Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

५२. इतिहासाचें खरें स्वरूप काय, सध्यां आपल्या देशांत तो कोणत्या रूपानें दाखविला जातो व वस्तुत: तो कोणत्या रूपानें दाखविला जाणें जरूर आहे, ह्या तीन प्रकरणांचा विचार करण्याची प्रतिज्ञा मागें केली होती पैकीं इतिहासाचें खरे स्वरूप काय, ह्या प्रश्र्नाचें उत्तर येथपर्यंत दिलें. पूर्वप्रलयीन कालापासून आतांपर्यंत पृथ्वीवरील सर्व देशांतील अखिल मानवसमाजाचें इत्थंभूत जें चरित्र तें इतिहास होय. कौलिक पद्धतीनें मानवसमाजाचें वर्गीकरण करून, प्रत्येक शुद्ध व भ्रष्ट शाखेचें चरित्र कालानुक्रमानें व देशपरत्वें दिल्यानें इतिहासलेखनाला सौकर्य येतें. समाजाच्या चरित्रांतील शेकड़ों व हजारों प्रसंग केवळ नमूद करून इतिहासाचें काम भागत नाहीं; तर प्रसंगांचें पौर्वापंर्य व कार्यकारणसंबंध दाखवून, ऐतिहासिक कारणपरंपरा सिद्ध करावी लागते. ह्या कारणपरंपरेलाच मानवसमाजशास्त्र अशी संज्ञा आहे. मानवसमाजशास्त्र व्यक्तमध्य अशा प्रपंचाचा म्हणजे समाजाचा विचार करतें; समाजाच्या आद्यन्ताचा शोध लावून, प्रपंच व परमार्थ ह्यांची संगति करण्याचा पत्कर तें घेत नाहीं. हा पत्कर तत्त्वज्ञान घेतें. मायोपधिक आत्म्याच्या निरनिराळ्या वृत्तींचा परिष्कार अथपासून आतांपर्यंत व अंतापर्यंत प्रपंचरूपानें कसा झाला आहे व कसा होईल, वगैरे भूत, भविष्य व वर्तमान समाजचरित्राची संगति लावून दिल्याचा तत्त्वज्ञान बहाणा करतें व ह्या बहाण्याचा त्या त्या काळीं समाजाच्या चरित्रावर अनिवार परिणाम होतो. येथपर्यंत केलेल्या विवेचनाचा हा असा इत्यर्थ आहे. इतिहास, समाजशास्त्र व ऐतिहासिक तत्त्वज्ञान, ह्यांचें खरें स्वरूप काय, तें स्थूलमानानें दाखविण्याचा अल्प प्रयत्न केलेला आहे. त्यावरून समाजाच्या सुस्थितीला ज्ञानाच्या ह्या त्रिविध शाखेचा उपयोग काय होतो, तें सूक्ष्मदृष्टीनें मनन करून पहचयाचें आहे.

५३. इतिहासाचें खरें स्वरूप काय, हा प्रश्न सोडविला म्हणजे स्वदेशांत तो कोणत्या रूपानें दाखविला जाणें जरूर आहे, हा प्रश्न सोडविल्यासारखाच आहे. खरा इतिहास कोणत्याहि काळीं व कोणत्याहि देशांत एकाच स्वरूपाचा असतो. इतिहास लिहिण्याची जी पद्धति यूरोपांत सशास्त्र समजली जाते, तीच पद्धत हिंदुस्थानांत तितकीच सशास्त्र समजली जाते. इतिहास राजकीय असो, धार्मिक असो, सामाजिक असो किंवा सांपत्तिक असो; विद्या, युध्द, संस्कृति, वन्यावस्था, अनीति किंवा असद्विचार इत्यादि (एकेका) कल्पनांचा इतिहास असो; किंवा ह्या कल्पना अमलांत आणणा-या संस्थायंत्राचा असो; तो प्रामाणिकपणें व सशास्त्र लिहिण्याच्या पद्धती सर्व देशांत सर्व कालीं एकच असल्या पाहिजेत. प्रामाणिकपणा व सशास्त्र पद्धती हे दोन इतिहासाचे केवळ प्राण होत. त्यांतल्यात्यांत एक वेळ अशास्त्रता निभावून घेतां येईल. कारण, तिच्यामुळें विषयाची फार झाली तर, व्यवस्थित मांडणी व्हावयाची नाहीं. परंतु अप्रामाणिकपणा इतिहासप्रणयनाला सर्वस्वीं घातक होय. स्वतःच्या पक्षाच्या किंवा मताच्या किंवा देशाच्या किंवा सत्तेच्या किंवा मतलबाच्या मंडनार्थ एखाद्या ऐतिहासिक प्रंसगाच्या किंवा गोष्टीच्या वास्तविक रूपाचा मनास मानेल त्याप्रमाणें जाणून बुजून विपर्यास किंवा भंग किंवा लोप करणें म्हणजेच इतिहासप्रदर्शनांत अप्रामाणिकता करणें होय. असल्या अप्रामाणिक इतिहासांनाच इतिहासविकृति अशी संज्ञा आहे. असतें एक व दाखवावयाचें दुसरेंच, हा ह्या अवास्तव इतिहासांचा मुख्य मतलब असतो. असले इतिहास म्हणजे तल्लेखकांच्या मतलबी मतांचीं प्रदर्शनेंच होत. एका समाजानें दुसरा समाज जिंकला म्हणजे जेते लोक असले अप्रामाणिक इतिहास नाना त-हांच्या मतलबांच्या सिद्धयर्थ लिहीत असतात. सध्यां इंग्रजींत जे हिंदुस्थानचें किंवा महाराष्ट्राचें इतिहास किंवा बखरी किंवा निबंधवजा ऐतिहासिक टिपणे किंवा राजकीय, सामाजिक अगर धार्मिक विषयांवर लेख येतात, त्यांपैकी अनेक अप्रामाणिक व विकृत असतात. अशा लेखांवर भोळेपणानें विश्वास ठेवणा-या लोकांसारखे हतभागी इसम जगाच्या पाठीवर दुसरे कोणी नसतील. परदेशाभिमान, स्वदेशाभिमान, गुलामगिरीला स्वतंत्रता, परधर्माभिमानाला स्वधर्माभिमान व परभाषाभ्यासाला उदार विद्या, अशीं विकृत नामाभिधानें विकृत इतिहासांत व राजकीय निबंधांत व प्रबंधांत दिलेलीं असतात आणि जित राष्ट्रांतील साध्या भोळ्या तरुणांच्या मतिभ्रंशाला कारण होतात. मतिभ्रंश करणें हा विकृत इतिहासाचा मूख्य मतलब असतो. हे इतिहास लिहिणा-याला लांछनास्पद व वाचणा-याला लज्जास्पद होत.

बद्धांची संख्या जेव्हां जास्त असते, तेव्हां धार्मिक, सामाजिक, राजकीय व मानसिक बंधन दास्य, अथवा गुलामगिरि समाजांत जास्त आविर्भूत होते. आणि कमी असेल तेव्हां धार्मिक, सामाजिक, राजकीय व मानसिक स्वातंत्र्य समाजांत नादूं लागतें. असा ह्या शाखेचा मुख्य ऐतिहासिक सिद्धान्त आहे. हा सिद्धान्त श्रीसमर्थ रामदासस्वामी यांणी दासबोधांत ब-याच विस्तारानें प्रपांचिला आहे व तो प्रपंच ग्रंथमालेंतील 'रामदास” ह्या निबंधांत मीं स्पष्ट करून सांगितला आहे. सबब त्याची पुनरुक्ति येथें करीत नाहीं. येथें रामदासी तत्त्वज्ञानांत व संन्यस्त तत्त्वज्ञानांत इतिहासाच्या अथवा प्रपंचाच्या अथवा समाजाच्या दृष्टीनें भेद कोणता आहे, तें मात्र सांगतों. बद्ध, मुमुक्षु व साधक यांना संन्यस्तांचें तत्त्वज्ञान प्रपंच म्हणजे समाज सोडून देण्याचा अशक्य उपदेश करतें. हा अशक्य उपदेश रामदासी व नैतिक तत्त्वज्ञान सांगत नाहीं. कारण, नरदेह धारण करणा-यांना-- मग ते बध्द असोत किंवा सिध्द असोत-- प्रपंच व समाज सहज असून कदापिही सुटण्यासारखे नाहींत. प्रपंचांत राहूनच, प्रपंच उत्तमोत्तम करूनच, परमार्थाचें साधन करावयाचें आहे. परमार्थांचें साधन करण्यास, परमार्थाची सिध्दि होण्यास, प्रपंच हाच एकटा अनन्य मार्ग आहे. प्रपंच सोडल्यावर, परमार्थ ही वस्तूच रहात नाहीं. प्रपंच आहे तोंपर्यंतच परमार्थ ह्या वस्तूंत हांशींल आहे. सारांश, प्रपंच साधून परमार्थाचा लाभ करून घेणें, हाच परम पुरुषार्थ होय. तेव्हां, बद्धांना व मुमुक्षूंना सन्याशाचें एकदेशी तत्त्व अमलांत आणावयास सांगणें केवळ मौर्ख्य आहे. प्रपंच सुटावयाचा नाहीं व संन्यास साधावयाचा नाहीं, अशी त्रिशंकुवत् अवस्था असल्या गुरुशिष्यांची अवश्य व्हावयाची. अशी दुरवस्था आर्य समाजाची अनेक वेळां झालेली आहे. तींतून सोडविण्याचा प्रयत्न भगवद्रीता व दासबोध या दोन ग्रंथांनीं केला आहे. ह्या दोन ग्रंथोत्तमांतल्या ऐतिहासिक तत्वज्ञानाचा यथास्थित व सर्वांगांनीं खुलासा करण्यास आणि त्याची तुलना यूरोपांतील पन्नास शंभर ऐतिहासिक तत्त्वज्ञानांशीं करून दाखविण्यास, एखादा स्वतंत्र ग्रंथच लिहिणें जरूर आहे. भगवद्रीतेंत वेदान्तापेक्षां इतिहासाचें म्हणजे प्रपंचाचें म्हणजे समाजाचें तत्त्वज्ञान स्पष्ट करून दाखविण्याचा विशेष कटाक्ष आहे, हें बीज महाराष्ट्रांतील लोकांच्या जितकें जास्त ध्यानांत येईल तितकें जास्त हिताचें होईल.

५१. भारतवर्षांतील ऐतिहासिक निर्णायक पद्धतीच्या एका शाखेचें रूप असें आहे. दुसरी जी शाखा तिला पहिलींतील गोम कळून चुकली आहे. अखिल कर्माचा किंवा समाजाचा त्याग करणें संन्याशाला किंवा मनुष्यमात्राला अशक्य असल्यामुळें, ह्या अशक्य स्थितीचा निषेध ही शाखा कंठरवानें करते. “आये दु:खं व्यये दु:खं धिगर्थान्दु:खकारिण:” "मांसपांचालिकायास्तु स्त्रिय: किमिव शोभनं” वगैरे समाज व समाजाच्या धडपडीचा द्वेष करण्यास शिकविणा-या विद्यारण्यांच्या संन्यस्त क्लृप्त्या ह्या शाखेला बिलकूल मान्य नाहींत. "नियतस्य तु संन्यास: कर्मंणो नोपपद्यते । मोहात्तस्य परित्यागस्तामस: परिकीर्तित: ।” "दु:खमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् । स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्; ॥" वगैरे मतें ह्या शाखेला मान्य आहेत. समाजांत देहधारण करून प्रपंच नियत म्हणून यथास्थित केलाच पाहिजे; मोहानें त्याचा त्याग करणें तामस होय; संपत्तीपासून किंवा पोराबाळापासून म्हणजे समाजापासून दुःख होतें म्हणून तो टाकणें भयावह आहे, असें तत्त्व ही शाखा मानते. “प्रपंच साधुनी परमार्थाचा लाभ ज्यानें केला, तो नर भला,” असा उत्तमोत्तम सिद्धान्त या शाखेचा आहे. ह्या शाखेचें ऐतिहासिक निर्णायक तत्त्वज्ञान स्थूलत्वानें असे. कोव्हांहि व कोठेंहि कोणत्याहि मनुष्यसमाजाच्या शाखेंतील लोकांचे चार प्रकार असतात. प्रपंचाचा अर्थ न कळतां प्रपंचाच्या गोंधळांत अज्ञानानें बद्ध होऊन गेलेल्या माणसांचा पहिला वर्ग. प्रपंचाचा अर्थ कळून घेण्याची इच्छा गुरुकृपेनें म्हणजे सिद्ध म्हणजे ज्ञाते यांच्या कृपेनें ज्यांना होते त्या मुमुक्षूंचा म्हणजे प्रपंचाचा व परमार्थाचा संबंध काय आहे तें समजून घेऊन परमार्थाकडे प्रपंचांतून सुटून जाऊं इच्छिणारांचा जो वर्ग तो दुसरा वर्ग होय. प्रपंचाचा अर्थ कळण्याची नुसती इच्छाच नव्हे, तर अर्थ कळून तद्नुसार आचरण ठेवण्याचा अभ्यास करणा-यांचा जो वर्ग तो तिसरा वर्ग. ह्या वर्गाला साधकांचा वर्ग म्हणतात. आणि प्रपंच व परमार्थ, वस्तु व आभास, तत् व त्वं यांचा तादात्म्यबुद्धीनें ज्यांना अर्थ कळला व तदनुसार ज्यांचे सहज आचरण होतें त्या सिद्धांचा जो वर्ग जो चवथा व शेवटला. असे मनुष्यांचे चार वर्ग आहेत. अत्यंत कमी संस्कृत समाजाप्रमाणें अत्यंत जास्त संस्कृत समाजांतहि हे चारी वर्ग निरनिराळ्या प्रमाणाने सांपडतात. मानसशास्त्राच्या अनुरोधानें हे चार वर्ग केलेले आहेत, कालानुक्रमानें केलेले नाहींत, हे ध्यानांत धरलें पाहिजे. म्हणजे, दहा हजार किंवा वीस हजार वर्षांपूर्वी प्रथम सर्व लोक बद्ध होते, पुढे पांच हजार वर्षांनी मुमुक्षू झाले, नंतर चार हजार वर्षांनी साधक झाले व आतां सिद्ध होत आहेत, असा प्रकार नाहीं. तर जेव्हां केव्हांपासून मानवसमाजाचा इतिहास कळूं लागला, तेव्हांपासून हें चार वर्ग समाजांत दृष्टोत्पत्तीस येतात. इतकेंच कीं कधीं मुमुक्षूंच्या मानानें बद्धांची संख्या जास्त असते व कधीं कमी असते.

आपली हलकीचें वारंवार वर्तमान रड लिहितात. सेवकाचे लक्ष तों च्यरणापासीं, की कोणेही प्रकारे उलगडून यावें. आमचे भर-वाता ईश्वरस्थानीं आपण. इहलोकी संवसार सर्व आज वीस वर्षे सेवकाचा स्वामिच्यरणाचे आधारावर. स्वामींनी कृपा करून शरीर संरक्षण व आबरू संवरक्षण केलें व करितात. दैवदशा बलवत्तर आहे ! इत:पर मासपक्षांत सर्व कुटुंबसुद्धा देशास यावें, चिरंजीव आठा नवा वर्षाचा आहे, त्यास स्वामीचे शागीर्दीस म्हणून हातीं घ्यावें, च्यार कामें अस्तील त्याचा मार्ग स्वामीचे मर्जीस येईल तैसा करतील, जमल्यास श्रीइच्छा म्हणून स्वामीची आज्ञा घेऊन एकाकी श्री कासीवास अथवा तीर्थवास करून जन्म सफल करावा, हाच निजध्यास. एविषई विनंति समक्ष केलीच आहे. येणेंकरून ...... यथास्थित स्वामिच्यरणाचें कृपने जालासा होईल. हा निजध्यास अहिर्निशी लागला आहे. येथील उलगडा पाडावा; परंतु स्वामीचे कृपेने सांप्रत कांही सोईस आला आहे. मासपक्षांत निकाल पाडून, स्वार होऊन, यांची स्वारी जलदीने आल्यास याजसमागमेंच येतो. कदाचित् दिवसगती खाले असल्यास विनंति लिहिल्याप्रमाणें येथील गुंता उरकून येतों. साकल्य च्यरणदर्शनाअंती निवेदन करीन. पत्रीं लिहिता विस्तार आहे. तीर्थस्वरूप राजश्री पुरुषोत्तम पंतनानाकडील पत्रे व मुजरद कासद आला, त्याची रवानगी उदैक सेवेसी करितो, त्याजवरून साकल्य कळेल. त्यांचे संवरक्षण व आमचे करणार स्वामी समर्थ आहेत. इत:पर सत्वर येतों. येथें एक एक घटका युगवत् जाते त्याचा विस्तार काय लि॥? विशेष काय लिहिणे? कृपा केली पाहिजे. हे विनंति. वेदमूर्त राजश्री गोविंदभट तात्या स्वामीस सा। नमस्कार विनंति. लिखितार्थ परिसोन कृपा करावी. येथून उलगडून निघावें व पत्राचे उत्तर पाठवावे, यास्तव उत्तर न लिहिलें. परंतु ग्रहदशा बलवंत. तरी आणखी मासपक्षाचा अवकाश पाहून उत्तर लिहिलें. अहिर्णीसीं निजध्यास हाच आहे. हें अगर सत्वर कोणेही प्रकारे येतो. कळावे लोभ कीजे. हे विनंति.

                                                                अर्जदास्त.

                                                           अर्जदास्त अर्जदार। बंदगी बंदेनवाज
                                                           अलेकं सलाम । साहेबांचे सेवेसी
                                                           बंदे शरीराकार। जीवाजी शेखदार
                                                           बुधाजी कारकून। प्रगणे शरीराबाद
                                                           किल्ले कायापुरी। सरकार साहेबांची

आज्ञा घेऊन स्वार जालों ती प्रगणे मजकुरीं येऊन सरकार काम करावयास लागलों. तो प्रगणे मजकूरचे जमेदार दंभाजी शेट्ये व कामाजी महाजन व मनीराम देशमुख व ममताई देशपांडी व क्रोधाजी नाईकवाडी ऐसे हरामजादे फार आहेत. ते सरकारकामाचा कयास चालू देत नाहीत. दंभाजी शेट्या कचेरीस येऊन जोम धरून बसतो. मनीराम देशमुख आपलें काम परभारें करून घेतो. ममताई देशपांडीण इणें तमाम प्रगणा जेरदस्त केला. क्रोधाजी नाईकवाडी याणें तमाम तफरका केला. तो साहेबांपासून जरासंध चोपदार आला. त्यानें खबर केली कीं मागून यमाजीपंताची तलब होणार. त्यास, त्या धास्तीनें तमाम प्रगणा वोस जाला. बितपशील कलम. डोळसवाडीस मात्र कांहीं रुई झुई वस्ती राहिली. कानगांव तो बंद जालें. दोन्ही वेशीचीं कवाडें लागलीं. नाकापुरास वहाव सुटले. तोंडापूर तो तफरका जालें. दंताळवाडी ओस पडली. दिवेलागणी देखील राहिली नाहीं. केसगांवची पांढर जाली. शिरापूरचा लोक दरोबस्त थरथरा कापतो. हातगांव कसाल्यानें जर्जर जाले. त्यांच्यानें आतां कांहीं लावणी होत नाहीं. पायगांवची मेटें बसलीं, ढोपरपूचीं राहिली. चरणगांव चाली सरली. गांडापूर वाहूं लागलें. लिंगस्थान भ्रष्ट जालें. उठूं पळूं लागलें. धीर धरवेना. ऐसी प्रगण्यांत कोर्दी बुडाली. यावर सरकारकाम सुरू करीत होतों. तो यमाजीपंताची परवानगी आली कीं, हुजूर येणें, आपणास साहेबाचा आश्रय आहे. एका जनार्दन बंदा। बंदगी रोशन होय! हे अर्जदास्त.

ही अर्जदास्त एकनाथी भजनींभारुडांतील आहें. हींत किती फारशी शब्द आहेत, त्याची गणती करण्याचें सोपें काम वाचकांकडेच सोंपवितों. एकनाथस्वामी इ. स. १५४८ जन्मले. त्यानंतर सुमारें ४० वर्षांनीं त्यानीं भजनीभारुड लिहिलें असे धरल्यास ही अर्जदास्त इ. स. १५८८ च्या सुमाराची असावी असें दिसतें. आतां इ. स. १५४१ तील एक व १५५८ तील एक असे दोन जुने मराठी लेख देतों. हे लेख साता-याजवळील निंब येथील ग्रामस्थांनीं एका गोसाव्याला दिलेलीं दानपत्रें आहेत. तीं सातारा येथील रा. रा. तुकारामपंत ठाकूर वकील यांच्याद्वारा मिळालीं.

                                                                                श्री.
श्री स्वस्ति श्री सकु १४६३ वीरखे प्लवंग संवत्सरे चैत्र सूध सप्तमी रविदिने तदीनि श्री सदानंद गोसावियाचे मठ मौजे निंब परगणे वाई तेथ अन्नदान प्रतीदिनि चालवावेया वृत्तीपत्र कंठगिरी गोसावी वा सदानंद गोसावी यांसी लिहुनि भीवोजी ++ जी देसाई, व माया पाटेलु, व सेटीया बसव सेटी कसबे मजूकुर, व प्रसोजी आषाडा मौजे आखाडें, व माल पाटेलू मूरुकुट मौजे राहगी हे मूख करूनि समस्त देसक परगणे कुडाल लीहुनी दीलें ऐसें जे प्रति वरुशि देणें बीतपसीलु गळा कैली खंडी ४।३।
(तक्ताः पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.)

श्रीगणराज.

लेखांक १०.

१७०२ कार्तिक शु.॥ १३
पौ छ १९ जिल्काद.

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
पोा देवराव माहादेव कृतानेक साां नमस्कार विनंति येथील कुशल ताा छ १२ जिल्काद स्वामीचे कृपेकरून यथास्थित असो. विशेष. कृपा करून पत्र छ १९ रमजानचें पाठविलें तें पावोन परम संतोष जाला. पत्रीं आज्ञा कीं, सरकारचा जाबसाल होणें यास्तव राजश्री पाटीलबावाचा निरोप घेऊन पुण्यात येणें, ह्मणून पेशजी तुह्मांस लिहिले होतें. परंतु त्याचें उत्तर न आले. त्यांस, तुह्मी कोठे आहां ? काय करतां ? वर्तान काय ? ते सविस्तर लिहून पाठवावें, ह्मणून आज्ञा. त्यास, पुण्याहून स्वामीपासून आज्ञा घेऊन जांबगांवी आलों, तेथून राजश्री पाटील बावाची स्वारी गुजराथ प्रांती जावयाची आली, ते साकल्य विनंति लिहिली. त्याची उत्तरे आली. आज्ञा येण्याविसी जालीं. त्यावरून यावें. परंतु पांच वर्षे यांचे संग्रही राहिलों. त्यांणी सरकारचे सनदेप्रमाणें दरमाह व आपले तर्फेने विशेष करून वरात संवस्थान कोटें येथे करून दिधली. त्यास, पांच वर्षे जाली. पैशास ठिकाण नाही. पदरचे सुखीं आह्मी कोणेंप्रकारे व काय अवस्थेनें दिवस काढितों. ते अवस्था स्वामी चरणासी लोपली नाहीं. चार दिवस येथें काळ-हरणार्थ आलों तों येथील नेमणूक दरमाहाचा दरमाहा द्यावीसीं केली. त्यास पांच वर्षे समूळ ठिकाण नाहीं. तेव्हा तेथे लोकांचे देणे पोटामुळें जालें. कुटुंबसहित येथे फसावा जाला. निघणें संकट यास्तव कोंडाईवारीपर्यंत समागमें आलों. वरातीची ताकीद होऊन कार्य होईल. नित्य विनंति केल्यास उत्तर हेंच की, देवितों. ज्यांचे देणें तेंही लस्करांतच त्यांचा आग्रह वरातीस ठिकाण लाऊन आमचा निकाल पाहून जावें. तेव्हां निरोपाय होऊन बारी उतरणे प्राप्त जाली. वरातीचे उत्तर निस्तोष होत नाहीं. हेंही होईना. वर्कड कोणी अनकूल होऊन, ममता धरून, हटकून कार्य करून निकाल पाडून घ्यावा व साहुकाराचे संबंधाने च्यार गोष्टी बोलून करावें, तर अनुकूल होते ते देखील प्रतिकूल जाले. त्याचों कारण जाले ते जांबगावांहून साकल्य विनंति सेवेसीं लिहिलीच होती. निरोपाय होऊन, गुजराथ प्रांत पाहून, संपूर्ण मुलूखगिरी, महर्घता, शरीरास समाधान नाहीं, हे सोसून मधें सोबत पाहून, हरएकही प्रकारें च्यरणापासीं यावेसें योजिलें. परंतु निर्फळ होऊन उज्जनपर्यंत येणें प्राप्त जालें. येथें ये तों दीड दोन महिने शरीरास पीडा प्राप्त प्राणांतिक झाली. स्वामीचे कृपेंकरून उलगडलो. संवस्थान कोटें येथील कमाविसदार येथें आले. नित्य ताकीदीने हटकिता, आज उद्यां करितां, आजपर्यंत झालें. शेवट प्रतिकूळ होते ते अनुकूळ करून घेण्यास, यांची मर्जी कायम करून देण्याविषई जाण्यास प्रयत्न करितां, सांप्रत जाबसाल सोईस येऊन कमाविसदारास ताकीद मागील बाकी देण्याविषई व पुढे चालविण्याविषई जाली आहे. आता कमाविसदाराकडून तजविजेनें साहुकारासी गांठ घालून त्याची खातरजमा करून यावें, हें बाकी आहे, त्या उद्योगास लागलों आहों. स्वामीकडील सिफारस आणून कार्य करून घ्यावे, तर तोही प्रकार येथें उपयोगी पडणार नाहीं. हें जाणून सेवेसी विनंति लिहिली.

श्रीवरद.

लेखांक ९.

१७०२ आश्विन वद्य ९.

पु।। श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना ऐसीजे :- छ १९ साबानी इंग्रजांकडील वकील फाजलअल्लीखान नामें कांही जाबसाल घेऊन आला आहे. तात्पर्य हेंच की, आमचे कोठीस दिल्लीस आगरियास जागा द्यावी व खर्चास दोन लक्ष रु।। दरमहा घेत जावे. पूर्वील बंगालियाचे वर्षासनाचे बाकीचे शनि:शांति देऊं व कोठीस जागा द्यावी. याचे नजरेंचें ठरावयासी वकील खानमा। आला आहे. पुढे जो अंतस्थ ठरेल तो शोध घेऊन सो। पाठवितों. मुख्य गोष्ट पूर्वीपासून इंग्रज जागा कोठीस जैपूर दिल्ली आगरे वगैरे स्थली इच्छितात. आता ग्वाल्हेर त्यांचे हातास गेली. याकरितां इंगज सर्वा स्थली अंमल जाहालासें जाणतात. श्रीइच्छा प्रमाण ! यास्तव फौज या प्रांतीं जलदीनें आल्यास प्रिथ्वीपतीस खातरजमा होऊन इंग्रजांसी बिघाड करीत. हे स्थल सरकारचे व पातशाहाचे काबूंत राहतें, श्री स्वामीचे प्रतापें करो (न). कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.

श्रीवरद.

लेखांक ८.

१७०२ भाद्रपद वद्य ३०.

पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना ऐसीजे :- ग्वालेरचे किल्यास्तव नजबखान बहुत कष्टी जाले व ह्मणाले कीं, आमचे स्वाधीन करता तरी किल्ला तुचा कायम राखिला जातो. आता तेथें कोठी करून गोहद व झांसी उज्जनपावेतों प्रांत घेतील. वैजापूरकर रजपुतांनी इंग्रजांकडून पैगाम केला आहे की एक कंपू जैपुरास पो, आह्मी पुढें प्रांत घेऊ. टोंक वगैरे ठाणी रजपुतांनी सरदारांची घेतली. आमचे नांव केलें. शेवटी आह्मांकडील महसूद अल्लीखान याणें ताकीद करून रजपुतांकडून ठाणी सोडविलीं असता...... ठाणी सोडून गेले. जागा खाली पडल्या आहेत ह्मणून नजबखानानीं मजकूर हाही सांगितला कीं, हेदरनाईकाची फौज काही इंग्रजाचे जिल्यास गेली होती, त्याची शिकस्त जाली, यास्तव आणिक फौजेस पाठविणार, भोंसले कटकाकडे गेले आहेत; परंतु कांहीं त्याजला जरब पोंहचली नाही. पुढे काय करतील व बातमी येईल ते सेवेसी विनंति लेहूं. याप्रमाणे उत्तर विनंति लिहावयास सांगितलें. श्रुत होय. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.

आमचा व सरकारांचा इनामप्रमाण करून देणें की, पुढे अन्तर न पडे. व इंग्रजांसी आह्मी इकडे बिघाड केलियावर तुह्मांकडील आश्रावर न राहिला तर आह्मी एकले पडून त्यांचे काबूंत सांपडूं, न करावे. तेव्हां आह्मी पुरती खातरजमा केली व आपली कैसी खातरजमा जाहली हे पुसिलें. तेव्हा बोलिले की, तयांच्या आमचा कौलकरार जाहला ह्मणजे खातरजमाच आहे. याप्रमाणें बोलणें जाहलें आहे. हाल्ली इंग्रजांची मोहीम अपुरी सोडून सरदार उज्जनी इंदुरास आले. यास्तव यांस संवशय वाढ होऊन पातशहाकडून कम नामें खोजा व नजबखानानें आपलेकडील इसमास नामें खोजा वजिरास नालकी व इंग्रजास वस्त्रें, जवाहीर व पत्रेंव आसफद्दौलाचे मातुश्रीस व आजीस वस्त्रें देऊन अयोध्येस रवाना केले. तेसमई आह्मी पृच्छा केली की, हा सिष्टाच्यार करावयाचें कारण काय ? तेव्हा बोलिले कीं, वजिराची आबरू वाढावी आणि इंग्रजांनी वजिरास ग्रासिलें आहे तें तूर्त आमचे खातीर दास्त केवळ ग्रासून चुकणार नाहींत तोंवर सरकारची फौज या प्रांतीं आलियावर त्यांचे आमचे विच्यारें जें कर्णे ते करूं, एविशीं तुह्मी आपले चित्तांत संदेह न मानावा. याप्रमाणें आमची खातरजमा केली व पूर्वी पातशहानी डेरेदाखल व्हावें व अंतर्वेदीत उतरावे हें ठरले होतें. याचे कारण हेंच की, सरदारांनी इंग्रजास सुरत प्रांतीं सरकारचे फौजेनें घेरले होतें या प्रतापावर हे बहुत उछाहयुक्त होते. आता सरदार फौज घरोघर गेले व एक दोन स्थलीं फौज इंग्रजांनीं मोडली व या प्रांतीं गोहदेकडील फौजेवर शहखून पडला. सरदार वीस हजार फौज असतां आपसांत फुटून गेले. अंबाजी इंगळे यांनी ग्वाल्हेरसारखा किल्ला गमाविला. इंग्रजांनी घेतला. आपले फौजेचें बळ नाहीसे जाणून हे शशांकित होऊन बाहीर निघणें राहिलें. वर्षाकाळानंतर सरदार मातबर फौजेनें आलियावर त्यांचे आमचेसला हें जें उत्तम असेल तें करूं, ह्मणतात. जें वर्तमान आह्मांस कळत नाही ते बातमी पुणियाहून कुवरसेन नामें कोणी आहे तो तेथून दिल्लीस नजबखानास वगैरे चहूंकडे बातनी लिहितो. व उज्जनची ही बातनी कच्ची पक्की वरचेवर अनुपगीर गोसाव्याकडे येते. तो यांस श्रुत करितो. तें वर्तमान आह्मांस नजबखानानीं सांगितलें. तेव्हां आमचे कर्ण सिथळ जाहले. परस्परें पातशहांस व नजबखानास याप्रमाणें बातमी येते ते वेळेस हे ह्मणतात कीं, हे आपले सरकारच्या गोष्टी उजमाच्या सांगतात. परंतु तेथील लिहिणार लिहितात ह्या गोष्टी सत्य आहेत. याप्रमाणें इकडील जालेलें वृत्त श्रवण व्हावें ह्मणून विनंति लिहिली असे. व सेवटीं आह्मी यांसी बोलिलों कीं, इंग्रजांची नड कायम ठेवलियास आमचे सरकारचे नुकसान नाहीं, परंतु पातशाहीस ठीक नाहीं. तेव्हां बोलिले कीं, श्रीमंतही त्यांचे पारपत्यास सिद्ध होत आहेत व आह्मांस तेंच आपले मकदुराप्रमाणें कर्णे प्राप्तच आहे. वर्षाकाळानंतर श्रीकृपेनें सरकारचे फौजेसहित सरदार आलियास त्यांचेच विच्यारें जें कर्णे तें करूं याप्रमाणें यांसी पक्कें केले आहे. पुढें इंग्रजांची यांची तुटातूट होऊन, त्यांचे प्रांतावर मोहीम करीत, तें करावयासी सरदारांस सेवकानें लिहिलें व पातशहा नजबखानाकडूनही लिहिलें व वचनीं गोविलें आहे. इंग्रजास चहूंकडून ताण बसल्यास जेर होतील. यास्तव एक सरदार मातबर एप्रांतीं पाठविणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.

तात्पर्य, ममत्व व ममत्वाभाव, अहंता व अहंताभाव, मृतत्व व अमृतत्व, अशा परस्परविरुद्ध स्थितिप्रत ही मंडळी जाऊन पोचली. अशांचें तत्त्वज्ञान जसें प्रपंचाला तसेंच परमार्थालाहि परम बाधक होय. ह्यांना प्रपंचहि नाहीं व परमार्थहि नाहीं. कारण, परमार्थाला आपण जाऊन पोहोंचलों व प्रपंचाला सोडून दिलें, अशी ह्यांची भावना असते. ह्या शाखेच्या तत्त्वज्ञानाचा परिणाम महाराष्ट्रांत दोन चार वेळां झालेला आहे व जेव्हां जेव्हां झाला आहे तेव्हां तेव्हां राष्ट्रत्वाचा लोप होऊन गेला आहे. जीवन्मुक्त, संन्यस्त, व विरक्त ह्यांनीं प्रपंच सोडलेलाच असतो; तेव्हां त्यांची कांहीं हानि व्हावयाची राहिलीच नसते. ज्यांनी प्रपंच सोडला नाहीं, त्यांची मात्र ह्या तत्वज्ञानानें पुरी फजिती होते. व्यक्तिंचा समुदाय जो समाज किंवा राष्ट्र त्यांच्या प्रपंचाला व परमार्थ मार्गाला तर हें तत्त्वज्ञान अत्यंत घातक असतें. समाज किंवा राष्ट्र ह्मांना समाजाचा किंवा राष्ट्राचा तिटकारा करावयास शिकविणें म्हणजे समाजाला किंवा राष्ट्राला नाशाच्या पंथासच लावणें आहे शिवाजीच्या हत्तींना, रथांना व घोड्यांना व जनसमूहाच्या मताला धाब्यावर बसविणारा तुकाराम, ज्ञानेश्वराचाच शिष्य होय. ही ग्यानबातुकारामांची जोडी महाराष्ट्रांतील समाजाच्या व राष्ट्राच्या प्रपंचाला बहुत घातक झालेली आहे. जर्मनींत इसवीसनाच्या अठराव्या शतकांत असाच प्रकार झाला. लेसिंग, गेटी, शिलर, हेगेल, फिश्ट, वगैरे जीवनमुक्तांच्या तत्त्वज्ञानानें राष्ट्राचा व प्रपंचाचा अभिमान कर्त्या व विचारी लोकांना वाटेनासा झाला व नेपोलियनाच्या मगमिठींत जर्मन लोक सांपडले.* * जगांतील माणसापुरतीच असणारी ही जर्मनींतील समबुद्धि जर्मन राष्ट्राच्या नाशास कारण झाली, अखिल चराचर सृष्टीची समबुद्धि ठेवणारी महाराष्ट्रांतील Cosmopolitanism महाराष्ट्राच्या नुसत्या राष्ट्रनाशासच तेवढी कारण झाली असें नाहीं; तर ह्या राक्षसीच्या उपदेशानें कला, संपति, संतति, वगैरे सर्व संस्कृतीचा लोप झाला.

विद्यांपि खेदकलिता विमुखी बभूव !

आणि मोक्षाची व परमार्थाची प्राप्ति एकीकडेच राहून, स्वतःच्या घरांत गुलामाप्रमाणें राबून परक्याच्या ओंजळीनें पाणी पिण्याचा दुर्घट व लाजिरवाणा प्रसंग मात्र झाला !!!