Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक २६४
१७०८ माघबा। ५

श्री
करीना भिवाजी गोसावी सु ।। सबा समानीन मया व अलफ लेहून दिल्हा करीना ऐसा जे आह्मी सारे एकत्र होतो घरात बनेनासे जाहले सा। वेगळे निघावेसे जाहले तेव्हा अवघे वधू मिळोन त्याची नावे वडील बाजीपत त्याहून धाकटे जोतीपत ते मृत्य पावले त्याचे पुत्र सखारामपत तिसरे आह्मी भिमाजी गोसावी चवथे कृष्णाजीपत पाचवे सदाशिव गोसावी ऐसे मिळोन ति-हाइता कडे हरिपत याचे वाड्यात गेलो की आपले आपल्यात समजावे तेव्हा तेथे खटखट जाहली तेथून मग पचाईत नावनिसी राजश्री विटलपत कुलकर्णी व हरीपत व वेदमूर्ति श्रीपादभट नि।। घोरपडे व जिवाजी पाटील ह्मणो लागले की तुह्मी आपलेल्यात कजिया करिता त्यास तुह्मी जामीन अवघे जण निराळे निराळे देणे त्या वरून अवघ्यानी जामीन सदरहू पचाईता जवळ दिल्हे मग त्यानी विभाग करून दिल्हे तीर्थस्वरूप बाजीपत याचे व अवघ्याचे विद्यमाने करून दिल्हे त्या प्रमाणे ज्याचा विभाग त्यानी घेतला आणि आपलेले घरास गेले नतर काही येक दिवस गेले तेव्हा कर्जदार विठल रघुनाथ कुलकर्णी याचे कर्ज आह्मा कडे वारावे ह्मणो लागले ते पैका मागू लागले त्यास वाटे केले ते समई सोने बूड चोरानी नेले ५ व आमच्या सास-याने भक्षिले ५ येकूण तोले सुमारे १० दहा ते आमच्या विभागात धरिले व बाजीपत याज कडेस ३ व सखाराम याज कडेस तोळे ५ व कृष्णजीपत याज कडे २ तोळे व सदाशिव बावा याज कडे येकूण तोळे २० वीस हे विभागानरूप सर्वत्रानी मोड सोसावी ते न करिता आह्मा येकट्यावर दाहा तोळे सोने चोरानी नेले व सोइ-यानी भक्षिले ते आह्मा वर घातले त्याचा फडशा करून देणे ह्मणोन आह्मा कडे कर्ज घातले आहे त्याचे मन मनाऊ ऐसी कटकट सदाशिव गोसावी व आह्मी करू लागलो तेव्हा कर्जदार यानी सदाशिव गोसावी यासी निकड केली की आमचा कर्जाचा निकाल करून देणे त्याज वर कर्जदारास काय सागितले न कळे आणि सदाशिव गोसावी दिवाणात राजश्री मालोजी घोरपडे याचा कारभारी याज कडे गेले आणि अह्मा वर पाच रु।। मसाला करून आमच्या पाठी मागे माणसे लावून बेअब्रू करू लागले सध्याकाळपर्यत उपोषण जाहले तेव्हा सध्याकाळी च्यार पचाईत व हकीम म्हणो लागले की कर्जदाराचे मन मनावणे मग तुमचा फडशा सोन्यावानेचा करून देऊ त्या नतर आह्मास रात्रौ भोजनास निरोप दिल्हा नतर कर्जदार याचे आह्मी मन मनाविले आणि पचाइता कडे गेलो की सावकाराचे मन आम्ही मनाविले पुढे आमचे मनास आणून विल्हे लावणे ऐसे करिता काही येक दिवस गेले तो आणखी आपल्या आपले मधे कटकट होऊन बाजीपत व आम्ही क्षेत्रास क-हाडास साल गु।। आलो बाजीपत निघोन देवास रत्नागिरीस गेले उपरातिक सदाशिव गोसावी हि कराडास आले तेव्हा बाजीपत येथे नाहीत तेव्हा कटकट होईल याज करिता आम्ही वेदमूर्ति वेकण जोसी यासी विचारिले की बाजीपत देवास गेले सदाशिव गोसावी येथे आले तेव्हा व्यकणजोसी बोलिले की बाजीपत गेले तुह्मी आपले घरास जाणे त्या वरून आह्मी घरास गेलो मागाहून सदाशिव गोसावी याणी क्षेत्राहून समस्ताचे पत्र व मसाला रु।। २ दोन करून आह्मास पाठविले त्याज वर आह्मी घरी न होतो

१६. माहीम ऊर्फ बिंबस्थान म्हणजे बिंबराजांच्या सैन्याच्या छावणीचें स्थान येथें प्रताप बिंबानें एकंदर नऊ वर्षे राज्य केलें. त्या काळच्या रूढी प्रमाणें त्याची राणी त्याच्या बरोबर सती निघाली. नंतर मही बिंब गादी वर आला. त्यानें शक १०६९ पासून शक ११३४ पर्यंत ६५ वर्षे गादीचा उपभोग घेतला. त्याच्या अमदानींत संवत् १२४५ त म्हणजे शक १११० त चंपावतीच्या म्हणजे चेऊलच्या भोजराजानें बिंबांच्या राज्या वर चाल केली. उरणापासून शहाबाज परगणा मारीत थेट ठाण्याजवळील कळव्या पर्यंत भोजाचें सैन्य येऊन पोहोचलें. मही बिंबा जवळ ८००० आठ हजार दळ होतें. खाडी उतरून, कळव्यास दोन्हीं दळांचें थोर युद्ध झाले. त्यांत भोज राजा प्राणास मुकला. तेव्हां भोजाचा प्रधान मही बिंबाच्या आड आला. त्याचा वध शेषवंशी केशवराव यानें केला. हा दुसरा पराभव पाहून, भोजराजाचा पाळकपुत्र युद्धास सज्ज झाला. त्याला मरोळच्या हंबीररावानें यमसदनास पाठविलें. तेव्हां नामोहरम होऊन भोजाचें राहिलेंसाहलें सैन्य पळोन गेलें, महीबिंबाला मोठा जय मिळाला. युद्धांत ज्यांनीं पराक्रम केले त्यांना राजानें पदव्या व पारितोषकें दिलीं. देसायांना वृत्या दिल्या. शेषवंशी केशवरावाला गळ्यांतील पदक देऊन चौधरीपणा अर्पण केला. देवनरच्या पाइकानें थोर नामोष केला, सबब त्याला ठाकूर पद दिलें. मरोळकर देसायाला कहाळांच्या दोन श्रुती वाजविण्याचा मान मिळाला. गंगाधर नाईक सांवखेडकर यांना पराक्रमा बद्दल वाद्यें, विराणें व वीरगांठ प्राप्त झाली. रघुनाथ पंताच्या पदरांत सरदेशकी पडली. उतनचे बारा राऊत पडले त्यांच्या कुळास राऊत पद वंशपरंपरा झालें, कांधवळीच्या दहा पाइकांच्या वंशजांस चौगुलकी मिळाली. साहारकर, कोंडिवटेकर, देवनरकर, चेंभूरकर, नरसापुरकर, वगैरे शेलके वीर, कडी, तोडे, सांखळ्या, वीरगांठी, वगैरे त्यां त्यां योग्य अशीं बक्षिसें पावले. एणें प्रमाणें आसपासच्या बरोबरीच्या संस्थानिकांना वचकांत ठेवून मही बिंबानें ६५ वर्षे सुखानें राज्य करून शक ११३४ त देह ठेविला. त्या वेळीं त्याचा पुत्र केशवदेव याचें वय पांच वर्षांचे होतें. त्यांची आई कामाई इजकडे राज्य चालविण्याची जोखीम आली. मंही बिंबाच्या उतार वयांतील ही त्याची शेवटची बायको वयानें तरुण व रूपानें सुंदर होती. तिच्या विषयीं प्रधानाला पापवासना उत्पन्न झाली. कामाई आपल्या मनीं बहुत खिन्न झाली. तिनें माहीमच्या हरद पुरोस प्रधानाची ही दुष्ट वासना निवेदिली. हरद पुरो म्हणाला, तू आम्हा सर्वांची माता, तुज पाहे ऐसा कोण आहे ? असें म्हणून हरद पुरोनें देशांतील कित्येक विश्वासाचे राऊत मिळविले आणि कुसुंबा भांग चढवून रात्रीस प्रधानाच्या महालास वेढा दिला. तेथें जंगी झटापट होऊन हांहां म्हणता हरद पुरोनें प्रधानाचा शिरच्छेद केला आणि तें शीर नेऊन कामाईच्या पुढें टाकिलें. कामाई प्रसन्न झाली व ज्यांनीं ज्यांनीं ह्या कामीं मेहनत केली त्या सर्वांना सरफराज केलें. नंतर हरद पुरोनें पळसवलीकर, पहाडकर व वनेवाळकर ब्राह्मणां करवीं शुभमुहुर्तावर केशवदेवास राज्यीं अभिषेकिलें व त्याच्या गळां राज्यसिक्के घातले. त्या समईं केशवदेवानें कामाईच्या अनुमतें देसायांना वाणें दिलीं त्याचा तपशील:-- (पुढील तपशील वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अश्या देणग्या केशवदेवानें दिल्या. केशवदेवानें मोठ्या ऐश्वर्यानें बारा वर्षे राज्य केलें. त्यानें राजपितामह, म्हणजे आसपासच्या सर्व लहान सहान संस्थानिकांचा आजा, ही पदवी धारण केली व त्या अर्थाचे बडेजावीचे गद्यपद्य पोवाडे रचिले. ते पोवाडे केशवदेवाचा भाट संस्थानिकांच्या राजधान्यांतून जाऊन गाऊं लागला. त्याचा राग संस्थानिकांना सहजच आला. तत्कालीन पोवाडे म्हणजे काय प्रकरण असे त्याचें स्पष्टीकरण केलें म्हणजे आसपासच्या संस्थानिकांना राग कां आला तें उलगडेल. सध्यां जे पोवाडे शाळिग्राम वगैरे मंडळीनें छापिले आहेत ते सर्व पद्य आहेत, त्यांत गद्याची एक हि ओळ नाहीं. केशवदेवाच्या काळचे म्हणजे शक ११००।१२०० च्या सुमारचे पोवाडे, तसेच शहाजीशिवाजींच्या वेळचे पोवाडे व पेशवेशिंदेहोळकर यांच्या वेळचे हि सर्व पोवाडे पद्य असून शिवाय गद्य हि असत. पोवाडा म्हटला म्हणजे तो गद्यपद्य असा दुरंगी असावयाचा. ज्याला संस्कृतांत चंपूकाव्य म्हणतात त्या काव्याच्या सदरांत पोवाडा पडतो, एवढें सांगितलें म्हणजे पोवाडां हें काव्य गद्यपद्य असतें, केवळ गद्य किंवा केवळ पद्य नसतें, हें सांगण्याची जरूर नाहीं. शाळिग्रामानें जे पोवाडे गोळा केले ते, पोवाड्यांचें खरें सबंद रूप काय असतें त्याचा नीट बोध त्याला न झाल्या मुळें, एथून तेथून सर्व अर्धवट गोळा केले.

लेखांक २७४                                                                     श्री                                                                           १६२४ मार्गशीर्ष शुध्द १२                                                                                                     

                                                                                       274

2 1 मा। अनाम हवालदार व कारकून ता। कर्याती मावळ यांस शंकराजी नारायण सचिव सु॥ सलास मया व अलफ मा। रायाजी इतबारराऊ सरनाईक घेरा किले सिंहगड यांणी पूर्वी केले मा। गनीमापासून हस्तगत केला ते समई स्वामीकार्यावरी एकनिष्ठेने राहोन तरवारेची शर्ती करावयाची ते करून किला गनीमापासून हस्तगत केला हे घेराचे वतनदार एकनिष्ठ या करिता यांस नूतन इनाम मौजे खांबगाव ता। मा।र पैकी वाडी खरमरी जमीन कास टके २ दोनी टके कास खो। इनामदार व हकदार वजा करून कुलबाब कुलकानू सदरहू जमीन इनाम करून दिल्ही असे तरी तुह्मी सदरहू इनाम जमीन यास नेमून देऊन पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने इनाम चालवीत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर न करणे तालीक लेहून घेऊन असल सनद भोगवटियास परतोन देणे छ १० रजब

                                                                                                                                                               274 1

लेखाक २६३
१७०८ माघशु॥ २

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी
करीणा बो। कृष्णाजी बल्लाळ सु।। सबा समानीन मया अलफ तीर्थस्वरूप भिमाजीबावा याचे पुत्र उभयता लस्कराहून घरास येऊन विभक्तपणा केला आह्मी वेगळे होत नाही ह्मणो लागले तेव्हा दिवाण माणूस लाऊन वेघळे घातले ते समई आपण बोलिलो जे चवघा प्रमाणे माझ्या मुलाचे लग्न करून देणे तेव्हा विभाग घेऊ ह्मणोन वाटणीस द्वाही दिली मग ति-हाइतानी लग्न करून द्यावे ह्मणोन सागितले असता त्याची वाट काही च नाही बळे च वाटा घेणे ह्मणोन तसती करू लागले मग आपण उसालिखाहून पूर्वी त्रिवर्ग वधू क्षेत्रक-हाडास आले होते सबब आपण क्षेत्रमजकुरास येऊन उभयेता वधूस क्षेत्राचे पत्र पाठविले मग आणिले आणि आह्मास आज्ञा केली जे तुझे बोलणे काय ते लेहून देणे त्यास माझ्या मुलाचे लग्न सा-यानी करून द्यावे मग चवथा हिसा जरा व जरा कागद व पोथी पुस्तक भाडी वगैरे वित्तविशय द्यावा येणे प्रमाणे बोलणे आहे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना
शके १७०८ पराभवनामसवत्सरे माघशुद्ध द्वितीया 

तपसीलवार कलम
१ वस्त सोने व रुपे                     १ इनामाचा वाटा द्यावा
१ भाडी देखील + + पर्यंत            १ वतनाचा विभागाचा हिसा यावा
१ कापड नवें जुने                      १ गुरे व घोडी
१ हत्यारे                                  १ कुणगा झाड पिछाडी करून
१ कागदकतबे द्यावी
१ दाणे हरजिनस                        ३ कर्ज वाम
१ लस्कराहून मनोहर व सखाराम   १ देणें लोकाचे
यान काय मेळवून आणले             १ व घेणें लोका कडील
त्याचा उगवलेकर घ्यावें
विभाग यावा १ बूड काय जाहली
१ हिसेब घरचा आह्मास
समजाऊन                               --
                                             १७
द्यावा कलम १
१ मुलाचे लग्न करून द्यावे
१ दुसेरीयाची गावकी जोसीक
पत-
करिले त्या वरून उठवून
आह्मास पळ-
विले त्याचा मुशाहिरा यावा
----
१०
सदरहू धाकटे भाऊ सदाशिव गोसावी याचा विभाग वाटणीस येईल त्या प्रमाणे आपण विभाग घेऊन समजोन राहू यासी नवदीगर करू तर देवाचे अन्याई

इत्यादि यजुर्वेदी देशस्थ माध्यंदिन मंडळी पैकी गंगाधर नाईक सांवखेडकरांस पसपवली गांव व विश्वनाथपंत कांबळ्यांस पाहाड गांव प्रताप बिंबानें वंशपरंपरा इनाम दिला. इतर हि गांवीं ब्राह्मणांस वृत्त्या राजहस्तें मिळाल्या. राजा स्वतः वाहिनळे राजणफर येथें राहिला. मरोळी खापण्यांत महाळजापुर व मालाड खापण्यांत नरसापुर येथें वसाहत करविली. काळभैरवी जोगेश्वरीचे ठिकाण जें कान्हेरी तेथील सिद्धाश्रम पाहून व पुरातन कालीं तेथें राजधाम होतें हें जाणून प्रताप बिंब कांहीं काल लेण्यांत राहिला. सूर्यवंशी मराठ्यांची स्थापना राज्यधाम जें माहीम तेथें केली. शेषवंशियांस चौगुलेपद दिलें. गुजर बकाल यांज करवीं गांवोगांवीं दुकानें मांडविली. तीन वर्षे उदमी सुकडा (शुल्क= सुंक) नाहीं व व्यापारीं जकात नाहीं, असा बंदोबस्त केला. शिलाहारांच्या राजवटींतील जुने वृत्तिवंत फारसे कोणी राहिले नव्हते. फक्त. पटवर्धन नामें करून कोणी ब्राह्मण माहीमचें स्थळगुरुत्व संपादणारा राहिला होता, त्याची वृत्ति प्रताप बिंबानें त्याच्या कडे पूर्ववत् कायम केली. वृत्तिवंतांची एणें प्रमाणें गांवगन्ना व्यवस्था लावून, प्रताप बिंबानें निरनिराळ्या माहालां वर जे हवालदार नेमिले त्यांची यादी अशी:- (यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वरील यादी वरून दिसेल कीं दहा हि हवालदारांच्या हवाल्यांतील सर्व गांवें वसईच्या खाडीच्या दक्षिणेस घोडबंदरा पासून मुंबईवाळुकेश्वर पर्यंतच्या टापूंतील आहेत, वसईच्या खाडीच्या उत्तरे कडील दमण पर्यंतच्या टापूंतील एक हि गांव नाहीं. ह्याचा अर्थ असा होतो कीं प्रतापबिंब वसईच्या खाडीच्या दक्षिणेस उतरल्या वर, अपरादित्य शिलाहारानें किंवा शिलाहारवंशांतील दुस-या राजन्यकांनीं वसईच्या खाडीच्या उत्तरे कडील प्रांता वर स्वारी केली आणि प्रताप बिंबाला व मही बिंबाला साष्टीच्या बेटांत कोंडून टाकलें. त्या मुळें वसई, सोपारा, केळवेमाहीम, तारापूर, डाहाणू व दमण ह्या उत्तरे कडील टापूंशीं प्रताप बिंबाचा बिलकुल संबंध सुटला. अर्थात्, वसईच्या खाडीच्या उत्तरे कडील प्रांतांत हवालदार व महालकरी नेमण्याचें प्रयोजन च राहिलें नाहीं. असा कोंडमारा झाल्या मुळें, साष्टी बेटांत मोठ्या सावधगिरीनें स्वतःचे व स्वत:च्या सैनिकादि लोकांचें संरक्षण करणें ओघास आलें. वसईच्या उत्तरे कडील केळवेमाहीम हातचें गेलें, तर प्रताप बिंबानें दुसरें नवीन एक माहीम वांद-याच्या दक्षिणेस निर्माण केलें व तेथें आपली कायमची राजधानी केली. शिलाहारांची राजधानी जे कल्याणठाणें तें राजपुत्र मही बिंब यानें हस्तगत करून, तेथें सैन्या सह दुसरें ठाणें दिलें. साष्टि बेटांतील निरनिराळ्या हवाल्यांत व महालांत सरदारांच्या हाता खालीं ठिकठिकाणीं राउतांचे गुल्म होते च. अश्या त-हेने साष्टी बेटांत कडेकोट तयारीनें प्रताप बिंब व मही बिंब राहूं लागले. साष्टी बेटांतून शिलाहारांची कायमची हकालपट्टी झाली. शक १०६२ नंतर म्हणजे अपरादित्या नंतर हारिपालदेव, मल्लिकार्जुन, अपरादित्य, केशिदेव व सोमेश्वर असें पांच शिलाहार राजे शक ११८२ पर्यंतच्या शंभर सवा शे वर्षांच्या अवधींत होऊन गेले. ते आपल्याला ठाणे कोंकणचे अधिपति म्हणवीत. कधीकधीं ठाणें शहरा भोंवतालील प्रांत त्यांच्या ताब्यांत हि जाई, परंतु त्यांचा स्थायिक अंमल त्या प्रांतांतून प्रताप बिंबाच्या कालीं जो एकदा उठला तो पुनः नीटसा असा कधी बसला नाहीं. वसई व सोपारा ह्या दोन बेटां वर वैतरणा नदीच्या दक्षिणेस व वसईच्या खाडीच्या उत्तरेस मात्र त्यांचा अंमल शक ११८२ पर्यंतच्या सवा शे वर्षांच्या अवधींत निरंतर चालला. साष्टींत बिंबराजांचा अंमल व शूर्पारक देशांत शिलाहारांचा अंमल, असा मनू शक १०६२ पासून उत्तरकोंकणांत प्रचलित झाला.

लेखाक २६२ बाळबोध
श्रीराम

वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड या प्रति
स्नेहपूर्वक समस्त ब्राह्मण कसबे चाफळ कृतानेक साष्टाग नमस्कार विनति उपरि येथील कुशल जाणुन स्वकीय लिहित असावे या नतर वो। रा। हरभट आठल्ये याचे घरी काही आरोप आला आहे त्यास येथील ग्रामस्ता पैकी कोणी भोजन न करावे ऐसे ठरावले नतर भटजी मजकूर यास सागावयास गेलो त्यास त्याचे जामात वो। राजश्री यज्ञेश्वरभट ताबे क्षेत्रमाहुली हे येथे आहेत त्याणी हरभट याचा पक्ष धरून आह्मी पावन करितो नतर अह्मी उत्तर केले की अह्मास श्रेष्ट श्रीकराड तुह्मी हि गोष्टीचा अभिमान धरू न ये ते न ऐकिता आह्मास शब्द लावितात आणि अभीमान धरून हरभट याचे पक्तीस भोजन करितात त्यास आपणास पत्र लिहिले आहे तर आमचे पत्र जमेस न धरिता परभारे श्रवण जाहाले आहे तर तुह्मी याची चौकशी होई तो पर्यत भोजनास तुह्मी न जाणे या प्रमाणे एक पत्र हरिभक्तपरायण राजश्री बावास व एक पत्र ग्रामस्तास ऐशी दोन पत्रे सायकाळ पावेतो येऊन पोहोचेत ऐशी केली पाहिजेत मिति भाद्रपदशुद्ध १३ बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनति

लेखाक २६१ बाळबोध

श्री
श्रीमत राजेश्री बाबासाहेब व रावसाहेब भावुसाहेब मत्री मजरे तुकाईचि वाडी
व शितारामभट बिन कृष्णभट उबराणि पालकर यानि अमचे देशातिल पूर्विपासून साप्रदाय मठाधिपत्याचा नसून श्री स्वामि जगद्गुरु याज पासून मठाधिकाराचे अपले नावे मशारनिले यानि पत्र करून घेतले परतु पदप्रायश्चित वगैरे अचारव्यवहार जे कर्णे ते क्षेत्राहुन होत अले त्याचि माहिति अपणास हि आहे असे असोन हा क्षेत्राचा अधिकार अपण करावा या दुरबुत्धिने पत्र करून घेतले हा मजकूर क्षेत्री श्रुत जाहला या स्तव ते क्षेत्राचे द्रोहि आहेत याज करिता अपणास लिहिले आहे तर भडजि उब्रराणि याशि व याचे घरि अन्नोदक व्यवहार कोणि करू नये असा निग्रह ठेवुन पत्राचे उत्तर यावे कळावे बहुत काय लिहिणे लोभ करावा हा अशिर्वाद मिति फालगुन शुध्ध ५

लेखाक २६० बालबोध

श्री
वेदमूर्ती राजेश्री समस्त ब्रह्मवृद व देशमुख व देशपाडे व जोतिषी व कुलकर्णी व राजकीय गृहस्थ मौजे काळे याशि
समस्त ब्राह्मण क्षेत्रकरहाटकस्थ कृत नमस्कार व अनुक्रमे आशिर्वाद विशेष पूर्वी पासून आचारव्यवहारपदप्रायश्चित करण्याचा हा अधिकार क्षेत्राचा पूर्वापार असून त्या प्रमाणे वहिवाट चालत असता पेशजी जगन्नाथपत हासबनीस याज वर काही आरोप आला होता ते समई शिराळकर याणी क्षेत्राची अवज्ञा केली तेव्हा क्षेत्रस्थ मडळी जाऊन शिराळकर याचा कागद लिहून घेतला त्यात हाशील की क्षेत्राचे आज्ञे प्रमाणे वागणूक करू आणि पदप्रायश्चित्त पूर्वी पासून तुह्मी करीत आला त्या प्रमाणे करावे असा आहे नतर मशारनिल्हे हासबनीस याज कडून प्रायश्चित्त करऊन शुद्ध केले असे असून हाली विनाकारण शिराळकर दाडगाई करितात या स्तव ते क्षेत्राचे द्रोही आहेत त्यास शिराळकर व बिळासक ज्योतिषी यासी व याचे घरी अन्नोदकव्यवहार येकपक्ती कोणी करू नये असा निर्बध ठेवावा आणि श्री स्वामी शकराचार्य याचे पत्र शिराळकर यानी आणिले असता मान्य करू नये पत्राचे उत्तर यावे

लेखाक २५९ बालबोध

गिजरे याचि वशावळि
मूळपुरुष रामेश्वरभट्टास पुत्र तीघ ३

१ नरहारभट्ट

१ कृष्णभट्ट
२ अपदे भट्ट व सोनभट्ट त्यास शभुभट्ट
४ अतभट्ट
५ नरहरि भट्टास पुत्र तीघ ३
१ विश्वनाथ भट्टास ३ दोघ मोरेश्वर भैरव विरेश्वर
२ रुद्र भट्टास चौघ लक्ष्मण काशीनाथ गदाधर गोपाळ ४
३ अपदे भट्टास २ नृसिह्म माहादेव
मूलपु रामेश्वरभट्टास पुत्र तीघ ३ वाईकर
१ रगभट्ट
१ शकरभट्टास पुत्र दोघ २
२ रुद्रभट भानभट्ट २ भानभट्टास पूत्र ३ छपीभट्ट १ भिकभट्ट २ अणभट्ट

रुद्रभट्टास पुत्र पाच ५
१ विश्वनाथभट्टास ४
२ गोविदभट्टास १ गगाधरास १ विरेश्वर २
३ हरिभट्टास १ भैरवास १ तुकभट्ट १
४ नृसिहभट्टास २ चितामणि मेरू राम
५ शकरभट्टास १ कृष्णभट्टास १ अनदभट्ट १
विश्वनाथभट्टास पुत्र ४
१ माहादेवभट्टास २
२ रामभट्टास १ बालभट्ट १
३ विनायक भट्ट
४ रगभट्टास २ हरि
कागदाची मागील बाजू दुशेरेकराची वशावळि
मूळपुरुष रामेश्वरभट्टास पुत्र तीघ
१ गोविंद भट्ट त्यास पुत्र दोघे
१ शभुभट्ट पिळभट्ट १
२ तिमण भट्ट भानभट्ट २
३ नरशिभट्ट रघभट्ट ३
पुढे नकल ० त्यास पुत्र दोघे
० नारायणभट्ट १०
भास्करभट्ट १
त्यास पुत्र ६
१ गोपाळभट्ट
२ रघूभट्ट
३ कृष्णभट्ट
४ भैरवभट्ट
५ तिमणभट्ट
६ नारायणभट्ट

लेखाक २५८ बालबोध

श्रीशंकर

स्वति श्रीमन्निखिल वसुधामूर्धावतसआदिमहासस्थानद-

क्षिणवाराणसी क्षेत्रकरहाटकस्थ वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्रि समस्त ब्रह्मवृद
याशि प्रति समस्त ब्राह्मण अष्टेकर व तथा समस्त ब्राह्मण क्षेत्रभिलवडी अनेक साष्टाग नमस्कार विनति उपर येथील वृत्त आषाढवद्य ८ पर्यत समस्त सुखरूप असो विशेष अपली क्षेत्रस्थाची पत्रे आलि होति कि विसलापुरा मध्ये गोलभट व पुसाळकर आहेत या उभयताचि निर्गत क्षेत्रास येवुन शुत्ध होय तावत्कालपर्यत त्यास व त्याचे सासर्गिक आहेत त्याचे घरि दिखिल अनव्यवहार न करणे या अन्वये अपली पत्रे आलि ती मान्य करून पत्रान्वय व्यवहार करीत आलो प्रस्तुत वैपरीत्य ऐकिले कि विसलापुरास क्षेत्र आले होते जि गोष्ट न घडायाचि ती कैसि घडलि परतु न कळे यदर्थि आह्मास सशय झाला आहे अपण थोर आहेत वचनाचे प्रमाण अह्मास वो । मोरदीक्षित अरणके हे बोलिले होते तुह्मि अमचे पत्राप्रमाणे वर्तणुक करणे जे वेळेस विसलापुरकराची शुधता होईल ती तुमचे विचारे होईल अरणके याचे व अमचे झाले अपण जे केले ते समजोन च केले असेल विशेष लिहावया शक्ति नाही सुज्ञा प्रति विशेष काय लिहिणे हे नमस्कार १०००० वचन ४