Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
अमदानगर.
देवगिरि ऊर्फ देविचा घांट चढून वर आलें ह्मणजे अमदानगर लागतें. ह्यालाच प्रस्तुतकालीं अहमदनगर ह्मणतात. अहमदनगर अमदानगर शब्दाचा अपभ्रंश आहे. अमदा ह्मणून यादवकुळांतील एका राजाची नाटकशाळा होती तिच्यावरून ह्या शहराला अमदानगर नांव पडलें असें कित्येक लोक ह्मणतात. अमदा ऊर्फ अमळा ह्या नदीच्या नांवावरून हें नाव पडलें असे ही कित्येकांचे ह्मणणे आहे. ह्यापैकीं कोणतेंहि ह्मणणें खरें धरलें तरी ह्या शहराचे नांव मूळचें फारशी नाही हें निर्विवाद आहे.
राजुरी, राउरी, राजपुरी, रायरी, रायरेश्वर.
राजपुरी हा मूळ संस्कृत शब्द त्याचें प्राकृत राअउरी शउरी राहुरी; राजाशब्दाचें जुनें मराठी राअ, राय. त्यापासून रायपुरी, रायरी, रायरेश्वर, राजपुरी । हें गाव वाईच्या दक्षिणेस तीन कोसांवर व रायरेश्वराचा डोंगर वाईच्या पश्चिमेस चार कोसांवर आहे. राजपुरी, वेरुळी, रायरेश्वर वगैरे ठिकाणीं जुन्या सिद्ध पुरुषांची व राजपुरुषांची एकेका प्रचंड दगडाची थडगीं आहेत. तीं थडगीं आपल्या पूर्वजांचीं आहेत, असें तेथील गांवढे सांगतात.
वेरूळ, वेरूळी, येरुळी.
दौलताबादेजवळील वेरूळचीं लेणीं प्रसिद्ध आहेत. वेरूळ शब्द विहारालय शब्दाचा प्राकृत अपभ्रंश आहे. लहान विहारालय ह्मणजे वेरुळी. वाईच्या उत्तरेस अंबाड खिंडीजवळ डोंगरावर वेरुळी ह्मणून गांव आहे. वेरुळीचा येरुळी हा अपभ्रंश आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १२१ ] श्री. १७३०.
राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकमतपन्हा यासीः-
आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं याउपरि कोणेविशीं संशय न धरितां स्वार होऊन स्वामिसंनिध येणें. तुमचेविशीं स्वामीचे मनांत कांहीं संदेह असेल तरी श्रींची शपथ असे, व तुह्मींही संदेह धराल तर तुह्मांस शपथ असे. परिवारसहवर्तमान सत्वर येणें. सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
कोल्हापूर.
सह्याद्रीच्या कांहीं भागांतील पूर्वेकडे उघडणा-या खो-यांना ज्याप्रमाणें मावळे ह्मणतात, त्याप्रमाणेंच ह्या पर्वताच्या कांहीं भागांतील खो-यांना कोल ह्मणण्याची पुरातन कागदपत्रांत वहिवाट आहे. कोल्हापूराच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या खो-यांना कौल ह्मणत. ह्या कोलांतून देशांत येतांना वस्तीचा जो मोठा गांव त्याला पुरातन कालीं कोलापूर हाणत व अर्वाचीन कालीं कोल्हापूर अथवा कोल्हापूर ह्मणतात. कोल्हा ह्या जनावराच्या नांवाशीं ह्या शहराच्या नांवाचा कांहीं एक संबध नाहीं. कोल्हांपूरच्या पश्चिमेकडील खो-यांत फार पुरातन काळीं कोल ऊर्फ कोळ लोक रहात होते, त्यावरून त्यांच्या प्रांतालाहि कोळ ह्मणत असत. सह्याद्री पर्वतांतील कातकरी, भिल्ल, कोळी, कतवडी वगैरे मूळच्या लोकांपैकींच हे कोल ऊर्फ कोळ होत. कोल्हापूराचें करवीर हें संस्कृत नांव सापेक्ष दृष्टीनें अलीकडील आहे असें दिसतें.
महाबळेश्वर.
सह्याद्रीच्या ज्या खो-यांना सध्यां आपण मावळें ह्मणतों त्यांना हजार बाराशें वर्षापूर्वी मामल ही संज्ञा असे. ह्या मामलदेशांतील जी मुख्य देवता ही मामलेश्वर अथवा मामलेस्त. महाबळेश्वराच्या भोंवतालील खेड्यांतील लोक महाबळेश्वराला मामलेसरच ह्मणतात. मामलेसराला महाबळेश्वर हें नांव शास्त्रीपंडितांनीं आपल्या संस्कृत वाणीला साजेल असें दिलें आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
शिवगड, शिवगंगा व शिवपूर.
पुण्याच्या दक्षिणेस दहा बारा मैलांवर सिंहगड नांवाचा प्रसिद्ध किल्ला आहे. त्या किल्याचे सिंहगड हें नांव शिवाजीनें तानाजी मालुस-याच्या स्मरणार्थ ठेविलें; व मराठ्यांच्या इतिहासांत त्याच नांवानें तो किल्ला प्रसिद्ध आहे. शिवाजीच्या पूर्वी मुसलमानांच्या अमदानींत ह्या किल्याला कोंडाणा ह्मणत असत, हें नांव मुसुलमानांनीं फारशी भाषेंतून ठेविलेलें नाहीं. गडाच्या पूर्वेस कोंडणपूर ह्मणून एक गांव आहे, त्यावरून सान्निध्यामुळें कोंडणा असें गडाला मुसुलमानांच्या पूर्वीच नांव पडलेलें आहे. “अस्ति दक्षिणपथे कुंडिनपुरं नामनगरम्” हें पंचतंत्रांतील वाक्य सर्वश्रुत आहे. तेंच हें कुंडिनपुर ऊर्फ अपभ्रंशानें कोंडणपुर असावें. परंतु हेंही ह्या किल्याचें सान्निध्यानें नांव पडलेलें आहे; खरें नांव नव्हे. ह्या किल्याचें खरें नांव शिवगड. गडाच्या माचीवरील कोळी आणि कल्याण वगैरे आसपासच्या खेड्यांतील गांवढे ह्या गडाला शिवगड ह्मणतात. ह्या गडापासून जी नदी कोंडणपुरावरून पूर्वेकडे शिवापूरास जाऊन वनेश्वरावरून नीरेला मिळते, तिला शिवगंगा ह्मणतात. तिच्या कांठी असलेलें मोठें गांव शिवपूर होय. हें गांव शिवाजीच्या वेळेस अगदीं मोडकळीस आलें होतें. तेथें शिवाजीच्या मनांत एके वेळीं आपली राजधानी करावी असें येऊन, या गांवाची चांगली उस्तवारी झाली व त्यास शिवापुर असें नांव पडलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
कित्येक शब्दाची व्युत्पत्ती.
व-हाड, म-हाड, क-हाड.
मराठा शब्द महाराष्ट्र शब्दाचा अपभ्रंश कित्येक समजतात. कित्येक महारट्ट शब्दाचा हा अपभ्रंश असावाअसें ह्मणतात. आणि कित्येक मरहट्ट असें ह्या शब्दाचें मूळस्वरूप असावें असें प्रतिपादितात. पैकीं दुसरीव्युत्पत्ति विद्वानांना मान्य आहे, असें दिसतें. डा. भांडारकरांनीं आपल्या दख्खनच्या इतिहासांत हीच व्युत्पत्ति मानिली आहे. शकांच्या, शातवाहनाच्या, व अशोकाच्या वेळीं दक्षिणेंत रट्ट ह्मणून एक लोक होते; त्यांचेच भाऊबंद रडु, रड्डी, वगैरे उत्तर कर्नाटकांतील कांहीं जुने लोक होत; ह्या रट्टापैकीं कित्येक कुळी महापराक्रमी निघाल्या व त्यांनीं आपल्याला महारट्ट असें बहुमानार्थी। नांव घेतलें; वगैरे अनुमानें काढिलेलीं प्रसिद्ध आहेत. कार्लें येथील शिलालेखांत महारथी व महारथिनी असे शब्द आलेले आहेत. ते दोन वर्षांपूर्वीच्या मराठ्यांचे वाचक आहेत, असें बहुतेक सर्व प्राचीन लेखसंशोधकांचें ह्मणणें आहे. परंतु महारथी ह्या संस्कृत शब्दाचें महारट्ट हें प्राकृत रूप कसें झालें हें नीट उलगडून कोणीच दाखविलें नाहीं. रथ शब्दाचें रह व रथी शब्दाचें रही अशीं प्राकृत रूपें होतात; रट्ट व रट्टी अशीं होत नाहींत. महारथी उगाच मजेखातर रूप लिहिलें, असेंहि म्हणणें शोभत नाहीं. कारण, हे शिलालेख कांहीं कोणाला फसविण्याकरितां लिहिलेले नाहींत, त्यावेळीं जें रूप प्रचलित असेल तेंच लिहिलें असेल. अशोकाच्या शिलालेखांत रास्टिक ह्मणून एक नांव येतें तें निराळेंच. येणेंप्रमाणें (१) रास्टिक, (२) महारथी, (३) महारट्ट, (४) मरहट्ट, व (५) महाराष्ट्र, असे एकाच देशांतील लोकांच्या नांवाचें पांच प्रकार पहाण्यांत येतात. ह्यापैकीं खरें नांव कोणतें असेल तें निश्चयानें सांगतां येत नाहीं, मराड, मरट्ट, म-हाटा. मराठा, अशीं ही रूपें अलीकडील सात आठशें वर्षांत प्रचारांत आहेत. मराठा हा शब्द अलीकडील तीनशें वर्षांतील लेखांत दृष्टीस पडतो. त्या पूर्वीच्या तीनशें वर्षांतल्या ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथांत म-हाटा असें रूप आढळतें. प्राकृत पिंगलसूत्रांत मरट्ट, महरट्ट अशीं दोन रूपें सांपडतात. व एक दोन ताम्रपटांत मराड असें रूप येतें. सारांश, हा शब्द गेल्या दोन हजार वर्षांत नऊ दहा प्रकारांनी लिहीत आले आहेत. पैकीं खरा शब्द व रूप महरट्ट असावें असें वाटतें. रट्ट हें ह्या देशांतील एका पुरातन कुळीचें नांव आहे; व महरट्ट हे त्याकुळींतील एका पोटभेदाचें नांव आहे. आतां, महरट्ट म्हणजे मोठे रट्ट असा जो कोणी कोणी विद्वान् अर्थ करतात, ह्या अर्थातून निराळा एक अर्थ ह्या शब्दाचा करावा असें पुढील कारणाकरितां मला वाटतें. मराठींत व-हाड व क-हाड असे म-हाड शब्दासारखेच दोन शब्द आहेत. हे दोन्हीं शब्द एकाच देशांतील निरनिराळ्या प्रांतांत रहाणा-या लोकांचे वाचक आहेत. व-हाड शब्द वहरट्ट व क-हाड शब्द कहरट्ट शब्दाचा अपभ्रंश दिसतो. येणें प्रमाणें महरट्ट वहरट्ट व कहरट्ट असे तीन शब्द पुढें येतात. हे तिन्हीं शब्द रट्टांच्या निरनिराळ्या पोटभेदांचे वाचक आहेत हें उघड आहे. आतां, ताम्रपत्रांतून व ग्रंथांतून क-हाड शब्द करहाटक, करहट्ट अशा रूपांनीं आढळतो, हें खरें आहे. परंतु, मरहट्ट, मरहाटक, ह्या शब्दाप्रमाणेंच करहाटक, करहट्ट हीं भ्रष्ट रूपें आहेत असें मानणें रास्त आहे. वरहट्ट व वरहाटक हे शब्द ताम्रपटांत व ग्रंथांत कोठेंही आढळत नाहींत. पण, महरट्ट व कहरट्ट ह्या शब्दांप्रमाणेंच हजार पंधराशे वर्षांपूर्वी वहरट्ट हा शब्द प्रचलित होता असें अनुमान होतें. कदाचित् वहरट्ट ही पोटकुळी राजकीयदृष्ट्या फारशी महत्वाची नसल्यामुळें तिचा नामनिर्देश ताम्रपटें व ग्रंथ ह्यांत नाहीं, इतकेंच. तेव्हां, वहरट्ट, महरट्ट व कहरट्ट असे तीन शब्द व्युत्पत्यर्थ आपल्यापुढें उभे राहतात. ह्या तीन शब्दांतील वह, मह, कह ह्या शकलांचे अर्थ बसवावयाचे आहेत. माझ्या मतें, वह ह्मणजे पलीकडील, मह ह्मणजे मधील व कह ह्मणजे अलीकडील, असे अर्थ घ्यावे. रट्ट कुळीचे एकंदर तीन पोटभेद होते, पलीकडील रट्ट ते वहरट्ट, मधलि, रट्ट ने महरट्ट, व अलीकडील रट्ट ते कहरट्ट. सारांश, हजार बाराशें वर्षांपूर्वी एके काळीं महाराष्ट्राचे व-हाड, म-हाड व क-हाड असे तीन भाग होते व त्यांतील लोकांस व-हाडी, म-हाडी व क-हाडी किंवा व-हाडी, मराठे, वे क-हाडे अशीं नांवें पडली. ह्या तिन्हीं प्रांतांतील तिन्हीं पोटकुळ्या एकच भाषा बोलतात व एकाच कुळींतल्या आहेत. मधील पोटकुळीतील जे महरट्ट किंवा मराठे ते राजकीय चळवळी करणारे असल्यामुळें त्यांच्या नांवानें नागपुरापासून तुंगभद्रेपर्यंत व तैलंगणपासून कोंकणापर्यंत जो विस्तीर्ण मुलुख आहे तो महशूर झाला आहे. भोज, पिटिनिक, अपरांतिक, वगैरे पैठण, नगर, उत्तर कोंकण प्रांतांतील मराठी भाषेसारखीच भाषा बोलणारे लोक राजकीयदृष्ट्या महत्वाचे नसल्यामुळें महरट्टांच्या ह्मणजे मराठ्यांच्या तेजांखालीं लोपून गेले. नाशकापासून वाईपर्येंतचा जो टापू तो महरट्टांचा मूळदेश; वाईपासून कोल्हापुरापर्येंतचा जो प्रांत तो कहरट्टाचा मुलूख; व खानदेशापासून नागपूर प्रांतापर्येंतचा जो देश तो वहट्टांचा प्रांत, असा प्रकार होता. पहिल्यांदा एकटी महरट्ट कुळी राजकीयदृष्ट्या महत्वाची झाली; तिनें पुढें वहरट्ट व कहरट्ट ह्या पोटकुळ्या आत्मसात् केल्या, आणि नंतर वाढत वाढत नागपूर, खानदेश, पैठण, बालेघाट, गुलबुर्गा, कोल्हापूर, बेळगांव, उत्तरकोंकण, दक्षिणकोंकण, गोंवा, कारवार, वगैरे प्रदेश आक्रमिले. हा प्रकार शहाजी व शिवाजी ह्यांच्या पर्यंतच्या पंधराशे वर्षांत झाला. नंतर मराठशाहींत ओडिसा, ग्वालेर, इंदूर, बडोदा, गुत्ती, अर्काट, तंजावर, येथपर्यंत मराठ्यांच्या छावण्या व वसाहती पसरल्या. असा हा मराठ्यांच्या कुळीच्या राजकीय प्रसाराचा वृत्तांत आहे. ही प्रसार होतांना पूर्वी अनेक अडथळे आलेले आहेत व सध्यां तर तो बहुतेक थांबल्यासारखाच आहे. परंतु ह्या कुळीच्या वाढीचा गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास पहातां, सर्व आर्यावर्तावर व जवळच्या म्लेंच्छ देशांवर ही कुळी पसरावी असा अंदाज बांधावा लागतो. ही पसरणी होतांना हजारों ठेंचा, लाखों अडचणी व शेंकडों वर्षे लागतील, हें उघड आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
९ बाजीरावसाहेब यांणीं दौलतराव शिंदे यांस स्वदस्तुर पत्र लिहून पाठविलें कीं तुम्हांकडून स्वदस्तूर अलिकडे पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तरी वरचेवर पाठवीत जावें. समग्र पृथ्वीचे पाठीवर आमचे जन्मांतरीचें त:पश्चर्येचे सोबती एक आपणच सेवक आहेत. आह्माविषयीं किती काळजी आपले जवळ प्राण जीग जीग केले असतील. परंतु माझे जातीविषयीं आपला खंबीर लोभ व निष्ठा एकरूप आमचे मनोदयानुरूप वागावयाचीच राहून मोठ्या मोठ्या माणसाची सांगणी मनावर धरली. तीच कारणें जनपर्येत शेवटास जाऊन शेवट गोड व्हावा. आपली उभयतांची कीर्त रहावी हेंच सबाह्यांतर आमची इच्छा आह्मांस राहून आणून संकटांत मोकळे करून, आह्मांविषयींचे कल्याण करावयाचेंच करावयाचें असा खंबीर भगवंत सत्तेंकरून धरून आम्हांस स्वरूपास आणिली. आणून उजेडास आणिलें. हें सर्व करणें आपण केलें तसेंच आमचे जन्मपर्येत निभवावें. आपली अशी सख्य भक्तिची निष्ठा मनांत आणून, अंत:कर्णापासोन प्रसन्न होऊन लिहिण्यांत येतें की, बाबा आह्मांस आपण आहेत. आह्मीं आपले आहों ह्मणोन पत्र पाठविलें. तें राबिसनसाहेब याजवळचे कागदांत सांपडलें त्याजवरून.
------
२७
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
२ वसई सरसुभ्याचें काम वामनाजी हरी मराठे यांजकडून दूर करून बाजीराव गोविंद बरवे यांस दिलें. तें काम कांहीं दिवत खंडेराव रास्ते व आन्याबा अभ्यंकर करीत होते. पुढें बाजीराव बर्वे यांजकडून सरसुभा दूर करून खंडेराव रास्ते यांजकडे सांगितला. शिंदे हिंदुस्थानांत गेल्यावर सरजेराव घाडगे कागलास जाऊन माघारे पुण्यास येऊन कुंजर यांचे घरीं खर्चाकरतां धरणें दिलें. तेव्हां श्रीमंतांनीं लोक पाठवून कुंजर यासह सोडून घेऊन सरजेराव यांस पुण्यांतून काढून दिलें. ते दरकूच शिंदे याचे लष्करांत गेले.
३ श्रीमंताकडील बाळोजी कुंजर व शिंदे यांजकडील देशमुख व लिंबाजी भास्कर व बाबाजी पाटणकर एक विचारे कारभार करूं लागले. सदाशिव माणकेश्वर याजविषयीं खातरी श्रीमंताजवळ बाळोजी कुंजर यांनीं करून सरकारांतून जवाहीर अंगावर घालावयास देऊन भागानगरास वकिलीवर पाठविलें. त्यांचे कारभारी कृष्णाजी भवानी श्रीमंताजवळ राहिले.
४ जयवंतराव महार्णवर फत्तेसिंग बहादर यांजकडील सरंजामाची जप्ती सालमजकूरी केली छ. १० मोहरम.
५ कृष्णाजी दाभाडे यांजकडील सरंजामाची जप्ती सालमजकुरी केली छ. २२ मोहरम.
६ शिवाजी महाराज कोल्हापुरकर यांस पुत्र फाल्गुन व॥ ७ रविवारीं थोरले स्त्रीस झाले. त्याचें नांव आबासाहेब ठेविलें.
७ नारोपंत चक्रदेव कारभारांत होते तों पावेंतों तारिख तेच घालीतच होते व मामलती जिल्हेस कोणी पैका देणें व खर्च करणें त्याचे परवानगीनें तारिख होत असे. ते कैद झाल्यावर श्रीमंत तारिख घालों लागले. व चिंतोपंत देशमुख यांस माहीतगारीकरितां कामांत घेऊन मामलती जिल्हेस लावूं लागले. महाली मुलखी काम खुद्द पाहूं लागले. वरकड राजकारणी कामावर बाळोजीं कुंजर वगैरे होते. रसद सरकारी व आपली खाजगी असा ठराव करावयाचा सांप्रदाय नवा श्रीमंतांनीं सुरूं केला.
८ धोडोपंत गोडबोले यांस पलटणें तयार करावयासं सांगितलीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
यशवंतराव होळकर यांचें पत्र छ, १३ जमादिलाखरचे सरकारांत आलें कीं, शिंदे याजकडील बाया याणीं पुण्यापासून येथपर्यंत मुलखाची धूळ करून कोठे ठिकाण राहूं दिला नाहीं. पुढेंही येथूम बहकुम जावयाची चाल पाहून त्याची खातरजमा करून जवळ जावणोन घेतल्या असतां मुलखांत धूम आरंभून उज्जनीचा विध्वंस करावा ही दृष्टि पाहिली. मार्गाची चाल एकही दिसेना. निरोपाय जाणून स्वाधीन करणें प्राप्त होऊन, आसमंतात घेरा घालोन घ्यावा तों ज्वारीचें शेतांतून निघोन उज्जनींत गेल्या. सभोंवति नाकेबंदी ठेविली आहे. कदाचित् निघोन गेल्यास त्यांचे मागें फौजांचीं रवानगी करून ज्यांत बंदोबस्त तेंच घडेल. खर्च घरचे कलहामुळें पराकाष्ठेच्या चाली होऊन कांहीं ठिकाण राहिला नाहीं. याउपरी व इकडील शिंदे यांजकडील बंदोबस्त होऊन ऐक्यता राहून व पूर्वरीतीनें सरकार चाकरी घडे ते केलें पाहिजेल ह्मणोन पत्र छ. २१ जमादिलाखर कार्तिक वा। ८ मीस आले. त्याचें उत्तर सरकारांतून गेलें कीं लक्ष्मीबाई उज्जनींत जातां मेवाडचा रोख धरून निघोन गेल्या ह्मणोन ऐकण्यांत होतें. त्याचे पिछास तुह्मी फौज पाठविली असेल व येविषयीं दौलतराव शिंदे याणींही तिकडील सरदार इंगळे व जनरल याजला लिहून पत्राच्या रवानग्या केल्या आहेत. त्याप्रमाणें तेही पाठलाग करतीलच. परंतु तुह्मीं त्याची वाट ज्या हाता जिकडे गेल्या असतील तिकडे शोध लावून जलदिनें फौजेच्या रवानग्या करून सरकार आज्ञेप्रमाणें ज्यात हास्तगत ते करणें. बंदोबस्त प्रकरणीं लिहिलें त्यांस येविषयीं मल्हार शाबजी यांशीं बोलण्यांत आलें आहे. लिहीतील त्याजवरून कळेल. मशारनिल्हे सरकार आज्ञेप्रमाणें लिहितील तेंच खचीत समजोन इकडील बंदोबस्त विषयीं संशय न धरावा. लिहिल्याअन्वयें करणें ह्मणोन उत्तर पाठविलें. होळकर यांचें पत्र व उत्तराचा मसुदा राबिसनसाहेब यांजवळचे कागदांत सांपडला त्यांजवरून.
१ श्रीमंताची स्वारी मार्गशीर्ष मासीं निघोन सासवडास नाना पुरंधरे यांचे वाड्यांत जाऊन राहिले. तेथून जेजूरी, मोरगांव, भुलेश्वर, वाई, वगैरे गेले. पुरंदर पाहिला नारायण याचें दर्शन घेतलें. पुण्यास माघ शु। ७ मीस दाखल झाले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १२० ] श्री.
छत्रपति
राजश्री चिटकोवा गोसावी यांसीः -
अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। गुंजाजी गाईकवाड सरखवास रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष तुह्मीं पत्र पा। तें पावोन लिहिला मजकूर कळो आला. वो। राजश्री केशवभट्ट गोटखिडीकर याचा मजकूर लिहिला तो कळला. ऐसियासी येविशीं श्रीमन्ममहाराज राजश्री स्वामीचे सेवेसी अर्ज करून आज्ञा होईल त्याप्रो। मागाहून लिहिलें जाईल. बावडेस रवाना करणेचे लाखोटे दोन पा। आहेत. येऊन पोहोंचतील. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
३ नाना पुरंधरे यांचे पुत्र बज्याबा यास पुत्र दत्तक महिपतराव त्रिंबक ऊर्फ नाना पुरंधरे याणीं सरंजामी याचा कारभार करावा ह्मणोन श्रीमंतानें सांगितले. श्रावण मास पागेचें काम निळकंठ महादेव पुरंधेरे यांजकडे सांगितलें, त्याचे तर्फेने सदाशिवपंत फाटक पागेचे काम पहात होते.
४ श्रावण मासचा देकार पांच दरवाजे मिळोन दिला. अडीचे लक्ष रुपये खर्च झाला. बाजीरावसाहेब व आप्पासाहेब व मोरोबा फडणीस देकार म्यावयास होते. दवलतराव शिंदे देकारांत आले होते. प्रदक्षणा सर्वानीं केल्या. समारंभ यथास्थित झाला. ब्राह्मण वाड्यांत व पर्वतीचे मिळोन बेचाळीस हजार झाले.
५ ढंढेरे याजकडे हुजुर पागा होती. त्याजवर नारोबा आठवले याची चौकशी नेमली. श्रावण शुद्ध १३ छ. ११ रबिलावल.
६ मोरो बाबुराव फडणीस यांस तारिख घालावयास विजयादशमीस सांगितलें.
७ नाना फडणीस मृत्यु पावले. बाळोबा वगैरे मारले गेले व पदरचे मंडळींपैकीं बहुतेक कैद केलें. अमृतरावसाहेब निघोन गेले. आतां शिंदे गेले असतां बखेडा होणार नाहीं असें बाजीराव साहेब याणीं मनांत
आणून. कार्तिक श्रु। १२ छ, १० जमादिलाखरी दौलतराव शिंदे यांस निरोप दिला. खंडेराव होळकर त्यांचे हवाली केले. कार्तिक अखेर पावेतो शिंदे वानवडीवर राहून जांबगांवास गेले; तेथून पुढें गेले. सरजेराव कागलास जावयाकरितां राहिले. बराबर गेले नाहींत. गाईकवाड यांजकडून दाहा लक्ष रुपये शिंदे यास सरकारांतून देवविले. जावजी पाटील निसबत गाई कवाड याणी वाघोलीचे मुकामीं शिंदे याचे लष्करांत जाऊन विसा दिवसांत ऐवज बडोद्यांत पाठवून द्यावा याचा करार करून खास हवाला घेतला, नरसिंह खंडेराव विंचुरकर व रंगराव राजे बहादुर व पवार रघुनाथराव बळवंत जायगांवकर यांणीं चार पतकें बराबर घ्यावी व काशीराव होळकर यास बराबर ध्यावें असें निरोपसमयीं ठरलें. येविषयीं शिंदे यांचीं पत्रें कीं गाईकवाड़ याजकडील ऐवज पटला नाहीं. व खंडेराव होळकर व चार पतके यांस आज्ञा होऊन रवानगी सत्वर झाली पाहिजे ह्मणून सरकारांत व बाळोजी कुंजर यांस छ. २१ फजल व १६ फजालचीं पत्रें चाळीसगावचे मुक्कामाची आली ती राबिसनसाहेब याजवळचे कागदांत सांपडली ती त्यावरून—