Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ५९.

श्री.
पौ छ ७ जिल्हेज चैत्र
१६९० फाल्गुन बहुले ३

तीर्थस्वरूप राजश्री दादा व तथा राजश्री बाजीपंत दादा वाडिलांचे सेवेसीः-

अपत्ये गणेशानें दोन्ही कर जोडून शिर साष्टांग नमस्कार विज्ञापना ता फाल्गुन बहुल त्रितीया, म।। ब्रह्मेश्वर गंगातीर, नजीक निर्मल, समस्त सुखरूप असों विशेष. आपली दोन्ही पत्रें एक सांडणी स्वारांबा व एक जासूदा बा ऐशीं दोन पत्रें पो तीं पावलीं. लि।। मजंकूर कळला. इंकडूनहि पेशजी सडी स्वारी जालया उपरी सांडणी स्वाराबराबर वे जासूदाबा ऐसीं व कले. झरा वरून ऐशीं तीन पत्रें पो तीं पावलींच असतील. किंवा न पावलीं हें कांहींच कळत नाहीं. तरी सविस्तर लि।। पाहिजे. यानंतर इकडील मजकूर तरीः चांदे याजकडे होतों ते समर्ई बातमी आली की, भोंसले पुण्यास चालिले, त्याजवरून राजश्री गोपाळ रावजी व रामचंद्र गणेश व शाबाची भासले वगैरे पथकें ऐसीं सडी करून पाठीवरीरखाना केलीं. तें माहुराहून दरमजल वीस वीस कोस मजली करून खंदारानजीक भालकीचे मैदानांत भोंसले यांची आमची विसा कोसांची ( तफावत राहिली ). एक मजलीचें अंतर राहिलें. तदनंतर भालकीवरून पुणियाकडील वोढ सोडून, बैदरावरून भवानगर उजवें टाकून, संगारडमिंगोरडी पेठेवरून दररोज पांच गांवें सा गांवे येणेंप्रो, तो पुढें, आमच्या फौजा पाठीमागें, ऐशा झाडींतून पंधरा वीस रोज याप्रों चालिलों. त्याणें फारच गणिमाई केली ! तीन च्यार रोज भाकरी नाहीं. बकरीयाजवरीच जीव धरून फारच निकड करून निघोन गेले. अखेर गांठ न पडली. महिनाभर पर्यंत आमचे फौजेस पांच गांवें सा गांवें दौड पडली. शेवटीं मंथनकालेश्वराजवळ गंगा उतरलों. भोंसले तसेच पुढें झाडींतून चांदे याजकडे गेले. पुढें मागें जावे तरी, मुलुख त्यांचा, झाडी फार, याजकरितां गंगातीरानेच मुकाम मजकुरीं श्रीमंतांस येऊन मिळालो. सहा दिवस जाहले. घोडियांत व माणसांत कांहीं बाकी राहिली नाहीं. फौज अगदीं सडून गेली, दोन अडीच हजार पावेतों घोडे राहिले. झाडींत पांच सहा लंघनें घोडियांस जालीं. याजप्रों स्वारी जाली. या मागेंहि येणेंप्रमाणें स्वारी जाली नाहीं व पुढेंहि होणें नाहीं. कळलें पाहिजे. येथें श्रीमंतांचे मुकाम दाहा बारा जाले. सल्ला मामला होत आहे. बोली चाली आहे. पुढें काय मजकूर होईल तो सेवेसीं मागाहून लिहून पाठवून देऊं. सारांश, आपणाकडील सविस्तर मजकूर लिहून पाठवावे. वेदशास्त्र संपन्न रा जगन्नाथ देव बाबा व राजश्री मथुनाथ देव बाबा स्वामीस सिरसाष्टांग नमस्कार लिा परिसोन आपण माघ मासाचें आशिर्वाद पत्र पों तें या मुकामीं पावलें. दर्शनतुल्य संतोष जाहला. सदैव आशीर्वादपत्र पाठविलें पा. लोभ असे दिजे. हे विज्ञप्ति.

पत्रांक ५८

श्री.
१६९० फाल्गुन शुद्ध ४

वेदमूर्ती राजश्री गणेशभट हरडीकर स्वामीचे सेवेसीः-

विद्यार्थी विठ्ठल कृष्ण साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय ता फाल्गुन शुद्ध ४ रविवार जाणून स्वकीय लिहित गेलें पाहिजे. विशेष तुह्मांकडून सांप्रत पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. देवालयाचें काम सिद्धिस गेलें कीं नाहीं ? घराचें काम कोठवर आलें ? काय करितां हें कांहींच कळत नाहीं. तरी सविस्तर लेहून पाठवणें. घराचे कामाचा बखेडा फार न वाढवणें. सत्वर काम करून घेऊन, राजश्री शंकराजी केशव यांसी पुण्यास पाठवून द्यावयाविशीं तुह्मांस पेशजीं लिहिलेंच आहे. त्याप्रमाणें घराचें काम सत्वर उरकून घेऊन शंकराजी केशव यांसी पाठवून देणें. सारांश, खर्च वावगा न करणें. काम सत्वर आटोपून घेणें, चिरंजीव केशो उद्धव, विसा उद्धव यांचें वर्तमान काय तें लेहून पाठविणें, पुणियांत भोसले येतात म्हणून भारी गडबड जाली होती. पुणें पळालें होतें. आमचींही बायकामुलें पुरंधरीं गेलीं आहेत. पांचा साताराजांनीं आणविणार आहें. कळावें. अद्याप भोंसलिया कडील कजिया तुटलासा जाला नाहीं. लांबला आहे. पुढें किती दिवस लागतील पाहावें. सारांश, तुह्मीं श्रीचें व देवीच्या देवालयांतील काम सांगितलें होतें त्याप्रा, झाडून करणें, घराचें काम मध्यम रीतीचे लौकर करून घेणें. फार थोर कराल, काम वाढवाल [ तरी] पैसा मिळणार नाहीं. जें काम कराल तें चांगलें करणें. आपले कडील सविस्तर वर्तमान लि।। पाहिजे. बहुत काय लिहिजे ? कृपा करावी, हे विनंति. इ. इ.

पत्रांक ५७

श्री
१६९० माघ शुा ४

वेदमूर्ति राजश्री गणेशभट हारडीकर व राजश्री शंकराजी केशव स्वामीच सेवेसीः-

पो विठ्ठल कृष्ण सां नमस्कार विनंति. उपरी येथील कुशल ता माघ शुा ४ भृगुवार जाणून स्वकीय लिहित असावें. विशेष. इकडील वर्तमान तरीः–श्रीमंत फौजेसुद्धां नागपुरानजीक आहेत. श्रीमंतांच्या फौजेस व भोंसल्यास साठसत्तर कोसांची तफावत आहे. अद्याप कांहीं तहरह नाहीं. पुढें काय होतें पहावें. घरचे कामास लांकडें तोडावयाविशीं र। विसाजीपंत लेले यांची सनद घेऊन मागें पाठविली ती पावलीच असेल. लांकडें घराच्या बेगमीचींच तोडावीं. देवालयाचे कामापैकीं शिल्लक राहिलीं असेल तीं खर्च करून जीं लागतील तितकींच तोडून खर्च करणें. लांकडें राहिल्यानें उपयोग पडणार नाहीं. याकरितां लिा आहे. घराचें काम आटोपल्यावर चांगलें. बळकट, मजुबूत भिंती चांगल्या घालून आटोपशीर करावें. पैका विशेष खर्च न करणें. रिकामा कारभार न वाढवणें. चैत्र मासांत घर तयार करून शंकराजी केशव यांस पुण्यास पाठवून देणे. येथून शिवराम महादेव यांसी निरोप द्यावा लागतो. याकरितां घराचें काम आटोपून घेऊन शंकरोबास पाठविणें. वरकड इकडील सविस्तर वर्तमान वेदमूर्ती पद्माकर पाध्ये सांगतां कळों येईल. आजिता काम कोठवर आलें ते लिहिलें पाहिजे. श्री सिद्धेश्वर व श्री मुगादेवीचे काम सांगितल्याप्रमाणें तयार केलें असेल. राहिलें असेल तें सांगितल्याप्रमाणें तयार करणें. काम जलदीनें करावें. फार दिवस न लावणें. बहुन काय लिहिणें ? कृपा किजे, हे विनंति आडिवरेकर त्रिवर्ग भटजी यांचे घरीं नमस्कार सांगणें.

पत्रांक ५६

श्री ( नक्कल )
१६९० पौष शुद्ध १०

रा बाबूराव नरसी, उपनाम खेर, गोत्र गौतम, सूत्र आश्वलायन, कसबें बावधन, प्रांत वाईं, गोसावी यांसी:-

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा ( तिसा ) सितैन मया व अलफ. शके १६९० सर्वधारी नाम संवत्सरे, तुह्मीं हुजुर कसबे पुणे येथील मुक्कामीं येऊन विनंती केली कीं:-राजश्री भगवंतराव पंडित प्रतिनिधी यांणी आपणास मौजे कणूर संमेत हवेली प्रां वाईं हा गांव स्वराज्य तर्फेनें आपले कडील अमल, खेरीज हक्कदार व इनामदार करून दरोबस्त कुल बाब कुलकानू देखील इनाम तिजाई इनाम करार करून देऊन भोगवटीयास पत्रें करून दिल्हीं आहेत. त्याप्रों गांव इनाम चालत आहे. त्यास, स्वामींनीं कृपाळू होऊन, आपणाजवळ पत्रें आहेत तीं पाहून, त्या प्रों सरकारांतून करार करून दिल्हीं पाहिजेत. ह्मणून, त्याजवरून तुह्मी स्वामीचे राज्यांतील पुरातन सेवक; यास्तव तुमचें चालवणें आवश्यक जाणून, तुह्मांवरी कृपाळु होऊन, मौजे मार येथील रा भगवतंराव पंडित यांणी स्वराज्यतर्फेचा आपले वडील अमल, देखील इनाम, तिजाई देखील खेरीज हक्कदार व इनामदार करून दरोबस्त कुलबाब, कलकानू, इनाम देऊन पत्रें करून दिलीं आहेत तीं पाहून त्याजप्रों सरकारांतून करार करून दिल्हा असे. तरी, सदरहु लिहिल्याप्रमाणें मौजे माचा अंमल आपले दुमाला करून घेऊन, तुह्मीं व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें इनाम अनभऊन, सुखरूप राहणें. जाणिजे. छ ८ रमजान, आज्ञा प्रमाण. ( मोर्तब व शिक्का असे. )

पत्रांक ५५.

श्री.
१६९० पौष शु। १

वेदमूर्ति राजश्री गणेशभट हरडीकर स्वामींचे सेवेसीः-

विद्यार्थी विठ्ठल कृष्ण सां नमस्कार विनंति उषरी येथील कुशल तारा पौष शुद्ध १ जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. सरकारची सनद सायली लाकडाची राजश्री महादजी रघुनाथ. सुभेदार यांस पेशजीं घेऊन वेदमूर्ति महादेव पाध्ये नाटेकर यांजबराबर पाठविलीच आहे. व सुभेदारांनीं सरसुभांच्या सनदेचा आक्षेप केला ह्मणून लिहिलें होतें. त्यावरोन राजश्री विसाजीपंत सर सुभेदार यांचें पत्र घेऊन पाठविलें आहे. या उपरी लांकडें तोडून देवालयाचें व घराचें काम सत्वर सिद्धीस न्यावें. लांकडें तोडावयास तो तुह्मीं राजश्रीं शंकराजी केशव यांस पाठविलें आहे. लांकडें तोडलीं असतील. सरसुभांची सनद विजयदुर्गास पाठऊन, तेथील पत्र आणून, याउपरी लांकडें जलदीनें आणवणें. आणि घराचें काम निकडीनें करून, देवळाचें काम सांगितलें आहे त्याप्रमाणें त्वरेनें करून घेणें, घराचें काम फार न वाढवणें. आटोपतें धरून वैशाख मासाकारणें शाकारून टाकणें. कौलें करून अगोदर ठेवणें. जें साहित्य लागेल तें अजिपासून लगटानें काम करून घेणें. रिकामा फैलाव कराल तरी पैसा मिळणार नाहीं. लांकडे सनदेप्रों आणावयाची आहेत. जितकीं लागतीलशीं असतील तितकीं लागलींच आणून ठेवणें. लांकडे पैका खर्चून आणाल आणि राहतील तीं व्यर्थ जातील ऐसें न करणें, अथवा पाहिजेत तीं पुरीं न आणलीं आणि मग तीं आणावयास गेलो तेव्हां त्यांणीं अडथळा केला. मांगतीं सभाचे किल्याचें अथवा सरकारचें पत्र मागूं लागले तरी पुनः वारंवार खटपट होणार नाहीं. यास्तव, सूचनार्थ तपशीलवार लि।। आहे. पाहिजेत तीं आणून काम शेवटास नेणें, वैशाखा पुढें काम न ठेवणें. ऐवजाविषीं लि।। त्यास तूर्त ऐवजाची वोढी आहे. तुह्मांपाशील ऐवज खर्च करणें. मग पाठऊं. खर्च वावगा न करणें. श्रीमंतांसी भोसलियांसी बिघाड जाला आहे. यास्तव वराडप्रांते श्रीमंत फौज सुद्धां गेले. कळावें. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दिजे हे विनंति, राजश्री शंकराजी पंतास नमस्कार सांगितल्या प्रों करावें. वाढऊ नये. हे विनंति.

                                                                             लेखांक ३४२

                                                                                                                                                       १६०७ आश्विन वद्य ३   

                                                                                                    342

स्वस्ति श्री राज्याभिषेकशक १२ क्रोधन नाम संवत्सरे आश्विन बहुल त्रितीया इंदुवासरे क्षत्रियकुलावतंश सिव्हासनाधीश्वर श्री राजा शंभु छत्रपति स्वामी याणी सर्जाराऊ जेधे यासि आज्ञा केली ऐसी जे तुह्मी संताजी निंबालकर मुद्राधारी विचित्रगड यासि पत्र लेहून आपला मुद्दा सागोन पाठविला की आपला भाऊ शिवजी जेधा याणे हरामखोरी करून सिरवळास गेला त्याणे आपली गुरे ढोरे वळुनु नेली पुढे आपणास बरे पाहाणार नाही या बदल आपण हि उठोन सिरवळास आलो आहे ऐसियासि आपण राजश्री स्वामीच्या पायाजवळी एकनिष्ठ च आहे स्वामी कृपाळु होउनु आपले वतन देसमुखी आपले स्वाधीन करतील आणि अभयपत्र सादर होईल तरी आपण शेवेस एउनु एकनिष्ठ होउनु शेवा करीन ह्मणून तरी तुमचा मुद्दा मा।इले हवालदार एही स्वामीचे शेवेसी हुजूर लिहिला त्यावरून कळो आला त्यावरून हे आज्ञापत्र तुह्मास लिहिले आहे तरी आधी तुह्मी च सरासरी हरामखोरी केली की वतनदार होउनु इमाने इतबारे वर्तावे ते गोष्ट न करितां स्वामीचे अन्न बहुत दिवस भक्षिले त्याचे सार्थक केलेत की स्वामीच्या पायासी दुर्बुध्दि धरून दोन दिवसाचे मोगल त्याकडे जाउनु राहिलेस तुमचा भाऊ शिवजी गनीमाकडे गेला तो तुह्मास बरे पाहे ना ऐसें होते तरी तुह्मी स्वामिसन्निध हुजूर यावे होते ह्मणिजे तुमचे इतबारपण कळोन एकनिष्ठता कळो एती ते केले नाही तरी बरी च गोष्ट जाली या उपेरी हि गनिमाकडे राहाणे च- असेली तरी सुखे च राहाणे तुमचा हिसाब तो काय आहे ए क्षणी स्वामी आज्ञा करितात तरी गनीमा देखिल तुह्मास कापून काढवीत च आहेत हे बरें समजणें दुसरी गोस्ट की तेथें राहाणे च नाही एकनिष्ठेने स्वामीच्या पायाजवळी वर्तावे ऐसे असेली तरी तुह्मी परमारे मुद्दे सागोन गडकिलियाकडे राबिते काय ह्मणून करिता हे गोस्ट स्वामीस मानत नाही जो राबिता करणे तो स्वामीकडे च करून हुजूर वर्तमान लेहून पाठवावे स्वामी तुमचा मुद्दा मनास आणून आज्ञा करायाची ते करितील तरी ऐसी गोस्ट करावया प्रयोजन नाही उजराती खेरीज दुसरियाकडे एकंदर राबिता न करणे जे वर्तमान लिहिणे ते स्वामीस लिहीत जाणे तुमचे ठाइ एकनिष्ठत च आहे ऐसे स्वामीस कळलियावरी जे आज्ञा करणे ते करून आज्ञापत्र सादर होईल तेणे प्रमाणे वर्तणूक करणे लेखनालंकार

 

                                                                         305 1            148 2

 

रुजू
रवाना छ ३ जिल्हेज
सुरू सूद

पत्रांक ५४.

श्री (नक्कल.)
१६९० मार्गशीर्ष वद्य ५

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव विश्वनाथ गोसावी यांसीं:--

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुा तिसा सितैन मया व अलफ. बाजीरुद्र पेशजीं सनसमान खमसेनांत कडप्याचे लढाईंत सरकारकामास आले. सबब तीर्थरुप कैलासवासी नानासाहेब यांणीं तीनसें रुपयांचा गांव इनाम द्यावयाचा करार केला. परंतु गांवची नेमणूक होऊन आली नाहीं. याजकरितां तीर्थरुप यांणीं तीनसें रुपयांचे तनख्याचा इनाम द्यावयाचा यादीवर करार केला होता तो पाहून त्यांचे बंधु राजश्री आपाजी रुद्र व बाळाजी रुद्र यांसी मौजे आघलगांव ता बेलहे प्रा जुन्नर येथील जाहीगीर व फौजदारी तुह्मांकडून दूर करून दोन्ही अंमल दरोबस्त इनाम करार करून देऊन भोगवटीयांस पत्रें करून दिल्हीं आहेत. त्याप्रों हरदू अंमल यांजकडे इनाम सुरळीत चालविणें, जाणिजे. छ १८ शाबान. बहुत काय लिहिणे?

पत्रांक ५३

पो छ १ साबान.
श्री (नक्कल.)  १६९० आश्विन शुद्ध ११

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव विश्वनाथ गोसावी यांसीः-

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा तिसा सितैन मया व अलफ, राजश्री विसाजी कृष्ण हे मौजे तिखणी प्रा राजापूर येथें देवालय व घर बांधितात. त्यास, मौज भांबेड व मौज हरदखले व मौजे आरगांव वगैरे प्रा मजकुरी येथील रानांतून लांकडें सागवानी तुळया व खांब व आटववांसे व गजया वगैरे मिळोन सुमारें ४३८५ च्यार हजार तीनसें पंच्याऐसीं लांकडें तोडून मौजे मजकुरीं आणितील. त्यास आणूं देणें. कोणेविशीं अडथळा न करणें. जाणिजे, छ १० जाखर, आज्ञा प्रमाण.

पत्रांक ५२

( शिका)

श्री.
( नक्कल. )
१६९० भाद्रपद वद्य ७

राजमान्य राजश्री बाबूराव नरसी, उपनाम खेर, गोत्र गौतम, सूत्र आश्वलायन, वास्तव्य कसबा बावधन, प्रांत वाईं, यांसीं भगवंतराव त्र्यंबक प्रतिनिधि नमस्कार. सु। तिसा सितैन मया व अलफ. दिल्हें इनामपत्र ऐसीजे:- तुह्मीं हुजुर पुण्याचे मुक्कामीं येऊन विनंति केली जेः- आपण राज्यांत एकनिष्ठेनें सेवा केली आहे. याजकरितां कैलासवासी यमाजी पंत यांणीं आपणावर कृपाळू होऊन मौजे कणुर, संमत हवेली, प्रां वाईं, हा गांव सुभाकडे होता, तो दूर करून जिल्हेकडून कुलबाब, कुलकानू इनाम करून देऊन इनामपत्रें करून दिलीं आहेत, त्या प्रों चालत आहे. त्यास, तीं पत्रें मनास आणून, आपलीं पत्रें भोगवटीयास करून देऊन, पूर्ववत्प्रों इनाम चालविला पाहिजे. ह्मणून, त्यावरून, तीं पत्रें मनास आणून, तुमचें चालविणें आवश्यक जाणून, तुह्मांवर कृपाळु होऊन हालीं मौजे मार हा गांव जिल्हे कडून पूर्ववत् प्रों कुलबीब-कुलकानू हाली पट्टी व पेस्तर पट्टी देखील इनाम तिजाई खेरीज हक्कदार करून दरोबस्त इनाम दिल्हा असे. तरी तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें अनभऊन सुखरूप राहणे. जाणिजे. छ २० जमादिलावल, बहुत काय लिहिणें? मोर्तबसूद.

पत्रांक ५१.

श्रीलक्ष्मीकांत.
१६९० श्रावण शुद्ध ७

राजश्री माधवराव पंडित प्रधान गोसावी यांसीः-

सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मीआलंकृत राजमान्य स्नो जानोजी भोंसले सेनासाहेब-सुभा दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष, गोसावी यांनीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाहला. राणोजी करांडे याचा करार राजश्री दादासाहेब यांसी केला आहे कीं, पूर्ववत् प्रों त्याचा सरंजाम देऊन, मारनिलेस पदरीं बाळगून, पहिल्याप्रों सेवा घ्यावी ह्मणोन. त्यास हालीं मारनिलेस फक्त कांहीं न देतां दिल्हा ह्मणोन विदित जाहलें. त्याजवरून हे पत्र लिहिलें आहे. तरी कराराप्रमाणें त्याचा सरंजाम देऊन त्याची रसीद केशो शामजी व खिजमतगार पाठविले आहेत, त्याज समागमें पाठवावी, ह्मणोन लिहिलें. ऐसियास, करांडे मजकूरास सोडिलें ते समयीं त्याणें करार केला कीं, आपण नरनाळा ग्वालीं करून देतों, गोंडवानचा सरंजाम किल्ले जातीचा नलगे, वराडांत सरंजाम आहे त्यापैकी जो कृपा करून देतील तो घेऊन एकनिष्ठेनें चाकरी करून दाखऊन उर्जित करून घेईन. याप्रमाणें करार करून, शपथेचें पत्र लिहून सरकारचे ऐवजाचे भरण्याबद्दल निरोप घेऊन, त्याजनंतर महिनाभर पर्यंत सेवेसीं येतों, बेईमानी कदापि करणारं नाहीं, ऐसें लिहित आला. त्याज अलिकडे तो सर्व प्रकार टाकून मनस्वीपणाची वर्तणूक मांडली आहे. वराडांत रोखे करावे, स्वा-या कराव्या, सरदार मा. रावे, मुलूख खराव करावी, हा विचार मांडला आहे. यास्तव त्यासच निक्षुन आज्ञा होऊन यथास्थित रीतीनें वर्ते,आणि येथें येऊन कराराप्रोंच चाले असे जालिया येथूनहि अंतर होणार नाहीं. एतद्विशई अर्थ सर्वज्ञतेचे ठाई विस्तारें ल्याहावेंसें नाहीं. रा छ ६ माहे रबिलाखर, सुज्ञाप्रति विशेष काय लिहिणे ? कृपालोभ असूं दिला पाहिजे. हे विनंति. मोर्तबसूद