Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक २७२
१७०८- १७०९

श्री
तालिक
माहादेव गोसावी यानी क्षेत्र करहाड येथे भिमाजी गोसावी यासि पुत्र करून माडीवर घेतला हे पत्रा निशि व साक्षी निशी पुरवून देऊ हे लिहले खरे दत्तविधान करून घेतला इतकी पुर्वणी करून देऊ न देऊ तर वादास खोटे

लेखाक २७१
१७०८ - १७०९

श्री
तालिक
१ जबानी गोपाळ जोसी भिमाजी गोसावी याची मुज माहादेव गोसावी याच्या माडी वरी केली या उपरातिकआह्मास काही ठावके नाही
१ जबानी माणिक दीक्षित पढरपुरे भिमाजी गोसावी याची मुज कोणाच्या माडी वर केली ठाऊकी नाही त्या समई सईबाई हिने विचारिले को या मुलास ब्रह्मच्यारी करिता किंवा गृहस्ताश्रमी करिता त्यास महादेव गोसावी बोलिला की ब्रह्मच्यारी यास पुत्र कशास पाहिजे त्यास तो गृहस्ताश्रमी होईल या पेक्षा आह्मास ठाऊक नाही
१ येणे प्रमाणे रघुनाथभट गिजरे
१ येणे प्रमाणे भाऊ देशपाडे
साक्षी निशी पुरवणी करून देऊ ह्मणोन लिहिले ते साक्षीदार कोण आहेत त्ये सागणे

१ गोपाळ जोशी              १ विठलभट पढरपुर
१ माणिकभय पढरपुरे      १ भाऊ देशपाडे
३ रघुनाथभट गिजरे         १ गोविंदपत

लेखाक २७०
१७०९ आषाढकृष्ण १३

श्रीमत्कृष्णाककुद्यतीप्रीतिसंगमो जयति
स्वस्ति श्रीमदिदिराकरकमलोपरिष्ठिताष्टादशशक्तिपीठातस्थितशक्तिपीठमहासस्थान-

दक्षणावाराणसीश्रीकरहाटकक्षेत्रस्थविद्वज्जनसमूह यानी लेहून दिल्हे निर्णयपत्र ऐसे जे बापूजी रघुनाथ व भिमाजी बल्लाल व कृष्णाजी बल्लाळ व सदाशिव बल्लाळ वास्तव्य कुमठे समत कोरेगाव प्रात वाई चतुर्वर्गा मध्ये दत्तकविशई कलह होवोनि क्षेत्रमजकुरास आले सदाशिव बल्लाळ यानी विनती केली की भिमाजी बल्लाळ यात व आह्मात कलह होउन आह्मि आपणा पासि अलो त्या वरून भीमाजी बल्लाळ यास बोलाउन आणिले या उभयता पासि राजिनामे व जामिनकतबे व तक्रिरा घेउन मनास आणिता दत्तकाचि चौकशी वर ठरले त्यास भिमाजी बल्लाळ बोलिले किं अपण महादेव गोसावि ब्रह्मचारी याचे पुत्र अपण ऐसे दत्त घेतले ऐसे साक्षी निशि व भूक्ति निशि व पत्रानिशि पुरवणि करुन देउ त्याचि चौकशी पाहता भुक्ति पुरवलि नाही मग साक्षिदार अणुन विचारिले कि तुह्मी सत्यपूर्वक काय असल ते
सागणे त्या वर साक्षीदारानि ब्रह्मसभेस येउन सागीतले किं दत्तविधान जाहले नाही आणि पुत्र घेतला नाही कागदपत्रा निशी पुरवणी जाहली नाहि आणि माहादेव बावा बोलिले कि अह्मि ब्रह्मचारी अह्मास कशास पुत्र पाहिजे ऐसे साक्षीदारानी सागितले अणि आज पर्यत पुत्रधर्माचे अचरण किमपि घडले नाही त्याजवरून बाळाजीपत यास पुत्र चौघे वडील रघुनाथ बल्लाळ त्याचे पुत्र बापुजी रघुनाथ व भिमाजी बल्लाळ व कृष्णाजी बल्लाळ व सदाशिव बल्लाळ ऐसे चतुर्वर्ग बधु त्यास भिमाजी बल्लाळ यानी अपले बधु जोतिपत याचि स्त्रीस अपला पुत्र सखाराम दिल्हा ऐसे बोलत होते त्याचि चौकशी पाहता भिमाजी बल्लाळ याचे मुखे पुरवणी जाहलि नाहि आणि पुत्रधर्म अजि पर्यत काहि च घडले नाहि व माहाजरात सखाराम भिमाजी स्पष्ट ऐसा उत्धार अह्ये त्या वरून सखाराम पुत्र नव्हे ऐसे दोन्हि दत्तकाचि पुरवणी जाहली नाही ह्मणउन निवाडपत्र दिल्ले असे चौघा बधुनि यथाविभागे च्यार वाटण्या अपल्याल्या करून स्वस्तिक्षेम आसावे कोणि कोणासी परस्परे कळ करू नये हे निर्णयपत्र असे मिति शके १७०९ प्लवगनाम सवत्सरे आषाढकृष्ण १३ त्रयोदशी एव निर्णयपत्रस्यपक्तय

लेखांक २६९
१७०९ ज्येष्ठ वा। ३०

श्री
वेदशास्त्र समस्त ब्राह्मण क्षेत्र का। कराड यासी भिमाजी गोसावी मु॥ कुमटे

विनति विज्ञापना ऐसी जे आपण आज्ञा केली ऐसी जे महजर याची पुरवणी करून देणे त्यास जो जागा टाकिला आहे तो भिवाजी माहादेव किंवा भिमाजी बलाल ह्मणाव त्यास आपण जो स्तापतील त्या प्रमाणे मान्य असो ज्या उपरि आपणा पाशी पत्रे नाहीत हे खरे सदरहू महजर याच्या जागा टाकिला आहे त्याची पुरवणी आपणा कडून होत नाही हे लि॥ खरे शके १७०९ प्लवगनाम सवत्सरे सु।। समान समानीन मया अलफ छ २८ माहे साबान
सदरहू आह्मी कारकून व्हावे असी अपेक्षा हवी ती काही आपली नाही तुह्मी जे सागाल त्यास मान्य असो

लेखाक २६८

श्री

तकरीर सदाशिवबावा यास कलमझाडा विचारिला महादेवबावा ब्रह्मचारी अस्ता तुमचे पाच बधू याचे व्रतबध त्यानी करविले ते तुमचे तीर्थरूप असता व्रतबध करविले किंवा मृत्य पावल्या वरी व्रतबध करविले ते व कोण कोणाचे व्रतबध कोणाचे माडी वरी करविल्ले ते सागावे महादेव बावा ब्रह्मचारी असता करावयास कारण काय हे सागावे कलम १

याचे उत्तर बावानी व्रतबध केले ते धर्मार्थ आमचे तीर्थरूप असता बाजीपत च जोतीपत याचा व्रतबध जाहला तीर्थरूप निवर्तल्या वरी भिमाजी बावाचा क-हाडी व्रतबध महादेवबावानी केला कुणाचा माडी वरी केला हे आपल्यास ठावूक नाही कृष्णाजीपताचा व्रतबध कुमट्यात जाहला कुणाचा माडी वरी जाहला हे ठावूक नाही आमचा व्रतबध बाजीपताचा माडी वरी जाहला येणे प्रमाणे लिहिले सही

लेखाक २६७
शके १७०९ ज्येष्ठ वा।३०

श्री
वो। समस्त ब्राह्मण क्षेत्र पचाईत कराडकर स्वा।।
वि॥ सदाशिव बल्लाळ नमस्कार तुह्मी विचारिले ऐसे जे म्हाजरात भीमाजीपताचे नाव लिहून जागा पुढे टाकली याची पुरवणी करून देणे त्यास आपल्याच्याने पुरवणी होत नाही ये विषईं आपल्या पासी कागदपत्र हि नाही तुह्मी सागाल त्यास मान्य असो हा कागद लेहून दिल्हा सही शके १७०९ जेष्ट वद्य अखेरि
बी।

फलटण

लेखांक २७५                                                      श्रीभवानीशंकरप्रसन्न                                                                             १४२७                                                                                  

श्रीमंत महाराज जयपालसुत वणंगपाल नाईक निंबाळकर सरकार परगणे फलटण -

प्रा। बाबा शेटी वसंत शेटी व सारंगशेट सोनार कसबे मजकूर सु॥ सन ९०५ बेशमे पत्र करून दिल्हे जे --

आमचे सर्व नायकांचे मुतने कापून आमचे सर्व राज्य चोथ्यांनी घेऊन राज्य करू लागले. ते वेळी आमची मातोश्री गरोदर होती तिला. तेथील हणमंतजी परीट याने पाठीसी बांधून रात्रीची त्यांनीं मौजे निंबळकचे रानांत डोंगराचे सुळक्यात ताकुबीर बोवा याचे समाधीत नेऊन ठेविले. तेथेच प्रसूत जाहली. त्यास आह्मी वनांत उपजलो तेव्हा आमचे नांव त्या परटाने वनंग पाळ ठेविले, तेथेच काही दिवस छपून आमची मातुश्री व आह्मी होतो. त्या परटाने बाळंतपणाची तजवीज ठेविली होती. आरण्यात कोणी मनुष्य वगैरे थारा नव्हता, तेथून आह्मास व मातुश्रीस त्या परटाने निंबळक गावी निमजाईदेवीचे देवळीं नेऊन आह्मास ठेविले. तेथेच आह्मी बारा वर्षाचे झालो आह्मास चागले कळू लागल्यावर आह्मी तेथेच राहून देवीची पुज्या अर्च्या करून तप अनुष्ठान बारा वर्षे केले एके दिवशी श्री देवीचा प्रत्यक्ष दृष्टात होऊन वर देती झाली की तू माझा खडग हातात घेऊन आता फळटणी जा; तेव्हा दोन प्रहर रात्र होती. देवीची आज्ञा घेऊन ते वेळेस रात्री एकटे फलटणास आलो, ते वेळेस रात्रीचा छबीना पाहारा- चौकीचा बदोबस्त असोन चोथ्या महालात निजला होता आह्मी सर्व पहारेकरी यास भेटून त्यास वर्तमान कथन केले की मी या गावचा राजा असोन त्याने आमचे मुतने कापले आहे, पण आह्मी देवदेशी राहिलो आहे आणि श्री निमजाई देवी प्रसन्न होउुन केली की ''तुह्मास सर्व लोक सहाय्य होतील तेव्हा तुह्मी त्या चोथ्याचे शीर कापा तुमचा फता आहे'' त्याप्रमाणे आह्मी आलो आहे आह्मास सहाय्य व्हा असा मजकूर त्याणी ऐकताच सर्व आह्मास सहाय्य झाले, नतर आह्मी महालात गेलो चोथ्या निजला आहे हे पाहून त्याजला जागे करून हातातील खङ्गाने त्याचे शीर कापले आणि त्याचे सर्व चोथ्याचे मुतने कापून त्याचे बद्दला आह्मी घेऊन आह्मी राज्य घेऊन राज्य करू लागलो, तेव्हापासोन तुझे नावाने आह्मी वर्तू ह्मणोन देवीस मागोन घेतले, तेव्हा पासोन आह्मी निंबाळकर ह्मणूननाव चावविले. आह्मी मूळचे धारचे पवार आहो हे वर्तमान मोगल बादशहा बेदर ह्यास कोणी कळवीले वरून त्याणे येथे येऊन आमचे राज्य जप्‍त करून आपले ठाणे बसवीले, आणि बेदरास कैद करून नेले, तेथे आह्मी एक वर्ष कैदेत होतो. तेथील अमीर ऊमराव मध्ये घालोन मोगलाची धाड पधरा लक्ष १५००००० एक शीक्का मोगलाची धाड भरून आमची जहागीरी सोडवीली, हा तुमचा मोठा उपकार जाणोन तुह्मास ''धाडे पतगराव'' ही कीतापत नवीन वतन करून दिल्हे आहे ते -----

लेखाक २६६
१७०८ फाल्गुन वा। १३


श्री
ताजाकलम करीना जबानी भिमाजी माहादेव गोसावी लेहून दिल्हा करीना ऐसा जे आपला मूळपुरुष मुधोपत १ यास पुत्र २ दोघे
वडील माहादेव गोसावी १                   धाकटे बाळाजीपत १ यासी पुत्र ५
मा।र निलेस पुत्र नाही सबब भि           १ बाजीपत
वाजीबावा कराडी मुज आपले             १ जोतीपत
मांडीवर करून वोट्यात घेतला           १ भिवजी बावा
१ कृष्णाजीपत                                 १ सदाशिवपत
                                                  ----
                                                   ५
बालाजीपत यासी पुत्र च्यार जोतीपत यासी पुत्र नाही सबब भिवाजी गोसावी याचा पुत्र जोतीपताच्या वोट्यात घातला येणे प्रमाणे वाटणीचा विभाग आहे हे करीना लिहून दिल्हा सही याज खेरीज आपले बोलणे नाही जर करिता बोललो तरी वाद सागतो हा खोटा तेरीख छ २६ जमादिलावल शके १७०८ पराभवनामसवत्सरे फाल्गुनवद्य १३ त्रयोदशी

हस्ताक्षर मनोहर भिवाजी

लेखाक २६५
१७०८ माघवा। ७

श्री
वेदशास्त्रसपन्न राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी करीना
बो। सदाशिव बल्लाळ मु।। मौजे कुमटे सा। कोरेगाव प्रा। वाई सु।। सबा

समानीन मया व अलफ कारणे लेहून दिल्हा करीना यैसा जे आमचे चुलते तीर्थस्वरूप माहादेवबावा ब्रह्मच्यारी नैष्टिक त्याचे बधु तीर्थरुप बाळाजीपत आमचे तीर्थरुप त्याचे लग्न बावानी केले पालग्रहण केले त्याचे पोटी पाच पुत्र वडील बाजीपत दुसरे जोतीपत तिसरे भिमाजी गोसावी चवथे कृष्णाजीपत पाचवे कनिष्ट आम्ही ऐसे पाच पुत्र त्याच्या मुजी वृतबध बावानी करविले आणि तिघाची लग्ने बावानी केली उपरातीक बावाचा काळ शके १६७७ युवानामसवत्सरे मार्गशीर्षमासी जाहला त्याचे उत्तरकार्य बाजीपत यानी केले आमचे तीर्थरूप अगोदर च काळ जाहला होता उपरातिक बावाचा काल जाहला आमचे व कृष्णाजीपताचे लग्न बाजीपती केले ऐसे एकत्र असता जोतीपताचा काल जाहला त्याचे पोटी पुत्रसतान नाही बाजीपतास पुत्र येक जोती पताचे नकल जाहले भिमाजी गोसावी यासी पुत्र पाच कृष्णाजीपत पुत्र दोघे व आपणास दोघे पुत्र येणे प्रमाणे चौघाचे पोटी पुत्रसतान जाहले जोतीपताचे नकल जाहले तेव्हा बाजीपत बोलिले जे जोतीपताचे पोटी पुत्र नाही त्याचा काल जाहला तेव्हा त्याचे स्त्रीस येक पुत्र द्यावा तेव्हा तिघा जणाच्या व ब्राह्मणाच्या चित्तात द्यावा ऐसे जाहले तेव्हा बाजीपताचा आग्रह जे तिजला पुत्र द्यावा तिचे चित्तात हि नव्हते घेतला नाही परतु बाजीपतानी घ्यावासा केला भिमाजी गोसावी याणी वृतबध केला तदनतर जोतीपताची स्त्री काशीयात्रेस गेली तेथे तिचा काळ जाहला तिचे उत्तरकार्य तेथे धर्मपुत्र घालून केले येथे कळल्या नतर तिजला पुत्र दिला असता तरी तिचे उत्तरकार्य करून श्राद्धपक्ष जोतीपताचे व त्याचे स्त्रीचे पुत्राने करावे ते न केले बाजीपत करीत आले आणि चौघे बधू येक विचारे येकत्र चालिले गुदस्ता शके १७०७ विश्वावसुनामसवत्सरे पौषशुद्धपौर्णिमेस घरात कलह होऊन विभक्त जाहले तेव्हा पाच विभाग करू लागले तेव्हा कृष्णाजीपत बोलिला जे पाच विभाग का करिता एकाचे नकल जाहले ऐसे असता च्यार विभाग करावे ते पाच विभाग का करिता माझ्या पुत्राचे लग्न जाहले नाही वरकड भावाची पाच च्यार एकएकाची जाली आमचे मुलाचे लग्न नाही तेव्हा विभक्त होता येत नाही ह्मणोन पचाइतास द्वाही दिल्ही असता पाचानी पाच विभाग केले राजी नसता ऐसे असोन चौघाचे ऐकोन आपण व कृष्णाजीपत पाचास मान दिल्हा कर्जवाम व भाडेकुडे व दाणा जबरदस्ती आमचे पदरी घातले परतु घेतले नाही तैसे च पडले आहे ऐसे असोन भिमाजी गोसावी याने व बाजीपंतानी पाच विभाग करून घेतले तुम्ही विभागा प्रा। घेणे ह्मणोन पाचानी सागितले त्या वरून मान्य कृष्णाजीपताचे मुलाचे पाचा जणानी लग्न करून द्यावे ऐसे जाहले असता हाली भिमाजी गोसावी चौघाचे व पचाईताचे मोडून दुसरे च काढले जे माहादेवबावाचा हिसा मजला निमे देणे ह्मणून खटका करून क्षेत्रास आला येणेप्रमाणे जाहले वर्तमान निवेदन केले या खेरीज आपले बोलणे काही राहिले नाही हा करीना लेहून दिल्हा सही छ १९ रबिलाखर माघ वा। ७ शके १७०८

आमचा पुत्र मनोहर व जोतीपताचा पुत्र सखाराम ऐसे येथे कराडास आले मसाला केला होता तो माणसास दिल्हा येथे क्षेत्रस्तानी करार केला की तुह्मी अवघे जण गावास जाऊन गावी समजणे येथे खटला करू नये ऐसे सागितले त्या वरून निघोन त्रिवर्ग गावास आले आह्मास चिरजीव मनोहर याने वर्तमान या प्रमाणे सागितले नतर मध्ये काही येक दिवस गेले मग आणखी आह्मी गावकर याज कडे गेला त्यास आमचा कजिया तोडणे त्यानी सदाशिवबावा यास कितेके प्रकारे सोन्याचा फडशा विभागास असेल तैसा करावा ऐसे सागत होते परतु हे ऐकेनात नित्य याचा आमचा कलह याज मुळे गावात ह्मणो लागले की येथे तुह्मासा सागितल्याने तुह्मी कोणी ऐकत नाही त्या पक्षी थळ नेमून देतो स्थळास जाणे ऐसे बोलणे जाहले ते दिवशी दीडप्रहररात्रपर्यंत उपोषण जाहले तेव्हा गावकर सारे मिळोन स्थळास जावे ऐसे सदाशिवबावा यास व आह्मास सागितले नतर स्थळास राजी होऊन नेमोत्तरे लिहून दिल्ही स्थळ मौजे चिमणगाव हा गाव नेमिला नेमास जावे त्यास सदाशिवबावा स्थलास येईना तेव्हा ते दिवशी आणखी गावकरा कडे गेलो सध्याकालपर्यत उपोषण जाहले तेव्हा सदाशिवबावा यानी गावकरासी करार केला की मी दसरा करून स्थळास जातो व गावकर यानी आह्मास हि सागितले की दसरियात कजिया न करणे दसरा जाहलिया वर स्थळ नेमून दिल्हे आहे तेथे जाऊन फडशा करून घेणे दसरा जाहलिया वर आह्मी स्थळचिटी घेतली आणि सदाशिवबावा यास स्थळास चला ह्यणून बोलिलो परतु आले नाहीत आह्मी स्थळास जाऊन स्थळचिटी दिल्ही स्थळकरी यांनी सदाशिवबावा यास पत्र पाठविले ते मान्य न केले आणि स्थळास आले नाहीत आह्मी स्थळी महिना भर बसलो उपरात स्थळकरी याची चिटी घेऊन गावास आलो गावकरास स्थळचे पत्र दिल्हे तेव्हा पुढे गावी पचाईतात व हकीमात आह्मा उभयताचा कजिया पडला की तुह्मी आह्मा पासोन कर्ज वारविले आणि सोन्याचा फडशा सदाशिवबावा करून देत नाहीत व स्थळास येत नाहीत तेव्हा माझी वाट काय ह्यणोन बैसलो तेव्हा सदाशिव गोसावी यास व कृष्णाजीपत यास बोलाऊन निकड केली सध्याकाल पावे तो आह्मा चौघा जणास बैसविले तेव्हा ते दिवशी सदाशिवबावा बोलले की आपण स्थळास जात नाही तुह्मी चौघे सागाल त्यास मान्य ऐसा करार जाहला मग. आह्मा सर्वत्रास निरोप दिल्हा बाजीपत आषाढमासी मृत्य पावले आह्मी चौघे जण आपलेले घरास गेलो उपरात गावकरा कडे जाऊन फडशा करून घ्यावा ते न करता कुसाजीपत निघोन माहुलीस गेले तेथून पत्र आह्मास पाठविले आह्मी माहुलीस गेलो नाही तेथून कृष्णाजीपत आपले कडे क्षेत्रास येऊन आह्मास पत्र क्षेत्रीचे पाठविले त्या वरून आह्मी क्षेत्रास आलो करीना लेहून देणे ह्मणोन आज्ञा त्यावरून जाहला करीना लेहून दिल्हा असे तरीख छ १८ सु।। सबा समानीन माहे रबिलाखर शके १७०८ पराभवनामसवत्सरे
बिकलम विठल नारायण कुलकर्णी
कसबे कराड