Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक ४१                                                                                                                                      १६४२                                                                                              

तकरीरकर्दे पश्चमवादी बो। नारो केशव व बाबूराव देसपांडिये पा। सुपे सु॥ ११३० कारणे पंचाइताचे सेवेसी तकरीर लेहोन दिधली ऐसी जे आपणावर देवाजी त्रिंबक व यादो रखमागद दिवाण बहजूर राजश्री याजवळ उभे राहिले तकरीर केली जे आपले हरिविष्णूने मेगो कोतोचा कजिया जालियावर एकसे बत्तिसा वरसाअलीकडे भटपणाची तिसरी तकसीम सेभरा होनास १०० जाऊबास दिधली आणि अलीकडे देसपांडेपण व कसबेचे कुलकर्ण जबरदस्तीने खाताती ह्मणोन उभे राहिले त्यावरी त्यासी व आपणास पंचायत थळमजकूर नेमून दिल्हे मग आपण व वादेमजकूर साहेबाजवळ आलो त्यावरी गोतपंचाईत समस्त बैसोन आपणास फर्माविले की अग्रवादी देवाजी त्रिंबक व यादो रखमागद यानी आपली तकरीर लेहोन दिल्ही त्यावरी तुह्मी आपली हकीकती लेहोन देणे त्यावरी आपली तकरीर दिधली जे सदरहू भांडण आजितागाईत कधी भाडले नाहीत अगर आपले वडिली हि सागितले नाही अगर कधी याचे हि वडील आपल्या वडिलासी भाडले नाहीत आजितागाईत भाऊपणे आहो वडील भावाचे आह्मी धाकटे भावाचे देवाजी त्रिंबक व यादो रखमागद भाऊपणे निमे आपण व निमे आपणामागे सदरहू जण वतन देशपांडेपण व कुळकर्ण कसबांचे व भटपण जोतिष अष्टाधिकार का। मा। वगैरे वतन दो ठाई खात आलो आपले वडील वडीलपण नाव पान तहरीफ जो लवाजिमा वडिलपणाचा त्याप्रमाणे चालिले त्यामागे हरदोजणाचे वडील भाऊपणे चालिले तेणेप्रमाणे आपण चालिलो आणि आपणामागे सदरहूजण चालिले हाली राजश्री पंतप्रधान याजवळ हरदोजण उभे राहोन फिर्याद जाले की आपले वडीलपण आहे आणि आपणावरी जोरावरी करिताती मोगलाईच्या बळे मन माने ते खादले ऐसिया तुफाने तोतियाच्या गोष्टी बोलोन सासवडचे मुकामी फिर्याद जाले त्यावरी राजश्री पंतप्रधान याणी फर्माविले की आपण प्रस्तुत दिल्लीहून फिरोन आलो आहो राजदर्शन जालियावर या मुलकास फिरोन एऊन आणि मनास आणू ह्मणोन बोलिले त्यावरी राजश्री पंत हजूर सातारियास गेले त्यावर दो महिन्या उपरे परगणेमजकूरच्या कारकुनास व देसमुख व देसपांडिये व मोकदमास हजूर सातारियास जमाबदीबद्दल बोलाविले त्याउपेरी हजूर गेलो तेथे सदरहू जणी कजिया केला की आपले वडीलपण आहे मुचलका लेहोन बापूजीदतापासि दिधला आणि तकरीर मागता लेहोन दिधली की हरी विष्णूने जाऊबास भटपण तिसरी तकसीम सेभरा होनास दिधली आणि देसपाडेपण व कुलकर्ण व भटपण कसबाचे वगैरे वतन मोगलाईचे बळे खाताती ह्मणोन लेहोन दिधली

पत्रांक ५५५

श्री.
१७२४ चैत्र शुद्ध १३
पौ चैत्र वद्य १ सोमवार.

वो राजश्री ब्रह्मभट यांसीः-

प्रति लक्ष्मीनारायण दीक्षित नमस्कार विनंति येथील क्षेम ता चैत्र शु। १३ पावेतों मुा पुणें येथे सुखरूप असों, विशेष. मी आल्या ता तुम्हांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही. तर वरचेवर लिहून सविस्तर कळवीत असावें. यानंतर कायगांवचें वर्तमान लुटल्याचें आइकिलें होतें. परंतु येथे आल्यावर पक्की बातमी समजली कीं, सर्व क्षेम आहेत. कांहींएक उपद्रव देखील जाला नाही. तुम्ही स्वस्थ असावें +++ हे विनंति.

पत्रांक ५५४

श्री.
१७२४ चैत्र शुद्ध १३

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गंगाधरपंत तात्या स्वामीचे सेवेसी:-

पो रामचंद्र रावजी सां नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम तार चैत्र शुा १३ जाणून स्वकीय लिा. विशेष. नथू हलकारा लष्करांतून आला. बेलापुरावर दोनचार मुकाम आहेत. पुंतांबें उज्याड आहे. परंतु चवकी होळकरानें पाठविली कीं, भलताच न लुटी. मग तेच काय करतील तें करोत. बेलापूर उज्याड, परंतु त्यांजला भक्षावयास मिळतें. घरें खाणावीं. दाणा, कडवा लागतो तो नेतात. मनस्वी धामधूम करितात. ते पत्रीं लिहितां पुर्वत नाहीं. घर उकलून जाळितात. बेलापुराहून पुंतांबियासहि दोनचार मुकाम होणार, म्हणून बोलतात. ऐसें नथू मारानं जबानीं सांगितले. खासास्वारी होळकराची बेलापुरास आली. परंतु तोफखाना राहुरीवरच आहे. मुकाम फार ऐकून येथील गरीबगुरीब भयाभीत जाले. बायकामुलें बाहेर आजच लाविलीं. परंतु फार भितात. उद्यां परवां गांव बेचिराख होईल, असें दिसतें. बहुत काय लिहिणे ? हे विज्ञप्ति. इत्यादि.

[ ६१ ]                                श्री आई आदिपुरुष                                            १७०८.

विनति उपरि. स्वामींनीं दया करून राजश्री नरसिहपत व तिमाजीपंत व धनाजी घाटगा याजसमागमें पत्र पाठविलें. कितेक स्वमुखें निरोप सांगोन पाठविला आहे. तें केवळ आपलीं वचनें हे सांगतील ते ह्मणून स्वामीनी लिहिलें. पत्रार्थ व निरोप एकोन बहुत समाधान झालें. स्वामीच्या निरोपाचें प्रतिउत्तर त्रिवर्गाजवळ सांग सांगितलें आहे. तें निवेदन करितां वित्तारूढ होईल स्वामीनीं आज्ञा सांगोन पाठविली तदनुरुप श्रीवरील पुष्पें व रोटी ऐसी शपथ पाठविली आहे. स्वामीनीं एक तिळतुल्य चित्तांत आनसारिखी गोष्टी येऊ न द्यावी. आमचें चित्त निखालस स्वामीच्या पायाशी आहे. परिणामीही कळों येईल हें जीवित आहे तें केवळ स्वामीच्या अन्नाचें आहे त्याहीमधें ह्या प्रसंगीं केवळ आमच्या जीवाचेंच आदान होतें. परंतु स्वामी प्रसंगी होते. स्वामीनीं दया करून प्राण वांचविला. हे गोष्टीचा कृतोपकार आहे जोंवरी आयुष्य असेल तो विसार पडणार नाहीं. स्वामीनीं आमचा सर्वस्व अभिमान धरिला तरी जें आमचें वंशजपण असेल तदनुरुप उत्तीर्ण होऊन श्री करील तरी स्वामीची कीर्ति दिगंतरी प्रसार व्हावी ऐसाच अर्थ होईल हे स्वामीस पूर्ण भरवसा असावा याउपरी स्वामींनीं कांही मनात संदेह येऊ नेदून पत्री सदेहास्पद लिहित न जावें. स्वामीचें उत्तमपण आहे, ते स्वामी करितात. आह्मीं अधम कृति चित्ती आणिली ती इहलोकीं निंद्य. परलोकी तो विश्वासघातकाते, नरो नरकं याति यावत् चंद्र दिवाकरौ, हा प्रसंग जो अधमपणा करील त्याचे पदरीं पडेल. स्वामीनीं विमलहस्तें श्री पूजिला आहे तावत्कालपावेतो अभिमान आहेच. ऐसा प्रसंग आहे. याविसीं विशद लेखन करावें तरी पत्रार्थ विशेष वाढतो. राजश्री रायभानजी राजे व आपण हे गोष्टी अंगीकार केला आहे, यामुळें बहुताचे द्वेष पडतात पदरीं ह्मणून स्वामीनीं लिहिलें, तरी राजश्री रायभानजी राजे आणि स्वामी ऐसे आह्मीं दोन्ही लक्षीत नाहीं. त्याहीमध्यें या प्रसंगीं त्याहीं दया केली. याहून उत्तम तें काय आहे ? उभयतांनीं हे गोष्टी अंगिकारिली. स्वामीस ऐसें पुरतें चित्तांत येऊं द्यावें कीं, या गोष्टीनीं स्वामीची व त्यांची कीर्ति बहुत होते आणि स्वामीनीं आपला पाठिबा उभा केला, ऐसें चित्तांत येऊं द्यावें. वरकडीचे द्वेष पदरीं पडतात, ह्मणून लिहिलें तरी श्री समर्थ आहे. स्वामी आह्मीं आणि राजश्री रायभानजी राजे ऐसे एकचित असतां जरी आभाळ पडत असेल त्यास हात देऊं. तेथें वरकड प्रसंग ते काय आहेत ? स्वामीस काय न कळेसा प्रसंग आहे तो विशद लेखन करुं ! स्वामीनीं तो तैक्कल आमचेविशीं केलेंच आहे. त्यास श्रीस्वामींस उत्तर काय ? यश पदरीं घालेत ऐसा पुरता भरंवसा असो दिला पाहिजे. आपण स्वारीस मल्हारराऊ सेना घेऊन चिपळुणास येणार. याजनिमित्य जातो ' तुह्मीं आहां तैसें पंधरा दिवस असणें, बहुतसा राबिता होऊं न देणें, या दोनीच्या विचारे असिले पाहिजे ', ह्मणून स्वामींनी लिहिलें तरी, स्वामीनीं पूर्वी जे रीतीनें ठेविलें त्या रीतीनें दोन मास क्रमिले. याउपरी जे रीतीनें आज्ञा केली तदनुरुप रहाटी करून परंतु स्वामीची दया जालियाउपरी किंचित् भाग राहिला तो राहूं देणें हें उचित नाहीं. वरकडाचे उपरोध स्वामीनीं किमपि चित्तांत येऊं न द्यावें याहींमध्यें जे स्वामी आज्ञा करितील तदनुरूप रहाटी केली जाईल. स्वामीनीं लिहिलें कीं, आठ पंधरा दिवस. त्यास हें पत्र स्वामीपाशईं पावे, तों आठ दिवस जाले. एका शब्दाचा तो नियत वारला. दुसरे शब्दास आठ दिवस अवकाश राहतो यामधें स्वामीस श्री प्रेहरील तें करावें, परंतु आतां उचित आहे कीं , आमचा श्रम परिहार सत्वर करावा हें उचित आहे स्वामीनीं लिहिलें कीं, भोजन करून खुशाल असणें तरी , स्वामीची दया जाली तेधवां खुशालच आहों. भोजन श्रीचे आणि स्वामीचे पाय पाहूं तेधवा होईल. फराळ घेतों. खुशाल स्वामीचे पत्र पाहून आहों वरकड साकल्य वर्तमान त्रिवर्ग सागतां कळों येईल, कृपा असो दीजे. हे विनति.

पत्रांक ५५३

श्री
१७२३ माघ वद्य ११

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नारायण बाबूराव स्वामी गो यांसीः-

पो अमृतराव रघुनाथ नमस्कार विनंती उपरी येथील कुशल लिहीत जाणें. विशेष. राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा यांजकडे इकडील लाख रुपयांचे वरातेपैकीं तीस हजार रुपये राहिले आहेत. त्यास, सेनासाहेब सुभा यांचे कारभारी पुण्यास आले असेत. तरी, सदहू ऐवज राजश्री विठ्ठल बल्लाळ याचे हवालीं करणें. ऐवजास बहुत दिवस जाहले. येथें खर्चाची वोढ आहे. याजकरतां ऐवजाचा उलगडा लौकर पाडून देणें. जाणिजे. छ २४ शवाल सुा। इसने मयातैन व अल्लफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.

पत्रांक ५५२

श्री.
१७२३

यादी हैबतराव आटोळे धुरंधर समशेरबहादर विज्ञापना ऐसीजेः-

सरकारची सेवा बहुत दिवस सर लष्कर याजबरोबर करीत आलों. सुरसन इसने मयातैनचे सालीं सरकारांतून सरंजामाची जप्ती केली. याजकरिता विनंती करावयासी कारकून हुजूर पाठविले आहेत. सरंजामाचीं गांवें व खेडीं बहद्यामुळें बिलकुल उज्याड जालीं. सबब, सरदारी फार वोढींत आली. त्यास, स्वामींनी कृपाळू होऊन, शेवाचाकरी घेऊन, सरंजामाचे मोकळिकीविशी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत.

पत्रांक ५५१

श्रीमार्तंड,
१७२३ फाल्गुन वद्य ८

पोतापैकीं सुा इसने मयातैन देणें. रघोजी भोंधले सेनासाहेबसुभा यांजकडून नागपुराहून दसरियाचे पोशाख सरकारांत सांडणीस्वार घेऊन आले. त्यांस, निरोपसमईं इनाम साल गुा प्रों साल मजकुरीं आ २ एा रु. २० वीस रुा। देणें, छ २२ जिल्काद.

पत्रांक ५५०

श्रीमार्तड.
१७२३ फाल्गुन वद्य ८

जामदारखानापैकी सुा। इसने मयातैन देणें. रघोजी भोसले सेनासाहेबसुमा याजकडून नागपुराहून दसरेयाचे पोशाख सरकारांत सांडणीस्वार घेऊन आले. त्यांस निरोपसमईं इनाम साल गुा। प्रो साल मजकुरीं असामी २ यास दर ४० प्रों रसानगी याद कापड आंख ८०.
ऐशीं आंख देणें. छ २२ जिल्काद.

[ ६० ]                                श्री आई आदिपुरुष                                            १७०८.

विनंति उपरी. स्वामीनी लिहिलें कीं, कितेक विचार सुचत जाईल, तो लिहून पाठवीत जाणें. ह्मणून लिहिले कीं, स्वामी वडील आहेत दया करुन जें लिहिलें ते मनांत दयाच येऊन लिहिले श्री स्वामीस सुचला विचार आह्मीं ल्याहावा हे आह्मांस अधिकारच आहे. स्वामीच्या यशे राजियाचें कल्याण. त्यामुळें आह्मीं अवघे सुखी. आज्ञेप्रमाणें कितेक विचार सुचला, तो त्रिवर्गापाशीं सांगितला आहे, ते निवेदन करितील त्यामधें जो उपेगाचा असेल तो मनास आणावा नसेल तो राहूं द्यावा. शामळासी सख्य कोणे रीतीनीं करावें ह्मणून लिहिलें तरी शामळ सलियास तूर्त येतो, हे तो दिसत नाहीं. कदाचित् आलाच तरी चौथाई देऊं करावी, आणि तह करावा, याहीमधें प्रसंग पाहून जें कर्तव्य तें करावें कबिला सिहगडीहून आणावा, कीं तूर्त न आणावा ह्मणून लिहिलें. तरी सिंहगड आपले हातीं असेल तरी चार दिवस कबिला आणूं नये. एक स्वारी मात्र आणावी पुढे वेळ पडेल त्यासारिखें करावें. राजश्री नरहरिपंत देखील तेथेच असों देऊन ते जागा आपल्या हातीं असो द्यावा. कुल अवघे वळण त्यातोंडें पडणार. गनीम विशाळगडास यंदा येतो, यास संदेह नाहीं. तेधवा दुसरा जागा सरदारी करावा ऐसा नाहीं. याजकरिता हा विचार स्वामींनीं मनांत आणून जें कर्तव्य तें करावें. आह्मास सुचल्यासारिखे लिहिलें आहे. कृपा असो दीजे. हे विनंती, स्वामीनीं चिरंजीव आपाची बेडी तोडविली ह्मणून लिहिलें तरी सर्व संकट स्वामीसच आहे. चिरंजीव माधवरायाचीही बेडी तोडविली स्वामींनीं असेल. सकलही मान अपमान आमचा स्वामीस आहे. विशेष काय लिहिणें. हे विनंति.

पत्रांक ५४९

श्री
१७२३ फाल्गुन वद्य ३

श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री ++ जी यांसी प्रति लक्ष्मीबाईचे अनेक आशीर्वाद उपरी येथील क्षेम तागायत फाल्गुन वा ३ रविवार पावेती कायगांवीं सुखरूप असों. विशेष. तुह्मी बयाजी सोनवणी याजबराबर पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. इकडील वर्तमान तरः कायगांवचे कौलास आज प्रारंभ केला. दुसरें, राजश्री धोंडोपंत गोडबोले तोफखान्याचे सुभा मालेगांवीं होते. त्यांशीं व शामतखां पठाण व गाबडे व अचबीसिंग वगैरे निा होळकर यांसीं लढाई जाली. धोंडोपंत यांनीं सिकस्त खाल्ली. याजकडील तोफा व पलटणी झाडून कापून काढिलें. जातीनिशीं घोंडोपंत आतेगाव वामळे येथें आहेत. समागमें हजारपांचशें लोक आहेत, असें ह्मणतात. परंतु सत्य मिथ्या न कळे. यांजकडील.पळ दीडशे राऊत काल शनवारीं कायगांवीं मुक्कामास होते. कांहीं उपद्रव जाला नाहीं. आज कूच करून पुढे गेले, धोंडोपंत पुढें होते. यामुळें पठाण वगैरे यांस कांहीं प्रतिबंध होता, तो मोकळा जाला. हाल्लीं चांदवडाकडे येण्याची आवई बोलतात. घाट चढल्यास ठीक नव्हे. मग श्री काय घडविणें ते घडवील. हाल्लीं बयाजी पाठविला आहे. तुह्मा समागमें माणूस अधिक असावें सा पाठविला आहे. बयाजीबरोबर साखर पाठविली आहे. पावेल. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.