Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(८) यूथावस्थेत आर्षसमाज असताना, स्त्रीपुरुषसमागम अत्यंत अनियमित असे, म्हणजे नातेगोते काहीएक बघत नसत; कारण नातेगोते उत्पन्नच झालेले नव्हते. कुमारींशी समागम करीत, उघड्यात पशूंप्रमाणे समागम करीत इत्यादी स्वैरपणा यद्यपि होता, तत्रापि तशाही स्थितीत स्त्रियांना पुरुष आपली मालमत्ता समजत ही बाब सदैव लक्षांत ठेविली पाहिजे. पाणिनीय समाहारद्वंद्वाची जी उदाहरणे दिली आहेत त्यात दारगवम् हे एक उदाहरण दिलेले सर्व प्रसिद्ध आहे. दाराः च गावः च दारगवम्. दाराः म्हणजे स्त्रिया. यांची गणना गाईच्याबरोबर केलेली आहे. ही स्थिती पाणिनीच्या वेळची. प्राचीन आर्षाच्या काळी तर ही स्थिती ह्याहून प्रखर होती. स्मृतिकार व सूत्रकार जे आठ विवाह सांगतात, त्यांत आर्षविवाहाचे वर्णन येते. या विवाहात वर किंवा वराचा बाप वधूच्या बापाला गोमिथुन म्हणजे एक गाय व एक बैल देऊन कन्या घेतो म्हणजे अर्थात् विकत घेतो. ह्या विवाहाला आर्षविवाह ही संज्ञा आहे. ह्यावरून उघड होते की, आर्षलोकांत मुलीची किंमत एक गाय व एक बैल इतकी समजत असत. अर्थात् नित्याच्या बोलण्यात आपल्या मालमत्तेचे वर्णन करावयाचे असल्यास ते दारगवम् या सामासिक शब्दाने आर्षलोक करीत. असुर साक्षात् धन घेऊन कन्याविक्रय करीत. आर्षलोक गोमिथुन घेऊन कन्याविक्रय करीत, कारण इतर सुवर्णादि धन अत्यंत प्राचीन काळीं आर्षलोकांना मुळीं माहीतच नव्हते. आर्षलोक जसा कन्याविक्रय करीत तसाच ते आपल्या इतर स्त्रियांचाही विक्रय करीत. हरिवंशात ७९ व्या अध्यायात पुण्यक व्रताची कहाणी सांगितली आहे. तीत असे वर्णन आहे की, पुण्यकव्रत करणा-या पतिव्रता स्त्रीने ब्राह्मणांकडून त्यांच्या स्त्रिया विकत घ्याव्या व त्या आचार्यास उदकपूर्वक दान द्याव्या. In Polynesia, the husbands trafficked in their wives without scruple. [पॉलेनीशियात नवरे स्वस्त्रियांची विक्री करीत आणि त्याचे त्यांना काही वाटत नसे]. हीच चाल प्राचीन आर्षलोकांतही होती. जेथे स्व-स्त्रिया व कन्या विकीत असत, तेथे त्या भाड्यानेही दिल्या जात असल्यास त्यात काही नवल नाही.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
नुकाट्रिवांत तेथील तरुण मुली जे कोणी त्यांना आकर्षित करून घेऊ शकत त्या सर्वांच्या पत्नी असत. जेव्हा त्या जरा मोठ्या होत तेव्हा त्या स्थिर संबंध प्रस्थापित करीत. द्वीपसमूहात पुष्कळदा फ्रेंच नाविकांना आठ वर्षे वयाच्या मुली दिल्या जात आणि त्या कुमारी नसत [लिटोर्न्यू].
ह्या तुलनेवरून दिसेल की अतिप्राचीन आर्षसमाज एके काळी अत्यंत रानटी अशा यूथावस्थेत होता, कन्यादूषणाच्या संबंधाने युवन् व युवती हे दोन जुनाट शब्द लक्ष्य आहेत. यु म्हणजे जुडणे आणि युवन् म्हणजे जुडणारा, समागम करणारा. युवती म्हणजे समागम करणारी. संघातील मुलगे व मुली ही समागम करण्यास योग्य झाली म्हणजे आर्षलोक त्यांना संभोग करू देत. ऑस्ट्रेलियांत ही चाल दृष्टीस पडते. हीच स्थिती प्राचीन आर्षसमाजात होती. In Australia, the girls cohabit from the age of ten with young boys of fourteen or fifteen, without rebuke from anyone (Letourneau). ऑस्ट्रेलियात दहा वर्षांच्या मुली चौदा आणि पंधरा वर्षांच्या मुलांबरोबर संभोग करीत आणि त्याबद्दल त्यांना कोणी दोष देत नसे. हीच स्थिती प्राचीन आर्ष समाजांत होती.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
गंगानामक कुमारीशी शंतनु राजाने समागम केल्याचे वृत्त सर्वप्रसिद्ध आहे. तात्पर्य, ज्याला आपण कन्यादूषण म्हणून म्हणतो ते प्राचीन आर्यलोकात सनातन धर्म म्हणून होते, व त्याचा प्रघात कौरवपांडवांच्या काळीहीं होता. हा प्रघात पाणिनीच्या काळीही तुरळक होता. कुमारः श्रमणादिभिः २-१-७०. या सूत्रात कुमारकुलटा, कुमारगर्भिणी व कुमारबंधकी हे तीन सत्पुरुष समास पाणिनी देतो. श्रमणादिगणात कुलटा हा शब्द तिसरा आहे. कुमारकुलटा म्हणजे कुमारी चासौ कुलटा च. कुमारी असून जी कुलटा म्हणजे छिनाल ती कुमारकुलटा. कोंवारपणी जी गर्भार राहिली ती कुमारगर्भिणी व कोंवारपणी जी वांडकी निघाली ती कुमारबंधकी. याचा अर्थ असा की पाणिनीकाली कुमारी व्यभिचारिणी वांडक्या व गर्भार असलेल्या आढळत असत. कौमारापूर्ववचने ४-२-१३ या सूत्रात कौमारः पतिः व कौमारी भार्या असे दोन प्रयोग पाणिनी देतो. पुंसा सह यस्याः असंप्रयोगः सा कुमारी ६-२-९५ असा कुमारी शब्दाचा सांप्रदायिक अर्थ आहे. जिला पूर्वी पुरुष माहीत नाही अशा मुलीच्या नव-याला पाणिनीकाली कौमारः पतिः म्हणून म्हणत व त्या मुलीला विवाहानंतर कौमारी भार्या म्हणत. ह्यापासून गर्भित अर्थ असा निघतो की पाणिनीकाली ज्याप्रमाणे विवाहापूर्वी पुरुष माहीत नसलेल्या मुली असत त्याचप्रमाणे पुरुष माहीत असलेल्याही मुली आढळत. नाहीतर कौमारः पतिः व कौमारी भार्या यांचे विशेष कौतुक पाणिनीकाली झाले नसते. ह्या सर्व विवेचनाचा मथितार्थ असा की, अतिप्राचीन आर्ष काळापासून पाणिनीकालापर्यंत अविवाहित मुलीशी समागम करण्याची रूढी भारतीय समाजात प्रथम अनिंद्य व धर्म्य म्हणून व पुढे पुढे निंद्य म्हणून प्रचलित होती. मागे चौथ्या कलमात सांगितलेच आहे की अतिप्राचीन आर्षकाळी मुलींवर सहा वर्षांपर्यंत देवांचा हक्क असे. नंतर त्यांच्यावर मनुष्यांचा हक्क उत्पन्न होई. याचकरिता आठव्या वर्षी मुलीचा विवाह करावा अशी रूढी भारतीय समाजात असलेली दिसते. आठ वर्षांपासून मुली पुरुषाला उपभोग्य होत असा सामाजिक अभिप्राय होता. चोवीस वर्षांच्या मुलाने आठ वर्षांच्या मुलीशी विवाह करावा, अशा अर्थाच्या स्मृति प्रसिद्ध आहेत. विवाहरात्रौ समागम करावा अशीही स्मृतिवचने आहेत. तेव्हा, आठ वर्षांच्या मुली समागमेय समजण्याची रूढी देशात होती यात संशय नाही. पुरुषसमागम आधी यद्यपि झाला व त्या समागमापासून अपत्यही यद्यपि झाले, तत्रापि पुढे धर्म्य विवाह होण्याला मुलींना कोणतीच आडकाठी नसे. अशी ही कन्यादूषणाची चाल आर्ष समाजात होती. पृथ्वीवरील इतर त्याच योग्यतेच्या समाजात ही चाल आढळून येते. At Noukatriva, the young girls of the island are the wives of all those who can buy their favors. When they are older, they form more lasting connections. In the same archipelago the French sailors were frequently offered girls of eight years and they were not virgins (Letourneau).
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(७) पाशव अवस्थेतून परिणत होत होत मनुष्य जमाव करून राहू लागला. या यूथावस्थेत नाना प्रकारचे संकीर्ण व्यवाय स्त्रीपुरुषांत होत. वडील धाकुटपणाचे नाते अस्तित्वातच नसल्यामुळे, वयात आलेल्या कोणत्याही स्त्रीशी पुरुष सरमिसळ व्यवहार करीत. ह्याच्याही पलीकडे जाऊन, यूथावस्थ समाजात वयात न आलेल्या कन्यांशीही व्यवहार झाल्याची उदाहरणे भारतात व हरिवंशात आढळतात. आदिपर्वाच्या ११२ व्या अध्यायात कुंतीचे व पंडूचे संभाषण दिले आहे. त्यात प्राचीनकालीन म्हणजे आपल्याहून फार प्राचीनकालीन स्त्रीधर्माचे निरूपण करताना पंडु म्हणतो, अतिप्राचीन काळी कन्या कौमारावस्थेपासून पतिमर्यादेचा अतिक्रम करीत व तो अतिक्रम अधर्म समजला जात नसे, म्हणजे तत्कालीन समाजाला संमत असे. कुंतीला कोणत्याही प्रकारची शंका राहू नये म्हणून पंडु पुढे असे ठासून सांगतो की, हे धर्मतत्त्व सनातन असून स्त्रियांस सुखप्रद असल्यामुळे उत्तर करू देशात हा व्यवहार सांप्रत चालू आहे. उत्तरकरू ही पांडवांची मूळभूमी असल्यामुळे तिच्यावर त्यांचे विशेष प्रेम असे व तीतील आचार ते शिष्ट मानीत असत, हे येथे लक्षात बाळगिले पाहिजे. हाच प्राचीन सनातन धर्म बालपणी कुंतीला सूर्यनारायणाने सांगितला होता. वनपर्वाच्या ३०७ व्या अध्यायात सूर्य म्हणतो, हे कुंती ! कन्या शब्दाची उत्पत्ती कम्। धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा करू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे, स्त्रिया व पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत, यास्तव तू माझ्याशी समागम कर, समागम केल्यावरही तू पुनरपि कुमारीच म्हणजे अक्षतयोनीच राहशील. कुंतीला हा काळपर्यंत रजोदर्शन झाले नव्हते, म्हणजे ती केवळ बाला होती. अरजस्क स्त्रीशी समागम केल्याचा दोष भगवान सूर्यनारायणाला लागेल या भीतीने कवीने म्हणजे व्यासांनी येथे वर्णन करण्यात अशी शिताफी केली आहे की कुंतीला ह्याच वेळी पहिले विटासपण आले म्हणून आगाऊच त्यांनी मेख मारून ठेवली. कवीची ही कारुणिक बुद्धि एकीकडे ठेवून पाहता असे दिसते की कुंती या वेळी अक्षतयोनि व अरजस्क मुलगी होती, कदाचित् तिचा उमेदवार होण्याचा समय जवळ आलेला असावा. कुंतीच्याप्रमाणेच पराशर ऋषीने उपभोगिलेली मत्स्यगंधा कुमारीच होती व उपभोगानंतर कुमारीच राहिली म्हणून कवी सांगतो.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
प्रिये, तुला वरुणाच्या पाशांतून कायमची मुक्त केली आहे. हे आश्वासन दिल्यावर वराने मोठ्या तो-याने व विजयाने वधूला अपराजित दिशेने सात पावले चालविले. देवांच्या कचाट्यांतून वधू सोडवीत आपण मोठा जय मिळविला हे जाहीर करण्याच्या हेतूने वराने वधूला ईशान्य दिशेकडे नेले, कारण ईशान्य दिशा ही आर्षलोकांना जय मिळाल्याची दिशा होती व एतदर्थ त्यांनी त्या दिशेचे नाव अपराजित असे ठेविले होते. स्त्रियांना अग्रोपभोगाकरिता देवांच्या स्वाधीन करण्याची ही पुरातन आर्ष चाल अवशेषरूपाने सध्या आपणात प्रचलित आहे व ती प्रतीकरूंपाने प्रचलित आहे. पुरातन आर्ष लोकांत ही चाल साक्षात् प्रचलित होती. सबब श्रेष्ठांना, समर्थांना व आपल्याहून बलिष्ठांना स्त्रिया अर्पण करणा-या रानटी टास्मेनियन लोकांच्या पंगतीस पुरातन आर्ष लोकांना बसविण्यास हे एक तिसरे कारण उपलब्ध झाले.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
ही तडजोड करण्याला वधूचा भाऊ होता. म्हणून प्रसंगी तो धावून आला. ज्या वधूला भाऊ नसेल तिचे हाल कुत्र्यानेही खाल्ले नसतील. सबब अभ्रातृक मुलीची किंमत विवाहकर्मात अत्यंत निकृष्ट किंवा शून्य मानलेली आहे व तसला पाठिंबा नसलेली मुलगी वधू करू नये असा निषेध केला आहे. शिळेवर वधू घट्ट उभी राहिली. नंतर देवांना द्यावयाचे धान्य भावाने आणिले आणि ते वधूच्या हाताने देवास अर्पण करविले. वध्वंजलौ उपस्तीर्यं भ्राता भ्रातृस्थानो वा द्विर्लाजान् आवपति १-७-८. वधूच्या ओंजळीला तूप लावून तिच्या भावाने किंवा भावासारख्याने त्या अंजलीत दोन वेळ लाह्या घातल्या. ( पंचप्रवरी असेल तर तीन वेळ लाह्या घालाव्या १-७-९). नंतर लाह्यांच्या अवदानावर तूप घातले १-७-१०/११. ते अवदान अग्निद्वारे अर्यमन् वरुण व पूषन् या देवांच्या पदरात टाकले, आणि अवदान देताना देवांना खालीलप्रमाणे बजावले. अर्यमणं नु देवं कन्या अग्निं अयक्षत, स इमा देवो अर्यमा प्र इतः मुंचातु न अमुतः स्वाहा १-७-१३. अग्नीच्या द्वारा कन्या अर्यमन् देवाला हे अवदान देत आहे, सबब येथून नव-यापासून अर्यमन् देवाने हिला सोडवून नेऊ नये, तेथून आपल्या ताब्यातून सोडून द्यावी, हीच बजवणूक पूषन् व वरुण या देवांची भावाने केली. भाऊ साधाभोळा नव्हता, हडसून खडसून व्यवहार करणारा होता. त्याने एकदम सा-या लाह्या किंवा सर्व अवदान तिन्ही देवांपुढे एकदम ओतले नाही. प्रत्येक देवाला एकेकटा बोलावून ज्याचे अवदान त्याच्या पदरात अग्नीला साक्ष ठेवून घातले. ओप्य ओप्य ह एके लाजान् परिणयंति तथा उत्तमे आहुती ने सन्निपततः १-७-१५. एकदम सारी अवदाने देण्यात गडबड व गोंधळ होतो, कोणाचे कोणते अवदान ते समजत नाही, सबब प्रत्येक अवदानानंतर अग्नीला प्रदक्षिणा घालून भावाने प्रत्येक देवाच्या माथी त्याचे त्याचे अवदान बिनचूक मारले. भावाच्या साहाय्याने वधूची देवांच्या देण्यातून यद्यपि सुटका झाली, तथापि अद्याप वधूच्या केसांना वरुणाने जखडून बांधलेला लोकरीचा दोर ऊर्फ पाश वधूला पीडा करीतच होता. त्या पाशातून गरीब बिचा-या वधूचे केश वराने हलकेहलके सोडविले व खालील धन्योद्गार काढिले.
प्र त्वा मुंचामि वरुणस्य पाशात् १-७-१७।१८.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
युरोपातल्या धर्माचार्याप्रमाणे आपल्या इकडे वल्लभाचार्यांना हा अग्रोपभोगाचा हक्क परवापरवापर्यंत गुजराथेत लोक देत असत आणि सध्या हक्काची बजावणी यद्यापि अक्षरशः होत नसली, तथापि वल्लभपंथीयांची ह्या हक्काला मानसिक अनुमति आहे. युरोपात हा अग्रोपभोगाचा हक्क परवापर्यंत होता हे पाहिले म्हणजे प्राचीन आर्षसमाजात पाचसहा हजार वर्षापलीकडे तो असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. देवलोक व देवसमाज नष्ट झाल्यावर, स्त्रियांचे अर्पण करण्यास मनुष्यदेहधारी देव राहिले नाहीत. परंतु या अवधीत वीरपूजेचा पगडा आर्षांवर बसून इंद्रादी देवांना व वीरांना आर्ष लोक ईश्वर समजू लागले व या ईश्वरांना स्त्रिया प्रथम अर्पण करू लागले. आर्ष ह्या चालीचा अवशेष अद्यापही आपणा महाराष्ट्रीयांत व इतर भारतीयांत जारीने प्रचलित आहे. विवाहात लाजाहोम म्हणून एक होम करीत असतात. या होमाची सर्व प्रक्रिया वधूची देवांच्या हक्कांतून मुक्त करण्यासंबंधाची आहे. आश्वलायन गृह्यसूत्रांतून ही सर्व प्रक्रिया क्रमवार येथे देतो व समाजशास्त्रदृष्ट्या तिचा अर्थ करून दाखवितो. अर्यमन् , वरुण आणि पूषन् या तीन देवांचा ताबा ऊर्फ पाश वधूवर होता. त्या पाशांतून तिला मुक्त करण्याचा वराने संकल्प केला. तेव्हा प्रथम देवांच्या साक्षात् कैचीतून वधूला काढून आणून वराने तिला एका बळकट शिळेसन्निध आणिले आणि म्हटले की इमं अश्मानं आरोह, अश्मेब त्वं स्थिरा भव, सहस्व पृतनायतः, अभितिष्ठ पृतन्यतः ॥ आश्वलायनगृह्यसूत्र, अ. १, खंड ७, सूत्र ७. ह्या शिळेवर चढ, शिळेप्रमाणे स्थिर हो आणि शत्रूंना हतप्रभ कर व तोंड दे. वराने आपल्या ताब्यातून काढून वधू नेलेली पाहून देव क्रोधायमान झाले व ते वधूवरांवर चालून आले. तेव्हा वधूचा भाऊ जवळ साहाय्यार्थ होता. त्याने मध्यस्थी करुन गोष्ट हाणामारीपर्यंत येऊ दिली नाही. त्याने रदबदली करून वराने पळविलेल्या वधूच्या मोबदला भाजलेल्या लाह्या दंड म्हणून देण्याचे कबूल केले व देवांच्या कचाट्यातून बहिणीची मुक्तता केली. ह्या दंडालाच अवदान म्हणून पारिभाषिक नाव आहे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
हा हक्क कसा उत्पन्न झाला याचा अंदाज करता येतो. देवसमाज व आर्ष समाज हे दोन प्रातिवेशिक समाज असत. देवसमाज बलिष्ठ पडल्यामुळे त्याने आर्ष समाजाला आपल्या कह्यात आणले आणि आर्षांच्या सर्व चीजवस्तेवर व मालमत्तेवर ताबा मिळविला. आर्षाची मुख्य मालमत्ता म्हणजे त्यांच्या गुलामवजा स्त्रिया. त्यांच्यावरही देवांचा ताबा बसला, आणि तो ताबा इतका प्रखर बसला की स्त्री जन्मली की तिच्यावर कोणातरी देवाचे स्वामित्व चालू होई. देवांच्या ह्या अग्रहक्कातून मुक्त व्हायचे म्हणजे त्यांना आर्ष लोक नुसते हिरवे धान्य नव्हे तर उत्तम भाजलेल्या धान्याच्या लाह्या व साचलेले तूप देत व आपल्या मुली देवांच्या ताब्यातून सोडवून आणीत, हा देवांचा अग्रोपभोगाचा हक्क म्हणजे Medieval feudal युरोपातील Prelibation चा हक्क होय. Prelibation म्हणजे अग्रोपभोगाचा हक्क. This right of Prelibation has been in use in many fiefs and until a very recent epoch, certain lords of the Netherlands of Prussia, and of Germany still claimed, in our own days. In a French:Titledeed of 1507 we read that the Count d'Eu has the right of prelibation in the said place when anyone marries. Even ecclesiastics claimed the right in their quality of feudal lords (Letourneau).
(हा अग्रोपभोगाचा हक्क अनेक सरंजामी वतनात चालू होता. अगदी आधुनिक कालापर्यंत आणि प्रशियाच्या नेदर्लेडमधील आणि जर्मनीतील काही लॉर्ड आजही हा आपला हक्क असल्याचे सांगतात. १५०७ सालच्या फ्रान्समधील एका सनदेत काउंट ड'ल्यू याला त्या भागात होणा-या विवाहांत अग्रोपभोगाचा हक्क असल्याचा उल्लेख आहे. धर्मगुरूसुद्धा सरंजामदार या नात्याने हा हक्क असल्याचा दावा करीत.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(६) संकीर्ण समागम व उघड्यात समागम या दोन रानटी चालींप्रमाणे प्राचीन आर्षलोकांत तिसरी एक वन्य चाल आहे. आपल्या समाजाहून कर्तृत्वाने, सामर्थ्याने व ऐश्वर्याने जो समाज अतीच अती श्रेष्ठ असेल, त्या समाजातील पुरुषांशी स्वस्त्रियांचा समागम झाल्यास भूषण मानणारे काही निकृष्ट समाज नुकते परवापरवापर्यंत होते.
In Tasmania it was thought an honour for women to prostitute themselves to Europeans, who were ennobled in the eyes of the natives by the prestige of their superiority (Letourneau). (टास्मानियात युरोपियन पुरुषाबरोबर संबंध असणे हा स्त्रीचा मोठेपणा मानला जाई; हे कारण तद्देशीय लोकांच्या दृष्टीने त्यांच्या उत्तमपणामुळे त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालेले होते.) टास्मेनियन लोकांना जो युरोपियन लोकांचा दरारा, आदर, प्रेम वाटे तसलाच दरारा आदर व प्रेम आर्ष मानवांना देव म्हणून कोणी लोक होते त्यांचे वाटे. देवांनी जर कोण्या मानव स्त्रीच्या ठायी गर्भाधान केले, तर आपले भाग्य शिखरास पोहोचले असे प्राचीन आर्षांना वाटे. ह्या समजुतीचे प्रमाणक असे दाखले भारतात व हरिवंशात इतके आहेत की त्याचे परिगणन करण्याची अपेक्षा विशेषशी आपल्या देशात कोणाला वाटणार नाही. इंद्रापासून, यमधर्मापासून, नासत्यांपासून, अग्नीपासून, वायूपासून व इतर देवांपासून आर्ष स्त्रियांना संतती झाल्याच्या कथा विपुल आहेत. देवसमाजासंबंधाने आर्ष लोकांना इतका काही दरारा वाटे की आर्ष लोकांत स्त्री अपत्य जन्मले की त्या वर देवांचा हक्क ते प्रथम कबूल करीत. स्त्री-अपत्य दोन वर्षांचे होईपर्यंत तिच्यावर अमुक देवाचा हक्क, चार वर्षाचे होईपर्यंत अमुक देवाचा हक्क आणि सहा वर्षांचे होईपर्यंत अमुक देवाचा हक्क असे जन्मापासून आर्ष स्त्रियांवर देवांचे अग्र हक्क असत.
सोमः प्रथमो विवेदे गंधर्वो विविद उत्तरः । ऋग्वेद
तृतीयो अग्निष्टे पति स्तुरीयस्ते मनुष्यजाः ॥ १०।८५।४०
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
लोकान्तात मैथुन करण्याची चाल कधीतरी अस्तित्वात असल्याबिगर, ते एकान्तात करण्याचा निर्बेध घालण्याची आवश्यकता भासली नसती. आर्ष लोकांत लोकान्तात मैथुन करण्याची चाल असल्याचा सुगावा अयोनिज या शब्दात सापडतो. द्रौपदी; सीता वगैरे अनेक व्यक्तींची उत्पत्ती अयोनिज झाल्याची वर्णने आहेत. अयोनिज या शब्दाचा अर्थ काय ? अयोनिज म्हणजे स्त्री-योनीपासून न झालेले अपत्य असा उत्ताना अर्थ करतात, परंतु असा अर्थ करणे समंजस नाही, स्त्रीयोनिव्यतिरिक्त प्रजा होणे ज्या अर्थी अशक्य आहे त्या अर्थी हा उत्तानार्थ खरा अर्थ नव्हे, हे स्पष्टच होते. अयोनिज या शब्दाचा खरा अर्थ खालीलप्रमाणे आहे. योनि या शब्दाचा अर्थ गृह असा मुळात आहे व वेदांत या अर्थाने हा शब्द योजिलेला आढळतो. आरोहंतु जनयो योनि अग्रे (तैत्तिरीय आरण्यक प्रपाठक ६, अनुवाक १). स्त्रिया आधी घरात शिरोत, असा अर्थ आहे. योनिज म्हणजे घरात जन्मलेले मूल व अयोनिज म्हणजे घरात न जन्मलेले म्हणजे घराबाहेर जन्मलेले. घराबाहेर जन्मलेले म्हणजे कोठे जन्मलेले ? तर यज्ञमंडपात जन्मलेले. ऋषी वामदेव्यव्रत करीत आणि ही व्रते यज्ञभूमीवर करीत असताना कोण्याही स्त्रीने संभोगेच्छा दर्शविली असता ती तेथल्या तेथे पूर्ण करीत. वामदेव्यव्रताचे मंत्र छांदोग्योपनिषदात दिले आहेत. असल्या ह्या व्रताच्या वेळी जे मूल जन्मास घातले गेले त्या मुलास अयोनिज मूल म्हणजे घराबाहेर जन्मास घातलेले मूल म्हणत. यज्ञभूमीवर उघड्यात संभोग केल्याची उदाहरणे महाभारतात आहेत. तात्पर्य, आर्ष लोकांत उघड्यात समागम करण्याची चाल एके काळी होती व तिचा अवशेष म्हणून यज्ञभूमीवर वामदेव्यादी व्रते करताना समागम करण्याची चाल शिल्लक राहिलेली दिसते.