Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

 इतर जातींच्या नंतर किंवा पूर्वी हे लोक कोंकणांत आले असावे. सेउली, सेपरु, बिलु, हे वैदिक अपभ्रंश ज्या अर्थी ह्यांच्या नांवांत सांपडतात त्या अर्थी असे म्हणावें लागतें कीं, माहाराष्ट्रिकांच्या अगोदर हे लोक कोंकणांत वसाहत करण्यास आले असावे. माहाराष्ट्रिकांच्या अगोदर शेंकडों वर्षे नागलोक कोंकणांत वसाहती करून स्थिर झाले होते. माहाराष्ट्रिक कोंकणांत उतरल्या वर नागांशीं त्यांचा शरीरसंबंध झाला व ह्या शरीरसंबंधा पासून आधुनिककाळीं ज्यांना मराठे म्हणतात त्यांचा उदय झाला. माहाराष्ट्रिकांचा ज्या प्रमाणें नागांशीं शरीरसंबंध झाला, त्या प्रमाणें मांगेल्यांचा नागांशीं शरीरसंबंध झाला नाहीं. ते अगदीं अलग राहिले. ह्या वरून स्पष्ट होतें कीं, मांगेले नागवंशी नव्हते. मांगेले नागवंशी जसे नव्हते तसे ते माहाराष्ट्रिकवंशी हि नव्हते. ते नागवंशी किंवा माहाराष्ट्रवंशी लोकांशीं थोडेफार सजातीय असते, तर नागांत किंवा माहाराष्ट्रिकांत शरीरसंबंधानें मिसळून जाते. तात्पर्य, मांगेले लोक नाग व माहाराष्ट्रिक ह्यांहून निराळ्या वंशाचे, बहुशः आंध्र-तेलगू-द्रविड शाखेचे लोक मूळत: असावे. आंध्रादि देशांत असतांना तेथें वसाहत करून राहिलेल्या वैदिक भाषा बोलणा-या आर्यांचा पगडा त्यांज वर बसून, वैदिक व्यक्तिनामें उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली. नंतर आंध्रदेशांतून ते कोंकणच्या पश्चिम किना-या वर आले. सप्तगोदावरीप्रदेशांत ते मूळांत मच्छीमारीचा धंदा करीत असावे आणि पश्चिमसमुद्रा वर आल्या नंतर त्यांनीं तो धंदा कोंकण किना-या वर चालूं केला असावा. आर्यांची वैदिक भाषा ते अपभ्रंशरूपानें जी आंध्रदेशांत बोलत ती च कोंकणांत आल्या वर हि सहज बोलत. शेजारचे पूर्वीचे नाग आर्यभाष होते च व पश्चात् आलेले माहाराष्ट्रिक हि आर्यभाष होते. त्या मुळें दळणवळणाला प्रयास पडले नाहींत. एणें प्रमाणें एवढें सिद्ध झालें कीं बिंब, भोज, भौम, नायते, नागरशा, मांगेलेतांडेले हे व्यक्ति. नामवाचक किंवा आडनांववाचक किंवा जातिनामवाचक शब्द भारतवर्षांत फार प्राचीन काळा पासून प्रचलित आहेत व ते शक १०६० पासून शक १३७० पर्यंतच्या काळांत उतरकोंकणांत विद्यमान असल्यास असंभाव्य नवल वाटण्याचें कारण नाहीं.

३२. मांगेलेतांडेले लोक आंध्रदेशांत असतांना किंवा आंध्रदेशांतून पश्चिमे कडे. प्रवास करीत असतांना वैदिकभाषा अपभ्रष्ट रूपानें बोलत असा तर्क वरील रकान्यांत केला. ह्या तर्काचा अर्थं असा होतो कीं आंध्रदेशांत व त्याच्या पश्चिमेस आर्यांच्या वसाहती व आर्यभाषेचा प्रसार मांगेले लोक कोंकणांत येण्याच्या पूर्वी होऊन गेलेला होता. आणि हा तर्क खरा आहे. ऐतरेय ब्राह्मणांत आंध्र लोकांचा जसा उल्लेख आलेला आहे तसा कोंकणप्रांतांचा किंवा अपरान्ताचा उल्लेख वैदिक वाङयांत कोठें हिं आलेला नाहीं. आंध्रदेशीय मांगेले लोक अपभ्रष्ट आर्यभाषा घेऊन उत्तरकोंकणाच्या समुद्रकिना-या वर आले म्हणून सांगितलें. ह्या समुद्रकिना-याचा विस्तार स्थूलमानानें उंबरगांवा पासून मुंबई पर्यंत होता. धंद्यानें मच्छीमार पडल्या मुळें, समुद्रकिना-या पासून मैल अर्धमैलाच्या आंत त्यांनीं जी एकदा वसती केली ती अद्यापपर्यंत तेवढा च टापू व्यापून आहे. समुद्रा पासून मैलअर्धमैलाच्या नंतर पूर्वे कडे तीन चार मैला पर्यंत दुबळे लोकांची वसती आहे. दुबळे गुजराथी भाषा बोलतात व शेती वर निर्वाह करितात. भाषे वरून स्पष्टं च होतें कीं दुबळे लोक गुजराथेंतून म्हणजे सुरते कडून दक्षिणेस उत्तरकोकणांत डाहाणूउबंरगांवप्रांतांत शिरले. दुबळ्यांच्या टापूंत धेडे नांवाचे लोक रहातात. हे गुजराथी भाषा बोलतात व अस्पृश्यवर्गांत मोडतात. दुबळा शूद्र आहे व धेडा अतिशूद्र आहे. दुबळ्यांच्या टापूच्या पूर्वेस सह्याद्रिशिखरा पर्यंत वारली लोकांचीं वसती आहे. वारली लोक मराठी भाषा बोलतात. व्यासवरुडनिषाद इत्यादि वार्तिकांत वरुड-वारुडकि ह्या नांवानें वारल्यांचा उल्लेख कात्यायन करतो. वारुडकि= वारुलइ-वारुली=वारली. उंबरगांवा पासून सह्याद्रि पर्यंत जर पश्चिमे कडून पूर्वे कडे एक रेघ मारिली तर त्या वीस मैल रुंद रेघेंत निरनिराळ्या जातींचे टापू येणें प्रमाणें समावतात:--
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)

                                                                      ६ वी नोंद
                                               हरीचंद्र. पी. लश्मन. आ. नाना. दीनाचा पुत्र परश्राम.
                                               भा. मदन. सा. चु. धर्मा नथु. मा. सानुकुबाई. सा.
                                               मागेले ताडेले. कुं. ताबाळी-गा. धीवली. ता. माहींम.

                                                                      ४ थी नोंद
                                               लक्षुमण पी बिलु आ. झानु पत्रु सुकल्या भा.
                                               गोपाळ या आंगुचे राम व. सोमवार व पांडु माता
                                               पुरुबाई* सा. स्त्री जानकीबाई सा. जात मांगेले तांडेले 
                                               आ. पाकधर गांव घविली ता. माहीम जि. ठाणा. प्र.
                                               चींचणी तारापूर

                                                                     ११ वी नोंद
                                              कबरीबाई ध. आत्माराम स. का-या आ. धर्मा पुत्र काळु
                                              समागमे देर चंदु व सेउली चु. सा. वठल व सुख-या
                                              चा सेपरु चा नामजी वीठलचे बली व चंद्रकोर सासु
                                              सीमाबाईं समागमे मागेले कुळी तांबोळी गांव घविंली.
                                              ११ व्या नोंदी नंतर खालील दस्तूर खुद्द आहे:-
                                              हे नावे ११ अकरा याला गवीदार सखाराम अनंत
                                              शुक्ल व आन्नाजी नानाजी चंद्रात्रे हे दोघे बराबर
                                              असे ह॥ अक्षर गोविंद माहादेव शुक्ल द॥ खु॥

ह्या चार नोंदींत तीन प्रकारचीं नांवें आलीं आहेत. कृष्णा, रामचंद्र, बाबू इत्यादि नांवांचा पहिला प्रकार. शिनिवार, सोमवार, बुधी ऊर्फ बुधवारी ह्या वारप्रत्ययान्त नांवांचा दुसरा प्रकार. आणि सेऊली, सेपरु, बिलु, ह्या नांवांचा सरा प्रकार. पहिल्या प्रकारचीं नांवें नित्याच्या परिचयांतील पौराणिक ऊर्फ आधुनिक आहेत. दुसच्या प्रकारची नांवें आंध्र व तेलगू लोकांतील कांहीं जातींत प्रचलित आहेत आणि तिस-या प्रकारचीं नांवें पाणिनीयकालचीं आहेत. शेवलसुपरिविशालवरुणार्यमादीनां तृतीयात् (५-३-८४) या सूत्रांत जो शेवल शब्द येतो त्याचा अपभ्रंश सेउली हा शब्द आहे. इल या शब्दाचा इलु, विलु बिलु, हा अपभ्रंश आहे. आणि सुपरि किंवा शुन:- शेफ ह्या दोन्ही शब्दांचे अनुकंपादर्शक व -हस्वत्वदर्शक अपभ्रंश सुपरु व सेपरु हे आहेत. शेवल, सुपरि, शुनःशेफ, इल, हीं वैदिक नांवें ज्या कालीं प्रचारांत होतीं त्या कालीं हे मांगेले-तांडेले लोक विद्यमान होते असा अर्थ ह्या शब्दांच्या योजनेचा होतो. तसेंच ज्या तेलगू किंवा आंध्र जातींत शिनिवार, आइतवार, सोमवार, बुधवार ही वारप्रत्ययान्त नामें आढळतात त्या जातींशी ह्या मांगेले- तांडेले जातीचा कांहीं तरी संबंध असावा असा तर्क दुस-या प्रकारच्या नांवांच्या योजने वरून करावा लागतो. कोंकणांतील व देशावरील कोणत्या हि इतर हिंदू जातींत बुधवा-या आइतवा-या इत्यादि नांवें नाहींत, तेव्हां हे मांगेले लोक इतर हिंदू जातीं बरोबर कोंकणांत वसाहत करण्यास आले नाहींत हें उघड होतें.

लेखांक २९०                                                                                 श्री 

मौजे सांगवी ता। सांडस प्राा पुणे येथील शेरी तांबे थल पौ। तिरोका बिघे ३० पेशजी चाकणचे अमदानीस चालत होती अमल लोहेखान ते वेलेस कुमाजी बिन दाजी पाटील केले मोकदम नहावीस होता गावात करभाजी लखमाजी बिन होनाजी कुमाजी मा।र याचा चुलता व पिलाजी बिन सावजी पाबले चौगुला व गोपाल कृष्ण गुमास्ते कुलकरणी त्या अमदानीस मालजी बिन सावजी पाबल याजकडे शेरीची सरकती होती शेरीचा माल पीक अमदानी देशमुखाचे घरी आणोन देत होता खंडणी करावयासी पाटील कुलकरणी चाकणास गेले खंडणी होऊन जामीन साकली होऊ लागली ते समई लखमाजी व पिलाजी पिंपलेकर पाटील यासी जामीन जामीन जाहाले की हे गेले पलाले तरी दीडशे हानासी निशा आपण करोन देऊ त्यासी तो गाव पलाला तेव्हा जामीनास तगादा केला स्वारासी बरदास्त करोन रात्रीस पलोन गेले नंतर स्वारांनी गावात वरकडाचे मुलामाणसास छेडछेड केली त्यासमई शेरीकराने स्वार समागमे घेऊन मोकदम पाटील नाहावीस होता त्यासी दाखविले तेथोन स्वारांनी पाटीलास चाकणस घेऊन जाऊन पायात बेडी घातली पिंपलेकर पाटील आणोन हाजीर करावा नाही तर दीडशे होनासी निशा करावी तेव्हा नाहावकर सितोले यांनी मालोजी नरसिंगराव बावा देशमुख याजपासी येऊन विनंति केली की तुमचा पाटील कैदेत पडला आहे यासी सुटका होय तो अर्थ केला पाहिजे त्याजवर देशमुखानी विचार करोन पाटलाची बायको व पुत्र उभयतास बरोबर संतु गुरव व धावनाक माहार समागमे देऊन चाकरणकर देशमुखास पत्र दिली जे उभयतास येऊन पाटलास सोडून द्यावे ह्मणजे ऐवजाची तरतूद करील त्याजवर पाटलास सोडून दिले घरास येऊन गावकरी बोलाऊन सर्वत्रानी मिलोन स्ये संभर दिले आणि पाटलान आपले घरचे घोड व वस्तभाव विकोन ऐवजाची भरती केली जामीनकी उगवोन सिरपाव घेऊन बायको व पुत्र याजला घेऊन गावास आला मग बरवाजी पाबला चौगुला रोनगावकीचा कारभार करू लागले ते समई पाटील मा।राने मालोजी बाबा देशमुख याजपासी सांगीतले की तुमचे शेसीकरान स्वार आणोन दाखऊन दिले ह्मणोन सांगीतले नंतर त्याजकडोन शेरी काहाडली जाखोजी पाबला याजकडे सेरीचे काम सांगीतले त्याजवर जाखोजीने काही दिवस शेरी व पुढे चाकणेकडोन गाव निघाला काल बहुत कठीण पडला गाव उज्याड जाहाला त्याजवर अवरंगजेब बाछा मुलकात आले त्याचा कौल घेतला परंतु गावात वस्ती जाहाली नाही

(५) महाभारतात व हरिवंशात वंशोत्पत्तीसंबंधक जे पुरातन इतिहास-पुरातन इतिहास हा शब्द माझा नाही. व्यासांचा आहे - दिले आहेत त्यांच्यावरून भारतीय समाजाची पुरातन नीतिमत्ता आपल्या सध्याच्या नीतिमत्तेच्या दृष्टीने कोणत्या दर्जाची होती, हे आपणास ब-याच खुलाशाने सांगता आले. हा खुलासा ह्या पुरातन इतिहासांच्या आधाराने आणीकही विस्तृत करता येण्यासारखा आहे. मनुष्य हा वंशाने पाशव आहे व प्राथमिक वन्य मनुष्यांत काही काही बाबतीत पशूंचे आचरण दृष्टीस पडल्यास नवल करावयास नको. आदिपर्वाच्या ६३ व्या अध्यायात पराशरऋषी व सत्यवती ऊर्फ मत्स्यगंधा निषादी यांच्या समागमाचा वृत्तान्त दिला आहे, त्यात पराशराने सत्यवतीशी उघड्यात समागम केल्याचे लिहिले आहे. आपले कृत्य दिसू नये म्हणून परशराने भोवताली योगमायेने अंधार उत्पन्न केला म्हणून कवीने पराशराची पाशववृत्ती झाकण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु थोडे सूक्ष्म पाहिले असता त्यात विशेषसा राम दिसत नाही; कारण अतिप्राचीन आर्यलोकांत दिवसाढवळ्या उघड्या हवेत स्त्रीपुरुष समागम होण्यात काही नीतिभंग होतो असे वाटत नसल्याचा पुरावा आहे. उतथ्यपुत्र दीर्घतपाने सर्व लोकांसमक्ष स्त्रीसमागम करण्यास आरंभ केला, असे वर्णन आदिपर्वाच्या १०४ व्या अध्यायात आढळते. आदिपर्वाच्या ८३ व्या अध्यायात, गुरुदारेशी रत होणारे आणि पशूंसारखे ज्यांचे आचारविचार आहेत, अशा म्लेंच्छ लोकांचे गुणवर्णन केलेले आढळते. सर्व लोकांसमक्ष उघड्यात स्त्रीसमागम करण्याची चाल हिंदुस्थानात कोठे कोठे अवशिष्ट असलेली अर्वाचीन प्रवाशांनी नमूद करून ठेविली आहे. रणजितसिंग हत्तीच्या अंबारीत सर्वांसमक्ष स्त्रीसमागम करी म्हणून ज्याकूमो लिहितो. पुण्यात बाजीराव रघुनाथ ह्यांची घटकंचुकी सर्वप्रसिद्ध आहे. निवडक स्त्रीपुरुष रंगमहालात जमून स्त्रियांच्या चोळ्या एका घागरीत घालीत व ज्या पुरुषाला ज्या बाईची चोळी सापडे तिशी तो सर्वांदेखत रममाण होई. या पाशव खेळाला घटकंचुकी म्हणत. ही घटकंचुकी कर्नाटकात पाचपन्नास वर्षोंपूर्वी प्रघातात होती. घटकंचुकीत वडील, धाकुटे किंवा नाते हा भेद पाळीत नसत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. असो.)प्राचीन आर्ष समाजाच्या जोडीला प्राचीन शक, अर्वाचीन टाहीटियन व प्राचीन तामील लोकांना बसविता येईल. हिरोडोटस एस्किथियन (Skythian) म्हणजे शक लोकासंबंधाने लिहितो की, when one of them desires a woman, he suspends his quiver in front of his chariot and tranquility unites with her. (जेव्हा त्यापैकी कोणाला स्त्री-संभोगाची इच्छा होई तेव्हा ते आपला भाता रथाला लटकावून शांतपणे संभोग करीत). हाच इतिहासकार तामील लोकांसंबंधाने नमूद करतो की, They coupled as publicly as beasts. (ते जनावरांच्याइतक्याच उघडपणे संभोग करीत). तात्पर्य, प्राचीन शक किंवा तामील किंवा अर्वाचीन टाहीटियन लोकांची जी वन्यावस्था होती व आहे तीच निकृष्ट दशा प्राचीन आर्य लोकांची असलेली महाभारतावरून दिसते. ही रानटी चाल जसजशी मोडत गेली तसतसा तद्विरुद्ध धर्मही निर्माण होत गेला. मैथुन एकान्तात करावे, म्हणून शांतिपर्वाच्या १९३ व्या अध्यायात व इतर स्मृतिग्रंथांत मुद्दाम सांगितलेले आहे.

मद्र व वाहीक इत्यादी निंद्य देशांच्या प्रगतीला कर्ण प्रस्थल, गांधार, आरट्ट, खस, वसाति, सिंधुसौवीर, कारस्कर, माहिषक, कालिंग, केरल, कर्कोटक, वीरक या देशांनाही बसवितो. पैकी कारस्कर, माहिषक, केरल, कर्कोटक व वीरक हे दक्षिणेकडील देश आहेत. वीरक म्हणजे बहुशः करवीरक असावे. या निंद्य देशांची गणना येथेच संपली नाही. त्यात सुराष्ट्राचीही गणना कर्ण करतो. कर्णमते सुराष्ट्रांतील लोक संकरवृत्ति आहेत .(कर्ण-४५). देशांची नावनिशी संपविताना कर्ण म्लेंच्छ समाजांना विसरला नाही. तो म्हणतो, म्लेंच्छ मानवजातीला लांछन, औष्ट्रिक म्लेंच्छांना लांछन, षंढ औष्ट्रिकांना लांछन, आणि राजपुरोहित षंढांना लांछन (कर्ण-४५). म्लेंच्छ म्हणजे अस्पष्ट भाषा बोलणारे भारतवर्षातील व भारतबाह्य देशांतील लोक. हा म्लेंच्छसमाज कर्णकाली स्त्रीपुरुषसंबंधात अत्यंत अनाचारी होता. पाच हजार वर्षापूर्वीचा कर्णच तेवढा म्लेच्छांची निंदा करतो असे नाही, आधुनिक प्रवाश्यांनी, पुराणेतिहाससंशोधकांनी व प्राचीन ग्रीक व रोमन इतिहासकारांनी ह्या लोकांची अशीच वर्णने केलेली आहेत.

Yazidies, a sect of Arabs, unite in the darkness without heed as to adultery or incest (Letourneau 44) Justin and Tertullian tell that the Parthians and Persians married their own mothers. In ancient Persia, religion sanctified the union of a son with his mother,

[व्यभिचार किंवा आप्तसंबंध याचा विचार न करता याझीदी, अरबातील एक पंथ, अंधारात संभोग करतात (लिटोर्न्यू-४४). जस्टिन आणि टेर्ट्युलियन असे सांगतात की, पार्थियन आणि पर्शियन आपल्या स्वतःच्या आईशी विवाह करीत. जुन्या पर्शियात मुलगा आणि आई यांच्या विवाहाला धर्माने मान्यता दिली होती.]
ही वर्णनमाला आणीक हवी तितकी वाढविता येईल. "व्यभिचारियासी मल्याळ देश" म्हणून मुक्तेश्वर आपल्या भारतात मल्याळ ऊर्फ मलयदेशाची कुत्सा करतो वर्तमानकाळी महाराष्ट्रात कोल्हाटी म्हणून लोक आहेत, त्यांच्यातील स्त्रियांची व नीतीची पूर्ण फारकत असलेली आढळून येते. येणेप्रमाणे म्लेंच्छ लोकांच्या नीतीसंबंधाने सर्वसामान्य हकीकत आहे. पैकी कर्णाचा कटाक्ष, गंधार, मद्र या देशांच्या बाजूच्या म्लेंच्छ लोकांवर मुख्यतः असलेला दिसतो. सभापर्वात (अध्याय ३१) माहिष्मतीनगरीत स्त्रिया स्वच्छंद वागतात म्हणून वर्णन आहे. उत्तरकुरूंत, म्हणजे जेथून कौरवपांडव मूळ आले त्या देशात, स्त्रिया स्वच्छंदाने वागतात आणि नरनारींमध्ये तत्संबंधाने मत्सरबुद्धी वास करीत नाही, असे अनुशासन पर्वाच्या १०२ व्या अध्यायात वर्णन आहे.

[चिपेवे काही वेळेला आपल्या आयांच्या बरोबर व पुष्कळदा आपल्या भगिनी व मुली यांचे बरोबर संभोग करीत. कादिकांच्यात अनिर्बेध संभोग असे, भाऊ-बहिणींचा व बाप लेकींचा. कारीब एकाच वेळी आई आणि मुलगी यांचेशी विवाह करतात.आयर्लेंडचे जुने रहिवासी अनिर्बेधपणे आपले आया व बहिणी यांचेबरोबर विवाह करीत [लिटोर्न्यू-पृ. ६५-६६].

चिपेवे, कारीब वगैरे लोक रानटी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच दर्जाचे महाभारतात वर्णिलेले हे प्राचीन आर्ष लोक होते, असे म्हणावे लागते. आई, मुलगी, बहीण यांच्याशी व्यवाय करणारे असे लोक केवळ प्राचीन आर्षसमाजातच तेवढे होते असे समजू नये. खुद्द कौरवपांडवांच्या काली भारतवर्षात भारतीय म्हणून गणले जाणारे काही समाज प्राचीन आर्षसमाजाइतके किंवा त्यांच्याहूनही विचित्र होते. कर्णपर्वाच्या ४० पासून ४६ पर्यंतच्या अध्यायात कर्ण व शल्य हे एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढीत आहेत. त्यात शल्याला वाक्प्रहार करताना शल्याच्या राज्यातील जे आहीक, आरट्ट, पांचनद व भद्र देश तेथील लोकांच्या निंद्य-म्हणजे आर्यावर्तातील लोकांच्या दृष्टीने निंद्य-चालीसंबंधाने कर्ण म्हणतो, " शल्या, तुझ्या मद्र देशांत पिता, पुत्र, माता, सासू, सासरा, मामा, जावई, मुलगी, भाऊ, नातू व दुसरे बांधव, सोबती, पाहुणे व दासदासी ही सर्व सरमिसळ व्यवाय करतात. त्या देशातील स्त्रिया कोणत्याही पुरुषाशी स्वेच्छेने समागम करतात, मग ते पुरुष त्यांच्या ओळखीचे असोत नसोत. स्त्रिया भलतीसलती गाणी गातात. मद्रदेशाच्या सान्निध्याने गांधार देशातीलही चाली बिघडल्या. मद्र देशातील स्त्रिया दारू पितात व वस्त्रे टाकून नागव्या नाचतात. स्त्रिया उंट किंवा गाढव यांच्याप्रमाणे नैसर्गिक उत्सर्ग करतात. मद्र देशातील स्त्रियांपाशी कोणी मद्य मागितल्यास त्या कुले खाजवीत खाजवीत मद्य देणार नाही, वाटेल तर पति किंवा पुत्र देऊ म्हणून म्हणतात. वाहीक देशात जारज प्रजेचे प्रमाण अतिशय आहे. शूद्रांपासून अन्य स्त्रियांच्या ठायी झालेले ब्राह्मण तेथे आहेत. आरट्ट देशात, बहिणीच्या मुलांना वारसाहक्क प्राप्त होतो, पोटच्या पोरांना नाही. वाहिक देशात म्हणजे सध्याच्या:पंजाबात मनुष्य प्रथम ब्राह्मण बनतो, मग क्षत्रिय होतो, नंतर वैश्य होतो, मग शूद्र होतो, शेवटी नापित होतो, पुनः ब्राह्मण बनतो व ब्राह्मणाचा शेवटी गुलाम बनतो. मद्र देशातील कुमारिका निर्लज्ज व अनाचारी असतात. पांचन देशातील लोक कृतयुगांत सुद्धा अधर्माचरण करणारे ठरतील. या शेवटल्या वाक्याचा अर्थ असा की, कृतयुगात सबगोलंकार असल्यामुळे त्या काली सर्वच अधर्म होता; अशा अधर्मी युगातही पांचनद अधर्मी ठरतील. शेवटी कर्ण म्हणतो की, वाहीकलोक भुतलाला लांछन आहेत व मद्रस्त्रिया स्त्रीजातीला लांछन आहेत ! मद्रलोक गुरुपत्नीगमन व भ्रूणहत्या करतात असेही कर्ण म्हणतो. मद्र व वाहीक देशांची ही निंदा एकट्या कर्णानेच केली आहे असे समजू नये. शांतिपर्वाच्या ३२८ व्या अध्यायात नारद व्यासाला सांगतात की, पृथ्वीवर वाहीकलोकांचे वास्तव्य पृथ्वीला कमीपणा आणणारे आहे.

नमूद करून ठेविल्या आहेत, अज्ञानाने काहीतरी भोळसटपणा केलेला नाही. हर्यश्व व युवनाश्व असे दोघे भाऊ होते व या दोन भावांना एक बहीण होती. हर्यश्वाचा मुलगा जो यादववंशस्थापक यदु ह्याने आपल्या बापाच्या बहिणीच्या पाच मुलींशी शरीरसंबंध केला ( हरिवंश, अध्याय २३७ ). येथे आतेबहिणीशी संबंध झाला. वरील सर्व अवतरणांचा मथितार्थ असा की प्राचीन काळी आर्यंसमाजात सख्खी बहीण, चुलत बहीण, नात, सख्खी मुलगी व आतेबहीण यांच्याशी शरीरसंबंध आर्ष लोक करीत असत. यात बरेच नातगोत गोविले गेले हे खरे, परंतु ह्याहून आश्चर्यकारक चाली महाभारतात वर्णिल्या आहेत. महाभारताच्या आदिपर्वाच्या ४५ व ४६ या अध्यायांत अर्जुन व ऊर्वशी यांच्या भेटीचा वृत्तान्त दिला आहे. ऊर्वशी ही पौरववंशाची जननी आणि अर्जुन हा तिचा वंशज. असे असून भेटीच्या वेळी ऊर्वशीने अर्जुनाजवळ भोगयाचना केली ती अर्जुनाने फेटाळली; कारण अर्जुनाचा पूर्वज जो ऊर्वशीपती पुरूरवा त्याच्या काळच्या नीतींत व अर्जुनाच्या काळच्या नीतीत बहुत अंतर पडून प्रगती झाली होती. ऊर्वशी ही जुनाट स्त्री पुराणप्रिय असल्यामुळे ती पुरातन नीतीला अनुसरणारी होती. ती अर्जुनाला म्हणते, “ मला तू असा फेटाळू नको, पुरूच्या वंशातील आमचे जे पुत्र व पौत्र येथे इंद्रलोकी येतात ते आमच्याशी रमतात आणि त्यांना कोणी दोष देत नाहीत, तेव्हा तूही मजशी रमलास तर तुलाही त्यात काही दोष नाही." अशी पुरातन नीति यद्यपि ऊर्वशीने आपल्या वंशजाला सांगितली तत्रापि नीतिसुधारक अर्जुनाने ती मान्य केली नाही. तेव्हा संतप्त होऊन ऊर्वशीने अर्जुनाला शाप दिला की, तू माझा आदर केला नाहीस सबब वर्षभर षंढ होशील. हे उदाहरण मातृगमनाचे किंवा मातामहीगमनाचे किंवा प्रमातामहीगमनाचे, असे वाटेल त्याचे समजावे; कारण, अर्जुन हा इंद्राचा मुलगा व ऊर्वशी ही इंद्राची भोग्य अप्सरा, या दृष्टीने ऊर्वशी अर्जुनाची माता ठरते; आणि अर्जुनाचा पूर्वज जो पुरूरवा त्याची स्त्री म्हणून प्रमातामही ठरते. तात्पर्य मात्रागमनाची चाल पुरातन भारतीयात होती. त्या काली माता, पिता, भाऊ, बहीण, नात, मुलगी, चुलतबहीण, आतेबहीण वगैरे नाती उत्पन्न झालेली नव्हती. यावरून अत्यंत पुरातन भारतीय पूर्वज किती रानटी स्थितीत होते त्याचा वर्तमानकालीन कित्येक रानटी समाजांशी तुलना करिता, अंदाज करता येतो.

The Chippeways frequently cohabit with their mothers and oftener still with their sisters and daughters. Kadiaks unite indiscriminately, brothers with sisters and parents with children. The Caribs married at the same time a mother and a daughter. The ancient Irish married, without distinction, their mothers and sisters (Letourneau, page 65-66 ).

(४) वर जी ही भारतीय, हरिवंशीय, वैदिक व स्मार्त शरीरसंबंधक उदाहरणे नमूद केली ती सर्व एका स्त्रीशी एकाच बापाचा किंवा भावाचा शरीरसंबंध दाखविण्यापुरवी झाली. अनेक सपिंड पुरुषांचा एकाच सपिंड स्त्रीशी संबंध दाखविणारी वाक्येही इतिहासातून सापडतात. हरिवंशाच्या दुस-या अध्यायात असे लिहिले आहे की, दहा प्रचेत्यांनी व त्यांचा पुत्र सोम याने सोमाची मुलगी जी मारिषा तिचे ठायी आपापली तेजे घालून दक्ष प्रजापति निर्माण केला. पितृदुहितृसंबंधाचे तर हे उदाहरण आहेच. शिवाय आजा व नात यांचा संबंध या उदाहरणात दाखविला आहे, इतकेच नव्हे तर दहा आजे व एक बाप यांचा संबंध बापाच्या मुलीशी झाल्याचे लिहिले आहे. याच अध्यायात पुढे असे वर्णन आहे की सोमाचा मुलगा किंवा दौहित्र जो दक्ष प्रजापति त्याने आपल्या सत्तावीस मुली आपला बाप किंवा आजा जो सोम त्यास प्रजोत्पादनार्थ दिल्या. येथेही आजाचा व नातींचा शरीरसंबंध झाल्याचा दाखला मिळतो. हरिवंशाच्या तिस-या अध्यायात असे नमूद केले आहे की ब्रम्हदेवाचा पुत्र दक्ष याने आपली मुलगी ब्रम्हदेवाला दिली व तिजपासून प्रसिद्ध नारद झाला. हाही संबंध वरच्याच वर्गातला आहे. हे विचित्र संबंध वर्णिलेले, आणि तेही इतिहासकार व्यासांनी व वैशंपायनांनी वर्णिलेले ऐकून, सध्या आपल्याला जे आश्चर्य वाटते तेच आश्चर्य जनमेजय राजाला पाच हजार वर्षापूर्वी वाटले आणि आपण जो प्रश्न करू तोच जनमेजयाने वैशंपायनांना केला. जनमेजय विचारतो की, वैशंपायन हो ! हे असले अधर्म्य संबंध झालेले आपण इतिहास म्हणून वर्णिता याचा अर्थ काय ? जेव्हा जनमेजयाचे वैशंपायनांनी असे समाधान केले की पूर्वयुगी हे असले संबंध होणे हाच धर्म ऊर्फ समाजरूढी सर्वमान्य होती. वर्तमानकाली समाजशास्त्रदृष्ट्या आपण जे उत्तर देऊ तेच उत्तर वैशंपायनांनी दिले. वैशंपायनाला, भीष्माला व व्यासाला पूर्व इतिहास म्हणून या कथा परंपरेने माहीत होत्या व पुरातन इतिहास म्हणून त्यांनी त्या ज्ञानतः

पित्याच्या घरात राहून विधियुक्त विवाह न होता कन्येला तुल्य जातीच्या पुरुषाकडून जो पुत्र होईल तो पुत्र त्या कन्येच्या बापाची म्हणजे मातामहाचा शास्त्र म्हणजे रूढा समजते. त्या पुत्राने पिंड द्यावे व धनाचा उपभोग घ्यावा. येथे समाजशास्त्रदृष्ट्या असा प्रश्न उद्भवतो की तुल्य जातीच्या परपुरुषाकडून लग्न न झालेल्या स्वकन्येच्या ठायी जो पुत्र उत्पादन केला तो पुत्र त्या कन्येच्या बापाची काय म्हणून शास्त्र किंवा रूढी ठरवी ? तो कानीन मुलगा ज्या परपुरुषाकडून झाला त्याचा वास्तविक ठरावा व आपल्या आज्याचा म्हणजे. आईच्या बापाचा नातू ठरावा. परंतु कानीन मुलगा परपुरुषाचाही न ठरता किंवा आज्याचा नातूही न ठरता, आज्याचा धर्मोत्पादित पुत्र ठरे व त्या पुत्राची प्रत्यक्ष आई त्याची बहीण ठरे. ह्या चमत्कारिक चालीचा अर्थ काय ? समाजात ही समजत व रूढी व हा धर्म काय म्हणून मान्य झाला? सध्याच्या आपल्या समाजात असा प्रकार निंद्य समजला जाईल. परंतु वसिष्ठसंहिताकाली तो अधर्म्य व निंद्य समजला जात नसे. ह्याचे कारण काय ? ह्याचे कारण एकच आहे आणि ते हे की वसिष्ठकालीन समाज अशा एका पुरातन समाजाचा वंशज होता की ज्या समाजात पिता आपल्या स्वतःच्या कन्येच्या ठायी संतती उत्पन्न करी. सर्वच समाजात ही चाल त्या पुरातनकाली प्रचलित असल्याकारणाने कोणी कोणाला नावे ठेवीत नसत. म्हणजे त्या चालीला अधर्म्य व निंद्य समजत नसत. वसिष्ठोत्तर मन्वादिसंहिताकाराना व मन्वादिसंहिताकालीन आर्यसमाजांना स्वकन्येच्या ठायी परपुरुषाकडून झालेल्या मुलाला कन्येच्या बापाने आपला मुलगा म्हणावा ही चाल अप्रशस्त व अस्वाभाविक वाटून त्या कानीन मुलाचे पितृत्व उत्पादक परपुरुषाकडे किंवा कन्येच्या भावी पतीकडे येणे प्रशस्त वाटलेले उत्तरकालीन स्मृतिग्रंथातून नमूद केलेले आहे. त्या नमूदीचा प्रपंच प्रस्तुत प्रकरणाचा विषय नसल्यामुळे, तत्संबंधाने जास्त लिहिण्याचे येथे प्रयोजन नाही. येणेप्रमाणे अतिप्राचीन आर्यसमाजात पितृदुहितृशरीरसंबंध एका काली प्रचलित होता हे विधान स्मृतिग्रंथातील वचनांनीही सिद्ध होत आहे. एकूण इतिहास, वेद व स्मृती, किंवा इतिहास, श्रुती व स्मृती या तिहीतील वचनांचा आधार या चालीच्या अस्तित्वाची सिद्धी करण्यास उपलब्ध आहेत. सबब, प्राचीन आर्यलोकात ही चाल प्रचलित होती या विधानाच्या पोषणार्थ जास्ते पुरावे गोळा करण्याची किंचिन्मात्रही आवश्यकता राहिली नाही.

(३) हरिवंशाच्या दुस-या अध्यायात वर्णन आहे की वसिष्ठ प्रजापतीची मुलगी शतरूपा ही वयात आल्यावर आपला पिता जो वसिष्ठ त्याच्याशी पत्नीभावाने राहिली. तसेच ह्याच ग्रंथाच्या दहाव्या अध्यायात असे विधान केले आहे की मनूने आपली मुलगी इला इजशी शरीरसंबंध केला. त्याचप्रमाणे इतिहासाच्या सत्ताविसाव्या अध्यायात असे लिहिले आहे की जन्हूची मुलगी जी जान्हवी गंगा हिने आपला बाप जन्हू यालाच आपला पती केले. ह्या तीन ऐतिहासिक उदाहरणांचा अर्थ असा की बाप आणि त्याच्या पोटची मुलगी यांचा शरीरसंबंध अतिप्राचीन आर्ष काली होत असे व तो तत्कालीन समाजमान्य असल्यामुळे निंद्य किंवा गर्ह्य मानला जात नसे. ही ऐतिहासिक विधाने निव्वळ भाकडकथा आहेत किंवा वास्तविक घडलेली वृत्ते आहेत या बाबींचा पडताळा व पाहण्याची इतर साधने उपलब्ध आहेत. ऋग्वैदिक अशी एक समजूत सर्वमान्य आहे की सूर्याची दुहिता जी उषा ऊर्फ सरण्यू तीच सूर्याची भार्या होती. यास्कृकृत निरुक्तांच्या पाचव्या अध्यायाच्या सहाव्या खंडात उषाः सूर्यो वृषाकपायी सरण्यूः ही चार उषस्ची नावे दिलेली आहेत.
प्रजापति र्वै स्वां दुहितर मध्यायत् । (ऐ. ब्रा. पं. ३ अ. ३ खंड ३३)
ह्या ऐतरेय ब्राह्मणवचनांत हाच अर्थ स्पष्ट सांगितला आहे. पितृदुहितृसंबंधाचा हा वैदिक पुरावा झाला. स्मृतिग्रंथातही ह्या चालींची म्हणजे बापाचा स्वत:च्या मुलीशी संबंध होण्याची ज्ञापके आढळतात. वसिष्ठसंहिता ही एक जुनाटातली संहिता म्हणजे स्मृतिग्रंथ समजतात. ह्या संहितेत कानीन म्हणून ज्याला म्हणतात त्या पुत्रासंबंधाने खालील वाक्ये आली आहेतः
" कानीनः पंचमः । या पितृगृहे
असंस्कृता कामादुत्पादयेत्
मातामहस्य पुत्रो भवतीत्याहुः ।
।। अथाप्युदाहरंति ।।
अप्रत्ता दुहिता यस्य पुत्रं विंदति ,तुल्यतः ।।
पुत्री मातामहस्तेन दद्यात्पिंडं हरेद्धनं ।।१।।