Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०८ १५८२ आषाढ वद्य ७
(फारसी मजकूर)
बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल देसमुखानि पा। वाई मालूम बाद सु॥सन इहिदे सितैन अलफ दरीविला अमणभाट बिन दामोधरभट क्षीरसागर सेकीन मौजे एकबे पा। मजकूर हुजूर येउनु मालूम केले जे आपणासी इनाम जमीन चावर नीम .॥. दर सवाद मौजे मजकूर बर तरफ बि॥ विठोजी पटेल नजीक तरफ अंबाजी बगा + + + + + हीस सूर जमीन चावर बित .।.
तरफ विठोजी पटेल नजीक
गवदरी चाकर वार + + .।.
देखील माहासूल नकादयाती व जमीन लाजीमात व बेलेकटी व मोहीमखर्च व बाजे बाब व बेठ बेगार कुलबाब मर्हामत असे दरीबाब फर्माउन हुमायून व खु॥ होय मोखासाइयानि माजी व खान अफजलखान मरहूमी दर साल सन सीत खमसैन बतेरीख २५ माहे सौवाल सनद सादीर असे हाली पा। मजकूर साहेबासी मोकासा अर्जानी जाहले आहे साहेबी नजर इनायत करून सदरहू इनाम दुंबाला मर्हामत कराव्या रजा होय ह्मणौउनु तरी बराय मालुमात ऊ खातीरेसी आणउनु सदरहू इनाम जमीन चावर नीम ॥ दर सवाद मौजे मजकूर दुंबाला केले असे माहाली भोगवटा तसरुफात सालाबाद ता। सालगु॥ कारकीर्दी खा। अफजलखान मरहूमी चालिलेप्रमाणे दुंबाल (करून) दीजे हर साल खु॥चे उजूर न कीजे तालीक लिहून घेऊन असली परतून दीजे मोर्तब
तेरीख १५ माहे सफर
पौ छ १६ रबिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ शके १७१५. बुधवार ता. २७ दिसेबंर १७९३.
विनंती विज्ञापना, नबाबाची शरिर प्रकृती हैदराबादेंत होती त्याहून बेदरात आल्यानंतर कृशत्व अधिक. आलीकडे तर बहुतच क्षीण शरीर आहे. माकुवत, त्यांतून पांच सात दिवसां पासोन दस्तही दोन तीन होतात. या प्र प्रकृतीचा अहवाल आहे. रा छ, २२ रा।खर हे विज्ञापना.
श्री.
कार्तिक वा ९ बुधवार शके १७९५ ता० २७ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. ईसामियांकडील पहिलें तालुके ताडपत्री, ततबारी, सिंगणमला, येलानुर हे च्यार तगीर करून दिलावरुदौला गंजीकोव्याचा किले दार याजकडे सांगितलें. ईसामियां यांस हैदराबादचे सुभ्याचे तालुके नलगुंडा, देवरकुंडा व कोलीपाला वगैरे भवनगिरि सरकारसुद्धां सांगोन ईसामियां यांची रवानगी केली. छ. १९ राखरीं ईसामियां गेले. ईसामियां यांनीं टिपुस । कमरुदीखानास पत्रें लिहिलीं होतीं त्याचे जबाब सांपडले. दौलांनीं आह्मांस दाखविलें. याचा तपसील व पत्राच्या नकला पेशजी सेंवेसीं पाठविल्या. त्यास ईसामियां यांचें बोलणें दौलांसीं कीं “ हीं पत्रें खोटीं; याची तहकीक करावी. " दौलानीं तहकीक करितां पत्रें खरीं नाहींत. ईसामियांचा पहिला कारकुन व्यंकटराव बरतरफ केला. त्यानें अदावतीनें दरम्यान तुफान रचून पत्रें तयार केलीं. हीं खोटीं यैसें दौलांस समजलें. रा छ, २२ राखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक बा ९ शके १७१५. बुधवार ता• २७ दिसेबंर १७९३.
विनंती विज्ञापना. कामठाणें येयें शिकारगाहाकरितां जाण्याची तयारी नवाबांनीं केली. जागा पाहाण्या करितां दौला छ १५ राखरी गेले होते. मैदान धरून वाढा मोठा दिला. कमठाण्यांत लोकाचीं घरें होतीं तीं तमाम खाली करविली. दोन तीन हवेल्याही आहेत. त्या येक नवाबाकडे; येक दौलानीं आपल्यास, योजून ठेविल्या. कामाठी, बेलदार, मजुरदार लाऊन जाग्याची मरमत करविली. जागीरदार, मनसबदार, मुतसदी सरदार सर्वास ताकीद कीं कोणीं बेदरांत न राहातां आपलाले संरजामसुधां कमठाण्यावर येऊन राहावें, झडे नेऊन उभे करविले. नवाबाचे खैम व चोबी बंगला जाऊन उभा राहिला बरकडही लोकांचे डेरे, राहोय्या, पाले संरजाम कमठाण्यास गेला, वरचेवर जात आहे. वाड्याचे रखवालीस गाडद मुसारेहमु, व सैदउमरखां व अबदुकरीम कुमदान वगैरेस हुकुम पोहचला. चराईस आसपास हाथी व उंट व बैल होते ते आणविले. काहीं आले व येतात. सरदारजागीरदारासही हुकुम असाच कीं आपलाले स्वार जेथें असतील तेथुन आणून जमा करावे. स्वारगाड्याची मोजदादही कमठाण्यावर पाहावयाचा बेत आहे. याउपरी नबाब निघोन डेरे दाखल होणार. याची तपसीलें विनंती लिहिण्यात येईल. रा छ, २२. राखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ बुधवार शके १७१५ ता० २७ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग याचा पता लावित भारामल ह्मैशा पावेतों गेले उमरखेडकर कमा विसदाराचे दोन कारकुन भारामला सभागमें आहेत. त्यांस ही निकड कीं शकंराव याचा पता लाऊन देण्याचा जिमा तुमचा. त्या प्रा पता लाऊन देणे. त्यावरून शोध लावितां शंकरराव याची बायको व जवांहिराचे डबे दोन व सनगे पोषागियाचे पेटारे सांपडले. डबे व पेटारे भारामल यानीं दौलांकडे पाठविलें. सदरहु अन्वयें मारही मारामल यांनीं दौलास लिहिला. शंकरराव अद्याप सांपडला नाहीं. पुढे होईल त्या प्रा विनंती लिहीन. शंकर नाईक नागपुरास गेला याजकरितां भोंसल्यांस पत्रें जावीं, आणि त्यांजकडील कारभारी पुणियांत आहेत त्यांस ताकीद व्हावी ये विषई पेशजी नवाबाचे आज्ञे प्रमाणें दौलानीं सांगितलें त्याची विनंती पूर्वी लिहिली, त्याविसीं आज्ञा जालीच असेल. राछ २२ माहे राखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ बुधवार शके १७१५. ता० २७ दिसेबंर १७९३.
विनंती विज्ञापना. अजिमुदौला यांजकडील नरसिंगराव व खानसामा वगैरे लोक सांपडले ते यै (औ,) रंगाबादेहुन चिमणा राजे यांनीं येथें पाठविले. त्यांस कैद करून बेदरचे किल्यांत दाखल केलें. या छ २२ माहे साखर हे विज्ञापना.
श्री.
कार्तिक वा ९ बुधवार शके १७१५. ता० २७ दिसेबंर १७९३.
विनंती विज्ञापना. नवाबास राव सिदें याजकडून घोडे आरबी दोन व काठेवाडी दोन (व) येकुण च्यार; व गुलकंद व गुलाब वगैरे जिंनसे आला. या समंधे बाबाराव यांची अर्जीसहित हरराव यांनीं छ २० राखिरीं दौलाचे विचारें गुजराणिले. राछ २२ राखिर हे विज्ञापना. सिंयांनीं पाठविली किंवा कल्याणराव यांनी विकत घेऊन पाठविली याचा संशय आहे. शोध करून लिहितो. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा। ९ बुधवार शके १७१५. ता० २७ दिसबंर १७९३.
विनंती विज्ञापना. अजिमुदौला प्रकर्णी नवाबांनीं सरकारांत पत्रें पेशज रवाना केलीं. त्यां अन्वयें व राव सिंदे यांसही पत्रें पाठविलीं. त्याचा जबाब खरीता पत्र सिदें यांजकडून आलें ते दौलांनीं नवाबास वाचून दाखविलें. मी समीप होतों. पत्रांत मारकीं “ आजिमुदौला जेथ पावेतों गेला असेल त्याची तहकीक करून हस्तगत करावा. त्यास, आजिमुदौला कोणते मार्गे गेल्याचें अद्याप समजलें नाहीं. ज्याबण्या तालुकदारास ताकिदी पाठविल्या आहेत, कीं जेथें सांपडेल तेथें अटकाऊन पाठऊन द्यावा. या बमोजाब पत्रें सर्वांस रवाना केलीं आहेत. " या प्रा मार, राजश्री कल्याणराव व बाबाराव यांच्याही अर्ज्या आंल्या, त्या हरराव यांनीं गुजराणिल्या. बाबाराव यांनीं लिहिले आहे कीं “पुणियास पोंहचुन राव सिदें याची भेट जालीं. या प्रा लिहिलें.' रा छ २२ माहे राखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ शके ७१५. बुधवार ता० २७ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. टिपुसुलतान यांस दौलांनी आपलें तरफेनें पत्र तयार केलें, त्याचा मसविदा नवाबास मी समीप असतां वाचून दाखविला. त्यांत मारकीं, “ तिसरे किस्तीचा यैवज तुह्मीं कडप्यास पाटविला, तो घेऊन अ. ह्याकडील फलाणा शक्ष कडप्यांत होता. त्याजपासीं रसीद यैवजाची आमीं पाठविली, ते त्यानें दिल्ही. आपल्यापासी येऊन पोहोंचलें. दुसरे बल्हारी, उमरगोड, तलालकोटा व सिंगणमला वगैरे तालुक्यांतील कितेक गांव आपले तशरुफांत आहेत, ते इकडील अमीलाकडे वागुजास्त करावयाची ताकीद आपलें तालुकदारास निक्षुन यावीं की, हरगीज खलाल न राहे. या अन्वयें पत्राचा मा नबाबांनीं पाहुन बेहतर आहे यैसे सांगितलें, रा। छ. २२ माहे रावर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ शके १७१५. बुधवार ता० २७ दिसेबंर १७९३.
विनंती विज्ञापना. लाड बाहादुर व मिस्तर सरज्यान, षोर यांची दोन तीन पत्रें नवाबास थैल्या आल्या. त्या मिस्तर किनवी दिलावरजंग यांनीं नवाबास आह्मीं जवळ असतां गुजराणिल्या. पत्रें खोलून वाचून पाहिलीं. लाड बाहादुर यांचे पत्रांत मारकीं, “ मी कलकत्याहून जाहाजांत स्वार होऊन विलायेतीकडे गेलो. त्या मजवर आपली ममता व दोस्ती येखलास होती, त्याच बमोजीब दोस्तीचा सिलसिला मिस्तर सर ज्यान षोर गौरनर माझे जागीं आहेत, त्यांसी असावा." व ज्यान षोर याचे पत्रांतील मार कीं “ लाड बाहादुर कलकत्याहून निघोन जाहाजांत बसोन विलायेती कडे ( गेले?) गौरनरीचे अधिकारावर मी आहे. लाड बाहादुर यांसी दोस्ती व येगानगत आपली त्याहून ज्यादा तरकी असावी'' याप्रों दोघांकडील पत्रातील मार. राछ २२ राखरहे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ शके १७१९. बुधवार ता० २७ दिसेबंर १७९३.
विनंती विज्ञापना, नवाबांनीं सरकारांत पारसी पत्र लिहिलें. त्याचे हिंदंवी तरजुम्यांत कांहीं शब्द संग्रहार्थाचे आहेत, त्याचा खुलासा अर्थ ध्यानात येण्याकरितां विनंती कीं:--
१ “या मसाविद्यांत" असा शब्द जागा जागा आहे. त्यास सरकारांतुन दाफातीचा मसविदा ठरून मालिटाकडून यांजकडे आला. तो मसविदा लाडाकडून साता दफेची याद आली, त्यासी यांनीं मुकाबिला करून कमज्याद निवडून काढिलें, त्याचा दाखला पुरण्याकरितां या मसविघांत एसा शब्द आलें “ “हामसविदा " ह्मणजे सरकारांतून ठरला तो.
१ " वंश परंपरा " याचे पुढें “ कायम मकाम येक दुस-याचे" हा शब्द आहे. याचा अर्थ असा कीं, येंक अधिकारी तगीर होऊन त्याचे कामावर दुसरा होणें, त्यास कायम मकाम असें ह्यणाचें. यांस दृष्टांत जसे लाड बहादुर जाऊन त्यांचे स्थलीं मिस्तर ज्यान षोर नवा जनराल आला या प्रमाणें.
१“पलटणें इंग्रजांची सरकारांत दरखांस्तीचें कलम” याजगी “हा जाबसाल इग्रंजासीं तालुक. अम्हांसी इलाका नाहीं." ऐसें यांनी लिहिलें. यांचें तात्पर्य कीं, हा तहनामा तीन सरकारासीं; व तिन्हीं सरकारांतुन परस्परें देणें घेणें तेंव्हा तीन सरकारास समान तसें कलम तहनाम्यांत असावें. पलटणाचे दरखास्तीचा प्रकार इंग्रजासीं. त्या अर्थी फक्त इंग्रजासींच तहनामा असता तर हें कलम नीट. तीन सरकारां मिळोन तहनामा होणें, यांत याचें प्रयोजन नाहीं. असा यांचे लिहिण्याचा खुलासा. रा छ २२ माहे राखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १३७ ] श्री.
° श्री ˜
सामंतकुलेशोभानु-
र्मागलाख्यमहेश्वर: ।
नागसामंतमुद्रेयं जन-
भूत्यै विराजते ।।
राजश्री पंत अमात्य गोसावी यासीः - सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।।
नागसावंत भोसले सरदेसाई प्रांत कुडाळ व महालनिहाय रामराम येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे विशेष. आपण पत्र पाठविलें पावोन बहुत संतोष जाहला व रा. धोंडोपंत व रा. नरसिंगराऊ जाधव हे उभयतां आले त्याणींही कित्येक ममतायुक्त आपलीं वचनें सागितलीं. त्यावरून चित्ताचे ठायीं हर्षोत्कर्ष जाहला ते पत्रीं लिहितां पुरवत नाहीं. आपला आमचा स्नेह अकृत्रिम चालत आला, त्याची वृद्धि होऊन दिवसेंदिवस स्नेह अधिक चाले तो अर्थ केला पाहिजे. यानंतर मनसबेचा अर्थ चित्तांत आणून आपल्या पत्रावरून आवाडेहून कूच करून हेरेस आलों तों आपलीं पत्रें आलीं. त्यामध्यें दिरंग दिसोन आला. त्याउपर मनसबा योजावा तर प्रजन्य समीप येऊन दिवस थोडके राहिले. तेव्हां सहजच प्रस्तुत कालें मनसबेचा अर्थ राहिला. त्यांतून उभयपक्षीच्या भेटीही राहिल्या बरें ! जेव्हा उभयपक्षी चित्ताचे ठायीं दुसरा अर्थ कदाप नाहीं तेव्हां समयोचित भेटीही होतील. मुख्य गोष्ट चातुर्मास प्रजन्य काल. तो जातच आहे त्याउपर दुसरें कारणें उभयपक्षीं भेटी होऊन जो मनसबा करणें तो पोक्ताच करावा यदर्थीचा कितेक मजकूर रा पंत मा। यास स्वमुखें सांगितला असे. ते अनुक्रमे आपणास निवेदन करितील त्यावरून कळो येईल राजश्री सभाजी आंगरे सरखेल याजकडे आह्माकडील भला माणूस व पत्रें पाठवावीं ह्मणोन आपण सागोन पाठविलें. त्यावरून हाली पत्रें पाठविलीं आहेत. पुढां आपले विचारें रवाना करून दिलीं पाहिजे. मुख्य गोष्ट, आपण आह्मास कोणही प्रसंग अनकूल करून द्यावा ऐसें चित्तीं जाहलें तेव्हां सर्व भरीभार आमचा आपणाचवर आहे त्यास पत्रें लिहिली आहेत त्याचें समर्पक उत्तर आलेनंतर येथून भला माणूसही पाठवून देऊं घडीघडी पत्र पाठवीत असावे वरकड कितेक मजकूर पंतमशारनिलेजवळ सागितला असे. बहुत काय लिहिणें हे विनंति
विलसति
लेखनसीमा.