Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
४. कुटुंबात मातृप्राधान्य जाऊन पितृप्रधान्य यावयाला यद्यपि पराकाष्ठेचे प्रयास पडले, तत्रापि आर्य लोकांत प्रजापतिकाली पितृप्राधान्याची जी एकदा स्थापना काही टोळ्यात झाली तिची उपयुक्तता समाजाच्या ध्यानात उत्तरोत्तर जास्त जास्त येऊन ती संस्था कालांतराने आर्य लोकांत प्रथम शिष्टमान्य, नंतर बहुजनमान्य आणि शेवटी धर्ममान्य होऊन बसली. अशा काळी-म्हणजे पितृप्राधान्य बहुतेक पूर्णपणे स्थापित झाल्याच्या काळी-महाभारतनामक इतिहासाचा कर्ता जो व्यास नामक कोणी पुरुष जो शकपूर्व चौथ्या पाचव्या शतकाच्या सुमारास होऊन गेला असावा, त्याला भारतीय इतिहास रचण्याची आवश्यकता जेव्हा भासली तेव्हा त्याच्यापुढे असा प्रश्न पहिल्या प्रथम येऊन उभा राहिला की, भारतीय इतिहासाचा प्रारंभ कोठून करावा ? अतिप्राचीन सरमिसळ समागमाच्या काळापासून करावा की मातृप्रधान कुटुंबसंस्थेच्या काळापासून करावा, की पितृप्रधान जी प्रजापतिसंस्था तिच्या काळापासून करावा ? प्रथमपक्षी म्हणजे सरमिसळ समागमाच्या काळापासून इतिहासाचा प्रारंभ करावा म्हटले तर कोण कोणाचा कोण हेच ओळखण्याची तत्कालीन समाजसंबंधाने अडचण पडू लागली. सबब तेथून इतिहासाचा प्रारंभ करणे अव्यवहार्य दिसले. द्वितीयपक्षी म्हणजे मातृप्रधान कुटुंबसंस्थेच्या काळापासून इतिहासकथनास प्रारंभ करता आला नसता असे नाही; परंतु मातृप्रधान कुटुंबात यद्यपि भाऊ, बहीण, आई व मामा ही चार नाती स्पष्ट दिसत होती तत्रापि बापाचा पत्ता अद्याप लागला नव्हता, त्यामुळे एकापुढे एक वंश सांगण्याची पंचाईत पडू लागली. तेव्हा, दुसराही पक्ष ह्या इतिहासकाराने सोडून दिला. शिल्लक राहिला तिसरा पक्ष पितृप्रधान कुटुंबसंस्थेचा. ह्या संस्थेच्या काळापासून वंशपरंपरा जिला म्हणतात ती समाजात ठळकपणे उमटलेली दिसत होती. पणजा, आजा, बाप, मुलगा, नातू, पणतू अशी एकाला एक लागून वंशपरंपरा स्पष्ट ओळखता येत असल्यामुळे इतिहासरचनेचे कार्य सुरळीत भासले आणि म्हणूनच व्यासांनी प्रजापतिसंस्थेपासून भारतेतिहासाचा आदि केला आहे. मरीचि, अंगिरस, अत्रि, पुलस्त्य, पुलह, ऋतु, वशिष्ठ हे सहा किंवा सात प्रजापती, व्यासांच्या इतिहासदृष्टीने सर्व सृष्टीचे उत्पादक होत. यांच्यापासून देव, दानव, राक्षस, किन्नर, यक्ष, गंधर्व, अप्सरा, मानव, पशू, पक्षी, वृक्ष, नद्या व पर्वत उत्पन्न झाले असे व्यासांचे मत होते. याच्यापूर्वी काय होते ते व्यासांना माहीत नाही. फक्त याच्या पूर्वी ब्रह्मदेव होता व त्याने मरीच्यादी सहा किंवा सात प्रजापती केवळ मनःसंकल्पाने उत्पन्न केले. ह्या मरीच्यादींना व्यास ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून म्हणतो.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
उपनिषत्कालानंतर पाणिनीचा काल आला, अपत्यार्थक प्रत्ययमीमांसा करताना पीलाया वा (४-१-११८) या सूत्राने पीलाया अपत्यं पैलः, पैलेयः या मातृनामजन्य अपत्यनामांचा विशिष्ट सूत्र देऊन पाणिनी उल्लेख करतो. व्द्यचः (४-१-१२१) या सूत्राने दत्ताया अपत्यं दात्तेयः असे अपत्यनाम सिद्ध होते. या दात्तेय नामक लौकिक गोत्रनामावरून म्हणजे अपत्यनामावरून कोकणस्थातील दाते हे आडनाव निघालेले आहे. पैल, पैलेय, दात्तेय ह्या अपत्यनामावरून स्पष्ट होते की, पाणिनिकाली मातृनामावरून अपत्यानामे थोडी बहुत प्रचलित होत असत. पाणिनीय अपत्याधिकारात बहुतेक लौकिक गोत्रप्रवर्तकांची नावे पुरुषांची आहेत; परंतु त्यात पीला, दत्ता वगैरे स्त्रीनामे अपवादादाखल तरी सापडतात. म्हणजे पाणिनिकाली काही कुटुंबे बहुपतिक असावी व त्यात अर्थातच मातृनामावरून अपत्यनाम बनविण्याची चाल अगितकत्वास्तव प्रचलित असावी. पाणिनीनंतर शतवाहनांचा काल येतो. वासिष्ठीपुत्र, गौतमीपुत्र इत्यादी मातृनामजन्य अपत्यनामे शातवाहन राजकुलात प्रचलित असलेली सर्वांच्या ओळखीची आहेत. ही मातृनामजन्य अपत्यनामे गमतीखातर ठेविली असतील हे संभवत नाही. शातवाहनकुल आंध्रजातीय व आंध्र-भृत्य होते आणि आंध्र लोकात बहुपतिकत्वाची चाल एका काळी होती याविषयी वाद नाही. शातवाहनांच्या नंतर मातृनामावरून अपत्यनाम पडल्याचा ठळक असा उल्लेख म्हटला म्हणजे भवभूतीने केलेला जातुकर्णीपुत्राचा. जातुकर्णीपुत्र म्हणजे जातुकर्णी स्त्रीचा पुत्र. जातुकर्णीच्या नव-याच्या नावावरून जातुकर्णीच्या पोटी झालेल्या पुत्राचे नाव पडलेले नसून, स्वतः खुद्द जातुकर्णीच्या नावावरून ते पडलेले आहे, ही बाब लक्ष्य आहे. असो. भवभूतीपर्यंत स्त्रिया क्वचित् अपत्यनामप्रवर्तक असत, एवढे यावरून निश्चित आहे. तात्पर्य, अतिप्राचीन आर्यकालीन मातृनामोत्पन्न अपत्यनामे ठेवण्याची चाल हजारो वर्षे या देशात प्रचलित होती, व ती निखालस निर्मूलित व्हावयास आपला हा सध्याचा काल लागला. ह्यावरून प्राचीन काली मातृप्राधान्य जाऊन कुटुंबात पितृप्राधान्य यावयास किती प्रयास पडले असतील व प्रजापतिसंस्था म्हणजे एकपतित्वाची संस्था प्रचलित व्हावयास किती अडचणी आल्या असतील त्याचा अंदाज होण्यासारखा आहे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
असो. अशा त-हेने प्राचीन आर्ष लोकांत दोन प्रकारची कुटुंबे जन्मास आली. एकात अनेक बहिणी एका भावाला पती म्हणून राहू लागल्या व दुस-यात अनेक भाऊ एका बहिणीला पत्नी म्हणून राहू लागले. पहिल्याला बहुपत्नीक अशी संज्ञा सोईखातर देऊ व दुस-याला बहुपतीक अशी संज्ञा देऊ. पैकी दुस-या प्रकारच्या कुटुंबात मुलाचा बाप अमुकच अशी निश्चिती नसल्यामुळे मुलाला नाव आईवरून मिळे, आणि पहिल्या प्रकारच्या कुटुंबात पती एकच असल्यामुळे, मुलाच्या बापाचा निश्चय यद्यपि संशयित नसे, तत्रापि जुनी चाल म्हणून बराच कालपर्यंत आयांच्या नावावरून मुलांचे नामकरण होई. ह्या दुस-या प्रकारात मागे दिलेली आदितेय, वैनतेय, दैतेय इत्यादी नावे पडतात. अदिति, दिति, कद्रू इत्यादी यद्यपि कश्यप प्रजापतीच्या स्त्रिया होत्या, व मुलांच्या बापासंबंधाने यद्यपि कोणत्याही प्रकारची अनिश्चितता नव्हती. तत्रापि पुरातन रूढीला अनुसरून कश्यपबीजाने अदितीच्या पोटी झालेल्या प्रजेला आदितेय किंवा आदित्य असे नाव आईच्या नावावरून पडले, म्हणजे वंश माता जी अदिति तिच्या नावाने प्रख्यात झाला, बाप जो कश्यप त्याच्या नावाने झाला नाही. ह्याचा अर्थ असा की, माता जी अदि ति कुटुंबात प्रधान गणली गेली, पिता जो कश्यप त्याला पूर्ण गौणत्व दिले गेले. पित्याला गौणत्व कां मिळाले त्याला सबळ कारण आहे. प्रजापति संस्था म्हणजे एकपतित्वाची संस्था आर्य लोकांत जी सुरू झाली ती येथून तेथून सा-या आर्य लोकांत एकदम सुरू झाली नाही. आर्य लोकांतील काही थोड्या टोळ्यांमध्ये सुरू झाली. बाकीच्या ब-याच टोळ्यांत बहुपतित्वाची चाल जय्यत प्रचलित होती, व जुनी म्हणून पुराणप्रिय आर्यांनी ती बहुतकालपर्यंत सोडली नाही. आर्य लोकांत बहुजनसंमत अशी जी ही बहुपतिकत्वाची चाल तिच्या अमलात अपत्यनामे मातृनामावरून ठेवण्याखेरीज गत्यंतर नव्हते. त्यामुळे बहुजनसमाजात मातृनामोत्पन्न अपत्यनामांची संख्या इतकी बेसुमार अधिकतर होती की, त्यांच्या बहुसंख्येपुढे पितृनामोत्पन्न अपत्यनामांची डाळ शिजवायला बहुत प्रयास पडले असावेत. प्रयास किती पडले असतील त्याचा अंदाज करावयास काही प्रमाणे देतो. अतिप्राचीन आर्यकाळ व कौरव-पांडवांचा काळ यामध्ये काळाचे बरेच अंतर आहे. तथापि आर्य लोकांतील कित्येक समाजात मातृनामोत्पन्न अपत्यनामांची रेलचेल असलेली भारतेतिहासावरून दृष्टीस येते. कौतेय, पार्थ, राधेय, गांगेय, सौभद्र, माद्रेय, द्रौपदेय इत्यादी पांडव कुळातील व्यक्तींची नावे मातृनामोत्पन्न आहेत. कृष्णाला देवकीनंदन हे नाव वासुदेव या नावाचा अपरपर्याय म्हणून दिलेले वारंवार आढळते. प्रजापतिसंस्था निर्माण होऊन हजारो वर्षे लोटल्यावर झालेल्या पांडवांच्या काळची ही कथा; मग खुद्द प्रजापतिसंस्था म्हणजे एकपतित्वाची संस्था ज्या पुरातन काळी निर्माण झाली त्या काली मातृनामजन्म अपत्यनामे सर्वत्र प्रचलित असल्यास व त्यांच्या पुढे पितृनामजन्य अपत्यनामाचा टिकाव न लागल्यास नवल कसले ? पांडवकालानंतर उपनिषदादी ग्रंथात, गुरुपरंपरेचे ब्राह्मणाचे वंश दिलेले आहेत. त्यात मातृनामजन्य अनेक नामे नमूद करून ठेविली आहेत. ती सर्वांच्या परिचयाची असल्यामुळे, त्यांनी येथे जागा अडवीत नाही. त्यावरून एवढे मात्र स्पष्ट होते की, पांडवांच्या पुढील काळात स्त्रिया गोत्रप्रवर्तक ऊर्फ अपत्यनामप्रवर्तक असत व त्या ब्राह्मणात असत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
३. सादर भगिनीनी सोदर भ्रात्यांच्या समागमाने स्वतंत्र कुटुंबसंस्था स्थापिल्यावर त्याही संस्थेत पुढे फेरफार झाले. सा-याच बहिणीना सारेच
भाऊ किंवा सा-याच भावांना सा-याच बहिणी सारख्याच आवडत असतील असे नाही. आवडनिवड रूपामुळे, स्वभावामुळे व कामसूपणामुळे व्हावयाला लागून, इतर भावांहून सर्वतोप्रकारे श्रेष्ठ अशा एखाद्या भावावर ब-याच बहिणींचे मन बसून, त्यांनी त्या एकाच्याच समागमात कुटुंबसंस्था चालविण्याचा संकेत केला. अशा स्थितीत स्वस्त्रीय बहुपत्नीक व एकपतिक कुटुंबसंस्था निर्माण झाली. याची ठळक उदाहरणे म्हटली म्हणजे दक्षाच्या साठ कन्यांची. ह्या साठांपैकी काहींनी धर्माशी, काहींनी सोमाशी, काहींनी कश्यपाशी पत्नीभावाने राहण्याचे पत्करले. अशा त-हेने बहुपत्नीक व एकपतिक कुटुंब अस्तित्वात आले. पक्षी इतर बहिणीहून गुणांनी सर्वतोप्रकारे श्रेष्ठ अशा एखाद्या बहिणीवर ब-याच भावांचे मन जाऊन, त्या भावानी त्या एकाच अप्रतिम बहिणीच्या समागमात राहून कुटुंब चालविण्याचा इरादा केला. अशा स्थितीत एकपत्नीक व बहुपतिक कुटुंब ज्याला म्हणतात ते निर्माण झाले. याचे ठळक उदाहरण म्हटले म्हणजे हरिवंशाच्या दुस-या अध्यायात वर्णिलेले प्रचेतसू बंधूंचे. ह्या दहा प्रचेतसू भ्रात्यांनी मारिषा नामक वृक्ष-कन्येशी समागम केला व त्या समागमापासून दक्षप्रजापति जन्मास आला. ह्या दोन प्रकारच्या कुटुंब संस्था निर्माण व्हावयाला इतरही कारणे झालेली असतील. इतर जमावांशी लढाई करताना यूथातील बरेच पुरुष मरून गेल्यास, राहिलेल्या एखाद्याशीच पत्नीभावाने राहण्याचा प्रसंग येऊन एकपतिक व बहुपत्नीक कुटुंब बनण्याचा संभव आहे. तसेच लढायांत स्त्रिया इतर यूथांनी पाडाव केला गेल्यास राहिलेल्या एखादीशीच संसार करण्याचे कपाळी येऊन बहुपतिक व एकपत्नीक कुटुंब घडले जाण्याचा संभव आहे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
येथे असा प्रश्न उद्भवतो की, दक्षाने ज्या पुरुषांना आपल्या कन्या दिल्या, ते पुरुष एकंदर सात होते, तर त्या सातांना कन्यांचा सारखा विभाग करून कां दिला नाही ? कोणाला दोन दोन, कोणाला चार, कोणाला तेरा, कोणाला सत्तावीस असा विषम विभाग कां केला ? ह्या प्रश्नाला समर्पक व समाधानकारक असे सर्वात उत्तम उत्तर एकच संभवते, ते हे की यूथांतील सोदर बहिणी बहिणी ज्या मुली होत्या त्या सोदरत्वास्तव बद्ध मायेने झालेल्या असल्यामुळे त्यांचा संसार एकाच कुटुंबात झाला असता सर्वांच्या मनाजोगता होईल असा कयास करून दक्षाने ही विषम वाटणी केली. तात्पर्य, सांगावयाचा मुद्दा एवढाच की, यूथातून विभक्त होऊन स्वतंत्र कुटुंबस्थापना जी प्रथम झाली ती सोदर बहिणींच्या हस्ते झाली. यूथातील सर्व अपत्ये यूथातील सर्व स्त्रियांची समजण्याचा जो पूर्वीचा प्रघात होता, तोच प्रघात सोदर बहिणींच्या कुटुंबात काही काळ चालू होता. याला पोषक प्रमाण कृत्तिकांचे. कार्तिकेय जो षडानन तो ह्या सात कृत्तिका बहिणींचा सामायिक मुलगा म्हणून वर्णन केलेले आहे. हे सामायिकत्व पुढे कालांतराने नष्ट होऊन अपत्यांची मालकी त्या बहिणींची वैयक्तिक झाली. यूथावस्थ समाज असताना त्या समाजात बहुपतित्व व बहुपत्नीत्व असे दोन्ही प्रकार स्त्री-पुरुषसंबंधाचे असत. यूथातून सोदर बहिणी विभक्त झाल्यावर त्यांनी जे कुटुंब स्थापिले त्यांत सोदर भगिन्यात्मक बहुपत्नीत्व होते हे सांगावयाला नकोच. हे भगिन्यात्मक बहुपत्नीक कुटुंब मात्रात्मक बहुपतिकही होते; कारण यूथात एकाच समयी बहुपत्नीत्व व बहुपतित्व जसे विद्यमान असे, तसेच यूथातून विभक्त होणा-या सोदर बहिणींच्या स्वतंत्र कुटुंबातही बहुपत्नीकत्व व बहुपतिकत्व असे. यूथात ज्या चाली होत्या त्याच चाली सोदर बहिणींच्या स्वतंत्र कुटुंबात दृष्टीस पडल्यास नवल नाही. पुरातन चाली एकदम नाहीशा होत नाहीत, आस्ते आस्ते नाहीशा होतात, व बहुतकालपर्यंत व कधीकधी तर वर्तमानकाळपर्यंत आपले अवशेष अशांशाने मागे ठेवतात. इतकेच की, ह्या अंशाशाने मागे राहिलेल्या चाली इतर चालींच्या दडपणाखाली गुदमरून गेलेल्या असतात.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
आयांवरून मुलांना व्यावर्तक नाव ठेवण्याची आवश्यकता ज्या काली भासू लागली त्या काली मूळच्या सरमिसळ समाजात एक क्रांती घडून आली. सर्व मुले यूथातील सर्व स्त्रियांची सामायिक समजण्याची चाल मागे पडून अमुक मूल अमुक स्त्रीचे असे वैशिष्ट्यीकरण सुरू झाले, सामायिक मातृत्व जाऊन वैयक्तिक मातृत्व उदयास आले. मायिक यूथात ऊर्फ कळपात अपत्यांच्या माता ज्या स्त्रिया त्यांच्या करवी प्रथम अस्पष्ट विभाजन प्रचलित झाले. आई व तिची अपत्ये हे अस्पष्ट कुटुंब झाले. यूथातील प्रजननक्षम अशा सर्व स्त्रियांची अशी अस्पष्ट कुटुंबे झाली. अद्याप ही सर्व कुटुंबे पृथक् पृथक् विभक्त होऊन एकापासून दूर राहूं लागली नव्हती. सर्व कुटुंबे यूथातच असत. स्त्रियांशी समागम यूथातील वाटेल तो पुरुष करीतच असे. पुढे स्त्रिया-स्त्रियांत आपापल्या अपत्यांच्या जोपासनेसंबंधाने व इतर अशा मायेच्या कारणांनी बेबनाव वाढून स्त्रिया आपापल्या मुलांबाळांसह स्वतंत्र झोपडी करून स्वतंत्र संसार थाटू लागल्या. तथापि यूथातील वाटेल त्या पुरुषांशी स्वतंत्र कुटुंबातील स्त्रियांचा संबंध चालूच असे. पुरुषांनी मृगया करावी. रानावनातून श्वापदे मारून आणावी व ती कुटुंबस्थापक स्त्रियांच्या हवाली करून स्त्रिया तयार करतील ते अन्न खाऊन खुशाल असावे असा मनू सुरू झाला. ह्या स्वतंत्र कुटुंबे स्थापन करणा-या स्त्रिया प्रथम प्रथम एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या सोदर बहिणी बहिणी असत. सामायिक यूथसंस्था फोडून विभक्त कुटुंबसंस्था जी प्रथम उदयास आली ती यूथातील सोदर बहिणींच्या हस्ते उदयास आली या विधानाला पोषक असे प्रमाण भारत व हरिवंश यातील संभवपर्वात ठळक असे सापडते. दक्षाला ज्या साठ कन्या झाल्या (हरिवंश अध्याय ३) त्यापैकी दहा कन्या त्याने धर्म ऋषीला दिल्या, तेरा कश्यपाला दिल्या, सत्तावीस सोमाला दिल्या, चार अरिष्टनेमीला दिल्या, आणि दोन दोन भृगु, आंगिरस आणि कृशाश्व यांना प्रत्येकी दिल्या.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
मातृनाम अपत्यनाम
अदिति आदित्येयाः आदित्याः
दिति दैत्याः दैतेयाः
कृत्तिका कार्तिकेयः
दनु दानवः
कद्रू काद्रवेयाः
विनता वैनतेयः
काला कालेयाः
निर्ऋति नैऋत्येयाः
सिंहिका सैहिकेयाः
पुलोमन् पौलोमाः
कालका कालकेयाः
वसु वासवः वसवः
साध्या साध्य
विश्व विश्व
मरुत्मती मरुत्मतः
भानुः भानवः
मुहूर्ता मुहूर्ताः
यापैकी एकही अपत्यनाम प्रजापतींच्या नांवापासून झालेले नाही. एकोनएक नावे आयांच्या नावावरून पडलेली आहेत. याचा अर्थ असा की, आर्यसमाजात प्रजापतिसंस्था स्थापन होण्यापूर्वी अपत्ये स्त्रियांच्या नावाने ओळखिली जात, म्हणजे प्रजापती निर्माण होण्याच्या पूर्वी वंशावतरण स्त्रियांच्या अधीन असे, पुरुषांच्या नसे. म्हणजे स्त्रिया वंशप्रवर्तक असत, पुरुष नसत हे वंशप्रवर्तकत्व स्त्रियांना कसे मिळत गेले ते पाहणे मोठे मनोरंजक आहे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
या यूवावस्थेकाली मुलांची नावे त्या त्या कळपाच्या नावावरून पडत. कळपावरून पडलेल्या या नावांना यूथनामे अशी संज्ञा आहे. यूथनामांनाच पुढे किंचित् फरकाने गोत्रनामे ही संज्ञा मिळाली. मूल कोठले असे विचारल्यास ते अमुक अमुक यूथातले ऊर्फ कळपातले असे सांगण्याचा रिवाज असे. समजा की, एखाद्या यूथाचे नाव कदंब असले तर त्यातील सर्व मुलांना कादंब हे यूथनाम मिळे, कादंब म्हणजे कदंबाचा. मराठीत चा प्रत्यय शब्दाच्या शेवटी लावून आपण व्यवहार करतो. प्राचीन काळी मूळ शब्दाच्या आद्य स्वराची वृद्धी करून म्हणजे आद्यस्वरापूर्वी आ हा आगम करून तोच अर्थ प्रदर्शित करीत. कळपांतील सर्व मुलांना यूथनाम एकच असे. त्यावरून मूल अमुक कळपातले एवढाच बोध होई. एक मूल दुस-या मुलापासून निवडून काढण्याला हे यूथनाम उपयोगी पडत नसे. सबब दुसरे एक नाव मुलाचे अन्यव्यक्तिव्यावर्तक ठेवीत. ते नाव बापाच्या म्हणजे पुरुषाच्या नावावरून ठेवीत नसत; कारण की, अमुक मुलाचा अमुकच बाप असा निश्चय सरमिसळ व्यवायामुळे करता येत नसे, परंतु अमुक मूल अमुक स्त्रीच्या पोटी जन्मले हे निश्चित असल्यामुळे आईवरून मुलाला अन्य व्यावर्तक नाव मिळे. जसे ममता या स्त्रीच्या मुलाला मामतेय, विनता या स्त्रीच्या मुलाला वैनतेय इत्यादी. संभवपर्वात व हरिवंशाच्या पहिल्या तीन अध्यायात प्रजापतीच्या संततीचे वर्णन व्यास करीत आहेत खरे, परंतु प्रजापतीच्या संततीची नावे जी व्यासांनी परंपरागत पुराणावरून दिली आहेत, ती सर्वं आयांच्या नावावरून पडलेली नावे आहेत. आयांच्या म्हणजे प्रजापतींच्या स्त्रियांच्या नावावरून पडलेल्या ह्या नावांची एक यादीच देतो.
महिकावती (माहीम)ची बखर
३५. दमण पासून मुंबई पर्यंतच्या व समुद्रा पासून सह्याद्रिपर्यंतच्या टापूंतील मांगेले, वारली, कोळी, ठाकर, कातवडी, वगैरेंच्या प्रांतांतील नद्या, डोंगर व गांवें ह्यांचीं नांवें पहातां तीं सर्व संस्कृतोत्पन्न आहेत. हीं नांवें वारली वगैरे लोकांनीं वसाहत करतांना दिलीं असावीं हें एक, किंवा ब्राह्मणादि लोकांनीं दिलीं असावीं हें दुसरें. पैकीं वारल्यांच्या व डोंगरी कोळ्यांच्या प्रांतांत ब्राह्मण व मराठे यांची वसती सध्यां तर मुळींच नाहीं व पूर्वी हि थोडी देखील असेल असें म्हणवत नाहीं. औषधाला एखाददुसरा ब्राह्मण किंवा मराठा ह्या प्रदेशांत प्राचीन काळीं असल्यास असेल. तेव्हां नद्या, डोंगर व गांवें ह्यांना संस्कृत नांवें मूळ दिलीं कोणी हा प्रश्न उद्भवतो. उदाहरणार्थ, कांहीं नांवें येथें देतों:-
(नद्यांची नावें वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
इत्यादि आणीक पांच शें गांवांची यादी देतां येईल. कान्हेरी हें डोंगराचें नांव कृष्णगिरि ह्या संस्कृत शब्दा पासून निघालेलें सर्वांच्या परिचयाचें आहे. तात्पर्य नदीनामें, ग्रामनामें व पर्वतनामें येथूनतेथून सर्व संस्कृत किंवा संस्कृतोत्पन्न प्राकृत आहेत. कांहीं ग्रामनामें जातिनामां वरून पडलीं आहेत तीं अशीं:-
१ माछीवाडा (मत्स्यकवाट:) ८ कर्कुट पाडा (कर्कुटपाटकः)
२ महारवाडा (महारवाटः) ९ भोयपाडा (भौमपाटक:)
३ मगरवाडा (मकरवाट:) १० बर्बराचापाडा (बर्बरीयपाटकः)
४ भिलाड (भिल्लवाटः) ११ मांगेलवाडा (मांगेलवाटः)
५ किराट (किरातवाटः) १२ कोळवाडा (कोलवाट: )
६ वारलीवाडा (वारुडकिवाट:) १३ नागपाडा (नागपाटक:)
७ ठाकरियापाडा (तस्करकपाटकः) १४ बामणवाडी (ब्राह्मणवाटिका)
१५ आगरवाडी (आगरिकवाटिका)
हीं सर्वं नांवें किंवा ह्यां पैकीं बहुतेक सर्व नांवें मांगेले, वारली, कोळी, वगैरे संस्कृतोत्पन्न प्राकृत भाषा बोलणा-या लोकांनीं मूलतः ठेविलीं असें म्हटल्या खेरीज दुसरी वाट नाहीं. सोपारें, वालुकेश्वर, ठाणें, कल्याण, दमण, वगैरे किंचित् अपभ्रष्ट किंवा पूर्णपणें संस्कृत नांवें वारली वगैरेंच्या नंतर आलेल्या नल, मौर्य, शिलाहार, दामनीय, इत्यादि पश्चात्क लोकांनीं यद्यपि दिलीं असण्याचा संभव आहे, तत्रापि बाकींचीं बहुतेक सर्व नांवें वारली वगैरे लोकांनीं दिलीं असावीं. सोपारें हें नांव शिलालेखांतून व ताम्रपटांतून शूर्पारक असें नमूद केलेलें आढळतें. परंतु सोपारें ह्या प्राकृत उच्चाराचा हा संस्कृत उद्धार आहे इतकेंच. मूळ नांव सौपर्यम् . सुपरि हा शब्द पाणिनीय संकाशादिगणांत नमूद आहे. तसेंच, शेवलसुपरि ० (५-३-८४) ह्या पाणिनीय सूत्रांत हि पठित आहे. सुपरिणा निवृत्तं नगरं सौपर्यम् . सुपरि नामें कोणी एक व्याक्त. त्यानें वसविलेलें जें नगर तें सौपर्यम् . सौपर्यम् चा अपभ्रंश सोंपरें, सोपारें, सुपारें, कश्याचा अपभ्रंश काय आहे हें न शोधिल्या मुळें सोपारें ह्या शब्दाचें संस्कृत शूर्पारक असें शिलालेख लिहिणा-या व रचणा-या अडाणी लोकांनीं व अर्धवट संस्कृतज्ञांनीं केलें. शूर्पार असा शब्द संस्कृत भाषेंत बिलकुल नाहीं. शूर्प असा शब्द आहे. परंतु अर किंवा आर् प्रत्यय शूर्प शब्दाला कोठून लागला आणि कशा करतां लागला हें कोणीं पाहिलें. नाहीं व अर्धवट संस्कृतज्ञ पहात हि नाहींत. प्राकृत ग्रामनामांचें असलें धेडगुजरी संस्करण अन्यत्र हि अनेक ठिकाणीं आढळतें. उदाहरणार्थ, जूर्णनगर (जुन्नर), शीर्णनगर (सिन्नर), विराटनगर (वाई), महिकावती (माहीम), इत्यादि.