Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७४
श्री (नकल )
१६९८
सिका.
यादी विसाजी कृष्ण यांस जातीस तैनात व पुत्रास पालखीची तैनात व विठ्ठल कृष्ण बंधु यांस जातीस तैनात व फौजेस सरंजामास माहाल वगैरे आहेत. सुा सबा सबैन मया व अलफ.
खाशांच्या तैनातादेखील पालखी व खेरीज तैनात गांवजमिनीसुद्धां.
३५१६० तैनाता.
३०६१० खुद्द तैनात.
१००१० बरहा पेशजी.
२०००० जाजती हिंदुस्थानचे स्वारीस जातेसमई.
--------
३००१०
६०० कापड आंख १५०
------
३०६१०
१२६० महिपतराव विश्वनाथ जातीची तैनात नाहीं. पालखी व अबदागिन्याची तैनात.
३२९० विठल कृष्ण बंधु यांस तैनात पालखी दिवट्या, अबदागिन्या सुद्धां.
-------
३५१६०
१०७८ खेरीज तैनात, गांव व जमीन,
१००० मौजे नन्हे ता कर्यात मावळ,
८८४॥l. ऐन.
११५. जाजती.
-------------
१०००
६०. मौजे भिवंडी ता करणेव जमीन चाहूर.
१८ मौजे घोरपडी ता हवेली, प्रां पुणे, अमीन रुके ०४,
----------
१०७८
---------
३६२३८
फौजेस सरंजामास वगैरे गांव माहाल आहेत. ६६०५८
पो सांगोलें, देहें, व पो मिळोन २८
तनखा का ६६०५८
तपशील.
२४६४३८॥ सरंजामाकडे
४१४ १५०॥ दुमाले
-------
६६०५८
१३४४३।।।. पो ब्रह्मपुरी उर्फ माचनुर देहे ७
सातगांवची तनखा शा.
फुटगांव आकार सा.
३६६८९. ता करांजणगांवे पो देहे १७ तनखो रुपये
१२५१४॥ का बेलगांव वगैरे गांव ४ होन नाणे.
६२५७॥ यासीं दर होनास रुपये
२ प्रों १२५१४।। रुपये
३६१९॥. मौजे देऊळगांव सिंदी देहे १ आकार
तनखा रुपये
१९९१॥. मौजे पारगांव ता पांडेपेडगांव रुपये
३८०९
कित्ता फूटगांव ३८०९८:
१००० मौजे कोटमंगी कार्यास कसूर
प्रांर हुकेरी
४९५६८: मौजे सुस्ते व शंकरगांव पा काठी
९९२५ मौजे पुळंज पो माहाल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७२
श्री
१६९८ मार्गशीर्ष अखेर
आंशाहामत पन्हांनी किताबत वसूल उसूल केली ते पोहोंचोन खुष खुरमी हांसल जाहाली. व आशाहामतपन्हांकडून सदाकत अतवार नरसिंगराव आले. यांणीं मूंजबानी जाहीर केलें, ते मुफसल जाहीर जाहालें. वपारच्या रसीद जाली ते पोहचली. त्याजवरून गंगाधर राव रास्ते हुजूर येऊन आशाहामतपन्हांकडून मुक्दमा जाहीर केला, तो मालूम जाहाला. ऐसीयास, ये बाबेचा मजकूर नरसिंगराव यांस सांगितला आहे. हे लिहितील त्याजवरून कळेल. हमेशा किताबत पाठवून दिल ताजा करणें. दोस्ती जागां.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७१
पौरा छ १५ जिल्काद.
श्री
१६९८ मार्गशीर्ष वद्य ३
रावसो मेहेरबान करमफर्याम मखलिसां सखाराम पंडत सलम लाहुताला. बादक षौक मुलाकत मसरत आयात मषहूद खातीर इतिहाद मासरबाद. येथील खुषी जाणून आपली षादमानी हमेषा कलमी करित आलां पाहिजे. दरींविला, बहुतरोज जाहाले. आपणाकडील खैर आफियतेची खबर मालुम होत नाहीं. दोस्तीचे जागां ऐसें न व्हावें. हमेशा आपली षादमानी कलंमी करित यावें. हाली नरसिंगराव कारकून या बा चेरथान पारचे पाठविले असे. आजरा एखलास घेतला पाहिजे. ज्यादा लिहिणें काय असे ? हे किताबती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७०
श्री ( नकल )
१६९८ कार्तिक शुद्ध १४
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री जगन्नाथ चिमणाजी निा संस्थान धाडवसी गोसावी यासः-
सेवक माधवराव नारायण प्रधान सां नमस्कार सुा सबा सबैन मया व अल्लफ नारोराम कारकून दिशा संस्थान मजकूर यांणीं हुजुर विदित केलें कीं:
श्री परमहंस भार्गवरामबाबा पो- आपणास कदीम संस्थानाकडे वेतन
सोन आजपर्यंत संस्थानचे लिहिण्याचे रुगा सुवासे चालतात. त्यास, योगक्षेम
काम एकनिष्ठेने करीत असतां हाल्ली चालत नाहीं. तारापूर प्रांत वसई
आपले हाते घेत नाहीं, ह्मणून ऐशि- येथे आपणांस मजमूची असामी होती
यास पूर्वीपासून याजपासून लिहि- ते बंद पडली. रा जगन्नाथ चिम
ण्याचें काम घेऊन यांचें चालवीत णाजी यांण रजबदली करून ते अ
असतां हाल्लीं दिक्कत करावयास प्रयो- सामी आपले चिरंजीवाचे नांवें करून
जने काय ? तरी पूर्ववतप्र काम- घेऊन धर्मार्थ आपणांस शंभर रुा दे
काज यापासोन घेत आलो त्याप्रों तात. त्यास, असामी आपली आपले
घेणे व चालवीत आलो त्याप्रमों चाल नांवें चालोन पैकी पावे ते करावें.
वणे. णोन. तर सनदपैवस्तीपासून असामी
आपणाकडे गोसावीबावापासीन नारोराम यांचे नांवें चालऊन, असा-
पानपत्रावळीकरितां एक मनुष्य चा- मीचे वतन मशारनिलेस देत जाणें,
लत होते त्यास, सरकारचा बेहेडा कलम १
जाला, तेव्हा माणूस दूर जाहालें. त्या एकूण तीन कलमें लिहिल्या प्रों
ऐवजीं पंचवीस रुशा दरसाल करारे करार करणे. येविशीं बोभाट फिरून
केले ह्मणोन तर संस्थानचे ऐवजी येऊ न देणें, जाणिजे, छ १२ सवाल
शिबंदीखर्च संस्थानचा आहे. त्यामधें आज्ञाप्रमाण, मोर्तब.
कमपेश करून यांचे पंचवीस रुा
माणूस दूर जाल्यापासोन साल दरसाल
देत जाणे, कलम १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १६९
श्री.
अंदाजे १६९८
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री लक्ष्मणपंत बाबा स्वामीचे सेवेशीं:-
पो हरी बल्लाळ व पद्माकर बाबूराव सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. राजश्री आबाजी खंडो सुदामे सालगुा श्रीमंत राजश्री दादासाहेब याजकडून निरोप घेऊन आपले घरास जात होते. त्यास खंडाळ्याचे ओढयावर चौरांनीं लुटलें. तेव्हा आपण वाईंत होते. खंडाळेकरांनी माग काढिला तो भुइंजेस आला. तेथे सा-या रामोशांनी मिळोन मनसोबा करोन, भुंइजे पुढें चिंधोळीस माग न्यावा. ते टाकून, खडकी येथें माग न जातां सा-यांनीं एकोपा करून, खडकीचा रामोसी चोर ह्मणोन धरिला. तो आज ता कैदेंत आहे. त्याची चौकसी पहातां त्याजकडे मुद्दापत्ता नाहीं. तेव्हां सा-या रामोशांनी दाव्यादंदाने धरिला किंवा कसा धरिला ते जाणत. सा-या रामोशांनी......( वि ) चारूं लागले कीं, हा तुमचा चोर. तेव्हां आबाजी खंडो आतुर. सारे रामोशी याणीं आणून विचारितात. त्यास ह्मणतात कीं, आह्मीं करू त्यांत तुह्मीं आहां, कीं तुमची चोरी आह्मीं उगऊन देतों, त्यावरोन आंबाजी खंडो यांणीं हा चोर ह्मटलें. त्याजवरोन खडकीकर रामोशी आणोन वाड्यांत ठेऊन गेले. चौकशी करितां, पांच सात गांवचे रामोशी वाईस आणून विचारलें की, “ खडकीकराकडे मुद्दा शाबीत करून देणें, नाहींतर सारे मिळोन चोरीचा फडशा करून देणें. तेव्हां मुद्दापत्ता नाहीं, सा सात गांवचे रामोशी यांनीं करार केला कीं, आबाजी खंडो याचें काय गेलें तें सत्य पुरस्कर सांगावें. सारेजण मिळोन हिस्सेरसी करोन, कागद लिहोन देऊन, आठ पंधरा दिवसांचा वाइदा करून गेले, नंतर खंडाळेकरास आणलें. त्यांनीं तीस रुा ठराऊन गेले. परनिशेचें खतच दिल्हें आहे. वेळेकर व कवठेकर व सुरूकर हेही कबूलच आहेत, मौजे बदेगांवकरांवर रोखा केला. त्यास, त्याणीं गैरवाका रा रामाजपिंत घाटगे यास समजाऊन, त्यांणी स्वामीचें पत्र आणिलें. पुढें रोखे ( पुढें फाटून गेलें आहे.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३८७
१५४० पौष शुध्द १०
अज रखतखाने राजश्री कृष्णाजी राजे साहेब दामदौलतहू बजानेब हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी मौजे वडिगौ कर्याती पाटस पा। पुणे सु॥ तिसा असर अलफ रामेस्वरभट बिन नारायणभट सो। मौजे आरवी मुदगल हुजूर एउनु मालूम केले की आपणास इनाम जमीन चावर वाहातिकास देखील मळै रुके .।. बारा देखील नखतयाती व बाजे पटिया व वेळी बेगारी दर सवाद मौजे मजकूर प्रज माहाद पाटील ठोबरा बमा भोगवटे वजिरानी कारकीर्दी दर कारकीर्दी ता। सन समान चालिले आहे हाली मौजे मजकूर साहेबास मुकासा अर्जानी जाला असे माहाली कारकून ताजे खुर्द खताचा उजूर करिताती ह्मणउनु मालूम केले मालूम जाले रामेस्वरभट बिन नारायणभट यास सदरर्हू इनाम भोगवटे वजिरानी कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद ता। सन समान तसरुफाती चालिले आहे तेणेप्रमाणे दिधले असे दुमाला कीजे दर हर साल ताजे खुर्द खताचा उजूर न कीजे तालीक घेउनु असेली इनामदारास फिराउनु दीजे मोर्तबु
तेरीख ८ माहे मोहरम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १६८
श्री ( नकल )
१६९७ पौष्य वद्य ५
राजश्री यशवंतराव शिंदे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नों माधवराव नारायण प्रधान आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जाणें. विशेष. तामनोळी व चिकोडी वगैरे गांव श्रीमंत महाराज यांजकडून कर्जांत राजश्री आपाजी शामराव यांचे विद्यमानें राजश्री रामचंद्र महादेव याजकडे आहेत. त्यास, महाराजांची स्वारी बाहेर फौजेसह निघोन चिकोडी प्रांतीं येऊन, गांव खेडीं घेऊन पुढें आणखी घेणार, ह्मणोन कळलें. त्याजवरून, हें पत्र तुह्मांस लिहिलें आहे. तरी, करार जाला असतां, त्यांत अंतर करणें, गांवखेडीं घेणें ही गोष्ट उत्तम नसे. याउपरी महाराजांस विनंति करून गांवखेडीं घेतलीं असतील तीं माघारी देववून, पुढें उपसर्ग होऊं न देणें, नाहीं तरी तैसेंच लिहिणे. त्याप्रों केलें जाईल. या छ १९ जिलकाद, सु। सीत सबैन मया व अल्लफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १६७
श्री मोरेश्वर.
१६९७ मार्गशीर्ष वद्य १२
विनंती उपरी. मेस्तर हेष्टन यांजकडून बंगाल्यांतून वकील कर्नेल आपटेन कलकत्ताहून श्रीमंताकडे पुरंदरास जावया निमित्त आले. दोघे मुख्य आहेत. बरोबर तीन अंबा-या, व रिकामे वोझ्याचे वगैरे हत्ती नव, एकूण बारा हत्ती, व फिरंगी पांच सातसें पर्यंत, व चार शंभर आहेत, व नेहमीं वोझीं शंभर, व हजीर बेगारीची तीस, व उंटें तटें वगैरे खडदूर शेंपन्नास आहे. सुरतेकडील इंगेरजाचा व श्रीमंताचा सलूख करून द्यावा, या अर्थी आला. बरोबर श्रीमंताकडील कारकून व जासूद जोड्या व दस्तक आहे. दस्तकावरून आह्मीं नांवे लिहून घेतलीं आणि आपणास लिहिलीं. फिरंगी भाषेचीं नांवें आहेत. रजबचें दस्तक आहे. ठिकाण सोडून च्यार महिने जाले. आणखी आठ रोजांनी पुरंधरास जातील. वैजापुरीं रविवासरीं आले. शहरींहून नबाबाकडून दर्गाकुलीखानाचा भाऊ मेजवानींची वस्त्रें व दुशाला दोन व हजार रुपये नक्त घेऊन आला. त्याकरितां सोमवारीं वैजापुरीं मुकाम जाला. आज मंगलवारीं बाबूलगांवावरून चितली ता बेलापूर येथें मुकामास गेले. मार्गी कोणास कांहीं उपद्रव किमपी देत नाहींत. जें लागेल तें पैसा देऊन घेतात. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १६६
श्री माहालक्षुमी. १६९७ मार्गशीर्ष शुद्ध २
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके १०२ मन्मथ ना
म संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति स्वामी याणीं वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदासिव-दीक्षित ठकार यांसि आज्ञा केली ऐसीजे, तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें. हुजूर प्रविष्ट जाहलें. आपण श्रीचे दर्शनास करवीरास येणार, येविसीं आज्ञापत्र सादर व्हावें, म्हणून विनंतिपत्रीं लिहिलें, तें विदित जालें. श्रीचे दर्शनास हर कोण्यास येणेविसीं लडा काये आहे ? तुह्मी येणार, तरी सुखरूप येऊन, श्रीचें दर्शन घेऊन, जाणे. जाणिजे. निदेश समक्षे.
समत मंत्री.
बार सुरु सुद
समत सुद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १६५
त्यास कारभारांतून काढिल्यास मी करणार नाहीं, व तुम्हांजवळहि राहणार नाहीं. ऐसें कित्तेक प्रकारें मामास विनंती करून राहिलों. याचें कारण कीं एक वेळ पुरंधरास जावें, उभयतांची भेट घ्यावी, ते आज्ञा करितील त्याप्रों वर्तणूक करावी, ऐसें कथन दिवाकरपंतानीं बहुतच सांगितलें. कोठपर्यंत ल्यहावें? तेव्हां आम्ही व नानानीं बहुता प्रकारें सागितलें कीं, सेनाधुरंधर आमजेरास आले, येथें समजोत कोणतीहि नाहीं. या समयीं तुम्ही चित्त घालावें. त्यास उत्तर केलें कीं विठलपंतास वराडांत ठेवावें. आधी तुह्मीच नागपुरास जाऊं नये. ऐसें यजमानास बहुता प्रकारें सांगितलें. आठ रोज नाना तुह्मांस घेऊन सर्व सरदारांच्या घरास फिरलों. सर्वांस सांगोन अलजपुरावर रहावें, हे मसलत केली. तुह्मीं पाहिली. ते विचारास न आली. तेव्हां विठलपंतास ठेवावें ऐसें केलें. समईं मसलत सांगावी ते आइकू नये. तेव्हां आतां आह्मीं तों श्रीहरीचें चिंतन करीत बसलों. तात्यास सेडिल्यापासून कांहीं इतल्ला कामाचा आपणास नाहीं. आणि आतां काय ह्मणतां ? त्यास आह्मीं येथें आलों. त्या दिवसापासून द्रीष्टीनेंहि पाहिलें. हे कोणत्याहि कामांत नाहींत. आणि तुह्मीं उभयतांस पुरंधास पत्रें लिहिली. त्यांत उभयतां कारभारी एकत्र आहेत. ऐसें कैसियावरोन लिहिलेंत? व आपंली पत्रें दिवाकरपंतास दोन तीन आलीं कीं, सेनासाहेबसुभा यास घेऊन सत्वर फौजेंत यावें. त्यावरून दिवाकरपंत नाना जोशी याशीं ह्मणों लागले कीं. तुह्मीं उभयतांस काय लिहिलें, ते आह्मांस ऐसीं पत्रें लिहितात, तेव्हां आह्मीं येथे कारभार करितों, आणि त्यानें लिहिलेप्रों आमच्यानें घडत नाही, हें लिहिणें तुमचें उचित नाहीं, आतां मीं उभयतांस पत्रें लिहून अपली प्रथम जोडी पाठवीन. हें आमचे समक्ष भाषण जाहलें. शहरचे लोक व शिपाई व रयत-सावकार, वाड्यांतील बायका, सर्वांचा एकच प्रकार कीं, दौलत, जर दिवाकरपंत कारभार करतात तर, निभत्ये हें पाहोन व समय पाहोन आह्मीं फारच निकड केली कीं, आपण, बापू व नानापर्यंत हें जात, ऐसें करावें. तेव्हां भवानीपंतासच पुढें करून, सावकारांच्या घरोघर जाऊन, आठ रोज मोठा श्रम तीन तीन प्रहर रात्रपर्यंत आह्मांसुद्धां घेऊन बसावें. कामाची व बोलण्याची व जलदीची हातवटी पाहिली. सावकार मामलेदार राजी. पूर्वी कारभार केला. त्यास आपले विद्यमानेंच कर्ज कोणाचा एक रुपाया सरकारांत बुडों न दिल्हा. हें सर्वांकरवीं आह्मांसी भाषण करविलें, आणि आमचे दृष्टोत्पत्तीस आणून दिल्हें. आठा रोजांत दाहा लाख रुपये ऐवज, कांहीं मछदी व कांहीं सावकार व रयत व कटकची मामलत ऐसा ऐवज, नवीच कल्पना करून ठरविला. आणि आतां फौजेस देऊन निघणार, यजमानाचा बेत कीं, कैसेंहि करून यांस फसवून कामांत आणावें. हें आह्मांसी भाषण व दिवाकरपंतांसही भाषण बहुत नम्रतेनें काकळूत करून करितात कीं, तुह्मी चित्तावर घेत नाहीं तर, माझा प्राण वांचत नाहीं. मी पूर्वी सर्व प्रकारें चुकलों. ऐसें शंभर वेळ यजमानानें म्हटलें. परंतु दिवाकरपंतांची एकच जिंद कीं पुरंधरास बापूनानाकडे जाऊं. ते आज्ञा करितील तैसे करीन. तेव्हा आम्ही यजमानाच्या मर्जीकरितां बोलिलों कीं, उभयतांचीं पत्रें येथें आणवितों. आणि पत्रेंही वरचेवर तुह्मांस येत आहेत. परंतु यांचा बेत कीं, रुबरू जावें, श्रम कोणाचे केले हें सर्व विनंती करीन, रुजवात सर्वांची व तात्यांची करीन. यजमान व आह्मी त्रासलों ऐकत नाहींत, पत्रें आलीं तरी रुबरू जाऊन मग करीन. तेव्हां याला बाहेर तरी काढा, हें मात्र केलें. आतां ऐवजावर चिठ्या करून निघावें. सेनाधुरंधराचा नेट बसतां, विठ्ठलपंत तात्याजवळ होते, ते बोलाविले. ते व हे मिळून पंधरा हजार जमा होतील. महमद इसफ व इस्माइलखान व सेनाधुरंधर यांणीं गारद तोफा मोगल जाहालें. हे गनीम याकरितां रुकुनूद्दौले यांस पत्रें जावीं की, वराडास सुभा इस्माईलखानास तगीर करून दुसरा केला असेल तर तो जावा, नसेल तरी खानानें फंदास सोबत देऊं नये, अमर जाबितजंग वराडास पाठवावा. जाबितजंग व हे एक जाहाले म्हणजे अलजपुरचें खूळ तुटतें, जाबितजंग वराडांत जरूर जरूर यावा; नाहींतर मोंगल गनीमीची लढाई, नागपूर मजबूत नाहीं, शहर गालत होईल, किंवा न जाणो कैसें होईल. सेनासाहेबसुभा यांचा निश्चय शपथपूर्वक कीं, सेनाधुरंधर यांसीं लढाई हत्तीवर बसोन घेईन! हे संकट सर्वांस वाटतें. हे हत्तीवर बसोन त्याजवर जाणार. ते तो मोंगली सामान यांत पाटणकर, निंबाळकर वगैरे मोठमोठे सरदार' काळजी करतात कीं, तोफा गारद येथें नाहीं, आहे त्याचें साहित्य नाहीं. हे कसें होईल ? याकरितां जाबितजंग जरूर पाहिजे व आपणही सेनासाहेबसुभा यास वडिलपणें ल्याहावे की, आपणास रक्षून शत्रूस मारावें. हेंही जरूर ल्याहावें. वरकड येथें संचार फंद यजमान अगर कोणी याचे एक लक्ष श्रीमंत राजश्री पंतप्रधान येथील दैवत. दुसरा अर्थ नाहीं. आवांतरी आमचे संकटी आवांतर उत्पन्न जाहला, ऐसें नित्य ह्मणत असतात. दुसरा अर्थच घडणार नाहीं. हे निशा पक्की आहे. श्रीमंतांनीं रोकड वीस लाख पाठविली. धबी याजला श्रम ! पैका नाहीं! है दिवस परंतु पाहणार नाहींत. वस्ताद मसलत समयास जाऊन सांगणार आणि यजमानच एकनिष्ठ हे खातरजमा, दिवाकरपंत कायवंगमनसा बापूनानाचा नायब. हे बोलतात. करणीहि पाहतो. एकदां उभयतांस पहावें हाच मानस आहे, हेहि निशा, जाहली. एक भवानी शिवराम याची व धन्याची चित्त शुद्ध नाहीं. हें त्यांसही उमजलें आहे. आपलें आचरण आपणांस कळतें. आचरणच ऐसें दिसलें कीं, यजमान फार जाल ! फार फार अंगेज केली. नाहींतर एक दिवस निभों नये. ऐशी चाल पाहिली. यांतून न जाणों काय निघतें ? सर्वदा लक्ष आश्रय लोकांचा मोंगलांकडून कोठेंहि जोरानें कारभार असावा. ऐसें साधन चाल रीत आहे. ते एकदां सर्व आपल्याजवळ येतात. दरमियान सेनाधुरंधर मात्र आले. हा गुंत आहे. हे दरमियान नसते तर, न बोलावितां तात्याकडे जाऊन, तेथून शंभर पन्नासानिसीं पुरंधरास जावें, हे येथील मर्जी आहे. यांत सेंनाधुरंधर याचा योग पाहावा, कैसा घडतो व लढाई कैसी होती. आतां युद्धाचाच प्रकार दिसतो. हें वीस कोस असतां टाळा देतां नये. टाळा दिला तर नागपूर शहर गारद होतें. किल्ला एक गडीं नाहीं. आस्त्रा, मंडले किंवा निर्मळ दुसरा आस्रा नाहीं. कबिले समागमें घ्यावे, सरंजाम टाकावा, ऐसें संकट आहे. ज्याबितजंग मात्र असावे, अगर जे आज्ञा येईल तैसें करतील, कच्चें वर्तमान लिहिलें आहे. कित्येक आंतील बाहेरील अर्थ मी भेटेन तर सर्व निवेदन करीन. सर्व प्रकारें सेनासाहेबसुभा यांस लक्ष आपलें आहे. आपली आज्ञा तेंच मान्य, ऐसें आहे. येविसीची खातरजमा जाहली. पत्राचें उत्तर सत्वर येणें. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ करावा, हे विनंति.