Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

मल्हार रामराव चिटणीसकृत शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र १७३२ त लिहिलें गेलें. शाहू छत्रपती यांनीं राज्याभिषेक १३७ प्रमोदीनाम संवत्सरे ज्येष्ठ बहुल षष्ठी भृगुवासरीं हें चरित्र तयार करण्यास आज्ञा केली, असें मल्हार रामराव बखरीच्या प्रारंभीं लिहितो. परंतु दुसरे शाहू छत्रपती इ. स. १८०८ च्या मे महिन्याच्या ४ थ्या तारखेस वारले. शके १७३० वैशाख शु॥ ९ बुधवार व चरित्र लिहिण्यास आज्ञा ८ जून १८१० सालीं शके १७३२ ज्येष्ठ शु॥ ६ शुक्रवार झाली हीं दोन विधानें विसंगत आहेत. मल्हार रामरावानें असलें हें विधान कसें केलें याचें आश्चर्य वाटतें व ह्या हलगर्जीपणावरून त्याच्या ऐतिहासिक प्रामाण्याविषयीं मन साशंक होतें. चरित्र केव्हां संपविलें तें बखरींत कोठें लिहिलेलें नाहीं. हें चरित्र ग्रांट् डफ् नें पाहिलें होतें. विष्णुपुराण, दंडनीति, राजधर्म, राजमयूख, रमलशास्त्र, वडिलार्जित कारकीर्दी, दिनचर्या, वगैरे पाहून चिटणिसांनीं आपली बखर सजविली. वडिलार्जित कारकीर्दी, दीनचर्या, शिवाजीनें पाठविलेलीं व शिवाजीला आलेलीं अस्सल पत्रें व नकला ह्यांचा उपयोग मल्हार रामरावानें केला होता. परंतु सामुग्रीच्या महत्त्वाच्या मानानें मल्हाररावानें शिवछत्रपतींचें चरित्र मोठें नामांकित लिहिलें आहे असें नाहीं. ह्याचें कारण, महाराष्ट्रांतील त्या वेळच्या विद्येचें मान होय. प्रमाण काय, अप्रमाण काय, मिळालेल्या साधनांचा यथास्थित, चोख व साद्यंत उपयोग कसा करून घ्यावा व कां करून घ्यावा वगैरे गोष्टींच्या अज्ञानामुळें, मल्हार रामरावाचें चरित्र जसें वठावें तसें वठलें नाहीं. ग्रांट डफ मल्हाररावाच्या चरित्राला Voluminous म्हणून विशेषण देतो. परंतु माझ्या मतें हें चरित्र बरेंच त्रोटक आहे. अशी जरी या चरित्राची योग्यता आहे, तरी ग्रांट डफच्या ग्रंथांतहि न सांपडणा-या अशा कांहीं गोष्टी मल्हाररावाच्या चरित्रांत सांपडतात. मल्हाररावांच्या जवळ असलेल्या कारकीर्दी, दिनचर्या व पत्रें बोरगांवीं त्यांच्या वंशजांजवळ थोडींबहुत आहेत. तीं तपासून त्यांचा उपयोग पुन्हां करून घेतला पाहिजे. सातारा जिल्ह्यांत राहणा-या छत्रपतींच्या अष्टप्रधानांकडून मल्हाररावानें बरींच पत्रें व टिपणें मिळविलीं होतीं, असें बोरगांव येथील चिटणिसांच्या तोंडून कळतें. मल्हार रामराव चिटणीसकृत चरित्राचा इतिहासकाराला बराच उपयोग होईल ह्यांत संशय नाहीं. निदान ह्या चरित्रापासून नाना प्रकारच्या शंका घेण्यास अवकाश होईल हें खास आहे.

शिवदिग्विजय नांवाची बडोदें येथें छापिलेली बखर शके १७४० त लिहिली आहे. ह्या बखरीच्या पहिल्या पृष्ठावरील शके १६४० बहुधान्यनाम संवत्सर व संवत् १७७५ विरोधीनाम संवत्सर ह्याबद्दल अनुक्रमें शके १७४० विरोधीनाम संवत्सर व संवत् १८७५ बहुधान्यनाम संवत्सर असें पाहिजे आहे. तिस-या पृष्ठावरील संवत् १७७५ व शके १६४० ह्याबद्दल संवत् १८७५ व शके १७४० असें पाहिजे आहे; चवथ्या पृष्ठावरील १८७० बद्दल संवत् १८७५ पाहिजे; व पांचव्या पृष्ठावरील शके १६४० बद्दल शके १७४० पाहिजे; म्हणजे कलिवर्ष ४९१९ त शक १७४० संवत् १८७५ व फसली १२२८ बरोबर येतात. प्रसिद्ध ज्योतिर्विद रा. शंकर बाळकृष्ण दीक्षित ह्यांनीं ही चूक, ही बखर छापिली त्या वेळीं दाखवून दिली होंती. ज्या अर्थी ही बखर शके १७४० त लिहिली आहे त्या अर्थी तिचें कर्तृत्व वरपांगी तरी खंडो बल्लाळ चिटणीस यांजकडे जात नाहीं हें उघड आहे. चिटणीसांच्या बडोदें येथील घराण्यापैकीं कोणी तरी ही बखर लिहिली असावी असा अंदाज आहे, किंवा लिहिली असें म्हणण्याच्या ऐवजीं उतरून किंवा नक्कल करून किंवा जुळवाजुळव करून घेतली असेंहि म्हटलें तरी चालण्यासारखें आहे कां कीं, ह्या बखरींतील भाषा रा. नंदुरबारकर व रा. दांडेकर म्हणतात त्याप्रमाणें, शके १७४० तल्या सारखी बिलकुल दिसत नसून तिजवर अठराव्या शतकाच्या पूर्वार्धाची झांक मारीत आहे. मल्हार रामराव चिटणीस ह्यांनीं शके १७३२ त लिहिलेल्या शिवाजीच्या चरित्राची भाषा ह्या बखरींहून अत्यंत भिन्न आहे. इतकेंच नव्हे, तर शके १६८५ त लिहिलेल्या भाऊसाहेबांच्या बखरींतल्या पेक्षांहि ह्या बखरीची भाषा जुनाट दिसते. ह्यावरून असा तर्क काढण्यास हरकत दिसत नाहीं कीं, यद्यपि ही बखर शके १७४० त आहे त्या रूपानें प्रसिद्ध केली गेली तत्रापि, हिच्यांतील मजकूर पूर्वींच्या एखाद्या जुन्या बखरींतून घेतला असावा. बारनिशी, दाखले, पत्रें व जुने ग्रंथ ह्यांच्या आधारानें आपण लिहीत आहों, असें हा बखरनवीस आपल्या बखरीच्या १४८ व्या, १८८ व्या व ३८१ व्या पृष्ठांवर वारंवार म्हणतो त्यावरून वरील विधानाला दुजोरा येतो. ३८१ व्या पृष्ठावर संतावजयाचा या बखरनविसानें उल्लेख केला आहे त्यावरून महीपतीच्या कालानंतर ही बखर लिहिली गेली अशी शंका कोणी घेतल्यास, तिनें वरील विधानाला प्रत्यवाय येत नाहीं. बखर आहे, ह्या रूपानें १७४० त प्रसिद्ध झाली, परंतु आंतील बहुतेक मजकुर जशाचा तसाच किंवा फेरबदल करून एखाद्या जुन्या बखरीवरून घेतला असावा, व जुन्या बखरीच्या नंतरच्या कालांत झालेल्या ग्रंथाचा व स्थलांचा क्वचित् प्रसंगीं उल्लेख केला असावा. ही बखर ग्रांट डफला मिळालेली नव्हती. हिच्यांत डफच्या ग्रंथांत नाहीं अशी माहिती बरीच सांपडते.

आंग्रे याचा तह सालगुदस्त जाहाला. त्यांत कांही मुलूख आंग्र्यानें शाहूमहाराजास दिला. त्यांत आंग्र्याबरोबर कांही मुलूख शिद्यानें घेतला होता. तो शाहूकडे गेला. यामुळे आंग्र्याशी शिद्दी लढूं लागला. तेव्हां आंग्र्याचे कुमकेस बाळाजी विश्वनाथ जाऊन सिद्याशीं तह छ ५ सफर (३० जानेवारी १७१५) रोजी झाला. त्यांत असें ठरलें की, मामलत तळें व गोरेगांव, गोवेळ व निजामपूर इतके महालांवर आंग्रे यासी १००० रुपये मामल तळेपैकी व शाहूकडे मामले तळेपैकीं ८००, गोरेगावपैकीं ६००, गोवळेपैकीं १०००, तर्फ निजामपूरपैकी १७५, असे शाहूकडे २५७५ रुपये देणें. येणेप्रमाणें एकंदर ३५७५ रुपये मराठ्यांत पेस्तर सालपासून पोंचतील; व तर्फ नागोठणें व अष्टमी व पाली आश्रेधार पेटा व अंतोर्णे या महालांत दुतर्फे पाहणीदार फिरत जाऊन वसूल सुदामत निमेनिम होईल, वगैरे मजकूर तहांत आहे.

बाळाजी महादेव याजकडे फडणिशी दिली. हरि महादेव जेजूर मुक्कामीं मेले. मुलकास कौल दिला. अधिकभाद्रपद साबान महिन्यांत आला होता.

सु ॥ सीत अशर मया व अलफ, सन ११२५ फसली,
अव्वल साल छ ४ जमादिलाखर, २८ मे १७१५,
ज्येष्ठ शुध्द ६ शके १६३७.

परसोजी भोसले मयत झाले. त्यांचा सरंजाम व सेनासाहेब किताब त्यांचे पुत्र कान्होजी यांस देऊन कटक व वऱ्हाड व हिंदुस्थानपैकीं कांहीं भाग, महाल गोंडवण असा सुभा सांगितला. सेनापतिपद आपल्यास मिळालें नाही ह्मणून, हैबतराव निंबाळकर यांनी महाराजाशी कलह करून मोगलांकडे मिळून गोदावरीतीरी राहिले. पुढें त्यांचे सख्य झाले नाहीं. या वेळेस पुणें प्रांताचा अंमल मोगलांकडून बाजी कदम मुख्य अधिकारी होता. त्यानें निंबाळकरास उपद्रव करणार नाहीं, असे पेशवे याजकडून कबूल करवून नंतर पेशवे याचा पक्ष धरला. तेव्हा सर्व अमल पेशवे याचा बसला. हैबतराव निंबाळकर मेले. त्याचें पद सरलष्करचें आपल्यास मिळावें असें त्याचा पुत्र रंभाजी याचें ह्मणणे होतें. ते शाहू महाराज याणी कबूल केले नाहीं. सबब शाहूचा पक्ष टाकून मोगलाईत गेला. तिकडे रावरंभाजी असा किताब मिळून, मोठी योग्यता वाढून सरंजाम वगैरे मिळाला. तो अद्याप याचे वंशिकांकडे चालत आहे. सरलष्करपद निंबाळकराचें दावलजी सोमवंशी यास करार केले. पुरंदर किल्ला पेशवे यास अर्बा अशरांत पंतसचिव याणीं दिल्हा. त्यावर अंमल पेशवे यांचा अंबाजी त्र्यंबक पुरंधरे याणी बसवून सासवडास आले.

सु ॥ सवा अशय मया व अलफ, सन ११२६ फसली,
अव्वल साल छ १५ जमादिलाखर, २८ मे
१७१६, ज्येष्ठ वद्य १ शके १६३८.

६+

६+१

सभासदी बखरीच्या सर्व प्रतींत १६१६ असा एकच पाठ असल्यामुळें, सभासद यांनीं आपल्या बखरीचा प्रारंभ शके १६१६ त केला व तिची समाप्ति शके १६१९ ईश्वरनामसंवत्सरी केली, अशी संगती जुळवावी लागतै. सभासदांनी बखर लिहिली. त्या वेळीं छत्रपतीच्या खालोखाल महाराष्ट्रांतील कर्ते पुरुष म्हटले म्हणजे प्रल्हाद निराजी, रामचंद्र नीलकंठ, संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे, व धनाजी जाधव, हे पांच गृहस्थ होते. शिवाजी महाराजांच्या तोंडीं, मरण समयीं, मोडलें राज्य सांवरणा-या ह्या पांच गृहस्थांचीं नांवें सभासदांनीं दिलीं आहेत. त्याचाच अनुवाद, चिटणिसांनीं आपल्या सप्तप्रकरणात्मक चरित्रांत प्रल्हाद निराजी ह्या नांवांबद्दल निराजी रावजी असें चुकीचें नांव घालून व बहिरजी घोरपडे हें नांव वगळून केला आहे. रायरी येथील बखरींत हीं पांच नांवें नाहींत. तसेंच शिवदिग्विजयांत ह्या पांच नांवांचा मुळींच उल्लेख नाहीं. तेव्हां शिवाजी महाराजांच्या तोंडीं, ह्या पांच गृहस्थांना बरें वाटण्याकरितां किंवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून ह्या पांच गृहस्थांची कर्तव्यतत्परता उत्तेजित करण्याकरितां, सभासदांनीं हीं नांवे घातलीं असावीं असें वाटतें. संभाजीच्या हातून राज्यकारभार निभणार नाहीं अशा मजकुराचीं वाक्यें मात्र सर्व बखरींतून सांपडतात, त्या अर्थी वरील तर्काला बळकटी येते. सभासदांना शिवाजी महाराजांच्या वेळचीं राजकारणें स्वानुभवानें माहीत असल्यामुळें त्यांची बखर, काव्येतिहाससंग्रहकार म्हणतात त्याप्रमाणें, बहुत विश्वसनीय आहे. सभासदी बखरींत उणीव एवढीच आहे कीं, शिवाजीच्या पराक्रमाचें वर्णन त्यांनीं अत्यंत त्रोटक व स्थूल मानानें केलेलें आहे. तसेंच १५८१ मार्गशीर्षांच्या आधींची माहिती म्हणजे शिवाजीच्या पूर्व वयांतील पराक्रमाचें वर्णन सभासदांनीं फारच थोडें म्हणजे बहुतेक मुळींच दिलें नाहीं. शिवाजीचा इतिहास लिहिणा-याला सभासदी बखरीचा उपयोग फार होईल.

प्रो. फोरेस्ट यांनीं छापिलेली इंग्रजी तर्जुमा केलेली रायरी येथील बखर कोणीं लिहिली तें समजत नाहीं. कावरी येथील पाटलाच्या विनंतीवरून रायरी येथील कुळकर्णी माणको भिवराव यानें गडावरील दप्तरखान्यांत असलेल्या बखरीची नक्कल करून घेतली, म्हणून ह्या बखरीच्या शेवटी लिहिलें आहे. ह्या बखरींत शिवाजीच्या राज्याभिषेकानंतरची माहिती मुळींच नाहीं. इतर वर्षांची माहिती कोठं कोठें बरी व ब-याच ठिकाणीं अपूर्ती अशी दिली आहे. ही बखर छोटेखानी असून कांहीं कांहीं ठिकाणीं विशेषनामाचे खरे उच्चार लिहिलेले नाहींत. मूळ मराठींत बखरीचें स्वारस्य जें असेल तें इंग्रजी भाषांतरांत राहिलेलें नाहीं. बायबलांतील यहुदी लोकांच्या कथांप्रमाणें ह्या बखरींतील कथाभाग साधा व चमत्कारिक भासतो म्हणून प्रो. फारेस्ट प्रस्तावनेंत म्हणतात त्याचें कारण इंग्रजींत भाषांतर करणा-याची इच्छा होय. मूळ बखरींतील भाषा इतर बखरीप्रमाणेंच साधी, ठसकेदार, संदिग्ध व आखुडती असली पाहिजे. कारण ह्या बखरींतील मजकूर इतर बखरींतील मजकुरांच्या सारखाच बहुतेक आहे. ह्या बखरीचाहि उपयोग थोडाबहुत होण्यासारखा आहे.

दलपतरायाची बखर एकपक्षी म्हणजे शिवाजीच्या विरुद्ध लिहिलेली आहे. प्रतिपक्षाच्या गोटांतील मनुष्यानें ही बखर लिहिली असल्यामुळें, शिवाजीसंबंधीं विरुद्ध पक्षाचें मत हिच्या द्वारें कळेल व तारखांचा व वर्षांचाहि मेळ बसविण्यास हिचा उपयोग होईल.

श्रीशिवाजी-प्रताप ह्या कृत्रिम नांवाची जी बखर बडोदें येथें १८१७ त छापिली गेली तिची किंमत उपयोगाच्या दृष्टीनें फारच थोडी आहे. ही बखर बहुत अपूर्ण असून शिवाजीच्या बालपणाचीहि हकीकत हींत दिली आहे असें नाहीं. दुस-या बखरींत किंवा कैफियतींत ह्या बखरींतल्या पेक्षांहि जास्त माहिती मिळण्यासारखी आहे. तरी शिवाजी संबंधी कोणतेंहि चिटोरें विचारार्ह असणारच ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन, ह्या बखरीचा आदर केला पाहिजे.

(१) सभासदाची बखर, (२) चित्रगुप्ताची बखर, (३) चिटणीसांची बखर, (४) शिवदिग्विजय, (५) शिवप्रताप, (६) रायरी येथील बखर, व (७) दलपतरायाची बखर, ह्या सात बखरींपैकी चित्रगुप्ताची बखर सभासदी बखरीचा अक्षरशः अनुवाद आहे. सभासदी बखरीचें मूळ येऊन त्यांत चित्रगुप्तानें स्वतः रचिलेल्या कविता अधूनमधून घुसडून दिल्या आहेत. व सभासदी बखरीतील एका वाक्याच्या ऐवजींच त्याच अर्थांचीं तीन चार वाक्यें बनविलेली आहेत. रघुनाथ यादव चित्रगुप्त याचा चुलत आजा काकाजी प्रभू हा होता. काकाजी प्रभू म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस (ऊर्फ) चित्रे हा होय. बाळाजी आवजीस संभाजीनें विनापराधें ठार मारिलें हें प्रसिद्ध आहे. बाळाजी आवजीस चिमणाजी व शामजी हे दोन भाऊ होते. ह्या दोघांपैकीं कोणा एकाचा वंशज रघुनाथ यादव असावा हें निश्चित आहे. रघुनाथ यादवाला पुराणिकाच्या थाटावर लिहिण्याची संवय असल्याकारणानें त्यानें आपलें आडनांव चित्रे असें साधे न लावतां पौराणिक थाटावर चित्रगुप्त असें लाविलें आहे. यमाच्या दरबारीं जसा साक्षात् चित्रगुप्त चिटणिशी करी, तशी रघुनाथ यादव कोल्हापूरच्या दरबारीं चित्रगुप्ती किंवा चिटणिशी करी. थोरल्या राजाराम महाराजांचा पुत्र व प्रसिद्ध जिजाबाईचा नवरा कोल्हापूर येथील जो संभाजी राजा त्याच्या दरबारीं आपल्या वयाच्या बाराव्या किंवा तेराव्या वर्षांपासून पुढें चाळीस वर्षें रघुनाथ यादवानें चिटणिशी केली. १६८२ त संभाजी राजे वारले. ह्यावरून असें निष्पन्न होतें कीं, रघुनाथ यादव १६३० च्या सुमारास जन्मला असावा व त्यानें चिटणिशी १६४२ च्या सुमारास करण्यास सुरुवात केली असावी. संभाजीराजे वारल्यावर रघुनाथ यादवाची चिटणिशी दुस-या कोणीं बळकाविली असें दिसतें. तेव्हां चिटणीस मजकुरांच्या कपाळीं देशोदेशीं भणगतीनें हिंडणें प्राप्त झालें. हिंडतां हिंडतां चिकोडीस व मनोली ह्या तालुक्यांत राहून शाहूराजाच्या प्रांतांत दंगा करणा-या यशवंतराव शिंद्याचा रघुनाथाला आश्रय मिळाला व त्याच्या पदरी असतांना त्यानें ही बखर लिहिली. रघुनाथ यादवाला परंपरेनें ऐकिलेली शिवाजी महाराजांची व त्यांच्या वेळच्या कर्त्या पुरुषांची माहिती सडकून होती. सभासदी बखरींत ज्या पुरुषांची आडनांवें दिलीं नाहींत, त्यांची आडनांवें चित्रगुप्त लिहिण्याच्या झोकांत सहजासहजी देऊन जातो. व कधीं कधी वर्णनांत सभासदी बखरींत जीं नांवें मुळींच नाहींत तीं हा नव्यानेंच देतो, व आपण वर्णन करीत आहों तें कथानक आपल्याला करतलामकलवत् अवगत आहे, असें मोठ्या डौलानेंच दाखवितो. सारांश, रघुनाथ यादव माहितगार मनुष्य असल्यामुळें शिवाजीचा इतिहास लिहिणा-याला त्याचें मत वेळोवेळीं घेणें जरूर पडेल. फुल्लचरी, कलकत्ता वगैरें नांवें रघुनाथ यादवानें आपल्या कवितेंत ज्या अर्थी आणिलीं आहेत व शंभू छत्रपतीच्या पुढें आपण ही बखर लिहिली असें ज्या अर्थी तो स्वतःच लिहितो त्या अर्थीं ही बखर १६८२ पासून १६९२ पर्यंतच्या मधील कोणत्या तरी एका वर्षी लिहिली गेली असावी हें स्पष्ट आहे.

सभासदी बखर कृष्णाजी अनंत सभासद ह्यांनी रचिली. कृष्णाजी अनंत व त्यांचे वंशज नारो कृष्ण यास ज्याअर्थी काव्येतिहाससंग्रहकारांनीं पंत ह्या संज्ञेनें उल्लेखिलें आहे, त्या अर्थी सभासद हे देशस्थ ब्राह्मण असावे असे वरकरणी दिसतें. ह्यांच्या वंशजाकडे कोल्हापूर येथील चिटणीसाकडील काम होतें असेंहि संग्रहकार म्हणतात. परंतु चिटणिशी कोणा तरी प्रभू गृहस्थाकडे असली पाहिजे ही गोष्ट लक्ष्यांत घेतली म्हणजे चिटणीसांच्या दप्तरांतील सभासद हे एक सामान्य पिढीजात कारकून असावे असा तर्क करणें जरूर पडतें. खुद्द कृष्णाजी अनंत हे शिवाजीमहाराजांपासून राजाराम महाराजांच्या अखेरीपर्यंत छत्रपतींच्या दरबारीं सभासद होते. सभासदांचा दर्जा काय व कामगिरी कोणती हें जरी कोठें स्पष्ट किंवा अस्पष्ट लिहिलेलें आढळत नाहीं, तरी सभासद म्हणजे राजदरबारी सभेंत बसून सल्लामसलत देणारा शिष्ट पुरुष असावा असा अंदाज आहे. हा जर अंदाज खरा असेल तर अष्ट प्रधानांखेरीज सल्लामसलत देणारे असे छत्रपतींच्या दरबारीं स्वतंत्र सभासदमंडळ असे, असा तर्क करण्यास जागा होते. कृष्णाजी अनंत सभासद यांनीं राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून चंदी येथें आपली बखर ईश्वरनामसंवत्सरीं म्हणजे शके १६१९ त लिहिली.

ह्या पहिल्या वर्गांतील बखरींच्या अगदीं उलट वर्गांतील बखरी म्हणजे कर्णोपकर्णी ऐकिलेल्या वृत्तांताची बाडें होत. उदाहरणार्थ- (१) सोहनीकृत पेशव्यांच्या बखरीचा बराच भाग, (२) दाभाड्यांची हकीकत, (३) गायकवाडांची हकीकत, (४) ब्रह्मेंद्रस्वामीचें चरित्र, (५) गोविंदपंत बुंदेल्यांची कैफियत, व इतर कैफियत वगैरे. ह्या वर्गांतील बाडांतून कोणत्याहि प्रसंगाची सालवार हकीकत किंवा कोणत्याहि प्रसंगाचें साद्यंत व मुद्देसूद वर्णन प्रायः दिलेलें नसतें. कारण, ते ते प्रसंग होऊन बराच काल गेल्यावर, म्हणजे निदान शेपन्नास वर्षे लोटल्यानंतर कोण्या अधिका-याच्या सांगण्यावरून किंवा कोण्या दहा पांच लोकांच्या विनंतीवरून, त्या त्या लेखकांनीं हीं बाडें सजविलेलीं आहेत. वृद्ध लोकांच्या माहितीवरून किंवा स्वतःच्या स्मृतीवरून किंवा एखाददुस-या कागदावर भिस्त ठेवून हीं बाडें लिहिलेलीं आहेत. तशांत, हीं बाडें लिहिणा-यांना ऐतिहासिक सत्यासत्याचा निर्णय करून लिहिण्याचा अभ्यास नसल्यामुळें, मिळेल ती माहिती व सुचेल ती क्लृप्ति खरी धरून चालण्याचा त्यांचा भोळा परिपाठ आहे. लहर लागली म्हणजे किंवा बहुशः माहिती नसली म्हणजे सालेंची सालें खाण्याची ह्या बखरनविसांना संवय आहे. अत्यंत जुन्या काळची माहिती किंवा शंभर सवाशें वर्षांच्या पूर्वींची माहिती द्यावयाची असतांना ह्या बखरनविसांनीं दाखविलेला भोळा अज्ञपणा एक वेळ क्षम्य झाला असता. वास्तविक पाहिलें तर, ह्या बखरनविसांना किंवा कैफियती लिहिणा-यांना आपल्या वेळची किंवा पांच पंचवीस वर्षें आधींची माहिती नीट, मुद्देसूद व विश्वसनीय अशी देतां आली असती हें स्पष्ट आहे. परंतु ऐतिहासिक माहितीची जुळवाजुळव करण्याचें वळण ह्या लोकांना नसल्यामुळें त्यांच्या हातून हें विश्वसनीय इतिहास लिहून ठेवण्याचें काम अंशतः देखील झालें नाही. ह्या बखरींचा उपयोग इतिहास लिहिण्याच्या कामीं अगदींच होणार नाहीं असें नाहीं. जेथें इतर माहिती मुळींच मिळण्यासारखी नाहीं तेथें ह्यांचेंच लिहिणें आधारभूत धरणें प्राप्त आहे. ह्या दोन वर्गांखेरीज बखरींचा आणखी एक तिसरा वर्ग आहे. ह्या तिस-या वर्गांतील बखरींत त्यांच्या पूर्वीच्या जुन्या बखरींतील व टिपणांतील माहिती जशीच्या तशीच किंवा कांहीं फेरफार करून इष्ट तेवढी दिलेली असते. ह्या वर्गांत खालील बखरी मोडतात - (१) चिटणीसकृत शिवछत्रपतीचें सप्तप्रकरणात्मक चरित्र, (२) शिवदिग्विजय, (३) शिवप्रताप, (४) प्रो. फारेस्ट ह्यांनी छापिलेलें रायरी येथील बखरीचें इंग्रजी भाषांतर व (५) गोविंदराव चिटणीसांनीं लिहिलेली बखर. येणेंप्रमाणें बखरींचे तीन वर्ग आहेत. ह्या सर्व बखरींच्या प्रामाण्याची इयत्ता ठरविण्याचा माझा हेतु आहे. पैकीं पहिल्या दोन वर्गांतील बखरींची परीक्षा करण्याचें काम पुढें केव्हां तरी करण्याचें आश्वासन देऊन, तिस-या वर्गांतील बखरींची परीक्षा प्रस्तुत स्थळी करतों. ह्या तिस-या वर्गांतील बखरींची परीक्षा प्रथम करण्याचें कारण असें कीं, ह्या बखरी मराठ्यांच्या इतिहासाच्या आद्य कालाला अनुलक्षून असल्यामुळें ह्यांनाच अग्रमान देणें रास्त आहे. शिवाय ह्या बखरींच्या प्रामाण्यासंबंधानें जितकी चर्चा व्हावयाला पाहिजे तितकी झाली नसल्यामुळें त्यांची खरी योग्यता जशी ठरावी तशी अद्याप ठरलीं नाहीं व त्यांचा जितका उपयोग करून घ्यावा तितका अद्यापपर्यंत कोणी करून घेतला नाहीं. परीक्षेच्या अंती ह्या बखरींच्या महत्त्वाची इयत्ता ठरली जाईल. ह्या परीक्षेच्या संबंधानें सभासदी बखर, चिटणीशी बखर व दलपतरायाची बखर ह्या तीन बखरींचा उल्लेख करणें अवश्य होणार आहे.

(३) "शके १७०४ पर्यंतची पेशव्यांची बखर" हें या ग्रंथांतील दुसरें प्रकरण आहे. ही बखर सवाई माधवरावाकरितां नानाफडणिसांनीं चिटणिसांकडील बाळाजी गणेश ह्या कारकुनाकडून लिहविली. ही बखर, एक दोन क्षुल्लक अपवाद काढून टाकिले असतां, येथून तेथून पूर्णपणें विश्वसनीय आहे. सवाई माधवराव आठ वर्षांचे असतांना त्यांच्याकरितां ही बखर लिहिली असल्यामुळें, अर्थातच् ही अत्यंत त्रोटक आहे. परंतु कालाचा किंवा स्थलाचा किंवा प्रसंगाचा विपर्यास झालेला या बखरींत क्वचित् सांपडेल, किंबहुना सांपडणारच नाहीं. ह्या बखरीच्या एकंदर पांच प्रती मिळाल्याः- पुणें येथील ताई साठी इच्या वंशजांकडून एक, काव्येतिहाससंग्रहकारांच्या दप्तरांतील दोन व वसई येथील दिवेकर यांजकडून दोन. पैकीं साठ्यांची बखर व दिवेकरांची एक बखर पूर्ण आहेत. बाकीच्या तिन्ही बखरी अपूर्णं आहेत. ही बखर शके १७०४ शुभकृत् संवत्सरीं लिहिली. हीत सवाई माधवरावाच्या लग्नाचा ताजा उल्लेख आहे.
ह्या बखरींतील बरेच प्रसंग बखरनविसानें स्वतः पाहिले असल्यामुळें व ज्यांनीं ते प्रसंग स्वतः पाहिले त्यांच्याकरितां व त्यांच्या आज्ञेवरून ही सजविली असल्यामुळें, ही बखर विश्वासपात्र आहे. अधून मधून पेशव्यांची स्तुति केलेली आहे, ती देखील मर्यादित असून, तींत पक्षपातात्मक किंवा अप्रस्तुत असें एकहि वाक्य आढळावयाचें नाहीं. ही बखर त्रोटक नसून विस्तृत असती म्हणजे इतिहासाचें फारच हित झालें असते. महाराष्ट्रांत आजपर्यंत जेवढ्या म्हणून बखरी छापून प्रसिद्ध झाल्या आहेत, त्या सर्वांत बिनचुकपणाबद्दल हिला अग्रमान देणें रास्त आहे. विश्वासरावाच्या स्वारीसंबंधीं थोडीशी गफलत झालेली दिसते, ती शके १६७२ पासून १६८३ पर्यंतच्या मराठ्यांच्या इतिहासांतील शेंकडों प्रसंगांचें एक दोन पृष्ठांत वर्णन देण्याच्या घाईनें झालेली आहे हें वाचकांच्या लक्षांत येईल.

ह्या बखरीवरून असें अनुमान करितां येतें की, विश्वसनीय इतिहास लिहिण्याचा प्रघात अठराव्या शतकांत महाराष्ट्रांत होता. तसेंच समकालीन बखरनविसांनीं लिहिलेले वृत्तांत स्वाभाविकपणेंच विश्वसनीय असतात असेंहि विधान करण्यास ह्या बखरीच्या आधारानें अवकाश होतो. तेव्हां आपल्याला माहीत असलेल्या बखरींपैकीं जेवढ्या म्हणून बखरी समकालीन बखरनविसांनीं लिहिल्या आहेत, तेवढ्या ब-याच विश्वसनीय असाव्या किंवा असल्या पाहिजेत हें उघड आहे. आजपर्यंत छापून प्रसिद्ध झालेल्या बखरींपैकी समकालीन बखरनविसांनीं लिहिलेल्या बखरी म्हटल्या म्हणजे (१) सभासदविरचित शिवछत्रपतीचें चरित्र, (२) चित्रगुप्तविरचित शिवाजीमहाराजांची बखर, (३) भाऊसाहेबांची बखर, (४) भाऊसाहेबांची कैफियत, (५) खर्ड्याच्या स्वारीची बखर, व (६) मीं ही आतां छापलेली बखर. ह्या सहा बखरींत समकालीन प्रसंगांचें समकालीन लेखकांनीं विस्तृत किंवा त्रोटक असें वर्णन केलें आहे. विश्वसनीयत्वाच्या दृष्टीनें समकालीन बखरींचा हा पहिला वर्ग होय. ह्या बखरी ब-याच विश्वसनीय असतात असें जरी म्हटलें आहे, तरी त्यांच्या विश्वसनीयत्वाला कांहीं मर्यादा ही आहेच. अस्सल कागदपत्र मिळाले असतां ह्यांतील खुलासेवार मजकुरांत बरीच तफावत दिसून येते असें आढळून आलेलें आहे. तरी अस्सल कागदपत्रांच्या अभावीं ह्या बखरीवर बराच विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं. चित्रगुप्ताची बखर सभासदी बखरीचाच अक्षरशः अनुवाद असल्यामुळें तिचा ह्या वर्गांत समावेश केला आहे.

अथ नाशसंरक्षणशिक्षा.
अहंकारबुद्ध्या न जानाति रूपं 
न पात्रेषु दानं कुपात्रेषु सख्यम् ॥

अशिक्षोवरश्चात्ममालिन्यलिप्तो
व्यवस्थाविशून्यो गतः शेषलाभः ॥३॥
इति नाशसंरक्षणशिक्षा.

साठ्यांच्या व सातारा येथील प्रतींत ह्या श्लोकांचीं जागा सोडलेली आहे. तेंव्हा हे श्लोक मूळ प्रतींत असले पाहिजेत हें उघड आहे. हा ग्रंथ शके १७११ सौम्यनाम संवत्सरे माघ शुद्ध पंचमीला सवाई माधवरावाकरितां लिहिला. त्या वेळीं सवाई माधवरावाचें वय सोळा वर्षांचें होतें. गोपाळकृष्णाच्या कुळांत गोविंदकृष्णाच्या मनांत ह्या ग्रंथाची प्रथम कल्पना आली. तीवरून नारायणाने हा ग्रंथ निर्मिला, असें ग्रंथाच्या नांवावरून, उपोद्घातावरून व वरच्या श्लोकावरून दिसतें. हा ग्रंथ शिक्षात्मक आहे, शास्त्रात्मक नाहीं. शास्त्रात्मक ग्रंथांत कोणत्याहि विषयाची उपपत्ति दिलेली असते. शिक्षात्मक ग्रंथांत व्यवहारांत वागावें कसें ह्याविषयीं आज्ञा सांगितलेल्या असतात. नीतिशास्त्रांत नीतीच्या मूल तत्त्वांची उपपत्ति दिलेली असते. नीतिशिक्षेंत व्यवहारांत वर्तन करण्याच्या आज्ञा सांगितलेल्या असतात. नारायणव्यवहारशिक्षा हा ग्रंथ शिक्षात्मक आहे हें त्याच्या नांवावरूनच ठरतें. ह्यांत व्यवहारोपयोगी अनुभवजन्य हितोपदेश सांगितला आहे. लाभ, पालन व नाश-संरक्षण असे या ग्रंथाचे तीन भाग केले असून प्रत्येक भागाचे गुण दिले आहेत. हे गुण अगदींच अभिनवनिर्मित आहेत असें नाहीं. नारदनीति, कणिकनीति यक्षप्रश्न, पंचतंत्र, हितोपदेश वगैरे शिक्षाग्रंथातून बरींच वचनें घेतलेलीं वाचकांच्या दृष्टीस पडतील. परंतु ह्या ग्रंथाचा मुख्य उगम हेमाडपंताच्या नांवावर विकली जाणारी जी एक बखर प्रसिद्ध आहे ती होय. ह्या ग्रंथांत व हेमाडपंताच्या बखरींत भेद असा आहे कीं, हेमाडपंती बखरीपेक्षां ही शिक्षा व्यवस्थित आहे. नारायणशिक्षेंत लाभाचीं कलमें ३५, पालनाचें कलम १ व नाशसंरक्षणाचें कलम १, अशीं एकंदर ३७ कलमें आहेत. लाभाच्या ३५ कलमांचे १९६ गुण, पालनाच्या एक कलमाचे १२ गुण, व नाशसंरक्षणाच्या १ कलमाचे १० गुण सांगितले आहेत. गुण म्हणजे ध्यानांत ठेवण्यासारखीं वाक्यें अथवा म्हणी. ह्या म्हणींपैकीं कांहीं म्हणी नारायणशिक्षेच्या आधीं झालेल्या ब-याच ग्रंथांत सांपडतात. उदाहरणार्थ पालनाच्या कलमांतील नववा गुण 'महाराची खिचडी उतरावी, आपली चढवावी' ही म्हण भाऊसाहेबांच्या बखरींत आली आहे. भाऊसाहेबांच्या बखरींत 'महाराची' ह्याबद्दल 'महाराजाची' असें चुकून पडलें आहे. तसेंच बडोदे येथें छापलेल्या 'शिवप्रताप' नामक बखरीच्या चोविसाव्या पृष्ठावर 'परेंगित जाणावें', 'मर्म लोपवावें' वगैरे म्हणी आल्या आहेत. ह्यावरून असें दिसतें कीं पूर्वींच्या बखरींतील व लोकव्यवहारांतील ब-याच म्हणी नारायणशिक्षेंत गोविल्या असाव्या. हा ग्रंथ नानाफडणिसानें सवाई माधवरावाकरितां शके १७११ त लिहविला. ह्यांतील कलमांचा अर्थ गुरुमुखानें सवाईमाधवराव प्रत्यहीं प्रातःकाळीं ऐकत असत अशी आख्यायिका आहे. ह्या ग्रंथाची एक प्रत मीं ग्वालेरीस पाहिली. ह्यावरून असे दिसतें कीं हा ग्रंथ महाराष्ट्रमंडळांत त्या वेळीं बराच प्रचलित होता.

प्रस्तावना 

१ ह्या ग्रंथांत खालील प्रकरणें छापिलीं आहेतः-

(१) नारायणव्यवहारशिक्षा.
(२) सवाई माधवराव आठ वर्षांचे असतांना त्यांच्याकरितां तयार केलेली पेशव्यांची बखर.
(३) पेशवाईच्या अखेरची अखबार.
(४) रमास्वयंवर.
(५) शक १७३८ सालची हकीकत.
(६) पेशव्यांची वंशावळ.

२ नारायणव्यवहारशिक्षेच्या मला चार लेखी प्रती मिळाल्याः- सवाई माधवरावाची आजी ताईसाठी हिच्या वंशजांच्या दप्तरांतून दोन, सातारा येथील सुभेदार जोशी यांजकडून एक, व पुणें येथील भाऊसाहेब बिनीवाले यांजकडून एक. पैकीं पहिल्या तीन एकाच मूळाच्या निरनिराळ्या प्रती आहेत. बिनीवाल्यांच्या प्रतींत मात्र खालील श्लोक जास्त आहेत.

श्लोक

गोपालकृष्णकृपया व्यवहारशिक्षा
गोविंदकृष्णमनसोत्थितधर्मदीक्षा॥
यो वै तया चरति जिष्णुरिवात्र लोके
हर्म्ये तु तस्य कमलासनकीर्तिलाभः ॥१॥
इति लाभशिक्षा.

अथ पालनशिक्षा.
योग्यायोग्यविचारवस्तुविषये संसाररूपज्ञतां
स्थैर्यास्थैर्यविवेकमंत्ररचनासंचारकालज्ञतां ॥
साध्यासाध्यबलाबलेषु कुशलं शिक्षागुणज्ञप्रभो
लाभस्यप्रतिपालनं कुरु सदा लाभाच्च भाग्योदयः ॥२॥
इति पालनशिक्षा.

प्रतिनिधीस महाराजाकडून प्रतिनिधिपद दिल्याबद्दल राजाची सनद झाली ती अशी :- स्वतिश्री राज्याभिषेक शक ४० विजयनाम संवत्सरे वैशाख शु. ५ गुरुवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री परशराम त्र्यंबक प्रतिनिधी यांसी आज्ञा केली ऐंसीजे:- तुह्मी स्वामी सन्निध विनंति केली ती तीर्थस्वरूप महाराज राजाराम काकासाहेब कैलासवासी यांचे कारकीर्दीत राज्यांत बहुत श्रमसाहस केले. यास्तव प्रतिनिधिपद अजरामरामत वतनी आपणास करून दिल्हें आहे ते पत्र पाहून नवीन पत्र करून द्यावें ह्मणोन. त्याजवरून ते पत्र पाहून मनास आणितां पूर्वी राज्यावर औरंगझेब बादशाहा दक्षिणेंत येऊन सातारा, परळी व विशाळगड, पन्हाळा या किल्ल्यांस वेढा घालून बसले. ते समयीं तुह्मी झुंझण्याची शर्त केली. आणि पुन्हा बादशाहा माघारा फिरतांच श्रम जातीनिशी करून किल्ले घेतले. चंदीस महाराज गेले होते. तेथे धन्याचे साहित्याची सीमा केली. तेथून साहेब देशीं आल्यावर राज्य स्वाधीन केले आणि आज्ञेप्रमाणें वर्तून एकनिष्ठपणें सेवा केली. अशी महत्कार्ये करून राज्यरक्षण केलें. यास्तव तुह्मावर कृपाळू होऊन प्रतिनिधीचें पद तुह्मास वंशपरंपरेने वतीन करून दिल्हे असे. भोसले यांचे राज्याचे वंशी जो राज्य करील त्यानें तुमचे वंशाचे ठायी ममतापुरस्सर विश्वास ठेवून वंशी पद चालवावें. यासी अंतर करील त्याचे राज्यास श्रेयस्कर होणार नाही. छ. ४ रविलाखर सु.॥ अर्बा.

पंडितराव श्रीकराचार्य आईसाहेबाकडे गेले, सबब हे पद मुद्गलभट यांस दिलें. मंत्रीपद रामचंद्रपंत पुंडे याजकडून काढून नारोराम याजकडे सांगितले. न्यायाधीशपद शिवो विठ्ठल याजकडून काढून होनो अनंत याजकडे सांगितलें. सुमंतपद महादाजी गंगाधर हणमंते याजकडून दूर करून आनंदराव वकीलीस योग्य सबब आनंदरावाकडे सांगितले. सरलष्करपद हैबतराव निंबाळकर याजकडून काढून दावळजी सोमवंशी याजकडे करार केले. पारसनीस बुवाजी नीळकंठ होते, ते आईसाहेबाकडे गेले, सबब यादव बाळाजी परभू याजकडे सांगितलें. पुढें त्यास दिल्लीस सय्यदाकडें वकिलीस पाठविलें. तोफखान्याचे दरोगे नागोराव मेघश्याम नेमिले, व त्याजकडे राजाज्ञांची मुतालिकी सांगितली. पंतसचिव यांजकडे स्वदेशसुभा व कांही कोकणचे महाल दिले. व जो सरंजाम दिल्हा तो खाऊन महाराज याजकडील पीलखान्याचा खर्च चालवीत जावा असें ठरविले.

सु॥ खमस अशर मया व अलफ, सन ११२४ फसली,
अव्वल साल छ २३ जमादिलावल २६, में
१७१४, ज्येष्ठ वद्य ९ शके १६३६.

५+

५+१

५+२

५+३

५+४

त्यास गलबतांचा अधिकारी करून सरखेल पद कायम केले, आंग्रे यांनी पिंगळे यास सोडावें व राजमाची खेरीज शाहूचे किल्ले घेतले ते द्यावे, शाहू महाराजाचा पक्ष धरावा व संभाजीचा पक्ष धरू नये, असें ठरवून बाळाजी विश्वनाथ यांनी पिंगळे यांस आंग्रे याजकडून सोडवून आणिल्यावर त्यास बरोबर घेऊन साताऱ्यास आले. असाच एक बंड करणारा शंभू महादेवाचे डोंगराजवळ कृष्णराव खटावकर नामेकरून होता. त्याजला मोंगलाकडून राजा असा किताब होता. त्याचे पारिपत्यास बाळाजी विश्वनाथास पाठविलें व त्याचे मदतीस परशराम त्र्यंबक प्रतिनिधी याचा दुसरा मुलगा श्रीपतराव यास पाठविलें. त्याने खटावकर यास जिंकिले. या कामी त्याणी बहुत शौर्य केले, सबब महाराज प्रसन्न होऊन परशराम त्र्यंबक प्रतिनिधि कैदेंत होते, त्यांस मुक्त करून प्रतिनिधिपद वंशपरंपरेने दिलें. राजशक ४० जयनामसंवत्सरे वैशाख शु. ५, अर्बा अशर मया व अलफ, छ. ४ रबिलाखर, (८ एप्रिल १७१४) या दिवशीं प्रतिनिधीला सनद दिली. खटावकर यांस गांव वंशपरंपरेनें इनाम दिला. अशी मोठी कामें बाळाजी विश्वनाथ यांनी केली, हे यशस्वी व फौजेचे व मुत्सद्दीपणाचे कामायोग्य, मर्द माणूस, सबब बहिरोपंत पिंगळे यांजकडील पेशवेपद दूर करून छ ९ जिलकादे, अर्वा अशर मया व अलफ सालीं (१६ नोव्हेंबर १७१३) बाळाजी विश्वनाथांस मौजे मांजरी, प्रांत पुणें या मुक्कामी पेशवेपद दिलें. इतमाम साहेबनौबत, जरीपटका, बादली, पांच सनगें, जवाहीरकंठी, ढालतलवार, शिक्के कटार, असा शके १६३५ साली दिला. खानदेश, माळवा व बागलाण सुभा सांगितला. पुढें हिंदुस्थानचा अंमल साधेल तो व गंगातीरीं मोंगलाईंतील सुभा दिला. कर्नाटक, चंदीचंदावर, त्रिचनापल्ली अंल गेला, तो बसवावा. संस्थानिकांकडून खंडण्या येत ना त्या घ्याव्या. नौबतखाना महाराज असतील त्या मुलुखापासून दहा कोस आंत बंद असावा, ह्मणजे वाजवूं नये. शिवाय पेशवेपदास सरंजाम महाल वगैरे दिले. बाळाजी विश्वनाथ यांनी आपल्या बरोबर रोजगाराकरितां सोबतीस आणिलेले अंबाजी त्र्यंबक पुरंधरे यांस आपली मुतालिकी, व रामाजीपंत भानू यांस फडनिशी अशी महाराजास विनंति करून देवविली. बाळाजी विश्वनाथ पेशवे झाले, त्या वेळेस अष्टप्रधान होते ते :- १ प्रतिनिधी, परशराम त्र्यंबक, २ अमात्य, अंबूराव बापू हणमंत्ये, ३ सचिव, नारो शंकर, ४ मंत्री, नारोराम शेणवी, ५ सेनापति, मानसिंग मोरे, ६ सुमंत, आनंदराव, ७ न्यायाधीश, होनो अनंत, ८ पंडितराव, मुद्गलभट उपाध्ये व ९ पेशवे, बाळाजी विश्वनाथ. पुणे सुभ्यांत पेशवे यांचा अमल झाला. पेशवे यांजकडील अंमलास व्यंकोजी ढमढेरे पुण्यास आले; रंभाजीराव निंबाळकर यांजकडील बाजी कदम, याप्रमाणें पुण्यांत दोन अंमल झालें. पुणें प्रांत मोंगलाकडून जहागिरी रंभाजी निंबाळकर याजकडे होता. शके मजकुरीं पेशवे यांचा अंमल बसला तो स्वराज्यापुरता बसला. किल्ले लोहोगडची सबनिशी रामाजी महादेव भानू याजकडे व नाणे मावळची मजमू हरी महादेव याजकडे पेशवे यांनी सांगितली. त्या कामावर भिकाजी नारायण व अंताजी नारायण परचुरे होते.