Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता २० दिसेंबर १७८३.

विज्ञापना येसीजे. येथील वर्तमान ता। छ १० माहे जाल मंदवार पावेतों अखबार पत्रीं लेखन करून सेवेसीं पत्रीं रवानगी केली. त्यावरून ध्यानास आलें असेल. तदनंतर येथील वर्तमान, छ मारीं प्रात:काळीं नवाब बेदार जाले. असीलास दौलाकडे पाठऊन त्यांचें तबियतीची खबर आणविली. तीन घटिकां दिवसां नवाब स्वार होऊन जनान्यासहित शिकारीस गेले. शिकार जाली नाहीं. दोन प्रहरास डे-यास आले. रात्री खैर सला. छ. ११ रोज रविवारीं दिवसां दरबार जाला नाहीं व नवाब शिकारीसही गेले नाहींत. दौलाची तबियत फार अस्वस्थ होती, त्याची खबर वरचेवर असीलासीं आणवीत होते. मीर आलम व हाकीम महमदमाखां उभयतांस त्यांजपासी नेहमीं असावे. या प्रा। हुकुम जाला. छ १२ रोज सोमवारीं दोन घटिका प्रथम दिवसां नवाब सवार होऊन जनान्याचे बंदोबस्तापहित शिकारीस गेले. शिकार जाली नाहीं. त्यानंतर येदलाबाद ह्मणोन येक गांव आहे तेथें स्वारी गेली. पाटलाचे बायकोनें स्वयंपाक करून अन्न आणिलें तें घेऊन तिजला इनाम द्दिल्हा. येक प्रहर च्यार घटिकेस डे-यास आले. दौलाची खवर अशीलास पाठऊन आणविली. रात्रीं खेरसला. छ १३ रोज मंगळ. वारीं पांच घटिका प्रथम दिवसां खावगामधें नबाब बरामद जाले. दौला जवळचे वाटेनें म्यान्यांत बसोन आले. त्यांनीं नजर केली. पांच सांत इसमांचा सलाम जाला, दौलांसी क्षणभर बोलोन त्यांस वाटे लाविलें. नबाब साहा घटिकेस स्वार होऊन शिकारीस येदलाबादेकडे गेले. दोन प्रहर तीन घटिकेस डे-यास आले. दौलाचे प्रकृतीची खबर आणविली. रात्री पांच घटिकेस नबाब बरामद जाले. सरवुलंदजंग व घासीमियां व अजमखां वगैरे इसमांचा सलाम जाला. दिलदारखां व मुरादअलीस हुकुम जाला जे दोन चित्ते घेऊन वाड्याबाहेर हरणाची शिकार करून घेऊन येणें. चोबी बंगला दौलाचेथें उभा करण्याची ताकीद जाली. येक प्रहाराचे अमलांत बरखास जालें. छ १४ रोज बुधवारीं प्रातःकाळीं दौला चेथें चोबी बंगला उभा राहीला. त्यांनी फरास व कामाठी नवाबांकडील यांस इनाम शंभर रु. दिल्हे. दोन घटिका दिवसां नवाब जनान्यासुधां स्वार होऊन अमलापूरचे जंगलांत शीकारीस गेले. भोजनादि तेथेंच होऊन दोन प्रहर दोन घटिकेस डे-यास आले. दिलारखान व मुरादअली यांनी वाड्याबाहेर च्यार हरणांची शीकार करूर गुजराणली. दौलाची तबियत कांहींसी स्वस्थ जाली ह्मणून राज्याजी, रोशनराये, समशेरवंत वगैरे त्यांचे लोकांनी त्यांस नजरा केल्या. रायेरायां याचे बंधू अप्पाराव कुटुंबासुद्धां माहुरची यात्रा करून आले. याचा अर्ज जाला, रा। छ १६ माहे जावल हे विज्ञापना.

छ २४ जावलीं डांकेवर पुण्यास
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९२.
श्रीमंत रावसाहेब यांस छ. २४ चे मामुली हवाल्याचें पत्र

श्री.
मार्गशीर्ष वा २ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९२.

विनंती विज्ञापना, राजश्री कल्याणराव व वावाराव यांचीं, यत्रै दौलास आली. ती हरराव यांचें विद्यमानें गुजरलीं. पत्रें वाचते समई मीर आलम व महमदमाखां जवळ होते. बाबाराव यांनी लिहिलें मीं पुणियास आलों. मदारुलमाहाम यांची भेट जाली. सविस्तर मार सांगितला. त्यावरून बहुत संतोष जालें. सांप्रत आपण हजरत सुधां शिकारगाहास आल्याचें ब भोंस. ल्याकडील विठलपंत सुभेदार यांची तफैन दोस्ती भारामल यांस लिहून राखविली याचाही मार यैकुन खुप झाले. पुढें परस्परे भेटी व्हावयाचाही बयान केला. त्याजवरुन मदारुलमहाम यांचे ह्मण्यांत बेहेतर आहे इत्यादि मार होता. हे यैकुन दौला निजले होंते ते थटकरुन उंठोन वसले, आणि बोलले की "आह्मीं कोठें नको ह्मणतो ?" या प्रा। आवेश येऊन बोलले. याजवर मीर आलम बोलले कीं ह्या सर्व गोष्टीं गलत आहेत. रात्र मार यांची प्रकृत दुरुस्त नाहीं. तेव्हा हे जाबसाल काय करतात. या प्रा मीर आलम बोलल्यानंतर दौला उगीच राहिले. हें वर्तमान युक्तीनें खाचित समजलें. सबब विनंती लि।। असे. रा छ १६ माहे जावल हे विज्ञापना.

श्री.
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९३

विनंति विज्ञापना. हषमतजंग याचा जागीर वजीरखानाकडे सांगितली. जंगाचे जातीस भातांबरे वगैरे गांव आहेत. तेथे जंग आजपर्यंत होते. सांप्रत जंगांनीं नवाबास अर्जी व दौलास पत्र पाठविलें कीं माझी भिजास दुरुस्त नाही. याजकरितां हुकुम जाल्यास हैदराबादेस जाईन, या प्रा। पत्रें आलीं. याचा जबाव नबावांनीं पाठविला कीं तबियतीस इलाज करण्याकरिता तुम्हीं हैदराबादेस जावें. यावरून जंग भातांबर याहून निघोन छ १३ रोजीं मैलारास आले. छ १४ रोजीं तेथेंच मुक्काम जाला, आज उद्यां बेदरास येणार. शर्मुदौला यांची भेट घेऊन हैदराबादेस जाण्याचा निश्चय जाला. रा। छ १६ माहे जावल हे विज्ञापना.

श्री
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. चेनापटणाहुन व्यंकटरामदिला यांजकडुन अखबार आली. ते सेवेसीं रा। केली आहे. राजश्री गोविंदराव भगवंत प्रविष्ट करतील. उत्तरें रवाना करण्यास आज्ञा जाली पाहिजे. रा। छ, १६ माहे जाणवल हे विज्ञापना.

लेखांक ११०                                                                                                                                    १५८३ श्रावण शुध्द १२
                                                                                                            
                                                 63          110

अजरखतखाने खुदायेवंद खान अलीशान खाने अजम शर्जाखाने साहेब तुली दयाम दौलतहू बजानीब कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा। वाई बिदानंद सु॥ इसने सितैन अलफ दरीविले बेस्मी नरसिव्हभट बिन रगभट चित्राऊ हुजूर येऊन मालूम केले जे आपणासी इनाम जमीन चावर .. नीम दर सवाद मौजे पसरणी थल वाकेवाडी नजीक सिदनाथवाडी वाट माभलेस्वर दो। माहासूल व नखतयाती व खा। गला व सारा व बेठीबेगारी फर्मायेसी व बैलकडी व मोहीमपटी व घीउ ता। ठाणा व ता। देहाये बा। खुर्दखते वजीरानी मुकासाइयानी माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती सालाबाद चालिले आहे हाली पा। माळूर साहेबास मुकासा अर्जानी जाला आहे माहाली कारकून ताजा खुर्दखताचा उजूर करिताति तरी साहेबी नजर यैनायत फर्माखत मर्‍हामत करावया रजा फर्माविले पाहिजे ह्मणौऊनु तरी बराये मालुमाती खातिरेसी आणौऊनु सदरहू इनाम जमीन चावर .. नीम दर सवाद मौजे मा। पा। मा।कुर दो। माहासूल नखयाती व बाबा बाये सदरहू प्रमाणे बा। खुर्दखते वजीरानी मुकासाइयानी माजी कार कीर्दी दर कारकीर्दी भोगवटा तसरुफाती सालाबाद ता। सालगुदस्ता चालिळे असेली तेणे प्रमाणे दुमाला करून चालवीजे अवळाद व अहफवाद चालवीजे दर हर साळा ताज्या खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लेहौनु घेउनु असेली इनामदार मजकुरास फिराऊनु दीजे पा। हुजूर मोर्तब सूद

                                                                                                                                                                                                                              72 1
                                                                                                                                                                        रुजू सुरु -
                                                                                                                                                                         निवीस

तेरीख १०                  माहे जिल्हेज
जिल्हेज

 

पौ। छ १७ माहे मोहरम

सर्जाखान दुमाल मिसेल

 

[ १३९ ]                                श्रीविठ्ठल.                                         
                                         
°  श्री  ˜
                                      सामंतकुलेशोभानु-
                                     र्मागलाख्यमहेश्वर:।
                                     श्रीनागसामंतमुद्रेयं 
                                     जनभूत्यै विराजते।।

राजश्री पंत अमात्य हुकमतपन्हा गोसावी यांसीः --
1 सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। 
नाग सावत भोसले सरदेसाई प्रां । कुडाळ व महालानिहाय रामराम विनति येथील कुशल जाणून स्वकीयानद लिहित असलें पाहिजे. विशेष बहुत दिवस क्रमोन पत्र पाठविलें आढरे परसोन श्रवणे चित्त सतोषाते पावून समाधान वाटलें याचप्रमाणे प्रतिक्षणी साकल्य वृत्त लिहून सतोषाभिवृद्धि केली पाहिजे. यानतर महाराज राजश्री स्वामींनी उभयताकडील सौरस्याचा मजकूर लिहिला. अक्षरशा श्रुत जाहाला त्या कर्तव्यें एकसा विचारें जे आपणाकडील विवेक होऊन आला नाही हेच आह्मास अयुक्त वाटलें . बरें । आपण राज्यभारी, कर्ते असा तोही प्रसंग आपले चित्तानुरूप होऊन येईल. ते गोष्टीचे अगाध काय असे ? रा संभाजी आंगरे यांची व आपली भेटी जाहाली. बोली चाली व्हावी ते पूर्वी सुचविलेप्रमाणें जाहाली असली तर बहुत उत्तम गोष्ट घडली. जो विचार आमचे चित्ती आवश्यक होता तो संपादिला ते युक्तच गोष्ट केली बोलीचा मजकूर तरी - आपण सुज्ञ लोक आहा, तेथे सांगणें अगर लिहिणेंसे काय आहे ? मुख्य गोष्ट जे, उभय पक्षी, विवेक जाहाला. तेव्हा सर्वही मामला उत्तमच होऊन येईल. इलाचीबेग यांकडील काय वर्तमान लिहावें ह्मणून लिहिलें. तर निजामनमुलकाकडून बेळगाऊंचे किलेबारीस फौजदार होऊन जागा येऊन दाखल जाहाले. आह्मासही स्नेहभावयुक्त येताच पत्रें आलीं होती. चातुर्मास क्रमलेनंतर त्यांची कितेक मनसबे करायाची उमेद आहे. अगोदर फौजेचीही तरतूद करीत आहेत मालवणकर याकडील विचार लि।। त्यास त्या ह्मामध्यें कटकट माडिली आहे किल्लेस रा। शिवाजीपंत कारकून मख्तसर आहेत त्यांचीं आह्मांस पत्रें आलीं कीं, तुह्मीं आह्मीं मिळून मनसबा करावा, प्रस्तुत जमाऊ पाठवणे ह्मणून लि।। त्यावरून तेथें जमाऊ पाठविला आहे हमेशा स्वारी शिकारी करून पायबंद लागला आहे महादाजी अनंताचा मजकूर लि ।।. बरें । त्यांचें अगत्य कोणतें आहे ? उभय पक्षी भेटी होतील तेव्हां त्याचेही पारपत्य केले जाईल भेटीचे प्रसगाबद्दल अगोदर भाद्रपदमासी रा। माद पाध्ये यास पाठवितो असें लि।। बहुत बरें । सर्वही एकीकडेस ठेऊन आधीं भेटी व्हावी हाच इत्यर्थ आहे एतद्विषयी दुसरा विचार किमपि नाही भाद्रपदमासीं त्यास आधीं पाठवावें. तैसेच आपलं भेटीचा लाभ होऊन पुढील कर्तव्यता जे करणें ते आपले विचारें केली जाईल प्रस्तुत धुळाजी यास पाठविले. सांगता कळो येईल मागून भला मनुष्य पाठवितों आपले विचारास येईल तरी समागमें मजुरा देऊन पुढें आगरेकडे रवाना करावे मुख्य गोष्ट आपली भेटी व्हावी हा हेत आमच्या चित्ती भेटी होऊन येई तेव्हां मनाची निशा होऊन स्वस्थता दिसेल. बहुत काय लिहावें विनति.
                                                                             विलसती
                                                                             लेखनावधि.

श्री
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेबर १७९३.

विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग यांजकडील तालुका इंदुर, बोधन वगैरे काम व्यंकटराव सुरापुरकर यांचे पुत्र त्रिमलराव यांजकडे सांगितलें. मारनिलेनी दौलास पत्र लिहिलें त्यांत मा।र की पा। वालकुंडा येथील जमीदार दयारडि याचा पैगाभ७ आलाकीं शंकरराव याची चीजबस्त कांहीं मजपासीं आहे ती मी देतो; व मुचालका लेहुन देतें कीं यासिवाय चीजवस्त आपले आंगीं लागल्यास दुपट देईन. कौल यावा, भेटीस येतों. दुसरें, भोंगाकडील कारकुन हणमंतराव ह्मणोन येथे कैदेंत आहे. त्याचे विद्यमानें भोंगाकडिल पैगाम कीं मजला सरकारचा कौल आल्यास मी येतों. या प्रा। लिहिलें आलें. याचे जबाब दौलांकडुन त्रिमलरायाकडे गैले की दयारडीस कौल पाठऊन आणवावें. चीजबस्त असेल ते घेऊन मुचलकाही सदरहु प्रा। घ्यावा. त्याचे तालुकियाचें काम त्याचे हातें घ्यावें, भोंगाकडील पैगाम प्रमाण नाहीं. तुह्मीं हणमंतगव यासीं वचनीं गुंतूं नये. तो कैदेंत आहे तसाच असावा. याप्रा जबाब गेले. रा। छ, १६ जावल हे विज्ञापना.

श्री
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता० २० दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. भारामलाकडील पत्रें दौलास आली. त्यांत माराकिं "शंकरराव भोंग याचे ठिकाण लागत नाही. त्याचे भाउबंद व चीजवस्त कोठें कोठें याचे तलाशांत आहों. या प्रांती मुफसद नाईकडे यांचा हंगाम भारी याचे तंबीविषईं आज्ञा जाहल्यास उद्योग करू. मावजी ना सोईटकर टेंभुरदरा ह्मणोन उमरखेडचा गाव येथें आहे. तेथुन उमरखेड व सोईटावर स्वारी करणार. याजकरितां टेंभुरद-यावर मीं फौजसुधां जातो. तें जागा बेलाग आहे. भोंसले यांजकडिल विठलपंत सुभेदार वासीमा पासोन पांच कोसांवर जमियतसुधां माहुरचे रुखानें आहेत, त्यांचे फौजेसीं आह्मासीं फांसला पंचवीस कोसांचा आहे. त्यांनी आह्मी इत्यफाकानें राहुन मुफसद२ नाइकडे आदि करून यांचे तंबी विषंई तफैन मदद मावला करण्याचा ईर्षादे   त्या बमोजीब त्यांचा आमचा नविस्त. खादंज्यारी कुमकहीं परस्परें होत आहे. बिलफैल सुभेदार नाइक ह्याचा शोध लाऊन तंबी करितात. या प्रांती फौजाचे भयानें मुफसद कितेक मकानें खालीं टाकुन फरारी जाले आहेत. त्या गढया साफ करण्याचा उद्योग सुभेदाराचा आहे. आज्ञा येईल तसी वर्तणुक होइल. या अन्वयें पत्रातील मजकुर दौलांनी यैकुन राज्याजीस याचा जबाब देण्याचें सांगितलें. जबाब काय दिल्हा हें शोध लावलियावर मागाहुन लिहिण्यात येइल. रा। छ, १६ माहे जावल हे विज्ञापना.

 

श्री.
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. कमठाण्यास दाखल होऊन येकवीस दिवस जाले. सैरषिकार आलीकडे दौलाचे मिजाजमांदगी खाले दिवस गेले. मागती बेदरास छ १७ अगर छ १९ रोजीं येण्याचा बेत होता. परंतु तो राहिलासा दिसतो. नवबाचें मानस व माहालांतुनही बेदरास यावे यैसा निश्चय होता. दौलाचा अर्ज कीं येथून फिरोन बेदरास माघारे जाण्यांत कुलयात बिघडती. यास्तव महिना पंधरा रोज कमठाण्यावरच राहावें. पुढें विचारासारखी तजवीज, असेंही वर्तमान आहे. यैकिल्यात येतें. बेदरास येण्याचा गुलबांग दाट होता. तो तुर्त दिसत नाहीं. मागाहुन जसें ठरेल तसी विनंती लिहीन. रा। छ. १६ जावल हे विज्ञापना.

श्री.
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. दौलाची मिजाज मांदगी. सबब नबाबांनीं मीरअलम व हकीम महमदमाखां यांस नेहमीं जवळ राहुन दवा देत जाणें यैसी ताकीद केली, त्या प्रा उभयतां त्याजपासींच असतात. असीलास पाठउन घटके घटकेचे वर्तमान आणवितात, नवाबांनीं आपला चोबी बंगला दौलाकरितां पाठऊन फरासाकडुन त्यांचे मकानीं उभा केला. तेथें दौला आहेत. हाकीम महमदमाखां यांस पांच हजाराची जागीर देण्याचीही योजना जाली आहे. रा।छ १६ जाहल हे विज्ञापना.

श्री
मार्गशीर्ष व. ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. दौला छ ६ जावल मंगळवारी शिकारीहुन आल्यापासोन त्यांची तबियत बेआराम. पाठींत वायुचा दर्द; आर्मी ज्वर, याचे उपशमनार्थ महमदमाखां हाकिम यांची दवा मीरअलमजवळ बसोन दोन तीन दिवस हेंच जालें. दरबारची मनाई होती. छ, १० रोज शनवारी दौलांस कांहिंसें स्वस्थ वाटुन मर्दाना केला. रावरंभा व राज्याजी व नवबाचे मुनशी व अर्जबेगी यांस बोलाऊन घेतले. आह्मी कोल्हेरपंत यास पाठविलें. तेही जाऊन वसले. दौलांनी आपले प्रकृतीचें वर्तमान सांगितलें. "शरीर भोग आहे, दोनच्यार दिवसांत स्वस्थ होईल " याप्रा बोलले. येक घटका पर्यंत सदरहु मंडळी होती. त्यानंतर लोक आपलाले जागीं आले. दुसरे दिवसीं दौलाचा परामर्श करून यावें यास्तव प्रातःकाली आह्मी गेलों. बाहेरील कचेरींत मरिअलम व हाकीम व नबाबांचे जावई वगैरे लोक होते. रावरंभादि आले. तेथेंच सर्व बसोन दौलाकडे आंत खबर पोंचविली. त्यास शनवारचे रात्री पासोन दौलाची प्रकृत फिरोन बिघडली. प्रातःकालीं बहुत विकल; शरीरी ग्लानता बेहोष, नबाबांनी सांगीन पाठविलें कीं, कचेरी व लोक मेळऊन बसों नये, येहतीयात असावी. मीरअलम महंमदमाखां यां उभयतांस मात्र जाण्याची परवानगी. वरकड सर्वत्रांस मनाई. याप्रा बंदोबस्त जाल. मीरअलम व हाकीम दोघे दौलापासीं क्षणभर जाऊन हाकिमानें तबियत पाहुने अवषध दिल्हें, आणि उभयतांही बाहेर आले. दौला कांहीं शुद्धीवर नव्हते अशी अवस्था मीर अलम व हाकिमांनी तबियतीचा अहवाल सांगितला.इतकें तेथे होऊन तेदिवशी दौलाची गांठ न पडतां सर्वत्र आपलाले स्थळास आले, तो दिवस रात्र दौलाची प्रकृत अस्वस्थ. कोणाची वारयाबी नाही. दुसरे दिवशी दोन प्रहर पावेतों तोच प्रकार. मीर अलम व हाकिम दवा देऊन आले. अस्तमानीं कांहीं स्वस्थ होऊन राज्याजी, समशेरवंत व रोशनराव यांस अर्ध घटका बोलाऊन घेऊन भारामलाकडील पत्राचे जाब लिहिण्यास सांगितलें. छ १३ रोजी नबाबांनी शिकारीस जाण्याची सिद्धता केली. बराबद जाले. दौला जनान्या चे वाटेनें म्यान्यांत बसोन नवाबांपासीं गेले. डे-यांत दौलांस नबाबांनी त्यांचे तबियतीचें वर्तमान विच्यारिलें. यांनी अर्ज केला, नजर गुजराणिली. मीरअलम व हाकिम व राज्याजी व आह्मांकडून कोल्हेरपंत हे तेथें ते समईं होते. येक घटिकेंत याप्रा होऊन दौलांस निरोप दिल्हा. आपले मकानीं आले. नवाब स्वार होऊन शिकारीस गेले. दौलाची मिजाज छ मारीं स्वस्थ कांहींशी जाली. छ १४ रोजी दोनप्रहरपर्यंत बरेच होते. मागती प्रकृत बे आराम या प्रा यांचे भिजाजीचा अहवाल दिवसांत फेर दुसराहोतो असें आहे. याजवर प्रकृत फिरोन जशी डौलास येईल त्याप्रा विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल. रा। छ १६ माहे जावल हे विज्ञापना.