Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १४७
श्रीशकर श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिव्हभार
तीस्वामिकरकजोद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतना-
रायणस्मरणा
सकलगुणालकरण हरिभक्तिपरायण राजमान्य राजश्री गो। नारायण दीक्षित वास्तव्य क्षेत्र करहाटक क-हाड या प्रती विशेषस्तु तुमचे कल्याण ईछीत करवीरक्षेत्री छत्रसभासमवेत श्रीनिकट असो तदनतर येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत गेले पाहिजे या नतर साप्रत पौष्य' सीत' नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे.तरी आपण सह समुदाय येऊन मोहोत्साव साग सपादून गेले पाहिजे ये विशई अनमान न करणे बहुत काये लिहिणे श्रीच्या पुण्येतिथी करिता रा। साबाजी . गो। व रा। उमाजी गो। व रा। रामकृष्ण गो । व मसुरास पत्रे पाठविली आहेत पावती करऊन ते यात्रेस येत ते गोष्टी करणे जाणिजे
महिकावती (माहीम)ची बखर
शक १४०० नंतर सुमारें साठ वर्षांनीं प्रकरण पांचवें लिहिलें गेलें. ह्या प्रकरणांत पाठारे प्रभूंची वंशोत्पत्ति सांगण्याचा प्रयत्न केलेला असून पाठारे प्रभूंची महिकावतीप्रांतांत जी स्थापना झाली तिचें कथन केलें आहे. ह्या प्रकरणाच्या कर्त्याचें नांव समजण्यास साधन नाहीं.
प्रकरण पांचवें रचून झाल्यावर सुमारें चाळीस पन्नास वर्षांनीं म्हणजे शक १५०० च्या सुमारास भगवान् दत्त किंवा भगवान् नंद दत्त नामें करून कोण्या पुरुषाच्या हातीं प्रकरण दुसरें, तिसरें, पांचवें व सहावें अशी चार प्रकरणें गेलीं. तेव्हां त्याला असें दिसलें कीं प्रकरण दुसरें व तिसरें मिळून एक स्वतंत्र हकीकत आहे आणि प्रकरण पांचवें व साहावें मिळून दुसरी स्वतंत्र हकीकत आहे. पहिल्या हकीकतींत महिकावतीच्या राज्यांतील सर्व कुळांची शक १०६० पासून वंशपद्धति दिली होती व दुस-या हकीकतींत प्रामुख्यें करून पाठारे प्रभूंची वंशपद्धति दिली होती. अशा दोन स्वतंत्र हकीकती भगवान् दत्ताच्या हातीं पडल्या. प्रत्येक हकीकतीला एकेक पद्य उपोद्धात भगवान् दत्तानें जोडला. प्रकरण दुसरें व तिसरें या गद्य प्रकरणांना प्रकरण पहिलें हें पद्य प्रकरण जोडलें आणि प्रकरण पांचवें व साहावें या गद्य प्रकरणांना प्रकरण चौथें हें पद्य प्रकरण जोडलें. अशा त-हेनें दोन स्वतंत्र बखरी तयार झाल्या. प्रकरण पहिलें, दुसरें व तिसरें मिळून पहिली बखर व प्रकरण चौथें, पांचवें व साहावें मिळून दुसरी बखर. भगवान् दत्ताच्या नंतर दुसरा एक अनामक संहिताकार आला. त्याला असें दिसलें कीं दुसरी बखर ही पहिल्या बखरीचा च धागा पुढें चालविणारी आहे. सबब त्यानें ह्या दोन्ही बखरी एका पुढें एक लावून, प्रस्तुत छापला जाणारा सबंध ग्रंथ बनविला. ह्या दुस-या संस्कारकानें भगवान् दत्ताच्या संस्करणांत अधूनमधून कांहीं जास्त मजकूर घातला. " मत्छा पासुनि च्यारि ते नरहरी पर्यंत जाले कृती,'' हा श्लोक, विजयानगरच्या राज्याचा नाश झाल्याचा उल्लेख, बाबर हें नांव, वगैरे शक १४६० च्या व शक १५०० च्या नंतर झालेल्या वृत्तान्ताचे जे दोन चार उल्लेख ह्या ग्रंथांत आले आहेत ते ह्या द्वितीय संस्कारकानें घातलेले आहेत. ग्रंथाची रचना वेळोवेळीं कसकशी होत गेली ती खालील तक्त्या वरून स्पष्ट होईलः:-
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
पहिला संस्कारक जो भगवान् दत्त तो कोण कोठील केव्हांचा वैगरे कच्ची किंवा पक्की हकीकत, अनुमानिक देखील, बिलकुल उपलब्ध नाहीं. अनामक जो दुसरा संस्कारक त्याचें नांव हि माहीत नाहीं, तेव्हां तो कोणकोठचा हा प्रश्न त्याज संबंधानें काढण्यास अवसर हि रहात नाहीं. भगवान् दत्त हें लौकिक नांव नसून जर सांप्रदायिक नांव असेल तर दत्त हा भगवान् नामक गुरूचा शिष्य ठरेल. कोंकणांतील साधुसंतांत भगवान् हें नांव नवीन च उपलब्ध झालें, असा ह्या विधानाचा अर्थ होतो. दत्ताला कविता करण्याचा नाद होता, हें प्रकरण पहिलें व प्रकरण चौथें ह्यां वरून सिद्ध आहे. भगवान् नंद दत्त, हें जें नांव प्रकरण चौथ्याच्या प्रारंभीं आलें आहे त्या वरून असे म्हणतां येतें कीं दत्त हा भगवानाचा नंद म्हणजे नंदन ऊर्फ मुलगा किंवा शिष्य होता.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १४६
श्रीशंकर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि
राजमान्य राजश्री नारायणभट गिजरे यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इछितकरवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर सा॥ प्रा॥ पौष्यसित नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे. या करिता लिहिले असे तरी आपण सहसमुदाय एऊन मोहच्छाव साग केला पाहिजे बहुत काय लिहिणे ये विषइ वडगावास व राजश्री उमाजी गोसावी यासी व मसूरकर व'पालीकर यासी पत्रे लिहून पाठविली आहेत तरी त्यास प्रविष्ट होतील ऐसे केले पाहिजे जाणिजे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १४५
श्रीविद्याशाकर
श्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदमूर्ती राजश्री नारायणभट गिजरे व बाबाजीनाईक वास्तव्य कराड यासि विशेष
छत्री करावयास घातली आहे त्याची मुदती जाहली तरी सोनारा करवी रोक उत्तम करून छत्री व पताका -व सुरेपान करविले प्रमाणे वस्त उत्तम पाहून ब्राह्मणा पासी देऊन प्रविष्ट करवणे या विसी विलब न करणे जाणिजे तारलीस गेलो तरी उदयीक पावते होय ऐसे करावे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६० १६०९ ज्येष्ठ शुध्द १
१ शके १६०९ प्रभवनाम संवछरे ज्येष्ठ सुद प्रती
२ पदा तदिनी वेदमूर्ति राजश्री दामोदर भट
३ धर्माधिकारी सो। पुणताबे यासि प्रती राजश्री
४ महीमाजी राजे वलद माणकोजी राजे सीदे वृत्ति-
५ पत्र लेहोन दीधले ऐसे जे तुह्मास आपण पु-
६ ण्यस्तंभीचे तीर्थपुरोहितपण दीधले
७ आहे तेथे आलियावर तुह्मास मान्य करून आपले
८ वंशीचे ही जे कोण्ही तीर्थास येतील ते तुह्मास
९ मान्य करितील हे वृत्तिपत्र लेहोन दीधले
१० सही सु॥ हजार १०९७ *
तेरीख १२ माहे साबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १४४
।।श्रीविद्याशाकर।।
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकभार-
तीस्वामिकृतनारायणस्मरणानि
हरिगुभक्तिपरायण राजमान्य राजश्री नारायणभट गिजरे च बापाजी नाईक ह्मेत्रे वास्तव्य कराटक यासी विशेष यमाजी बा। पत्र पाठविले ते प्रविष्ट जाहले असेल परतु वस्ता पाठविल्या नाहीत ऐसीयासी राजेश्री वेकटभट यासी पाठविले असे तरी त्याज बराबरी ब्राह्मण दोघे जण देऊन वस्ता पाठविणे आणि वजन करून घेणे आह्मी येथे वजन करून घेऊ तरी शीघ्र वस्ता ब्राह्मण देऊन पाठविणे आळस न करणे जाणोन उदईक कडेगावास पाठविणे जाणिजे
महिकावती (माहीम)ची बखर
असें दिसतें कीं मूलतः शक १३७० त ऊर्फ संवत् १५०५ त महिकावतीची बखर ऊर्फ प्रकरण दुसरें रचिलें गेलें. नंतर प्रकरण तिसरें हें ज्यादा मजकूर म्हणून कालान्तरानें दुस-या प्रकरणाला परिशिष्टरूपानें जोडलें गेलें. “ह्या (म्हणजे दुस-या प्रकरणा) वर ते (म्हणजे तिसरें प्रकरण) हि प्रत चढेल " म्हणून दुसरें प्रकरण ऊर्फ महिकावतीची बखर लिहिणारा गृहस्थ जो केशवाचार्य तो स्वत: च म्हणतो (पृष्ठ ६२, ओळ ३). ह्या दोन्हीं प्रकरणांचा कर्ता जो केशवाचार्य त्याला शक १३७० त मालाडचा तत्कालीन देसला नायकोराव यानें सन्मानपूर्वक बोलावून हें वंशपद्धतीचें कर्म ऊर्फ महिकावतीची बखर त्याज करवीं लिहविली (पृष्टें ५२ व ५३), वंशपद्धती लिहविण्याचें कारण केशवाचार्य जें सांगतों तें फार हृदयद्रावक आहे. पहिल्या बिंबराजापासून म्हणजे शक १०६० पासून शक १३७० पर्यंत म्हणजे ही बखर ऊर्फ वंशपद्धति लिहिली गेली तावत्कालपर्यंत तीन शें वर्षें लोटून गेलीं होतीं (पृष्ट ५३ ओळ १६). सर्व कोंकणप्रांत म्लेच्छांनीं आक्रमण करून, येथून तेथून चोहीं कडे सर्वत्र म्लेछार्णवा खालीं सर्व पृथ्वी बुडून गेली. वर्णावर्ण वोळख नाहीशी झाली. स्वकुळाची वास्तपुस्त कोणाच्या गावीं हि राहिली नाहीं. क्षत्रियांनीं राज्याभिमान सांडिला, शस्त्रें सोडिलीं व केवळ कृषिकर्म स्वीकारून कित्येक निव्वळ कुणबी बनले, कित्येकांनीं कारकूनवृत्ति आदरिली, कांहीक सेवावृत्ति अंगिकारून निभ्रांत शूद्र ठरले, शाणि कित्येक नष्ट होऊन नामशेष हि राहिले नाहींत. बहुत आचारहीन झाले. गोत्र, प्रवर. कुळस्वामी व कुळगुरू ह्यांची बहुतेकांस आठवण हि राहिली नाहीं. अशी ह्या तीन शें वर्षात भ्रष्टता माजली व महाराष्ट्रधर्म अज्जी बुडाला. अश्या संकटसमयीं श्रीदेवी कुळस्वामिणी, मालाडचा देसला जो नायकोराव त्याच्या स्वप्नांत येऊन, सांगती झाली कीं, नायकोरावा, ऊठ, महाराष्ट्रधर्म रक्षिण्या करितां अठरा पगड जातीचा मेळावा कर आणि केळव्या पासून मुंबई पर्यंतच्या सर्व गांवचे, सर्व जातींचे व सर्व गोत्रांचे खलक जमवून त्यांस केशवाचार्याच्या मुखें महाराष्ट्रधर्म सांगीव (पृष्ट ५३). देवीची ही आज्ञा शिरसा वंदन करून नायकोरावानें केशवाचार्याच्या संमतीनें मालाड ऊर्फ म्हालजापुर येथील जोगेश्वरीच्या देवळा पुढें विस्तीर्ण मंडप रचून तीन हजार साहा शें पंचावन्न लोक जमा केले. त्यांत नायक, देसाई, पुरोहित, कुळगुरू, आचार्य, उपाध्ये, जोशी व इतर मुख्य मुख्य वृत्तिवंत पांचशे एकवीस होते. असा हा भव्य समुदाय मालाडास एकवीस दिवस राहिला. ब्राह्मणांनीं लक्ष्मीसूक्तांनीं भगवती दुर्गादेवीचें स्तवन केलें व श्रीदेवी आद्यशक्ति जगदंबिका महाराष्ट्रधर्मरक्षिका जी जगन्माता दुर्गादेवी ती तुम्हां सर्वां वर सुप्रसन्न असो असा आशिर्वाद दिला. नंतर केशवाचार्यानें सर्व शिष्टांची संमती घेऊन जमलेल्या सर्व लोकांस प्रस्तुत छापिली जाणारी वंशपद्धति राजा बिंबा पासून अद्ययावत् कथन केली व महाराष्ट्रधर्माचें निरूपण केलें. त्या वंशपद्धतीच्या व महाराष्ट्रधर्मकथनाच्या सासष्ट नकला करून साक्षशिक्या निशी त्या नकला त्या त्या कुळांस, वंशास व जातींस प्रमाणपूर्वक दिल्या. कुळांनी, वंशांनीं व जातींनीं शिरीं वंदन करून त्या नकला जतन करून ठेविल्या. पैकीं एक नक्कल कल्याण येथील सदाशिव महादेव दिवेकर ह्या खटपटी गृहस्थांच्या द्वारा प्रस्तुत संपादकाच्या हातीं येऊन मुद्रणसंस्कारार्हतेस प्राप्त झाली, असा ह्या बखरीच्या रचनेचा वृत्तान्त आहे. आजपर्यंत सांपडलेल्या सर्व बखरींत शक १३७० तील ही महिकावतीची बखर अत्यन्त जुनाट आहे.
शक १३७० तील ह्या दोन प्रकरणां नंतर तीस वर्षांनीं म्हणजे शक १४०० त प्रकरण साहावें रचिलें गेलें. प्रकरण दुसरें व प्रकरण तिसरें यांत महिंकावती प्रांतांतील बहुतेक सर्व कुळांची ऊर्फ खुमांची वंशपद्धती आली असून फक्त कोळंबा व शिळंबा वंशाची हकीकत द्यावयाची राहिली होती. ती ह्या साहाव्या प्रकरणांत दिली आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १४३
॥ श्रीशकर ॥
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितशृगेरीसिहासनाधीश्वर -
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकरकमल-सजाताभिनवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद आच्यार्य व जोतिषी व उपाध्ये व समस्त राजकीय ग्रहस्त व देशमुख व देशपाडे व समस्त ग्रहस्त क्षेत्रक-हाटक भक्तोत्तम या प्रती विशेषस्तु तुमचे कल्याण इछित करवीरक्षेत्री छयात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर साप्रत पौषसीत नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे या करिता लिहिले असे तरी आपण सहसमुदाय येऊन मोहत्साव साग केला पाहिजे बहुत काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १४२
श्रीविद्याशंकर
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितशृगेरीसिहासनाधीश्वर-
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती स्वामिकरकमल-
सजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायण- स्मरणानि
श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद क्षेत्रकरहाटक भक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणून स्वकीय सुखानुभव लिहून मानस तोषवित असिले पाहिजे या नतर आपण पत्र पाठविलेपाऊन लिहिला भावार्थ अवगत जाहला तेथ अर्थ की रा। केशोपत खोडगडे याचे मुक्तते विषई राजश्री रत्नाकरपंत याही विनति लिहिले आहे तरी स्वामीनी दया करून त्यास मुक्ततेचे पत्र पाठवून द्यावें मठीचा बहुमान मठास देऊ ह्यणोन तरी केशोपता कडील गुणदोष तुह्मास व रा। रत्नाकरपंतास पहिले च सांगितले आहे त्या हि वरी रा। अताजी सिवदेऊ मठसबधी याचे विद्यमाने मठास शत रुपये देतो दया करावी ह्मणून बोली जाहली त्यास मान्य केलें नाहीं ऐसे असतां सांप्रतं आपण व रा। रत्नाकरपत याहीं लिहिलें तेव्हां मठीचा अश काढाल चिंता काय मुख्य तुमचे व राजश्री रत्नाकरपंताचे अवश्यकता जाणून तुमचे पत्रा वरून त्यास शुद्धपत्र पाठविले असे पहिली बोली हि आपणास दर्शविली आहे यात मठीची सेवा जी कराल ती युक्त तुह्मा विरहित दुसरे आप्त कोण आहे तैसे सारिखे आपण शेवेसी तत्पर असता तेथे विशेष काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १४१
शके १७१६ वैशाख शु।। २
।। श्री शकर ।।
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणेन - स्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद विद्वज्जन व राजकीय गृहस्थ व व्यवसाई गृहस्थ व वास्तव्य क्षेत्रकरहाटक परमभक्तोत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित छात्रसभासमवेत श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असले पाहिजे या नतर वैशाख वद्य नवमीस श्रीआ( चा) र्य याची पुण्यतिथी, ब्राह्मणसतर्पण वार्षिकी उत्छाह मठसिरगावी वाळवे नजीक कृष्णातीरी आहे तर तुह्मी सर्वत्र तीर्थप्रसादास येणे अनमान न करावा अगत्य यावे तैसे क्षेत्रमजकुरी सस्थानास इनाम जमीन आहे त्याचा ऐवज सस्थानी येऊन पावत नाही जाणून लिहिले आहे तरी इस्तकबील पासून ऐवज राहिला असेल तो पाठवून द्यावा ये विसी आळस न करावा विशेष काय लिहिणे.
माहानुशासन वरीवर्ति
पौ। मिति शके १७१६ वैशाख शु।। २
हस्ते सखाराम पोवार