Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
सभासदी बखरीच्या चवथ्या परिशिष्टांत सोयराबाई शिरक्यांची कन्या होती म्हणून डफच्या आधारावर विधान केलें आहे. सईबाई मोहित्यांची कन्या म्हणून चित्रगुप्त म्हणतो [चित्रगुप्त ८९]. येणेंप्रमाणें शिवाजीच्या घरातील माहिती बिनचूक अशी फारच थोडी आहे व जी काही थोडीबहुत उपलब्ध आहे ती सर्व किंवा अंशतः खरी आहे असेंहि म्हणवत नाहीं. अमूक एका बखरींतील मजकूर खरा आहे असेंहि निश्चयानें सांगतां येत नाहीं व खोटा आहे असेंहि बिनधोक म्हणतां येत नाहीं. सारांश, या बखरींच्या आधारांवर निश्चयात्मक असें विधान काहींच करतां येत नाहीं; प्रत्येक गोष्टीविषयी संदेहवृत्तीचाच परिपाक विशेष होतो व आजपर्यंत जे शिवाजीचे वृत्तांत आपण वाचिलेले आहेत ते फक्त कल्पित कथांच्यापेक्षां जास्त विश्वसनीय आहेत हें पाहून इतर अस्सल पुराव्याची व रचनेची अपेक्षा उत्पन्न होते. जोंपर्यंत अस्सल पुराव्याचीं साधने उपलब्ध झालीं नाहींत तोपर्यंत ह्या बखरींचा उपयोग शंकास्थानें उत्पन्न करण्याचाच तेवढा होण्यासारखा आहे; कोणतीहि एखादी नवी बखर सांपडली व ती वर सांगितलेल्या तीन अस्सल वर्गांपैकीं नसली म्हणजे शंकांची मात्र जास्त जोड होण्याचा अवश्य संभव असतो. शिवाजीच्या गृहस्थितीबद्दल शंका काय काय उद्भवतात ह्याचा प्रपंच वर केला आहे. आतां शके १५६५ पासून १६०२ पर्यंतच्या शिवाजीच्या चरित्रासंबंधीं बखरींतील एक दोन शंकास्थानें काढून दाखवून हें प्रकरण आटोपतें घेतो.
पहिलें व दुसरें शंकास्थान निरनिराळ्या बखरींतील मजकुराच्या अनुक्रमासंबंधानें आहे ही शंकस्थानें वाचकांच्या स्पष्ट ध्यानांत यावी म्हणून प्रत्येक बखरींतील मजकुराच्या अनुक्रमाचे तक्ते खालीं देतों व नंतर त्यांतील संगती व विसंगती ह्याबद्दल दोन शब्द लिहितों.
[ १ ] शिवदिग्विजयांतील मजकुराचा अनुक्रम.
[ २ ] सप्तप्रकरणात्मक चरित्रांतील मजकुराचा अनुक्रम.
[ ३ ] सभासदी बखरींतील मजकुराचा अनुक्रम.
[ ४ ] चित्रगुप्ती बखरींतील मजकुराचा अनुक्रम.
[ ५ ] श्रीशिवाजीप्रतापांतील मजकुराचा अनुक्रम.
[ ६ ] रायरी येथील बखरींतील मजकुराचा अनुक्रम.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
तेव्हां मुसलमानी तवारिखांच्या प्रत्यंतर पुराव्यानें बखरींतील अमुक मजकूर खरा आहे असें विधान करणेंहि धोक्याचेंच आहे. तात्पर्य, व्यक्तिशः समुच्चयानें, बहुमतानें किंवा तवारिखांच्या पुराव्यानें देखील बखरींतील मजकुरांचें प्रामाण्य ठरणें कठीण आहे. हे चारहि प्रकारचे पुरावे बखरींतील मजकुराच्या प्रामाण्याला जर लागू पडत नाहींत, तर मग बखरींतील मजकुराचा खरेखोटेपणा ठरवावयाचा तरी कसा, असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. ह्या प्रश्नाला उत्तर असें आहे की, मराठी, पारशी, कानडी, इंग्रजी व पोर्तुगीज, अस्सल पत्रें त्या कालीं लिहिलेलीं अशी, जर सांपडलीं तरच बखरींतील मजकुराचा खरेखोटेपणा ठरवितां येईल. अन्यथा हें काम मनाजोगतें व निश्चयात्मक होणार नाहीं. अशीं अस्सल पत्रें आजपर्यंत फारच थोडीं उपलब्ध झालीं आहेत. शहाजहानानें व औरंगझेबानें शहाजीस व शिवाजीस पाठविलेलीं पत्रें, सुरत येथील दप्तर, व अवांतर पांच चार पत्रें एवढाच काय तो अस्सल पुरावा आजपर्यंत मिळाला आहे. ह्या अस्सल पुराव्याच्या जोरावर ग्रांट डफनें शिवाजीच्या चरित्रांतील कांहीं प्रसंगांच्या कालाचा व प्रसंगांच्या मजकुराचा निश्चय करून टाकला आहे. बाकीचा बहुतेक सर्व मजकूर बखरींच्या आधारावर व काफीखानाच्या प्रत्यंतर पुराव्यावर भिस्त ठेवून रचिला आहे. शिवाजीच्या मराठी इतिहासकारांना तर हीं अस्सल पत्रेंहि मिळालेलीं नाहींत. त्यांनीं ग्रांट डफवर सर्व भिस्त ठेवून आपला कार्यभाग उरकून घेतला आहे. असो. तेव्हां ह्या कम-अस्सल बखरींच्या मालिकेंत ग्रांट डफला व त्याच्या अनुयायांनाहि गोंवणे जरूर आहे. येणेंप्रमाणें ही अस्सल पत्रें फारच थोडीं असून त्यांचा उपयोग शिवाजीचा व औरंगझेबाचा संबंध दाखविण्यापुरताच असल्यामुळें व नवीन पत्रें अद्याप बाहेर यावयाला अवकाश असल्यामुळें, बखरींतील ब-याच मजकुराच्या सत्यासत्यतेची कसोटी आपल्याजवळ नाहीं. तेव्हां प्रकृत स्थळीं निव्वळ ह्या बखरींतून जेवढें निष्पन्न होईल तेवढ्यावरच निर्वाह करून घेणें भाग आहे. अस्सल पत्रांसारख्या बहिःप्रमाणांच्या अभावीं हीं निष्पति अंतःप्रमाणांवरून थोडीच व्हावी असें वाटतें. बखरींतील मजकुराच्या सत्यासत्यतेचा अंतःप्रमाणांवरून निर्णय करण्यापूर्वी एक मोठे संकट आड येतें. तें हें कीं बखरींत लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा, संदिग्ध शब्दाचा व मित्तीचा शेवटपर्यंत छडा लावीत गेलें पाहिजे. सभासदी बखर, मल्हाररावाची बखर, शिवदिग्विजय व बाकीच्या बखरी, ह्या सर्वांत जेवढा म्हणून मजकूर आला आहे, तेवढा सगळा विचारांत घेतला पाहिजे; त्यांतील एक ओळही सोडून देतां कामा नये. हा सगळा मजकूर विचारांत घेतल्यावर प्रथम कालानुक्रमाप्रमाणें त्या मजकुराचें वर्गीकरण केलें पाहिजे. मुख्य संकट जें येतें तें हें कालानुक्रमवार वर्गीकरण करण्यांतच येतें. वर्गीकरण झाल्यावर त्या त्या प्रसंगासंबंधींच्या मजकुराचे निरनिराळे पाठ, त्यांतील कमजास्त विशेषनामें हीं सर्व पाहून मग त्या प्रसंगासंबंधीचा मजकूर कांहीं एका अंशाने ग्राह्य धरिला पाहिजे. बहिःप्रमाणांच्या अभावीं निव्वळ अंतःप्रमाणांवरून बखरींतील बहुतेक मजकुरावर विश्वास अंशमात्रानेंच ठेवितां येईल, सर्वांशी किंवा बव्हंशी ठेवितां येणार नाहीं. ह्या अल्पांशाने विश्वसनीय मजकुराला बहिःप्रमाणांचा दुजोरा मिळाला म्हणजे त्याजवर पूर्णपणें विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं. असो. शिवाजीच्या लग्रासंबंधी विचार चालला असतांना हा वाद मध्येंच उपस्थित झाला. शिवाजीला [१] सईबाई [२] सोयराबाई [३] पुतळाबाई, वगैरे चार बायका होत्या म्हणून ग्रांट डफ म्हणतो [डफ १३३]. सईबाई, निंबाळकरांची व सोयराबाई शिरक्यांची मुलगी होतीं असें बखरकारांच्या विरुद्ध त्याचें म्हणणें आहे. चवथ्या बायकोचें नाव त्याला माहीत नव्हतें, तें नांव कदाचित् सगुणाबाई असावें [श्रीरामदास स्वामी यांचे चरित्र प्रकरण ५]. शिवाजीस तीन मुख्य स्त्रिया व दोन उपस्त्रिया होत्या असें रामदासाच्या चरित्रावरून दिसते [कित्ता]. सईबाईखेरीज शिवाजीला इतर सहा बायका होत्या म्हणून सभासद म्हणतो [सभादी बखर ५६]. सईबाई निंबाळकरांची कन्या [सभासद बखर ९]. व सोयराबाई मोहित्यांची कन्या [सभासद ५६] होती असें सभासद लिहितो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
इ. स. १६३७ त म्हणजे शके १५५९ त शिवाजीचा सईबाईशीं विवाह झाला हें ग्रांट डफ, मल्हार रामरावाच्या आधारावर लिहितो (मल्हाररावकृत चरित्र पृष्ठ २८). सईबाई शिर्क्याची कन्या होती असें मल्हारराव म्हणतो, तें डफला पसंत नव्हतें. बाकी शिवदिग्विजयात सईबाई शिर्क्यांच्या कुलांतील होती असें पुनः पुनः म्हटलें आहे (शिवदिग्विजय, पृष्ठ ९९, २०५) व मल्हाररावांचेंहि तेंच म्हणणें आहे. ह्यावरून ग्रांट डफ चुकीचा ठरतो. ग्रांट डफला एखादें अस्सल पत्र सांपडले असल्यास ह्या बहुमताचा कांहींच उपयोग नाहीं, हे मला कबूल आहे. परंतु ग्राटडफची बहुतेक माहिती बखरींवरून रचलेली आहे. प्रस्तुत प्रश्नासंबंधींच्या माहितीचा विशिष्ट आधार त्यानें दिला नाहीं, व शिवदिग्विजय हा ग्रंथ त्याला माहीत नव्हता, ह्या गोष्टी लक्षांत घेतल्या असतां माझेच म्हणणें जास्त विश्वसनीय ठरतें. ह्या ठिकाणीं कोणता आधार विश्वसनीय व कोणता आधार अविश्वसनीय ह्याविषयीं वाद उत्पन्न होण्याचा संभव आहे. तेव्हां ऐतिहासिक प्रमाण व अप्रमाण ह्यासंबंधीं माझीं मतें काय आहेत तें स्पष्ट सांगितल्यास पुष्कळ उलगडा होईल असें वाटतें (१) समकालीन व्यक्तींनीं समकालीन प्रसंग साक्षात् घडत असतांना परमार्थानें लिहिलेले किंवा लिहविलेलें अस्सल पत्र किंवा त्याची नक्कल सर्वांशीं जातीनें प्रमाण होय. (२) समकालीन व्यक्तींनीं आपल्या हयातींतील गतकालीन प्रसंगासंबंधीं लिहिलेले लेख किंवा उल्लेख पहिल्या वर्गांतील प्रमाणांच्या प्रतिकूल्याच्या अभावीं जातीनें प्रमाण होत. (३) विषमकालीन व्यक्तींनीं गतकालासंबंधीं लिहिलेले लेख (अ) पंचायतीपुढें प्रामाणिक साक्षीच्या रूपानें दिलेले असल्यास आणि (ब) बखरी म्हणून योग्य आधारानें लिहिले असल्यास, केवळ स्मृतीवर भरंवसा ठेवून लिहिलेले नसल्यास, व आपल्या कामाचें योग्य शिक्षण मिळून लिहिलेले असल्यास जातीनें प्रमाण समजावे. ह्या तीन प्रकारच्या लेखाखेरीज करून बाकी सर्व लेख कमजास्त प्रमाणानें अविश्वसनीय होत. प्रस्तुत ज्यांची परीक्षा चालली आहे त्या बखरी ह्या तिन्ही वर्गांतील कोणत्याहि एका वर्गांत अतूर्भत होत नाहींत. सभासदी बखर केवळ स्मृतीवर हवाला ठेवून लिहिलेली आहे. मल्हार रामरावानें जुन्या टिपणांचा व अस्सल पत्रांचा उपयोग केला आहे. परंतु योग्य शिक्षण त्याला मिळाले नसल्यामुळें याची बखर प्रमाणभूत समजणें योग्य नाहीं. शिवदिग्विजयांत जुन्या टिपणांचा व पत्रांचा उपयोग केलेला दिसतो व मल्हाररामरावांच्या बखरींतल्यापेक्षां ऐकीव व लेखी अशी जुनी माहिती तींत बरीच सापडतें. परंतु कर्त्याला योग्य शिक्षण न मिळाल्यामुळें तिचें प्रामाण्य मल्हार रामरावाच्या बखरीहून जास्त धरतां येत नाहीं. येणेंप्रमाणें ह्या तिन्हीं बखरींचें प्रामाण्य अव्वल प्रतीचें नाहीं; म्हणजे ह्या बखरी जातीनें प्रमाण नाहींत हें उघड आहे. ह्या बखरी जातीनें प्रमाण नाहींत ह्या विधानाची जास्त फोड करून सांगितली पाहिजे. जो लेख जातीनें प्रमाण असेल त्यांतील मजकूर (१) एकाच ऐतिहासिक प्रसंगाला अनुलक्षून असेल किंवा (२) अनेक प्रसंगांच्या संततीला अनुलक्षून असेल. प्रथमपक्षी प्रसंगाचा काल व स्वतः निश्चित झालेला असतो व द्वितीय पक्षींहि प्रसंगसंततीच्या कालाचें पौर्वापर्य व स्वतः प्रसंग निश्चित झालेले असतात. जातीनें प्रमाण जे असतात, त्यांत कालाचें पौर्वापर्य निश्चित असल्यामुळें प्रसंगाची संततीहि निश्चितच असते. हा निश्चितपणा बखरींतील मजकुरासंबंधीं खात्रींनें करतां येत नाहीं, इतकेच नव्हें तर, प्रसंगाचें वर्णनहि जसा तो घडला असेल तसा असेलच असेंहि सांगतां येत नाहीं. दहा पांच वर्षात घडून येणा-या प्रसंगांची गफलत ह्या बखरींत इतकी काहीं केलेली आढळते की, बखरींतील प्रसंगाची संतती व पौर्वापर्य जसें बखरीत नमूद केले असेल तसें हटकून असेलच असा निश्चय नसतो. ह्या बखरी व्यतिशः अविश्वसनीय आहेतच; परंतु समुच्चयानें किंवा बहुमतानेंहि त्यांना विश्वसनीय धरतां येत नाहीं. मराठी बखरींना मुसलमानी तवारिखांची प्रत्यंतरें देऊन मग प्रसंगांचीं निश्चितता खात्रीने सांगतां येईल असाहि भाग नाहीं कां की, मुसलमानी तवारिखा मराठी बखरींच्याहून जास्त विश्वसनीय आहेत असें नाहीं. कारण ह्या तवारिखा मूळ प्रसंग होऊन ब-याच कालानें लिहिलेल्या असून, लेखकाच्या समकालीन व्यक्तीच्या तोंडून मिळविलेल्या माहितीवरून किंवा बखरीवरूनच लिहिल्या गेल्या आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
येथपर्यंत शहाजीचा इतिहास बखरींतून कितपत सांपडण्यासारखा आहे ह्या गोष्टीची मीमांसा झाली. ह्या मीमांसेपासून इतकें निष्पन्न झालें कीं मलिकंबराच्या पाठीमागें निजामशाहीची पडती बाजू सावरण्यास दौलताबादेस शहाजीखेरीज दुसरा कोणी सरदार समर्थ नव्हता. त्याचा पराभव जेव्हां होई तेव्हां निजामशाही बुडाल्यासारखें दिसे व त्याचा जय होई तेव्हां तरल्यासारखी भासे. म्हणजे शहाजी व निजामशाही ह्या दोन वस्तूंचें १५४८ पासून १५५९ पर्यंत केवळ तादात्म्य झालेलें होतें. अर्थात् ह्या बारा वर्षात शहाजी म्हणजेच निजामशाही होती. शहाजीचें सामर्थ्य शहाजनाच्या मानानें फारच अल्प होतें. व आदिलशाहीच्या मानानेंहि फारसें बरोबरीचें नव्हतें. तरी ह्या दोन्ही पातशहांना दक्षिणेंतील व्यवस्था लावतांना शहाजीचा विचार करावा लागेल हें तत्कालीन इतिहासावरून स्पष्ट आहे. १५५८ त शहाजहानाचा व महमदशहाचा तह झाला त्या वेळीं यद्यपि शहाजीजवळ वरपांगी टीचभरहि जागा राहिली नव्हती, तत्रापि त्याच्याजवळ पंचवीस तीस हजार सैन्य असल्यामुळे शहाजहानाला व महमदशहाला दोघांनाहि त्याची भीति वाटत होती. निजामशाहीतील प्रांतांपैकी महमदशहाच्या वाट्यास आलेल्या प्रांतांतील पुणें व सुपें हे प्रांत वस्तुंतः शहाजीच्या ताब्यांत होते. १५५९ च्या पुढें शहाजीनें मनांत आणिले असतें व आदिलशहांनीं त्याला आश्रय दिला नसता तर आदिलशाही प्रांतांतील कांहीं प्रांत बळकावून बसण्याचें सामर्थ्य त्याच्या आंगी नव्हतें असे नाहीं. परंतु शहाजीचा स्वभाव एकदेशीय व उतावळा नसून, अव्यवस्थित पुंडपणा करण्यापेक्षां कोणत्याहि पादशहाची व्यवस्थित मनसबदारी करणें व अब्रूनें राहणें त्याला पसंत पडलें. शिवाय आदिलशहाच्या दरबारीं शहाजीचें वजन निजामशाही दरबारांतल्या प्रमाणेंच अतोनात होण्याचा निश्चित संभव होता. निजामशाहींत असतां जाधवांच्या मात्सर्याचा विषय भोसले होऊन बसले. आदिलशाहींत गेल्यावर घोरपड्यांच्या व तत्रस्थ काहीं मुसलमान सरदारांच्या द्वेषास शहाजी पात्र झाला. ह्यावरून असे दिसतें कीं जेथें जेथें शहाजी जाई तेथें तेथें त्याचें वजन अतोनात वाढे. हा सर्व प्रभाव त्याच्या जवळील सैन्यबलाचा होय. शिवाजीच्या उदयासंबंधीं विचार करतांना शहाजीच्या ह्या उच्च स्थितीचाहि अंदाज करून घेणें अगत्याचें आहे.
शके १५४९ पासून १५६२ पर्यंत शिवाजी कोठकोठें रहात होता ह्याचा तपशील निश्चयानें सांगतां येत नाहीं. १५४९ पासून १५५२ पर्यंत शिवाजी शिवनेरीस होता. १५५२ पासून १५५५ पर्यंत गांडापूर, वैजापूर, माहुली किल्ला, वगैरे ठिकाणी तो होता. १५५५ पासून १५५९ पर्यंत तो शिवनेरीस होता. १५५९ पासून १५६२ पर्यंत पुण्यास दादोजी कोंडदेवापाशीं होता. पुण्यास असतांना शके १५६२ विक्रम संवत्सरीं वैशाख शुद्ध पंचमीस म्हणजे १६४० च्या १६ एप्रिलास शिवाजीचा लग्रसंबंध शिर्क्यांच्या सईबाईशीं झाला. सदर शिर्क्यांचे ठिकाण पुणें प्रातांत मूळचें आहे. १५६३पासून १५६५ पर्यंत शिवाजी पुन्हा विजापुरास गेला असावा. त्याच वेळीं पातशहाला मुजरा न करणें कसायांची खोड मोडणें, गोब्राह्मणांचा विशेष आदर करणें, वगैरे बालिश परतुं स्तुत्य व उद्दाम कृत्यांच्या योगे शिवाजीचा मूळ स्वभाव दृष्टोत्पत्तीस येऊं लागला. कुरणूस न करितां शिवाजीनें रामराम केला, म्हणून काहीं बखरकार लिहितात. परंतु रामराम करण्याचा प्रघात रामदासांनीं पुढें पडिला, ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे रामरामाच्या ऐवजीं शिवाजीनें जोहार केला असावा असें वाटतें. ह्या संबंधानें मुजरा हा शब्द शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें वापरला आहे तो योग्य आहे. विजापुरास असतांना शिवाजीचें दुसरें लग्र पादशहाच्या आग्रहावरून सोयराबाईशीं झालें. सभासदी बखरीच्या चवथ्या परिशिष्टांत (पृष्ठ ८७) सईबाई निंबाळकरांची कन्या होती व तिच्याशीं शिवाजीचा विवाह १५५९ त झाला व सोयराबाई शिर्क्यांची मुलगी होती, अशी विधाने ग्रांट डफच्या आधारावर (मुंबई प्रत, पृष्ठ १३३) केलीं आहेत, तीं कालविपर्यासाच्या बाजूनें तरी दुष्ट आहेत ह्यांत सशंय नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
ह्या सुमारास विजापूरकरांचा व शहाजहानाचा निजामशाही वाटून घेण्याचा करार झाला, त्यांत शहाजीचें आंग होतें. १५५५ त मुरार जगदेव व शहाजी ह्यांनीं दौलताबादेवर म्हणजे मोंगलावर स्वारी केली; ह्याच स्वारींत कोरेगांवानजीक तुळापुरीं त्यांना सोमवारी सूर्यग्रहण पडलें. ह्या पर्वकालाची तीथ मल्हार रामरावानें शके १५५५ श्रीमुखनाम संवत्सर भाद्रपद वद्य ३० सोमवार म्हणून दिली आहे व ती बरोबर आहे. १६३३ च्या २३ सप्टेंबरी सोमवारीं सूर्यग्रहण हिंदुस्थानांत दिसत होतें. १५५४ च्या फाल्गुनांत दौलताबाद मोहोबतखानाच्या हातीं पडल्यामुळें शहाजी व मुरारपंत यांनीं फत्तेखानाच्या ऐवजीं मोंगलांच्या विरुद्ध खटपट चालविली. ह्याच खटपटींत असतां वर उल्लेख केलेलें ग्रहण तुळापुरास त्यांस पडलें. १५५६ त मोहोबतखान व सुलतान सुजा पातशहाच्या बोलण्यावरून दिल्लीस गेले व दौलताबादचा मुलूख मोकळा पडला. ही संधि साधून शहाजीनें मूर्तजा नांवाचा निजामशाही वंशांतील कोणी मुलगा कोंकणांत श्रीवर्धनास जाऊन राहिला होता त्यास भीमगडीं तख्तावर बसविलें व पुणें, औरंगाबाद, जुन्नर, अहमदनगर, नाशिक वगैरे बालेघाटापर्यंत प्रांत पुनः निजामशाहीच्या अंमलाखालीं आणिले. सिद्दी साया सैफखान भिवंडीस, सिद्दी अंबर जंजि-यास व श्रीनिवासराव जुन्नरास पुंडावा करून स्वतंत्र राहूं लागले होते त्या सर्वांस शहाजीनें मोडून काढिलें व निजामशाही सत्ता पुन्हा सुरळीत चालूं होण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं (का. पत्रें व यादी ४३८). श्रीनिवासराव ह्याला धरण्याच्या वेळीं शहाजीनें जिजाबाई व शिवाजी ह्यांस शिवनेरीहून काढून गांडापुरानजीक वैजापूर येथें नेऊन ठेविलें होतें. शके १५५५ त दौलताबाद घेतल्यावर निजामशाही बुडाली असें शहाजहान पातशहास वाटत होतें. परंतु एक वर्षाच्या आंत दौलताबादेभोंवतालचा प्रांत शहाजीनें काबीज केला व एका नव्या सुलतानाची भिमगडीं स्थापना केली. ही वार्ता ऐकून खानदौरान व खानजमान ह्या दोन सरदारांस शहाजहानानें दक्षणचा बंदोबस्त करण्यास पाठवून दिलें, व त्यांच्या पाठोपाठ आपणहि येऊन दाखल झाला. १५५७ पासून १५५९ पर्यंत निजामशाहीचा कड घेऊन भांडणा-या शहाजीला व विजापूरच्या बाजूनें लढणा-या रणदुल्लाखानाला खानजमान व खानदौरान ह्यांनीं बराच त्रास दिला. शेवटीं शहाजहानाचा व विजापूरच्या महमद आदिलशहाचा तह ठरला, शहाजीला विजारपूरकरांच्या आश्रयास जावें लागलें व जिच्या प्रीत्यर्थ शहाजीनें पांच वर्षें इतकी मेहनत घेतली ती बहिरी निजामशाही कायमची लुप्त झाली. निजामशाही मुलखापैकीं भीमेच्या दक्षणचा सर्व मुलूख व वसईपासून कल्याणपर्यंतचा कोंकणप्रांत महमद आदिलशहाच्या वाट्यास आला. आणि बाकीचा सर्व बहिरी निजामशाही मुलूख मोंगलांच्या ताब्यांत गेला. मालोजीनें शके १५२६ त दौलताबादच्या दरबारीं जी मनसब व जहागीर पैदा केली ती १५५९ त शहाजीनें मोठ्या मिनतवारीनें व साहसानें घालविली. ही जहागीर गेल्यानें शहाजीचें वजन यत्किंचितहि कमी झालें नाहीं. त्याचें शौर्य, त्याचें धोरण व त्याचें सामर्थ्य विजापूरच्या मुत्सद्यांस माहीत झालें होतें. त्यांनीं त्याच्याकडे पुणें व सुपें हे दोन प्रांत पहिल्याप्रमाणेंच ठेवून दिले व शिवाय दक्षिण कर्नाटकांतील प्रांतांत अंमल करवेल तितका करावा असा त्याला हुकूम केला. भीमेच्या उत्तरेकडील प्रांत मोंगलाकडे गेल्यामुळें शहाजीचें जें नुकसान झालें होतें तें कर्नाटकांतले कांहीं नवीन प्रांत काबीज करून त्यानें भरून काढिलें. ह्या कर्नाटकांतील मोहिमांसंबंधानें कनकगिरीच्यां विजयराघवाचें, अप्पाखानाचें, शहाजीचा वडील मुलगा संभाजी याचें व अफझुलखानाचें वगैरे व्यक्तींचीं नांवें बखरकार देतात, परंतु ह्या उल्लेखांपासून व्यवस्थित विधानांचा उद्गम संभवत नसल्यामुळें व प्रस्तुत स्थळीं विस्तृत इतिहास लिहिण्याचा मनोदय नसून बखरींची परीक्षाच करण्याचा हेतु असल्यामुळे शहाजीच्या १५५९ च्या पुढील कर्नाटकांतील आयुष्यक्रमाचा विचार करण्याचें येथें प्रयोजन नाहीं. १५५९ त विजापूरच्या दरबारी गेल्यापासून तों १५७१ त बाजीराव घोरपड्यानें दगा करी तोपर्यंत बारा वर्षें शहाजी विजापूरी व कर्नाटकांत काय करीत होता ह्याचा बिलकूल पता नाहीं. तसेंच १५७१ पासून १५८४ पर्यंतचा शहाजीचा इतिहास बहुतेक अज्ञातच आहे. सारांश १५५९ पासून १५८४ पर्यंतचा शहाजीचा वृत्तांत यथास्थित बसविण्यास बखरींचा कांहींएक उपयोग नाहीं. विजापूरच्या इतिहासांत थोडीबहुत माहिती सांपडते; परंतु ती इतकी त्रोटक व तुटक आहे कीं खुद्द कर्नाटकांतील अक्कलकोटपासून तंजावरपर्यंतच्या मुलखांतील जुन्या पेढीवाल्यांचीं, संस्थानिकांची, पाळेगारांची व जमीनदारांची दप्तरें नीट तपासून त्यांतील माहितीच्या आधारे ही उणीव भरून काढिली पाहिजे. परंतु हा प्रयत्न फारच खर्चाचा असल्यामुळें व्यक्तिमात्राच्या हातून हें काम झेंपण्यासारखें नाहीं. ह्या संबंधानें भागानगर येथील कुतुबशाहीचा व विजयानगर येथील हिंदुराजांचा व त्यांच्या मांडलिकांचाहि इतिहास नव्यानेंच शोधून काढावयाचा आहे. विजयानगर येथील राजांची नाममालिका ताम्रपटांवरून लागलेली आहे, परंतु त्या राजांच्या कारकीर्दीतील प्रसंगांची माहिती बहुतेक शून्य आहे. सारांश, तालीकोटच्या लढाईपासून म्हणजे १४८६ पासून म्हणजे मालोजीच्या उमेदवारीपासून तों १५५९ पर्यंतची इतिहासाची साधनें अद्याप हडकून काढावयाची आहेत. तीं कमजास्त प्रमाणानें सापडण्यासारखीं आहेत, हें मला सांपडलेल्या सोळाव्या शतकांतील कांहीं लेखांवरून संभवनीय दिसतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
शके १५४१ पासून शके १५४९ पर्यंत शहाजीच्या हालचालींचा वृत्तांत कसाबसा थोडाबहुत दिला आहे. आतां शके १५४९ पासून शके १५५९ पर्यंत त्यानें काय केलें तेंहि बखरीच्या आधारानें सांगितलें पाहिजे. परंतु त्या वेळची हकीकत सांगतांना बखरकारांनीं जो घोटाळा केला आहे तो सांगतां पुरवत नाहीं. शहाजी, मलिकंबर, मुरार जगदेव व चतुर साबाजी ह्यांचीं नांवें पुनः पुन्हा उच्चारण्यापलीकडे बखरींतून जास्त व व्यवस्थित अशी माहिती यत्किंचितहि दिलेली नाहीं. मलिकंबर शके १५४८ त वारला असून त्याचें नांव पुढें हे बखरनवीस कसे घेतात ह्याचेंच आश्चर्य वाटतें. परंतु ह्याचें फारसे आश्चर्य वाटावयास नको. कां कीं खुद्द शिवाजी महाराजांच्या जन्माची जी तीथ व जो दिवस ह्या लोकांनीं दिला आहे व जो आजपर्यंत खरा म्हणून धरला गेला आहे तो देखील बहुशः चुकला असावा असें वाटतें. मल्हार रामराव व शिवदिग्विजयाचा कर्ता हे शिवाजी शके १५४९ प्रभव नाम संवत्सरे वैशाख शुद्ध २ गुरुवारीं रोहिणी नक्षत्रीं जन्मला म्हणून लिहितात. परंतु शके १५४९ च्या वैशाख शुद्ध द्वितीयेस गुरुवार नसून शनिवार आहे, ह्या अर्थी ह्या मितीवर विश्वास ठेववत नाहीं. प्रो. फारेस्ट यांनीं छापिलेल्या रायरी येथील बखरींत शिवाजीचा जन्मशक १५४८ म्हणून दिला आहे. रायरी येथील बखरीच्या मजजवळ असलेल्या मराठी प्रतींत शिवाजीचा जन्म शके १५४८ क्षयनाम संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार असा दिला आहे. परंतु शके १५४८ च्या वैशाख शुद्ध पंचमीस चंद्रवार नाहीं; तेव्हां हीहि मिती विश्वसनीय नव्हे, असें म्हणणें भाग पडतें. काव्येतिहाससंग्रहकारांकडे १८०१ सालीं धारेहून रा. काशिनाथ कृष्ण लेले यांनीं पाठविलेल्या एका जंत्रींत शिवाजीचा जन्मशक १५४९ प्रभवनाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी सोमवार म्हणून दिला आहे. शके १५४९ च्या वैशाख शुद्ध पंचमीस सोमवार सरतां सरतां रोहिणी नक्षत्र असावें असें वाटतें. तेव्हां ह्या शेवटल्या मित्तीस म्हणजे शके १५४९ प्रभव संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी सोमवार रोहिणी नक्षत्रावर शिवाजीचा जन्म झाला हें विश्वसनीय दिसतें. १५४९ च्या वैशाख शुद्ध पंचमीला इसवी सन १६२७ च्या एप्रिलची १० तारीख होती. शिवाजी १६२७ च्या मेंत जन्मला म्हणून डफ म्हणतो तें अर्थात् बराबर नाहीं. मल्हार रामरावानें व शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें वैशाख शुद्ध द्वितीया गुरुवार ही तीथ कोणत्या हेतूनें दिली हें पाहणे थोडेसें अगत्याचें आहे. राजा म्हटला म्हणजे त्याला जन्मस्थ बहुत ग्रह उच्चीचे असले पाहिजेत ही समजूत फार पुरातन आहे. वैशाख शुद्ध पंचमीस सोमवारीं तसा कांहीं योग नसल्यामुळें वैख शुद्ध द्वितीया गुरुवार हीच तीथ पसंत करावी लागली. शिवदिग्विजयाच्या कर्त्याने तीन श्लोक दिले आहेत व त्या तिन्ही श्लोकांत वैशाख शुद्ध द्वितीया गुरुवार हीं अक्षरें स्पष्ट दिलीं आहेत. यद्यपि त्यानें व मल्हार रामरावानें बनावट तिथी देण्यास कमी केलें नाही, तत्रापि बनावट पुरावा जितका बेमालूम करावा तितका करण्याचें त्यांना किंवा त्यांनीं ज्या आधारावरून उतारा घेतला त्या मूळ श्लोककारांना साधलें नाहीं. बनावट पुरावा तयार करणा-यांना आपलें काम बेमालूम करण्याइतकें शास्त्रज्ञान प्रायः नसतें हें तरी मनुष्यमात्राचें सुदैवच समजलें पाहिजे! बनावट तिथी देणा-या मूळ श्लोककारांच्या किंवा टिप्पणकारांच्या मजकुरांत ह्या बखरनविसांनीं आपलें आणीक शहाणपण मिरविलें नाहीं, ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे!
१५४९ पासून १५५९ पर्यंत शहाजीचा इतिहास मराठी बखरींत सांपडण्यासारखा नसून तो प्रायः मुसलमानी तवारिखांतून येणा-या उल्लेखांवरूनच रचिला पाहिजे. काव्येतिहाससंग्रहांत ४३८ नंबरची यादी शहाजीची कैफियत म्हणून दिलेली आहे. परंतु तींत शहाजीच्या व शिवाजीच्या नांवांचा उल्लेख अधूनमधून मात्र केला असून त्याच्यासंबंधीं विशेष माहिती फारशी दिलेली नाहीं. तींत शहाजहान व अवरंगजेब यांच्या पराक्रमांचें त्रोटक वर्णन असल्यामुळें ती काफीरखानाच्या इतिहासाचा सारांश असावा असें वाटतें. शिवाजीचा इतिहास देणा-या जशा दहा पांच छापलेल्या व न छापलेल्या बखरी उपलब्ध आहेत, तशा शहाजीचा वृत्तांत देणा-या बखरी मुळींच नसल्यामुळें शहाजीच्या संबंधीं ठाम अशीं विधानें दहापांचाहून जास्त करतां येत नाहींत. १५४९ च्या पुढें शहाजी बंडखोरांत निवडला गेल्यामुळें, त्याच्या अमलाखालीं ज्या प्रांतांत तो असे त्या प्रांताला सोडून जास्त प्रांत नव्हता हें स्पष्टच आहे. अशेरीपासून पेडगांवापर्यंत त्याची जहागीर सैरावैरा पसरलेली होती. तींतून सह्याद्रीच्या लगत्याचे प्रांत, विशेषतः पुणें व सुपे हे प्रांत १५४९ च्या पुढें त्याच्या हातांत राहिलें असावे. शहाजीला तोडण्यात फत्तेखानानें मोठेसें शहाणपण केलें असें नाहीं. त्या तोडण्यानें निजामशाहीचा एक वाली गेला व सरहद्दीवरील मुलखांवर स्वा-या करण्यास मोंगलांस उत्तम सोय झाली. शहाजी ह्यापुढें बहुतेक स्वतंत्र असाच राहूं लागला व त्याचा कित्ता दौलताबादच्या इतर सरदारांनींहि गिरविला. शिद्दी रेहानानें सोलापूर, शहाजीनें भीमगड, श्रीनिवासरावानें जुन्नर, खिद्दी साया सैफखानानें तळकोंकण व शिद्दी अंबरानें जंजिरा, असे प्रांत निरनिराळ्या किल्लेदारांनीं व जमीनदारांनीं वाटून घेतले. (का. पत्रें व यादी ४३८). १५५० त शहाजहानानें दौलताबादेवर स्वतः स्वारी केली, त्या वेळीं शहाजीनें खानजहान लोदीचा पक्ष घेतला. पुढें १५५१ त लोदीचा पक्ष दुर्बळ वाटल्यावरून शहाजी शहाजहानाचा बेविसहजारी मनसबदार झाला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
मालोजीला जहागीर शके १५२६ त मिळाली. तिचा उपभोग १५ वर्षें घेऊन तो शके १५४१ त वारला. कांकीं शके १५४१ त शहाजीला मनसबदारीचीं वस्त्रें मिळालीं असें, इतर अव्यवस्थित माहिती देतांना, मल्हार रामराव सांगतो. (मल्हार रामराव, चरित्र २१). वजिरीची वस्त्रें शहाजीस मिळालीं म्हणून मल्हारराव म्हणतो, परंतु १५४१ त मलिकंबर वजीर असल्यामुळें शहाजीस मनसबदारीचींच तेवढीं वस्त्रें मिळालीं असावीं हें उघड आहे. शहाजीचा जन्म शके १५१६ जयनाम संवत्सरीं चैत्र शुक्ल पंचमीस म्हणजे १८ मार्च १५९४ त झाला. तेव्हां शके १५४१ त तो २५ वर्षांचा असावा. शहाजीचें मलिकंबरापाशीं वजन बरेच असावें असें बखरींतील लिहिण्यावरून व शहाजीच्या जहागिरीच्या स्वरूपावरून दिसतें. शके १५४२ त मलिकंबराचें व मोंगलांचें खानदेशाच्या उत्तर सरहद्दीवर युद्ध झालें त्यांत शहाजी प्रमुख होता. (Grant Duff chap. II). युद्धांत प्रमुखत्व मिळाल्यावर दरबारच्या मसलतींतहि शहाजीचें वजन अतोनात झालें. तें जाधवरावादि जुन्या सरदारांना साहेना. तेव्हां शके १५४३ त ती मंडळी मोंगलांना जाऊन मिळाली. शके १५४५ त शहाजीला जिजाबाईचे पोटीं प्रथम पुत्र संभाजी नामें झाला. शके १५४२ पासून शके १५४८ पर्यंत मलिकंबरी कारकीर्दींत शहाजीचीं पांच वर्षें मोठ्या थाटांत गेलीं. मलिकंबर व मूर्तजा निजामशहा हा शके १५४८ त वारल्यावर राज्यांत चतुर सांबाजी व शहाजी हे दोघे मुत्सद्दी तेवढे कायते नामांकित असे उरले होते. मलिकंबराचा मुलगा फत्तेखान ह्याच्या मनांत आपल्याला वजिरी मिळावी असें होतें. जाधवरावादि मंडळीस शहाजीचा पूर्वींपासूनच द्वेष वाटत होता. दौलताबादचा शहा लहान असल्यामुळें शहाजीच्या हातांत राज्याचीं सर्व सूत्रें बहुतेक गेल्यासारखीं होतीं. तेव्हां ही सर्व मंडळी एक होऊन त्यांनीं शहाजीची दौलताबादेहून उचलबांगडी केली. दौलताबादकरांचें व मोंगलांचे युद्ध चाललेंच होतें. मोंगलांकडे फत्तेखानानें आंतून सूत्र बांधिलें व जाधवरावादि मंडळी तर राजरोस त्यांना कित्येक वर्षें आधींच जाऊन मिळाली होती. मोंगलांच्या सैन्यांपुढें सरकत सरकत शहाजी जुन्नर प्रांतात शिरला व आपली बायको जिजाऊ हीस तेथील स्वतंत्र अंमलदार श्रीनिवास म्हणून होता त्याच्या स्वाधीन करून, अहमदनगरच्या पश्चिमेकडील प्रांतांत जाऊन राहिला. ह्या गोष्टी शके १५४९ च्या प्रारंभीं घडल्या. मोंगल आंगावर चालून आले तेव्हां शहाजी नाशिकाच्या पश्चिमेकडील घाटानें कोंकणांत माहुली किल्ल्यापाशीं उतरून तेथून नाणें घाटानें जुन्नरास आला असावा व रस्त्यांत जिजाबाई जाधवरावांच्या हातांत सांपडण्याचा प्रसंग येण्याची चिन्हें सडकून दिसलीं असावीं. परंतु एकंदरींत ती जाधवांच्या हातीं पडली नाहीं असें दिसतें. श्रीनिवासरावाचा व शहाजीचा स्नेह असल्यामुळें जिजाबाईला शहाजीनें शिवनेरीस ठेविलें. मोंगलांनीं माहुलीच्या किल्ल्याला वेढा दिला तो शके १५४९ दिला नसून पुढें दहा पांच वर्षांनीं दिलेला आहे. दौलताबादच्या निजामशाहाची वजिरी व पालकत्व करण्याचा शके १५४९ त शहाजीनें घाट घातला होता त्याचा हा असा विपरीत परिणाम झाला. दौलताबादची वजिरी करण्याचा प्रसंग शहाजीस दोनदां आलाः- शके १५४९ त पहिल्यांदा व शके १५५५ त दुस-यांदा. शके १५४६ तील वजिरीचा ग्रांट डफनें उल्लेख केला नाहीं. तसेंच शके १५५५ पर्यंत जिजाऊ जाधवांच्याकडे होती, म्हणून ग्रांट डफ म्हणतो (Duff. chap. III), त्यालाहि कांहीं आधार दिसत नाहीं. जुन्नरास अंमल श्रीनिवासरावाचा असल्यामुळें तेथें जाधवांचा रिघाव होणें कठीणच होतें. शिवाय, आपल्या वयाचीं पहिलीं पांच वर्षें शिवाजीनें शिवनेरीस घालविलीं म्हणून शिवदिग्विजयाच्या शेवटीं लिहिलें आहे (शिवदिग्विजय, ४६९), त्या अर्थी शके १५४९ पासून शके १५५५ पर्यंत जिजाऊ जाधवांकडे नसून शहाजीच्या जहागिरींत शिवनेरीसच होती हें स्पष्ट आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु ॥ समान अशर मया व अलफ सन ११२७ फसली,
अव्वल साल छ २६ जमादिलाखर, १६ मे १७१७,
ज्येष्ठ वद्य ११ शके १६३९.
दाऊदखान मेल्यावर सय्यदांचे अनिष्टाविषयीं मराठयांस गुप्तपणें फरोकसेर लिहीत असे. व दाभाड्याचा जय झाल्यामुळें मराठे प्रबळ होऊ लागले. या कारणानें दाऊदखान यानें चौथाई दिली असतां सरदेशमुखी बळेंच घेऊ लागले. बादशहाचा कृत्रिमपणा व मराठे लोकांचा उपद्रव यामुळे शेख हुसेन याचे मनांत शाहू महाराज यांशी स्नेह करून असावें असें आलें. त्या वेळेस शंक्राजी मल्हार, पूर्वी राजाराम महाराजानी सचिवपद करून दिल्हें तो काशीस गेला होता, तो कारभारावर सय्यदापाशी होता व त्याचा स्नेह साता-यास बहुत लोकांशी होता. सबब त्याला शाहूशी बोलणे करण्यास पाठविला. तेव्हा शाहू महाराजाचें बोलणे पडले की, सहा सुभे दक्षणची चौथ व सरदेशमुखी व हैदराबाद आणि विजापूर व कर्नाटक, ह्मैसूर व त्रिचनापल्ली व तंजोर यासंबंधी मुलूख व खानदेश खेरीज करून दक्षणेत जो शिवाजीनें मुलूख१०१०+ घेतला त्याच्या सनदा पातशाहाकडून मिळाव्या. व शिवाय गोंडवण व व-हाड यांतील मुलूख कान्होजी भोसले यांनी घेतला आहे. तो व आपली मुलेंमाणसें दिल्लीस आहेत, ती आह्माकडे पावती करावी. ही कामें झाली असतां मोंगल पातशहास आपण वर्षास एक कोट खंडणी देऊं, व सरदेशमुखीबद्दल मुलखांत चोरी वगैरे होऊ देणार नाहीं. असा बंदोबस्त करून व कांही नजरहि देऊन चौथाईबद्दल १५००० पंधरा हजार फौजेनिशीं पातशाहाची चाकरी करूं व कोल्हापूरकर राजाराम महाराज यांचा पुत्र संभाजी याचा उपद्रव होऊ देणार नाहीं. असे बोलणें झालें तें बहुतकरून सैदांनी मान्य केलें. हा तह झाल्यावर सालमजकुरी दिल्लीस पातशाहास कळला. त्यास ठीक वाटलें नाहीं. त्यावरून सय्यदास वाटलें की हा आपला द्वेष करतो यास्तव यास पदच्युत करावा. ह्मणून शाहूजवळ त्यानी मदत मागितली. ती देणें आपले हिताचेंच आहे असे समजून शाहू महाराज यांनी बाळाजी११ विश्वनाथ पेशवे याजबरोबर खंडेराव दाभाडे व उदाजी पवार व कान्होजी भोसले यांस बलाविलें. ते न येतां आपले सख्खे चुलत बंधु संताजी व राणूजी भोसले यांस पाठविलें. ते व आणखी सरदार फौजसुध्दा बाळाजी विश्वनाथ यांनीं बराबर आपला पुत्र बाजीराव व बाळाजी महादेव भानू फडणीस घेऊन दिल्लीस निघाले. निजामुन्मुलूख याचीहि भेट घेऊन त्याजकडील फौजहि दर राऊतास एक रुपया करून १२००० लोक बराबर घेतले. निजामांनी पेशवे यांस भाईचारा ह्मणजे मेजवानी केली. दिल्लीस निघते वेळी आणखीहि शाहू महाराज यांनी पेशवे यांस सुचविलें की दौलताबाद व चांदा किल्ला कसेंहि करून घ्यावा, व गुजराथ व माळवा यांचीहि सनद करून घ्यावी. दिल्लीस सय्यदांसुध्दा फौज पोहोंचल्यावर उभयता सय्यदांनी फेरोकेसर बादशहास डोळ्यांत सळई घालून डोळे फोडून ठार मारून टाकिले. फेरोकेसर बादशहा वारल्यावर त्याचे जागी दुसरा बादशहा पुढील साली बसला, ती हकीकत पुढील सालांत दाखल केली आहे. फत्तेसिंग भोसले यास मोकासे वगैरे अंमल सरंजाम या सालीं निराळा करून दिल्हा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
मल्हार रामराव दृष्टान्त शके १५२५ त म्हणजे इ. स. १६०३ त झाला म्हणून म्हणतो तें अर्थात् टाकाऊच धरिलें पाहिजे. ग्रांट डफनें ही गोष्ट शके १५२१ नंतर झाली असें धरून कांहीं विसंगत विधानें केलीं आहेत. जाधवरावानें आपली मुलगी शहाजीला देण्याचें नाकारल्यामुळें मालोजी हट्टास पेटला व आपली स्थिति सुधारण्याकरितां तो दरवडे घालून पैसा जमवूं लागला व दृष्टान्तानें पैसा मिळाला हें केवळ मालोजीचें ढोंग होतें वगैरे विधानें डफनें केलीं आहेत. परंतु तीं बराबर नाहींत. मालोजीला भुमिगत द्रव्य शके १५१५ त सांपडलें. त्याच्या जोरावर दोन चार हजार घोडीं ठेवून तो जाधवरावांची बराबरी करूं लागला. शके १४९९ त आपल्या वयाच्या २७ साव्या वर्षी (डफ म्हणतो त्याप्रमाणें २५ व्या वर्षीं नव्हे) लुकजी जाधवरावाच्या पदरीं मालोजीनें शिलेदारी करण्याचें आरंभिलें, तें शके १५२१ च्या रंगपंचमीच्या पुढें त्यानें सोडून दिलें. एका स्वतंत्र पथकाचा तो धनी बनला व जाधवरावाच्या विरुद्ध कामें करूं लागला. आपला मेव्हणा जगपाळ नाईक निंबाळकर याच्या सहाय्यानें मालोजीनें दौलताबादेजवळील एका मशिदींत मेलेलीं डुकरें नेऊन टाकिलीं. जाधवराव यवनांचा मनसबदार, तेव्हां यवनांचा द्वेष करणा-या पक्षांत मिळणें किंवा त्या पक्षाचा पुढाकार करणें मालोजीला त्या वेळीं हिताचें दिसलें. ही हकीकत १५२३, १५२४ च्या सुमाराला झाली असावी. त्या वेळीं निजामशाही अगदीं डबघाईस आलेली होती. अकबराच्या सरदारांनीं अहमदनगर १५२२ त घेऊन बहादूरशहास सालेरीस कैदेंत ठेविलें; चांदबिबी मरून गेली; व निजामशाह दौलताबादेस पळून गेला. तेथेंहि अकबराच्या सरदारानीं दुस-या मूर्तिजाशहास शह देण्यास कमी केलें नाहीं. अशा वेळीं मालोजीनेंहि पुंडावा आरंभिलेला पाहून, त्याला आपल्या बाजूला ओढून घेणें दौलताबादच्या मुत्सद्यांस जरूर पडले. जाधवरावांचें व मालोजीचें त्यांनीं सख्य करून दिलें, मालोजीचा मुलगा शहाजी यास जाधवरावाची मुलगी शके १५२५ च्या वैशाखमासीं अथवा ज्येष्ठ शुद्ध दशमीस (शिवप्रताप २४) म्हणजे इ. स. १६०४ च्या एप्रिल महिन्यांत देवविली व खुद्द मालोजीस पंचहजारी मनसबदाराचीं वस्त्रें लग्नाच्या आधीं त्याच वर्षाच्या चैत्र वद्य ५ स म्हणजे २६ मार्च १६०० त दिली. मालोजी ह्या वेळेपासून खराखुरा पातशाही मनसबदार झाला. फौजेच्या खर्चाकरितां त्याला कांहीं ठाणीं व किल्ले नेमून दिलेले होते (शिवदिग्विजय ४४). सध्याचे पुणे, नाशीक, अहमदनगर व खानदेश इतक्या जिल्ह्यांतून हीं ठाणीं पसरलेलीं होतीं. पैकीं खानदेशांत १५२२ च्या आधींच अकबराचा थोडासा अंमल झालेला होता व पुणें, नाशिक ह्या जिल्ह्यांतील डोंगराळ प्रदेशांत पुंडांनीं अस्वस्थता माजविली होती. नगरहि अकबराच्या ताब्यांतच होतें. सारांश, मालोजीला मिळालेलीं जहागीर बहुतेक मोंगलांच्या ताब्यांतील प्रांतांतून किंवा प्रांताच्या सरहद्दीच्या शेजारीं अशीच होती. असली जहागीर जतन करण्यास मालोजी सारखाच उपद्व्यापी व पराक्रमी मनुष्य पाहिजे होता. मालोजीच्या पराक्रमांचा प्रताप आपल्या प्रांतांतून दृष्टोत्पत्तीस न येतां मोंगलांच्या प्रांतांतून दृग्गोचर व्हावा असा हेतु, ही असली जहागीर मालोजीला देण्यांत दौलताबाद येथील मलिकंबरादि मुत्सद्यांचा असावा हें स्पष्ट आहे. मोंगलांशीं झगडण्यांत मालोजीचें मलिकंबराला बरेंच साहाय्य झालें असावें असें दिसतें. उत्तरेस अशेर व ब-हाणपूर ह्या ठाण्यापासून दक्षिणेस पेडगांवांपर्यंत म्हणजे मोंगलांच्या हद्दीपासून विजापूरच्या आदिलशाहीच्या हद्दीपर्यंत मालोजीची जहागीर सैरावैरा पसरली असल्यामुळें, निजामशाहाच्या प्रत्येक लढाईंत मालोजीचा कांहींना कांहीं तरी हितसंबंध असे. कांहीं व-हाडांतीलहि परगणे मालोजीच्या जहागिरींत होते म्हणजे खुजिस्ते बुनियाद अथवा दौलताबाद प्रांतांच्या भोंवतीं उत्तरेस, पूर्वेस, व दक्षिणेस मालोजीची जहागीर पसरली होती. ही जहागीर मोंगलांच्या, विजापूरकरांच्या व पुंडांच्या तडाक्यांतून सुरक्षित ठेवणें मालोजीस प्राप्त होतें. ह्या सुरक्षिततेच्या व्यवस्थेंत मालोजीचें बहुतेक आयुष्य गेलें व तींतच भोसल्यांच्या राज्यलक्ष्मीचा प्रथमोदय झाला. मालोजीच्या ह्या जहागिरीकडे ग्रांट डफादि इतिहासकारांचे लक्ष्य गेलेलें नाहीं. पुणें व सुपे हे दोन प्रांत मालोजीला जहागीर मिळाले एवढें सांगून ते स्वस्थ बसतात. त्यांना शिवदिग्विजयांतील यादीकडे दृष्टी फेकण्यास अवकाश झाला असता तर मालोजीच्या जहागिरीचें स्वरूप पृथक्करणांतीं त्यांच्या लक्ष्यांत निःसंशय आलें असतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
शिवाजी जातिवंत मराठा होता व त्याच्या घराण्याचा संबंध रजपुतांच्या घराण्यांशी लावण्याला ऐतिहासिक, शारीरिक व वांशिक हरकती अनेक येतात हें वरील विवेचनावरून स्पष्ट आहे. रजपूत व मराठे हे दोघेहि आर्यच होत. परंतु देशपरत्वें ह्या दोघांत शरीराच्या ठेवणीसंबंधानें भेद झाले आहेत हें लक्षांत घेतलें पाहिजे. आतां मराठे रजपूत नाहींत ह्या विधानानें थोडासा गैरसमज होण्याची भीति आहे. मराठे रजपूत नाहींत, ह्यांत तर संशयच नाहीं, पण तेवढ्यानें ते क्षत्रिय नाहींत असें मात्र बिलकुल म्हणतां येत नाहीं. दोन अडीच हजार वर्षांपूर्वीं जेव्हां प्रथम आर्य नर्मदेच्या दक्षिणेंतील प्रांतांत वसाहत करण्यास आले तेव्हां ते आपली चातुर्वर्ण्याची संस्था घेऊन आलेच असले पाहिजेत. त्या वेळचे जे क्षत्रिय तेच सध्यांचे मराठे होत. क्षत्रियांची जात महाराष्ट्रांत नष्ट झाली असा जो एक प्रवाद ऐकूं येतो तो वरील विधानाच्या पुढें फिक्का पडून जातो. ब्राह्मणाची जात जर अद्याप महाराष्ट्रांत आहे तर क्षत्रियांचीच जात महाराष्ट्रांत गुप्त कां व्हावी तें समजत नाहीं. अलीकडील अडीच हजार वर्षांत असा कोणता प्रलय झाला कीं तिनें क्षत्रियांचा लोप व्हावा? महाराष्ट्रांतील क्षत्रियकुलांची परिनालिका अशोकाच्या कालापासून ह्या वेळपर्यंत एकसारखी चालत आलेली स्पष्ट दाखवून देतां येते. ह्या परिनालिकेंत संकर जातींचा समावेश करतां येत नाहीं. अस्सल मराठा क्षत्रियांचा शूद्रादि जातींशीं शरीरसंबंध होऊन जी संतती झाली तिला क्षत्रियांच्या गोटांतून वगळणें रास्त आहे. परंतु ह्या अव्यवस्थित संबंधापासून झालेली संतती अमकीच असें दाखवून देणें अनेक कारणास्तव दुरापास्त आहे.
बखरनविसांनीं दिलेली वंशावळ अविश्वसनीय कां मानावी ह्यालाहि अशीं कारणें आहेत. सजणसिंहापासून कर्णसिंहापर्यंतची वंशावळ केवळ कृत्रिम भासते. ह्या कृत्रिम वंशावळींत सजणसिंहापासून बाबाजीपर्यंत १५ पुरुष दिले आहेत. बाबाजी शके १४५५ विजयनाम संवत्सरीं म्हणजे इ. स. १५३३ त जन्मला. दर पिढीला २६ वर्षें धरिलीं तर सजणसिंहाचा काल शके १०६२ च्या सुमाराला येतो व दर पिढीला २० वर्षें धरिलीं तर शके ११५२ येतो. परंतु सजणसिंह शके १२२५ च्या सुमाराला हयात असल्यामुळें वरील दोन्ही सन त्याला लागू पडत नाहींत. अर्थात, ह्या वंशावळीवर विश्वास ठेवण्यांत अर्थ नाहीं. शिवाजीचें मूळ रजपूत घराण्याशीं जोडून दिलें नाही तरी त्याचें क्षत्रियत्व कांहीं नाहींसें होत नाहीं. शिवाजीची आई जिजाबाई शिंदखेडच्या जाधवांची मुलगी होती. शिंदखेडचे जाधव म्हणजे देवगिरी येथें तेराव्या शतकाच्या प्रारंभीं राज्य करणा-या जाधवांचेच वंशज होत. तेव्हां मातृपक्षाकडून शिवाजी मराठा क्षत्रिय होता हें निःसंशय सिद्ध आहे. भोसल्यांचें कूळ महाराष्ट्रांतील पुरातन क्षत्रियांपैकीं होतें हें मागें सिद्ध करून दाखविलें आहे. त्याअर्थीं पितृपक्षाकडूनहि शिवाजीचें क्षत्रियत्व पूर्णपणें ठरतें. गागाभट्टादि मंडळींस शिवाजीच्या क्षत्रियत्वासंबंधानें शंका आली तिचें कारण त्या मंडळीचे पूर्वांपर इतिहासाचें अज्ञान होय. तें अज्ञान आधाराला घेऊन कृत्रिम वंशावळी ख-या मानण्याच्या भरीस आपण कां पडावें तें समजत नाहीं.
ह्या कृत्रिम वंशावळीचें लटांबर काढून टाकिलें म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वसनीय अशा जागेवर उभे राहिल्यासारखें वाटून पुढील कांहीं भागाचें परीक्षण विशेष भरंवशानें करतां येतें. बाबाजी भोसल्याचा जन्म शके १४५५ विजय नाम संवत्सरीं म्हणजे इ. स. १५३३ सालीं झाला म्हणून बखरकार जें सांगतात तें विश्वसनीय आहे. कां, कीं, ही माहिती बखरनविसांनीं स्वदेशांतील टिपणांवरून घेतली असून वंशावळीप्रमाणें परदेशांतील कृत्रिम टिपणांवरून घेतली नाहीं. बाबाजीच्या बापाचें नांव संभाजीं म्हणून होतें. बाबाजीला मालोजी व विठोजी हे दोन पुत्र अनुक्रमें शके १४७२ साधारण नाम संवत्सरीं व शके १४७५ प्रमादीनाम संवत्सरीं म्हणजे इ. स. १५५० त व १५५३ त झाले. मालोजीला जगदंबेचा दृष्टान्त शके १५१५ विजयनाम संवत्सरीं माघ शुक्ल १५ रविवारीं झाला म्हणून शिवदिग्विजयकार म्हणतो तें खरें आहे. त्यावर्षीं माघ शुक्ल १५ ला रविवारच होता.