Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक १६५


तेव्हां या तोडमोडींत राहून, सेवट, बाईचे बुद्धीनें बाई लुटली गेली. तीस लाख तलब देणें, याजला ते वांचली. खंडेराव दरेकर व आपाजीराव पाटणकर बाईचे मध्यस्तींत असतां, बाई चुकतां गारत जाहली. सेवट, अबरु वांचली. तात्यांनी तह केला. बाईस एक किल्ला द्यावा. वरकड साबाचीबावास पागा, हत्ती, सिलेखाना द्यावा. हा तह केला. दिवाकरपंतांनीं बाईकडून सेनासाहेबसुभा यास कराराप्रों मिळावें, ऐसें साधन राखावें, हें तात्यांनीं करून; भवानी शिवराम याचे कामांत तिडण न करावी, जें जाहलें तें जाहलें. हे इमानांत चुकले, आतां याजविसीं शपथ मजशीं करावी, कारभार यानें करावा, वडिलपणें आपण सल्लामसलत देत जावी, हें तात्यांनीं करून; निरोप दिल्हा. दिवाकरपंतांनी आक्षेप केला कीं, पुरंधरास जाऊन उभयतां बापू व नाना यांच्या भेटी मीं घेऊन येतों. तेव्हां सेनासाहेबसुभा यांनी आक्षेप फार केला, आणि तात्यांनी समाधान केलें. बहुमान केला असतां हे पुरंधराकडे पाहतात हें दिसलें. याकरितां यासमागमें वराडांत आलों. पंचवीस दिवस बाईकडे जाणें. बाईचें व नानाचे प्रेम निस्सीम जाहलें. एक जागा जेवावें. नानाचें कसें विचारावें. फारच ममता. मागील लुटणें दुःख सर्व विसरलें. बाईनीं तात्यास पत्र लिहिलें की, माझी खातरजमा नानांनीं केली, यांनीं लिहिलें कीं, बाई माझी जाहली, आतां तूट जन्मभर पडत नाहीं. हें नाना जोशी यांचे प्रत्ययास आणून दिल्हें. नानास नेऊन सर्व दाखविलें. बाईनें फौजेच्या समजाविशीं नुपर पडली तर पैका द्यावा, किल्ले द्यावे, नाना साहेबांचे सर्व साहित्य करावें. हे पुत्र ती आई, हें पंचवीस रोजांत जाहलें. हें पाहतांच, मागती काय जाहलें, नकळे, बाईकडे मी जाऊ नये. आणि बाईचा क्षोभ, मन मानें तें बोलों लागली. तेव्हां शोध मनास आणितां कारभारी यास हें असह्य जाहलें. बाईचें व नानासाहेबांचे एक, आणि जवळ मी, हे मसलतेंत असतां मीं राहणार नाही याकरितां यजमानास कळों येत नाहीं, ऐसे दर्शविलें व बाईस अनेक प्रकारें दर्शविलें, जर हे बाईकडून जातील, तर आपण बाईपासून चैरोजांत किल्ले घेईन. यजमानानीं नानास पुसिलें. त्यांनींहि संमत दिलें. हें वर्तमान आपणास कळलें, तेव्हां आम्ही तिकडील वस्त सोडून उगेच राहिलों. ऐसें दिवाकरपंतांनीं कित्तेक प्रकारें कारभारी यांच्या चुक्या सांगितल्या. त्या पत्रीं कोठपर्यत ल्याहाव्या ? दिवाकरपंतानी मसलत नासिली. नाट करावी, ते कारभारी यांनी ह्मणावें कीं, हें मीं अगोदरच केलें होतें. तेव्हां आपण व्रत धरिलें, नाना जोशी यांचे घरीं बसावें. आपणाकडे नानाचीं पत्रें गेली, तर मी नानापासी आहें, ऐसें आपणास ल्याहावें. याचें कारण कीं विरस न दाखवितां बापूची व नानाची भेट घ्यावी. मामाचे मसलतींत श्रम फार केले आळा घातला. साबाजीबावाचें व मामाचें नीट करून दिल्हें. भवानी शिवराम यास कारभारांतून काढावें, हें मामास सेनासाहेबसुभा यांनी सांगितलें. मामानींहि मान्य केलें. त्याप्रों भवानी शिवराम यास तगीर करावें. तेव्हां मींच मामाशीं अट धरिली कीं भवानीपंत माझा पुत्र होय.

पत्रांक १६५


तेव्हां, मागून कुटुंबाकरितां तुह्मी जाल, याकरितां यादी करार करून दिल्ही आहे. परंतु आता मोठ्या खिडक्या दरवाजे ठेविले आहेत. तूर्त शिक्केकटार पंधरा दिवस मात्र ठेवा. साबाजी भों नाना ऐसें चिठींत लिहीन. मागू नका. सेनासाहेब सुभा रघोजीबावास लिहीन. हा सिद्धांत मामांनी व दिवाकरपंतांनीं करून, सेनासाहेबसुभा यांस वे भवानी शिवराम यांस सांगितलें. आणि सांगितलें कीं, तुह्मीं बाईकडे जात जावें, रतिमात्र चूक पडली ह्मणजे नवाब व आह्मीं मिळाल्यास इजला गारत करून देईन ! तों बाईकडील पत्रेंहि मामांस सांपडलीं. रा शिवराम विइल यांजकडे संचार बाईनीं धरिला. तो त्यांनी सांगितला. वाईवर चौक्या ! सेवट मूल आणि बाई संभर रावतांनसीं डे-याजवळ आपल्या असावी, हा करार जाहला. बाईस उमजलें कीं, मी यांची आशा न मानिली ह्मणजे हे। यादींतून निघतात आणि गारत करितात. त्यावर राजश्री हरीपंत तात्या आले. हैं कच्चें वर्तमान तात्यांस व रुकुनुद्दौले व जाबितजंग यांस मामांनी सांगितलें, सेवट श्री पंढरीच्या देवालयांत बाईनीं मामास शपथेनें गोंवावें ऐशी संधी घडवून, भाऊबहीण हें नातें लाऊन, देवासमक्ष ह्मणूं लागली कीं, यादी खरी ऐसें वचन द्यावें. तेव्हां मामांनी साफ सांगितलें कीं, रघूजीबाबा जानोजी बावाचे पोटचा नाहीं, तुजला पुत्र नानाचाच खरा. ऐसें विशादयुक्त भाषण केलें तेव्हां बाईस निराशा जाहली. तेव्हां आपली गत पुसली कीं, माझा वाली कोण ? तेव्हां मामांनीं उत्तर केलें कीं, साबाजीबावा अवज्ञा करील तरी करू देणार नाहीं. हें वर्तमान डे-यास येऊन तात्यापाशीं सांगितलें. व रुकुनुद्दौले व जाबितजंग यांजपाशींहि सांगितलें कीं, देवाजवळ मजला बाईंनीं गांठिलें होतें, त्यास साफ सांगितलें, बाई उमजली. दंगा करील, जाईल, याजकरितां मोंगलाजवळ पिछाडीस उतरविली. तमाम फौजेच्या हजि-या राजश्री त्रिंबकपंतास व फडणवीस सचंत्र ठेऊन घेतल्या. त्याचे कारकून बेइतल्ला केलें. बाईस उमजलें कीं, आतां नानासाहेबांसच धरिल्यानें वांचत्यें. तेव्हां सरदार व कारकून राजकारणास लागले. त्या दिवसांत आह्मींहि बोध करून ठीक करावें ऐसे होतें. त्यास, मामा एका दिवसाकरितां उतावळी करून गेले. दगा पावले. दुसरे रोजी सर्व सरदार व नबाब एक करून श्रीमंतास दोन मजली जाऊं न द्यावें, हे जाबितजंग व आपण जिद करीत असतां, आपणावर तफाने ? शिक्केकटार मागितली. सेनासाहेबसुभा रघोजीबावास देणार ऐशीं पत्रें पुरंदरास लटकीं पाठविलीं व तात्यास सांगितलें, मुधोजीबावाचें व श्रीमंताचें सूत्र. ऐशीं तुफानें घेऊन, केली श्रम त्यास, श्रीहरी ब चार मातबर रास्ते आदिकरून यांस ठाऊक आहे. जाबितजंगास घेऊन आलों. एक मास निर्मलेकडे मजला लागला. मामांनीं सांगितलें कीं, हे मसलत राजश्री बापूची आहे. मीच बापू आहें. भेद नाहीं. मजविसीं पुरंदरास लिहिलेंहि असेल. ऐसे श्रम केले असतां, मामा जातच आपले राहुटींत बसलों. पंधरा रोज पाहिलें तों तुफान करून कैद करितात. तेव्हां राजश्री बापूकडे पत्र पाठविलें, बापूंनीं व नानांनीं हरीपंतास लिहिलें कीं, मसलतेंतून दिवाकरपंतास न टाकणें, आणि मजला पत्र आलें त्यांत आज्ञा कीं, हरीपंताकडे जात जा. तेहि बोलावतील. तेव्हां, ती पत्रे प्रतिष्ठेस प्राणास आश्रय जाहला. राजश्री नाना जोशी आले. त्यांचें दर्शन जाहलें. ते पुर्तें वाकीफ जाहलें. आमचें समाधान केलें. तों हरीपंतावर बाईचे मसलतेचें जड पडलें. पुरंधरचीं पत्रें आलियावर तात्यांनीं पदर पसरिला कीं, चूक जाहली. नाहक तुह्मांवर आरोप केला. भवानी शिवराम पायां पडले कीं, चूक जाहली. ईश्वर आह्मीं सोडिला. इतकें आतां माफ करावें. पुढें चुकणार नाहीं. तेव्हां तात्याकडे जाणें सुरू केलें. बाईचा कारभार, तीस लक्ष रुपये तलब बाईची द्यावी. पुढें बाईस सरंजाम द्यावा. या पेंचांत दौलत गारत. फौज सेनाधुरंधर याची हणमंतराव घाटगे वगैरे यांचें जथ पडणार.

पत्रांक १६५


लोकांच्या बोल्या पांच पांच हजार जातीचे मनमानेशा आपल्या यादी खासगत करून द्याव्या. जितका हरामखोर सरदार फंदी तितका आपले आंगीं लाऊन घेऊन खावंद जरबेंत असावा. पैका त्यास द्यावा तेव्हा उपाय काय ? देणें घेणें त्याचेच स्वाधीन. कांहीं बोलावे, तर दिवस नाहींत. कैसेंहि करून. परंतु, एक वेळ मसलत सिद्धीस जाऊ, या अर्थीं तेंहि सोसिलें. परंतु, नागपुरीं अडीच महिने जाहले मामलत अगर कोणताही इतल्ला खावंदास नाहीं. ऐवज कोठील करावा ? आणि कोणास द्यावा ? हा इतल्ला नाहीं. हिशेब मात्र एक मास जाला ह्मणजे दप्तरदारास यादी दाखऊन जमाखर्च ल्याहावा. हे चाल आज दोन वर्षें आहे. मामा व तात्याचे विद्यमानें पांच लाख रुपये बराणपूरपर्यंत रोजमरा पावला. त्यांपैकीं नाना जोशी याचे विद्यमानें पंधरा हजार रुपये मात्र ठाऊक ! वरकड दाखला देण्याचा नाहीं. सवा लक्ष रुपये दरमहा येत असतां, दाणा घोड्यास नाहीं. उंटें मेलीं ! चार रोज तीन रोज मुदबक नाहीं ! नाना जोशी यांचे घरीं जेवणें. अगर तात्याकडे गेलों, तर तेथें जेवणें. चौं रोजा आड मुदबक व्हावा. हें वर्तमान आईकोन मुस्ताक जाहलों, सवा करोड़ रुपये बारा हजार फौजेस दोन वरसांत वसूल असतां, हा गजब ! तेव्हां यजमानांचे सर्व आइकून कारभारी यांस पुसिलें. त्यांनी विजातीय कांहीं सांगितलें. ते पत्रीं काय ल्याहावें ? यजमानाच्या बोलण्यास दाखला पडत चालला. तेव्हां खातरजमा जाहली. पुढे सेनाधुरंधर आमजेरावर आले. लोक डे-याजवळ एक नाहीं ! खाविंद एकला ! याची तजवीज कारमारी उभयतांस पुसिली. तरी उभयतां एकांत एक नाहींत. रा. भवानी काळो याजकडे फौजेची समजाविसी लोकांची हजिरी हिशेब पांच सात वर्षांचा आला. ते लोक मातबर. बोल्या करून भवानी शिवराम यांनीं आपणाकडे आले त्यास पैका द्यावा. भवानी काळो याजकडे यादव, पांढरे वगैरे यांस पैका न द्यावा. तेव्हां कुल सरदारांची झोड, श्रावणमासाच्या दक्षणेसारखी दोन रुपये अधिक तिकडे ब्राह्मणांनी जावें ! हे चाल दोन वरसें चालत आली. रा भवानी काळो यांस तगीर करावे, आपल्या कामांत यांनीं न बोलावें, हे केलें. घरीं बसविलें. तेव्हां राजश्री सेनासाहेबसुभा यांस बोलणें प्राप्त झालें. कोणचि राहिलें नाही. पुढे संदेह. न जाणो काय होतें ! एक यादव मात्र यांचे पक्षीं राहिले. तेव्हां राजश्री सेनासाहेबसुभा यांनी संमंध, एका बाणदारांचें जमातदारास कामावर न घालतां बिडी घातली इतका संमंध, लाऊन आपल्या जिवावर आलें. पोटकरारी करावी. भरावें ? पागोटें टाकिलें. मोठा त्रास केला. हें आयकोन धांवोन गेलों, समाधान केलें तों भवानी शिवराम याचे गार्दी व लोक मिळाले. हें वर्तमान आलें तेव्हां मारनिले यास घरास लाऊन दिल्हें. भवानी शिवराम याचें बिनसलें, तेव्हां आह्मी व राजश्री नानाजोशी ऐसे राजश्री दिवाकरपंत दादा यांच्या घरास गेलों. त्यांसीं भाषण केलें.त्यांनीं मागाहून कथा सांगितली कीं, मीं नागपुरीं असतां मजला चारसें लोक पाठवून गेले. मामांचा व यांचा युद्धाचा समय ते वेळेस पोहोंचलों. मामांची व यांची भेट, केली. पुढें मामांनीं कांहीं खुणेच्या गोष्टी सांगितल्या. त्या आधारावर मामाजवळ जाऊन राहिलों, सेनासाहेबसुभा रघोजी बावास जाहला असतां, कटेश्वरीं गंगातिरीं मामांनीं गंगेचें उदक गंगेंत बसोन राजश्री सावाजी वावाच्या हातीं घातलें कीं, सेनासाहेबसुभा तुह्मांस दिला, ऐसें इमान देऊन मग मसलतेच्या रीतीनें भवानी शिवराम व जिवाजीपंत फडणीस व दिवाकर पंत यांस सांगितले कीं, दर्याबाई मुलास घेऊन जात होती ते मोठ्या प्रेत्नें रा त्रिंबकरावपंत वर्तक व पत्रें पाठऊन आणिली. तिणें यादी पाठविली होती. ते करार करून दिल्ही. तेव्हां ते आली. नाहीं तर इंदुरावर गेली होती. नागपुरास जाती.

पत्रांक १६५

श्री. १६९७ कार्तिक शुद्ध १२ नंतर

.......... तीन पत्रें आपलीं वरचेवर आली. तेथें राजश्री......सेनासाहेबसुभा यांनीं जलदी करून आपले फौजेंत यावें. श्रीमंत नेमल्या स्थळास येतात. उभयतां सरदार समागमें आहेत. चिंता नाहीं. परंतु श्रीमंताची बुध शास्वत नाहीं. याजकरितां जलदीनें यावें. वे राजश्री हैरीपततात्यांचींही पत्रें एका रोजाचे अंतरानें याजप्रकारें येत गेलीं. तेव्हां राजश्री सेनासाहेबसुभा यांजकडे दररोज जावें. कारभारी यांसीं बोलावें. कारभारी यांणीं उत्तर करावें कीं, ऐवज तयार जाहला, करितों, निघतों. तें प्रमाण वा. टावें. जेव्हां राजश्री सेनाधुरंधर व महमद इसफ, सात हजार फौज तीन हैजार गारदी व तोफा चार घेऊन, अलजपुरींहून निघाले ते नागपुरावर चाल धरून वीस कोस अलीकडे आले. नागपूर पन्नास कोस राहिलें. त्यांनीं जुने फौजेची समजावीस काढून नवी फौज आणीक मेळवून आले. तेव्हां येथें गलबल फारच जाहली. मसलत ठहरली कीं, राजश्री सेनासाहेबसुभा यांनीं डेरादाखल व्हावे. पुढें अस्त. मुहूर्तही नाहीं. याकरितां, छ १० रमजानीं
डेरेदाखल जाहले. तों डेरे मात्र उभे करून सारवान, फरास, खास चौकीचे गारदी, खिजमतगार यांपैकी दोनसें मनुष्य के पंचवीस जासूद आणि खांसी त्या माणसांत रोजमुरा नाहीं. मारेकरी यांचे बजिन्नस कागदच पेशजीं सांपडले, घरचा फंद ! कोणाचा प्रकार कैसा, हे कसें समजावें. गांवांतच मारेकरी असलियास कैसें वोळखावें ? खांसा, तर, हवेलींतून बाहेर आले आणि दशा, तर, या प्रकारची ! पांच राऊत डे-याजवळ कोणाचे उतरत नाहीं. तेव्हां भास ऐसा जाहला कीं, हा फंद सर्वांचा एक जाहला. काम नासेल. तेव्हां कारभारी राजश्री भवानी काळो व भवानी शिवराम यांजला हें काय, ऐसें पुसिलें, त्यांनीं सांगितलें कीं, दों वर्षांचा गळाठा, लोकांस पोटास नाहीं, नागपुरांत वाणी उच्यापत देतात त्यावर लोक आहेत, बाहेर निघाल्यास पैका घेतल्याखेरीज एक समागमें येणार नाहीं, पैका तर दिसेना. तेव्हां सरदारी बुडाली हें परिछिन्न वाटलें. कारभारी यांनी तों साफ सांगितलें की, ऐवज नाहीं, सावकार बुडाले, रयत बुडाली. यजमानाजवळ खासगत दौलतीपैकीं वीस लाख रुपयाचें सोनें व रुपें होतें. तें कुल कारभारी यांनीं, अलजपुरावर गुदस्तां रावसाहेबांचें वर्तमान आलें त्या गर्दींत लोकांनीं गवगवा केला, त्या संधींत कुल ऐवज भरतीस घातला. तेव्हां ओला होऊन घांट चढले. पुढें राजश्री मामांच्या यांच्या भेटी जाहल्या. ते समईं मुलखांतहि पैसा घेतला व सरकारांतूनहि खर्चास मिळालें. त्यामुळें ते दिवस गेले. हालीं तों खासापासीं एक रुपाया नाहीं. पुढें उपाय काय ? सेनाधुरंधर तों दरमजल अमजेरास तीन कोसांचा तफावत राहिला. येथें, तर, तरतूद नाहीं. शहरांत गर्दी जाहली. उमज पडेनासा जाहला. कारभारीयांचे व यजमानांचे आंत आंत पाहिलें तर परस्परें विक्षेप. याचें कारण मनास आणितां, दौलतीचा नाश जाहला. आजपावेतों सवा करोड रुपये रोकड व मुलूख दाहा हजार फौजेस दों वर्षांत खर्च जाहला. व सात लक्षाचें कापड, चाळीस हत्ती, दोनसें घोडे खासे इतका वसूल लोकांस पावोन, पांच पांचसें माणसांचा एकच गोंधळ ! धरनी ! उपास ! कारभारी यांनी एका दिवसा आड जेवणें. धन्यास दोन प्रहर रात्रीस अन्न मिळावें. खासे यांची ही दशा ! कारखाने घोडीं उपाशीं ! दाम नाहीं. हत्ती बारा पंधरा ते दोन दोन मुछदी यांनीं रतीब द्यावा. उंट दाण्याविना तीन चारसें मेलें, ऐसें वर्तमान मुख्यांनी सांगितलें, तें आईकवलें नाहीं. तेव्हां विनंती केली कीं, हा इतल्ला कैसा दिला नाहीं ? याचें उत्तर केलें कीं, पठाण दोन हजार व मराठे ऐसे आपले मलईंत मेळऊन त्या लोकांनी रामरामास येऊं नये, सलाम करू नये, समागमें चालूं नये. कांहीं विषादानें बोलतात. ते कुल मिळोन धरणें बैसावें. उपास पाडावे. तेव्हां खुशामत करावी. ह्मणतील तें आईकावें, तेव्हां उठावे. करारमदार करून घ्यावें.

पत्रांक १६४

श्री ( नक्कल )
१६९८ अश्विन वद्य ५

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन गोसावी यांसीः-

सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार, सुा सबा सबैन मया व अलफ, कोकणांत गांवखेडी भरलीं आहेत. त्यास, तुमचे लष्करीचे लोक उपद्रव लावतील, लुटतील, जाळतील व भातें आणून चारितील, तेव्हां बाकी राहणार नाहीं. सरकारची मोठी नुकसानी होईल. कोंकणांतील किल्लेकोटाचा खर्च भारी. त्यांचे बेगमीचा ऐवज कोंकणीचाच. कोंकण खराब जाल्यानें ऐवज हुजुरून पाठवावा असें होईल. त्यास, ओढीमुळें हुजुरून बेगमी होण्याचा अर्थ समजतच आहे. तेव्हां, किल्याकोटाच्या बेगमीवांचून गळाठा होईल. याजकरितां कोंकणास काडीमात्र उपद्रव लागों न देतां, आबाद राखिलें पाहिजे. ऐशियास, तुह्मी आपले फौजेस वरचेवरीं निक्षून ताकीद करून, रयतेस व रयतेच्या घरादारांस, शेताभातास किमपी तोषीस लागों न देणें. जे इरामखोर तोतियास मिळाले असतील, त्यांचें पारपत्य केल्यास, पैका घेतल्यास, चिंता नाही. तसे आढळल्यास करणे. वरकड रयत गरीब व कोंकण ह्मणजे केवळ सरकारचा खजाना. त्यास उपसर्ग लागलियाने सरकारनुकसान फार आहे. दुसरें, फौज लूट करील, तत्रापि रोजमुरा सोडणार नाही. याजकरिता काडीमात्र उपद्रव न लागे असा पक्का बंदोबस्त करणे. रखवाली करवीत जाणे. ऐसे करितां जो ताकीदीस न ऐके, त्याचे पारिपत्य करावयाची मुरवत न धरणे. जाणिजे. छ १७ रमजान बहुत काय लिहिणे? लेखनसीमा.

पत्रांक १६३

श्री.
१६९७ श्रावण वद्य १०

पौ छ २८ जाखर श्रीवण वद्य अमावास्या मंदवार सीत सबैन.
जीशांद बुलंद मकान पंडित अजम माधव राउज्यूं दवांमश फकतहूं:-

आबुबाज बहज्यत व कामरांनी असावाब मुशिरथ व शादमानी हमबारा वररुए रोजगार मुशाफिक मेहरुबान सराफलुत्फ नली एहसान मज्या मैशीफात सितूद इसाफत कुशादा व अमदाबाद अजिंदील एखलास हानराव्येल उइलिम हार्नबी इस्कोयर प्रजिदेंत गोवर्नदोर जनराल जजीरे मुंबई बादजशरे शौक कींमा फौक बरामुतसवीर नेस्त मशाहुदराय शफकत पैराय आंकी. आं शौकत पन्हांहि मफाविजां ईबलाग फर्माविला तो अजदस्त आं शौकत पन्हांचे नौकर भिकाजीपंत रसीद होऊन लिहिला मजमून आयां जाहला.

आं हिशमत पन्हांहि तस्तीर केलें कीं, अमारत पन्हां अजम सखाराम भगवंत यांचे नांवें रसीद जाहलें. त्याची नक्कल आं शौकत पन्हांहि इंजानेवांकडेस पाठविली आहे, आणि आं शौकत पन्हांहि आपले तमाम सरदारांसही हूकूम कलमी सादर केली आहे कीं, इंग्रजाचे अहशामाशीं जंग अगर ईजा दरपेश न आणावी. तर बेहत्तर असे. आं हिशमत पन्हांचे नौकर मारिनिले भिकाजीपंत यांहीं आंहिशामत पन्हांचें नांवें इंजानेबास जाहीर केलें कीं सदरहू आं हिशामत पन्हांची हुकूम आपले सरदारांस सादर जाली आहे. ती पंडित अजम रघुनाथ राऊ पेशवे यांसीं व त्यांस जे तमाम मुस्तफिक आहे त्याजशिही तालुक ठेविते कीं, मशारनिले आं हिशामत पन्हांचे सरदारांहिं त्याचे फौजेसीं व त्याचे तमामदरी मुकदमीयांत मुताफिक आहेत यांजशीहि जंगदर पेश आणूं नये व तसदी देऊं नये. तर हे बात वाजीब आहे. सबब कीं, मोजुनइल्लेहि पंडित अजम रघुनाथराऊ पेशवे इंजानबाचे इफाजतेंत आहेत. अजहाल जैसें आहे तैसे कुलबजा राहील, ऐसाच आ शौकत पन्हाचा इरादा व मतलब आहे, ह्मणोन अजरुए यकीन. आं हिशामत पन्हांचे नौकर मारनिले भिकाजीपंत यांहीं इंजानेवास जाहीर केलें. तर इंजानेबाचें मजकूज खातीरहि तैसेंच असे. बिनाबरा इंजानेबाकडील अहशामाचें सरदार यांस लाजीम व वाजीब, तैसीं हुकूम इंजानेबीं सादर केली आहे. व दरख्वास्त करितों कीं, आं हिशामत पन्हांचे हुकुमाची मुताबियत अमलांत येई ऐशी आं शौकत पन्हांही खबरदारी फर्मावावी. तेव्हां इंजानेबांचा हुकूमहि जेथपावेतों करारदाद अमलांत येईतवलग बजजे एहसान मुताबियतींत येईल जिआदा. बजुज शोकचे ! मुतशद्यांशवब्द, आयाम बकामबाद. रा छ २२ शौहर

पत्रांक १६२

श्री.
१६९७ जेष्ठ वद्य १

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री बाबूराव दादाजी गोसावी यांसीः

सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार. सुा सीत सबैन मया व अलफ, चिकोडीकर देसाई यांचा ठराव हुजूर रा आपाजी शामजी यांचे विद्यमानें होईल. ठाणीं वगैरे राजश्री पांडुरंगराव गोविंद यांचे स्वाधीन लवकर करण्याविषयीं तुह्मांस पत्र पेशजीं गेलें आहे. त्याप्रमाणें हालीं ठाणीं वगैरे मशारनिल्हेचे स्वाधीन हुजरुन खिजमतगार पाठविले आहेत यांचे गुजारतीनें करून हुजूर लेहून सत्वर पाठविणें. दिरंग लाविल्यास परिच्छिन्न कार्यास येणार नाहीं. ठाण्यांत गोळी वाजविल्यास फौजेचा वगैरे पैका तुह्मांपासून सरकारांत भरून घेतला जाईल, हें स्पष्ट समजोन, ठाणी वगैरे स्वाधीन करणें. जाणिजे. छ २२ रावल, आज्ञाप्रमाण. लेखनसीमा. पो छ १५ राखिर जेष्ठमास, सी सीतसबैन.

                                                                                लेखांक ३८६

                                                                                                                                                            १५४० मार्गशीर्ष शुध्द १०                                                                                                                                                 
                                                                                 
श्रीमद्गलसत्य                                                     नकल

                                                                                                श्रीमुदगळ

श्रीशक १५४० काळयुक्त नाम संवत्सरे मार्गशीर्ष शुध १० वार आदितवार त्तदिवसि रामेस्वरभट गोसावियासि देउजी बिन रुपाजी व लुमाजी बिन कान्होजी मोकदम व समस्त मुख्य व बारा ही बळुते मौजे आरवि ळेहोन दिधळे ऐसे तुह्मास देवाचीया फुळझाडाकारणे तुमचीया घरामागे गावाचे उतरभागि नजीक गावकुप जमिन खडसर सरगायरान पडि नेपतियाचि झाडे तेथे ऐसी आहेति ते जमीनिचा महसुळ अथवा नकत बाब ता। ठाणे व ता। देहाये काहि येत नाही मुतळ खडसर गायरान आहे जमिन बिघे २० विस गज शरायणी हे भोये तुह्मास श्री र्पण दिधळे असे तुह्मी विहरि पाडुन देवाकारणे फुळझाडे व ज्जो झाडझाडोरा व जे पिक होइल ते व उस केळी व निबाणिया हर जिनस जे ते भोईस पिकेळ ते तुह्मी देवाप्रण दिधळे असे सुखे किर्दि करवेह ते करुन सुखे घेणे आवलादि व अफळादि ळेकुराचा ळेकुरी दीधळे असे यासि अनसारिखे करु तरि श्रीअण असे व आमचे पुर्वज्जाचि आण व भाक आसे हे ळीहिळे सही

                                          गोहि                                                     (नांगर)

विठळभट होसींग                                          चिमणभट कोहकणे *

महंमद आदिलशाहा ४ नोव्हेबर १६५६ त वारला, असें डफ म्हणतो. परंतु ज्याअर्थी तो २६ मोहरम १०६७ हिजरीस वारला, त्याअर्थी १५ नोव्हेंबर १६५६ हीच त्याच्या मरणाची खरी तारीख समजली पाहिजे. ग्रांट डफनें २६ मोहरम बद्दल १६ मोहरम तवारिखेंत वाचलें असें दिसतें.

ह्या पत्रांवरून विजापूरचे आदिलशाहा, जाउलीचा चंद्रराय मोरे व शिवाजी राजे भोसले, ह्या तिघांचा १६५६ त कोणत्या प्रकारचा संबंध होता तें समजतें. जाउलीचा चंद्रराय मौरे वस्तुतः विजापूरच्या आदिलशाहाचा मांडलिक होता. शिवाजी राजे भोसले हा आदिलशाहाचा सरदार जो शहाजी राजे भोसले त्याचा मुलगा असून, ह्यानें इ. स. १६४३ पासून १६५६ पर्यंत घाटमाथ्यावर स्वतंत्र सत्ता स्थापण्याचा उपक्रम केला होता. ही सत्ता पुण्यापासून रोहिडखो-यापर्यंत स्थापिल्यावर शिवाजीच्या प्रांताची हद्द चंद्रराय मो-याच्या राज्याच्या हद्दीला येऊन भिडली. चंद्रराय मोरे दिसण्याला यद्यपि आदिलशाहाचा मांडलिक होता, तत्रापि अलीकडील दहा पांच वर्षांत शिवाजीचें व इतर बंडखोरांचें अनुकरण करून तोहि स्वतंत्रपणेंच वागूं लागला होता. चंद्ररायाचे हे स्वतंत्र वागणेंच त्याच्या नाशाला कारण झालें शिवाजी बोलून चालून स्वतंत्र बंडखोर बनला होता आणि त्याच्या प्रांताला भिडून दर्शनी परतंत्र व वस्तुतः स्वतंत्र अशा चंद्ररायाचा प्रांत होता. स्वतंत्रपणे वागण्याचा उपक्रम केल्यामुळें व आदिलशाहीशीं संबंध अजीबात तोडून न टाकल्यामुळे चंद्ररायाची स्थिति अगदीं निराश्रित अशी झाली होती. अशा निराश्रित स्वातंत्र्येच्छु संस्थानिकांची शिवाजीशीं गाठ पडून, विजापुरांतील बलिष्ठ सत्तेचा आश्रय तुटल्यामुळे, चंद्ररायाचा नाश झाला. त्यामुळे विजापुरातील आदिलशाहांना राग किंवा दुःख बिलकुल झाले नाहीं उलटें, एक शिरजोर स्वातंत्र्येच्छु संस्थानिक नष्ट झाला हें पाहून, त्यांना प्रायः समाधानच वाटलें. नाहींतर विजापुरांतील सर्वश्रेष्ठ कारभारी जो दियानतराव तो शिवाजीला चंद्ररायासंबंधानें असें शांततेचें पत्र न लिहिता. विजापुरचा मांडलिक व संस्थानिक जो चंद्रराय मोरे त्याचा प्रांत शिवाजीनें घेतला, ह्या कृत्याचा अर्थ विजारपूरच्या पातशाहीवर शिवाजीनें हल्ला केला असा वस्तुतः होतो. हा हल्ला झाला असतां, विजापुरानें शिवाजीवर चालून जाऊन त्याला नेस्तनाबूद करावयाचें. परंतु तसें कांहीं एक न करतां, चंद्ररायाचा नाश झाला असतां, शिवाजीनें घेतलेल्या प्रांतांतील कोणते गांव चंद्ररायाचें व कोणते विजापूरकरांचे ह्या विषयीं विजापुरचा सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी जो दियानतराव तो शिवाजीचा मुजुमदार जो निळी सोनदेव त्याशीं वाटाघाट करतो. ह्या सामोपचाराच्या वाटाघाटीवरून असें अनुमान निघतें कीं, शिवाजीची स्वतंत्र सत्ता विजापुरकरांना ह्या वेळीं मान्य झाली होती व विजापूरच्या शिरजोर संस्थानिकांना शिवाजीने मारिलें असतां विजापुरकरांना त्याचें कांहीच वाटत नसे. ते शिवाजीच्या हालचालींकडे लक्ष एवढ्यापुतेंच देत कीं त्यानें आपल्या प्रांतांत कांही गडबड करूं नये. १६५६ पर्यंत शिवाजीनें मावळांत व कोंकणात जी धामधूम चालविली होती ती बंद करण्याला विजापूरकरांनीं म्हणण्यासारखी काहींच खटपट का केली नाहीं त्याचें बिंग हें आहे. अहमदनगरची निजामशाही बुडाल्यावर तिची वांटणी दिल्ली व विजापूर येथील पातशाहांनीं केली. पैकीं विजापूरच्या वांटणीस मावळातील व कोंकणांतील जो नवीन प्रांत आला त्यांत १६५६ पर्यंत शिवाजीनें खवडव चालविली होती. ह्या प्रांतावर विजापूरचा जसा अम्मल बसावा तसा बसला नव्हता व तेथील संस्थानिक व अधिकारी विजापूरच्या अंकित जसे व्हावे तसे झाले नव्हते. ह्या बेबंद संस्थानिकांना, किल्लेदारांना व अधिका-यांना शिवाजीनें नेस्तनाबूद केलें, हें विजापूरच्या मुत्सद्यांना एका प्रकारें इष्टच वाटलें. बेबंद व शिरजोर संस्थानिकांचा व किल्लेदारांचा शिवाजीनें नाश केल्यावर, शिवाजीची व्यवस्था लावतां येईल असा ह्या मुत्सद्यांचा अंतस्थ हेतू होता. ह्यामुळें १६५६ पर्यंत शिवाजीच्या विरुद्ध मोहिम करण्याचा उपक्रम विजापूरच्या मुत्सद्यांनीं केला नाहीं. परंतु १६५६ नंतर विजापूरच्या मुळच्या वाई, क-हाड वगैरे प्रांतांत जेव्हा शिवाजी शिरूं लागला, तेव्हां अफजलखानाला शिवाजीवर पाठविणें विजापूरकरांना अवश्य झालें. अफजलखानाच्या मोहिमेचा काय परिणाम झाला हे सर्वत्र प्रसिद्धच आहे. ह्या १६५६ पर्यंतच्या हालचालीवरून असें दिसते कीं विजापूरच्या मुत्सद्यांचीं मनें शिवाजीनें उत्तमोत्तम पारखिलीं होतीं.

पत्रांक १६१.

श्री.
१६९७ वैशाख शुद्ध ६

राजश्री सखारामपंत बापू गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंग गायकवाड दंडवत विनंती ती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल सदैव पत्रीं लेखन करून संतोषवीत असावें. विशेष. आपणाकडून पत्रें आह्मांस व साहित्याविसीं पत्रें अमदाबादकर ग्रहस्त व पित्रव्यास येत गेली तीं त्यांजकडे पावती करीत गेलों. साहित्याचा प्रकार आजपर्यंत प्रथम दिवस! त्यापैकीं आह्मीं कारकिर्दी ममतेनें पित्रव्याचे मुख्य पुत्र चिरंजीव राजश्री मल्हारराव गायकवाड आह्मांकडे आणिलें. तेव्हां अधिक शुद्ध द्वितीया-तृतीयांचीं युद्धें दोन जाहली. याज अलिकडे युद्धप्रसंग आजपर्यंत जाला नाहीं. आह्मीं बडोदें, खेड, पाटण प्रांतांची ठाणीं कायम करून, आपले लेख धैर्याविशीं येतात, त्याजवर दिवस काढितों. पुढें दिवस निघावयाचें संकट. हें पूर्वीं व हालींचे वर्तमान राजश्री दादासाहेबाकडील वगैरे, सविस्तर राजश्री बाळाजी नाईक भिडे यांचे पत्र लिहिलें आहे, त्याजवरोन कळों येईल. सारांश, मुरबीपणाचा सर्वस्वीं भरंवसा आपला आहे. त्याजवर असूं. विशेष ल्याहावेसें नाहीं. आपणाकडील साकल्यार्थ लिहून संतोषवृत्ती करावी. रा छ ४ माहे सवाल. बहुत काय लिहिणे? लोभ असों दिजे. हे विनंती-मोर्तबसूद.