Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९१.
श्री.
पौ छ २६ जिल्हेज,
१६९५ फाल्गुन वद्य ५
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्रीं हरीपंत तात्या स्वामीचे सेवेसीं:-
सेवक भवानी शिवराम सां नमस्कार. विनंति उपरी येथील कुशल ता। छ १९ माहे जिल्हेज गुरुवार मुकाम मोजे इदरगांव, पा गुंजोटी, जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असावें. विशेष. दोन तीन पत्रें आपणाकडून आलीं पाहीन आल्हाद जाहला. उत्तरें पाठविलीं ते पोंहचून सविस्तर कळलेंच असेल. प्रस्तुत वर्तमान कीः संकेताप्रमाणें लांब लांब सोळा सतरा कोसांच्या मजली करीत, मजल दरमजल छ १७ रोजीं गुंजोटीवर मुा केला. इतकियांत मंदारुलमहाम यांची पत्रें एकामागें एक कीं, तुह्मीं सत्वर येणें. त्याजवरून राजश्री मामा यांच्या तर्फेनें राजश्री बापू शिवदेव यांजकडील चिमणाजीपंत आह्मी दोन प्रहर रात्रीस लष्कर दाखल जाहलों. दुसरे रोजी मदारुलमहाम यांचे पुत्र डावरजंग डेरीयास आले. भेटी जाहल्या. तदोत्तर आपणहि गेलों. भेटी होऊन कित्तेक मजकूर बोलण्यांत आलें. त्याजकडील लक्ष आपणाकडे आहे. श्रीमंत दादासाहेब यांजकडून राजारामपंत नामें एक गृहस्थ व भिकणखान ऐसे आले आहेत. मजकूर कीं, आपणास साह्य व्हावें, एक दोन किल्ले व दाहा कोसांची जाहागीर देतों. त्यास अमान्य करून, लक्ष आपणाकडे ठेविलें आहे. याउपरी होईल वर्तमान तें लिहित असों. छ १८ रोजीं सेनासाहेबसुभा व राजश्री मामा यांचे भेटी जाहल्या. आज छ मजकुरीं बंदगानअल्लीच्या मुजामतीस आह्मांस मदारउलमहाम नेणार. राजश्री मामाच्याहि भेटी होतील. तदोत्तर घडेल तें वर्तमान लिहिलें जाईल. सारांश, याजंकडील लक्ष एकनिष्ठपणें आपणांकडे आहे. दुसरियाकडे कि मपिहि नाहीं. कळावें ह्मणोन लिहिलें आहे. बहुत काय लिहिणे? कृपालोभ करावा हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९०
श्री.
पो छ २६ जिल्हेज.
१६९५ फाल्गुन वद्य ५
राजश्री हरीपंत गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत. विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. छ १६ जिल्हेजचीं पत्रें पाठविलीं आहेत त्याजवरून कळलें असेल. राजश्री भवानी शिवराम व राजश्री त्रिंबकरावमामाकडून राजश्री शिवराम विठल यांजकडील चिमणाजीपंत मोगलांकडे पाठविले होते. छ १७ जिल्हेजीं आमचा व तांब्राच्या सैन्याचा चौं कोसांचा तफावत राहिला. मौजे कवठे पा कलबुर्गें येथें आले. राजश्री रघुनाथरावदादा यांजकडून भिकणखान मेवाती व राजाराम गोविंद कोणी मोंगलांकडे आले होते. त्यास, छ १८ जिल्हेजी फाग वद्य पंचमी सौम्यवारीं प्रहर रात्रीस रुकनद्दौला व शर्फुद्दौला व बीरबाहादर दोन कोस अलिकडे आले. आह्मी व मामा दोन कोस पुढें गेलो. भेटी जाहल्या. नवाब निजामुद्दोला यांच्या भेटी होऊन चाल ठहरावी हा प्रकार मात्र आहे. याउपरी व्हावी ते त्वराच व्हावी. लांबण होऊं नये. सर्व तुमच्या ध्यानात आहे. राजश्री कृष्णराव नारायण यांच्या पत्रावरून कळेल. अतःपर कर्तव्य कामास दिवस लागों नयेत. रा १९... माहे जिव्हेज, बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति, मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक. ८९
श्री.
१६९५ फाल्गुन वद्य ५
राजश्री नानाजी कृष्ण व राजश्री बाबूराव विश्वनाथ गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. इकडील वर्तमान वरचेवर लेखन होतच आहे. नांदेडच्या मुकाम राजश्री कृष्णराव आह्मांजवळ पोंचल्यावर तैसेच दरकूच येत आहों. तांब्रांकडील राजकारण पहिलेंच आहे. त्याजकडील ज्ञानराव गिरधर आला होता. त्यास रवाने केला. ज्याबितजंग यासीं आणावयाबद्दल राजश्री दिवाकर पुरुषोत्तम पारा आणि दर मजल आलों, नबाबाकडून पत्रें आलीं कीं, आपण कलबुर्गियाचे सुमारें येत असों. त्याजवरून, छ १६ जिल्हेजीं राजश्री भवानी शिवराम नबाबाकडे पा. या मामाच्या तर्फेनें या शिवाजी विठ्ठल यांजकडील चिमणाजीपंत त्या समागमें दिल्हे. काल छ १८ जिल्हेजीं बुधवार फाग वद्य पंचमी प्रहर रात्रीस रुकनद्दौला व शर्फुद्दौला व वीरबाहदर यांच्या भेटी जाहाल्या. दोन कोस ते अलीकडे आले. आह्मीं व राजश्री मामा इकडून दोन कोस गेलों, भेटी होऊन आपापले गोटास आलों. नबाब निजाम उद्दोला यांच्या भेटी उदईक होऊन, पुढील चालीचा प्रकार होणें आहे. राजश्री रघुनाथराव दादा यांजकडून भिवुणखान मेवाती व राजाराम गोविंद ऐसे नबाबाकडे आले आहेत. त्यांसहि नबाब उदईक बिदा करणार. दादा माघारे फिरले. इतकें मात्र वर्तमान. आहे. ठिकाणबंद कोठें आले, मजकूर काय, हा प्रकार नाहीं. बातमीस माणसें गेली आहेत. आलियावर लेहूं. दादांची पत्रें आलिकडे आह्मांस दोन तीन आलीं कीं, तुमचे मतलब होऊन येतील, तुह्मीं रा त्रिंबक विश्वनाथ यांसीं भेटला हें उत्तम केलें, तरी अती सत्वर येणें. त्यास, आह्मीं साफ उत्तर दिल्हें. त्याचा मसोदाही आहे. सारांश, अतःपर लांबण होऊ नये, येविशीं राजश्री तात्यांनी लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. येथें तो रुा अगत्य पाहिजे. व आमच्या लोकांचा गवगवा मिटोन आदी होणें. दोन चार लाख रु। कोणत्याहि प्रकारें जरूर आहे. आह्मीं कायावाचामनें सर्व प्रकारें तुह्मांजवळ आहों. तुह्मीं मुरबीयांस प्रांजल सांगावें. निशा केलीच आहे. तत्रापि, साहित्यप्रकार अमलांत यावा. हें जाहले पाहिजे. रा छ १९ माहे जिल्हेज, बहुत काय लिहिणे ? हे विनंती. मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ८८
श्री.
१६९५ फाल्गुन शुद्ध १२
राजश्रियाविराजित राजमान्यराजश्री नरसिंगराव स्वामीचे सेवेसीं:-
पो सखाराम भगवंत साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जागून लिहित जावें. विशेष, राजश्री विष्णु नरहर लष्करांतून आले. त्यांणी सविस्तर मजकूर सांगितला तो कळला. त्यास तुमचें लक्ष इकडचें पुरतें आहे व हाली मारनिले यांणीं खातरजमा केली. त्यास, राजश्री भवानराव प्रतिनिधी व राजश्री वामनराव गोविंद हे उभयतां तुह्मांस सांगतील त्याप्रों ते व तुह्मी मिळोन कर्तव्य तें करावें. सर्व गोष्टी तुह्मांस समजल्याच आहेत. मेहनतीचे, कारस्थानीचे दिवस हेच आहेत. सर्व एकदिल होऊन कर्तव्यार्थ करावी. रा छ ११ जिल्हेज. बहुत काय लिहिणें. लोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ८७
श्री.
१६९५ माघ वद्य ४ वद्य ३०
पु। सेवेसी सां। नमस्कार. विनंति. येथील वर्तमानः श्रीमंत उभयता * * बाई पुरंधरास गेली. राजश्री नाना फडणीस व राजश्री सखारामपंत बापू व हरीपंत फडके ऐसे त्रिवर्ग तेथें आहेत. राजश्री मोरोबादादा फडणीस पुणेयांत आपल्या बागांत राहिले आहेत. काम कारभार सर्व बाईच्या नांवें पत्रे होतात, सरकारी कारखाने पुरंधरास नेतात. लोकहि सावध जाले आहेत. जिकडे ज्यांचा थारा तिकडे ते थारियास लावितात. ऐशास, राजश्री तात्यास घरास पाठवावें ह्मणोन दोन तीन पत्रांनीं लिहिलें आहे. त्यास, आपण लिा कीं, काका त्रिंबकराव मामाच्या लष्करीं गेले आहेत, ते आले ह्मणजे तात्यास लौकर पाठवितों, ह्मणोन लिहिले. तरी, तात्यांच्या येण्यास बहुत दिवस लागतील. तरी च्यार उंटें, दोन तट्टें सत्वर पाठवावीं. दोन उंटें राजश्री रावजीस दिलीं पाहिजेत. यास्तव उंटें, तट्टें जरूर आधीं पाठवावीं. दिवसगत न करावी. कृपा किजे. हे विनंति. इ० इ० इ०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ८६.
श्री नकल.
१६९५ पौष वद्य १
याद. राजश्री बाळाजी नाईक भिडे यांचा हिशोब एकंदर, सु। अब सबैन मया व अल्लफ, माहे रमजान, अखेर मार्गशीर्ष पावेतों सरकारचा शिक्यानशीं दिल्हा. त्याजशिवाय मारनिलेचें देणें तफावत कलम रुा
३०००० कित्ता रकमा.
१५००० सन इसन्नेंत सरकार भरण्यास नाईक मारनिले व नारो आपाजी व रामचंद्र नाईक परांजपे यांजकडून रुपये ५००००० पांच लक्ष देविले. त्यापैकी रद्कर्ज हुंड्या परभारें दिल्हे ४८५०००. बाकी
देणें रु।
१५००० दरबारचा खर्च व शिलेदाराचे समजाविशी बा व गैरे हिशेब रुा २२६५६७॥• पैकीं भरणा परभारा २११५६७|||• बाकी देणें
-----
३००००
२००० त्रिंबकराव हरी परचुरे यांणीं बंदर सुरतची मामलत करून रसदेचा भरणा केला असतां, त्याजकडून मामलत काढून रसदेचा ऐवज घेतला; तो माघार दिल्हा. सा खर्चाचे रुपये मारिनलेस देणें पडिले,
ते रुा १५२५ माहाल मार कमाविसदार व कारकून याचे मुशाहिरे देणें पडिले ते रुा ४७५ व्याजावा.
----
३२०००
सदरहू बत्तीस हजार रुपये पेशजींचे हिशेबाशिवाय मारनिलेचे देणे. शिवाय व्याज सदरहु ऐवजाचे मित्या पाहून देणे असे. जाणिजे. छ १५ माहे सवाल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ८५
श्री.
१६९५ आषाढ-श्रावण
श्रिया सहस्रायु चिरंजीव राजमान्य राजश्री भाऊ यांसीं प्रति काशीराव भास्कर आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी ऐसें न करावें. सदैव पत्रीं कुशलार्थ लिहित जाणें. यानंतर इकडील अर्थ तरीः चिरंजीव रा तात्या, श्रीमंत मातुश्री दर्याबाईसमागमें श्रीमंत आपासाहेबांसहित आहेत. आकोटावर आले. इस्माईलखान अलजपुरास आहेत. श्रीमंत नानासाहेब व नबाबाचे दिवाण रुकनद्दौला व जंग व धौसा ऐसे मिळून पंधरा हजार कंबेश फौज, शिवाय पन्नास साठ तोफा, शिवाय जेजाला, बाण व गारदी ऐसे सामानानशीं नजीक अलजपुरास गेले. पाहावें. इस्माईलखान जुजावयासी लागेल. शहरांतून लागले तरी आपा बाहेरून लाग करतील. नाहीं तरी, इस्माईलखान याचे विचारें जावसाल होणें तो होईल. ह्या आठ दिवसांत हरएक गोष्ट घडते, ऐसें आहे. आह्मी उभयतां श्रीमंताचे कटाक्षामुळें बेसरंजामीस्तव घरींच आहों. चिरंजीव तात्या मातुश्रीचे मर्जीत सुखरूप आहेत. चिंता न करावी. बहुत काय लिहिणें हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ८४
श्री.
यादी बळवंतराव महादेव भानु. विज्ञापना. आमची बहीण कैलासवासी श्रीमंत भाऊ साहेब यास प्रथम संमंधास दिल्ही होती. सबब सरकारांतून आह्मांस तो बेलापूर येथील दिवाणागिरीची असामी दरकी अडीच हजार रुपये यांची कैलासवासी श्रीमंत नानासाहेब यांणीं करार करून दिल्ही. ती आजपर्यंत निर्वेध चालत आली. ती स्वामी कृपाळू होऊन, असामी पूर्ववत आह्मी सरकारचे पदरचे, आमचें चालवणें अवश्यक जाणोन, असामी चालविली पाहिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३४९
श्री १६१३ भाद्रपद शुध्द २
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १८ प्रजापतिनाम सवत्सरे भाद्रपद शुध द्वितीया मंदवासर क्षत्रियकुलावतस श्री राजाराम छत्रपति याणी मा। सर्जाराव जेधे देशमुख व देशकुलकर्णी व गावकुलकर्णी मोकादम व चौगले व बाजे व सेटे माहाजन तपे रोहिडखोरे यासि दिल्हे अभयपत्र ऐसे जे तुह्मी स्वामीसनिध चजीचे मुकामी येऊन विदित केले की तपे मजकूरचे वतनदार लोक व आपण रयत देखील स्वामीच्या पायासी एकनिस्ट आहेत तरी स्वामीने कृपाळु होऊन वतनदारास वतने पहिले निजामशाही व आदीलशाही याचे कारकिर्दीस चालत होती तेणेप्रमाणे चालवायाची आज्ञा करून अभयपत्र देविले पाहिजे ह्मणोन तरी तुह्मी स्वामीच्या पायासी एकनिष्ट आहा या गोष्टीवरून स्वामी तुह्मावरी सतोषी आहेत त्या प्रातीच्या राज्याच्या कार्यभागास स्वामीने राजश्री रामचद्रपडित अमात्य व राजश्री शकराजीपत सचिव ठेविले आहेत त्यावरी मखत्यार आहे तेही तुमचे वर्तमान मनास आणून वतनाचा निर्वाह करून सनदा दिधल्या असतील त्या स्वामीच्या च आहेती तेणेप्रमाणे स्वामी चालवितील आपले समाधान असो देणे मावलप्राती राजश्री शकराजीपडित सचिव याचे दिमतीचे मुलकात आहे याकरिता तुह्मी त्याचे आज्ञेप्रमाणे वर्तणूक करित जाणे आणि स्वामीकार्य करून आपला मजुरा करून घेणे पुढे स्वामी त्या प्राते येतील तेव्हा तुमचे उर्जित करितील अभय असे जाणिजे निदेश समक्ष
रुजू
सुरु सुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ८३
श्री
१६९५ भाद्रपद वद्य अखेर.
श्रीमंतास पत्र लिहिलें आहे त्यांतील अन्वय.
विशेष. स्वामीनीं आज्ञापत्र पाठविलें तें सादर जाहालें. छ ११ जमा दिलाखरीं दोन प्रहरां दिवसानंतर गाडद्यांची तलबेमुळें दिवाणखान्यांत कटकट जाहली. त्यांत नारायणराव मारले गेले. त्यास, तुह्मीं किल्ले मजकूर येथील चौकशी पाहारियाचा बंदोबस्त चांगला करणें, तिकडे तुह्मांस शत्रू संनिध. ते आपली संधी पाहत असतील, याजकरितां बातमी राखोन बहुत खबर ( दार ) राहणें ह्मणोन आज्ञा. त्यास आज्ञेप्रमाणें किल्याचा बंदोबस्त यथास्थित राखला आहे. सांप्रत, नबाब हैदरअल्लीखान पट्टणासच आहेत. चित्रदुर्गकरांकडे जमाव पाठविला होता. त्यास, तेथील तह करून जमाव पट्टणास आणविला.........जागा कोडगाकडे वगैरे जमाव पाठविला होता. सर्व...पट्टणास जमा केला आहे. विजयादशमी जाहल्यावर चंदावरची कुमक करणार ह्मणोन बातमी आली आहे. याउपरी काय मनसबा करतील कळत नाहीं. वातनीस नेहमीं पांच जोड्या पाठवून वरचेवर बातनी आणवित असतों. त्याचा उपद्रव इकडे द्यावयाचा डौल दिसोन आलिया ठाण्याच्या बदोबस्तास शिबंदी जाजती ठेवावी लागेल. गुदस्तां नबाबांनीं श्रीनिवासराव बरकी फौजसुद्धां पाठवून पुंगनुर व घटक वगैरे तालुक्या खालील पाली येथील खंडणी तीसाला करून ऐवज घेऊन गेले. व गुमनाड पालें घेऊन, तेथें ठाणें आपलें घालून, चिमणाजी बाळाजी यांस ठेऊन, तेथें पांचशें स्वार व पांचशें गारदी ठेविले आहेत. त्याचा उपद्रव तालुक्यास होत आहे. इकडे आरद्राचा परज्यने जुजबी पडला होता. शेतें पेरलीं होतीं. मध्यें परज्यने पडला नाहीं याजमुळें वाळून गेलीं. कार्तिकांत साळीचें पीक यावें तें बुडालें हल्ली हस्ताचा परज्यने लागला आहे. स्वामीचे पुण्यप्रभावें (पीक) सर्व तालुक्यांत होईल. वैशाखचें साळीचें पीक होईल. नबाब महमंद अल्लीखान यांणीं चंदावरास मोर्चे देऊन तें स्थळ घेणार. धर्म–संस्थान आहे. स्वामीच्या पुण्यप्रतापें राहील. कळेना. येंदा फौजा याप्रान्तीं आल्या तर प्रांताचा बच्याव आहे. वरकड वर्तमान राजश्री रामचंद्र माहादेव शेवेसीं विनंती. (कर) तां निवेदन होईल.