Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
सोबतीच्या लघु मनुष्यांच्या बुद्धीस लागोन नसती कल्पना वाढवून धण्याचा मनसबा नामोहरम केला. स्वामिद्रोह मात्र पदरीं घेतला । तुमचे वडील पंडितमा।रनिले कोणें रीतीनें वर्तले, त्यांचे वर्तणुकीचे निदर्शन तुह्मीं स्वल्पकाळेच दाखविलें. ' राणोजी घोरपडियाची व आपाजी सितोळ्याची स्पर्धा वाढली', ह्मणोन लिहिलें. तरी ते जालें तरी मराठे माणूस, तुह्मीं सरकारकडून, तुमचे वक्रानें त्याणी वर्ताणें, कोणीं बदराह वर्ततील तरी तुह्मां लोकांनीं बुद्धिवाद सांगावा जे, धण्यासी हे अमर्यादा कार्याची नव्हे, परिणाम लागणार नाहीं. असें सांगावें. ऐसें तुह्मां लोकांच्या नीति असोन, हे एकीकडे ठेऊन, ते आपण एक होऊन, धन्यासी बळी बाधिली. वल्गनाही मन पूत केल्या. प्रांतांत उपद्वाप केला. हाच मुलूक मारिला रयत देशांतरास उठोन गेली जवळचे चार हुजरे होते त्याचे गांवखेडियांचे निसंतान केलें. धण्यासी केवळ प्रतिमल्लतेचाच प्रसंग जाहल्यावरी वरकडांनीं चित्तांत आणावेंसें काय ? तत्रापि सेवक जवळचे ह्मणजे लेकरें, यांस क्केश जाहल्यावरी धण्यास ये गोष्टीचें वैषम्य न वाटेसे काय ? तत्रापि धण्यांनीं इतकेंही किमपी चित्तांत न आणितां मागती तुह्मांवरी दया करावी, इतके दिवस वर्तणूक जाली ती क्षमा करावी, या अर्थे एकवेळ रामजी संकपाळ पाठविले. त्या बोलीचा परिणाम काय लाविला ? त्याउपरी सोनजी तांबट पाठविले. तेव्हांही तुमचें चित्त सपक्व जालें नव्हतें. तदुत्तर चिकोडीचे मोकामीं असतां तुह्मांस संकट कोणेंप्रकारचें प्राप्त जाले होते अथवा नव्हतें, हे तुमचे तुह्मी चित्तांत विचारून पाहणें. ऐसा तुमचा संकटाचा प्रसंग धण्यानीं पाहून, तुमचे अमर्यादेचा प्रसंग किमपी चित्ताते न आणितां, कृपाळू होऊन, राजश्री बहिरो व्यंकाजी व रघोजी जाधव या उभयतांस तुह्मांकडे पाठवून, हुजूर आणावें या अर्थे उभयतामा।रनिलेस तुह्मांकडेस पाठविले. त्यांणीं तुह्मांस घेऊन आले, ते परस्परें बावड्यास गेला ते समयीं धण्यासन्निध येता तरी तुह्मांस हें श्लाघ्यच होतें; परंतु हा विचार न पाहतां बावड्यास राहिला. तेथेंही मागती तुह्मांकडील कोणी भला माणूस आणवून बोलीचाली करावी याकरितां तुह्मीं राम ठाकूर व भगवंतराव पिंगळे ऐसें उभयतांस येथें बोलाचालींस पाठविले. बोलीचाली लागली असतां तुह्मीं परभारें सालवणावरी स्वारी करून दगा केला. बोलीस भला माणूस पाठवून ऐसे दंगे करिता, कोठे ऐकिलें आहे कीं काय ? किंबहुना हेही तुह्मापासून घडलें , तेव्हा धणियांनी क्षमा कोठपर्यंत करीत यावें ? ये गोष्टीचा विचार स्वहिताहित ज्याचा त्याणे चित्तात आणावा तरीच बरे सांगितले. गोष्टीचा परिणाम लागणे नाहीं प्रस्तुत तुह्मीं पत्रें दिवाणात लिहिलीं, त्यात निर्भत्सना करून लिहिलें यांत तुह्मां लोकांस भूषण कोणते ? पदें कागदीपत्रीं लिहावी, हे सामान्याची कमई । तुह्मांस योग्य नव्हे. जीं पत्रें येतात त्यांत किमपि तुमचे निष्ठार्थ नाहीं. जे लिहिणें तें विडंबर लिहितां. यावरून तुह्मांविशीं धण्यास अर्ज करणारानें कसा काय करावा ? धण्यास तरी कृपा कशी उपजेल ? ' या राज्यांत विवेक, विचार, शहाणे लोक, सभ्य, चतुर, विद्यावंत नाहींत, राजश्री शाहूराजे यांचे राज्यात सरकारकुन लक्षाचे लक्ष जिल्हे मामले खाऊन सुखरुप आहेत', ह्मणून लिहिलें.तरी तिकडील सरकारकुनानें अथवा सरदारानें धण्यासी अमर्यादा केलीसी नाहीं धण्यासी निष्ठेनें वर्तोन, आपलें नंगानें राहोन, कीर्ति संपादून घेतल्या. यद्यपि कोणी अमर्यादी वर्तणूकेस प्रवर्तले तरी तत्क्षणीं त्यास शिक्षा होईल, या भयेंकरून जे जे आहेत ते बहुत मर्यादेनें असतात.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८० १५५५ वैशाख शुध्द ११
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खु॥ खाने अलीशान खाने अजम रणदुला फराहादखान खु॥ दौलतहू बजानेबु कारकुनानि पा। वाई बिदानद सु॥ अर्बा सलासीन अलफ बो। रगभट बिन गोपीनाथभट चित्राउ सो। का। मजकूरु हुजूर येउनु अर्ज केला ऐसा जे आपला मामा हरीभट बिन विष्णुभट देऊरकर यासी इनाम जमीन चावर नीम .॥. दर सवाद मौजे पसरणी पा। मजकूरु थल वाकेवाडी सीव नजीक सिदनाथवाडी माहाबलेस्वरमार्गावजली दो। महसूल व नखतयाती व खा। गला व सारा व बेठबेगार व फर्मासी ता। ठाणे व ता। देहाय कारकीर्दी दर कारकीर्दी वजीरानि सालाबाद ता। सालुगा। चालिले आहे हरभट मजकूरु तो निपुत्रीक होता आपण त्याचा भाणजा जाणौनु मरते वखती सदरहू इनामाचे कागद आपणासी देउनु इनाम दान दिधला त्या सी मरौनु बहुत दिवस जाले तेपासुनु आपण त्याचे नावे कागद करुनु ता। सालगु॥ इनामाचा हक आपण खात आहे तरी साहेबी नजर अनायत फर्माउनु सदरहू इनामाचा कागद आपले नावे करून देविले पाहिजे काम खैरयतीचे आहे दरीबाब सरजाम होय मालूम जाले तरी हरीभट बिन विष्णुभट याचा इनाम जमीन चावर नीम .॥. दर सवाद मौजे पसरणी तो तेही मरते वखती रगभट बिन गोपीनाथभट चित्राउ यास दान दीधले आहे तेणे च प्रमाणे हुजुरूनु सदरहू इनाम रगभट बिन गोपीनाथभट चित्राउ यासी दीधला आहे दो। महसूल व नखतयाती व खा गला व सारा व बेठी बेगारी ता। ठाणे व ता। देहाय जैसे ता। सालगु॥ तशृफाती जाली असेल तेणे बा। चालवीजे दर हर साल खु॥ उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असेल इनामदार मा। दीजे पा। कारकूनु रा। रखमाजी रखतवान मुकाम शाहापूर बागे सूद मोर्तब सूद
रुजु दफतरखास रुजु शुरुनिवीस
तेरीख ९ माहे साबानु
साबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९९ ] श्री. १७२८.
राजश्री पंतअमात्य हुकुमतपन्हा स्वामीचे सेवेसींः-
श्रीमंत सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री द्वारकोजी यादव कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वाभ्योदये कुशललेखनपरामर्ष करीत असावें. यानंतर आपण वार्तिकासमवेत श्रीमत सकलसौभाग्यादिसंपन्न मातु.श्री बयासाहेबास पाठविलें तें विदित करून अक्षरश: श्रवण केलें. आह्मांस पत्र पाठविलें, तेंही प्रविष्ट होऊन सविस्तर वर्तमान कळों आलें. पेशजी आपलीं पत्रें आलीं व हालीही तुमची पत्रें आलीं कितेक विस्तारें लिहिलें. त्यांत मायेममतेचा अर्थ काय लिहिला न लिहिला हें तुमचें तुम्हांस दखल आहे. आह्मां सामान्य लोकास दरम्यान मध्यस्तीस घालावें आणि ऐसें स्वामीनीं लिहित जावें, यांस महत्त्वास भूषार्ह आहेसा अर्थ नाहीं या राज्यांत थोरले महाराज राजश्री यांणीं आह्मां लोकाचीं घरें वाढविलीं. तीर्थरूप राजश्री निळोपंत आजे, राजश्री रामचंद्रपंत बाप, त्यामागें आह्मीं सेवा केली. काळ साह्य होता, तों धणी यानीं वाढविलें. आजी ता। चालत आलें तीन पिढ्या सेवा केली, त्याचें सार्थक जाले । ज्याणीं दिले त्याणी घेतलें, हा दडक कोठेंही नव्हता । या राज्यात पाहिला । विश्वासू कारकून पाठवावा तरी कोणीं पाय घेईनात. ऐसे कितेक पर्याये लिहिले तरी तुह्मी सरकारकून, परपरागत या राज्यांतील सेवक, सर्वांनीं तुम्हां जवळून सिकोन जावे, असे असोन तुह्मी धण्यासी माया ममता न दर्शवितां इतराच्या दुर्बुद्धी ऐकोन, धण्याचे पायाशी अमर्यादा होऊन, लोकोत्तर इतकेंच पदरीं पडले । धण्यास कितेक शब्दारोप ठेऊन लिहिलें तरी धण्यासी तुह्मी अथवा कोणी शब्द ठेवावा ऐसे नाहीं. कोणे एकाचे चालविलें नाहीं आबालवृद्धापर्यंत धण्यानी लोभ करून, अंतरें महदंतरें पडली तरी क्षमा करून, सर्वापराध पोटांत घालून चालविले लहानाचे थोर केलें. पुढें त्यांची महत्त्वे विशेष वाढवावीं हेच चित्ती सर्वात्मना आहे. तुह्मीं किल्ले पनाळा असतां धण्यास नाना प्रकारचे संकटांमध्यें प्रसंग प्राप्त केलें. किंबहुना, अरिवर्ग असतील त्यांच्यानेही ऐशीं अमानुष कर्मे होणार नाहींत. ऐसे असोन तुह्मीं आपले आचरणास चुकला नाहीं. तत्रापि इतकेंही धण्यानीं पोटांत घालावयासी कारण कीं, तुह्मीं परपरागत सेवक, तुमचे वडिलांनीं या राज्यांत श्रम साहस आपे जिवाभ्य करून, ऐशास पात्र जाले. त्यामागें तुमचें चालवावें, तुमचे हातून महत्कार्ये घ्यावी, असें चित्तांत असता, ई।। पासून निग्रही वल्गनायुक्त आचरणें होता राहिली नाहींत तुमचे तीर्थरूप राजश्री रामचंद्र पंडित यांणीं थोरले महाराजासंन्निध कोणें रीतीनें वर्तणूक केली हे लोकांत कीर्ती प्रख्यात आहे. महाराज राजश्री या प्रांतीहून चजीप्रांतें जाणें जाले तत्समई संपूर्ण राज्य व लोक लोकपाळ स्वामित्व राजश्री पंडितमा।रनिले यांचे गळा घालोन खासा स्वामींनीं चंजी प्रांतें स्वारी केली. त्या मागें सबळ रिपुवर्ग यांचा उद्भव जाहला. तत्समई यवन उन्मत्त होते. त्यास इत्यादि अमर्यादकांस शासने करून, त्यांचा संव्हार करून, दमसर्द केलें. राज्य शथीनें राखिलें. तदोत्तर महाराज राजश्रींचें आगमन चंजीहून या प्रांते जालें. तेव्हां पंडितमशारनिलें यांणीं बहुत विशेषाकारें नम्रता धरून जाते समई, राज्य व लोकपाळ व गड किले स्वाधीन केलें होतें त्याप्रमाणें धण्याचे धण्यासंन्निध वोपून आपण विनीत प्रकारें होऊन, ' पुढें सेवकास आज्ञा कर्तव्य काय ?' ह्मणून पंडित मा।रनिले याणीं विनंती केली. हें किमर्थ कीं आपण ब्राह्मणलोक, परंपरागत सेवक, जीवित हें क्षणभंभुर आहे, ज्या धणियाचे कृपांजळें हें पद प्राप्त जालें, त्यासी निमकहराम न होता कल्याणाभिवृद्धि इच्छिल्यानें आपल्यास श्रेयस्कर, येणें करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतात. मागें पुढें कोणी दूषण ठेवीना ऐसे अभ्यत करणें विवेक वर्तत आले जे, हे श्रीचे वरदीराज्य, यासी दिल्लीश्वरादि कोणी स्वधर्मकर्तव्यतेस प्रवर्तले त्यांचा गर्व हत होऊन पराभव पावते जाले याकरितां धण्यासी मर्यादेनें असावें ऐसे चित्तांत आणून तुमचे वडील चालत आले. तुह्मांसही पंडितमा।निले याणीं सकलकलाविद्यासंपन्न केलेच होतें. प्रस्तुत त्यामागें आपण प्रतिदिनी पुराणश्रवण देवब्राह्मणाचे ठायीं भक्ति धरिली धर्मशास्त्र इत्यादि सर्वही नीत तुह्मांस करतलामल. तेव्हां सर्व अर्थ तुह्मास नकळेसा काय ? असें असोन, कोणेक गोष्टीचा युक्त विचार नाही. ' सितोळे घोरपडे यांचा कजिया लागोन कलह वाढला , आणि निरपराधें आह्मावरी जुलूम होऊन सर्वस्वें अपहार केला', ह्मणून लिहिले तरी घोरपडियाचे अथवा तुमचे तरी धण्यांनी काय वाईट केले होतें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९८ ] श्री. ३१ मे १७२८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५४ कीलकनाम संवत्सरे जेष्ट शु ।। चतुर्थी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभुछत्रपति स्वामी यांणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजेश्री भगवतराव अमात्य हुकमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहाले पूर्व पद्धतीप्रमाणे सेवा घेऊन ऊर्जित केल्यास हाजीर आहो ह्मणून कितेक लिहिले व राजश्री बाळाजी महादेव व नारो हणमंत यांणीही लिहून पाठविलें त्यावरून विदित झालें. ऐशास, तुह्मीं स्वामीचे परंपरागत सेवक आहां. तुमचें पूर्वपद्धतीपेक्षांही स्वामी विशेषाकारें ऊर्जित करून चालवितील. येविशीं तुह्मीं समाधान असो देणें सविस्तर उभयतां बरोबर अगोदर सांगोन पाठविलेच आहे. हालीं राजश्री शिवाजी शकर यांस पाठविले आहेत. आज्ञेप्रमाणे सांगतां कळेल व रा। उदाजी चव्हाण हिंमतबहादर याजकडील शिवाजी शिवदेव यास ही पाठविलें आहे याउपरी स्वामीचे दर्शनाचा प्रसंग सत्वर होऊन ये तें करणें. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.
मर्यादेयं विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७९ १५५५ वैशाख शुध्द ११
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खुदायवंद खान अलीशान खा। अजम रणदुला फरादखान खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानी पा। वाई बिदानंद सु॥ अर्बा सलासीन अलफ रगभट बिन गोपीनाथभट चित्राड सो। कसबे मजकूर हुजूर येऊनु मालूम केले जे आपणासी बा। धर्मादाउ देसमुखी व देसक पा। मजकूर येही सालीना होनु १० दाहाचे पत्र करून दीधले आहे ता। साल- गु॥ चालिले आहे साहेबाचे खुर्दखत होय की बा। पत्र देसमुख प्रमाणे देत जाणे ह्मणौउनु तरी रगभट मजकुरासी बा। धर्मादाउ देसमुख व देसक येही बा। पत्र प्रमाणे होनु १० दाहा दीधले आहेती ता। सा। गु॥ चालिल असेल तेणेप्रमाणे चालवीजे पा। कारकून ता। रखमाजी रखतवान तालीक घेउनु असली फिराउनु दीजे मोर्तब
रुजु दफतरखास रुजु शुरुनिवीस
तेरीख ९ माहे साबानु
साबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७८ १५५४ कार्तिक वद्य ३
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खुदायवद खान अलीशान खा। अजम रणदुला फरादखान खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। वाई बिदानद सु॥सन सलास सलासीन अलफ बो। बाजी बिन सुदामसेटी पाटणी पा। मजकुरु हुजूर येऊनु मालूम केले जे आपले बापाचे नावे इनाम आहेती तेणेप्रमाणे चाळत आहे त्यापैकी जमीन चावर १ एक आहे सेत दर सवाद कसबे मजकूरु दो। महसूल चालत आहे मोहीमखर्च व बेलेकटी हे आपले दुमाला नाही साहेबी नजर अनायत फर्माउनु आपले दुमाला करावया रजा होय ह्मणौउनु मालूम केले तरी यासि सदरहू चावराची बेलेकटी व मोहीमखर्च हाली मर्हामती करून दीधली असे याचे दुमाला कीजे दर हर साल ताजा खु॥ उजूर न कीजे तालीक घेउनु असेली खुर्दखत फिराउनु दीजे पा। हु॥ कारकून रा। महिमाजी अफराद बाबके मोर्तब
रुजु दफतरखास रुजु शुरुनिवीस
तेरीख १६ माहे रबिलाखर
रबिलाखर ळ॥ मो। कडूस
नजीक भिवरा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७७ १५५४ आश्विन वद्य ३
(फारसी सिक्का)
(फारसी सिक्का)
(सात ओळी फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी मौजे बोरखल सा नीब पा। मजकूर सु॥ सलास सलासेन आलफ दो। बदल इनाम बो। गोपीनाथभट बिन रामेस्वरभट तबीब जुनारदार सो। का। मजकूरु यासी इनाम बा। खुर्दखत रा। दर साल सन तिसा इशरीन अलफ छ ९ रबिलोवल पो। छ २० रबिलाखर सादीर आहे जे इनाम जमीन चावर दीढ १॥ बि॥ मौजे बोरखल चावर १ मौजे किण्हई चावर ॥ येणे प्रमाणे भोगवटा व तसरुफाती पाहून इनाम दुबाला करणे दर हर साला खु॥चे उजूर न करणे तालीक लेहून घेउनु असल खु॥ परतून दीजे ह्मणऊन तरी बा। भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ सन इसने सलासेन अलफ छ २३ जमादिलाखर दो। मा। ना। मुस्तैज रवा अस्त बायद की यशाबजो की ता। साल गु॥ भोगवटा व तसरुफाती चालिले प्रमाणे सन तल मजकूरास जमीन सदरहू दो। बाबहाय सदरहूपैकी जमीन मौजे मा। चावर १॥ दुबाला केले असे भोगवटा व तसरुफाती पाहून इनाम दुबाले केले असे दुबाला कीजे तालीक लेहून घेउनु असल मिसेली बदस्ते इनामदार मजकुरासी फिराउनु दीजे मोर्तबु मोर्तब
तेरीख १६ माहे रबिलोवल
रबिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९७ ] श्री. २९ एप्रिल १७२८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५४ कीलक नाम संवत्सरे वैशाख शु।। द्वितीया इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभु छत्रपती स्वामी यांणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकमत पन्हा यांसींः-
आज्ञा केली ऐसी जे- तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. व शेख महंमद या बरोबर कितेक सांगोन पाठविलें तें यांणीं सविस्तर सांगितलें. त्यावरून विदित जालें. त्याप्रमाणें सौभाग्यवती गोदूबाई व राजश्री धोंडो भास्कर, व नारो हणमंतराव, बाळाजी महादेव, याजवळ स्वामीनीं आज्ञा करून याचा निशा केला आहे, त्याप्रमाणे हे तुह्मांस लिहितील. व सौभाग्यवती गोदूबाई आली आहे तेंही सांगतील. त्यावरून कळेल. तरी तुह्मीं कोण्हेविषयीं दुसरा विचार चित्तात न आणितां स्वामी संनिध येणें. अत. पर तुमच्या चित्तांत कांहीं संशय असेल , तर ज्यास तुह्मीं पाठवा ह्मणाल ते लेहून पाठविणें. स्वामी त्यास पाठवून देतील. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.
मर्यादेंय विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७६ १५५३ फाल्गुन वद्य १२
फर्मान हुमायून शरफ सदुर यापत बजानीब कामील व अकीबा वलयात काद काबील व रुतबात वल यतीकाद अजीस मजलीस खास जुबदे वाफीर अल एखालास खान अलीशान रफीअज कदर वल मकान याकुतखान हवालदार व कारकुनानी हिसार जावली आकी अज सुहुरसन सलास अशरीन अलफ नीम चावर जमीन .॥. दर सवाद मौजे वझरडा मुजाफा हिसार मजकूर देखील माहसूल व नकदयाती वा खरीद गला वा सेगन वा बाजे उजुहाती दरवज इनाम नारायणभट बिन गोपीनातभट चिताराव जुनारकर सेकीन कसबे पा। बाई बाद ऊ बअवलाद अफाद ऊ मुतैन रवां अस्त बायेद के एशा जमीन मजकूर माअहवाद सदरहू बनायके सालाबाद रवा सूदा अस्त बसमा तरीक भोगवटा दीबा बाद ऊ बअवलाद ऊ वा अफवाद ऊ रवा दारंद साल बसाल बसमी फर्मान जारी दारंद वा तारीक निविस्ता गिरफ्ता असल फर्मान बाज देहंद बरहु (कु) म फर्मान अशरफ रवंद ताहीरीस फिअल तारख अल मजकूर मुताबीक अल खामीस अशरीन शाहर शाबान सन इसने सलासीन अलफ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९६ ] श्री. १७२८.
राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकुमतपन्हा यांसीः -
श्रीमंत मातुश्री राजसबाईसाहेब उपरी सुहुर सन तिसा आश्रिन मया अलफ. तुह्मीं विनंतीपत्र जिवाजी शिवदेऊ यासमागमें पाठविलें तें येऊन प्रविष्ट जालें पत्रार्थ सविस्तर निवेदन जाला धण्यांहीं इमान क्रियापुरस्कर राजश्री उपाध्ये व राजाजी वैद्य व शिवाजीपंत व राजश्री हिंमतबहाद्दर पाठविले त्यावरून आपण हाजीर जालों. धण्यांही आश्वासन जतन करून उर्जित करावें. बहुमानें चालवावें. जिवाभ्य एकरूप निष्ठेने सेवा करून. आपण लेकरें आहों. अन्याय असले, तथापि धणी मायबाप, क्षमा करावी. हेंही रूप धण्याचें आहे दया करून चालवावे ह्मणऊन तपसिलें तुह्मीं विनति पत्रीं लिहिल्यावरून अक्षरश विदित होऊन संतोष जाला, ऐशास, तुह्मीं वंशपरंपरागत साहेबांचे धुरधर सेवक सर्वहिविषयीं क्षमा करून तुमचें चालवावें हेंच चिरजीव राजश्रीस व साहेबांस अवश्यक आहे. अंत:पर याविषयी तुह्मीं आपल्या चित्तांत अणुमात्र संशय न धरिता आपलें समाधान असो देऊन याउपरी दर्शनाची त्वरा करणें. साहेबांचे आज्ञेवरून व राजश्री हिंमतबहादूर याचे वचनें चिरंजीव राजश्री शिवरामपंतास आणविलें, उत्तम गोष्ट केली चिरंजीव राजश्रीचेही पत्रें व आज्ञा सागोन पाठविणें ते त्याणी तुह्मांस सांगोन व लिहोन पाठविलीच आहे. त्या वचनासे सर्वथा अन्यथा होणे नाहीं. साहेबांसही तुह्मांपेक्षां दुसरे अधिकोत्तर नाही. साभिमानयुक्त तुमचें गोमटें करून चालवावें, तुमच्या हातें महतकार्य प्रयोजनें सिद्धीस नेऊन उत्तमपणाचेंच परिणाम करणें, हेंच अगत्य आहे. याविषयीं राजश्री उदाजी चव्हाण हिंमतबहादर यांसी आज्ञा केल्यावरून लिहितां कळेल. बहुत लिहिणें तरी तुह्मीं सुज्ञ असा.
विलसति लेखनावधि.