Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०६ ] श्री. २ जानेवारी १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ कीलक नाम संवत्सरे पौष शु।। चतुर्दशी गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी यांणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राज्यमान्य राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकुमतपन्हा यांसी आज्ञा केली ऐसी जेः-
तुह्मीं विनतीपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. व राजश्री नारो हणमंत व बाळाजी महादेव यांसमागमें सांगोन पाठविलें तेणेप्रमाणें यांणीं सांगितल्यावरून कळों आलें. ऐशास, स्वामीचे तुमचे दर्शनास बहुत दिवस जाहले, यानिमित्य त्वरेनें तुह्मीं येऊन दर्शन घ्यावें, हें स्वामीस अगत्य, त्यास, राजश्री शिवराम रामचंद्र याकडील गुंता सांगोन पाठविला तरी त्याकडील उजूर धरावा लागला आहे, हे गोष्ट उचितच आहे. त्यास, तेविशींही बहुतसा साक्षेप करून याउपरी स्वामीचे तुमचे दर्शनास दिवसगत न लागे तें करणें. रत्नागिरीकडील प्रसंग लिहिला. तरी जें होणें तें राजश्री गोपाळ रामराव यांचे अमर्यादेमुळेच जालें. व धनसंपदा लटिकी, सर्व अर्थ दो दिवसाचे आहेत. ह्मणून कितेक परमार्थयुक्तीने लिहिलें. तरी जें तुह्मीं लिहिलें तें उचितच परंतु हे मार्ग हे तुह्मां लोकांस बोलिले आहेतसें नाहीं अजरामरवत्प्राज्ञो विद्यामर्थ च साधयेत्, ऐसें आहे. स्वामिकार्यनिष्ठा चतुर्विध अर्थ घडतच आहेत. तुह्मांस कांहीं न कळेसे नाहीं. वरकड त्रिवर्ग लिहितां कळेल व मल्हारजी सूर्यवंशी यासमागमें तुह्मीं सांगोन पाठविलें तेणें विदित केलें. हाली यांजवळ आज्ञा जाली आहे सांगेल. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८२ १५६० अधिक श्रावण शुध्द ७
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ताहा मोकदमानि व रया मौजे पसर्णी पा। मजकूर बिदानद हर्ची सु॥ तिसा सलासीन अलफ जमीन चावर नीम .॥. दर सवाद मौजे मजकुरु दा। बदल इनाम बो। नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ सा। कसबे मजकुरु बा। खु॥ रा। दर साल सन तिसा असरीन अलफ छ ९ रबिलाखर सादीर असे जे जमीन सदरहू चावर नीम दो। माहासूल नखतयाती व बाजे उजुहाती व खा। गला व बेलकटी व मोहीमखर्च कुलबाब दिल्हे असे दुबाला कीजे दर हर साला खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लिहून घेउनु असल परतोनु दीजे ह्मणउनु रजा व भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ सन समान छ २८ जमादिलोवल मुतैन रवा अस्त बायद की ऐशाबनोकी ता। सालगु॥ चालिले प्रमाणे जाहाती सन तल मजकुरासी दीधले असे भोगवटा व तसरुफाती पाहून तागाईत साल गुदस्ता चालिले प्रमाणे देविले असे दुंबाला कीजे तालीक लिहून घेउनु असल इनामदार मजकुरासी परतोनु दीजे मोर्तब
तेरीख ५ माहे रबिलोवल
रबिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०५ ] श्री. १८ डिसेंबर १७२८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ कीलकनाम संवत्सरे मार्गशीर्ष बहुल चतुर्दशी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभूछत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमतपन्हा यांसीं आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं बावडियाहून उत्तरेकडेस स्वार होऊन गेला. तेव्हां स्वामीस विनंतिपत्र पाठविलें कीं, चिरंजीव राजश्री आप्पाजीराव स्वामिसन्निध आहेत, साहेबीं हुद्दा मामला सांगोन उर्जित करावें, वडिलीं या राज्यांत सेवा चाकरी केली आहे. ऐसे कितेक विशदें लिहिलें. ऐशास, तुह्मीं परपक्ष अवलंब करून गेला. आपाजीराव स्वामीसंनिध राहिले. याकरितां मजमूचा हुद्दा व जिल्हा मामला पूर्ववत्प्रमाणें त्यास सांगोन जंजिरे रत्नागिरीस रवाना केलें जंजि-याचा नातवानीचा प्रसंग त्यामध्यें राजश्री कान्होजी आंगरे सरखेल यांचा शह लोकांस भक्षावयास नाहीं. तेव्हां स्वामीनीं यांसी जिल्हे, मामले, गाव, खेडीं यांचा ऐवज बेगमी करून याणीं कर्जवाम करून ऐवज दिला. स्थळ रक्षण केलें. ऐसें असतां तुह्मीं रासिवडे, सांगरुळचा मोबदला ह्मणून पोंबुर्लेवर रोखा करून दीडशें रुपये घेतले. याकरितां त्याणी चिदरत्रिंबकावरी गोवदलियाचा रोखा केला मात्र निमित्य ठेवून तुह्मी मो+ स केली व नंदगांव व नाडगौडी ता। तारळें येथे रोखे केले, कीं मौजे मजकूरचा ऐवज दुसरियाकडे एकदर वसूल न देणें, ह्मणून वरातदारास सांगोन धुंध केली यामुळें गांव परागंदा जाहले ऐशास, स्वामीचे आज्ञेप्रमाणें याणीं खेडियांचा वसुल थोडाबहुत घेतला असता तुह्मी येविषयीचा कथळा करार करावा ऐसें नाही. आपाजीराव यासी स्वामीनीं लिहिलें आहे याउपरी तुमचे खेडियांवरी रोखे करणार नाहीं. व तुह्मी यांच्या खेडियांवरी व नाडगौडीवर केलें तें मना करणें. आपाजीरायाकडील खासगत गांवपैकी जो ऐवज घेतला असेल तो परतोन देणें. या कामास नारोराव हरकारे पाठविले आहेत बहुत लिहिणे तर तुह्मीं सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०४ ] श्री. तालीक. ८ डिसेंबर १७२८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ किलक सवत्सर मार्गशीर्ष बहुल तृतीया रविवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शाहूछत्रपति स्वामी यांणी चौधरी व देशकुलकर्णी व शेटे माहाजन व पाटील व खोत र्ता। सोनवळें प्रा। भिवडी यांसी आज्ञा केली ऐसी जे- राजश्री भगवंतराऊ रामचंद्र व मोरेश्वर रामचंद्र व शिवराम रामचंद्र यांनी सातारियाचे मुक्कामीं हुजूर येऊन स्वामीसंनिध विनति केली कीं, र्ता। मारीचे अदकारपणाचें वतन कदीम आपलें आहे, व या वतनास हक्क व लाजिमा व इसापती गांव पेशजी चालत आले आहेत, त्याप्रो । चालावयासी आज्ञा केली पाहिजे ह्मणून. त्यावरून हें आज्ञापत्र सादर केलें आहे. तरी तुह्मीं र्ता। मारीचे अदकारपणाचें वतन यांचें यास चालवणें व हक्कलाजिमा व इसापतीचे गांव इनाम शेतें बांधाणें सुदामत चालत आलें आहे त्याप्रमाणें यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें चालवणें. या पत्राची प्रती लेहोन घेऊन अस्सल पत्र भोगवटियास परतोन देणें. जाणिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८१ १५६०
बहूधान्य संवत्सरे शुध्द अष्टमी मंगळवार तद्दिनि रामेश्वरभट्ट व नारायणभट्ट व रंगभट्ट व अउजि चित्राउ याचा *इनामाचा विभाग झाला ऐसा जे मौजे बोरखळ चावर १ मौजे किणहि चावर .॥.
यासि
बोरखळ किणहि
अउभट्ट चावर .॥. अउभट्ट .l.
रगभट्ट चावर .l. तुकोजि बिघे १५
नारायणभट्ट .l. सूर्याजि तरफ बिघे १५
रामेश्वरभट्ट तुकोजि तरफ १५
सूर्याजि तरफ १५
येणेप्रमाणे यत्न करून विभाग भक्षणे याप्रमाणे भक्षून सुखे असणे परस्परे कळह करायासि संबंध नाहि दस्तूर रंगभट्ट
साक्षि
माहादे भट्ट अकंभट्ट येकंभट्ट पत्रप्रमाणे मान्य
कृष्ण जोसि अउजिस पत्र प्रमाणे मान्य
गोविंद जोसि
नारायेण जोसि
येकभट्ट
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०३ ] श्री. १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ कीलक नाम संवत्सरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शाहूछत्रपति स्वामी यांणीं राजश्री भगवंतराऊ रामचंद्र व मोरेश्वर रामचंद्र व शिवराम रामचंद्र अधिकारी तो । सोनवळें प्रांत भिवडी यांसी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मीं हुजूर सातारियाचे मुकामीं येऊन विनंती केली कीं, ता। सोनवळें प्रात मजकूर येथील अदकारपणाचें वतन कदीम आहे परंतु मुरार भानजी गोत्रज यांच्या वडिलीं आमच्या वडलाचा मारा मौजे भादाणे तो। मजकूर येथें केला. आणि जबरदस्तीनें वतन खात होता. तेव्हां आपले तीर्थरुप राजश्री रामचद्र निलकठ यांणीं पत्रें लेहोन गोविंद रंगनाथ मुतालीक कल्याणास अजम जेनुद अल्लीखान व काकाजी नाईक दिवाण यांजकडे पाठविला त्याणें तेथें जाऊन पत्रें देऊन हकीकत श्रुत केली त्यावरून हकिमांनी कल्याण भिवंडीचे जमीदार आणवून गोतमुखें उभयताचा निवाडा करविला. जुन्या हकीकती गोतानें मनांस आणून गोतमुखें मुरार भानजी खोटा जाला. र्ता। मजकूरच्या वतनास लाभत नाहीं, ऐसें खरें जालें. तेव्हां हें वर्तमान लेहोन तेथून अवरंगाबादेस गेले. तेथें दाउदखान वंची, किलिजखान, व द्यानदखान दिवाण यांणीं मनास आणून परवाने करून दिधले. ते परवाने दिल्लीस पाठविलें. तेथें बाहादूरशाहा पातशाहीस जुलपुकारीखा दिवाण यांणीं श्रुत करून पातशाही फरमान करून दिधला. तो व परवाने मनास आणून आपलें वतन आपले दुमाले करून चालवावयाची आज्ञा केली पाहिजे, ह्मणोन विदित केलें. त्याप्रमाणें मनास आणून तुह्मांवरी स्वामी कृपाळू होऊन र्ता। मजकूरचे अदकारपणाचें वतन तुमचे दुमाले करून हें वतनपात्र दिलें असे. तरी तुह्मीं या वतनाची सेवा करून पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें वतन अनभवून सुखरूप राहणें. या वतनास हक लाजिमा व इना इसाफत गाव सुदागत चालत आले आहेत वगैरे वितपसील.
इनामतीचे गाव कदीम दस्ताप्रा। र्तामजकूरचे देखील कसबे देहे
१ मौजे भादाणे ८४ येथील हक्क लाजिमा सुदामत
१ मौजे कुळासे प्रमाणें कलम १ बंदर व रहदारी
------- दर गोणीस हक पक्के पैसे
२ र्ता। मजकूरीं पेठ व बाजार आहेत,
इनाम गावगन्नाचे व बाधाणें कदीम चालत तेथे शेव व धार व दसकी
आलें आहे त्याप्रमाणें चालवणें कलम १ व सुदामत प्रमाणें कलम १
इसाफती वतनी वाडे व झाडझाडोरा व राबते
महार सुदामत प्रमाणें १
येणें प्रमाणें हक्क लाजिमा करार केला असे. तो घेऊन वतनाची सेवा करुन सुखरुप राहणें. जाणिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०२ ] श्री. १५ नोव्हेंबर १७२८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ कीलकनाम संवत्सरे कार्तिक बहुल दशमी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभूछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमतपन्हा यांसी -
आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. कितेक निष्ठापूर्वक व श्लोकयुक्त लिहिलें. व राजश्री नरसो तिमाजी व राजश्री रघुराव व तुकोजी खांड्या या समागमें सांगोन पाठविलं. तेणेप्रमाणें यांणीं निवेदन केल्यावरून विदित जाहलें. ऐशास चालवायास स्वामी अंतराय करणार नाहींत. हा अर्थ वारंवार लिहावा असें नाहीं. हालीं तुह्मांकडून उभयता आले, याजजवळ सांगितलें आहे सांगतां कळेल. सर्वप्रकारे समाधान असों देणें. व राजश्री शिवराम रामचंद्र यांचा उजूर स्वामीचे दर्शनास धरिला. तरी स्वामीचें दर्शन त्वरित तुह्मांस व्हावें, हें स्वामीस बहुत अगत्य. या करितां सत्वर स्वामीचें दर्शन तुह्मांस होय तें करणें. व राजश्री श्रीनिवास शिवदेव यांकडील गांवचीं पत्रे द्यावीं, ह्मणून तुह्मीं लिहिलें. त्यावरून मशारनिलेकडील गांवांस ताकीदपत्रें दिली आहेत. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०१ ] श्रीशिवायनम: १३ ऑगस्ट १७२८.
यादीदास्त राजश्री भगवंतराऊ अमात्य याणीं मुकसुद लेहून पाठविलें त्याचे उत्तर सु।। तिसा अशरीन मया अलफः-
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
याप्रमाणे लिहिलें, याचे उत्तर लिहिलें आहे छ १८ मोहरम.
मोर्तब सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०० ] श्री. ६ मे १७२८
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५४ कीलक नाम संवत्सरे वैशाख श्रुद्ध अष्टमी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा. शंभूछत्रपति स्वामी यांणीं राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमतपन्हा यांसी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मांस दोन पत्रें स्वामीनीं यावयाविषयीं पाठविलीं. तुमचेविषयीं स्वामीचे चित्तीं कांहीं संशय असेल तर श्रीची शपथ असे, तुम्हासही श्रीची शपथ असे, ह्मणोन लिहिलें व सांगोन पाठविलें. परंतु तुह्मीं चित्तांतील संदेह दूर केला नाहीं . तरी स्वामिसंनिध यावयास अनमान केला हें तुह्मांस उचित नव्हे. स्वामीस तुह्मांपेक्षां दुसरा अर्थ कांहीं विशेष आहे, ऐसे नाहीं. तुह्मीं मात्र निष्ठुरता धरीत आहे. हें स्वामी हृद्गत तुह्मांस कळावें, व तुमचेही स्वामीस विदित व्हावें, या करितां हालीं राजश्री लक्ष्मणराव शामजी व अंताजी बल्लाळ यांसी आज्ञा करून पाठविले आहेत. हे स्वामीचे आज्ञेप्रमाणें तुह्मांस सागतील, तें चित्तांत आणून याउपर कोणेविषयीं संदेह न धरणें आणि आपलें हृद्गत सागोन पाठविणें. तुमचें ठायी ज्याचा विश्वास असेल, त्यास सांगोन पाठविणें स्वामी त्यांस तुह्मांकडे पाठवितील समाधान असो देणे बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा
मर्यादेय विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
धणीही त्यांचे निष्ठेप्रमाणें भूषणें वाढवितात. जिल्हे मामले देतात त्याजला स्वामिसेवेवितरिक्त दुसरे नाहीं. सुखरुप दौलता खाऊन आहेत. त्यांची साक्षी उपसाक्षी देऊन तुह्मीं लिहिलियानें साम्यतेस येणार नाहीं तुह्मांसही धण्यानीं सरंजाम दिलाच आहे त्यामध्यें तुह्मीं आपले पदाप्रमाणें वर्तोन, धण्याची सेवा करून, कृपा संपादून घ्यावी. तुह्मांवरी धण्यांनीं दया करावी असेंच उभयपक्षीं उचित आहे असा प्रसंग असता तुमचे इस्तकबिलीपासून एकही सुप्रयुक्त वर्तणूक नाहीं. धण्यासच आरोप ठेवून लिहिता, यामध्यें तुह्मांस कोणतें उचित असे ? आह्मां सारिख्यानीं लिहिलें तरी तुह्मांस विषादावह वाटेल ; परंतु तुह्माजवळचे कारकून भले माणूस आहेत. त्यासच ये गोष्टीचा पर्याय विचारणें. तेच तुह्मांस काय ह्मणतील, हे गोष्टीचा प्रत्यय पाहणें. हा आपले जागीं विचार न पाहता, ज्या भरीं भरिता त्या भरीं भरोन कागदपत्र लिहिता, यांत स्वार्थ कोणता ? घोरपडे, सितोळे यांचेज भरी भरोन अव्यवस्थित वर्तणूक करून तप्त केलें. असें असतां तुह्मीं लिहिलें जे, आपले आज्याचे लग्नास लक्ष दोन लक्ष रुपये खर्च करून लग्नें केलीं, सरकारकुन्या दिल्या, ऐसें तीन पिढ्या चालले, आणि आपल्यावरीच निकर्ष धण्याचा । ह्मणोन लिहिलें तरी स्वामिद्रोहपणाची वर्तणूक तुमच्या त्रिपूर्वजात ऐसें कोणांपासून तरी कर्म अवलंबिलें होतें काय ? धण्यांनी लक्ष दोन लक्ष रुपये लाऊन लग्नें केलीं, पदें दिल्हीं, याणीं सेवा केली, त्याचें सार्थक निदर्शनास आणिलें ते वडिल चालत आले त्यांच्या वर्तणुकीप्रमाणे तुह्मीं वर्तावे, राज्याचा बदोबस्त करावा, लोकात कीर्त संपादावी, हें तुमच्या वांट्यास न येता, मनस्वी लोकांच्या बुद्धी ऐकोन त्याचें निदर्शन जे खवारी जाली, दुराचरणाचें निदर्शन तुह्मास आलें याउपरी तरी तुह्मी सर्व अर्थ चित्तात आणून, एकाग्र चित्तें धण्याचे पायाशी लक्ष लावून, धण्याची कृपा संपादून घ्यावी आपण आम्हांस लिहिलेसारखे आह्मास द्यावें. असें मन.पूर्वक आपलें चित्तीं बेकिलाफानें सदेह न धरिता चित्ती असेल तरी त्याप्रमाणे जो विचार कर्तव्य उपयुक्त असेल तें करावें. सारांश, सुमतीस दुर्मतीस तफावत फार आहे । सुबुद्धिदुर्बद्धीचीं फळें नारदमुनींस व मार्कंडेयासी प्रत्यय आला, हें कथापुराणान्तराश्रयें आपण ऐकिलींच असेल. आपलीं पदें महत्त्वें भारी आहेत. याकरितां दुसरियाच्या सांगितल्या बुद्धीवरी जाऊं नये, यांत श्रेयस्कर आहे आपल्यास हे पत्र विस्तारें लिहिलें आहे. जें उपयुक्त असेल तें चित्तांत आणावें. एक भला माणूस येथें नि संशयरूपें पाठवून धण्याशी सख्य करून घ्यावें, यांत उत्तम आहे तरी आपण अगत्यरूपें मला माणूस पाठवून गोडीचा विचार करावा. येविशीं विलंबावरी न घालतां गुप्तरूपें सत्वर पाठवावा. विदित जालें पाहिजे. हे विनंति.