Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
श्रावण शुद्ध १३ सोमवार शके १७१५
मोहरम छ ११ रोज, मालोजी कीरपंत यांनीं मागितल्यावरून दिल्हें.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:-----

पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें. विशेष, राजश्री मालोजी कीरपंत धारासिवकर हे तुह्माकडे पुण्यास येतील. त्यांजजवळ पेशजी तुह्मास व राजश्री हरिपंत तात्यास पत्रें दिलीं आहेत, त्याप्रा यांचे रोजगाराची सोय करून द्यावी. हालीं मालोजीचा भाऊ नारायणराव कीरपंत यानें बालेघाटीं जभीयेत करून दंगा केला. याचा बोभाट पुण्यास गेला. सबब मालोजीं कीरपंत तेथें आल्याउपारांतीक हा नारायेणरायाचा भाऊ ह्मणोन यास सरकारांतून वगैर तगादे करतील. त्यास मालोजी भाउ. परंतु उभैतांच्या तीन च्यार पिढ्या गुजरल्या. व येके जागांही नाहींत. त्यापक्षीं याजकडे नारायेणराव यांजविसीं कांहीं खटला नाहीं. रा छ ११ मोहरम. बहुत काय लि ? लोभ कीजे हे विनंति.

श्री.
श्रावण शुद्ध ८ गुरुवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं.-----

पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असिलें पाहिजे. विशेष, तुम्हीं पत्र पा तें पाऊन लिहिला मार समजला. माहादू गवळी याची मुक्तता जाली. परंतु याचा मुचलका नवाबाचे सरकारांत गुंतला आहे, तो आला नाहीं. याजकरितां मागतीं राजश्री पाटीलबावा यांनीं सांगून पा व समक्षही सांगितलें. त्यास याचा कागद काहडोन देण्याविसीं आज्ञा व्हावी. बाळू गवळी वारंवार गैरवाका समजाऊन कजिया करितो. त्यास निक्षुन ताकीद व्हावी. याविसीं पाटीलबावास फार अगत्य आहे ह्मणोन लि. त्यास हालीं बावाचे वडिलांचें पत्र आलें. याजवरून राजश्री राज्याजी यांस पत्र होतें तें काहाडोन आणोन पा आहे. पावेल. पावलियाचें उत्तर पाठवावें. बाळू गवळी येथें नाहीं. तो आलियावर त्यासही ताकीद केली जाईल. रा छ ७ मोहरम बहुत काय लि ? लोभ कीजे हे विनंति.

श्री.
श्रावण शुद्ध ४ रविवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:-----

पो॥ गोविंदराव कृष्ण सां। नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष. राजश्री राजे व्येंकटप्पा नाईक बळवंत बहिरी बहादूर सुरापुरकर संस्थानिक यांजकडे नवाबाचे सरकारचा ऐवज नजराणा बाबत येणें. त्या ऐवजीं मार निलेनीं राजश्री बापु सिवदत साहुकार यांचे मारफतीनें रुपये १००००० येक लाख पाठविले ते नाईक म ।। र निलेकडील वेणू गोपाळ कारकून यांचे गुजारतीनें पोंहचऊन अजिमुलउमराव बहादुर यांसी पावते जाले. सदरहू यैवजाची रसीद नवाबाकडील आल्यानंतर नाईक म ॥ र निले यांजकडे रवाणा होईल. र ॥ छ १४ माहे जिल्हेज सु ।। अर्बा तिसैन मया व अलफ, सन फसली १२०३ शके १७१५ आषाढ शु॥ १५ मु । बेदर. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.
छ ७ माहे मोहरम.

लेखांक १८६                                                               श्री                                                               १५५५ आषाढ शुध्द १३                                   
                                                                                                                                                                           
नकल

माहजर बतेरीख छ ११ माहे मोहरम सुहूरसन अर्बा सलासीन अलफ बिहुजूर हाजीर मजालसीयानी अज माहाल पा। कोल्हापूर →पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

याहुजूर जाहाला माहाजर ऐसा जे ब्रह्मसभा श्री कपिलेश्वराचे देउळी धर्माधिकरणी यामध्ये व जोइसी यामध्यें बोलणें जाहाले, सबब मौजे पलुसकर कुलकर्णी वेव्हाराबदल का। मजकुरास आले होते त्यानिमित्य देवालई सभा करून समस्त ही बैसले होते ते समई कुलकर्णी यानी आपली पत्रे दिधली ते वाचिली ते पत्रे पूर्वीपासून धर्माधिकरणी यापासी ठेवीत होते ते निर्वाहपत्र धर्माधिकरणी लिहून देत होते त्यावरी ते दिवसी जोइसी यानी ते पत्रें हिरोन घेतली होती त्यावरी धर्माधिकरणी बोलिले जे पूर्वीपासून वेव्हारपत्रे निर्वाह होय तोवरी आह्मापासी ठेविताती तैसे च ही पत्रे आह्मापासी देणे आह्मी ठेऊन त्यास धर्माधिकरण आमचे ऐसे बोलोन का। मजकुरीचे कारकून तुह्मास बोलाविताती ह्मणऊन जोइसीयानी धर्माधिकरणीयास घेऊन का। मजकुरीचे चावडीस गेले तेथे राजग्रहात तेथे राजग्रहात मौजे पलूसचे कुलकर्णी याची पत्रे ठेविली त्यावरी धर्माधिकरणी बोलिले जे साहेबी आपणापासी पत्रे द्यावी त्यास का। मजकुरीचे कारकुन बोलिले जे उदिया तुमचा व जोइसीयाचा निवाडा करून पत्रे देऊन त्यावरी धर्माधिकरणी बोलिले जे जैसी हे पत्रे ठेविली तेसी च जोइसी मजकुराचे पचाग ठेवणे त्यावरी जोईसी मजकुराचे पचागे व पलूसचे कुलकर्णीयाची पत्रे ऐसी दोनी ठेविली, त्यावरी जोईसीयास व धर्माधिकरणीयास उभयतात राजग्रही बैसविले ते दाहा रोज १० बैसविले होते तेथे काही मुनसिफी होऊन निवडले नाही त्यावरी हे खबर ठाणामध्ये मालूम जाहाली मग जोइसी मजकुरास व धर्माधिकरणी मजकुरास बोलाऊन आणिले त्यावरी हरदो जणापासून हारजितीचे कतबे घेऊन मुनसिफी का। मजकुरीचे पाटील याचे हवाला केली तेही श्रीमाहालक्षुमीचे देवीचे देउळी सभा करून बैसोन उभयताचे बोळणे मनासी आणिले
जोइसीयांनी

→पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

एणेप्रमाणे उभयताचे बोलणे मनासी आणुऊन सभासद बोलिले की उभयताची मातृपक्षाची वृती ऐसे मनासी आणुऊन मग समस्त हि राजसभेस जाऊन आदि अत वर्तमान सागीतले त्यावरी जोइसी मजकूर धर्माधिकरणास कयानी आपले ह्मणऊन बोलत होते गलथ धर्माधिकरणास जोइसी यास समध नाही ऐसे निवडले त्यावरी हारजितीचे कतबे घेतले होते त्यास जोइसी मजकूर खोटे जाहाले ह्मणऊन त्यापासून ताजील माल गुन्हेगारी होन ५०६ पनास घेतले व धर्माधिकरणी मजकूर खरे जाहाले त्यापासून सीर्णी होन २५६ पंचवीस घेतले सदरहूप्रमाणे निवाडा जाहाला पदमनाभीभट बिन मुदगलभट धर्माधिकरणी व समस्त गोत्रज धर्माधिकरणी याची मिरासी धर्माधिकरण का। मजकुरीचे खात येताती तैसे च त्याची मिरासी खरी असे जोइसी मजकुरास धर्माधिकरणाविषयी सबध नाही धर्माधिकरण पदमनाभीभट बिन मुदगलभट याचे व याचे गोत्रज त्याची मिरासी लेकराचे लेकरी खाऊन सुखे असावे हा माहजर सही

                                                    गोही
१ बापूभट हैदले
रामा पाध्ये
गंगाधरभट पुराणीक कोपरगाव
बंंडभट गोडबोले
कृष्णंभट भरणे
जनीभट ढवळीकर
मादेवभट उरुणकर 
नरसींभट पुराणीक                 
लक्षुंभट जमखिंडी
वेंकडभट श्रीवत्स
बापूभट वाळवडेकर
नरसींभट जपे
मुदगलभट देव

 

श्री.
श्रावण शुद्ध ४ रविवार शके १७१५.
पु ॥ राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:-----

विनंति. उपरि छ २६ माहे जिल्हेजची रवानगी ती छ १ माहे मोहरभीं पावली. व इकडील पत्रें राजश्री नानास गेलीं त्याचे जाब व तुह्मीं कांहीं म।। र लिहिला तो कळला. याचीं उत्तरें मागाहून लाकरच पाठविण्यांत येतील. र ॥ छ ३ माहे मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण शुद्धः ४ रविवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:---

विनंति. उपरि तुह्मीं छ २१ माहे जिल्हेजचीं पत्रें पा तीं छ २७ माहे मारीं पावलीं. टिपूचे पुढील मसलहतीचे प्रकर्णी लाड बाहदुर याद आली ती मुषीरुन मुळीक यांनीं राजश्री नानाकडे पाठवावयासीं दिल्ही. त्यांचा निश्चय ठरून येक फर्द ठरली. त्या प्रकर्णी श्रीमंताचा खरिता नवाबास व आमचे नांवें सरकारचें पत्र व फर्द याप्रो पा तें पावलें. मध्यस्ताकडें तेच दिवसीं सांगून पाठविलें. त्याचें उत्तर जालें कीं आज बंदगान आली माझे येथें येणार, याजकरितां उदईक यावें. त्यावरून दुसरे दिवसीं गेलों. मध्यस्तास फर्द दाखविली, बोलणें जालें. नंतर बोलले कीं हजरतीस आर्जी करून तुह्मांस सांगून पाठवितों त्या वेळेस यावें. दुसरे दिवसीं मीरआलम यांस बोलाऊन आपले घरीं मसलहत केली. तिसरे दिवसीं दरबारास येण्याची सूचना जाली. त्यावरून गेलों, आम दरबार भरला होता. नबाबास पत्र सरकारचें गुजराणलें, नंतर दोन तीन घटकांपर्यंत नवाब व मध्यस्त व मीरआलम व मी चौघांसी खलबत जालें. भवति न भवति होऊन सेवटीं नवाब बोलले कीं टिपूची चाल कसी याविसीं आणि या तहनाम्याप्रकर्णी मध्यस्त आपले घरीं तुह्मासीं बोलतील तें समज़ोन घ्यावें. ऐसें होऊन बरखास्त जाले, त्या उपरि दुसरे दिवसीं मध्यस्ताकडे गेलों. येक प्रहर बैठक होऊन मीरआलमसुधां बोलणें जालें. त्याचा त। लिहूत मागाहून रवानगी करण्यांत येईल. पत्रें पावलीं. बोलणें जालें याचा इतला व्हावा ह्मणोन सरसरीं पत्र लि ॥ असे. भवति न भवति जाली याचा त ॥ आणि याचीं उत्तरें मध्यस्त सांगणार, यास आणखीं येक बैठक होऊन निश्चय सांगतील तो लिहिण्यांत येईल. र ॥ छ ३ माहे मोहरम हे विनंति.

[ १८४ ]                                        श्रीराजाराम.                                    १७५१.                                                                                                                                                    

माहाराजाचे सेवेसी विज्ञापना. उपरि आह्मीं ब्राह्मण कैलासवासी थोरले माहाराज यांचे नवाजीस. आजे बाप याचें उर्जित केलें हुद्दा, मामला, कैद, कानू, सरंजाम देऊन चालविलें. अर्ज विनति चालवीत आले आह्मास मातु श्री आईसाहेबीं वाढविलें, नांवारूपास आणिलें चाकरी घेतली. शेवटीं राज्यांतील विचार पाहोन वनवास करीत राहिलों साहेबाचा जन्म झाला तेसमयी मातु श्रीच्या आज्ञेप्रमाणें दोघातिघांनीं जिवावर होडखे केला साहेबास पळविलें ते बावडियासी नेलें तेथे आह्मीं मागावून गेलो साहेबांचें पालणपोषण केले दहा बारा वर्षे जाली. तेथे आह्मावरी राजा शभूची इतराजी झाली सौ जिजाबाईसाहेब चालोन आली तेसमयी परदेशी घासीराम याणे व बाइकोनें आह्मास नकळत पळवून साहेबास घाटाखाली नेलें तेथून चौ-यायशीचे फेरे फिरत, घिरट्या घेत श्रीतुळजापुरास गेले तेथें थाग आह्मास लागला नारोजीबाबा आधारी यांचा सहवास जाला तेथे रहाणें जालें श्रीतुकाईने दया केली, ते समयी साहेब पाणगावास आले. बाईचा सहवास जाला. मुलकात पुकारा होऊन राजा शाहूपर्यंत चहूकडे नाव गाजलें यामुळे आह्मीं बावडियाहून श्रीपंढरीचे यात्रेस आलों. साहेबाकडे पत्र लेहून मातु.श्रीचे आज्ञेप्रमाणें भुजंग हुजरे व राजश्री एस ठाकूर व बहीरजी पडवल व एसू वस्त्रे देऊन पाठविले. साहेबीं इमान वचन दिल्हे, पत्रें पाठविलीं दर्याबाई यांसी वस्त्रे व पत्रे पाठविलीं. तेथील बोलीचाली अवघी एकीकडेस राहून नवाच पंथ अविद्या चित्तीं धरून मातु श्रीची सोय व आमची सोय टाकून ज्यांणीं जें सांगितलें तेंच ऐकावेसें जालें साहेबामुळें मातु श्रीनीं उपभोगिलें, आह्मीं श्रम साहस करून उपभोगिले, ते एकीकडेस राहिलें , तें ईश्वर जाणें ! साहेबाकरितां ऊर्जितास्तव श्रीदेवाजवळ अनुठानें केलीं, ब्राह्मण घातले, नवस केले, त्याची यादी अलाहिदा लिहिली आहे राजा शाहूचा अवतार संपूर्ण जाल्यास कोणी खावंद नाही, ऐसें जालें. तेसमयीं मातु श्री आईसाहेबीं अवमान धरून साहेबास आणविलें. माता लेकराजवळ धावली. ऐसें असोन साहेबीं मायीचा जिव्हाळा सोडिला. मुंज, लग्न मातु श्रीमुळें साहेबाचें जालें स्थापना आईसाहेबामुळे राज्यपदावरी जाली ती एकीकडे राहून साहेब दुसरियाचे मायेस गुंतले धनलोभास मोहो पावले. मातु.श्रीची उपेक्षा केली ही ईश्वरास न मानें. येणेकरून राज्यास अपाय आहे एक वर्ष साहेबास राज्यपदावरी बसोन जालें साहेबाचें धणीपण चाकरलोकीं बाकीस ठेविलें नाहीं. धकाबुकी जाल्या. शिवनिर्माल्य करून ठेविले हुजरेयांसी मारिलें ये गोष्टीची ईरे अभिमान सोडून आपला हेका तिरपगडा खरा! मातु श्री नलगेत ! ऐसा मोहो घालून, दुष्टांनीं कपटविद्या करून मातापुत्रास अंतर पाडिले हें आमच्या चित्तास येत नाही माता पुत्र, गुरु चेला, धणी चाकर, ही मर्यादा चालावी ; साहेबीं उत्तम वासना धरावी ; वडिालांचे आज्ञेप्रमाणें कारभार करावा ; हें उत्तम आहे राजा शंभू कोल्हापुराहून दुष्टांनीं वारणे ऐलीकडेस दहा राउतानिशीं आणिले. ते सातारियाचे शहरात येऊन, घरोघर हिंडोन, साहेबाचे अदुष्टाचे बाल्याबोला माघारे घालविलें चोर एकीकडेस राहून संन्यासी मोठा पाहोन सुळीं दिल्हा, ऐसी गत जाली राज्यांत डोहाणा फितूर आला. चोहूकडे गर्दी जाली गड, किल्ले गेले दुष्ट बळावले ये गोष्टीची ईरे अभिमान साहेबास नाही. हें दुख कोणाजवळ सागावें. आह्मांस गवत, फाटें, पाणी पाने तुमच्या राज्यात मिळत नाही कर्जदार जालों लोकांची घरे बुडविलीं शिराळें, सातारा येथे येऊन फजित पावलो साहेबाजवळ अर्ज केला तो चालत नाही चोर, चहाड, लबाड याचा पर्वकाळ, इतबार साहेबास वाटतो आमचा विश्वास इतबार नाहीं.

श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:---

पो गोविंदराव कृष्ण साष्टांग नमस्कार विनंति, उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि।। जावें, विशेष राजश्री नागोराव बुरटे का भूम येथें राहतात. यांचे घरगुती कजियाकरितां गुदस्तां मारनिले पुण्यास आले होते. ते समंईं तुह्मीं राजश्री बाबुराव बलाळ कादार यांस पत्र दिल्हें कीं सदरहूप्रों बुरटे मार वर्तणूक करितील. यास कांहीं उपद्रव न द्यावा. त्याप्रमों बाबुराव यांनीं मान्य केलें, आणि मारनिलेही कराराप्रों सिद्ध असतां सांप्रत तुह्मांस कोणीं गैरवाका समजाविल्यावरून बाबुराव यांस दुसरें पत्र तुह्मीं पाठविल्यामुळें त्यांनीं त्यास उपसर्ग लाविला ह्मणोन कळलें, त्यावरून लि असे. त्यास पेशजी येक वेळ करार ठरल्याप्रो वर्तणूक व्हावी. ऐसें असतां मागती उपसर्गाचें कारण काय ? यास्तव बाबूराव बलाळ यांस निक्षूण पत्र देऊन तुह्मीं ठराविल्याप्रों व्हावें रा छ २३ जिल्हेज बहुत काय लि।।? लोभ कीजे हे विनंति.
माहे मोहरम श्रावणमास. छ ३ रोजीं डांकेवर.

[ १८३ ]                                          श्री.                                      १७४८.                                                                                                                                                                                                                               

विनंति उपरि येथें वर्तमान ऐकतो जेः-
पाणगांवमधें राजा असे. तो निघोन सप्तऋषीस येत असे त्यास हें वर्तमान आपल्यास विदित आहे कीं नाहीं हें कळत नाहीं. कोणत्या विचारें येतात हें कळत नाहीं यावें, यामधें उत्तम नाहीं. सौभाग्यवती मातु श्री सकवरबाईचा मजकूर तर आपल्यास विदितच असे त्याचें मानस एक प्रकार असे. ती चिंतितात जे - एक वेळ आपले हातीं यावा, मग ईश्वर असे. महाराजाच्या चित्तांतील शोध घ्यावा, तर तूर्त समाधान नाहीं. यास्तव धनीन जवळ असे बोलता येत नाहीं. बरे जाहलेवर चित्तातील शोध करून लिहून पाठवितों. तंवर उतावळी करून आणाल तर न आणणें. येथें आलेवर परिणाम बरा नाहीं. तुह्मी सुखरूप राहणें, राजश्री बरे जाहलेवर आह्मीं निरोप घेऊन येतों. मग आपले चित्तामधें जावयाचे असेल तर निरोप देऊ परंतु तुह्मीं तूर्त आहे ऐसाच असो देणें. तुह्मीं तेथेच राहणें खर्चावेचाविषयी राजश्री जानोजी पवार यांस लिहिलें असे ते देतील. सकल वर्तमान शिवाजीपंत लिहितील. सेकू सागतां विदित होईल. बहुत काय लिहिणें हे विनंति पत्र फाडून टाकावे.

श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु॥ राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:----

‘विनंति. उपरि मीर मुरादअली वगैरे पंच यांस सरकारांतून मौजे भोडणी पा रावेर हा गांव आहे. तेथील दखलही यांजकडे सरकारची पत्रें व हुजरे जाऊन जाला. स्वराज्याचे अमलाकरितां चोपटेकरकर क।। दाराकडील आनंदराव कारकून याची कटकट भारी. बेमोईन ऐवज घेऊन उपद्रव लागतो. यास्तव नवाबांनीं सांगितल्यावरून व मुरादअली यांचे हमेषा ह्म (ण)णें कीं बंदोबस्त असा व्हावा कीं मामुलप्रों स्वराज्याचे अमलाची वांटणी जागीर सुधां व्हावी, अथवा मख्ता स्वराज्याचा ठरावा. त्याप्रों दरसाल ऐवज घेत जावा. ज्याजती उपसर्ग होऊं नये. येविषींच्या यादीही तुह्मापासीं दिल्ह्या. ऐसें फत्तेआली याचे बोलण्यांत. त्यावरून राजश्री नानांस व तुह्मांस पत्रें खानम।।र यांजपासीं दिल्हीं. व डांकेवरही हलीं रानगी केली असे. येविषीं मुरादआली यांनीं तुह्मांस व त्याजकडून तेथें गृहस्थ आहे त्यास दोन पत्रें ये॥ तीन लाखोटे पारसी पा आहेत. त्याचे त्यास द्यावे; व नाना यांस विनंति करून याचे कार्याचा बंदोबस्त करून इकडे ल्याहावें. याचे सांगण्यांत तेथील स्वराज्याचा मामुल चौथाई तीन हिसे व सरदेशमुखी सेंकडा साडे बाराप्रो आहे. याप्रों ठराऊन बंदोबस्त व्हावा, ज्याजती तोसीस सायेर फर्मास वगैरे कादार करितात ते न व्हावी. ठरावाप्रों साल बसाल फड च्या करून घेत जावा. याप्रों कादारास सरकारांतून ताकीद होऊन इकडे ल्याहावें. छ २३ जिल्हेज हे विनंति.

गोविंदराव बुरटे यांनीं पत्र मागितलें सबब.