Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

२. यूथावस्थ आर्य समाजात जो अनियंत्रित स्त्री-पुरुष समागम एकेकाळी प्रचलित असे त्याचे रूपांतर कालांतराने कसे कसे होत गेले हे शोधून काढण्याचा प्रांत येथून पुढे लागतो. स्त्री-पुरुष समागमाला नियंत्रण बिलकुल नाही अशा पाशव स्थितीतून अतिप्राचीन आर्य समाजाने कोणकोणती नियंत्रणे ऊर्फ नियमने कसकशा परंपरेने ज्ञानत: अज्ञानतः निर्माण केली या बाबीचा शोध केवळ कल्पनेने करण्याची आवश्यकता नसून भारत के हरिवंश यांतील संभवपर्वस्थ वंशकथांवरून बराच निश्चिमातेने लाविता येण्यास साधने आहेत. आदिपर्वाच्या ६४ व्या अध्यायात व हरिवंशाच्या पहिल्या, दुस-या व तिस-या अध्यायात देव, दानव, गंधर्वाप्सरस, मानव व यक्षराक्षस यांच्या उत्पत्तीची जी माहिती व्यासांनी पुराणातून परंपरेने ऐकिलेली दिली आहे ती पाहता असे दिसून येते की, प्राचीन इतिहासकार व्यास यांना प्राचीन आर्यसमाजविषयक जे काही ज्ञान पूर्वपुराणावरून झालेले होते ते बरेच संकुचित व मर्यादित होते. प्राचीन आर्य समाजात प्रजापतिसंस्था निर्माण झाल्यापासून माहिती हा दंतकथाकार ऊर्फ इतिहासकार देतो. तत्पूर्वीची माहिती याला ज्ञानतः नाही. येथे प्रजापतिसंस्था समाजशास्त्रात कशाला म्हणतात ते सांगणे जरूर आहे. अनियंत्रित स्त्री-पुरुष समागमकाली प्रजा, राज्य, पिता, पुत्र, माता, भगिनी इत्यादी नाती अस्तित्वात नव्हती. अमुक अपत्य अमुक पुरुषाचे असे नक्की म्हणण्यास सोय नव्हती. फक्त अमुक मूल अमुक स्त्रीचे इतकेच म्हणता येण्याची शक्यता होती. ती ही शक्यता त्या काळी तत्कालीन अनियंत्रित समाजाने मर्यादित करून ठेविली होती. जेवढ्या म्हणून स्त्रिया एखाद्या जमावात किंवा कळपात किंवा यूथात असत, तेवढ्या सर्व स्त्रिया कळपात जन्मलेल्या सर्व बालकांच्या माता समजण्याची रूढी असे. कार्तिकेय हा सहा किंवा सात आयांचा मुलगा म्हणून वर्णिलेला आहे व प्रत्येक आईने त्याला एकेक अवयव दिला असे सांगितले आहे. म्हणजे जमावांतील एक विवक्षित स्त्रीच्या पोटी यद्यपि एकादे मूल जन्मले, तत्रापि त्या मुलाचे एकेक अवयव जमावांतील सर्व स्त्रियांच्यापासून होऊन ते मूल सबंद झाले, अशी समजूत यूथावस्थ आर्षसमाजात होती. द्वैमातुर, षाण्मातुर, साप्तमातुर वगैरे शब्द व अर्थ ह्या प्राचीन समजुतीचे दर्शक आहेत. या यूथावस्थकाली कळपातील स्त्रियांना जनि म्हणजे पोरे विणा-या म्हणत, पुरुषांना जन म्हणजे पोरे उत्पादणारे म्हणत व मुलांना जात म्हणजे स्त्रिया व पुरुष यांजपासून झालेले म्हणत. हे तिन्ही शब्द याच अर्थाने ऋग्वेदांत वारंवार आलेले आहेत. अर्वाचीन संस्कृतात मूळ या अर्थी जात शब्द योजिलेला सर्वांच्या परिचयाचा आहेच.

महस्पुत्रासो असुरस्य वीरा । दिवो धर्तार उर्विया परि ख्यन ।।

त्यावर यमी म्हणाली, देव रागावणार तर नाहीतच, उलटे त्यांना आपले हे कृत्य पसंत पडेल.
उशंति द्या ते अमृतास एतद् ।

यम व यमी यांच्या ह्या संवादावरून उघड होत आहे की, फार पुरातनकाळी बहीण-भावंडांचा समागम रानटी आर्य लोकांत प्रचलित होता, व ऋग्वेदकाळी तो गर्ह्य समजला जाऊ लागला होता. बहीण-भावंडांच्या समागमाचे उत्तम उदाहरण महाभारताच्या प्रारंभालाच दिलेले आढळते. अदिति ही दक्षाची कन्या व तीच अदिति दक्षाची आई असे विधान दहाव्या अष्टकातील ७२ व्या अध्यायाच्या चौथ्या वर्गात केलेले आढळते. सरमिसळ समागमाचे हे नामी उदाहरण आहे. य इं चकार न सो अस्य वेद, स मातुर्योनौ परिवीतः । हे विधान पहिल्या मंडळाच्या २२व्या अनुवाकाच्या १६४ व्या सूक्तातील ३२ व्या ऋचेत आले आहे. बापाला आपला मुलगा कोणता ते माहीत नाही, आईच्या पोटी तो उत्पन्न झाला एंवढे मात्र खरे, असा या ऋचेचा गर्भितार्थ आहे. हेही सरमिसळ समागमाचेच उदाहरण आहे. "यस्त्वा भ्राता पतिर्भूत्वा जारो भूत्वा विपत्यते, प्रचां यस्ते जिघांसति तमितो नाशयामसि (१०-१६२-५)" या वाक्यात गर्भार स्त्रीशी भाऊ, धनी किंवा जार यापैकी कोणी समागम करील त्याचे पारिपत्य करू म्हणून दहशत घातलेली आहे. हेही सरमिसळ समागमाचेच उदाहरण आहे. स्त्री गर्भार नसली तर भावाने, धन्याने किंवा जाराने तिशी समागम केला तरी चालेल असा ध्वनी या दहशतीतून निघतो. अशी आणिक किती तरी वाक्ये ऋग्वेदातून काढून दाखविता येतील. सध्या इतकीच देऊन प्रकृताचे अनुसरण करतो. तात्पर्य, महाभारत व ऋग्वेदात सरमिसळ समागमाचे दाखले आढळतात व त्यावरून बिनधोक असे विधान करता येते की, अतिप्राचीन आर्य समाजात एकेकाळी स्त्रीपुरुष समागम अत्यंत अनियंत्रित असे.

मांगेले, वारली व ठाकर महाराष्ट्रीसम अपभ्रष्ट प्राकृत भाषा आगमनसमयीं बोलत असल्या मुळें, उंबरगांवा पर्यंतचा उत्तर कोंकणचा टापू मराठी भाषेचा झाला. फक्त दुबळे व धेडे तेवढे ह्या टापूंत गुजराथी भाषा बोलणारे टिकले. ते बलिष्ट म्हणून येथें टिकले नाहींत; तर शेती वगैरे कामाला उपयुक्त म्हणून टिकले. उंबरगांवा पर्यंत च तेवढी मराठी भाषा कां व त्याच्या उत्तरेस गुजराथी भाषा कां, ह्या प्रश्नाचें उत्तर महाराष्ट्रीसम प्राकृत भाषा बोलणा-या मांगेले, वारली व ठाकर ह्या जातींचे ह्या टापूंत जें आगमन झालें त्यांत सांपडतें. हे लोक उंबरगांव पासून दक्षिणे कडील कोंकणांत व सह्याद्रीच्या लगतच्या रानांत येण्या पूर्वी कातवडी लोकांची येथें तुरळक वसती होतो व कातवडी लोकांची मूळ भाषा येथें बोलली जात होती. कातवडी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचें रूप काय होतें त्याचा पत्ता लागण्याचा संभव सुद्धां आतां राहिला नाहीं. डोंगरकोळी व समुद्रकोळी ह्या लोकांचे जे कोल पूर्वज त्यांच्या हि मूळ भाषेचा अत्यन्त लोप होऊन गेला आहे. मांगेले, वारली व ठाकरे ह्यांचे पुरातन पूर्वज जे आंध्रादि प्राचीन लोक त्या लोकांच्या भाषेचें रूप कळण्यास हि कांहीं एक साधन उरलें नाहीं. कदाचित् आधुनिक तेलगू वरून आंध्रांच्या प्राचीन भाषेचा अंदाज अल्पस्वल्प करतां येण्याचा संभव आहे. परंतु वारली व ठाकर ह्यांच्या पूर्वजांच्या प्राचीन अनार्य भाषांचा मागमूस हि आतां लागणें दुरापास्त समजावें.

३४. मांगेली, वारली, ठाकरी, कातकरी, कोळी, कुणबी, पातेणी, चित्पावनी, क-हाडी, सारस्वती, गोमांतकी, गोकर्णी, सोंधेकरी, मिरजी, पंढरपुरी, मंगळवेढी, बेदरी, नांदेडी, रायपुरी, मूळतापी, लाडी, इत्यादि प्रांतिक व जातिक महाराष्ट्री भाषेचे लहान लहान पुंज महाराष्ट्रदेश म्हणून ज्याला सध्यां म्हणतात त्या देशाच्या सीमाप्रदेशा वर दोन अडीच हजार वर्षां पूर्वी व पाणिनिकालाच्या नंतर ठिकठिकाणीं वसती करून राहिले. ह्या सीमा प्रदेशाच्या आंतील विस्तीर्ण टापूंत नागपुरी, अलजपुरी, व-हाडी, खानदेशी, पैठणी, नाशिकी, जुनरी, पुणेरी, भिमथडी, बालेघाटी, नगरी, कोल्हापुरी, मावळी, इत्यादि प्रांतिक महाराष्ट्री भाषेचे शेकडों पुंज वसाहतकालीं स्थिर झाले. रूपसाम्या वरून हे अन्योन्य भिन्न प्रांतिक भाषा बोलणारे पुंज, शालिवाहनाच्या पांचव्या शतकाच्या सुमारास मराठी भाषा हे थोर नांव महाराष्ट्रिक व नाग ह्यांच्या मिश्रणा पासून बनलेल्या मराठ्यांच्या ज्या भाषेस पडलें, त्या भाषेशीं आस्तेआस्ते राजकीय, वैयापारिक, धार्मिक व वाङ्ययिक कारणांनीं समरस होत होत सध्यां बहुतेक शिष्ट मराठी बनले आहेत. शकाच्या पांचव्या सहाव्या शतका पर्यंत हे पुंज थोडेफार तुटक तुटक असत. ते राजकीयादि कारणांनी समरस बनून त्यांच्या सबंद प्रांताला प्रथम त्रिमहाराष्ट्रक व नंतर महाराष्ट्र हें नांव कायमचें मिळालें. महाराष्ट्र जितका महाराष्ट्रिकांनीं बनविला तितकाच बहुतेक मांगेले, वारली, कोळी, कातवडी, लाडी, रांगडी, इत्यादि पुंजांनीं बनविला आहे. हे पुंज जर सीमाप्रदेशा वर नसते तर मराठी भाषेचा विस्तार सध्यां जो दिसत आहे, त्या हून बराच संकुचित व मर्यादित दिसता. सीमाप्रदेशा वरील पुंजांच्या भाषेंतील प्रांतिक लकबा साधुसंतनिर्मित वाङमयप्रसारानें पूर्वी निघून जात व शालोपयोगी छापील पुस्तकपठनानें सध्यां निघून जात आहेत. मांगेले, वारली वगैरे लोकांनीं महाराष्ट्रीय भाषेचीं सीमाप्रदेशा वर ठाणीं व टापू पुरातनकालीं तयार केले. शंभर वर्षां पूर्वी तें च काम ग्वालेर, बुंदेलखंड, माळवा, विलासपुर, बडोदें, म्हैसूर, तंजावर, मिरज, अथणी, बेळगांव, विजापूर, गुत्ती, वगैरे महाराष्ट्रबाह्य प्रदेशा वर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, भोसले व भट राजकर्त्यांनीं मध्यकालीं व अर्वाचीन कालीं पुढें चालविलें. पानिपत येथें महाराष्ट्रधर्म सर्व भारतवर्षांत पसरविण्याचा मराठ्यांचा हव्यास किंचित् विराम पावून शक १७४० त तर अगदींच थंडा पडला. तो च उद्योग माळवा, पंजाब, काफरिस्थान व चित्रळ ह्या प्रदेशांत मानभावांच्या भक्तिमार्गानें गेलीं आठ शें वर्षे चालविला आहे. महाराष्ट्राचा राष्ट्रीय देह जर पुनः सजीव झाला तर पूर्वीचा महाराष्ट्रधर्म, अर्थात् महाराष्ट्रभाषा, भरतखंड भर पसरविण्याचा पूर्वजन्मींचा धागा त्याला सोडून चालतां येणार नाहीं असें भविष्य वर्तविण्याचें कारण नाहीं. जीवमात्राचा हा निसर्गधर्म च आहे.

उदाहरणार्थ, दम ऋषीने मृगीशी संग केला ही मूळची आर्षकालीन हकीकत. ही कथा स्वकालीन समाजाला निंद्य, गर्ह्य, लाजिरवाणी व अधर्म्य वाटेल व प्राचीन पूर्वजांची निंदा केल्याचे पातक माथ्यावर पडेल या भीतीने व्यासांनी एवढीच मखलाशी केली की दम ऋषीला व त्याच्या स्त्रीला वाटेल त्या प्राण्याचे रूप धारण करण्याचे तपोबलाने सामर्थ्य असल्यामुळे, ती दोघे मृगाचे रूप घेऊन क्रीडा करीत होती, सबब हा समागम नीतीला व धर्माला सोडून नव्हता. दुसरे उदाहरण अत्यंत प्रसिद्ध असे कुंतीचे घेऊ. कुतीने तीन परपुरुषांपासून म्हणजे स्वपतीव्यतिरिक्त अन्य पुरुषांपासून संतती करून घेतली ही मूळ हकीकत. ही उघडीनागडी हकीकत व्यासकालीन- म्हणजे शकपूर्व चार-पाचशे वर्षांपलीकडे झालेल्या महाभारतकालीन-नीतीला व धर्माला किंचित् गौण व कमीपणा आणणारी भासल्यामुळे व्यासांनी एवढीच दैवी व अद्भुत मखलाशी केली की, कुंतीशी ज्या परपुरुषांनी समागम केला ते पुरुष भिकार व पापी मानव नव्हेत तर इंद्र, यम, वरुण इत्यादी सारखे मोठे मोठे देव होते. ही मखलाशी पहिल्या प्रथम महाभारतकार व्यासांनीच निर्माण केली असेल असेही म्हणवत नाही. पिढ्यानपिढ्या दंतकथा सांगणारांनी देखील उघड्यानागड्या अश्लीलत्वावर झाकण घालण्याच्या सद्बुद्धीने ही मखलाशी केली असण्याचा पूर्ण संभव आहे. कारण, पितरांची व त्याबरोबरच आपलीही निंदा करण्याची खंती मनुष्यमात्राच्या प्रगतिप्रवण नीतिमत्तेला वाटलेली सर्वत्र आढळून येते. यांचे अत्यंत ठळक असे सेमेटिक उदाहरण म्हटले म्हणजे ख्रिस्ती धर्मोत्पादक ख्रिस्ताचे. ह्याची आई जी मेरी तिला साक्षात् होली घोस्टकरवी गर्भदान झाले, अशी दंतकथा आहे. मर्त्य पुरुषाच्या समागमाव्यतिरिक्त मर्त्य स्त्रीला प्रजा होणे असंभाव्य आहे या दृष्टीने पाहता कुमारी मेरी हिला कोण्यातरी पुरुषापासून ख्रिस्त झाला असला पाहिजे. परंतु असले बिगरलग्न प्रजोत्पादन त्या काली यहुदी लोकांत नीतिबाह्य दिसत असल्यामुळे दैवी गर्भाधानाची मखलाशी नवीन निर्माण करणे अवश्य झालेले उघड उघड दिसत आहे. पुरुषाशिवाय गर्भधारणेवर (Immaculate conception ) कितीत री पांडित्य ख्रिस्ती पंडितांनी केलेले जे आढळते त्यातील बीज इतकेच की, साधुवर्य ख्रिस्ताचा जन्म अधर्म्य व नीतिबाह्य नाही हे कसेतरी श्रोत्यांना पटवुन द्यावे. युरोपियन पुरुषाशिवाय गर्भधारणावाल्यांची जी दुर्दशा तीच महाभारतकार व्यासांचीही दुर्दशा आहे. तात्पर्य, महाभारतातील विस्तृत प्राचीन इतिहासकथांना वैदिक त्रोटक उल्लेखांचा आधार आहे. असो. प्राचीन आर्य समाजात सरमिसळ स्त्री-पुरुषसमागम एका काळी प्रचलित होता, एतत्संबंधाने सध्या आपण विवेचन करीत आहोत व ते विवेचन मुख्यत: महाभारताच्या आधाराने करीत आलो आहोत. आता वैदिक वाङ्मयात व विशेषतः ऋग्वेदात सरमिसळ स्त्री-पुरुषसमागमासंबंधाने बरेच उल्लेख स्थळोस्थळी आढळतात. त्यापैकी दोन तीन मासल्याकरिता येथे देतो. यम आणि यमी या बहीण-भावंडासंबंधाने विशेष उल्लेख करावयाला नकोच, कारण ही वैदिक कथा बहुतेक आबालवृद्धांच्या कानावरून गेलेली आढळते. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात व अथर्ववेदाच्या अठराव्या कांडात यम आणि यमी यांचा संवाद दिला आहे. यमी आपला सोदर भाऊ जो यम त्यापाशी संभोगाची याचना करू लागली. ती याचना यमाने फेटाळली. तो म्हणाला, वरुणाचे दूत आपले कृत्य पाहतील व दोष देतील.

समुद्रा वर मांगेले, समुद्रा पासून चार मैल पर्यंत दुबळे व चौथ्या मैला पासून पूर्वेस सह्याद्रि पर्यंतच्या दहा पंधरा मैल टापूंत वारली पसरलेले आहेत. मराठी भाषा बोलणा-या वारली व मांगेले ह्यांच्या मध्यें गुजराथी भाषा बोलणारे दुबळे व धेडे पाचरे सारखे अडकले आहेत. मांगेले समुद्र सेाडून जात नाहींत व वारली रान सोडून समुद्रा कडे झुकत नाहींत. मांगेले कोठून व केव्हां कोंकणकिना-या वर आले तें आपणांस अंदाजानें माहीत आहे. दुबळे वे धेडे गुजराथेंतून कोंकणांत उतरले एवढें निश्चयानें सांगतां येतें. आतां वारली कोठून आले तें पहावयाचें. वारली जुनाट मराठी भाषा शुद्ध व उत्तम बोलतात. सूर्यनारायण वगैरे देवांची भक्ति वारल्यांत प्रचलित आहे. लावण्या वगैरे गाण्यांचें तोंडी वाङमय त्यांच्यांत आहे. भुतां खेतां वर त्यांचा दाट विश्वास असतो. तो स्पृश्य वर्गांत बराच मोडतो. असा हा कांहींसा सुधारलेला वारली उतरकोंकणांत स्वयंभू आहे कीं आगंतुक आहे ? बाहेरून कोठून आला तें ज्या संबंधाने सांगतां व अनुमानतां येत नाहीं त्याला येथें स्वयंभू म्हटलें आहे. दक्षिणेस डोंगरी कोळी, पूर्वेस घाटमाथ्या वर कोळी व कातवडी, उत्तरेस गुजराथेच्या बाजूनें कोळी व भिल्ल आणि पूर्वेस दुबळे व मांगेले ह्या चार पांच समाजांच्या मध्यें वारली आहे तो ह्यांच्या मध्यें बाहेरून शिरला किंवा पूर्वापार स्वयंभू आहे ? सध्यांचे डोंगरी कोळी हे पुरातन कोल लोकांचे वंशज आहेत. भिल्ल हे पुरातन रानटी लोक आहेत. कातवडी तर अद्याप हि रानटी आहेत. ह्या तिघांच्या हून वारली जास्त सुधारलेला आहे. तेव्हां ह्या प्राचीन भिल्ल, कोळी व कातवडी लोकांच्या देशांत वारली बाहेरून कोठून तरी शिरला असावा असा तर्क करावा लागतो. कोठून व कसा शिरला तें मात्र सांगण्यास असावें तसें गमक उपलब्ध नाहीं. महाराष्ट्रीसम किंवा मराठीसम प्राकृत भाषा घेऊन वारली कोंकणांत शिरला असें हि म्हणतां येण्यास पुरावा आहे. वरुड नामें करून कोणी एक अनार्य जात होती. तिच्या पासून वारुडकि ऊर्फ वारली ही जात झाली. वरुडांचें नांव कात्यायनाला माहीत होतें. कात्यायन विंध्योत्तर प्रदेशांतील रहाणारा. त्याला त्याच्या प्रदेशाच्या सीमाप्रांता वर रहाणारे वरुड लोक माहीत होते. तेव्हा वारुडकि ऊर्फ वारली हे लेाक उत्तरे कडून कोंकणांत शिरले असावे व शिरण्याच्या वेळीं कोणती तरी महाराष्ट्रीसम प्राकृत भाषा बोलत असावे असा तर्क करतां येतो. कोंकणांत आल्या वर नाग, महाराष्ट्रिक इत्यादि लोकांच्या प्राकृत भाषां प्रमाणें याच्या हि प्राकृत भाषेंत बदल होत जाऊन, तो सध्यां बोलतो ती प्रांतिक किंवा जातिक मराठी भाषा बोलूं लागला व त्या मराठी भाषेंत जुनाट शब्दांचा उपयोग अद्याप पर्यंत करीत राहिला.

३३. वारल्यांच्या टापूच्या दक्षिणेस कोळी, कातवडी व ठाकर लोक रहातात. पैकीं ठाकर लेाक तस्कर ह्या नांवानें कात्यायनाला माहीत आहेत. तद्बहतो: करपत्यो श्वोरदेवतयोः सुट् तलोपश्च (६-१-१५७) ह्या वार्तिकांत तस्कर शब्दाचा निर्देश कात्यायन करतो. त्या वरून म्हणतां येतें कीं तस्कर- ठक्कर-ठाकर हे लोक उत्तरे कडून कोंकणांत आले. कातवडी, काथोडी, कोठोडी, हे लोक सह्याद्रीच्या आसपासच्या प्रदेशांतील अत्यन्त जुनाट लोक आहेत. ह्यांना कातकरी हें आणीक एक नांव आहे. तें त्यांच्या कात करण्याच्या धंद्या वरून मूळत: पडलें. जुनाट नांव कातवडी होय. कारस्कर देशांत राहणारे ते कारस्करी, कातकरी अशी हि व्युत्पत्ति ओढूनताणून केली तर प्रयासानें होईल. परंतु, कातकरी ह्या शब्दाचा अपभ्रंश कातवडी असा कोणत्या हि ओढाताणीनें होणार नाहीं. कातवडी हा मराठी अपभ्रंश कृत्तिपट्टिन् ह्या संस्कृत शब्दाचा होणें शक्य आहे. कृत्ति म्हणजे कातडे व पट्ट म्हणजे वस्त्र, कातड्यांचें वस्त्र पांघरणारा जो तो कृत्तिपट्टिन्. कृत्तिपट्टिन् कातवडी. मूळ हे रानटी लोक वाघ, हरिण, इत्यादींचीं कातडीं पांघरणारे महाराष्ट्रिकांना आढळले. त्या वरून त्यांनी त्यांना कृत्तिपट्टिन् असें सार्थक नांव दिलें. महाराष्ट्रिकांच्या संसर्गानें कातवडी मराठी भाषा बोलूं लागले. डहाणूउंबरगांव पासून मुंबई पर्यंतच्या टापूंत रहाणा-या मांगेले, दुबळे, धेडे, वारली, कोळी, ठाकर व कातवडी ह्या लोकांचा भाषिक इतिहास उपरिनिर्दिष्ट त-हेचा आहे. पैकीं कातवडी तेवढे ह्या प्रांतांत सर्वांच्या पूर्वीचे रहाणारे आहेत. मांगेले, वारली, कोळी व ठाकर अपभ्रष्ट प्राकृत भाषा घेऊन उत्तरे कडून ह्या प्रांतांत शिरले. मांगेल्यांनीं उंबरगांवा पासूनचा समुद्रकिनारा धरिला आणि वारली व ठाकर ह्यांनीं आंतील सह्याद्रीचीं रानें आटोपिलीं.

पुढे शाहूमहाराजाचे अमदानीस दमाजी थोरात यांनी आपले सिलेदारास गाव मोकासे दिले त्या वेलस सांगवी गाव सितोजी सितोले यासी मोकासा करून दिला त्यानी तुकोजी पाटील याचा पुत्र वाकोजी पाटील खानदेशातून धरून आणिले आणि थोराताचा कौल देऊन गावची वस्ती केली तेव्हा आपली सेरी नाहावीकर होनाजी सितोले यासी लाविली होती त्याने सात आठ वरसे वयवाट केली फिरोन गाव उज्याड पडला मग पुढे बालाजीपंत नाना याचे कौलाने मागती वस्ती जाहाली मग वाकोजी पाटील आपले बापास घेऊन तलेगावास आला पुण्यास येऊन देशमुख देशपांडियासि भेटून वर्तमान सांगितले की मी एकला आहे भाऊबंद कुलडम असामी कोणी नाही यासी काय ते आज्ञा करावी त्यासी सांगीतल जे आसपास भाऊबंद व कुणबी आसामी अशेल त्यासी आणोन वस्ती करावी त्याजवर पाटलानी उतर केले की पोटास काय खावे त्यासी उतर केले की दोन पायली दाणे देतो घेऊन चहूकडे प्रयत्‍न करोन गावची वस्ती करावी पाटलाने जाऊन दोन चार भाऊ ठिकाणी लाऊन लखमाजी बिन देवजी कलो बरोबर घेऊन पुण्यास आला आणि कौल मागू लागला भेटी ऐवाजयासी अनकूल नाही बापोजी श्रीपत सुभेदार याजपुढे पानसुपारी ठेऊन कौल घेतला त्यावर थोडीसी वस्ती जाहाली सिवार पडला च होता पाच सात सेत मात्र लागली होती पुढे गावकी न चाले आणि सिवार हि न लागे ह्मणोन सितोजी बावा सितोले भाऊ करोन लावणी केली आणि वस्ती हि जाहाली पुढे पाचा साता वरसा पुण्यास येऊन श्रीमंत बाजीराव साहेबाचे कानावर घालोन सुरत महाजर अभयपत्र व देशमुख देशपांडे सरकार कारकूण हवालदार मजमदार गावास घेऊन गेले भोवर गावचे पाटील व बारा बलुते जमा करोन महजर करू लागले कागद सिधे जालाले ते समई देशमुख देशपांडे बोलले की आमची सेरी व इनाम दाखऊन द्यावी ह्मणजे लावणी करू मग वाकोजी पाटील व गोदाजी पाटील व सितोले बोलले की कागदपत्र तयार करावे नंतर सेरी व इनाम दाखऊ मग भोवर गावचे पाटील चौगुले व गावचे बारा बलुते याची गोही व देशमुख व देसपांडे यांची दसतक जाहाली व हावलदाराचा सिका जाहला तेसमई खासा देशमुख खंडेराव व मातोश्री लाडूबाई व कारभारी धडफले नाना व कल्याणपत व निलो विठल देशपाडे होते सिका करते समई देशमुख गोदाजी बावा सितोले यासी बोलले की नाहावीच्या कजियाबदल लोकासी घोडी वाटली ते समई आह्मास काही दिले नाही तर त्या अवलादीचे एक घोड आह्मास द्यावे म्हणजे सिका करू तेव्हा सितोले मा।र बोलला की असी घोडी कोणकोणास देऊ हे गोस्टी आह्मास पुर्वत नाही तेव्हा मातुश्रीने देशमुखाचे हातचा सिका घेऊन पुण्यास आले मागाहून पाटील मा।र पुण्यास येऊन श्रीमंताची परवाणगी घेऊन जानोजी पाटील ढमढेरे तलेगावकर यानी मधेस्ती करोन मातोश्रीस समजाऊन महजरावर सिका केला.

प्रकरण २ रे
स्त्रियांचे वंशप्रवर्तकत्व व प्रजापतिसंस्था

१. अतिप्राचीन आर्ष समाजात म्हणजे यूथावस्थ आर्ष समाजात, म्हणजे पाशवावस्थेतून नुकत्याच बाहेर पडलेल्या आर्ष समाजात, स्त्री पुरुषसमागम अत्यंत अनियमित असे, अथवा त्याला कोणताच निर्बंध नसे; म्हणजे, आई, बाप, भाऊ, बहीण ही नात्यांची नावे ज्यांना कालांतराने पुढे पडली त्यांच्यात समागम सररहा होत असे हे महाभारतातील कित्येक पुराण इतिहासकथांवरून आपणांस ताडिता आले. ह्या प्राचीन इतिहासकथांचा मूळ व एकच एक उगम वेद आहेत असे जरी म्हणता येत नाही, तरी एवढे प्रमाणबद्ध विधान बिनधोक करता येते की महाभारतात ज्या पुराणकथा सांगितल्या आहेत, त्यातील ब-याच व्यक्तींचा उल्लेख वेदातून आलेला आढळतो. हे इंद्रा, तू अमक्या अमक्या प्राचीन किंवा नुकत्याच होऊन गेलेल्या ऋषीला किंवा राजाला जसे अमुक अमुक त-हेने तारिलेस व रक्षिलेस तसे मला किंवा माझ्या कुळाला तार, अशी प्रार्थना जेथे जेथे येते तेथे तेथे त्या ऋषीला किंवा राजाला कोणत्या संकटात इंद्राने किंवा अग्नीने किंवा ऋभूंनी तारिले त्याचा ओझरता, त्रोटक व फारच झाला तर संक्षिप्त उल्लेख केलेला बहुशः सापडतो. हे उल्लेख ज्या हकीकतीसंबंधाने केलेले आहेत त्या हकीकती ऋचा व सूक्ते ज्या ऋषींनी रचिली त्यांना तर संपूर्ण माहीत असतील यात जसा संशय नाही, तसाच त्या ऋचा व सूक्ते ऐकणाच्या समाजालाही तितक्याच संपूर्णतेने अवगत असल्यावाचून कवीचे व श्रोत्यांचे एकावधान शक्य नाही. तात्पर्य, ऋचा ज्या काली ऋषींनी रचिल्या त्या काली आर्ष समाजात ह्या पुरातन कथा प्रायः तोंडी दंतकथा भारतात त्या त्या स्थळी व्यासांनी भीष्मादिकांच्या तोंडून पुराण इतिहास म्हणून वदविल्या आहेत. मूळच्या वैदिक दंतकथा म्हणजे तोंडी हकीकती व्यासांनी जशा त्या मुळात घडल्या तशाच बहुतेक दिल्या आहेत. त्यास त्यांनी स्वतःच्या पदरांचा जोड जो दिलेला आहे तो एवढाच की स्वतःच्या कालच्या समजुतीच्या व नीतिमत्तेच्या दृष्ट्या त्या विगर्हणीय भासू नयेत म्हणून बहुतेक प्रत्येक हकीकतीला दैवी व अद्भुत कारणांची पुष्टी दिली आहे.

(१०) असल्या ह्या सरमिसळ व्यवाय करणा-या अतिप्राचीन आर्षसमाजात आपल्या ह्या वर्तमानकालीन समाजातील आई, भाऊ, बाप, चुलता, मामा, आत्या इत्यादी बहुविध नाती व भेद असण्याचा संभवच नाही. तत्रापि बहुविध नाती व भेद यद्यपी नसले तरी काही थोडे भेद व नाती ह्या रानटी समाजांत उद्भवल्याशिवाय राहिली नाहीत . जमावातील किंवा यूथातील सर्व बाया सर्व मुलांच्या आया पडल्याकारणाने, त्या काली स्त्रीसामान्याला जनि ही संज्ञा असे. जनि म्हणजे जन्म देणारी जन्+इ. इ. म्हणजे ती व जन् म्हणजे जन्म देणे, जनि म्हणजे ती जन्म देते. जमावातील सर्व स्त्रिया जशा जनि या शब्दाने निर्देशिल्या जात त्याचप्रमाणे ह्या जन्मापासून झालेल्या सर्व व्यक्तींना जन ही संज्ञा असे. जन या शब्दात स्त्री-पुरुष, लहानमोठे असे जमावातील सर्व माणूस सामान्यत: येई व विशेषतः जन्यांपासून झालेली पुल्लिंगी प्रजा येई. सर्व पुरुष सर्व स्त्रियांशी सरमिसळ व्यवाय करीत असल्यामुळे, सर्व जन सर्व जन्यांचे नवरे व सर्व जन्या सर्व जनांच्या नव-या असत. म्हणजे स्त्री आणि पुरुष असे दोनच भेद यूथावस्थेतील अतिप्राचीन आर्षसमाजात असते. त्या काली स्त्री व पुरुष हे शब्दही बहुशः घडण्यात आले नव्हते. इतकेच काय तर ऋषी हा शब्दसुद्धा घडण्यात आला नसावा. अर्थात् त्या अतिप्राचीन सरमिसळ व्यवाय करणा-या यूथावस्थ समाजाला आर्षसमाज म्हणणेही ऐतिहासिक म्हणजे पौर्वापर्य दृष्टीने अयुक्त होय तथापि ऋषीचे ते पूर्वज होते एवढ्याचकरिता त्या यूथाला आर्ष ही संज्ञा लाविली आहे. त्या काली फक्त जन व जनि, जन्म दिलेले व जन्म देणा-या हे शब्द निर्माण झाले होते. स्त्री, पुरुष, बंधु, भगिनी, पिता, पुत्र, माता, दुहिता, स्वसृ, यातृ इत्यादी शब्द, भेद व नाती कशी व केव्हा निर्माण झाली व उदयास आली या बोधप्रद विषयाचा ऊहापोह पुढे यथाप्रसंग करावयाचा आहे.

(९) पाशवदशेतून यूथावस्थेत येत असताना पाशवीवृत्तीचे अवशेष वन्य समाजात अनेक ठिकाणी आढळतात. In the Sandwich Islands adultery, incest and formication were common things. (सँडविच बेटात व्यभिचार, जवळच्या नात्यात संबंध आणि निषद्ध संभोग या सामान्य गोष्टी होत्या). ज्याला सुधारलेला समाज आपल्या नातगोताच्या दृष्टीने Adultery incest व formication म्हणतो त्याची प्राचीन आर्ष समाजातील उदाहरणे वर हवी तितकी दिली. आता निराळ्याच एका नीतिभ्रष्टतेची उदाहरणे महाभारतातून देतो. वनपर्वाच्या ११० व्या अध्यायात असे लिहिले आहे की ऋष्यशृंगपिता जो विभांडक ऋषि त्याला मृगीपासून ऋष्यशृंग पुत्र झाला. येथे मृग या शब्दाचा एक अर्थ अनृषि मनुष्यांची एक जात असा होईल. सर्प, नाग, गरुड, वानर ह्या जशा अनृषि मनुष्यांच्या जाती तशीच त्या काली मृग ही एक जात असावी. दुसरा मृग शब्दाचा अर्थ हरीणनामक पशू. पशूपासून ऋष्यशृंगासारखी मानवी प्रजा निष्पन्न होणे अशक्य असल्यामुळे हा दुसरा अर्थ प्रस्तुत उदाहरणात सोडून देणे बरे. आदिपर्वाच्या प्रथमाध्यायात व ११८ व्या अध्यायात पांडुशापवृत्त दिले आहे. त्यात दम ऋषि मृगीशी संग करीत असता पांडुराजाच्या बाणाने विद्ध होऊन मरण पावल्याचे लिहिले आहे.पांडुराजा मृगया करावयास गेला होता व तेथे हरणे मारीत होता. त्यात दम ऋषि एका हरीणीशी रममाण होण्यात गुंतला होता. ते ध्यानात न येऊन पांडूने बाण मारिला व तो दम ऋषीला लागला तेव्हा दम ऋषीने पांडूला हे पापकृत्य केल्याबद्दल दोष देऊन मैथुनकर्मात निमग्न झालेल्या आपणांस प्राणांतिक जखम केल्याबद्दलही दोष दिला. पशूशी मैथुन करण्यात काही विपरीतपणा आहे हे राजाच्या किंवा ऋषीच्या मनातसुद्धा आले नाही. कवीने म्हणजे व्यासांनी दम ऋषीच्या ह्या कृत्यावर असे पांघरूण घातले आहे की दम ऋषीने हरिणीशी संग करण्याच्या वेळी हरणाचे रूप घेतले होते व ती हरणीही दम ऋषीची बायको होती; परंतु ही मखलाशी काढून टाकली म्हणजे खरा प्रकार उघडकीस येतो, आदि पर्वाच्या ६६ व्या अध्यायात वर्णन आहे की अश्वरूप धारण करणारी त्वाष्ट्री ही सूर्याची भार्या होती. म्हणजे घोडीशी पुरुष कर्म करीत असत अशी कल्पना तरी निदान व्यासकाली सर्वत्र वाचल्या जाणा-या ग्रंथात लिहिलेली खपत असे. ह्याहून निःसंदिग्ध असे पशुसंगाचे आर्ष उदाहरण म्हटले म्हणजे अश्वमेधयज्ञातील घोड्यांशी यजमान पत्नीने निजण्याचे. अश्वमेधांतील हे प्रतीकरूप कर्म आर्षलोकांच्या पाशवीवृत्तीतील एका चालीचा अवशेष आहे हे जाणत्यांना सांगावयाला नकोच. अतिप्राचीन आर्षलोकांत स्त्रिया व पुरुष पशूंशी संग करीत व तो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष करीत व त्यांत काही विपरीतपणा त्यांना भासत नसे. या बाबीच्या सिद्धयर्थ ह्याहून जास्त पुरावा नको. सांप्रतकाली कुत्र्यांशी गाढवीशी, शेळ्यांशी व गाईशी संग केल्याचे वृत्त कर्णोपकर्णी महाराष्ट्रात कधी कोठे ऐकू येते. परंतु समाजात व कायद्यात तो अक्षम्य अपराध म्हणून गणिला जातो. प्राचीन आर्षकाली तो अक्षम्य अपराध व गुन्हा समजला जात नसे, एवढाच प्राचीन व अर्वाचीन समाजात भेद.

उद्योगपर्वाच्या १०६ व्या अध्यायापासून १२३ व्या अध्यायापर्यंत माधवीचे आख्यान वर्णिले आहे. गालव नावाच्या ऋषीला ययातिराजाने आपली मुलगी माधवी गालवाला गुरुदक्षिणा देता यावी म्हणून दिली. ऋषीने तिला स्वतःची मुलगी म्हणून तीन राजांना एकेक पुत्र होईतोपर्यंत क्रमाक्रमाने भाड्याने दिली, आणि नंतर ती मुलगी गालवाने आपला गुरु जो विश्वामित्र त्याला भार्या म्हणून अर्पण केली. तिच्यापासून विश्वामित्राला एक पुत्र झाल्यावर, गालवाने तिला तिचा बाप जो ययाति त्याच्या स्वाधीन परत केली. ह्या कथेत तीन आर्ष चालींचा निर्देश झाला आहे. (१) बाप आपल्या मुलीला वित्त म्हणून वाटेल त्यास काही काल भाड्याने देऊ शके. (२) शरीरसंबंध काही विवक्षित काल करण्याच्या अटीवर मुली गहाण टाकता येत असत. (३) आणि पुत्ररूप जो शिष्य त्याची मुलगी म्हणजे आपली नात पितृरूप जो गुरु तो काही काल बायको करू शके. आर्षलोक मुली किंवा स्त्रिया विकत किंवा भाड्याने देत असत हा प्रस्तुतचा मुद्दा आहे आणि ह्या प्रकरणी इतर रानटी लोकांप्रमाणेच पुरातन आर्षलोकांचा आचार असे हे सांगण्याकडे कटाक्ष आहे. ह्या चालीचा स्मारक असा वर्तमानकाली अवशेष म्हटला म्हणजे मराठी भाड्या हा शब्द आहे. भाड्या या शब्दाचे संस्कृत रूप भाटिकः, स्वस्त्रीला भाड्याने देऊन त्यावर निर्वाह करणा-याला भाटिक म्हणून पूर्वी म्हणत असत व भाड्या म्हणून सध्या महाराष्ट्रात म्हणतात.