याचे गायकवाडाचा मूळ पुरुष. तो दमाजी, खंडेराव दाभाडा मेला त्याच सामारास, मृत्यू पावला. याचे जागी त्याचा पुतण्या पिलाजी गायकवाड यास बसविला. संस्थान जंजिरा याचा अंल शिद्दिसात याजकडे आहे. त्याणें दक्षिण कोंकणात बहुत धामधूम केली. त्याचे पारपत्यास चिमणाजी बल्लाळ यास पाठविलें. त्याचे तैनातीस विठ्ठल१६  शिवदेव विंचूरकर यास दिले होतें. त्यांनी लढाई करून त्याचे घोडे आपले हस्तगत करून आणिले. छ ४ सफर१७ १७+ रोजी (२५ नोव्हेंबर १७२०) बाजीराव साहेब साता-यास गेले. पुढे छ २५ सफर रोजी (१७ डिसेंबर १७२०) निघून मोगलाईत गेले. नंतर सुप्यास येऊन दोन महिने होते. छ १६ रबिलावल रोजी (६ जानेवारी १७२१) निजामउन्मुलुख याची भेट मु ॥ सावर्डिया पे ॥ उंदिरगांव येथे झाली. मोहरम (आक्टोबर-नोव्हेंबर १७२०) महिन्यांत बारामतीवर लढाई झाली. भाद्रपद मास (सप्टंबर-अक्टोबर १७२०) मुक्काम सासवड. रमजान (जून-जुलै १७२०) महिना व-हाड प्रांती होते.

चंद्ररावाचाचें पुत्र बाजीराव व कृष्णराव ह्यांस पुण्यांत दक्षिणेकडील निमजग्यांत आणून ठेविलें म्हणून हे दोघे बखरकार सांगतात. ही तपशीलवार माहिती मुख्य हकीकतीला विशेष पोषक नसून जातां जातां सहजासहजीं लिहून ठेविलेली आहे. तेव्हां ती ह्या बखरकारांनीं कोणत्या तरी एका जुन्या बाडांतून घेतली असावी असा अंदाज होतो. ह्या दोघां बखरकारांनीं बाकीची जी ह्या प्रसंगाची हकीकत दिली आहे ती परस्परविरोधी व विसंगत आहे. इतरहि बखरकारांचें एकाचें म्हणणें एकाला जुळत नाहीं. तेव्हां आतां प्रश्न असा उद्भवतो कीं, ह्या प्रसंगाची खरी हकीकत काय असावी व ग्रांट डफनें जी हकीकत दिली आहे ती कोणत्या आधारावर दिली असावी? ह्या प्रश्नाला, माझ्या मतें उत्तर असें पडतें कीं, ह्या प्रसंगाची खरी हकीकत उपलब्ध बखरींतून निश्चयात्मक अमकीच असेल असें सांगणे कठीण आहे व ग्रांट डफनें जी दिली आहे ती निराधार असून बखरींच्या इतकीच विश्वसनीय आहे. अस्सल पत्रें व हकीकती पुढें आल्यावांचून अमक्या बखरींतील मजकूर खरा व अमकींतील खोटा, असें निश्चयानें कांहींच सांगता येत नाही तात्पर्य, ह्या प्रसंगाची खरी हकीकत सजविण्यास निवळ बखरींचा व तवारिखांचा कांही उपयोग होईल असें वाटत नाहीं. शके १५७७ त केव्हां तरी शिवाजीनें मो-यांस जिंकिलें, चंद्रराव कोणत्या तरी कारणाने मेला, त्याचे पुत्र पुण्यांत निमजग्यांत कैदेंत होते, राघो बल्लाळ व संभाजी कावजी ह्या मोहिमेंत प्रमुख होते, हें मो-यांचे प्रकरण निदान चार महिने तरी चाललें होतें, व तें शके १५७७ च्या पावसाळ्याखेरीज कोणत्या तरी ऋतूंत घडून आलें, ह्या पलीकडे जास्त गोष्टींवर विश्वास ठेवण्यास जागा नाहीं. सारांश, अस्सल आधार कांहीं तरी असल्याशिवाय ह्या बखरींतील तपशिलावर विशेष विश्वास ठेवून चालणें उपयोगाचें नाही.

(३) तपशिलासंबंधानें तिसरे प्रकरण अफजलखानाच्या पराभवाचें आहे. अफजलखानाच्या पराभवाचा वृत्तांत सर्व बखरींतून दिलेला आहे. शिवाय आक्वर्थ व शाळिग्राम ह्यांनीं छापिलेल्या पोवाड्यांतहि ह्या प्रसंगाचें वर्णन आहे. खानमजकुराच्या पराभवाचा इतिहास त्या वेळीं व पुढेंहि सर्व पृथ्वींत महशूर झाल्यामुळे व तो प्रसंगहि अघटित असल्यामुळें त्याचे वर्णन सर्व बखरींतून व पोवाड्यांतून विशेष खुलाशानें दिलेलें असतें, व तें इतर वृत्तांतापेक्षां जास्त विश्वसनीय दिसतें. अफजलखानाचा वध शके १५८१ विकारीनाम संवत्सरी मार्गशीर्ष शुद्ध ५ भृगुवारीं झाला असें मल्हार रामराव सांगतो. “शुद्ध १३ स अफदुलखानाचा सरंजाम आणिला” म्हणून शिवदिग्विजयकार लिहितो, त्यावरून मल्हाररामरावाची अफजलखानाच्या वधाची मित्ती खरी ठरते. आतां शंका अशी येते कीं, ज्या मुसलमान सरदारास शिवाजीनें शके १५८१ च्या मार्गशीर्षांत मारिलें त्याचें नांव अफजलखान कीं अफजुलखान कीं अबदुलाखान, कीं अबदुलखान? पोवाड्यांत व शिवदिग्विजयांत ह्या सरदाराला अबदुलखान म्हणून म्हटलें आहे, मल्हार रामराव त्याला अफजलखान म्हणून म्हणतो; व ग्रांट डफ अफझुलखान असें लिहितो. खरें नांव काय असावें तें ठरविण्यास त्या वेळच्या अस्सल पत्रांखेरीज सोय नाहीं. वांई येथील चित्राव यांच्या दप्तरांतील अफलजखानाचे ११ हुकुमनामे मजजवळ आहेत. त्यांत त्याचें नांव अफलजखान असें लिहिलेलें आहे. पैकीं एका हुकुमनाम्याचा शिरोभाग येथें देतों :-

अज् रफ्तखाने खोदायवंद खाने अलीशान खाने अफजलखान
महमदशाही खुलीदयाम दौलतहू बजाने व कारकुनानी हालवा
इस्तकबल वा देशमुखने प।। वाई बिदानंद. सु।। सन खमसैन
अलफ. दरींविले.............................
तेरीख १८ जमादिलाखर.