Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखाक १४०
शके १६२९-१६६८

।। श्रीविद्याशंकर।।
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीश्वर
श्रीमच्छकराचार्यान्वयश्रीविद्याशकरभारतीस्वामिकरकमल-
सजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि

श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री कृष्णाजी विठल सुभेदार प्रां। कराड भक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री छत्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय सुखानुभवलेखनद्वारा चित्त प्रमोदवीत असले पाहिजे दुसेरीक्षेत्रास आले समई आपण श्रीच्या पुण्यतिथी करिता गोदूम पाच मण मान्य केले आहेत त्यास प्रस्तुत पुण्यतिथी समीप उरली गोदूम मठास आणावे लागताती या करिता रा। वेकणभट या समागमे आशीर्वादपत्र पाठविले आहे तरी गोदूम सिध करून उत्तर पाठवणे ह्मणजे बैल पाठवून मठास आणऊ ते ब्राह्मणमुखी व्यय होतील तेणे करिता श्रेयस्कर आहे आपण मठीचे अभिमानी सच्छिष्य असा तेथे विशेष काय लिहिणे

लेखाक १३९
१६४० बाळबोध

श्रीरामो जयति
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितै शकराचार्यान्वयसजा-
तश्रीमच्छकेश्वरमठस्थविद्याशकरभारतीभि कृत नारायणस्मरणानि
स्वस्ति श्रीमन्निखिलनिगमाध्ययनाध्यापनार्जितयशोनिकुरबरजितदिक्प्रातेषु
श्रीमत्करहाटक - क्षेत्रस्थब्रह्मवृदेषु विशेष सप्रति श्रीमत्प्राते प्रतिवर्ष तैलगा
समायाति अस्मन्मठाभिमान केनापि न क्रियते तद्धशादस्माभि श्रीमत्प्राते अस्माक मठपूजामठदक्षणाआचारव्यवहारप्रायश्चित्तादिक श्रीमोरेश्वरभट्टगिजरोपनामकधर्माधिकारिणा स्वाधीनता कृतास्ति तर्हि श्रीमद्भि सर्वै पूर्वपरपरया मठधर्मो यथाचालितस्थितस्तथैवाधुनापि चालनीय आलश्यो मा विधेय इद भवतामेव श्लाघ्य धर्मोल्लिघनन कर्तव्यमित्यल सुज्ञेषु

लेखांक १३८

श्रीरामचद्र

वेदमूहुर्ती राजश्री नारायेणभट गिजरे तीर्थउपाध्ये क्षेत्र कराड स्वामीचे सेवेसी

सेवक भगवतराउ रामचद्र कृतानेक नमस्कार विनती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहिले पाहिजे विशेष माहादाजी खडेराऊ याजपासून काही अप्रमाद घडोन आला या करिता हाली श्री स्नानास तुह्माकडेस पाठविले आहेत ऐसीयासि येथाशास्त्र प्रायेचीत देऊन शुधपत्र दाहा ब्राह्मणाचे विद्यमाने देऊन पाठविले पाहिजे छ २२ रमजान कृपा असो दीजे हे विनती पा। हुजर

लेखाक १३७

श्री

वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री तात्या दीक्षित गिजरे स्वामीचे सेवेसि

विनती उपरी येथील कुशल ता। छ २४ रजब पर्यत तुमचे आसीर्वादे सुखरूप असो विशेष वो । राजश्री श्रीनिवास जोसी कुटुब सुधा पुण्यास लग्नास आले होते ते समई जोसी बावाची कन्या हि आली तिचा भरतार हि आह्मापासी लग्नात होता लग्न जाहल्यावर येक महिना राहिला होता स्त्रीपुरुषे काही दिवस येकत्र होती नतर घरास गेली जोसीबावा राहिले होते काही दिवसानी ते हि गेले असे असता हाली तुमचे ग्रामस्त मनस्वी वल्गना करितात जी गोष्ट घडावयाची स्वप्नात हि नाही ऐसे बोलणे बोलतात त्यास कोणती हि गोष्ट बोलणे ती स्थल पाहून वस्तु पाहून बोलावी ती न करिता अपशब्द बोलावे हे सर्वास ठीक नव्हे आणि बाइकानी वगैरे हे श्रवण करून भयाभीत व्हावे हे उचित की काय पूर्वीचा समध पाहता काहीच अतर नाहीं लग्नास आली किंवा नाही याचा शोध न करिता गैरसमजुतीने कोणती हि गोष्ट बोलो नये तुह्मी क्षेत्रस्त ह्मणौन विनती लिहिली आहे कोणती हि गोष्ट जे करणे ते समजून करावी सुज्ञाप्रति विशेष काय लिहिणे पत्राचे उत्तर पाठवावे ही विज्ञापना

लेखाक १३६

श्री

माहाराज राजाधिराज राजमान्य राजश्री पत अमात्य स्वामीचे शेवेसी

विनति सेवेसी सेवक रुद्राजी चदो देसकुलकर्णी पा। क-हाड कृतानेक सास्टाग नमस्कार विनति क्षेम ता। छ ७ माहे जिलकाद पावेतो सेवकाचे वर्तमान माहाराजाचे कृपादृस्टी करिता यथास्तीत आसे माहाराजानी कसबे क्षेत्रीच्या ब्राह्मणास मौजे सैदापूर त्याचे नाव सिवापूर ठेऊन अग्रहार करून दिल्हे ते क्षेत्रा समीप वाधताती ब्राह्मणास गावीची उपजीविका होऊन येई ना ह्मणौऊन ब्राह्मणानी सागीतले त्या वरी स्वामी कृपाळू होऊन मौजे आटके दिल्हे त्या पत्रा निमित्य माहाराजा पासी वेदमूर्ती मोरेश्वर भट व समस्त ब्राह्मण आले आहेत मौजे मजकूरची चावर ३६।१८ बि ता।
आवल जमीन चावर                  दूम जमीन चावर       सीम जमीन
२०१०                                          १३१८                ३२०
देखील प्राचीन इनामदार आहे तेथील पाटील पलाले आहेत त्यासी आणावयाचे यत्न केला आहे तो गाऊ दोनी तीन वरसे खराब पडिला आहे स्वामीस ब्राह्मणाचा अभिमान आहे पत्र करून द्यावयास स्वामी समर्थ आहेत बहुत काय लिहू सेवक असे ही विनति

लेखाक १३५

श्री

वेदमूर्ती राजश्री गोपालभट बिन रुद्रभट गिजरे वास्तव्य कसबे क-हाड स्वामीचे शेवेसी

सेवक कालोजी बिन सोमाजी भोसले सा। दडवत विनति उपरी क-हाड क्षेत्रीचे तुह्मी आमचे तीर्थपुरोहित आमचे वडिलाचे लिहिले तुह्मापासी होते ते लिहिले तुह्मापासून गेले तुह्मी आह्मापासी येऊन त्या प्रमाणे सागितले की वडिलाचे लिहिले आह्मा पासून गेले आहे त्यास मनास आणिता तुह्मी आमचे तीर्थपुरोहित ऐसे जाणून तुह्यास पत्र लिहून दिल्हे असे तुह्मी आमचे पुरोहित आमचे वौशीचे देऊन येतील ते तुमचे पूजन करितील यासि अतर नाही तुह्मास दरसाल वरशासन, रु॥ १० बाब देऊ जे आसीर्वाद देऊन सुखरूप राहणे बहुत काय लिहिणे हे विनति

लेखाक १३४

श्री

वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजेश्री समस्त ब्राह्मण क्षेत्र
करहाटक स्वामीचे शेवेशि

आज्ञाधारक नारायणाचार्ये कृत साष्टाग नमस्कार विज्ञापना ऐसी जे स्वामीनी पत्रे पाठविली ती पावली वर्तमान विदित झाले त्यानतर श्रीमत नाना फडनिसाचे दर्शन घेऊन वर्तमान सर्वे विदित केले ते बोलिले की अह्मास चवकशी करावी लागती त्यावरून यादीची मकलाशी सदिग्ध केली की कोणाचे गाव व इनाम व वर्षासने कोणी दिल्ही याचे कागदपत्र कैसे अहेत याचा शोध करणे ह्मणोन मकलाशी झाली असे दोन वेल झाले दिकत फार पत्रामध्ये लिहिली मग राजेश्री गोपाल नाईक ताबवेकर यानी दोन वेला सागून दूसरी यादि केली पत्र लिहिले त्यामध्ये हि दिकत अहेच रा। श्री नारोपत पर्चुरे मुख्य कार्भारी चौउकशी फार या करीता समस्त ब्राह्मणाचे येक च पत्र जाहले पृथक् पृथक् होईना तर कदाचीत् रा। श्री दाजीपतानी कोणास काहीं गाव विषई अथवा इनामा विषई उपद्रव केला तर मनुष्या हाती पत्र लिहून पाठवणे ताकीत पाठऊन देऊ या ब्राह्मणास उपद्रव न करणे ह्मणून दोन पत्रे रा नाना याची ताकीद हि आहे त्यावरि रा। रामाजी नायीक भिडे याचे ही पत्र पाठविले आहे धदा अवघा नाइकानी देवविला त्यानी उत्तम पत्र दिधले आहे काही उपद्रव झाला तरि भय दादाचे न धरणे त्यानतरि जाचे जे इनाम वर्षासने व धान्य जे आहेत जे चालतात त्यास अडस्थला न करणे ह्मणून आज्ञा येकधर केली आहे कलले पाहिजे तुमची तालिका पत्रे अवघी पाठऊन दिधली असेत येथील दरबारची रीति फार दुर्घट झाली आहे पत्रे शीघ्र होत नाही भोगवट्या व्यतिरिक्त पत्र होत नाही चवथाईच्या ताकिती येक दोन गेल्या आहे काही चिता न करणे बहुत काय लिहिणे हे नमस्कारा सर्वानी वर्षासने अपली मागून घेणे त्यानतर अह्मी प्रतिनिधीस पत्रे घेतले आहे की अमचा परसात शूद्र रघू मुलीक राहिला आहे तो काढून स्थल मुक्त करणे त्यास तुह्मी ही यत्न करून शूद्र निघेल ते गोष्टि करावी रा। दादास पत्र आहे होमशाला बाधायाची आहे सूज्ञेषु किबहुना इत्यल पल्लवेन
हा नमस्कार

लेखाक १३३

श्री
राजमान्य राजेश्री रामभट बुधकर अग्रहार मौजे ब्रह्मपुरी गोसावी यासी

स्नेहाभिलाषी श्रीकराचार्ये पडितराय नमस्कार उपरी मौजे ब्रह्मपुरी अग्रहार येथे आमचे अश जमीन । पाव चावर आहे त्याचे लागणी काय जाली आहे उत्पन्न अल्पस्वल्प काय होते हे काही तुह्मी लिहून पाठवीत नाहीत हे तुह्मास उचित नव्हे जे काय थोडे बहत उत्पन्न होईल ते आमचे आह्मास प्रविष्ट करीत जाणे व बाळभट सिराळेकर याचे नेमणूक आश अग्रहारीचे विभागाच्या जाबित्यामध्ये खडी १४ येक खडी आहे त्याचे दामाशाही पावीत जाणे व जाबित्यामध्ये मोरेश्वरभट व कासीभट या दोघाच्या असामी आहेत त्याचा आश जो नेमिला आहे त्याचे ही दामाशाई प्रा। आश पावीत जाणे या उपरी रा। वीरेश्वरभट गिजरे याणी आह्मास गोष्टी विचारिली त्याविषई वीरेश्वरभटापासी सागितले ते मुखवचने सागतील विशेष काय लिहिणे लोभ असो देणे हे नमस्कार
शुभ भवतु

लेखांक २५९                                                                                                                                         १६०७ माघ शुध्द ७                                      

                                                                                72

१ श्रीसके १६०७ क्रोधननामसंवछरे माघशुध्द सप्‍तमी बु-
२ धवार तदिनी रा। वेदमूर्ति दामोदरभट धर्मा अधिकारी साकीन
३ पुनताबे यासि रा। तीपाजी राजे पांढरे याणी लेहुन दिल्हे
४ ऐसे जे तुह्मास तुमचे स्तलचे तीर्थउपाधीक दिल्हे
५ अस तुमच्या गावास आलिया पूजन तुमच करावे उपाधी-
६ क तुह्मास द्यावे आपले वंसीचे जे येतील त्यानी तुमचे
७ घरी राहावे हे लिहिले सही

                                   260 1  (फारसी)

 

                                                                     प्रकरण चौथे
ह्या प्रकरणाचें नांव श्रीचिंतामणिकौस्तुभपुराण. सर्व प्रकरण ओवीपद्य आहे. एकंदर अध्याय चार, प्रस्तुत ग्रंथाचीं ७२ पासून ८८ पर्यंतचीं १७ पृष्टें हें प्रकरण आहे. या प्रकरणाचा काळ कर्त्यानें दिला नाहीं. तत्रापि हें चिंतामणिकौस्तुभपुराण अथवा कौस्तुभचिंतामणिपुराण शक १५१६ च्या अगोदर केव्हां तरी लिहिले गेले असावें असे म्हणण्यास प्रमाण आहे. गर्सन ड कुन्हा याच्या The origin of Bombay ह्या पुस्तकाच्या ११९ व्या पृष्टा वर खालील वृत्त आहे:- One of the resultsa of the conversion of the (पाठारा) Prabhus by the Portu. guese was the production of a local native historian, who, when converted, became Caetano de Souza, and wrote a work in Portuguese entitled A Historia de Mahim, in I594 A. D. He is said to have based his history on the Kaostubha-Chintamani for his account of the Prabhus. डसूझानें इसवीसन १५९४ त कौस्तुभचिंतामणि नांवाच्या ग्रंथाच्या आधारें माहीमचा इतिहास पोर्तुगीज भाषेंत लिहिला, म्हणून वरील वाक्यांत सांगितलें आहे. डसूझा हा मूळचा पाताण्या प्रभू होता व त्यानें कौस्तुभचिंतामणि हा ग्रंथ आधारास घेऊन १५९४ इसवींत माहीमचा इतिहास ज्या अर्थी लिहिला त्या अर्थी कौस्तुभचिंतामणि हा ग्रंथ १५९४ इसवीच्या म्हणजे शक १५१६ च्या अगोदर केव्हां तरी लिहिला गेला, हें निश्चित. हे प्रकरण पांचव्या प्रकरणाच्या नंतर म्हणजे शक १५०० च्या सुमारास लिहिलें गेलें असावें. प्रकरणाचा कर्ता भगवान् दत्त म्हणून प्रकरणसमाप्तीस सांगितलें आहे. भगवान् नंद दत्त असें नांव प्रकरणप्रारंभीं दिलें आहे.

                                                                     प्रकरण पांचवें
पाठाराज्ञतिवंशावळि हें नांव ह्या प्रकरणास बरेंच साजेल. हें सर्व गद्य आहे. ह्यानें प्रस्तुत छापील ग्रंथाचीं ८८ पासून १०५ पर्यंतची १७ पृष्टे व्यापिलीं आहेत. हें प्रकरण शक १४६० च्या सुमारास लिहिलें गेलें असावें, असें अंतर्गत मजकुरा वरून दिसतें.

                                                                     प्रकरण सहावें
ह्या प्रकरणाचें नांव वंशावळी. सर्व गद्य, संवत् १५३५ म्हणजे शक १४०० त ही वंशावळी लिहिली, असे प्रकरणकार प्रकरणसमाप्तीस स्वत:च म्हणतो.
कालदृष्ट्या प्रकरणरचनेचा क्रम येणेंप्रमाणें बसतो.
शक १३७०----------------------------------------------------- प्रकरण दुसरें
शक १३७० च्यानंतर कांहीं थोड्या दिवसांनी---------------------प्रकरण तिसरें
शक १४००----------------------------------------------------- प्रकरण साहावें
शक १४६०------------------------------------------------------प्रकरण पांचवें
शक १५०० सुमार ---------------------------------------------- प्रकरण चौथें व प्रकरण पहिलें.