Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १०१
श्री.
पौ छ २ मोहरम.
१६९६ चैत्रशुद्ध ३.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामींचे सेवेसीः-
सेवक कृष्णराव नारायण जोसी कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असावें. विशेष. इकडील वर्तमान तरी अलाहिदा पत्रीं लिा त्यावरून कळों येईल. सारांश, यांची खर्चाची बेजमी उत्तम रीतीची करून दिल्ही पेा. त्याशिवाय आजपावेतों श्रम केले ते व्यर्थ होतात. तरी चित्तावर धरून अगत्य कार्य केलें पाहिजे. येथें नानांनी किंवा बापूनीं यावें. त्याखेरीज केवळ रा मामांशींच संबंध असलिया उत्तम नाहीं. येविशींचे सविस्तर अर्थ पुर्ते मनन करून, काय विचार करणें तो करावा. आह्मांस सुचलें तें आह्मी लिहिलें आहे. कळावें. बहुत काय लिहिणे ? लोभ करीत असावा हे विनंती.
राजश्री भवानी शिवराम यांनी दोन पुरवण्या * वर्तमानाच्या वगैरे बंद सात, लिा आहेत. ते अक्षरशाहा वाचून पाहून करणें तें करावें. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १००
श्री.
१६९५ फाल्गुन वद्य १२
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन गोसावी यांसी प्रति मातुश्री गंगाबाई आशिर्वाद, सुा अब सबैन मया व अल्फ. राजश्री त्रिंबकराव विश्वनाथ यांच्या व नबाबाच्या भेटी गुंजोटीच्या मुकामीं जाल्या. दर मजल फौजसुद्धां त्याच रोखें येत आहेत. त्यास, तुह्मीं पथकसुद्धां त्रिंबकराव यांजकडे जाऊन पोंहचणें. जाणिजे. छ २५ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९९
श्री.
१६९५ फाल्गुन वद्य १२
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नरसिंगराव स्वामींचे सेवेसीः
पोष्य सखाराम भगवंत सा नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. राजश्री त्रिंबकराव मामाच्या व नबाबाच्या भेटी गुंजोटीच्या मुकामीं जाहल्या. तेथून फौज सुद्धां दर मजल त्याच रोखें येत आहेत. त्यास, तुह्मी राजश्री मामाकडे पथकसुद्धां जाऊन पोंहचणें. बहुत काय लिहिणे ? लोभ असों दीजे. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९८.
श्री
पो छ २ माहे मोहरम
१५ फाल्गुन वद्य ११
आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता छ २४ जिल्हेज भौमवार पावेंतों लष्करांत सुखरूप असो. विशेष, इकडील वर्तमान तरीः रुकनुद्दौलाच्या भेटीचा मार पेशजीं लिहिलाच आहे. मंदवासरीं बंदगानअल्लीच्या भेटी जाहल्या. भेटीचे समईं मामांनीं सेनासाहेबमुभा यांजकडील सरदार व लोक भेटीस न आणावे ह्मणोन सांगितलें आणि आपले सरदार व लोक भेटीस बहुत नेले. असो. ते भेटी झाल्यानंतर सेनासाहेबसुभा यांस टाकून खलबत मामांनी करणें उत्तम नाहीं. पहिल्यापासोन ऐसें जाहलें नाहीं. ऐसें असोन, तेथे मामांनी उपक्रम केला. तेव्हां यांनीं म्हटलें कीं, आह्मांस निरोप देणें, आह्मी डेरेयास जातों, तुर्ह्मी खलबत करावें. ऐसें ह्मणोन नबाबाचा निरोप घेऊन आले, यांस तर वाईट वाटलें व नबाबास व रुकनतद्दौला यांसहि ते गोष्ट मानली नाहीं. यांनीं, मसलतीवर नजर, या करितां मर्जी राक्षतात. परंतु, समयीं मामा मानभंग या रीतीनें करतात. 'आपण लिहिलें कीं, मजी सांभाळावी. त्यास. मर्जी सांभाळण्यास कसूर करीत नाहींत. परंतु, समयीं ऐसें परस्थळीं करितात. हें उचित कीं काय ? तेहि हे मोजीत नाहीं. परंतु विरुद्ध दिसतें. यास काय करावें? खर्चाचा प्रकार तरीः आपण लिहिलें कीं, मामाकडे लाख रुपये पाठविले आहेत, ते देतील न देतील तरी तेथें राहून पाठवणें, भरती करून पाठवूं. ह्मणोन लिहिलें. त्यास, मामास नित्य उठोन खर्चास मागतात. दोन चार रुपयांचे निर्खे देतात. त्याचे पावणेतीन रुा घडतात, तेहि एकदां देत नाहींत. हजार दोन हजार ऐसे देतात. त्याणे त्यांचे कांहीं होत नाहीं. यांस जर करतां पांचलक्ष रुा तूर्त मिळतात, तरी दोन महिने निसूर राहून मसलतीवर कायम राहतील. दोन गोष्टी अडचणीच्या संभाळत नाहीं. रुबकार लढाई प्राप्त. या दिवसांत पोटाची रड नसावी व फंद नसावा. त्यास पोटास नाहीं; व दर्याबाई मामांनीं बगलेस मारली. यामुळे बखेडे होतात. यास, कोठपर्यंत सांभाळावें? मामा तरी परिछिन्न घातावर. त्यास साह्य देवजीपंत. युक्तीप्रयुक्तीने पेंच पडोत यांची कमी पडावी, राजश्री बापूंची व नानांची मर्जी यांजवर कडवी व्हावी, हें ध्यान आहे! हे तर आपल्याकडून बहुताप्रकारें सांभाळितात. मानअपमान ध्यानांत ने आणितां, भामांचे मर्जीप्रमाणें वर्तणूक करून, समयीं काम करून दाखवावें, आणि आपले मनोरथ सिद्धीस जावे. त्यास, या गोष्टीस मुख्यत्वें करून द्रव्य अनुकूलता पाहिजे. लोकांस पोटास मिळालें ह्मणजे मग हे कांहीं भीत नाहींत. त्यास श्रीमंत राजश्री नानांस विनंती करावी कीं, हे सरदारी आपली, पदरी पडीलयांचें उणें ते आपणास पूर्ण करावे लागेल. याजकरितां सरकारांतून अगर हरकैसेकरून यांस पांच लक्ष रु। कर्ज मेळवून द्यावे. आणि यांची पोटाची संस्था करावी. मसलत सिद्धिस गेल्यावर कर्जाच्या ऐवजास मुलूख परगणे लाऊन देतात. रु। व्याज सुद्धां आदीं देतील. आज सनदा करून देतात. परंतु हा समय आहे. लढाईचें काम. या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बेउजूर कैसी करितील ! आणि त्यास, बेमुरवत, अर्धरात्रीं प्रसंग पडल्या जीन ठेवा असें कैसें ह्मणावें ? याजकरितां कोणेंहि प्रकारें पांच लक्षांची तरतूद जाहली पाहिजे दर्याबाईस खर्चास मामा देतात. त्यांच्या लष्करांत व मामांच्या अविंधांच्या लष्करांत पोटाचें धरणें नाहीं. आणि यांचे लष्करांत पोटाचें संकटीं! या अर्थी बहुत संकटांत आहेत. हे संकट श्रीमंत राजश्री नाना दूर करतील तर होईल. आणख्यांच्यानें होत नाहीं. याजकरितां सविस्तरें ल्याहावयाची आज्ञा जाहली. त्यास, त्यांचा अर्थ ध्यानांत आणून पुर्तेपणीं विनंती करून माणसांची बेगमी करून देऊन लिहून पाठवावें. मागाहून एक दो रोजां राऊत व गणेबास ऐवजाकरितां पाठवितों. बातमीचें वर्तमान सविस्तर राजश्री भावानी शिवराम यांनी लिा आहे. कळेल, बहुत काय लिहिणें? लोभ कीजे हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९७
श्री.
पौ छ २ मोहरम.
१६९५ फाल्गुन वद्य ११
राजश्री नानाजी कृष्ण जोशी व बाबूराव विश्वनाथ वैद्य गोसावी यांसी:---
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. छ १७ जिल्हेजीं रुकनद्दौला व शर्फुदौला यांच्या भेटी जाहल्याचें वर्तमान लिा आहे. जावितजंग यासीं आणावयाबद्दल राजश्री दिवाकर पुरुषोत्तम यांस पा होतें. तेही काल छ २२ जिल्हेजीं दाखल जाहले. या उपरी कांहीं गुंता नाहीं. नेमलेल्या कामासच जावें. आणखी प्रकार नाहीं. वरकड राजश्री कृष्णराव व लक्ष्मणपंत यांणी लिहिलें आहे, त्याजवरोन कळों येईल. दोन चार पत्रीं राजश्री सखारामपंत व राजश्री बाळाजीपंत यांच्या पत्रीं मेजकुर कीं, स्वार पो खर्चास पाठऊं. त्यास, राजश्री त्रिंबकराव मामा यांची मर्जी आह्मांस दरकार. या मसलतीस मुख्य उपयोग. तिढण नसावी. त्याणीं पत्र लिहून मागितलें. तें आह्मी दिलें. त्याजवरोन कळलें असेल, त्यास, पोटाचा गवगवा लोकांस मोठा आहे. कामाची मुनासद बारीक आणि पैसा नाहीं, मामाकडेसच ऐवज आला नाहीं. हा मजकूर एक व प्रसंगीं एक असावें. ऐसें दोन मजकूर आहे. येविषयींचा सिद्धांत तेथें उभयतांचे विचारें काय तरतूद हे कळावें रवाना छ २४ माहे जिल्हेज. आह्माकडील सर्व अभिमान राजश्री बापूनीं व नानांनीं धरिला. तेथे अधिक लिहिणें ऐसें नाहीं. तुह्मी जवळ असा. बहुत काय लिहिणे? हे विनंती. मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९६
श्री.
गौ छ २६ जिल्हेज
१६९५ फाल्गून वद्य ६
आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता फाल्गुन वद्य ६ भृगुवासर पावेतों मुा नजीक गुंजोटी वर्तमान यथास्थित असे. विशेष. रुकनतद्दोले यांची भेट बुधवारीं रात्रौ राजश्री मामासाहेब व सेनासाहेबसुभा यांची जाहली. भाषण ममता पुरस्कर जाहलें. आज उद्यां निजामअली याची भेट होईल. उपरांत चालीचा प्रकार ठरोन कूच होईल. रा भवानी शिवराम व चिमणाजीपंत दिा राजश्री शिवाजी विठल हे नवाबाच्या लष्करांतच आहेत. देवाजीपंत धौसे यांस आणावयास गेले ते लवकरच येतील. श्रीमंत राजश्री दादासाहेब कोणे ठिकाणीं आले हें तहकीक बातमी नाहीं. त्यांजकडून राजारामपंत व भिकणखान आले आहेत. त्यांनी नबाब निजामअल्ली यास जहागिर वीस लक्षांची व दोन किल्ले देतों, ह्मणोन सूत्र लाविलें आहे. परंतु लक्ष मिळालें नाहीं. मामाच्या बोलण्यांत आलें आहे कीं, त्यास निरोप द्यावा; ठेऊ देतों, म्हणून मदारुलमहाल यांनी करार केला आहे. आजउद्यां निजामअल्ली यांच्या भेटी होतील. उपरांत मसलतीचा विचार ठराऊन इतकियांत बातमीहि पक्केपणाची येईल. मग रोंख कोणीकडे होणें तो देतील ऐसें आहे. भवानीपंतांच्या व रुकनतदौलांच्या बोलण्यांत त्यांणी दर्शविलें कीं, तुह्मांविसी राजश्री बापूस व राजश्री नानांस आह्मी लिहिलें होतें. त्याचीं उत्तरें आलीं तीं दाखविलीं. यांनींहि दर्शविलें कीं, आह्मींहि आपला स्नेहच असावा, ह्मणोन लिहिलें होतें. त्याचींहि उत्तरें आलीं आहेत. त्यास पत्रें पाहों झटल्यास असावीं याजकरितां पुरवणीं पत्रे लिहून दिल्हीं आहेत. त्याच्या नकला पाहत आहे. पेंच पडावयाचा नाही. परंतु इतला असावी याजकरितां लिहिले आहे. श्रीमंत राजश्री दादासाहेब यांची पत्रे सेनासाहेब यांस आली होती. त्यांची उत्तरे राजश्री मामांचे सल्लेने लिहून दिली. त्यांत अर्थ जेः आजपर्यंत लोभयुक्त पत्रे यावी ह्मणोन प्रतिज्ञा होती. याजकरितां उपासीतपासी मामासमागमें चार मास क्रमिले. निरुपाय जाणोन चारी घरें मोकलीं. ये गोष्टीस अनुसरलों. त्यास हालींहि पत्रें आलीं. त्यास गुह्य लिहिलें, आह्मीं मराठे, उर्मी-काय जाणो, त्यास प्रगट ल्याहावें, ह्मणजे समजण्यांत येईल, ऐसें लिहून दिल्हें आहे. सेनासाहेबसुभा यांचे विचारें कीं, मातुश्री बाईसाहेबांस घेऊन श्रीमंत राजश्री बापू व श्रीमंत राजश्री नानांनी फौजेस यावें, ह्मणजे उत्तम, कोणे गोष्टीचा पेंच पडणार नाहीं, सर्व सरदार आज्ञेंत राहतील, कामकाज जीव वादऊन करतील, व कोणहिविसीं पुढें पेंच पडणार नाहीं. बाईसाहेबांचें येणें नघडे, तरी तेथें एकाजणानें राहिलें पाहिजे, त्यास राजश्री बापूंनी तेथे रहावे आणि राजश्री नानांनी फौजेत यावे, ह्मणजे बंदोबस्त नीट होऊन कामकाज उत्तम प्रकारे होईल, पुढे पेंच पडणार नाहीं, दिवस हेच आहेत; आणि पाहता सल्लाहि हेच आहे, उभयतांतून एकजण आले, एकजण तेथे राहिले, तरी आपण अगर आपले नाना यांतून एकजणाने तेथे रहावे, एकाजणाने समागमे यावें. ऐसे यांचे मानस आहे. आणि ऐसेच घडलेही पाहिजे. श्रीमंत राजश्री नानाचे पत्र देखील आह्मांस नाहीं. विस्मरण पडलें कीं नाहीं? राजश्री मामांनीं बोलणें अगर खर्चास यास देणें तें आमचे विद्यमानें द्यावें, ऐसें तेथून यास परस्परें पत्रें आल्यास उपयोगीं आहे, परस्परें काम जाहल्यास आह्मी श्रम केले, त्याचें फल काय? तरी पुर्तेपणीं समजोन लिहावलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे आशिर्वाद.
राजश्री रावजी स्वामीस तात्यांचे सां नमस्कार, लि।। परिसोन लोभ किजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९५
श्री.
१६९५ फाल्गुन वद्य ५
आशिर्वाद उपरी. मुख्याकडून आज चार दिवसांत चार अनुसंधानें चौघांचे हातून याजकडे आलीं. त्यातील अर्थ जे, प्रथम सेनाखासखेल हें पद देतों, तुमच्या सरंजामाइतका सरंजाम देतों, आणि दोन किल्ले मातबर देतों, व दर्म्यानें मातबर माणूस देतों, आणि तुह्मी यावें. हें अनुसंधान योसिता व शिशु येथें आहेत त्यांचे विद्यमानेंच यांण त्याणी एक होऊन जावें, ऐसें प्रथम आलें. याणी साफ उत्तर दिलें. त्यावर दुसरें सूत्र आलें की, तुमचें पद तुह्मांस देतों, आणखी दोन किल्ले व जहागीर देतों. तेहि यांनी अमान्य केलें. त्याजवर, तिसरें सूत्र आलें कीं, जे जाहलें तें समर्थ, तुमचे मुद्दई आह्माजवळ आहेत, यामुळें तुह्मांस विश्वास पटत नाहीं, तरी त्यास ज्ञानकंटी बसवून पाहिजे तरी तुह्मांकडे पाठवितों. त्यानंतर चवथे सूत्र आले कीं, आपण एकले तुमच्या डे-यांत येऊन बसतों, तुमच्या वंशजपणास उत्तम दिसेल तें करावें; तुह्मी ह्मणाल कीं, राज्य एकीकडे व आह्मी एकीकहै कैसें बनेल, तरी तुह्मांस सोबती आणखी करून देतों, मुद्दईयाचे खावंद तुह्मी, व्हावें म्हणजे चिंता नाहीं. याणीं नावें पुसिलीं. त्याणी आपले सरदार मातबर यांची नांवें घेतात. वृध नकार-नामक सकार-नामक येथें आहेत. हे व मुद्दई यांची चमू यांची नांवें घेतलीं. तेव्हां त्यासहि संशय प्राप्त जाहला, परंतु परस्परें विक्षेप वाढावें या अर्थी नांवे घेतात किंवा कसें, हेंहि समजत नाहीं. यांणीं उत्तर केलें कीं, तुह्मी गोष्टी सांगतां त्या आमच्या निदर्शनास कशा येतील, व तुह्मी ज्याचे अभिमान धरिलें त्यांच्या गोष्टी तुह्मीच ऐशा सांगतां तेव्हां पुढें परिणाम कैसा ? ऐसीं याजकडे अनुसंधाने येतात. यांचा आमचा प्रकार दुसरो नाही, यामुळें आम्हांस कळतात. त्यास, याप्रो सर्वत्राकडेच असतील, ऐसें वाटतें. राजश्री मामांनींहि बोलण्यांत आणिलें कीं, श्रीमंतांची सूत्रें येतात यामुळें कोणी कच्चपक्के होतील कीं हे काय कळत नाहीं, खुद्द आह्माकडेच नित्य सूत्रें येतात, ऐसींच सर्वांकडे येत असतील. यांनी उत्तर केलें की, ज्यांच्या वंशांत खतरा असेल त्याचें कळेना, एक बाप असेल त्याजकडून तरी दुसरी गोष्ट घडणार नाहीं, ऐसें वाटतें. तेव्हां मामा उगेच राहिले. त्यास, त्यांचा खंबीरदार दुसरा नाहीं, परंतु फौजेस पोटास नाहीं यामुळे सर्व मनुष्य मात्र आजुर्दे आहे व मामाचें भाषण रुक्ष विक्षेपास कारण होतें. मामा यासींच रुक्ष भाषण करितात, ऐसें नाहीं. त्यास सल्लागार दकारपूर्वक. त्यास कोणेहि प्रकारे हितशत्रुत्व करणें प्राप्त. मामास मात्र आप्त वाटतात. अविंधहि फार अजुर्दा आहे. पदोपदीं भाषणांत नाशितात. व सर्व अध्यकता आपणाकडे असावी वरकडाकडे कोणाचें लक्ष नसावें, एतदविषयी प्रेत्नही केले आणि करितात. अविंधानें तर सुबकपणा ठराविला. त्याचे मानस कीं, राजश्री बापूनीं व नानानीं फौजेंत यावें तरच ठीक पडेल, एरवीं ठीक पडणार नाहीं. येविसीं त्यांचीं व जिवाजी रघुनाथ यांची पत्रेंहि गेलीं असतील. परंतु उघड लिहिलें न लिहिलें हें न कळलें. सारांश, मसलत थोर, या दिवसांत सर्वांचें मनोधारण रक्षून दाबहि राखावा तरच उत्तम. नाहीं तरी कल खाईल. मग सुधरणार नाहीं. पिघी अविंधानें लुटली. ब्राह्मण व मराठे यांचे कबिले तेथें होते त्यांच्या अबरू गेल्या. यामुळें मराठे अजुर्दा फार आहेत. अविंधांकडून सहजांत जाहलें, जाणोन न जाहलें, परंतु वाईट फारच जाहलें. त्यामुळें मराठे यांस विक्षेप जाहला. जे गनिमाई जबरेंत आली, यामुळे या गोष्टी घडल्या.' राजा बाहादर याचे वेळेस ऐसेच विक्षेप वाढले. त्यास, हें नसावें. हें पत्र वाचून फाडून टाकावें. यांतील भावार्थ मात्र यजमानाम समजावा. हरवख्त सूचना असावी है आशिर्वाद.
आज श्रीमंतांकडून कराराची यादी व पत्र यांस आलें. त्यांत लिहिले आहे कीं, जानोजी भोंसले यांच्या तहाप्रों तुमचे तुह्मांकडे करार आहे. मुधोजी भोंसले, जानोजी भों यांचे समई चंद्रपूर मात्र घेऊन ताबेदारी करीत होते, त्याप्रों करतील. याप्रों पत्र व यादी आलीं, टोपीवाले यांचीच पाठविलीं. नामनिर्देस उच्चार न करावा. परंतु वर्तमान असें आहे. यांस नकल दाखविली. ती त्यांनी आपणाजवळ घेतली आहे. परंतु यास पुर्तेपणीं समजलें आहे. एक दोन गृहस्थहि यास बोध करीत होते. परंतु यांणीं ते गोष्ट अमान्य केली जे, आपणास हे गोष्ट उचित नाहीं, प्राणहि जाऊ, परंतु विपरीत गोष्ट घडणार नाहीं, आमचे वृत्तीस क्षणक्षणा पालट न करावा. ऐसें उत्तर साफ केलें. परंतु ऐसे फंद आहेत ! यांत सावधता असावी. उभयतांनी यावें. हे मोठी सला आहे. हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९४.
श्री.
पौ. छ. २६ जिल्हेज.
१६९५ फाल्गुन वद्य ५.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापू स्वामीचे सेवेसीं:-
पो कृष्णराव नारायण जोशी कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करित असलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान तरी राजश्री त्रिंबकराव मामा राजश्री साबाजी भो सेनासाहेबसुभा यांच्या व रुकृनुद्दौले यांच्या भेटीं बुधवारी रात्रौ जाहाल्या. भाषण ममतापुरस्कर जाहलें. आज उद्यां नबाव बंदगानअल्ली यांच्या भेटी होतील. सविस्तर वृत्त राजश्री सेनासाहेबसुभा यांनी लिहिलें आहे. व तीर्थरूप राजश्री नाना व राजश्री बापूरावजी निवेदन करितील. तिकडून पत्रें वरचेवर येत असावीं. बहुत काय लिहिणें? लोभ करावा हे विनंती. सेवेसीं विनंती सेवक लक्ष्मण बल्लाळ साष्टांग नमस्कार विज्ञापना. जाहलें वर्तमान सेवेसीं लिहिलें आहे. नबाबाच्या भेटी जाहल्यानंतर सविस्तर लिहून पाठऊं, सेवेसीं श्रुत होय.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९३.
पौ छ. २६ जिल्हेज
श्रीशंकर,
१६९५ फाल्गुन वद्य ५.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री हरीपंत तात्या स्वामीचे सेवेसीं-
पो कृष्णराव नारायण कृतानेक सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेप. राजश्री त्रिंबकराव मामा व राजश्री साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा यांच्या व रुकनतद्दौले यांच्या भेटी बुधवारीं रात्रौ जाहाल्या. बोलणें ममतेचें जाहलें. आज उद्यां नबाब बंदगानअल्ली यांच्या भेटी होतील, येविशीं राजश्री सेनासाहेबसुभा यांनी लिहिलें आहे, व तीर्थरूप राजश्री नाना व राजश्री बापूरावजी सविस्तर सांगतील. त्यावरून कळेल. निरंतर पत्रीं कुशलार्थ लिहून संतोपवीत असावें. बहुत काय लिहिणें ? लोभाची वृद्धी करीत जावी. हे विनंती.
सेवेसीं लक्ष्मण बल्लाळ जोशी सां नमस्कार. विनंती लिा परिसोन सदैव परामृश करीत जावें. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९२
श्री.
पौ छ २६ जिल्हेज
१६९५ फाल्गुन वद्य ५
श्रीमंत राजश्री बापू स्वामींचे सेवेसीः-
सेवक भवानी शिवराम सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता छ १९ माहे जिल्हेज गुरुवासर मुकाम मौजे इदरगांव गुंजोटी जाणोन कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आह्मांकडील एक दोन पत्रें सेनासाहेब सुभा व सेवकांचे नांवे आली तीं पोंहचून संतोषवाप्ती जाहली. उत्तरे पाठविलीं तें पाहोन वर्तमान ध्यानास आलेंच असेल. प्रस्तुत इकडील वर्तमान तरीः आपले लिहिल्याप्रमाणें लांब लांब सोळा सतरा कोसांच्या मजली करीत मजल दर मजल छ १७ रोज भौम्य-वासरीं गुंजोटीवर मुकाम केला. तों पत्रामागें पत्रें दोन तीन मदारुलमहाम यांची आलींत कीं, तुह्मीं सत्वर येणें. त्याजवरोन तेच दिवशीं राजश्री मामा यांच्या तर्फेनें राजश्री शिवाजी विठल यांजकडील चिमणाजीपंत व आह्मी स्वार होऊन दोन प्रहर रात्रीस लष्कर दाखल जाहलों. दुसरे रोजीं मदारुलमहाम यांचे पुत्र डावरजंग डे-यास आले. भेटी जाहल्या, तदोत्तर आपण नबाबाच्या भेटीस गेलों. भेटीं होऊन कित्तेक भाषण जाहलें. याजकडील लक्ष आपलेशिवाय दुसरेकडे नाही. छ १८ रोजीं सेनासाहेवसुभा व राजश्री मामा यांच्याही भेटी बारा घटिका रात्रीस जाहाल्या. छ मजकुर आज आह्मांस बंदगानअल्लीच्या मुलाजमतीस मदारुलमहाम नेणार. सेनासाहेबसुभा व राजश्री. मामा यांचेहि भेटी घडतील. तदोत्तरः होईल वर्तमान सेवेसी लिहित असों. श्रीमंत दादासाहेब यांजकडोन राजारामपंत नामें वे भिकणखान आले. एक दोन किल्ले व दाहा वीस लक्षांची जहागीर देतों, साह्य व्हावें. त्यास याणीं अमान्य केलें; व लक्ष आपल्याकडे ठेविलें आहे. दुसरीकडे नाहींच नाहीं. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असे द्यावा. हे विनंती.