Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखाक ३१४
१७२२ श्रावण वा। १

श्री

दी नागेशभट बिन बाजीभट ढवलीकर व बापूचार्य बिन रघुनाथा चार्य घलसासी हे उभयता बाबा श्रीधर नरसीपूरकर यास बहिष्कार असता त्याचे घरी जाऊन भोजन करून आले नतर श्रीपाडुरग येथे आषाढीची समाराधना जाहली तेथे सरकारातून सागितले जे या उभयतास भोजनास सागू नये त्या वरून क्षेत्रस्था कडे येऊन जबानी जाले वृत्त लेहून दिल्हे नतर सरकारचे जप्तीचे रोखे इनामा वर जाहले पुढे याचे प्रकरण प्रायश्चित्त घ्यावे ऐसे ठरले नतर आमचे ग्रामस्थ कोणी बोलू लागले की पचगव्य द्यावे सरकारचे बोलणे जे शास्त्रार्थ निघेल ते प्रायश्चित्त करावे या खाली पधरा दिवस लोटले मग हे उभयता मान्य जाहले की सरकार व शास्त्रार्थ जैसा असेल तैसे करू त्याज वरून श्रावणशु॥ १० स राजश्री भाऊ याज कडे ब्राह्मण नावनिशीवार गेले की प्रायश्चित्ताची परवानगी द्यावी ते समयी हजर ब्राह्मण बितपशील
१ बालकृष्णभट गिजरे                 १ चिमण जोशी
१ नागेशभट बिन सखारामभट       १ तात्या जोशी
दी।। ढवळीकर                          १ नागेश बाजी ढवळीकर
१ तात्या गिजरे                            १ बापूजी रघुनाथ घलसासी
--                                           ---
३                                            ४

येणे प्रमाणे परवानगी मागितली त्यानी उत्तर केले जे सरकारवाड्यात जाऊन कारभारी यास विचारून देऊ मग बाळकृष्णभट गिजरे बोलिले जे आज त्याचे घरी कुलधर्म आहे त्यास जोशी व ग्रामोपाध्ये समागमे घेऊन जावे आणि वाड्यातून परवानगी द्यावी त्या वरून बालकोबा यानी बहिरभट ग्रामउपाध्ये परतु कारभारी त्याची गाठ पडली नाही मग तो माघारा आला त्यास हि पाच दिवस जाहले मग श्रावणवा॥ १ मगळवारी ब्राह्मणमडळी मिळोन परवानगी मागावयास सरकारात गेले त्याची नावनिशी बितपशील

१ बाबादी॥ वळवडे            १ चिमण जोशी
१ तात्या जोशी                   १ माणिकदी। उब्राणी
१ नरसिहाचार्य टोणपे          १ रामाचार्य शर्मिष्ठा
१ आपादी।। क्षीरसागर        १ बालभट गिजरे
१ बालभट वैद्य                   १ मोरभट ग्रामउपाध्ये
१ महिपतभट गिजरे            १ विठल महिपत जोशी
१ नारायणभट टोणपे           २ प्रायश्चित्ताचे
१ तात्या गिजरे                   १ नागो ढवळीकर
------                              १ बापू घलसासी
१४                                ----
                                     २
-----
१६

येणे प्रमाणे सरकारचे कचेरीस जाऊन राजश्री मोरोपंतभाऊ व सदाशिवपत फडणीस व लक्ष्मणपंत व बापूरुद्र आणखी मडळी होती त्यांनी सागितलें जे पाचसात जण एकी कडे त्याज वरून बितपशील
१ बाबा वलवडे              १ चिमणजोशी
१ नरसिहाचार्य टोणपे      १ आपा दीक्षित
१ मोरभट ग्रामउपाध्ये     १ विठल महीपत जोशी
१ रामाचार्य घलसासी      १ तात्या गिजरे

येणे प्रमाणे जाऊन त्याची आमची बोलणी बहुत जाहली पंचगव्य द्यावे त्याचे बोलणे शास्त्रार्थ जो निघेल त्या प्रमाणे करणे मग दर असामीस एक एक कुछ सागितले मग जोशी व ग्रामउपाध्ये यास सागितले त्याणी क्षौर करून पचगव्य दिल्हे मिति शके १७२२ श्रावणकृष्ण १ मंगलवार

लेखांक ३१३
१७२२ आषाढवा।। ८ बाळबोध

श्रीलक्ष्मीनृसिहप्रसन्
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राम्हण क्षेत्र
करहाढ याशी

नागेशभट्ट विन्न बाजीभट ढवळीकर सा।। विनती उपरि ऐशी जे अह्मी नरशीपुरास गेलो होतो जाऊन बाबा श्रीधर यास वाळीत असता जाऊन त्याचे घरी भोजन केले ह्मणू सर्काचे रोखे आमच्या शेता वर जाले अहेत याज मुळे अह्मी तुह्मा पाशी अलो याज वरून अपण विच्यारिले जे तुह्मी जावयास कारण काय व तेथे जाउन काय करून अला हे सागावे त्यास बापूच्यार्य बिन रघूनाथाच्यार्य घळसाशी हे अपल्या बहिणीस हिवाचे औषध घेऊन जात होते व अह्मी देवास जात होतो त्यास बाबा श्रीधर यास वाळीत अहे दुस-या घरी राहवू ऐस बापूच्यार्य यास बोलिलो त्यास बापूने उत्तर केले जे अह्मी दोन चार वेळा बाबा श्रीधर याचे घरी जाऊन भोजन करून अक्षत लाऊन अलो परतु अह्मास कोणी विचारिले नाही त्याज वरून बापूच्या सोबतीने अह्मी जाऊन त्याचे घरी भोजन केल्या नतर देवदर्शनास जावे तो गावात ब्राह्मणानी अह्मी भोजन केल्या नतर देवदर्शनास जावे तो गावात ब्राह्मणानी अह्मी भोजन केले ह्मणून गजबज केली याज मुळे देवदर्शन जाले नाही इत पर त्याचे सहा घरात जाणार नाही साप्रत तुह्मी जे सागाल ते ऐकू यास अतर होणार नाही हा कागद लेहून दिला सत्य मिती शके १७२२ रौद्रनामसवत्सरे अषाढवद्य ८ हस्ताक्षर ॐ

लेखांक २८१                                                                      श्री                                                                        १६०२ आश्विन शुध्द १                                                                                                                                                                

                                                                                                         281

स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ७ रौद्र नाम सवत्सरे आश्विन शु॥ प्रतीपदा इदुवासर क्षत्रियकुलावतस श्री राजा शभु छत्रपति याणी राजश्री गणोराम देशाधिकारी व देशलेखक प्रात कुडाळ यासी आज्ञा केली असी जे तुह्मी हुजूर येऊन स्वामीस विनति केली की राजश्री मौनी गोसावी पाटगावी रहातात बहुत थोर ईश्वर पुरुष आहे त्यास पालखी आहे परतु नेहमी भोई नाहीत तरी नेहमी भोई व वाजत्री नेहम करून देविले पाहिजे यावरून वरशास भोयास व वाजत्रियास मोईन होन निशाणी १२५ सवासे करून दिले आहेती यात भोई व वाजत्री ठेऊन देणे ते सेवा करितील तुह्मी सदरर्हू पैके तुरुतगिरी शिष्य गोसावियाचा आहे, त्याजवळ पावीत जाणे ते भोयास व वाजत्रियास हक पावितील सदर्हू मोईन ई॥ सालमजकुरापासोन केली असे यासी वाजत्री तुह्मी ठेविली आहे भोई ठेऊन देणे आहे यैसीयासि वाजत्री ज्या दिवसापासून सालमा। ठेविले असाल ते दिवसापासून वाजत्रियास वरशास पचवीस होनप्रमाणे पाववणे उरले शभर होन यासी भोई ज्या दिवसापासून ठेवाल ते दिवसापासून सालमाचे हक पाववणे पुढे सदर्हू शभर होन भोयास व पचवीस वाजत्रियास याप्रमाणे साल दर साल पावीत जाणे आणि धर्मार्थ ह्मणून गोसावीयाचे नावे खर्च लिहीत जाणे ताजा सनदेचा उजूर करीत न च जाणे गोसावी कुशल असतील तो ठेवीत जाणे असल गोसावीयाच्या शिष्यापासी देऊन तालीक सुभा विले लावणे सदरहू सवासे होन निवल देविले आहे, तियासी वजावाटाव माफ असे लेखनालंकार

                                              281 1

                                                                         रुजु सुरुनिवीस
                                                                         रा। छ १६ माहे रमजान

छ २९ शाबान                                                       माहे शाबान

                                                                        सुरू सूद बार बार
श्रीशंकर                                                             पौ। छ २९ रमजान

लेखाक ३१२
१७२२ आषाढ वा। ८ बाळबोध

श्री
वेदशास्त्रसंपन राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रक-हाड यासि

बापूचार्ये बिन रघुनाथाचार्ये घळसासी क्षेत्रमजकुर विनती ऐसि जे अह्मी नरसिपुरास गेलो होतो जाउन बाबा श्रीधर यास वाळित असता जाउन त्याचे घरि भोजन केले मणुन सरकारचे रोखे अमचे शेता वर जाहले अहेत याज मुळे अह्मी तुम्हा पासि अलो याज वरून अपण विचारिले जे तुम्ही जावयास कारण काय व तेथे जाउन काय करून अला हे सागावे त्यास अम्ही अपल्या बहिणीस औषध घेउन जात होतो व नागेशभट बिंन बाजीभट ढवलीकर देवास जात होते त्यास हे बोलिले कि बाबा श्रीधर यास वाळित अहे दुसरे घरि राहिल्यास अम्ही बोलिलो जे त्याचे घरिं अम्ही येक दोन वेळा जाउन भोजन करुन अक्षद लाउन अलो परतु अम्हास कोणि विचारिले नाही याज वरुन अम्ही व नागेशभट मिळोन बाबा श्रीधर याचे घरि जाउन भोजन केले हे वर्तमान गावात ब्राम्हणास समजले याज वरून अम्हास धरून बसविले आणि रेट-यास अणिले रेटरेकर यानी त्यास माघार लाउन दिले अम्हास कराडास लाउन दिल्हे हे वर्तमान खर साप्रत तुम्ही जे सागाल ते मान्य करुन पुढे त्याचे साहा घरास अम्ही जाणार नाही व ते येथ अले तर स्थळ देणार नाही अणि अमचे मुली त्याचे घरि अहेत त्या हि त्याचि निस्कृति होय तो पर्यत अणार नाही हे पत्र लिहिले सत्य मिती शके १७२२ अषाढ वद्य ८ हस्ताक्षर

अल्लाउद्दीनाची धाड येण्या पूर्वी कर्नाटक, कोंकण, इत्यादि बहुतेक सर्व प्रांतांतून मांडलिक राजे बेलगाम होऊन सम्राट्सत्ता नांवाला मात्र राहिली होती. रामदेवराव जाधव, शाहू राजा, बाजीराव रघुनाथ, इत्यादि दुर्बल राजपुरुषांच्या मनाची रचना च अशी विघटित असते कीं दुर्दैंवानें आंगावर पडलेल्या सम्राट्सत्तेचा भार त्यांना सहन होत नाहीं, कारभाराचा व्याप आकलन करण्याचा मगदूर त्यांच्या ठाईं जन्मत:च गैरहजर असतो आणि राज्यलक्ष्मीचा संसार थाटानें व शिताफीनें चालविण्याच्या करामतीची उणीव त्यांच्यांत निसर्गसिद्ध व परिस्थितिसिद्ध असते. अश्या दुर्बल राजाला शक १२१६ त अल्लाउद्दिनानें चार घटकेंत (बखरींतील शब्द) चूप केलें यांत मोठेंसें नवल नाहीं ! राज्य यंत्र पटकाविण्याची सामान्य तयारी केलेला कोणी हि इसम हें कृत्य ह्या हून हि थोड्या अवधींत करता. त्रिपुरकुमर ह्या ठाणेंकोंकणच्या सामान्य संस्थानिकानें रामदेवरावाला दटावण्याचा व पिटाळण्याचा हा क्षुद्र चमत्कार वीस वर्षां पूर्वीं शक ११९६ त कसा केला तें मागें सांगितलें च आहे. अल्लाउद्दीनानें शक १२१६ देवगिरी वर प्रथम स्वारी केली म्हणून म्लेच्छ तवारिखकार लिहितात. परंतु, त्या सालाच्या अगोदर चार वर्षे म्हणजे शके १२१० त अल्लाउद्दीनानें पैठणा वर स्वारी केली होती असें प्रस्तुत बखर म्हणते (पृष्ट ८९). ह्या शक १२१० च्या स्वारींत रामदेवराव व त्याचे पातेणे प्रभु सरदार यांचा पराभव झाला. ह्या पराभवा नंतर असें दिसतें कीं विशेष भानगडींत न पडतां, अल्लाउद्दीन परत क-हामाणिकपुरास गेला. देवगिरीस केशवदेव किल्ला बळकावून म्हणजे बळकट करून राहिला. हा केशवदेव पुढें थोड्या च काळांत मरण पावला व त्याचा पुत्र धाकटा रामदेवराव देवगिरी वर अंमल करूं लागला. प्रतापशा राजगुरू हेमाडपंता सह अळंदापुरपाटण येथें जसा चा तसा च होता. बिंबदेव उदगीरीस होता. त्यानें गुजराथेच्या बाजूनें स्वारी करून सालेरमोलेर, नंदनबारे म्हणजे सध्यांचे नंदूरबार, दाहिटें, केशवपुर, वडानगर पावेतों चाल करून शक १२१६ त ठाणेंकोंकणांत प्रवेश केला. शक १२१६ त अल्लाउद्दीनानें देवगिरी वर चाल केली त्या च सुमारास बिंबदेव यादवानें गुजराथे वर स्वारी करून कोंकणांत प्रवेश केला. गुजराथे वर स्वारी करण्याचें कारण उघड आहे. देवगिरी वर चालून आलेल्या अल्लाउद्दीनाला गुजराथेंतून जाऊन माळव्याच्या बाजूनें पायबंद देण्याचा बिंबदेवाचा उघडउघड हेतू दिसतो. बिंबदेवाचा हा डाव ओळखून व रामदेवरावाशीं झटपट तह करण्याचा फार्स लगबग उरकून अल्लाउद्दीन परत क-हामाणीकपुरास गेला. त्या मुळें बिंबदेवानें देऊं घातलेला पायबंदाचा शह त्याच्या मागचा चुकला. हा डाव फसल्या वर व अल्लाउद्दीनाची धाड परत गेल्या वर, बिंबदेवानें गुजराथेंतून माळव्या कडे जाण्याचा रोख बदलून गुजराथेच्या दक्षिणे कडील नागरशा व त्रिपुरकुमर वगैरे लहान सहान नाइकांच्या म्हणजे राजकांच्या ठाणेंकोंकण प्रदेशा कडे आपला मोर्चा शक १२१६ त वळविला. ह्या वेळीं नागरशाचा पुत्र जो त्रिपुरकुमर त्याच्या हातीं ठाणेंकोंकणची सर्व सत्ता गेली होती. ठाणेंकोंकणच्या भोंवतालील इतर लहानसहान संस्थानिकां हून त्याचें सामर्थ्य यद्यपि मोठें होतें, तत्रापि बिंबदेव जाधवा सारख्या सम्राट्पुत्राच्या बड्या सैन्याशीं बरोबरीच्या नात्यानें वर्षोनवर्ष टक्कर देत बसण्याची त्याची ऐपत नव्हती. बिंबदेव ठाणेंकोंकणांत शिरून परतापुर येथें सैन्या सह मुक्काम करून राहिला आणि माहीम बेटांत आपल्या सूर्यवंशी सोमवंशी व शेषवंशी सरदारांची वसाहत करून कायमचा बसला. याचा अर्थ असा झाला कीं माहीम प्रांत त्रिपुरकुमराच्या हातचा जाऊन, चेऊल, उरण, पनवेल, पेण वगैरे दक्षिणे कडील प्रांतांचा त्याला आश्रय करावा लागला. शक १२१६ पासून शक १२२५ पर्यंतच्या नऊ दहा वर्षांत घेतलेल्या प्रांतांची स्थिरस्थावरता करून, बिंबदेवानें बरोबर आणिलेल्या सरदारांची स्थापना माहीम बेटांत कायमची केली. सरदारांची यादी बखरकार जी देतो ती अशी:- (यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

लेखाक ३११
१७२२ ज्येष्ठ वा॥ ३

श्री
नकल
वो। राजश्री बालंभट बिन नरसिंहभट व बाबाभट बिन श्रीधरभट अध्यापक प्रभृति भाऊ साहा जोतिषी क्षेत्रनरसिंपूर यांसि

प्रति बाळशास्त्री विनंति उपरि वो। राजश्री शामभट बिन दादभट अध्यापक जोतिषी क्षेत्रनरसिपूर यानी विदित केले की नरसिपूर येथील जोतिषाचा व अग्रहरसमधे बाळंभट व बाबाभट याचा व आमचा पेशजी कजिया लागोन विषय जप्त होऊन मनसुबी सरकारात पडली त्याचा फडशा जाहला नाही परतु परस्परे वृधिक्षय धरीत आहो सालगु॥ रगभट बिन दादभट याची स्त्री प्रसूत होऊन मृत्यु पावली तिचा वृधिक्षय धरिला नाही सबब हे वर्तमान उभयतानी क्षेत्रकराड येथील ब्राह्मणास सागितले ते त्यानी समजोन घेऊन बाळभट व बाबाभट प्रभृति भाऊ साहा यास बहिष्कार घातला असता कोठे कोठे ब्राह्मणास अन्नव्यवहाप करितात त्यास आणोन मनसुबीचा फडशा करावा ह्मणोन त्याज वरून हे पत्र तुह्मास लिहिले आहे तरी कराडकर याणी तुह्मास बहिष्कार घातला आहे त्याप्रमाणे बहिष्कृत राहून मनसुबीस पुण्यास येणे या कामास माहादजी कोडे व सिवाजी जगताप असामी दोन पाठविले आहेत यास मसाला रुपये १०० शभर आदा करून निघोन येणे रवाना छ १६ मोहरम: सु।। इहिदे मया तैन व अलफ बहुत काय लिहिणे हे विनंति

छ २१ मोहरम ज्येष्ठवा ८

लेखाक ३१०
१७२२ वैशाखवा॥ ३०

श्री
यादी बाबा श्रीधर रगाचार्य जोशी नरसीपूरकर या उभयताचा वृद्धिक्षया मुळे खटला पडला सबब क्षेत्रकराड येथे आले उभयताचे मनास आणिता बाबा श्रीधर याने सुतक धरले नाही सबब बहिष्कारपत्रे पाठविली त्याज वर गुप्त शुद्धपत्रे नेहली ह्मणून पुन्हा क्षेत्रस्थाची व सरकारची बहिस्कारपत्रे सादर गावगन्ना जाहली याज मुळे बाबा श्रीधर यानी मिरजेस जाऊन मुलीचे लग्न केले तेथे आमचे कराडकर क्षेत्रस्थ असाम्या जाऊन लग्न करून आले व नतर सरकारात समजलेंं

चौतळकराचे घरी मुज वै॥शु॥ १० स जाहली शु॥ १२ स ब्राह्मण जेवावयास सागितले ते मिरजेस गेले व आणखी हि सागितले त्याज वरून सरकारचा कारकून भगवत जिवाजी अवकरे येऊन त्याने मिरजेस गेलेले ब्राह्मण आ॥ १४ वोढून काढिले मग वसतपूजेस व भोजनास कोणी सागनातसे जाहले वाळीत चौदा असाम्यास पडले ते समई गर्गशा सरकारात पडला त्यानी निक्षुने सागितले की मिरजेस जाण्याचे कारण काय समस्ताचे बहिस्कारपत्र व सरकारची पत्रे ऐसे असता सुतकीयाचे घरी लग्नात जाऊन भोजन केले सबब प्रायश्चित्त घेतल्या वाचून पक्तीस अन्नोदकव्यवहार करू नये ऐसे ठरल्या वर सदरहू मिरजेस चौदा असाम्या गेली होती त्यानी उपोषण वै॥शु।। १२ पासून वो गोविंदजोशी वाडानजीकसरकार येथे प्रारभ केला उपोषणास त्यास तीन उपोषणे जाहली मग श्रीमत मातुश्री काशीबाई यानी वो। तात्या गिजरे व चिमण जोशी व रामभट गोवारकर यास पुसिले जे क्षेत्रात कलह पडला आहे हा तोडून टाकावा त्यास मिरजेस आ। १४ गेली त्यानी श्रीसगमी स्नान करून पचगव्य घेऊन तुह्मी समस्त व ते एकभावे असावे कलह करू नये त्याज वरून चौदा आ॥ १४ त्यास धणी रामभट गोवरेकर व क्षेत्रस्थ दोनशे चौदा आ। यास धणी तात्या गिजरे येणे प्रमाणे याद ठरवावी ह्मणोन राजश्री बापूरुद्र व विष्णुपत व धोडोपत व मोरो अनत भागवत यास सागितले त्याज वरून कचेरीस येऊन याद ठरली ती धोडोपत यानी पाहून विवाद बोलू लागले की रगभट यास बहिष्कार असावा बाबा श्रीधर यास आहे ह्मणोन त्यास असावा त्याज वरून श्रीमत बाई याणी आज्ञा केली जे नरसीपूरकर समस्त ब्राह्मण ज्यास पक्तीस घेतील त्यास तुह्मी घ्यावे येणे प्रमाणे मान्य सर्वत्राचे विचारे याद करून मान्यता घालोन याद विष्णुपती ठेविली आहे मग सरकारचा कारकून त्रिबक मलेगिरी यास समागमे देऊन श्रीचे देवालये पचगव्य वै।। वा ॥ ३० चे दिवशी दिल्हे पचगव्य करून वो। हरभटबाबा यानी द्यावे या प्रमाणे ठरोन सदरहू असामी यानी पचगव्ये घेतली ती याद त्रिबकपत याज पाशी आहे मिति शके १७२२ वै॥वा॥ ३० पचगव्य प्राशन के सर्वत्रानी बाबा श्रीधर सुतकी असता याचे लग्नास मिरजेस चौदा असाम्या गेल्या सबब पचगव्य घेणे प्राप्त

लेखाक ३०९
१७२२ वैशाख वा॥ १० बाळबोध

श्री
यादि जमानी रगभट्ट बिन्न अनतभट्ट उपनाम घळसासी व आपाभट्ट बिन गोविंदभट्ट उपनाम घळसासी नरसिपूरकर बाबा श्रीधर साहा असामी पूर्वी क्षेत्रस्थानी बहिष्कृत होते त्यास त्याचे घरचे लग्न त्यानी मिरजस जाउन केले तेथे अह्मी उभयता होतो त्यास लग्न करून अह्मी नरशिपूरास आलो त्या नतर अह्मी उभयता मिळोन क्षेत्रास येऊन तीर्थ घेऊन मुक्त जाहालो हि जमानी लिहुन दिल्लि सहि मिति शके १७२२ रौद्रनामसवत्सरे वैशाखवद्य १०

हस्ताक्षर अपाजी गोविंद
रगाचार्य मान्य

मागणी नागरशानें नाकारली, मेव्हणे नाखुष झाले व देवगिरीच्या रामदेवराव जाधवाच्या आश्रयास गेले. रामदेवराव जाधव नुकता च शक ११९३ त सम्राट्पदा वर आरूढ झाला होता, नागरशाला ठाण्याचें राज्य करूं लागून तीस वर्षे झालीं होतीं. व त्रिपुरकुमराचें वय ह्या वेळीं ऐन तिशीच्या भरांत आलें होतें. नागरशाच्या मेव्हण्यांनीं रामदेवराव जाधवाला सांगितलें कीं नागरशानें आमच्या बळा वर ठाणेकोंकणचें राज्य मिळविलें आणि आम्हांस स्वास्थ्य करितां बोट भर देखील जमीन देत नाहीं, सबब त्याचा सूड उगविण्याच्या हेतूनें आम्हीं तुज कडे आलों आहों, नागरशाचें राज्य तूं खालसा कर. हा बूट रामदेवरावास मान्य झाला व तो आपल्या दळा समवेत खुद्द ठाण्या वर येऊन ठेपला. चेंदणीकर पाटलानें रामदेवरावाला ठाण्या हून खाडी पलीकडे कळव्यास पिटाळून लाविलें. तों इतक्यांत नागरशाचा पुत्र त्रिपुरकुमर येऊन युद्धांत सामील झाला. कळव्यास मोठें घनघोर युद्ध झालें. तेथून रामदेवरावाचें सैन्य माहुली किल्ल्याच्या आश्रयास गेलें. तेथें हि त्रिपुरकुमर पावला. माहुलीस युद्ध होऊन रामदेवरावाचा प्रधान हेमाडपंडित ह्याचा पराभव झाला. नागरशाचे मेव्हणे-नानोजी, विकोजी व बाळकोजी–हे हि हरले. अश्या प्रकारें या युद्धांत रामदेवरावाचा पूर्ण पराजय झाला. ही हकीकत शक ११९३ नंतर थोड्या च काळांत घडली. या युद्धांत माहीमकर म्हातरा दादपुरो थोर झुंझला, म्हणोन रानवटकर पद राणे पावला. रानवट म्हणजे रणवाट ऊर्फ युद्धभूमि व राणे म्हणजे राजन्यक ऊर्फ राणक, पाटेकरांना नवअर्बुदे ही पदवी मिळाली. दुसरे बहू झुंझले त्यांस अनेक पदांचीं नांवें बहाल केलीं. साष्टीचा देसला आपले दळें बहुत झुंजला, त्यास सरचौक अधिकारी पद जालें, गोहारीकर पाइकाला विराण दिलें. नाऊरकराला नेजाकाहाळा बक्षीस दिली. कांधवळकराला घोडा दिला. साहारकराला पाटवृंदें दिलीं. अश्या नाना देणग्या व पदव्या नागरश्यानें दिल्या.

१७. ठाणेंकोंकणच्या नागरशाचें प्रस्थ ह्या विजयानें अतोनात माजलें. रामदेवराव जाधव म्हणजे सर्व दक्षिणापथाचा सम्राट् . त्याचा पराभव करणें कांहीं लहानसहान गोष्ट नव्हती. नागरशाला जास्त पुंडाई करतां येऊं नये ह्या करितां रामदेवरावानें ह्या पुढें दुसरी एक योजना तयार केली. ती अमलांत आणण्यास त्याला इतर महत्वाच्या भानगडी मुळें पंधरा वीस वर्षे लागलीं. तो पर्यंत नागरशा व त्रिपुरकुमर ठाणेंकोंकणचें राज्य निर्वेधपणें करीत होते. शिलाहारांचें आतां कोणीं उत्तरकोंकणांत राहिलें नव्हतें. यादव सम्राटांचे सामान्य अधिकारी उत्तरकोंकणचा कारभार करीत. परंतु त्रिपुरकुमर वगैरे तत्रस्थ संस्थानिक आपापल्या संस्थानांतून बहुतेक स्वतंत्रपणें राज्य चालवीत. सम्राट्सत्ता रामचंद्र यादवाच्या कारकीर्दीत बहुत हल्लक होऊन गेली होती. त्यांच्या अधिका-यांची सत्ता केवळ नाममात्र असे. संस्थानिक त्यांना विशेष जुमानीत नसत. करतां, खास राजपुत्राची स्थापना ठाणेंकोंकणांत करण्याची योजना रामदेवराव जाधवानें नक्की केली. रामदेवरावाचे शंकरदेव, केशवदेव, बिंबदेव, प्रतापशा वगैरे अनेक पुत्र होते. पैकीं शंकरदेवाला त्यानें आपल्या जवळ खास ठेवून घेतलें. केशवदेवाची स्थापना देवगिरीस केली. बिंबराजास उदयगिरि ऊर्फ उदगीर हा प्रांत दिला. प्रतापशास अलंदापुरपाटणीं स्थापिलें. आणि आपण स्वतः कधीं देवगिरीस व कधी पैठणास राहूं लागला. रामदेव हा लढवय्या पुरुष नव्हता. सातारच्या शाहूराजा सारखा सुखोपभोगी, सैल व मृदु माणूस होता. हरिदासांच्या कथा, शास्त्र्यांच्या संभावना, मानभावांचे संवाद, हेमाद्रीचीं व्रतेंउद्यापनें, इत्यादि पारमार्थिक बाबींत त्याचा सर्व वेळ खर्चिला जाऊन, सैन्य व राज्य ह्यांच्या तयारी कडे त्याचें बिलकुल लक्ष्य नव्हतें. राजपुरुषाला सर्वथा अयोग्य अश्या ह्या वर्तनाचे दुष्परिणाम बरेच होऊन चुकले होते; परंतु ते उत्कटत्वानें दृश्यमान होण्यास शक १२१६ तील अल्लाउद्दीनाची स्वारी विशेष कारण झाली.

लेखाक ३०८
१७२२ वैशाख शुद्ध ३

श्री
यदी शके १७२२ रौद्रनामसवछरे वैशाख शु।। ३ रविवार तदिनी बाबा श्रीधर वगैरे साहा असामी यास बहिष्कार पूर्वी असता बाबा श्रीधर याणी चोरून मिरजेत लग्न केले त्या लग्नास मिरजेस ब्राह्मण कराडकर व नरसिपूर गेले नावनिसीवार

१ नागेशभट गिजरे              १ वासुदेवाचार्य घळसासी
१ व्यकणभट अयाचित         १ गोपाळाचार्य घळसासी
१ समुद्रभट-बनवडीकर        १ व्यकाजी बापू घळसासी
१ नागेशभट ढवळीकर         १ गोविंदभट ढवळीकर
१ सिदभट ढवळीकर           १ रामभट कडू बनवडीकर
१ व्यकणभट आवकीर         १ काशिनाथ अयाचित
१ शामावैद्य                        १ रामभट विदार
२ नरसिपूरकर
             १ रगाच्यार्य घळसासी
             १ आपाजी गोविद घळसासी
येणे प्रमाणे असामी याचे बि-हाड त्रिबकराव सुभेदार कसबे तेरदाल शरीरसबध तिमण्णा नाईक कपली याच्या पुत्राची मुज सोडली नवती त्यास सूर्योदया पूर्वी समावर्तन करून नतर दोन घटिकाने देवकप्रतिष्ठा केली दोन प्रहरा नतर लागली च लग्न केले तिथी ३ रविवार