Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
६१. समाजचरित्र व समाजशास्त्र यांचा विचार झाल्यानंतर, महाराष्ट्रांतील तत्कालीन सामाजिक ऊर्फ ऐतिहासिक तत्त्वज्ञानाकडे वळणें जरूर आहे. ज्ञानेश्वरापासून भाऊमहाराजापर्यंत जे शेकडों ग्रंथकार महाराष्ट्रांत झाले त्या सर्वांचे ग्रंथ अध्यात्म तत्त्वज्ञानानें ओतप्रोत भरलेले आहेत. ते इतके कीं, महाराष्ट्र सारस्वताचा शेकडा पंचाहत्तर भाग तत्त्वज्ञानात्मक आहे. भगवत्दीता, योगवासिष्ठ, पंचीकरण, उपनिषदें, द्वैत, अद्वैत, पंचमहाभूतें, वगैरे तात्त्विक विषयावर मराठींत अतोनात ग्रंथ झालेले आहेत. ह्याच ग्रंथांना कित्येक लोक धार्मिक अशी संज्ञा देतात. व कित्येक लोक भक्तिमार्गी म्हणतात. परंतु ह्या दोन्ही संज्ञा केवळ भ्रामक होत. हे ग्रंथ केवळ तत्त्वज्ञानाचे आहेत. विठोबा, राम, दत्त वगैरे देवतांची स्तुति अभंगांमधून आढळते, त्यावरून हे ग्रंथ भक्तिमार्गाचे असावे, असा वरवर पहाणाराचा समज होतो. परंतु, परमात्म्याच्या ऐवजी विठोबा, राम, दत्त वगैरे नांवे या ग्रंथकारांनीं योजिलेलीं आहेत, हें ह्या अभंगांतील मजकुराचें पृथक्करण केलें असतां दिसून येतें. शिवाय सामान्य जनांना निर्विकार व निर्लेप अशा परब्रह्माचें आकलन होत नाहीं, सबब नामरूपांकित देवतांची कल्पना करून, त्यांची वृति परब्रह्माकडे वळविण्याचा ज्ञानेश्वरादि तत्त्वज्ञांचा हेतु उघड दिसून येतो. ज्ञानदेव, नामदेव, दासोपंत, एकनाथ, तुकाराम, वग़ैरे साधु ग्रंथकारांनीं हा हेतु स्पष्ट शब्दांनीं बोलूनहि दाखविलेला आहे. धर्माचें मुख्य तत्त्व जो आचार त्याच्यासंबंधानें या साधु ग्रंथकारांच्या व तत्त्वज्ञांच्या ग्रंथांत फारसा नव्हे, मुळींच विचार केलेला नाहीं. आचारासंबंधानें विवेचन करण्याचें काम धर्मशास्त्री संस्कृतांतून करीत. तेव्हां ती आगंतुक कामगिरी तत्त्वज्ञांनीं आपल्या शिरावर घेतली नाहीं. हें रास्तच होतें गुरुचरित्रादि ग्रंथांत आचाराची तुरळक माहिती किचित् दिलेली आहे. परंतु, असले अपवादात्मक ग्रंथ फारच थोडे आहेत. साधू-ग्रंथकारांचा मुख्य कटाक्ष तत्त्वावर आहे. आणि असाच प्रकार होणें रास्त होतें. ऑगस्ट कोंटेनें म्हटल्याप्रमाणें मनुष्यसमाजाचे विचार तीन पाय-यांनीं उद्भूत होत असतात; प्रथम धार्मिक विचारांचा उदय होतो. तो झाल्यावर नंतर तात्त्विक विचारांचे साम्राज्य होतें; आणि शेवटीं शास्त्रीय ज्ञानाचें राज्य होतें. पैकीं ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत महाराष्ट्रांत तत्त्वज्ञानाचें म्हणजे तात्त्विक विचारांचे साम्राज्य होतें. धार्मिक, तात्त्विक, व शास्त्रीय ह्या संस्कृत शब्दांना ऑगस्ट कोंटे Religions, Metaphysical and positive स्वभाषेंत शब्द योजतो. मनुष्यसमाजाच्या ह्या तीन स्थिति एकापाठीमागून एक येतात व दुसरी आली म्हणजे पहिलीचा समूळ लोप होतो, असा अर्थ समजावयाचा नाहीं. तर, विवक्षित काळांत एकेका स्थितीचें विशेष प्राबल्य असतें, इतकाच अर्थ विवक्षित आहे. तात्त्विक विचारांचा राष्ट्रावर पगडा बसला, म्हणजे धार्मिक अगर शास्त्रीय विचारांचा अत्यंत लोप झालेला असतो असा भाग नाहीं; तर हे दोन विचार ह्या वेळेपुतें गौण समजले जातात, एवढेंच सांगण्याचा मुद्दा आहे. कोणत्याहि काळीं कोणत्याहि समाजांत ह्या तिन्ही स्थिति विद्यमान असतात.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
५९. ऐशी वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत इतिहासाची ही अशी संकुचित स्थिति होती. तुलनेचा जेथें अभाव होता, तेथें मानवसमाजशास्त्र उदयास येणें दुरापास्तच होतें. कालपरत्वें देशपरत्वें नाना समाजांच्या नैकविध चरित्रांचें जेव्हां सूक्ष्म अवलोकन करावें, तेव्हां समाजशास्त्राची निर्मिति होण्याचा संभव असतो. यूरोपांत देखील समाजशास्त्र हें नांव निर्माण होऊन साठ सत्तर वर्षे लोटलीं नाहींत. तेव्हां, ऐशी वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत त्या शास्त्राचा उदय झाला नाहीं, ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट नाहीं. तत्रापि, समाजशास्त्रांपैकीं राजनीति म्हणून जी शाखा आहे, तिच्यावर शक १६२२ च्या सुमारास एक ग्रंथ झालेला प्रसिद्ध आहे. तो रामचंन्द्रपंत अमात्य यांनी रचिलेला राजनीतिवरील प्रबंध होय. ह्यालाच “संभाजी राजाची राजनीति” असें दुसरें नांव आहे. ह्यांत राजनीतीचें पद्धतशीर व सशास्त्र विवेचन आहे, असें नाहीं. परंतु, अनेक महत्त्वाच्या व कुशलतेच्या राजनैतिक सूचना ह्या ग्रंथांत सांपडतात. न्याय व नीति हीं राज्याचीं मुळें आहेत, इंग्रजादि जलचरांना राज्यांत रहाण्यास कायमची जागा देऊं नये, वांशिक अस्सलाई लक्षांत घ्यावी, वगैरे अनुभवोत्पन्न शेकडों सूचना मोठ्या मार्मिक आहेत. महाराष्ट्रीय राजनीतीवर जो कोणी ऐतिहासिक पद्धतीनें ग्रंथरचना करूं इच्छील, त्याला हा ग्रंथ अत्यंत उपयोगीं पडेल. राजनीतीवर दुसरा ग्रंथ नानाफडणीसानें सवाई माधवरावाकरितां रचिलेला “नारायणशिक्षा” हा होय. यद्यपि हा सूत्ररूप आहे, तत्रापि ह्यांत अनेक अनुभविक व मार्मिक सूचना आहेत. तिसरा मराठी राजनैतिक ग्रंथ म्हटला म्हणजे चिटणीसकृत राजनीति हा होय. ह्यांत नारद, कणिक, वगैरेंच्या नीतीप्रबंधांतली सटरफटर माहिती एकत्र जुळविलेली आहे. अमात्यांचा किंवा फडणिसांचा अनुभव चिटणिसांना नसल्यामुळें, त्यांचा ग्रंथ महाराष्ट्रीय नीतिशास्राच्या परिशीलनाला फारसा पोषक होण्याचा संभव नाहीं. राजनीतिखेरीज समाजशास्राच्या दुस-या कोणत्याहि शाखेवर किंवा उपांगांवर मराठी ग्रंथरचना त्याकालीं झाली नाहीं.
६०. समाजयंत्र व राज्ययंत्र ह्यांच्यांसंबंधीं धर्मशास्त्रांतून व कामंदक्यादि नीतिशास्त्रांतून जी व्यवस्था सांगितलेली आहे, तीच कालदेशवर्तमानानुसार त्या कालीं मान्य समजली जात असे. पुरातन आर्यसमाजयंत्रांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशी चतुर्वर्णात्मक विभागणी असे, तिच्या ऐवजीं ब्राह्मण व शूद्र अशी द्विवर्णात्मक पद्धंति शक १२२२ पासून १५२२ पर्यंत मान्य समजूं जाऊं लागली. शेटे, महाजन, वगैरे वैश्य जाति यादवांच्या राज्यापासून महाराष्ट्रांतील ग्रामसंस्थांत व नगरसंस्थात चालू होत्याच. परंतु त्यांचा धंदा मारवाड व गुजराथ या दोन प्रांतांतील वाण्यांनीं, मुसुलमानी अमलांत आक्रमून टाकिला. त्यामुळें, महाराष्ट्रांतील शेटे, महाजन वगैरे लोक शेतीवर उदरनिर्वाह करूं लागले. महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीचें विवेचन करतांना, वैश्यजातींच्या धंद्यांत झालेल्या ह्या क्रांतीचा विचार करणें अत्यवश्यक आहे. मुसलमानी अमलांत क्षत्रियांचाहि धंदा लुप्त झाल्याकारणानें, तेहि लोक शेतीवरच निर्वाह करूं लागले आणि त्यांच्यापैकीं ब-याच कंगाल लोकांचा अंतर्भाव शूद्रादिवर्गांत चुकीनें व संकरानें होऊं लागला. ब्राह्मणांपैकीं ब-याच पोटजाती शूद्रादिकांचा व्यवहार करूं लागल्या आणि त्यांचाहि समाहार भ्रष्ट अथवा पतित ब्राह्मणांच्या वर्गांत होण्याचा प्रसंग जवळ येऊन ठेपला. अशा संकटसमयीं शहाजी व शिवाजी राजे भोसले आणि रामदास, दादोजी कोंडदेव, निळो सोनदेव, वगैरे क्षत्रिय व ब्राह्मण यांनी स्वधर्माचें म्हणजे स्वतःच्या कर्तव्याचें पुनरुजीवन करून महाराष्ट्रांतील चातुर्वर्ण्य बरेंच पुनरुज्जीवित केलें. समाजयंत्राचे पुरातन विभाग मुसुलमानीं अमलांत जे लुप्त होऊं पहात होते, ते पुन: उदयास आले आणि पुरातन धर्मशास्रांचा व व्यवहाराचा पुन: मेळ बसूं लागला. ह्या मेळाचा परिणाम असा झाला कीं, समाजयंत्र व राज्ययंत्र ह्यांच्यासंबंधींच्या पुरातन कल्पनाच त्या कालीं यथास्थित पटल्या गेल्या आणि नवीन धर्मग्रंथ मराठींत करण्याचें कारण पडलें नाहीं. कायद्याचे जे निरनिराळे विभाग आहेत, ते रूढि व शास्त्र ह्यांच्या पायांवर उभारले गेले आणि प्राचीन व अर्वाचीन समाजव्यवस्थेची एकवाक्यता झाली. शक ११०० पासून शक १७२२ पर्यंत महाराष्ट्रांतील कायदेपंडितांनीं शेंदीडशें धर्मप्रबंध त्या त्या स्थितीला व रूढीला अनुलक्षून पुरातन श्रुतिस्मृतींना न सोडतां रचिलेले आहेत. सारांश, समाजयंत्र व राजयंत्र यांना अनुलक्षून ११०० पासून शक १७२२ पर्यंत बराच ग्रंथसमूह संस्कृतांतून व मराठी पंचायतींतून झालेला आहे. ह्या विस्तृत व प्रचंड सारस्वताचें पृथक्करण व एकीकरण कुशल व विद्वान् कायदेपंडितांची व इतिहासज्ञांची प्रतीक्षा करीत आहे. धर्मग्रंथांचें व पंचायतीचें पृथक्करण व एककिरण झाल्यावांचून, महाराष्ट्रीय समाजयंत्राचीं गुह्यें नीट उलगडणार नाहींत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शक १७४० पर्यंत ज्या दोन अडीचशें लहानमोंठ्या बखरी झाल्या, त्यांत परदेशाची किंवा परसमाजाची नांवाला देखील एक बखर नाहीं. महाराष्ट्रांतील मुसुलमानी राजांच्या दोन चार बखरी आहेत. परंतु त्या बहुतेक हिंदुरिवाज ग्रहण केलेल्या मुसुलमानांच्या आहेत. अहिंदु समाज सोडून, हिंदुस्थानांतील सधर्मीय जे बंगाली, पंजाबी, गुजराथी, रजपूत, द्राविड वगैरे समाज त्यांचा जरी इतिहास लिहिण्याचा प्रयत्न तत्कालीन मराठ्यांनीं केला असता, तरी देखील तुलना बुध्दि त्यांच्यांत निपजली असती आणि पध्दती व शास्त्र यांची निश्चित कल्पना त्यांना आली असती. इंग्रज, फ्रेंच, डच, फिरंगी वगैरे ताम्रमुखांचा संसर्ग मराठ्यांना बराच झाला होता. त्यांची एखादी लहानशी तरी बखर तत्कालीन बखरींत सांपडेल, अशी माझी फार दिवसांची अपेक्षा होती. परंतु, ती अद्याप सफल झाली नाहीं. बहुश: अशी बखर नसावी, असेंच कबूल करणें भाग पडतें. येणेंप्रमाणें परदेशांतील समाज, संस्कृति व शास्त्र यांची तुलना स्वदेशांतील समाज, संस्कृति व शास्त्र यांशी करावयाला न सांपडल्या मुळें, मराठी बखरकारांच्या इतिहासलेखनांत पध्दती व शास्त्र यांचा तर अभाव आहेच. परंतु दुसरीहि एक मोठी उणीव आहे. झाल्या प्रसंगाची हकीकत नाना बाजूंनी कशी द्यावी, यांची कल्पना त्यांना आली नाहीं. त्यामुळें होतें काय कीं व्यक्ति, काल व स्थल बदलून पाहिलें असतां, सर्व बखरींचें रूप सारखें एका मासल्याचें दिसतें. अवलोकन, पृथक्करण, टीका, व पध्दती ह्यांचा मागमूसही या बखरींतून नाहीं. तुलनेच्या अभावामुळें हा दोष होतो. ह्याच्याशिवाय दुसरा दोष म्हणजे संशोधनाभाव होय. आपल्यापूर्वी कोणीं काय लिहिलें आहे, आपण ज्या लोकांचा इतिहास लिहीत आहों, त्यांचा पूर्व व प्राचीन इतिहास काय आहे व त्याचीं साधनें कशीं मिळतील, ही विवंचना ह्या बखरकारांना पडलीच नाहीं. कारण, स्वदेशाचा पूर्व किंवा प्राचीन इतिहास लिहिण्याच्या भानगडींत ते शिरलेच नाहींत कित्येक बखरींच्या प्रारंभी पुराणांतील व तवारिखांतील राजांच्या व पातशाहांच्या अर्ध्याकच्या यादी दिलेल्या आढळतात. परंतु त्यांना इतिहास हें बडें नांव देण्याचें धाष्टर्य करवत नाहीं. सारांश, देश व काल ह्या दोन्ही दृष्टींनीं हे बखरकार पंगू होतें, असें म्हणणें प्राप्त होतें. दिशाभूल झाल्यामुळें परदेशांच्या इतिहासांचे अज्ञान कायम राहिलें व कालभूल झाल्यामुळें स्वदेशाचाहि प्राचीन इतिहास समजण्याला मार्ग राहिला नाहीं. स्वतःचा पूर्वेतिहास किंवा परकीयांचा प्राचीन व समकालीन इतिहास ह्यांच्या परिशीलनानें व तुलनेनें दृष्टीला वैशद्य, बुद्धीला प्रागल्भ व मनाला विचक्षणत्व जें येतें, तें शक १७४० पर्यंतच्या महाराष्ट्रांतील बखरकारांना आलें नाहीं. स्वदेशाचें स्वकालीन चरित्र स्वत:च्या प्रत्यक्ष किंवा ऐकीव माहितीनें जेवढे लिहितां येण्याजोगें होतें, तेवढें मात्र त्यांनी सत्यापलाप न करतां लिहिलें. ह्या संकुचित एकदेशीयत्वाचा परिणाम कूपमंडुकन्यायाने बुद्धिमांद्याच्या रूपानें फळास आला. सकलमानवजातीच्या घटनेंत व भ्रमणांत आपली स्थिति दिक्कालावच्छेदानें कोठें आहे, हें सूक्ष्म दृष्टीनें वारंवार पाहिल्यानें अवलोकनाची व तुलनेची मर्यादा विस्तार पावते आणि स्वदेशाच्या व स्वसमाजाच्या चरित्राचें अनेक अंगांनीं वर्णन करण्याचें सामर्थ्य येतें. सारांश, तुलनेच्या साहाय्यानें अवलोकनाच्या बाबी वाढतात, ही गोष्ट ह्या बखरकारांच्या मनांत बिलकुल उतरली नव्हतीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
५८. झाली हकीकत, समजली तशी, आपल्या ज्ञानाच्या आंवाक्याप्रमाणें, लिहून ठेविणारे बखरकार शंभर वर्षांपूर्वी आपल्या देशांत झाले, ही मोठ्या समाधानाची गोष्ट आहे. परंतु ह्या सर्व बखरकारांच्या ज्ञानाची व्याप्ति अत्यंत संकुचित होती, हीहि गोष्ट सांगितल्याशिवाय गत्यंतर नाहीं. झाली हकीकत, जशीची तशी, सर्वांगांनीं संपूर्ण, अशी देणें मोठें बिकट कृत्य आहे. एखाद्या वैदूला राष्ट्रसभेची जी हकीकत देतां येईल, त्यापेक्षां विस्तृत हकीकत एखादा दशग्रंथी ब्राह्मण देईल; आणि दशग्रंथी ब्राह्मणापेक्षां विस्तृत व कदाचित् कार्यकारणभावसंबंधक हकीकत एखाद्या आधुनिक विद्याधराला देतां येईल. परंतु, यूरोपांतील राज्ययंत्राचा ज्यानें आजन्म अभ्यास केला आहे आणि यूरोपीयन व आशिआटिक अशा अनेक संस्था, शास्त्रें व समाज ह्यांचें पृथक्करण करण्यांत ज्यानें वर्षेच्या वर्षे घालविलीं आहेत, अशा एखाद्या चतुरस्र इतिहासज्ञानें जर राष्ट्रसभेचें चरित्र लिहिण्याचें मनांत आणिलें, तर हजारों स्थूल व सूक्ष्म, प्रसिद्ध व गुप्त, क्षुल्लक व महत्त्वाच्या प्रसंगांचें योग्यायोग्यत्व, लघुत्वमहत्त्व व कार्यकारणत्व दाखवून तो जी हकीकत साध्या व समर्पक भाषेनें सांगेल तिच्यांत व उपरिनिर्दिष्ट तिघांच्यांत केवढें थोरलें अंतर पडेल ! चौघांनाहि द्यावयाची आहे झालेली हकीकतच. परंतु ज्याच्या त्याच्या अवांतर ज्ञानाच्या विस्तारा मुळें प्रत्येकाच्या हकीकतीचें वैचित्र्य निरनिराळ्या दर्जाचें उठेल, हें उघड आहे. हेंच अवलोकन—वैचित्र्य इतिहासलेखनांतहि दृष्टोत्पत्तीस येतें. ज्या देशांतील लोक देशोदेशीं प्रवास करतात, देशोदेशींचे समाज, धर्म, सारस्वत, संस्था, संस्कृति व इतिहास पाहून तुलनात्मक विचार करण्याची जेथें संवय झाली व देशांतल्या देशांत भौतिक शास्त्रांचें जेथें प्रणयन चाललें आहे, त्या देशांतील इतिहासकार झालेली हकीकत पध्दतशीर त-हेनें ज्या वैचित्र्यानें लिहितील तें वैचित्र्य परदेशांना बहिष्कार घालणा-या व परदेशीयांना अस्पर्श समजणा-या देशांतील इतिहासाकारांच्या हकीकतींत कसें येईल? अलीकडील पन्नास वर्षातल्या किंवा शेंदीडशें वर्षांतल्या यूरोपीयन इतिहासकारांशी मराठी बखरकारांची मी तुलना करीत नाही; तर दीडशें वर्षांपलीकडीस यूरोपीयन इतिहासकारांशीं करीत आहे. हे दीडशें वर्षांपलिकडले पाश्र्यात्य इतिहासकार मोठे नामांकित होते, अशांतला भाग नाहीं. कालानुक्रम कशाशीं खावा, ऐतिहासिक सत्य म्हणजे काय, पध्दती म्हणजे काय चीज आहे, वगैरे गूढें तत्कालीन पाश्र्चात्य इतिहासकारांना उकलली नव्हती, हें खरें आहे. ह्या इतिहासकारमन्यांची बकलनें उडविलेली टर सर्वश्रुतच आहे. सध्यांच्या मानानें पहातां तत्कालीन यूरोपीयन इतिहासकारांची यद्यपि इतकी निकृष्ट दशा होती, तत्रापि इतकें कबूल केलें पाहिजे कीं, तत्कालीन मराठी बखरकारांपेक्षां त्यांची दृष्टि जास्त विस्तृत झालेली होती. स्वदेशाच्या पलीकडे पृथ्वीवर अन्य देश आहेत व त्यांचे इतिहास लिहिल्याशिवाय मानव समाजाचा साद्यान्त इतिहास लिहितां यावयाचा नाहीं, हा सिध्दान्त त्यांना कळून चुकला होता. हा सिध्दान्त मराठी बखरकारांच्या स्वप्नींहि आलेला नव्हता.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
५६. नि:पक्षपात व निरहंकार बुद्धीनें इतिहास लिहिणें म्हणजे काय, ख-या व निर्भेळ इतिहासाचें रूप कसें असतें, तो लिहिण्याच्या सशास्त्र पद्धती कोणत्या, प्रसारक इतिहास कशाला म्हणावें, अभिमानी इतिहास कशाकरतां लिहितात, व इतिहासविकृति म्हजे काय चीज आहे, वगैरे प्रकरणांचें संक्षिप्त दिग्दर्शन येथपर्यंत केलें. आतां महाराष्ट्रांत इतिहासलेखनाची हालहवाल कशी काय आहे, तें पाहूं.
५७. संस्कृत भाषेंत इतिहास व मराठी भाषेंत बखर ज्याला म्हणतात तो सारस्वताचा प्रकार संस्कृतांत व मराठींत फार पुरातन कालापासून असावा, हें ह्या दोन शब्दांच्या अस्तित्वावरून अनुमानतां येतें. संस्कृत इतिहासाचा विचार प्रस्तुतस्थलीं कर्तव्य नसल्यामुळें, प्राकृत व मराठी भाषांतील बखरींपासून महाराष्ट्रांतील इतिहासलेखनाचा इतिहास देण्यास प्रारंभ करणें सयुक्तिक आहे. बक=बकणें, बोलणें, ह्या धातूपासून बखर शब्द मराठींत निपजला आहे. ह्यावरून असें अनुमान करावें लागतें कीं, फार पुरातन कालीं बखरी तोंडानें बोलत असत, हातानें लिहीत नसत. तोंडानें बखरी बोलण्याचा हा काल दोन अडीच हजार वर्षांपलीकडील असावा. कारण, अलीकडील अडीच हजार वर्षांत जेव्हां लेखनकला माहीत नव्हती, असा काळ महाराष्ट्रांत आढळत नाहीं. जींत इतिहासाचा कांहीं अंश सांपडतो अशी अत्यंत जुनी मराठी बखर म्हटली म्हणजे शालिवाहनाची बखर होय. ह्या बखरीच्या सध्यां ज्या पोथ्या सांपडतात, त्यांची भाषा लेखकांनीं परंपरेनें आधुनिक करून टाकिली आहे. परंतु, मूळ फार जुनें असावें यांत संशय नाहीं. शालिवाहनाच्या बखरीपुढील जुन्या बखरी मानभावांनीं लिहिलेल्या सिंघणादि यादवांच्या आहेत. ह्या बखरींपैकी काहींची पानें मीं पाहिलीं असून, ह्यांची भाषा जुनी आहे. यादवांच्या बखरींच्या बरोबरीचीच हेमाडपंताची बखर समजावी लागते. हिचीहि भाषा लेखकांनीं आधुनिक केली आहे. हेमाडपंतांच्या बखरीच्यापुढील बखर राक्षसतागडीची आहे. ही मुळीं शक १४८८ त लिहिली असून भाषा बरीच तत्कालीन आहे. शक १४८८ च्या नंतर पांचपंचवीस वर्षांनीं भोसल्यांचे कुळ महाराष्ट्रांत उदयास आलें व स्वराज्याचा पाया घातला गेला. तेव्हांपासून शक १७४० पर्यंतच्या अडीचशें वर्षांत ह्या देशांत दोन अडीचशें बखरी मराठ्यांच्या इतिहासांतील निरनिराळ्या प्रसंगांवर लिहिल्या गेल्या. ह्या अडीचशें बखरींत पांचपंचवीस ओळीच्या त्रोटक टिपणापासून हजार हजार पानांच्या बाडापर्यंत संक्षिप्त व विस्तृत इतिहास आले आहेत. टिपणें, रोजनिशा, शकावली, वंशवेल, हकीकती, कुळकट, आत्मचरित्र, राजावलि, अखबारा, दंतकथा, लोककथा, पवाडे, प्रशस्त्या, घराण्यांची वर्णनें, युध्दांचीं वर्णनें, मोहिमांचीं वर्णनें, राजनीति, स्मरणवह्या, ताम्रपट, शिलालेख, शिलशिले, दफातीं, निवाडे, ऐतिहासिक लेखसंग्रह, संतचरित्रें, बखरी व इतिहास, अशीं इतिहासाचीं जीं नाना अंगें व उपांगें तीं ह्या काळांत निर्माण झालीं. त्यांपैकीं कित्येक अत्यंत वकृत्वप्रचुर असून, कित्येकांत प्रसंगांचें कथन साध्या व सोप्या भाषेंत फार हृदयंगम केलें आहे. ह्या सर्व बखरींत व हकीकतींत असा एक मोठा अद्वितीय गुण आहे कीं, प्राय: झाल्या प्रसंगाची हकीकत सांगतांना सत्याचा अपलाप जाणूनबुजून कोंठोंहि केलेला नाहीं. त्यांची कांहीं विधानें जर सध्यां अविश्र्वसनीय भासूं लागलीं, तर त्याचें कारण लेखकांचा असत्याभिमान नसून, त्यांचें अज्ञान किंवा गैरसमजूत आहे, असें आढळून येतें लेखकांच्या ज्ञानाच्या व्याप्तीच्या प्रमाणें लेखांतील माहिती नाना प्रकारची आहे. प्रत्यक्ष व कर्णोपकर्णी जी माहिती जशी मिळाली, तशी ती टिपून ठेविलेली ह्या बखरींतून आढळते. यूरोपांतील राष्ट्रांच्या अडीचशें वर्षांपूर्वील ज्या बखरी, हकीकती वगैरे आहेत त्यांच्यापेक्षां ह्या बखरी सरस असून विश्वसनीयतेच्या बाबतींत जास्त मान्य आहेत. तीनशें वर्षांपूर्वी यूरोपांतील राष्ट्रांतील जी स्थिति होती, तीपेक्षां शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रदेशाची स्थिति ब-याच बाबतींत श्रेष्ठ होती, ही गोष्ट लक्ष्यांत घेतली असतां, ह्या बखरींच्या गुणोत्कर्षाचें कारण निराळें धुंडाळावयास नको.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
५५. प्रसारक वर्गांतील कित्येक इतिहास विशिष्ट मतांच्या किंवा संस्थांच्या पक्षपातानें मुद्दाम लिहिलेले असतात. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा व स्वसंस्कृति सर्व जगांत श्रेष्ठ आहेत व परदेश, परधर्म वगैरे कनिष्ठ आहेत, असें प्रतिपादन करण्याची असल्या इतिहासाची प्रतिज्ञा असते. परदेश जिंकण्याची व स्वदेशाला उत्कर्षाप्रत नेण्याची हांव धरणा-या राष्ट्रांत बहुतेक प्रसारक इतिहास स्वदेश, स्वधर्म, स्वभाषाभिमानी असतात स्वदेशाभिमानी लेखकांच्या हातून असला प्रकार होणें रास्तच आहे. कोंवळ्या व अपरिपक्क बुद्धीच्या माणसांच्या ठायीं स्वदेशादिकांबद्दल प्रेम उत्पन्न करावयाला स्वदेशाभिमानीच इतिहास हवा असतो. स्वदेश भिकार, स्वराष्ट्र कुचकामाचें, स्वभाषा दरिद्री, स्वधर्म खोटा, स्वजन लुचे, व स्वत: चे आईबाप अडाणी, असें वर्णन स्वदेशाच्या ज्या इतिहासांत केलेलें असतें, ते वाचून कोंवळ्या व अपरिपक्क बुध्दीच्या माणसांना स्वदेशादिकांविषयीं प्रेम कसें बेरें उत्पन्न होईल? परंतु असलेहि इतिहासकलंक कित्येक देशांत प्रत्यक्ष देशांतल्या लोकांच्या हातून निर्माण होतात! असल्या इतिहासांना स्वदेशावमानी इतिहास अशी संज्ञा आहे. स्वदेशावमानी इतिहास लिहिणारेच स्वशालोपयोगी परदेशाभिमानी इतिहास लिहित असतात. स्वदेशावमानी व परदेशाभिमानी अशा इतिहासकाराधमांची ही दुक्कल स्वतंत्र राष्ट्रांत क्षणभरदेखील टिकत नाहीं; त्यांची वाढ परतंत्र राष्ट्रांतच शक्य असते. हे अभिमानी इतिहास नाना प्रकारचे असतात. कित्येकांत राज्ययंत्राचा अभिमान, कित्येकांत राजाचा अभिमान,कित्येकांत महाजनांचा अभिमान, कित्येकांत सुधारणेचा अभिमान व कित्येकांत स्वजातीचा अभिमान ओतप्रोत दाखविलेला असतो. अशा हेतूनें कीं, अजाण वाचकांना इष्ट व्यक्तीचा, वर्गांचा किंवा मताचा योग्य व क्कचित फाजिलहि अभिमान उत्पन्न व्हावा. हे अभिमानी इतिहास केवळ इतिहास नव्हत, तर मतलबी लोकांच्या मतांची प्रसरणद्वारेंहि होत. वाईट मतलबाप्रमाणें चांगल्या मतलबाच्याहि सिद्धीला असल्या विकृत इतिहासांचा उपयोग होतो. प्रसारक इतिहासांचे अनेक प्रकार आहेत; पैकीं कांहींचा येथें निर्देश करतों:-
(१) शालोपयोगी इतिहास.
(२) पाठशालोपयोगी इतिहास.
(३) स्वदेशाभिमानी इतिहास.
(४) स्वदेशावमानी इतिहास.
(५) परदेशाभिमानी इतिहास.
(६) परदेशावमानी इतिहास.
(७) स्वराज्याभिंमानी इतिहास.
(८) लोंकाभिमानी इतिहास.
(९) महाजनाभिमानी इतिहास.
(१०) धर्माभिमानी इतिहास.
(११) व्यक्तभिमानी इतिहास.
(१२) सुधारणाभिमानी इतिहास.
(१३) स्वजात्यभिमानी इतिहास.
(१४) स्वभाषेंत लिहिलेला स्वदेशाचा इतिहास.
(१५) स्वदेशांतील लोकांकरितां परभाषेंत लिहिलेला स्वदेशाचा इतिंहास. वगैरे, वगैरे, वगैरे.
चवथ्या, पांचव्या व पंधराव्या नंबरचे प्रसारक इतिहास स्वतंत्र राष्ट्रांत असूं शकत नाहींत; परतंत्र राष्ट्रांत असूं शकतात. कारणें खोल नसल्यामुळें, त्यांचा निर्देश करून जागा अडवीत नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
त्यावरून मुकुंदराज ज्ञानेश्वराच्या समकालीन किंवा किंचित् अगोदर झाला असावा असें वाटतें. विवेकसिंधूच्या सध्यांच्या ज्या छापील प्रती आहेत त्या जोगाईच्या आंब्यास असणा-या दुर्बोध मूळप्रतींवरून साक्षात् केलेल्या नसून, विवेकसिंधूची वाचतां येण्यासारखी व अर्थात् अर्वाचीन लोकांस समजण्यासारखी दुसरी एक प्रत आंब्यास आहे तीवरून केलेल्या आहेत, असें सांगतात. विवेकसिंधूखेरीज ज्ञानेश्वरांपूर्वी मराठींत दुसरी ग्रंथरचना झाली होती हें सिद्ध करण्यास एक साधन आहे. ज्ञानेश्वरानें निवृत्तिनाथ, गयणीनाथ, गोरखनाथ, मछंद्रनाथ अशी आपली गुरूपरंपरा दिली आहे. पैकीं गोरखनाथाची गोरखमत ह्या मथळ्याखालीं कांहीं वाक्ये कित्येक पंचागांत देत असतात. गोरखनाथाची एक शकुनवंतीहि प्रसिद्ध आहे. प्रत्येक गुरुशिष्यांत २५ वर्षांचे अंतर धरल्यास गोरखनाथ इ. स. ११०० च्या सुमारास असावा असें होतें. ह्या ११०० च्या शंभर दीडशें वर्षे अगोदरचे मराठी ग्रंथ म्हटले म्हणजे मानभावांचे गुप्त लिपींत लिहिलेले कांहीं जुने ग्रंथ होत. मानभावी जुने ग्रंथ जसेचे तसे छापून बाहेर पडल्याशिवाय ज्ञानेश्वरांच्या पूर्वीच्या मराठीसंबंधानें विशेष कांही लिहिता येणार नाहीं. मानभावांच्या अगोदर मराठींत कांही ग्रंथ होते कीं नव्हते वगैरे विधान करण्यास प्रस्तुत लेखकाला काहींच आधार माहीत नाहीं.
शिवाजीच्या वेळेपासून ज्ञानेश्वराच्या वेळेपर्यंतचे जे हे लेख दिले त्यांपासून (१) १२९० पर्यंत सर्व महाराष्ट्रांत, व १३९५ पर्यंत, कदाचित् पुढेंहि कांहीं काळापावेतों, महाराष्ट्राच्या ज्या भागांत स्वराज्य होतें तेथें, शुद्ध निर्भेळ मराठी भाषा बोलण्यांत व लिहिण्यांत येत असे; (२) १२९० पासून १६५६ पर्यंत, म्हणजे शिवाजीचा अंमल सुरू होईपर्यंत, फारशी शब्दांचें मराठीत प्राधान्य होतें; (३) १६५६ पासून १७२८ पर्यंत फारशी शब्द जलदीनें कमी होत गेले; आणि त्यापुढें (४) १७२८ पासून १८१८ पर्यंत मुसलमान संस्थानांशी झालेला पत्रव्यवहार व सरकारी दफ्तर ह्यांखेरीज इतरत्र फारशी शब्द फारसे उपयोगांत नव्हते; असे चार सिद्धान्त निष्पन्न झाले. पैकीं फारशीचा अप्रतिहृत प्रवेश मराठी भाषेंत १२९० पासून १६५६ पर्यंतच्या काळांत जोरानें झाला. इ. स. १२९० पासून १३१८ पर्यंत महाराष्ट्रांत यादवांचेंच राज्य असल्यामुळें, फारशीचा प्रवेश मराठीत कांहींच झाला नसावा. १३१८ पासून मुसुलमानांकडे राज्याचीं सूत्रें गेल्यावर मात्र फारशी शब्द मराठींत येण्यास सुरुवात झाली. व ह्या आगमनाची अखेर इ. स. १६५६ त झाली. म्हणजे सुमारें ३३८ वर्षे फारशीचें मराठीला निकट सान्निध्य होतें. ह्या सान्निध्याच्या कचाटीत मराठी भाषेची हालहवाल कशी काय होती त्याचा वृत्तांत पुंढे देतों.
इ. स. १३१८ पासून १३४७ पर्यंत महाराष्ट्राचा कारभार दिल्लीहून होत असे. १३४७ त दिल्लीशीं संबंध तोडून हसंग गांगो ब्राह्मणानें दक्षिणेंत ब्राह्मणीराज्य स्थापन केलें तें इ. स. १४९२ पर्यंत बेदरास, १४८४ पर्यंत व-हाडांत, १४८९ पर्यंत अहमदनगरास, १४८९ पर्यंत विजापुरास, व १५१२ पर्यंत गोवळकोंड्यास चालूं होतें, ह्या सालानंतर दक्षिणेंत बरीदशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही व कुत्बशाही अशा निरनिराळ्या शाह्या १६५६, १५७२, १६३७, १६८६ व १६८७ पर्यंत अनुक्रमें चालल्या. ह्या सालानंतर किंवा ह्या सालांच्या सुमारास मराठ्यांनी सर्व महाराष्ट्र आक्रमिण्याचा प्रयत्न केला. इ. स. १४५० च्या सुमारास खानदेच्या वा-यांत निकम, ठाण्यास बिंबदेव राणे यांचे वंशज, कोळवणांत कोळी, रामनगरास राणे, सोनगड व रायरी प्रांतांत तेथील राजे, शिरकाणांत शिरके, खेळण्यास शंकरदेव, वाडीस सावंत, बेळगांवास कर्णराज, मोरगिरसि मो-ये, असे अनेक लहान लहान मराठे संस्थानिक स्वतंत्रपणें राज्य करीत होते. ह्या लहान लहान संस्थानांत १४५० पर्यंत अस्सल मराठीचाच प्रचार असे. हे प्रांत सोडून बाकीच्या महाराष्ट्रांत फारशी शब्दाचा प्रचार अतोनात झाला. १४५० नंतर हीं लहान राज्यें समूळ नष्ट झालीं किंवा ब्राह्मणी पातशाहांच्या अंकित झालीं, तेव्हांपासून शिवाजी स्वराज्यस्थापन करी तोंपर्यंत महाराष्ट्रांत सर्वत्र फारशी शब्दांचा प्रचार होता. येणेंप्रमाणें काळ व स्थळ ह्यासंबंधानें फारशी शब्दांची व्याप्ति मराठींत व महाराष्ट्रांत कशी होत गेली, त्याची हकीकत आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
कुंट्यांच्या प्रतींतील चवदावी ओवी तर अत्यंत अशुद्ध आहे. असो. प्रस्तुतचा मुख्य मुद्दा ज्ञानेश्वरींतील जुनी मराठी भाषा कशी असते हें दाखविण्याचा आहे. ज्ञानेश्वरानें ज्ञानेश्वरी आपल्या वेळच्या मराठींत जशी लिहिली तशी सध्यांच्या कोणत्याहि छापील पुस्तकांत ती उपलब्ध नाहीं हें स्पष्ट करण्याच्या हेतूनें - कोणती तरी छापील ज्ञानेश्वरी तुलनेला घ्यावयाचीच होती तेव्हां- कुंट्यांच्या प्रतीचा उल्लेख केला. दुस-या कोणत्याहि छापील प्रतीचा उल्लेख केला असता तरी चाललें असतें. खरी गोष्ट अशी आहे कीं, आज सहाशें वर्षे मराठी भाषेचीं जीं निरनिराळीं रूपें होत आहेत त्यांचा ठसा ज्ञानेश्वरीच्या त्या त्या वेळीं झालेल्या प्रतींत गोचर होत आहे. ज्ञानेश्वरींतील भाषा तेराव्या शतकांतील मराठी भाषा होय. एकनाथानें शके १५१२ त म्हणजे बराबर तीनशें वर्षांनी ज्ञानेश्वरीची पोथी शुद्ध केली; शुद्ध केली म्हणजे आपल्या वेळच्या लोकांना समजेल अशी केली. मूळ ज्ञानेश्वरींतील जीं रूपे एकनाथाच्या वेळीं केवळ आर्ष भासूं लागलीं होतीं तीं एकनाथानें बहुशः गाळली; व त्याच्या नंतरच्या प्रती करणा-यांनीं तर तींत वाटतील ते बदल व अपपाठ घुसडून दिले. ही दशा एकट्या ज्ञानेश्वरीचीच झाली आहे असें नाहीं. चौदाव्या शतकांतला ज्यास आपण सध्यां समजतों त्या नामदेवाच्या अभंगाचीहि हीच व्यवस्था लागलेली आहे. चौदाव्या शतकांतलें मराठी कोणत्या प्रकारचें होतें तें भूपालवल्लभांतील वर दिलेल्या वाक्यांवरून सहज समजण्यासारखें आहे. नामदेवाच्या मूळ अभंगांतील शब्दांचीं रूपें ह्या वाक्यांतील शब्दांच्या रूपासारखीं असली पाहिजेत. परंतु सध्यांच्या नामदेवाच्या छापील गाथेंतील शब्दांची व प्रयोगांचीं रूपें, फार झालें तर, सोळाव्या शतकांतल्या रूपांसारखी दिसतात. ज्ञानेश्वराचे, सोपानदेवाचे व मुक्ताबाईचे म्हणून जे अभंग सध्यां प्रचलित आहेत तेहि असेच अर्वाचीन दिसतात. नामदेवानें मराठींत भारत लिहिलें म्हणून महिपति भक्तविजयाच्या प्रारंभी म्हणतो. हें नामदेवाचें भारत मजजवळ आहे व त्याची भाषा सोळाव्या शतकांतील आहे. नामदेवाचे अभंग तोंडी म्हणण्याची चाल फार असल्यामुळें त्यांत निरनिराळ्या काळीं म्हणणा-यांच्या रोजच्या बोलण्याच्या पद्धतीप्रमाणें न कळत बदल होण्याचा संभव आहे. परंतु, ह्या भारताच्या भाषेंत फारसा बदल होण्यासारखा नाहीं. कितीहि फेरबदल झाला तरी तो कोणत्याहि ग्रंथांत इतका होत नाहीं कीं चौदाव्या शतकांतील भाषा सोळाव्या शतकांतील भाषेसारखी हुबेहूब दिसावीं. खुद्द ज्ञानेश्वरींतहि फेरफार झालेला आहे. कान्हा, मात्रा, उकाराबद्दल अकार, ऐकाराबद्दल एकार, ऐयाबद्दल इया, ओकाराबद्दल अकार, असे बरेच बदल ज्ञानेश्वरींत झालेले आहेत. परंतु ज्ञानेश्वरी दासबोधासारखी किंवा एकनाथी रामायणासारखीं झालेली नाहीं. ह्यावरून अभंग रचणारे ज्ञानदेव व नामदेव चौदाव्या शतकांतल्यापेक्षां पंधराव्या शतकाच्या शेवटीं व सोळाव्याच्या प्रारंभीं झाले असावे असा तर्क करावा लागतो. ह्या तर्काला तीन साधे पुरावे देतों. (१) ज्ञानेश्वरींत फारशी शब्द एकहि नाहीं; नामदेवांच्या गाथ्यांत बरेच आहेत. (२) ज्ञानेश्वरींत चतुर्थीचा किंवा द्वितीयेचा ला प्रत्यय बिलकूल नाहीं, नामदेवांच्या गाथ्यांत आहे. हा ला प्रत्यय फारशी द्वितीयेचा प्रत्यय जो रा त्यापासून आलेला आहे. (३) ज्ञानेश्वरींत व हें उभयान्वयी अव्यय नाही; नामदेवांच्या गाथ्यांत आहे. निंगारकरांनीं आपल्या ज्ञानेश्वरीवरील लेखांत निशाण वगैरे शब्द फारशी आहेत. असें म्हटले आहे. पण तसा प्रकार नाहीं. हे सर्व शब्द अस्सल जुने मराठी आहेत.
असो. इ. स. १५४१ च्या व १४१६ च्या लेखांत फारशी शब्द सांपडतात. ह्या सालांच्या पाठीमागें वीस पंचवीस वर्षे गेलें म्हणजे सावंतांच्या राज्यांतील इ. स. १३९७ तील लेखांत, पर्शरामोपदेशांतील १३५६ तील लेखांत व १२९० तील ज्ञानेश्वरींत एकहि फारशी शब्द सांपडत नाहीं. येणेंप्रमाणें, शिवाजीच्या वेळच्या दरबारी लेखांतील भाषेचें परीक्षण करतां करतां तींत फारशी शब्द व प्रयोग कसे व केव्हांपासून आले ह्या गोष्टींचा शोध लावण्याच्या मिषानें आपण ज्ञानेश्वरीपर्यंत येऊन ठेपलों. मराठी भाषेच्या शब्दरचनेंत व वाक्यरचनेत फारशी भाषेचें कार्य कोणतें, हा प्रस्तुत विवेचनाचा विषय असल्यामुळें ज्ञानेश्वरीच्या पलीकडे आपल्याला जाण्याची जरूर नाहीं. महाराष्ट्रीपासून ज्ञानेश्वराच्या वेळची मराठी भाषा कशी निघाली, ह्या प्रकरणाचा विचार प्रस्तुत कर्तव्य असता तर इ. स. सातशेंपासून तेराशेंपर्यंतचे मराठी लेख पहाणें जरूर होतें. ज्ञानेश्वरानें ज्या अर्थी मराठींत एवढा मोठा ग्रंथ १२९० त लिहिला त्याअर्थी त्याच्यापूर्वी मराठींत कांहीं तरी ग्रंथरचना झाली असली पाहिजे हें उघड आहे. विवेकसिंधु व विवेकामृत, असे दोन शब्द ज्ञानेश्वरींत सहजासहजी आलेले आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
(९) नाहीं माझेनि पाडें वाडु। मी चि सर्वज्ञ एकु रूढु। ऐसा शिवमुष्टिगंडु। घेउनु ठाके ॥
अ. १३, श्लो. ११, ओ. ७०७.
(१०) रसु न्हव्हावा अतिमात्रु। हा घेता सिकोवे मंत्रु। तरि अवंतुनु शत्रु। करितासि गा ॥
अ. १३, श्लो. ११, ओ. ६२५.
(११) किंबहुना पूंसा। पांजरेयामाझि जैसा। वेदाज्ञेसि तैसा। भिउनु असे॥
अ. १३, श्लो. ९, ओ. १८८.
(१२) ह्मणे पूयगर्ते रिगाला। मूत्र-रंध्रौनि निघाला। कटारे मिया चाटिला। कुचस्वेदु॥
अ. १३, श्लो. ८, ओ. ५३८.
(१३) तिये कडौनु येतु वारा। देखौनु धावे सामोरा। आडपडे ह्मणे घरा । बीजें कीजे।
अ. १३, श्लो. ७, ओ. ३७५.
(१४) ज्ञानदेओ ह्मणे, तुम्हीं। संत वोळगावेति, हें मी। पढविलां स्वामीं। निवृत्तिनाथें.।
अ. १२, श्लो. २०, ओ. २४१.
(१५) तिये गीतेचा कलशु। संपूर्ण हा अष्टादशु। म्हणे निवृत्तिदासु। ज्ञानदेवो ॥
अ. १८, श्लोक ७८, ओ. १७९०.
ह्या ओव्यां कुंट्यांच्या प्रतींतील ओव्यांशीं व वर दिलेल्या भूपाळवल्लभांतील वाक्यांशीं ताडून पाहतां, बीड येथील पाटांगणांत सापडलेल्या प्रतींतील ओव्या, नामे, क्रियापदें व शब्दयोगी अव्ययें यांच्यासंबंधानें, कुंट्यांच्या प्रतींतील ओव्यांपेक्षां भूपाळवल्लभांतील वाक्यांशी जास्त जुळतात व ही गोष्ट ह्या प्रतीच्या पुराणत्वाच्या सिद्धीला उत्तम प्रमाण आहे. इ. स. १२९० त लिहिलेल्या ज्ञानेश्वरींची भाषा १३२६ पासून १३५६ पर्यंत लिहिलेल्या ग्रंथांच्या भाषेप्रमाणें असलीच पाहिजे, इतकेंच नव्हे तर ह्या ग्रंथाच्या भाषेहूनहि ती किंचित जुनाट असली पाहिजे. उदाहरणार्थ, वर दिलेल्या ओव्यांतील तांथू हा शब्द घ्या. तंतू ह्या संस्कृत शब्दाचें हें जुनें मराठी रूप आहे. तांतू म्हणजे अनंताचा दोरा, कोळी नांवाच्या प्राण्याच्या जाळ्याचा दोरा, बारीक दो-यासारखे जंत ह्या अर्थी मराठींत अद्यापहि वापरतात. तसेंच, बक-याचें आतडें पिरगाटुन व वाळवून बनविलेल्या दोराला ह्या तांतूपासून निघालेला तांत शब्द लावतात. तेव्हां ज्ञानेश्वरींत हें जुनें रूप येणेंच रास्त आहे. तसेंच मृत्तिकेचा ह्याबद्दल मातियेचा हें रूप ज्ञानेश्वरींत इष्ट आहे. 'काय' बद्दल काइ हें रूप माझ्या ह्या पाटांगणांतील प्रतींत हमेशा सांपडतें. केउते तांथुपटु सांपडतील ते, ह्या शुद्ध वाक्याच्या ऐवजीं कुंट्यांच्या प्रतींत-केउते तंतू पट सांडील तो-असें अशुद्ध वाक्य आहे. केउतें ह्यांत मूळ शब्द केउता आहे. केउता, केउतें, केउती, हीं ह्या शब्दांचीं तिन्हीं लिंगी एकवचनी रूपें आहेत। केउते, केउतें किंवा केउतीं, केउती हीं तिन्ही लिंगी अनेकवचनीं रूपें आहेत. ह्या वाक्यांत केउतें तंतूचें विशेषण आहे. तंतू पुल्लिंगी असल्यामुळें केउता असें विशेषणाचें रूप पाहिजे होतें. परंतु केउते हे पुल्लिंगी अनेकवचनी रूप जुन्या प्रतींतूत असलेलें कुंट्यांच्या प्रतींत तसेंच ठेविलेले आहे व त्याचा तंतू ह्या पुल्लिंगी एकवचनाशीं संबंध लागेना तेव्हां अनुस्वार देऊन क्रियाविशेषण बनविलें आहे. ते तांथू पटु केउते सांडतील, असा मूळ अन्वय होता. अशीच दुस-या वाक्यांचीहि मीमांसा करतां येईल. परंतु ज्ञानेश्वरींतील भाषेची मीमांसा इतरत्र करण्याचा विचार असल्याकारणानें येथें तत्संबंधीं विस्तार करीत नाहीं. येथें फक्त कुंट्यांच्या प्रतींत वर दिलेल्या ओव्यांतील कित्येक शब्दांचीं रूपें कशी आहेत तें दाखवितों.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
ह्या उता-यांतील सर्व वाक्ये शुद्ध बावनकशी जुनीं मराठी आहेत व त्यांना फारशीचा बिलकुल गंध नाहीं. ह्या वाक्यांची भाषा बहुतेक हुबेहुब ज्ञानेश्वरींतील भाषेसारखी आहे. बहुतेक म्हणण्याचें कारण असें कीं इ. स. १२९० त लिहिलेल्या ज्ञानेश्वरींच्या भाषेंत व इ. स. १३५६ त लिहिलेल्या ह्या वाक्यांच्या भाषेंत साठ वर्षांचा अवधि गेल्यामुळें किंचित् फरक पडणें साहजिक आहे. तयापुढील व जयाचिये हे जे दोन शब्द ह्या वाक्यांत आले आहेत त्यांचीं ज्ञानेश्वरींत तेयापुढील व जेयाचिये अशीं रूपें सांपडतात, तेयापुढील व जेयाचिये हीं रूपें एकनाथस्वामीनें शुद्ध केलेल्या प्रतीवरून झालेल्या लेखी किंवा छापील ज्ञानेश्वरींत सांपडावयाचीं नाहींत. हीं रूपें एकनाथस्वामीच्या पूर्वीच्या ज्ञानेश्वरींच्या प्रतींत सांपडतात. बालेघाटावरील बीड शहरीं पाटांगण नावाचें एक देवस्थान आहे, तेथील दफ्तर तपाशीत असतां एकनाथस्वामींच्या पूर्वीची एका ज्ञानेश्वरीची प्रत मला मिळाली. कुंट्यांनीं छापिलेल्या ज्ञानेश्वरींतल्यापेक्षां ह्या ज्ञानेश्वरींत ओव्यांची संख्या बरीच कमी असून, हींतील भाषाहि कुंट्यांच्या प्रतींतल्याहून जुनी आहे. शिवाय, ह्या पाटांगणांतील प्रतींतील अक्षरे तेराव्या किंवा चवदाव्या शतकांतील महाराष्ट्रांतील ताम्रपटावरील अक्षरांसारखीं आहेत. वरील लेखांशीं ताडून पहाण्याकरितां व ज्ञानेश्वरीची मूळ खरी भाषा काय होती ते दाखविण्याकरितां ह्या प्रतींतील निरनिराळ्या प्रयोगांच्या ओव्या देतों.
(१) मातियेचा वीटु। घेउनि काइ करी घटु। केउते ताथू पटु। सांडतील ते॥
अध्याय १८, श्लोक ११, ओवी १७
(२) तैसा शरीराचेनि आभासे। नांदतु जबं असे । तव कर्मत्यागाचें पीसें। काइसें तन्हीं।
अध्याय १८, श्लोक ११, ओ. २०
(३) ऐसें व्यापक ज्ञान भलें । जेयांचेया -हदया आलें।
तेयांची समदृष्टि बोले। विशेषू काई॥ अ. ५ श्लोक. १६, ओ. ८७.
(४) मग मशकु हा गजु। कां श्वपचू हा द्विजू। पैल इतरु का आत्मजु । हें उरैल कें॥
अ ५, श्लो. १८, ओ. ९२.
(५) जरि विषइं विषयो सांडिजैल ॥ तरि महादोषिं के वसिजैल।
आणि हा संसारशब्दु नन्हैल। लटका जगीं ॥
अ. ५, श्लोक २३, ओ. २३.
(६) है अष्टधा भिन्न कैसी। ऐसा ध्वनि धरिसी मानसीं।
तरि तेंचि आता परिसैं। विवंचना।।
अ. ७, श्लो. ४, ओ. १७.
(७) किं तो पार्थु मनीं। आझुइं धणि न मनीं। अधिकाधधिक उतान्ही। वाढवितु असे ॥
अ. १३, श्लो. ३४, ओ. ११३१.
(८) हे बहु असो, पंडितु। धरूनु बालकाचा हातु॥
अ १३, श्लो. ७, ओ. ३०७.