Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

प्रस्तावना 

तेव्हां स्वामीच्या मसलतीचा ठसा जर कांहीं कोठे उमटला असेल तर तो हिंदुस्थानच्या राजकारणांत किंवा दक्षिणच्या राजकारणांत उमटला नाही हें निश्चित आहे. दक्षिण व हिंदुस्थान वगळून बाकी राहिलेलें जें कोंकण, तेथील राजकारणांत स्वामीचा कांहीं हात होता हें मात्र प्रांजलपणें कबूल केलें पाहिजे. आता कोंकणच्या मसलतींत स्वामीचा हात होता ह्या विधानाचा अर्थ स्वामीं कोंकणच्या मसलतीचा सूत्रधार होता असा करण्यांत तात्पर्य नाहीं. कां कीं, १७२६ त जंजि-याच्या हबशाशीं जें युद्ध सुरू झालें, तें ब्रह्मेंद्र वरघांटी येण्याच्या पूर्वी झालेलें होतें, हें ध्यानांत धरिलें पाहिजे. तसेंच हें युद्ध १७२६ त निजामुन्मुलुखाशीं सुरूं झालेल्या युद्धाचा भाग होता, हेंहि लक्षांत घेतलें पाहिजे. शिवाय हबशाशीं युद्ध सुरू असतांना, त्याचा हत्ती सावनुराहून आणण्याचा पत्कर स्वामीनें ज्याअर्थी घेतला होता त्याअर्थी लढाई सुरू होतांना ब्रह्मेंद्राचा व हबशाचा स्नेह होता हें सिद्ध आहे. अर्थात् ब्रह्मेंद्र जंजिरेकर हबशाच्या युद्धाचा मूळ सूत्रधार होता असें विधान बिलकुल करतां येत नाहीं. आपला हत्ती स्वामीनें आंग्र्यांच्या हातांत जाणूनबुजून जाऊं दिला अशी गैर समजूत करून घेऊन हबशानें जेव्हां ब्रह्मेंद्राच्या देवालयाचा उध्वंस केला, तेव्हां हबशाचा सूड उगविण्याच्या इच्छेनें स्वामी साता-यास आला व हबशाचा नाश करण्यास शाहूस व बाजीरावास प्रोत्साहन देता झाला. स्वामीच्या देवालयाचा उध्वंस हबशानें केला नसता, तत्रापि त्याचें पारिपत्य करणें शाहूस आवश्यकच झालें होतें. निजामुन्मुलूख व कोल्हापूकर संभाजी ह्यांचा हस्तक जो हबशी त्याचा पाडाव करणें हें त्यावेळच्या युद्धाचें एक अंगच होतें. सारांश, प्रासंगिक प्रोत्साहनाव्यतिरिक्त स्वामीचा हबशाच्या युद्धाशीं फारसा संबंध नव्हता. हबशाच्या युद्धांनतरचें दुसरें मोठें कोंकणांतील युद्ध म्हटलें म्हणजे वसईची मोहीम होय. ह्याहि युद्धाचीं मूळ सूत्रें स्वामीनें हलविलीं असें म्हणण्यास पुरावा नाही. कारण कीं, वसईच्या मोहिमेचा बूट खंडोजी माणकर, मोरोजी शिंदे वगैरे साष्टींतील मसलती पुरुषांनीं चिमाजी आप्पा कोंकणांत १७३७ त उतरण्यापूर्वीच काढिला होता. वसईच्या मोहिमेची बारीक पूर्वपीठिका साष्टीच्या बखरींत बरीच इत्थंभूत दिली आहे, तींत ब्रह्मेंद्रस्वामीचा दुरूनहि उल्लेख केलेला नाहीं. १७३७ त चिमाजी आप्पा कोंकणांत साष्टीकडे गेला, त्यावेळीं मात्र ब्रह्मेंद्रानें वसई तुम्हांस खास मिळेल, असा आशीर्वाद वारंवार दिला. ह्या आशीर्वचनाव्यतिरित ब्रह्मेंद्रानें वसईची मोहीम फत्ते होण्यास कांहीं साहाय्य केलें होतें असें दिसत नाहीं. सारांश, मराठ्यांच्या साम्राज्याच्या मूलस्थापनेशी किंवा वर्धमानस्थितीशीं सूत्रधार ह्या नात्यानें ब्रह्मेंद्राचा काहीं एक संबंध नव्हता असें म्हटल्यावाचून गत्यंतर नाहीं.

प्रस्तावना 

२२. ब्रह्मेंद्रस्वामीच्या हयातींत मराठ्यांच्या राजकारणाचें अंतः स्वरूप व बहिःस्वरूप हें असें दोन प्रकारचें होतें. आतां ब्रह्मेंद्रस्वामी मराठ्यांच्या राजकारणाचा मुख्य सूत्रधार होता हा जर ग्रह खरा धरला तर सरंजामी सरदारीची पद्धत व साम्राज्य-वर्धनाचा उपक्रम ह्यांच्या मूळाशीं ब्रह्मेंद्र असला पाहिजे. परंतु ह्या दोन पद्धती बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत अंमलात येत असतांना, ब्रह्मेंद्र कोंकणांत व कोंकणच्या आसपास परशराम येथील देवालय बांधण्याकरितां भिक्षा मागत हिंडत होता. साम्राज्य पसरविण्याचा उपक्रम शाहूच्या राज्यारोहणाच्या अगोदर अवरंगजेब जिवंत असतानाच होत चालला होता हें वर दाखवून दिलें आहे. तसेंच सरंजामी सरदारीची पद्धत शाहूला स्वपक्षपुष्टीकरणार्थ स्वीकारावी लागली, ह्याचेंहि स्पष्टीकरण वर केलें आहे. तेव्हां ह्या वेळच्या मराठ्यांच्या राजकारणाचीं हीं मुख्य रूपें घडविण्यांत स्वामीचें अंग बिलकुल नव्हतें हें उघड आहे.

२३. सरंजामी सरदारीची पद्धति व साम्राज्याची स्थापना ह्यांच्या मुळाशीं यद्यपि ब्रह्मेंद्रस्वामी नसला, तत्रापि ह्या दोन्ही संस्था वर्धमान स्थितींत असतांना त्यांच्यावर स्वामींच्या प्रतिभेचे ठसे उमटले जाण्याचा संभव आहे असें कोणाचें म्हणणें पडेल. परंतु बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत मराठ्यांच्या राजकारणात ब्रह्मेंद्राचा म्हणण्यासारखा प्रवेश झालेला दिसत नाहीं. कां कीं, १७२७ च्या पूर्वी स्वामीचा पत्रव्यवहार मुदलांतच फारसा नव्हता किंवा कदाचित् असलाच तर तो प्रस्तुत कालीं आपल्याला अनुपलब्धीमुळें नसल्यासारखाच आहे. त्यामुळे १७२७ च्या पूर्वीचा स्वामीच्या मुत्सद्दीपणाचा माग लावण्यास कांहींच साधन उरलें नाहीं. १७२७ त स्वामी धावडशीस कायमचा रहावयास आल्यानंतरचा जो पत्रव्यवहार उपलब्ध झाला आहे त्यावरून मात्र, स्वामीच्या प्रतिभेचा ठसा मराठ्यांच्या राजकारणावर कितपत उमटला आहे, तें समजण्यास उत्तम सोय झाली आहे. ह्या पत्रव्यवहारावरून मराठ्यांच्या राजकीय चरित्राच्या प्राणभूत अशा ज्या सरंजामी सरदारी व साम्राज्यस्थापना-दोन संस्था त्या वर्धमान होत असतां त्यांत स्वामीनें काहीं फेरबदल करण्याची मसलत दिली होती असें ओढून ताणून म्हणण्यालाहि यत्किंचित् पुरावा सांपडत नाहीं. गुजराथ, खानदेश, व-हाड, माळवा, विजापूर ह्या प्रदेशांत मराठ्यांच्या ज्या खटपटी १७२० पासून १७४० पर्यंत बाजीरावाच्या कारकीर्दीत झाल्या, त्याशीं ब्रह्मेंद्राच्या मसलतीचा कांही संबंध होता असें म्हणण्यास एका अक्षराचाहि आधार मिळणे मुष्कील आहे. १७४० पासून १७४५ पर्यंत बाळाजी बाजीरावानें हिंदुस्थानांत व इतरत्र ज्या खटपटी केल्या त्यांच्यांशीं तर स्वामीचा काडीचा संबंध नव्हता. कां कीं, बाजीरावाच्या कारकीर्दीत स्वामीला जो मान मिळत असे तो बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत मिळत नव्हता.

प्रस्तावना 

फितूर झालेल्या जाधव, निंबाळकर वगैरे सरदारांना निजमुन्मुलुखानें सरंजाम दिल्यामुळें तितक्याच योग्यतेची लालुच आपल्याहि सरदारांना देण्याशिवाय दुसरी सोय शाहूजवळ राहिली नाहीं. सरदारांना सरंजामी करून टाकिल्यावर अष्टप्रधानांच्या उरावर शाहूनें एक मुख्य प्रधान अथवा पेशवा म्हणून अधिकारी नेमिला. येथून पुढें पेशवा मुख्य व अष्टप्रधान गौण असा प्रकार झाला. अष्टप्रधानांतील बरीच मंडळी ताराबाईच्या पक्षाची असल्यामुळें शाहूला ही तोड करावी लागली. येणेंप्रमाणें मराठ्यांच्या राज्यपद्धतींत सरंजामी सरदारीचा नवीन प्रवेश झाला, व तींतून अष्टप्रधानपद्धतीचा हळूं हळूं लोप होत गेला. बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत मराठी राज्यपद्धतीला, वंशपरंपरेनें चालणारी, एक प्रधानघटित मांडलिकसंस्थानोपवर्ति, संयुक्त लष्करी एकसत्तात्मक पद्धति अशी संज्ञा तंतोतंत लागू पडते. सारांश, शाहू, बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या कारकीर्दीत संयुक्त साम्राज्याचें स्वरूप महाराष्ट्र राज्यपद्धतीला येत चाललें होतें. अथवा खंरे म्हटलें असतां, आलेंच होतें. महाराष्ट्राच्या ह्या संयुक्त साम्राज्याचें रूप एका आधुनिक राष्ट्राच्या संयुत साम्राज्याच्या रूपासारखेच होतें. इंग्लंड व इंग्लडच्या वसाहती ह्यांचा जो संयोग सध्यां बनत चाललेला आपण पाहत आहों तोच संयोग महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील सरंजामी सरदारांचीं संस्थानें ह्यांचा त्यावेळी बनत होता. भेद इतकाच की इंग्लंडांत प्रतिनिधिनिक्षिप्त व बहुप्रधानघटित, वंशपरंपरेनें चालणारी एक सत्ता आहे आणि महाराष्ट्रांत त्या वेळीं एकप्रधानघटित अथवा पंतप्रधानघटित वंशपरंपरेनें चालणारी एक सत्ता होती. युनायटेड स्टेट्स, क्यानडा, ट्रान्सव्हाल ह्यांनीं जशी इंग्लंडच्या विरुद्ध आजपर्यंत वेळोवेळी खटपट केली, त्याप्रमाणेंच आंग्रे, दाभाडे वगैरेनीं महाराष्ट्राच्या विरुद्ध केली. वसाहतींतील संस्थानांचें हितसंबंध इंग्लंडच्या हितसंबंधांशीं गोवून टाकण्याचा ब्रिटिश मुत्सद्दी ज्याप्रमाणें सध्यां प्रयत्न करीत आहेत त्याप्रमाणेंच शाहू व बाळाजी विश्वनाथ यांनीं नवीन उत्पन्न झालेल्या सरदारांचे हितसंबंध आपल्या हितसंबंधाशीं गोवून टाकिले. सरदेशमुखी, बाबती, साहोत्रा वगैरे बाबींची वांटणी सरदारांच्या संस्थानांतून व जिंकलेल्या प्रातांतून छत्रपति व सरदार ह्यांच्यामध्यें त्यांनीं अशी करून टाकिली कीं मुख्य सत्तेचा स्पर्श सरदारांच्या सदा अनुभवास यावा व सरदारांच्या हालचाली सदा मुख्य सत्तेच्या देखरेखीखालीं रहाव्या. बाळाजी विश्वनाथाच्या ह्या शिस्तीलाच ग्रांट डफ ब्राह्मणाचा कावा म्हणून दूषण देतो (Duff, chap. xII). कोणतेंहि राष्ट्र संयुक्त संस्थानाच्या पदवीला येऊन पोहोंचलें म्हणजे संयोगांतर्गत संस्थानाचे हितसंबंध मुख्य सत्तेच्या हितसंबंधाशीं गोवून टाकणें अत्यंत आवश्यक कसें होतें ह्याचा अनुभव डफला नसल्यामुळें मुत्सद्देगिरीच्या ह्या धोरणाला तो ब्राह्मणांचा कावा म्हणून दूषण देतो. परंतु संयुक्त साम्राज्याचे ओझें डोक्यावर येऊन पडलेल्या डफच्या नातवांना बाळाजी विश्वनाथाच्या ह्या धोरणाचा अर्थ जास्त उदात्त रीतीनें करतां येईल यांत संशय नाहीं. प्रसिद्ध इतिहासतत्त्ववेत्ते कैलासवासी महादेव गोविंद रानडे यांनीं बाळाजी विश्वनाथाच्या ह्या सरंजामी पद्धतीचे गुणानुवाद मोठ्या भारदस्त शब्दांनीं गायिले आहेत व तें, तत्कालीन वस्तुस्थिति लक्षांत घेतां, सर्वथैव यथायोग्य आहेत. शिवाजीनें रचिलेल्या अष्टप्रधानघटित राज्यपद्धतींचे अनुकरण हिंदुस्थानांत ब्रिटिश मुत्सद्यांनी केलें आहे असें ह्या तत्ववेत्त्याचें म्हणणें होतें. त्याचप्रमाणें मराठ्यांच्या साम्राज्याच्या हितार्थ बाळाजी विश्वनाथानें रचिलेली सरंजामीं राज्यपद्धति, ब्रिटिश साम्राज्याशी वसाहतींतील संस्थानांचे हितसंबंध जखडून टाकण्यास ब्रिटिश मुत्सद्यांनीं योजिलेल्या पद्धतीसारखीच आहे. बाळाजी विश्वनाथाच्या सरंजामी पद्धतींतील कांही कलमें येणेंप्रमाणे होतीं. (१) आपापल्या ताब्यांतील प्रांतांत सरदारांनी मुलकी व लष्करी अधिकार चालवावे. (२) प्रांतांतील उत्पन्नाचे हिशेब सरकारच्या सरदारांना दाखवून सरकारांत रुजू करावे. (३) छत्रपति हुकूम करतील त्या मोहिमेस सरदारांनी जावें. (४) सरकारच्या हुकुमाशिवाय परराष्ट्रांशीं तह किंवा लढाई करूं नये. (५) ठरविलेली पेषकष सरकारांत दरवर्षी भरणा करावी. (६) सरंजामी सरदारी वंशपरंपरा नसून सरकारास वाटेल त्यास देतां यावी. (७) छत्रपतीनीं दिलेले किताब नांवापुढे चालवावे. (८) राज्याच्या बाबी प्रथम वसुलांतून काढून ठेवाव्या. (९) वसुलाच्या बाबी सरदारांनीं देशपरत्वें ठरवाव्या (१०) येणा-या व जाणा-या मालावर जकात बसवावी. ह्या पद्धतींतील हीं दहा कलमे मुख्य आहेत. ह्या पद्धतीअन्वयें, दाभाडे, आंग्रे, बांडे, भोंसले वगैरे सरदाराशीं करारनामे बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत ठरले होते. ह्या कलमांतील कराराच्या विरुद्ध जी जाईल त्याचें पारिपत्य करणें छत्रपतींच्या अधिकारांतील होतें.

प्रस्तावना 

फितूर झालेल्या जाधव, निंबाळकर वगैरे सरदारांना निजमुन्मुलुखानें सरंजाम दिल्यामुळें तितक्याच योग्यतेची लालुच आपल्याहि सरदारांना देण्याशिवाय दुसरी सोय शाहूजवळ राहिली नाहीं. सरदारांना सरंजामी करून टाकिल्यावर अष्टप्रधानांच्या उरावर शाहूनें एक मुख्य प्रधान अथवा पेशवा म्हणून अधिकारी नेमिला. येथून पुढें पेशवा मुख्य व अष्टप्रधान गौण असा प्रकार झाला. अष्टप्रधानांतील बरीच मंडळी ताराबाईच्या पक्षाची असल्यामुळें शाहूला ही तोड करावी लागली. येणेंप्रमाणें मराठ्यांच्या राज्यपद्धतींत सरंजामी सरदारीचा नवीन प्रवेश झाला, व तींतून अष्टप्रधानपद्धतीचा हळूं हळूं लोप होत गेला. बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत मराठी राज्यपद्धतीला, वंशपरंपरेनें चालणारी, एक प्रधानघटित मांडलिकसंस्थानोपवर्ति, संयुक्त लष्करी एकसत्तात्मक पद्धति अशी संज्ञा तंतोतंत लागू पडते. सारांश, शाहू, बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या कारकीर्दीत संयुक्त साम्राज्याचें स्वरूप महाराष्ट्र राज्यपद्धतीला येत चाललें होतें. अथवा खंरे म्हटलें असतां, आलेंच होतें. महाराष्ट्राच्या ह्या संयुक्त साम्राज्याचें रूप एका आधुनिक राष्ट्राच्या संयुत साम्राज्याच्या रूपासारखेच होतें. इंग्लंड व इंग्लडच्या वसाहती ह्यांचा जो संयोग सध्यां बनत चाललेला आपण पाहत आहों तोच संयोग महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील सरंजामी सरदारांचीं संस्थानें ह्यांचा त्यावेळी बनत होता. भेद इतकाच की इंग्लंडांत प्रतिनिधिनिक्षिप्त व बहुप्रधानघटित, वंशपरंपरेनें चालणारी एक सत्ता आहे आणि महाराष्ट्रांत त्या वेळीं एकप्रधानघटित अथवा पंतप्रधानघटित वंशपरंपरेनें चालणारी एक सत्ता होती. युनायटेड स्टेट्स, क्यानडा, ट्रान्सव्हाल ह्यांनीं जशी इंग्लंडच्या विरुद्ध आजपर्यंत वेळोवेळी खटपट केली, त्याप्रमाणेंच आंग्रे, दाभाडे वगैरेनीं महाराष्ट्राच्या विरुद्ध केली. वसाहतींतील संस्थानांचें हितसंबंध इंग्लंडच्या हितसंबंधांशीं गोवून टाकण्याचा ब्रिटिश मुत्सद्दी ज्याप्रमाणें सध्यां प्रयत्न करीत आहेत त्याप्रमाणेंच शाहू व बाळाजी विश्वनाथ यांनीं नवीन उत्पन्न झालेल्या सरदारांचे हितसंबंध आपल्या हितसंबंधाशीं गोवून टाकिले. सरदेशमुखी, बाबती, साहोत्रा वगैरे बाबींची वांटणी सरदारांच्या संस्थानांतून व जिंकलेल्या प्रातांतून छत्रपति व सरदार ह्यांच्यामध्यें त्यांनीं अशी करून टाकिली कीं मुख्य सत्तेचा स्पर्श सरदारांच्या सदा अनुभवास यावा व सरदारांच्या हालचाली सदा मुख्य सत्तेच्या देखरेखीखालीं रहाव्या. बाळाजी विश्वनाथाच्या ह्या शिस्तीलाच ग्रांट डफ ब्राह्मणाचा कावा म्हणून दूषण देतो (Duff, chap. xII). कोणतेंहि राष्ट्र संयुक्त संस्थानाच्या पदवीला येऊन पोहोंचलें म्हणजे संयोगांतर्गत संस्थानाचे हितसंबंध मुख्य सत्तेच्या हितसंबंधाशीं गोवून टाकणें अत्यंत आवश्यक कसें होतें ह्याचा अनुभव डफला नसल्यामुळें मुत्सद्देगिरीच्या ह्या धोरणाला तो ब्राह्मणांचा कावा म्हणून दूषण देतो. परंतु संयुक्त साम्राज्याचे ओझें डोक्यावर येऊन पडलेल्या डफच्या नातवांना बाळाजी विश्वनाथाच्या ह्या धोरणाचा अर्थ जास्त उदात्त रीतीनें करतां येईल यांत संशय नाहीं. प्रसिद्ध इतिहासतत्त्ववेत्ते कैलासवासी महादेव गोविंद रानडे यांनीं बाळाजी विश्वनाथाच्या ह्या सरंजामी पद्धतीचे गुणानुवाद मोठ्या भारदस्त शब्दांनीं गायिले आहेत व तें, तत्कालीन वस्तुस्थिति लक्षांत घेतां, सर्वथैव यथायोग्य आहेत. शिवाजीनें रचिलेल्या अष्टप्रधानघटित राज्यपद्धतींचे अनुकरण हिंदुस्थानांत ब्रिटिश मुत्सद्यांनी केलें आहे असें ह्या तत्ववेत्त्याचें म्हणणें होतें. त्याचप्रमाणें मराठ्यांच्या साम्राज्याच्या हितार्थ बाळाजी विश्वनाथानें रचिलेली सरंजामीं राज्यपद्धति, ब्रिटिश साम्राज्याशी वसाहतींतील संस्थानांचे हितसंबंध जखडून टाकण्यास ब्रिटिश मुत्सद्यांनीं योजिलेल्या पद्धतीसारखीच आहे. बाळाजी विश्वनाथाच्या सरंजामी पद्धतींतील कांही कलमें येणेंप्रमाणे होतीं. (१) आपापल्या ताब्यांतील प्रांतांत सरदारांनी मुलकी व लष्करी अधिकार चालवावे. (२) प्रांतांतील उत्पन्नाचे हिशेब सरकारच्या सरदारांना दाखवून सरकारांत रुजू करावे. (३) छत्रपति हुकूम करतील त्या मोहिमेस सरदारांनी जावें. (४) सरकारच्या हुकुमाशिवाय परराष्ट्रांशीं तह किंवा लढाई करूं नये. (५) ठरविलेली पेषकष सरकारांत दरवर्षी भरणा करावी. (६) सरंजामी सरदारी वंशपरंपरा नसून सरकारास वाटेल त्यास देतां यावी. (७) छत्रपतीनीं दिलेले किताब नांवापुढे चालवावे. (८) राज्याच्या बाबी प्रथम वसुलांतून काढून ठेवाव्या. (९) वसुलाच्या बाबी सरदारांनीं देशपरत्वें ठरवाव्या (१०) येणा-या व जाणा-या मालावर जकात बसवावी. ह्या पद्धतींतील हीं दहा कलमे मुख्य आहेत. ह्या पद्धतीअन्वयें, दाभाडे, आंग्रे, बांडे, भोंसले वगैरे सरदाराशीं करारनामे बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत ठरले होते. ह्या कलमांतील कराराच्या विरुद्ध जी जाईल त्याचें पारिपत्य करणें छत्रपतींच्या अधिकारांतील होतें.

प्रस्तावना 

२०. ब्रह्मेंद्रस्वामी मराठ्यांच्या राजकारणाचीं मुख्य सूत्रें फिरवीत होता किंवा नाहीं हे पहावयाचें म्हटलें म्हणजे ह्यावेळचें मराठ्यांच्या राजकारणाच्या विस्ताराचें स्वरूप साद्यन्त ध्यानांत आणिलें पाहिजे. त्यावेळच्या मराठ्यांच्या राजकारणाचें रूप दोन प्रकारचें होतें. अंतस्थ व्यवस्था ठेवण्याचें राजकारण करणें हे एक रूप व सर्व भरतखंड हिंदुपदबादशाहींत आणणे हें दुसरें रूप. पैकीं पहिले रूप कालान्तरानें बनत बनत कसें बनलें हें पहाणे मोठें मनोवेधक आहे. शहाजीच्या पूर्ववयांत जी एक लहानशी जहागीर होती, ती शिवाजीनें १६४६ त विजापूरच्या पातशाहींतून फोडून स्वतंत्र संस्थानाच्या पदवीस आणून सोडिली. विजापूरच्या पातशाहींतून स्वतंत्र झालेलें हें मावळांतील शकल वाढत वाढत १६७४ त सह्याद्रीच्या पृष्ठवंशाच्या पूर्वेस व पश्चिमेस बागलणापासून फोंड्यापर्यंत वीस पासून तीस मैलांच्या अंतरानें पसरलें. ह्या प्रसाराला स्वराज्यस्थापन अशी संज्ञा आहे. ह्यावेळीं राजा व अष्टप्रधान हींच काय तीं राज्याची अंगें होतीं. शिवाजीचें महाराष्ट्र त्यावेळीं वंशपरंपरेनें चालणारें व अष्टप्रधानोपदिष्ट असें एकसत्तात्मक राज्य होतें. शिवाजीच्या नंतर २७ वर्षांनीं शाहू राज्यासनीं आल्यावर ह्या एकसत्तात्मक राज्यांत मांडलिक ऊर्फ सरंजामी सरदार उत्पन्न झाले. सरंजामी सरदारांनी आपापल्या प्रांतांतील मुलकी, दिवाणी व लष्करी व्यवस्था पाहून छत्रपतींना पेषकष देऊन रहावें असा निर्बध बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत पडला. सरंजामी सरदार उत्पन्न व्हावयाला व शिवाजीच्या स्वराज्याच्या बाहेर मराठ्यांची सत्ता पसरण्याला एकच गांठ पडली. स्वातंत्र्यार्थ लढाईचा निकाल औरंगझेबाच्या मृत्युसमयीं मराठ्यांच्या तर्फेनें लागल्यावर, मराठ्यांच्या शक्तीचा जोर स्वराज्याला पुरून परराज्यात वावरूं लागला. मोंगलांची पिछेहाट झाल्यावर मराठ्यांची पेषामद व्हावी हें पराकाष्ठेची मेहनत करून स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांचे कुलक्रमागत व्रतच आहे. मोंगलांच्या प्रांतांत मराठ्यांची ही पेषामद मोठी चमत्कारिक झाली. राजाराम महाराज जिंजीस असतांना व राजाराम महाराज मृत्यू पावल्यावर खंडेराव दाभाडे, कंठाजी कदम बांडे, कान्होजी भोसले, चिमणाजी दामोदर, कान्होजी आंग्रे वगैरे सरदार बहुतेक स्वतंत्रपणें मोंगलांच्या प्रांतांत व मोंगलांनी जिंकिलेल्या स्वराज्यांतील प्रांतांत अम्मल चालवीत होते. राज्यावर येण्याच्या समर्यीं व नंतर आपल्या पक्षाला बळकटी यावी या हेतूनें शाहूनें ह्या बहुतेक स्वतंत्र सरदारांना आपल्या राज्याचे बहुतेक स्वतंत्र असे सरंजामी सरदार अथवा मांडलिक केले. मोंगलाच्या प्रांतांत अंमल करणा-या ह्या सरदारांस सरंजाम दिल्यावर स्वराज्यांतील अष्टप्रधान व इतर योद्धे यासहि सरंजाम देणें शाहूस भाग पडलें.

  मराठ्यांच्या इतिहासाची साधने एकूण खंड २२
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तजावरचा शिलालेख)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सोळावा (शिवकालीन घराणी)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सतरावा (शिवकालीन घराणी)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
     मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
  राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
  महिकावती (माहीम)ची बखर
  नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
 भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
  संस्कृत भाषेचा उलगडा
    

 

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण हे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता, २५ नोव्हेंबर, १९८४ रोजी मा. यशवंतराव चव्हाण मृत्युनंतर त्यांचे हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी यशवंतरावांचे अनुयायी, सुहृद व कार्यकर्ते एकत्र आले. त्यातूनच १७ सप्टेंबर, १९८५ रोजी मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे पक्षनिरपेक्ष व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या जनमानसाला संचित करणा-या प्रश्नांचा खल करावा आणि या चर्चेतून कार्य करणारी माणसे तयार व्हावीत ही प्रतिष्ठानची भूमिका आहे. या राकट, कणखर, दगडांच्या देशाचा स्वाभिमान अभंग राहावा ही महाराष्ट्रातील जनमानसाची इच्छा आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा प्रवास हा या आकांक्षेच्या पूर्ततेचा आहे. अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. www.ycpmumbai.com

 





 

 

आजच्या सायबर जगात मराठीच्या समृद्ध साहित्य परंपरेचे प्रतिबिंब जास्तीत जास्त ठळकपणे दिसावे असे धोरण प्रतिष्ठानने गेली दहा वर्षांहून अधिक काळ सातत्याने जपले आहे. आजपर्यंत समग्र विठ्ठल रामजी शिंदे, समग्र धर्मानंद कोसंबी, केतकर ज्ञानकोशाचे सर्व २३ खंड, महाराष्ट्राचे कायम प्रेरणास्थान असणारे कै. यशवंतराव चव्हाण यांचे समग्र साहित्य आणि भाषणे वगैरेची संकेतस्थळे प्रतिष्ठानने लोकार्पित केली. त्या संकेतस्थळांना इंटरनेटच्या विश्वात चांगली लोकप्रियता आणि प्रतिष्ठा लाभली याचे समाधान वाटते.

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे मराठी सांस्कृतिक जगतातले महापंडित. राजवाड्यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ हा विषय घेऊन संशोधनासाठी आपले उभे आयुष्य वेचले. त्यांनी संशोधनासाठी गोळा केलेल्या दुर्मिळ ऐतिहासिक व महाराष्ट्र विषयक महत्वाच्या सांस्कृतिक कागदपत्रांची संख्या पाच लाखांहून अधिक आहे. ह्या कागदपत्रांचे जतन व्हावे यासाठी त्यांचे डिजिटायझेशन करण्यासाठी धुळ्याची राजवाडे संशोधन मंदिराची मंडळी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करीत प्रतिष्ठान कडे आली. राजवाडे यांच्या समग्र साहित्याच्या पुनर्मुद्रणाचे फार मोठे काम धुळेकरांनी केले आहे. राजवाड्यांच्या कागदपत्रांपैकी एक लाख कागदपत्रांचे डिजिटायझेशन करून ती दुर्मिळ कागदपत्रे अभ्यासकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध करण्यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी प्रतिष्ठानने घेतली. दोन वर्षांपूर्वी ते काम पूर्ण झाले. त्यातूनच राजवाडे संशोधन मंदिराच्या मालकीचे vkrajwade.com संकेतस्थळ जन्माला आले हे सांगताना आनंद वाटतो.

आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान samagrarajwade.com संकेतस्थळाचे लोकार्पण करीत आहे. हा प्रकल्प इतिहासाचार्य राजवाडे यांचे समग्र साहित्य इंटरनेटवर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करण्याचा आहे. राजवाड्यांचे समग्र साहित्य सुमारे १२,००० पानांचे आहे, आणि ते फक्त मराठीत आहे. ह्या पानांतील मजकूर अभ्यासक आणि संशोधकांसाठी ‘सर्च’ पद्धतीने उपलब्ध होणे हे मराठी भाषेच्या दृष्टीने आम्हाला महत्वाचे वाटले. ती काळाची गरजही आहे. राजवाडे संशोधन मंदिर संस्थेच्या vkrajwade.com ह्या वेब प्रकल्पात आज राजवाड्यांची १ लाख दुर्मिळ कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. पण त्यात कोणताही ‘सर्चेबल’ मजकूर नाही. ती उणीव आणि गरज प्रतिष्ठानचे samagrarajwade.com हे संकेतस्थळ भरून काढणार आहे.

राजवाड्यांनी केलेले संशोधन आणि लेखन विविध प्रकारचे आहे. ते केवळ इतिहासाशी संबंधित नाही. त्यांचे समकालीन ज्ञानकोशकार डॉ.केतकर यांनी त्या संदर्भात जे लिहिले आहे ते फार महत्वाचे आहे. डॉ. केतकर लिहितात, “ राजवाड्यांच्या अनेक कामगिऱ्यांपैकी सर्वांत अधिक मोठी कोणती हे ठरवून राजवाड्यांचे वर्णन करावयाचे झाले तर त्यास भाषाशास्त्रज्ञ म्हणावे लागेल, आणि त्यांची गणना अत्यंत मोठ्या वैय्याकरण्यात करावी लागेल. हेमचंद्र आणि वररूचि यांचे प्रयत्न राजवाड्यांच्या प्रयत्नांच्या दृष्टीने काहीच नाहीत. इतिहासाचार्य किंवा इतिहाससंशोधक हे नाव राजवाड्यांस देण्यात आपण त्यांच्या कार्याचे अज्ञान दाखवू. त्यांच्या बौद्धिक कार्याचे गुरूलघुत्व माझ्या मते १) भाषाशास्त्रज्ञ, २) वैय्याकरण, ३) शब्दसंग्राहक, ४) इतिहाससंशोधक या अनुक्रमाने आहे.”

samagrarajwade.com संकेतस्थळाचा पसारा सुमारे १२,००० पानांचा आहे याचा उल्लेख वर आला आहे. त्या बारा हजार पानांचा युनिकोड मजकूर मुद्रित शोधन करून उभारायचा हे काम अजस्त्र आहे. प्रतिष्ठानच्या सर्व संकेतस्थळांचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम आजपर्यंत ज्यांनी अतिशय यशस्वीपणे केले त्या ‘पुजासॉफ्ट’ च्या माधव शिरवळकर यांच्याकडेच ह्या संकेतस्थळाची जबाबदारी आम्ही सोपवली आहे. शिरवळकर आणि त्यांच्या पुजासॉफ्टमधील सहकाऱ्यांनी प्रतिष्ठानसाठी आणखी एका चांगल्या मराठी संकेतस्थळाचे काम पूर्ण केले याचा मला आनंद वाटतो. 

samagrarajwade.com चे लोकार्पण झाले असे मी आनंदाने जाहीर करीत आहे.

शरद पवार
अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.

बाकी विकिले किंमत होनु २० यास खडून दिल्हे खत कर्दे महादजी बिन सुलतानजी पटेल जगदळे का। मसूर

मशाजी जमीन ठिकणे गैरमो। वडीलपण पानमान
चावर वसले तश्रीफ माहार नागर
१॥। कलम १

 

एणे प्रमाणे माहादजी पाटील याने खत केले असे सदरहू जमीन व वडीलपण याचा धणी पटेल माहादजी बिन सुलतानजी जगदळे का। मसूरकर असे आता सताजी बिन भिवजी चव्हाण पटेल मौजे कोणेगाऊ व मादजी बिन सुलतानजी जगदळे मसूरकर या हरदुजणानी समाजुगतीने असावे मादजी बिन सुलतानजी पटेल जगदळे मसूरकर यानी सदरहूचे हक खाऊनु वडीलपण दिवाण-चाकरी करावी सताजी बिन भिवजी याने एक चावराची हसली तकसीम खाऊनु सुखी असावे वडीलपण पानमान तश्रीफ माहार नागर सताजी भिवजीस अर्थे अर्थ समध नाही हा महजर सही

                                                                                     8 2

खासा रुद्राजीपण देसकुळकर्णी यासि दिल्हे जमीन चावर ॥१४ वगैरे मोइनी ठिकाणे २ दोनी त्या पासून फिराऊन मागोन घेतले त्यास घोडा एक बापूजी सलाबतखानियापासून घेऊन सारगा घोडा किमती होन १५० दीडसेयाचा कागदर रुद्राजीपताच्या दस्तुरे आलाहिदा असे

                                                                                      8 2

राजश्री कोनेर रगनाथ सरसुभेदार यास हरकी बा। होन १०० सेभर दिल्हेयाचे अलाहिदे जाब आहेती देसमुख व सरदेसमुख होन पनास व देसकुळकर्णी होन पचवीस या खेरीज गावकरीयास व परगणियाच्या पाटिलास तश्रिफा दिल्ह्या होन सेभर एणे प्रमाणे माहाजर जाहाला सताजी चव्हाण पाटील याकडे चावर एक राहिला तो हि चावर आणीक तीस होन घेऊन घेतला या खेरीज त्याचा पोटखर्च जाहाला असे एणे प्रमाणे माहाजर जाहाला सही

                                                                                        8 2