Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ८२.

श्री. (नकल)
१६९४ फाल्गुन शुद्ध १
शिक्का.

आज्ञापत्र समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री नारायणराव पंडित प्रधान ता, कादरखान वल्लद सादुल्लखान वा कसबें वाई समत हवेली प्रांत वाई. सुा सलास सबैन मया व अल्लफ, तुह्मीं हुजूर पुणें येथील मुकामीं येऊन विदित केलें कीं, कसबें मार येथील कोतवाली पेशजीपासून आपला आजा मियानखान त्याजकडे होती, तो हल्लीं मयत झाला, याजकरितां साहेबीं कृपाळु होऊन आपल्याकडे कोतवाली करार करून सनद करून दिल्ही पाहिजे. ह्मणोन त्याजवरोन मनास आणितां, का मारिची कोतवाली तुझा आजा मियनखान त्याजकडे चालत होती. त्यास, तो मयत जाहला. सबब हल्लीं तुजकडे कोतवाली करार करून दिली असे. कोतवाली संमंधें जमीन मळ्यासुद्धां व हक्कलाजिमा, सुदामत चालत आल्याप्रमाणें दुवा घेत जाऊन पूर्ववत्प्रमाणें कोतवालीचें कामकाज करीत जाणें, जाणिजे. छ २९ जिलकाद. आज्ञा प्रमाण, लेखनसीमा, मोर्तब.

पत्रांक ८१

श्री.
१६९४ माघ शुद्ध ८.

राजश्री संभाजी जाधवराव गोसावी यांसी:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो नारायणराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जाणें. विशेष. तुमच्या लोकांनीं तुमासीं गवगवा केला आहे, ह्मणोन कळलें. तरी तुह्मीं लोकांसह वर्तमान हुजूर येणें. येथें लग्नाचा प्रकार आहे. तरी सत्वर येणें. जाणिजे. छ, ७ जिलकाद. वहुत काय लिहिणे ? लेखनसीमा.

पत्रांक ८०

श्री.
१६९४ मार्गशीर्ष वद्य ११.
राजश्री बिरोजी गारे गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोसले सेनासाहेबसुभा रामराम. सुा सलास सबैन मया व अल्लफ, मौजे पेद पेठ पोरलावल हा गांव कृष्णाजी वामन यांजकडे मोकासा सुदामतपासून चालत होता. त्यांस देवआज्ञा जाली. याजकरितां त्यांचे पुत्र रा केशवराव कृष्ण यांजकडे पेसजीं प्रों करार करून दिल्हे असे. येविषयीं पेसजीं सनदा सादर जाल्या आहेत. तर मौजे मजकूराचा मोकासा दरोबस्त मारनिलेकडे चालवणें. सालमजकुरींचा वसूल तुह्मीं घ्याल तर देणें येईल. जाणिजे. छ. २४ माहे रमजान.

पत्रांक ७९

श्री.
१६९४ आश्विन वद्य १२


दस्तक सरकार राजश्री पंत प्रधान ता कमावीसदारान वे चौकीदारान व रहदारान व जकाती देहाय. सुा सलास सबैन मया व अलफ. राजश्री बाळाजी जनार्दन फडनिवीस यांचे तांदूळ खंडी १० दाहा खालोन फिरंगाण कल्याण प्रांतांतून पुणियास आणितील. त्यास, आणूं देणें. जकातीचा तगादा न लावणें. जाणिजे. छ २५ रजब. आज्ञा प्रमाण. लेखनसिमा. बार.
पैसा छ २४ जिल्काद.

पत्रांक ७८

श्री.
१६९४ भाद्रपद वद्य २

सेवेसी आबाजी बाजी कांबरस व रामचंद्र महादेव परांजपे. विज्ञप्ती. श्रीमंत महाराज राजश्री शिवाजी महाराज स्वामी यांसी तालुके चिबोडी व मनोळी दिल्हे आणि त्यांजकडोन ऐवज घ्यावयाचा करार केला रु। १२५०००१ बारालक्ष पन्नास हजार एक. सदरहु रुपये यांचा हवाला आह्मीं घेऊन ऐवज भरिला आणि दोन्ही तालुके ठाणींसुद्धां राजश्री आपाजी शामराव यांचे निसबतीस सावकारींत श्रीमंत महाराज स्वामी यांणीं ठेवून करार करून दिल्हे आहेत. त्याप्रों मुद्दल व व्याज, मनोती व दरबार सर्व सुद्धां ऐवज फिटे तों दोन्ही तालुके आह्मांकडे असावे. मधें महाराजांनीं आपाजी शामराव यांसीं व आह्मासीं हरएक गोष्टीविषयीं दिक्कत आणून तालुकेयाची घालमेल करितील किंवा सरकारांत आणखी मध्यस्ताचे हातून हरएकविशीं लोभ दाखवून संधान करितील आणि तालुक्याची घालमेल करवितील; किंवा भगवंत आपाजी व राजश्री शेषो नारायण यांचे कर्जाचा फडशा महाराजांकडून होणें आहे, तो सुरळीत न केल्यास सरकारांतून मानिल्हे तालुक्यांत उपद्रव करवितील; तर आमचा पैका कराराप्रों अगोदर देवावा. मग कर्तव्य तें करावें, अथवा आमचा पैका फिटे तों पुस्त पुन्हां करून घालमेल होऊं देऊं नये. भगवंत आपाजी व शेषो नारायण यांचा कांहीं पैका निघाला; आणि सरकारांतून देवणें; तरी परभारें महाराजांकडून देवावा. आमच्या दोन्ही तालुक्यांस उपद्रव लागों नये, येणेंप्रमाणें करार करून अभयवचन दिल्यास सेवक या कामांत येतील. कलम. सदरहुप्रमाणें तुम्हीं विनंती केली. त्यास तुह्मी बेवसवास या कामांत येऊन ऐवजाचा भरणा करणें. तुह्मास श्रीमंत महाराज छत्रपती स्वामी यांनी दोनी तालुक्यांचा ऐवज अपाजी शामराव यांचे विद्यमानें लाऊन दिल्हा आहे. त्याजप्रमाणें घेत जाणें. सरकारांतून दोन्ही तालुकियांस उपद्रव होणार नाहीं. कदाचित महाराज स्वामीकडून तालुकियास उपद्रव जाला, तर सरकारांतून पुस्तपुन्हा राखून तुमचा पैका व्याजसुद्धां फिटे तोंपर्यंत तालुकियाची घालमेल होऊ देणार नाहीं. येणेप्रमाणे करार छ १६ जमादिलाखर, भाद्रपद मास, सन सल्लास सबैन.

                                                                             लेखांक ३४८

                                                                                                श्री                                                          १६१२ वैशाख शुध्द ७  

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १६ प्रमोद संवत्सर वैशाख शुध +++ बाजी सर्जाराऊ जेधे देशमुख व देसकुलकर्णी +++ तपे रोहिडखोरे यासि राजाज्ञा ऐसी जे x x चे विशी नाइकजी जेधा बि॥ देसाई हुजूर येउनु विदित केले की आपल्या वतनाचा हकलाजिमा इनाम व इसाफती चा गाव कारकिर्दी अलशाहापावेतो चालत होते त्यावरी साहेबाचे कारकीर्दीस बटाईचा तह जाहला त्यामुळे आपले इसाफतीचा + + चा राजभाग गला दिवाणात होउनु हकाची मोईन नख्त व ++ करून दिल्ही तेणेकरून आपला औकात चालिला नाही हकाची मोईन दिवाणातून करून दिधली तेणेकरून आली हैरानगी च जाहली अनवस्त्राची ते हि विपती जाहली औरंगजेब स्वामीच्या राज्यावरी चाली केली राजश्री छत्रपतिस्वामी रायजडीहून कर्नाटकप्रांते गेले रायगड व वरकड हि किलेकोट गनिमासी सामील होउनु फिसाती केल्या त्याबराबरी आपणास हि च्यारी दिवस वर्तावे ऐसे जाहले परंतु आपण हि स्वामीच्या पायासी एकनिष्टेने वर्तावे हा च निश्चय करून होतो स्वामी करनाटक प्रांते गेलियावरी तिकडे विजय केला आपण वतनदारलोक एकनिष्ट सेवा करुनु दाखवावी हमणउनु किले विचित्रगड गनिमापासून घेतला व देश हि सोडविला पुढे हि जमाव करून गड कोट व देश गनिमापासुनु घेतो परंतु स्वामीने कृपाळु होउनु पेसजी आपला हक चालत होता तेणेप्रमाणे देखील इसापतीचे गाव चालविले पाहिजेत ता। मजकूरीची लावणी सचणी करून व स्वामीसेवा एसनिष्टपणे करून ह्मणउनु विदित केले त्यावरून ++ चा हक व इनाम व इसाफतीचा गाव तुह्मास देविले असेत पेसजी कारकिर्दीप्रमाणे घेत जाणे ता। मजकूरीची लावणी करून दस्त आकारून सदरहूप्रमाणे घेत जाणे ता। मा।रीचे गाव लावणी करून दस्त आकार होत जाईल त्याप्रमाणे लागल्या दस्तावरी हकाची मोईन बैसउनु घेत जाणे छ ५ साबान सु॥ सन तिसैन अलफ आज्ञा प्रमाण

 

                                                    346 2

 

            सुरु सुद बार

पत्रांक ७७.

श्री.
१६९४ वैशाख शुद्ध १२

निळकंठराव गोविंद शिवराम यांचे पुत्र यांस वस्त्रे वगैरे विा राजश्री रावसाहेब रुबरु पाहून दिल्हीं. सु।।
इसन्ने सबैन मया व अल्लफ, जामदारखाना पैकीं छ १० सफर पोषाख खासगी राजश्री नारायणरावपैकी कापड आंखे.

११८        तिवट छिटी बापुरी          १
४००        दुपटा पैठणी                 १
६७||        झगा छिटी मुलतानी       १
११३         तुंबा किनखाप               १
----                                       -----
६९८॥                                     ४
जवाहीरखानापैकीं छ १२ सफर वस्त्रें दिल्हीं ते समईं चौकडा मोत्याचा एक एकूण किंमत रु। ३२१५॥

मोत्यें रति २७ वजन तोळे ।।१।।

एकुण किंमत रुपये ३२०० मोत्ये ४. सोने दर तोळा रुपये १५४ प्रमाणे किंमत रुसो १५।। सोनें तोळे १९८१

जिन्नसखानापैकी छ १० सफर यांस पोषाख दिल्हा त्यास विजारेस दाल रेशमी निरुख गज २॥

पत्रांक ७६

श्री.
१६९३ आश्विन वद्य

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महादजी नारायण गोसावी यांसीः-

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा इसने सबैन मया व अलफ, तालुके अमदानगर येथील सालमजकुरींचा बेहेडा जाला आहे. तरी सालगुदस्त सन इहिदे सबैनचा हिशेब गांवगन्ना जमाबंदीसुधां व सालमजकुरीं अवल सालची लोकांची हजीरी वगैरे कागद बेहेड्याचे उपयोगी दरकदार कारकुनाबराबर देखतपत्र हुजूर पाठवून देणे.

पत्रांक ७५

श्री.
१६९३ आश्विन वद्य १४

राजश्री नारो आबाजी गोसावी यांसीः-

सु। इसने सबैन मया व अलफ. किल्ले पुरंधर व किल्ले वज्रगड देखील सरंजामाचे गांव येथील सालमजकूरचा बेहेडा जाला पाहिजे. तरी सालगुदस्त सन इहिदे सबैनचा हिशेब तपशीलवार व सालमजकूर अवल सालची हजिरी ठिकाणवार व सरंजामाचे गांवची जमाबंदी वगैरे कागद बेहेड्याचे उपयोगी दरकदार कारकुनाबराबर पाठवून देणें. जाणिजे. छ २७ रजब.

पत्रांक ७४

श्री ( नकल) १६९३ आश्विनशुद्ध ६

राजश्री बाळाजीपंत लेले स्वामीसः-

विनंती उपरी. किल्ले बेळगांव पैा पंन्नास माणूस राजश्री त्र्यंबकराव मामाकडे कर्नाटकांत रवाना करावयाची नेमणूक पुणियांत केली आहे. त्यास, किल्ले मजकुरीं माणसाची भरती थोडी आहे ह्मणोन राजश्री महिपतराव विश्वनाथ यांणीं सांगितलें. त्याजवरून रजबदलीमुळें पंचवीस माणुस मना करून बाकी पंचवीसासच रवाना करावयाची नेमणूक केली आहे. तरी सदरहू लिहिल्याप्रमाणें किल्ले मजकुरांतून पंचवीस माणसांची रवानगी कर्नाटकांत करवणे, रा छ ५ रज्जब, अन इसन्ने. हे विनंति.