Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८९ १५७१ अधिक आषाढ वद्य ५
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायवंद खान खोदायवंद खोदायवंद खान अलीशान खान अफजलखान माहमदशाही खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल वा इस्तकबाल वा देसमुखानि पा। वाई बिदानंद सु॥सन खमसैन अलफ दरीविले नरसीभट बिन रंगभट चित्राउ हुजरु येउनु मालूम जाहले जे आपले बापासी सालाबाद धर्मआदाऊ होन १० दाह पा। मजकुरी बरहुकूम खुर्दखत मोकासाइयानि माजी चालत होते आपले बापसी हुकु(म) खुदाई जाहले वा पा। मजकूर साहेबासी मोकासा अर्जानी जाहले माहली कारकुनानि ताजा खुर्दखतचे उजूर करीत असे नजर इनायत फर्माउनु सदरहू इनाम धर्मआदाउ आपले नावी मरहमत फर्मावणे ह्मणुनु मालूम जाहले मेबायद के सदरहू धर्मआदाउ बाबती रगभटचे त्याचे फर्जद नरसीव्हाभटासी मरहमत केले असे बरहुकुम खुर्दखत मोकासाइयानि माजी बरहुकुम भोगवटा व तसरुफती सालाबाद ता। सालगुदस्त कैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुबाला करून चालवीजे बऔलाद वा अहफाद चालवीजे दर हर साला खुर्दखताचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल खुर्दखत परतुनु दीजे पा। हुजूर
*
तेरीख १८
जमादिलाखर सुरु सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
सदतीस लक्ष रुपये तुह्मांस द्यावयाचे ठरले. त्यापैकीं बारा लक्षांच्या वराता ब्राळाजी गोविंद बुंदेले व शिवराम हरी झांशीकर मामलेदार याजवर द्यावयाच्या. बाकीं पंचवीस लक्ष रुपये राहिले. त्याच्या मुदतीची याद आलाहिदा ठरेल त्याप्रमाणें एका महिन्याचे आंत खुशालचंद याची निशा दिली जाईल. येणेंप्रमाणें करार, फौज व पलटणें हुजुर चाकरीस राहातील, त्यास सरंजाम स्वदेशांत वसुली बेरजे चालवून घ्यावा ते ५००००० रुपये तुम्हांकडील एक हजार फौज दोन पलटणें हुजुर चाकरीस राहतील, त्याचे मदतखर्चास पांच लक्ष रुपयांचा सरंजाम कच्चा वसुली जमेची स्वदेशांत लाऊन दिला जाईल. येणेंप्रमाणें करार.
-----
२
९ सदरहु प्रमाणें ऐवजाची याद करून दिली.
----
२
१ बाजीरावसाहेब व आप्पासाहेब व मोरो बाबुराव फडणीस वगैरे मुत्सद्दी व सरदार शिंदे याचे कारभारी आबा चिटणीस यांणी आपल्या डे-यांत स्वयंपाक केला. तेथें भोजनास गेले. अमृतरावसाहेब वाड्यांतच होते. आषाढ शु।। ८ छ, ६ सफर सोमवार.
२ अमृतरावसाहेब याणीं भिवडी वगैरे सात लक्षांचा सरंजाम घेऊन कोकणांत भिवंडीस जावयाकरतां श्रावण शु। १ छ २९ सफरी प्रातःकाळीं वाड्यांतून निघून गेले. स्त्री सौभाग्यवति वहिनीबाई व पुत्र विनायकराव वाड्यांत होते. देखावे अमृतरावसाहेब करीत होते ते राहिले. बाजीरांवसाहेब देणें व फडणीसीची तारीख करून कारभारास सदाशिव माणकेश्वर व गोपाळराव मुनसी व बाळोजी कुंजर होते. मोरोबा फडणीस आपले घरीं असत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ११९ ] श्री. १७३०.
राजमान्य राजेश्री सेखोजी आंगरे सरखेल यासी आज्ञा केली ऐसी जेः-
जंजिरे रत्नागिरी येथें तुह्माकडील उपसर्ग लागतो, येणेकरून उस्तवारी होत नाही, ह्मणून हुजूर विदित झालें. ऐशास, राजश्री भगवंतराऊ पंडित स्वामी संनिध आले आपले निष्ठेचा अर्थ निवेदन केला त्याचे सर्व प्रकार अभिमान धरून चालवणें व जंजिरेयाची उस्तवारी करणें स्वामीस आवश्यक. असे असतां तुह्मीं उपद्रव करावा हे गोष्ट उत्तम नव्हे. तुह्मीं तेथील साहित्य करावे, उपसर्ग न द्यावा, हें उचित आहे. हालीं हे आज्ञापत्र सादर केलें आहे . तरी जजिरे मजकुरास कोणेविशीं उपद्रव लागो न देणें. सर्व प्रकारें साहित्य करून जंजिरे मा। ची उस्तवारी होय, स्वामी संतोष पावत, तो अर्थ संपादत वरकड कितेक श्रीनिवास शिवदेऊ तुह्मांस लिहितील त्याप्रमाणें साहित्यास अंतर न करणे. सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
११ जात मुबार केले दवलतीचा बंदोबस्त करून सर्वावर दाब व तेज असावें हें तुमचें मानस. त्यास जात मुबारकेकडून दवलतीचा बंदोबस्त होण्यास तुमची अनुकूळता पाहिजे: तशी सबाह्याभ्यांतर कायम असावी, हार कोणाचे समजाविल्यावांचून संशय घेऊन, दरम्यान कलुष तुह्मी चित्तांत आणू नये. कोणी कांहीं समजाविल्यास हुजूर विनंति करून स्वच्छता वरचेवर करून घेत जावी. प्रांतांतील तुह्मी उपद्रव व पत्रें व चिट्टया मसाले मना केले ह्मणजे दाब व तेज तुमचे मनोदयानुरुप निदंर्शनास येईल,
स्वामींनीं जातीनिशीं दवलतीस आळा घालोन बंदोबस्त करावा हीच इच्छा. त्याप्रमाणें स्वामीकंरितां सेवकाकडून कोणतेही प्रतिकूळ पडणार नाहीं. कोणाचे समजाविल्यावरून स्वागीचे चित्तांत व सेवकाचे चित्तांत संशय येऊं नये. राजकारणसंबंधी व सल्लमसलतीचा दाखला पहिलेपासून सेवकाकडे घ्यावयाची चाल आहे. त्याप्रमाणें सरकारांतून आज्ञा होत नाहीं. परस्परें कोणाचें सांगितल्यावरून चित्तांत संशय आल्यास, सरकारांतून आज्ञा होत जावी. इकडूनही विनंति होईल. संशय दोन्हीकडेही राहूं नये. ज्यांत स्वामीचा दाब तेज प्रतापाची वृद्धि होय तेच करण्यांत येईल येणेंप्रमाणें.
---
११ करार.
१ शिंदे यांस ऐवज द्यावयाचा ठरावून बाजीरावसाहेब याणी कराराची याद करून दिली. छ. १७ फर आज्ञा. मास ७
१ फौजेचे खर्चाबद्दल रुपये,
३७०००००
२५०००००
तूर्त नक्त रुपये सावकारी निशा.
१२०००००
वराता हिंदुस्थानांत बाळाजी गोविंद बुंदेले व शिवराम हरी झांशीवाले यांजवर दावा.
-----------
३७०००००
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
सदरहु अन्वयें जप्त्या उठवून देऊ येणेप्रमाणें करार
८ स्वामीचें वांकडें पहाणार व लक्षांत नाहींत त्याचें पारपत्य स्वामीनी करून निष्कट करावें. आह्मी सर्व प्रकारें अनुकूल ऐशी तुमची विनंती त्यानें आणि दवलतीचे व जातमुबारकेचे वांकडे पहात असतील व लक्षांत नाहींत व उद्योगीही नाहींत अशांचें पारपत्य व बंदोबस्त सरकारांतून होईल, त्यांस तुमची अनुलता असावी. आज्ञा होईल तसें करीत जावें, ह्मणजे निष्कट होईल.
सरकारचे वांकडे पहात असतील व लक्षांत नाहींत त्याचे परिपत्य सरकारांतून व्हावें, त्यास सेवकाकडून आज्ञेप्रमाणें अनुकुळतेंत कमी पडणार नाहीं येणेंप्रमाणें करार.
९ सरकार तालुक्यांत तुह्मांकडील पागे पतगे मनस्वी उपद्रव देऊन खंडण्या वगैरे ऐवज घेतात. तो मना करून, याउपरी सरकार प्रांतांत पागे पतगे वगैरेस निक्षून ताकीद पाठवून बोलवून घ्यावें ह्मणजे सरकारचे लागदार लावणीच्या बंदोबस्ती करतील. तुह्मी निधून ताकीद केली असतां उपद्रव करू लागल्यास त्याचें पारपत्य करावें. पागे पतके व कंपुवाले यांचा उपद्रव लागतो त्याचा बंदोबस्त आज्ञेवरून होईल. कोणी लबाडी केल्यास पारपत्य करावयास येईल. येणेंप्रमाणे करार.
१० सरकारचे मातबर व महान सरदार वगैरे व पर दवलतदार यांजकडून सरकारचा ऐवज वगैरे जबासाल उलगडून घ्यावयाचें तें कराराप्रमाणें त्यांजपासून सरकारांतून उलगडून घेतले जातील, कोंणी दिकत केल्यास जरब देऊन कामें उगवली पाहिजे. त्यांस तुह्मीं अनुकूळ असावें.
वाजबी ऐवज सरकारचा येणें वगैरे जाबसाल असतां कोणी दिकतकरील त्यांजवर जरब देऊन उलगडून घ्यावे येविषयी शेवकाकडून अनुकूळता होईल येणेप्रमाणे करार,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
सदरहु अन्वयें सरकारांतून आज्ञा होईल त्याशी जुजबी जाबसाल असतील ते बोलण्यांत येतील. येणेंप्रमाणें करार.
३ तुमचे खानगीचे खर्चविषयीं तुह्मी सरकारांत विनंती केली याजवरून सरकारचे व तुमचे विचारे सदतीस लक्ष रुपये तुह्मांस द्यावयाचें ठरलें. त्यास यामागें सरकारांतून व सरकारचे कारकून वगैरे यांजपासून ऐवज घ्यवायाचा करार होऊन तुह्मी दस्तऐवज घेतले त्यापैकीं वसूल पाउन, बाकी राहिली ती याउपरी तुह्मी मागूं नये. दस्तऐवज चिट्टया वगैरे असतील ते सरकारांत माघारे घ्यावें.
४ रवानगीचे खर्चास सदतीस लक्ष रुपये ठरले त्याप्रमाणें पंचवीस लक्ष रूपये तूर्त घ्यावें. त्याची निशा सावकार खुशालचंद यांजकडून देववावी आलाहिदा यादी मुदतीची ठरेल त्याप्रमाणें एक महिन्याचे आंत निशा घ्यावी. व बारा लक्षांच्या वराता बाळाजी गोविंद बुंदेले व शिवराम हरी झांशीचे मामलेदार यांजवर करून घ्यावा. यामागें सरकारचे कारकुनाचे दस्तऐवज असतील ते शोध करून निघतील ते माघारे दुसरे विल्हेस पडले असल्यास त्याजबद्दल जाबसाल राहिला नाहीं; येणेंप्रमाणें करार.
५ तुह्मांकडील दोन पलटणें व एक हजार फौज हुजुर चाकरीस राहील, त्याणीं सरकारचे आज्ञेप्रमाणें चाकरी करावी. हुकमांत वागावें. त्याचे मदत खर्चास पांच लक्ष रुपयांचा वसुली सरंजामकडील दिला आहे.
पांच लक्षाचा सरंजाम पलटणें व फौज राहील त्यास वसूल जमेच्याकडील घ्यावा. सरकारआज्ञेप्रमाणें चाकरी करून हुकमांत वागतील येणेंप्रमाणें करार.
६ सरकारांतून तुह्मांस जाण्याविषयीं आज्ञा होईल तेव्हां कांहीं अडचण न घालतां कुच करून जावें. आज्ञा झाल्याविरहीत कुच करून जाऊं नये. मसलदीनुरूप जाणें राहाणें स्वामीचे शेवकाचे विचारें ठरेल त्याप्रमाणें करप्यांत येईल. सरकार आज्ञेप्रमाणें निरोप घेऊं. न जाणें झाल्यास कांहीं अडचण घालणार नाहीं येणेंप्रमाणें करार.
७ प्रांतांतील सरकारचे व सरंजामी यांजकडील गांव खेडीं वगैरे येथें तुह्मांकडून व तुह्माकडील तालुकेदार यांजडून जप्त्या झाल्या असल्यास उठवाव्या. व याउपरी होऊं नयेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ नारोपंत चक्रदेव कैद केले ते व बजाबा शिरवळकर व राघोपंत गोडबोले व धोंडोपंत लिमये व लक्ष्मणपंत चक्रदेव एकूण पांच असामी बाळाजीपंत पटवर्धन खासा पागेसुद्धां व भिवजी नाईक अशी बराबर देऊन जुन्नरास आषाढ शु।। १२ शीस नेले. हाडपसरास पोंहचविलें. चिमणाजी खेंडराव प्रतागडास पाठविले.
२ दौलतराव शिंदे यांची खानगी हिंदुस्थानात करावयाचे ठरविलें. त्याजवरून श्रीमंतांचे दौलतीचे बंदोबस्ताचीं कलमें शिंदें यांजकडून करार करून घेतला. त्याची याद व शिंदे यांस सरकारांतून ऐवज घ्यावयाचा ठरला त्याची याद राबीसनसाहेब बहादुर याजवळचे कागदांत आहे त्यावरून.
१ श्रीमंतांनीं दोंलतीचे बंदोबस्त विषई कलमें लिहून याद शिंदे यांजकडे वानवडीस पाठविली त्या कलमावर शिंदे याणीं करार करून याद सरकारांत पाठविली. यादीची तारिख छ, २ सफर आषाढ़ मास सन मजकूरकलमें---
१ सरकारचे व जातमुबारकेचे लक्ष सोडून जे असतील त्यांचा बंदोबस्त मनोदयारूप केला जाईल. त्यास तुह्मी अनुकूल असावे. सदरहु अन्वयें आह्मांकडून अनुकूळतेंत कमी होणार नाहीं. येणेप्रमाणे करार.
२ पुण्यांतील व प्रांतांतील दादी फिर्यादी तुह्मांकडे येऊन ताहाकयांत पत्रें व हुजुर चिटया घेतात त्यास या उपरी कोणी दादी फिर्यादी आल्यास हुजूर पाठवावें. परभारें तुह्मांकडून पत्रें व मसाले वगैरे होऊं नये व हुजुर चिट्ट्याही होऊं नयेत. सदरहु अन्वयें वर्तणुक होईल. हा करार हरएक जाती कामाकरतां तुमची चिठ्ठी हुजुर येऊं नये. सरकारांतून विश्वासुक बोलणार त्यांशीं तुह्मी बोलावें. मशारनिल्हे जी हुजुर विनंती करून जाबसाल वाजवी असतीलसे उलगडून घेऊन तुह्मांस सांगावें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
मोरो बाबुराव फडणीस जुन्नरास येऊन राहिले होते ते आषाढ शु॥ १। छ, २९ मोहरम सोमवारीं पुण्यास आले. गारपिरावर श्रीमंत त्रिवर्ग व दौलतराव शिंदे वगैरे एक जागा बसून मोरो बाबूराव येऊन भेटी झाल्या. शिंदे आपले गांवास गेले. मोरो बाबूराव बाबासाहेबांचे मागें अंबारींत चवरी घेऊन बसले. अमृतरावसाहेब व चिमणाजीअप्पा एके अंबारींत होते. त्यांचे मागें मोरो बाबुराव यांचे पुत्र बसेल, अंबारीचे पुढें व बाबासाहेबांचे मागें आबा पुरंधरे याची अंबार, याप्रमाणें स्वारी रवीवाराहून बुधवार पेठेनें वाडा उजवा घालोन वाड्यांत दाखल झाले.
६ गोविंदराव कृष्ण काळे कैदेंत होते त्यांस चिट्टी बाजीरावसाहेब याणीं पाठविली कीं, नारोपंत चक्रदेव वगैरे मंडळी यांची चाल आह्मांस दाखवून दवलत. करावी. नाना फडणीस यास नगराहून आणावयाचें करून त्यांची जरब आह्मांवर ठेवून कामकाज चालवूं लागले ती तुमची आमची बोलणीं समक्ष होतच होती. सांप्रत या चालिची पराकाष्टा दिसण्यांत आली. ती काय लिहावी ? समक्ष बोलण्यांत येईल. जेष्ठ व॥ ७ मास मशारीनल्हे आदिकरून चिमणाजी खंडेराव व बज्याबा शिरवळकर वगैरे मंडळी नजरबंद केली. नंतर दवलतींत दिसावयाजोगा माणूस हुजूर नाहीं. तुह्मी पेचांत, शिंदे याचीं बोलणीं तुह्मांविषयीं तेव्हांची त्यांत कसेंही करून तुमची मुक्तता होय. या प्रयत्नांत मी आहेच; दवलतींत माणूस दिसावयाकरितां जुन्नराहून मोरोबादादा फडणीस यास आज आणून गारपिरावर भेट होऊन खवासीत घेऊन पुण्यास आले. तुह्मांस कळावें ह्मणून चिठ्ठी पाठविली त्याचा मसुदा राबिसनसाहेब बहादूर यांचे कागदांत सांपडला त्यावरून.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८८ १५७१ अधिक आषाढ वद्य ५
विरोधी संवत्सरे अधिक आषाढ वदि पंचमी सोमवार तदिनी अउभट्ट व शंकरभट्टास अकोजीने व येकोजीने लेहुन दिधले जे पदमणभट्टाचे पसरणीचे इनामाचे पत्रानिमित्त कलह असे तनिमित्त अम्हदखानाचे पत्र आज्ञा करून तृतीय स्थानी ठेविले होते ते पाचाचा उत्तरे दिधलेयाउपेरि पाच जण जे स्थळ देतील त्या स्थळास जाउन निर्णय करुन जो न ये तो ब्रह्मसभेचा अन्याई सत्य
चे दिवाळीस जा।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
शके १७२२ रौद्रनाम संवत्सरे सुरू सन, ईहिदे, मया, तैन व अलफ, सन १२१० संवत अठराशें सत्तावन, १८५७ शक १२७ इसवी सन १८०० व १८०१
१ अमृतरावसाहेब देवावे करावयास वर्ष प्रातपिदेपासून लागले, बाजीरावसाहेब त्यांजवर देणें करून कारभार कचेरी होऊ लागला, नारोपंत चक्रदेव फडणीसीची तारिख करीत होते चैत्र शु॥ १.
२ अमृतरावसाहेब याणीं वडगांवास बारव विहिर केली तिचें उद्यापन वैशाख शु।। ६ छ. ४ जील्हेजी केलें.
३ नारोपंत चक्रदेव व वजाबा शिरवळकर चिमणाजी खंडैराव असे नानास दत्तक पुत्र घ्यावा असें श्रीमंतांजवळ व शिंदे यांजवळ बोलानें ठरावांत आणिलें, श्रीमंतांचें मनांत नव्हतें, परंतु चक्रदेव वगैरे यांस कैद करावयाकरतां नाद चालविला. श्रीमंतांनीं शिंदे यांस संकेत करून त्यांस वाड्यांत बोलाविलें ते जेष्ठ व॥ ७ सह अष्टमी शुक्रवारीं छ, २० मोहरम शिंदे फौजसुद्धां वावाड्यांत आलै. शामीरखान वगैरे फौज चक्रदेव याणीं वाड्यांत बोलाविली. शिंदे आल्यावर दत्तकाचे ठरवावयाकरतां नारोपंत चक्रदेव, बजाबा शिरवळकर, धोंडोपंत लिमये, राघोपंत गोडबोले, लक्ष्मणपंत चक्रदेव, चिमणाजी खंडेराव असे आंत बोलाऊन कैद केलें. नंतर शामीरखान यास लोकसुद्धां प्रहर रात्रीस वाड्यांतून बाहेर काढून दिलें. शिंदे याचे लोक वाड्यांत होते.
४ नाना फडणवीस यांचे वाड्यांत अरब होते ते न निघत, याकरतां तोफा त्यांचे वाड्यास जेष्ठ व। ८ शनवारीं लाविल्या. पश्चिमेकडील एक कोपरा जाया झाला व वाड्यांत गोळे जाऊन पडले. दुसरे दिवशीं जेष्ठ व॥ ९ छ. २२ मोहरम रविवारीं आरब बाहेर गेले. शामीरखान पठाण भवानी पेठेंत होते. त्याजवर तोफा शिंद्याकडून येऊन त्याचे वाड्यावर गोळे मारून त्यांस लष्करांत नेलें. तेथून काढून दिलें जेष्ट व। १० सोमवार छ. २३ मोहरम.
५ अमृतरावसाहेब व बाबासाहेब व अप्पासाहेब नानाफडणीस याचे बायकांचे समाधान त्याचे घरीं गेले. जेष्ट व ॥ १४ छ. २७ मोहरम