Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

शत्रूंच्या अंगावर देव आग पाखडीत त्यांना पिटाळून लावीत हे रानटी ऋषिपूर्वज शेकडो वर्षे पाहत होते; परंतु ही आग ते कशी निर्माण करीत व कोठून आणीत ते ऋषिपूर्वजांना कळत नसे. देवांनाही रानटी ऋषिपूर्वजांना अग्नी उत्पन्न करण्याचे गुह्य आपण होऊन परोपकारबुद्धीने कधी सांगितले नाही, सांगितले असते तर देवांचा श्रेष्ठपणा राहिला नसता. कदाचित् देवांनी मानवांना ते गुह्य सांगण्याचा प्रयत्न केला असता, तरी ते रानटी माणसांना कळले असते की काय याचा संशय आहे. उदाहरणार्थ, सध्याचा गनकॉटन घ्या. सध्याचा युरोपियन माणूस गनकॉटन निर्माण करू शके व त्याच्या जोरावर कमतर सुधारलेल्या लोकांचा पाडाव करतो. अरब, अफगाण, हिंदू, चिनी हे लोक युरोपियन माणसाचा हा प्रभाव पाहतात, परंतु गनकॉटन तयार कसा करावा हे या लोकांना माहीत नसते. यद्यपि परोपकारबुद्धीने युरोपियन माणसाने गनकॉटन कसा तयार करतात याची माहिती रानटी हिंदू, मुसलमान किंवा चिनी माणसाला दिली, तत्रापि हिंदू वगैरे कमतर सुधारलेल्या लोकांना गटकॉटन तयार करता येणे निखालस अशक्य असते; कारण गनकॉटन नावाचा अग्नि निर्माण करण्याला जे शास्त्रीय ज्ञान व शास्त्रीय अवजारे व हत्यारे व औते लागतात त्याचे स्वप्नही हिंदू, अरब, अफगाण वगैरे सध्याच्या रानटी द्विपादांना नसते. अर्थात्, गनकॉटन करण्याचे गुह्य यद्यपि व्याख्यानांनी, पुस्तकांनी किंवा साक्षात् कारखान्यातून पढवून या लोकांना सांगितले तथापि तो स्वदेशात स्वतंत्रपणे तयार करण्याची ऐपत या लोकांना नसते. तोच प्रकार रानटी ऋषिपूर्वजांचा असे. देव शत्रूवर आग पाखडीत व त्यांचा पराभव करीत हे ऋषिपूर्वज पाहत, परंतु ही आग कशी तयार करावी, अग्नी वेळ पडेल तेव्हा कसा उत्पन्न करावा, कोणती इंधने उपयोगात आणावी वगैरे वनस्पतिज्ञान, पुढील तजवीज अगाऊ करून ठेवण्याची नैतिक बुद्धी ज्वालाग्राही इंधनाचा साठा करण्यास लागणारी निवा-याची घरे, वगैरे पूर्वतयारी रानटी ऋषिपूर्वजांजवळ नसल्यामुळे, देवांच्या क्लृप्त्या माणसांना पेलता येण्यासारखा नव्हत्या. पुढे वन्य ऋषिपूर्वज गुहा सोडून झोपड्या करून जेव्हा राहण्याच्या पायरीला आले, जळाऊ इंधने कोणती हे अनुभवजन्य शास्त्रज्ञान जेव्हा त्यांना त्यांच्या स्वत:च्या मेहनतीने आले, आणि पुढील संकटांना तोंड देण्याकरिता अगाऊ जय्यत तयारी करून असावे लागते, हे नीतिज्ञान जेव्हा त्यांनी संपादन केले, तेव्हा अगीचे स्वामित्व ऋषिपूर्वजांना येऊन, त्यांची सुधारणेच्या कामात उत्तरोत्तर प्रगती होत गेली. अगदी प्रथम ऋषिपूर्वज अग्नी कसा तयार करीत त्याचे दिग्दर्शन ऋग्वेदात केलेले सापडते. अग्नी हा दहा बहिणींचा पुत्र होय, अशी कव्योक्ती आहे. दश स्वसारो अग्रुवः समीचीः पुमांसं जातमभि संरभंते (ऋग्वेदसूक्त २६३ ऋचा १३).

जाळून पोळून राखरांगोळी करणा-या व मागे सर्व रान काळेकुट्ट करून टाकणा-या अग्नीला कृष्णवर्मा हे उपपद ऋग्वेदात बहुत स्थली दिलेले आहे. कोलितांचा ऊर्फ कुलिशांचा ऊर्फ जळक्या कोळशांचा श्वापदांना भेवडविण्याच्या कामी उपयोग करण्याची क्लृप्ती यद्यपि वनचर ऋषिपूर्वजांना गावली तत्रापि त्या क्लृप्तीचा उपयोग उन्हाळ्यात रानांना वणवा लागेल तेव्हाच तेवढा करता येण्याजोगा असे, आयती कोलिते मिळण्याचे असले सुप्रसंग फारच क्वचित् व फार झाले तर दोन अडीच महिने मिळण्याचा संभव असल्यामुळे वर्षाच्या बाकीच्या दहा महिन्यांत ऋषिपूर्वज इतर पशूंइतकेच दुबळे असत. ह्या दुबळेपणात शेकडो वर्षे काढल्यावर, वणव्याने पेटलेले ओंडके डोंगरातील गुहांतून जळके राखून ठेवण्याची क्लृप्ती सुचली. ह्याच क्लृप्तीला अनुलक्षून ऋग्वेदात गुहाहितः, गुहायां निहितः ही विशेषणे अग्नीला लावलेली आहेत.गुहाहित म्हणजे गुहांत राखून ठेवलेला अग्नी, डोंगरकपारीतील गुहेच्या बाहेर मैदानात किंवा नदीतीरी किंवा इतरत्र हवा तेथे वाटेल तेव्हा वाटेल त्या ऋतूत उपयोगास आणता येत असे. हीही अडचण अकलेच्या जोरावर रानटी ऋषिपूर्वजांनी कालांतराने काढून टाकली. ऋषिपूर्वजांचा अत्यंत पहिला पूर्वज कोणी अंगिरस या नावाचा पुरुष होऊन गेला. त्याने गुहेत जतन करून ठेवलेल्या अग्नीस गुहेच्या बाहेर आणून लोकांत आणून सोडले म्हणून ऋग्वेदात अनेकदा उल्लेख आलेले आहेत. ते ऋग्वेद वाचणा-यात इतके प्रसिद्ध आहेत की, त्यांचे संदर्भ देऊन कालहरण करीत नाही. जेव्हा ऋषिपूर्वज गुहांतूंन म्हणजे डोंगरातील भुयारातून वसती करून असत व खाली मैदानातून झोपड्या करून राहण्याची कला त्यांच्यात निर्माण झाली नव्हती, तेव्हा सतत उपयोगी पडावा म्हणून ते अग्नीचे रक्षण सहजच गुहातून करीत. पुढे झोपड्यातून राहण्याची कला माहीत झाल्यावर गुहेत अग्नी न ठेविता, ते तो झोपड्यातून ठेवू लागले. ही झोपड्यातून अग्नि ठेवण्याची क्लृप्ती समाजात प्रथम अंगिरसाने काढिली. गुहेत जोपर्यंत अग्नी ठेविला जात असे, तोपर्यंत शत्रूवर फेकण्यासाठी कोलिते आणण्यास वारंवार गुहेकडे जावे लागे आणि प्रसंगी गुहेतील अग्नी वेळेवर हाती येण्यापूर्वी हिंस्त्र पशू व त्याहून हिंस्त्र असे जे दस्यू ते ऋषिपूर्वजांना इजा करून निघून जात. झोपड्यातून अग्नी ठेवण्याची जेव्हा क्लृप्ती निघाली, तेव्हा शत्रूला वाटेल तेव्हा तोंड देण्याचे सामर्थ्य ऋषिपूर्वजांत आले. ह्यापूर्वी शत्रूंवर अग्नीचा उपयोग इतर श्रेष्ठ लोकांनी केलेला ऋषिपूर्वजांनी पाहिलेला होता. रानटी ऋषींहून जास्त सुधारलेले देव म्हणून कोणी लोक असत. यथा वै मनुष्या एवं देवा अग्र आसन् (तै. सं. का. ७ प्र.-४-अनुवाक २). ते दस्यूंचा पाडाव आग टाकून करीत. अयं अग्निः पृतनाषाट् सुवीरो येन देवासो असहन्त दस्यून् (ऋग्वेद सूक्त २६३ नववी ऋचा). हा अग्नी दस्यूंची सैन्ये मारून काढितो, याच्या साहाय्याने देवांनी दस्यूंचा पुरातन काली पाडाव केला, असे वर्णन वैदिक ऋषींनी केलेले आहे.

(२) ऋषींचे अतिप्राचीन पूर्वज वानरीय पाशवावस्थेत असताना, वानरांप्रमाणेच त्यांनाही झाडे, पर्वतांचे कपरे, गुहा वगैरेंच्या आश्रयाने राहून हिंस्त्र पशूंपासून, वादळांपासून व थंडीवा-यापासून आपला बचाव मोठ्या संकटाने करावा लागे. अशा दुरवस्थेत पशूंहून व पक्ष्यांहूनही कष्टतर स्थिती पशुतुल्य ऋषिपूर्वजांची असे. जी दुरवस्था गाई, बकरी किंवा हरणे यांची व्याघ्रसिंहादी हिंस्त्र श्वापदांच्या पुढे होते, त्याहूनही अधम अवस्था पाशवावस्थेतील मनुष्याची असे. हरणे वगैरेंचा बचावकरिता शिंगे, दाढा, टापा वगैरे सहज शस्त्रे तरी असतात, मनुष्यांना तीही नाहीत. फक्त अकलेचे शस्त्र तेवढे मनुष्याजवळ जास्त, तेही बाह्य साधनाभावी प्रसंगी अत्यंत पंगू ठरते. अशा पंगू व दुबळ्या स्थितीत प्राचीन ऋषिपूर्वजांत मृत्युसंख्या किती भयंकर असेल तिची कल्पनाच करावी. अरण्यातील वानरांची वाढ ज्या अल्प प्रमाणावर होत असलेली आपण पाहतो तेच किंवा त्याहूनही अल्पतर प्रमाण पाशवावस्था माणसाच्या लोकसंख्येच्या वाढीचे असे. यूथातील लोकसंख्या जेमतेम आहे तितकी टिकली म्हणजे महद्भाग्य. मनुष्याची अशी किरकोळ संख्यावृद्धीची किती हजार वर्षे गेली असतील ते सांगवत नाही. कालांतराने हजारो टक्केटोणपे खाऊन व लाखो अवलोकनें करून व करोडा वेळा फसवून मनुष्याच्या, म्हणजे सर्वच मनुष्यांच्या नव्हे तर वैदिक ऋषि ज्यांच्यापासून जन्मले त्या पाशवप्राय ऋषिपूर्वजांच्या, उष्णकाली अरण्यात सहज पेटणा-या दावाग्नीने दग्ध झालेल्या वनस्पतींच्या निखा-यांची धग सहन न होऊन कृमिकीटक व गजव्याघ्र जीव घेऊन पळतात, ही बाब लक्षात आली व तिचा अनुभव घेऊन पाहण्याची कित्येक कल्पक ऋषिपूर्वजांना सुदैवाने बुद्धी झाली. रानातील जळकी कोलिते हत्ती, वाघ, सिंह, हरणे इत्यादींच्या अंगावर फेकिली असता, ती श्वापदे मनुष्याच्या वा-याला उभी रहात नाहीत, हा अनुभव ऋषिपूर्वजांनी प्रथम मिळविला. स्वसंरक्षणार्थ व शत्रुनिर्दालनार्थ कोलितांचा उपयोग करण्याचा शोध लागल्या दिवसापासून, पशुप्राय ऋषिपूर्वजांची उत्तरोत्तर आस्ते आस्ते संस्कृतीत प्रगती होत गेली. दावाग्नीने भडकणा-या रानांचे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. 

प्रकरण ४ थे
अग्नि व यज्ञ

(१) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास व पारंपरिक तपशील सांगावयाचा म्हटला म्हणजे अग्नि ह्या पदार्थाचा थोडासा सामाजिक इतिहास सांगावा लागतो. अग्नीला साक्ष ठेवून सध्याचे भारतवर्षीय त्रैवर्णिक हिंदू लोक विवाहसंपादन करतात. अग्नीची साक्ष नसेल, तर तो विवाह धर्म्य समजला जात नाही. येथे असा प्रश्न उद्भवतो की, अग्नीचा व विवाहाचा संबंध काय ? विवाहाग्नी, गृह्याग्नी, आवसथ्याग्नी, औपासनाग्नी इत्यादी शब्दांत विवाह व अग्नी, गृह व अग्नी, उपासना व अग्नी ह्या द्वंद्वाचा नित्य संबंध सांगितलेला आढळतो तो काय म्हणून ? अग्नीने रानटी आर्यांचे असे कोणते कार्य केले होते की जेथे तेथे त्यांनी अग्नीचे आवाहन करावे ? इत्यादी प्रश्नांना उत्तर द्यावयाचे म्हणजे रानटी आर्यांची पुरातन काळी सामाजिक व भौम स्थिती काय होती ते पाहावे लागते.

(३) द्वापारयुगी मिथुनावस्था समाजाला आली. काही काल स्थिर राहणा-या जोडप्यांनी प्रजोत्पादन करण्याची पद्धती उदयास आली. त्रेतायुगात सर्व मुले सर्व समाजाची ऊर्फ सबंध टोळीची समजत. सर्व बाप्ये हे सर्व मुलांचे बाप आणि सर्व स्त्रिया सर्व मुलांच्या आया एवढाच संबंध त्रेतायुगात अस्तित्वात होता. द्वापरयुगात मिथुनावस्था प्रचलित झाल्यावर मुलाचा बाप अमुक व आई अमुक इत्यादी वैशिष्टीकरण आस्ते आस्ते उद्भूत झाले. आणि-

(४) कलियुगात द्वंद्वावस्था म्हणजे विवाहसंस्था प्रचलित झाल्यावर पिता, पुत्र, भ्राता, भगिनी, चुलता, मामा, आई, पणजी इत्यादी वर्तमानकालीन नाती क्रमाक्रमाने समाजाच्या अनुभवास येऊ लागली. एकंदरीत भीष्मांनी वर्णिलेल्या निरनिराळ्या युगांतील स्थिती ऐतिहासिक आहे, व इतक्या प्राचीन काली ती इतक्या उत्कृष्ट त-हेने मांडल्याबद्दल त्या थोर बुद्धिमान पुरुषाचे आपण ऋणी आहोत. द्वापरयुगी मिथुनधर्म प्रचलित झाला म्हणून सांगितले. तत्संबंधी तपशीलवार विवेचन पुढील निबंधात करू.

(२) त्रेतायुगात अन्योन्यस्पर्श म्हणजे हाताने किंवा अंगुलीने परस्परस्पर्श करून संभोगेच्छा दर्शविण्याची चाल टोळीतील समाजास मान्य झाली. ह्या हस्तादिकांच्या स्पर्शनावरून कालांतराने भारतीयांत जी विवाहसंस्था परिणत झाली तीतील विवाहास पाणिपीडन किंवा हस्तग्रहण हे नाव पडलेले आहे. आश्वलायन गृह्यसूत्रातील पहिल्या अध्यायाच्या सातव्या खंडात विवाहविधीची प्रक्रिया सांगितली आहे. तीत, (१) गृभ्णामि ते सौभगत्वाय हस्तं इति अंगुष्ठमेव गृहणीयाद् यदि कामयति पुमांस एव मे पुत्रा जायेरन्निति, (२) अंगुलीरेव स्त्रीकामः, आणि (३) रोमान्ते हस्तं सांगुष्ठ मुभयकामः, असे तीन प्रकार स्पर्शाचे ऊर्फ पाणिपीडनाचे दिले आहेत. म्हणजे मुलगे पाहिजे असल्यास नव-याने नवरीचा अंगठा धरावा, मुलगी पाहिजे असल्यास फक्त अंगुळ्या धराव्या, आणि दोन्ही पाहिजे असतील तर केसापर्यंतचा हात अंगठ्यासह धरावा. आश्वलायन गृह्यसूत्रातील ह्या तिन्ही त-हा त्रेतायुगातील स्पर्शावस्थेतील आहेत. त्रेतायुगात एक रानटी टोळी पुरुषप्रधान असून तिच्यात धरून आणिलेल्या स्त्रीचा अंगठा पकडण्याची चाल होती. दुसरी टोळी स्त्रीप्रधान असून तिच्यात वेठबिगार करून नवरी मिळविणारा नवरा नवरीच्या फक्त अंगुल्या अलगत धरी, आणि तिसरी एक टोळी स्त्रीपुरुषांचे समानत्व मानणारी होती. तीत नवरीचे मनगट नवरा खुशाल धरी. हे तिन्ही समाज एकवटून वैदिक समाज बनला, आणि अर्थात् या तिन्ही चाली वैदिक समाजात प्रचलित असलेला गृह्यसूत्रकार जो शौनक त्याने नमूद करून ठेविल्या. पुरुषप्रधान समाज अंगुष्ठ धरी, सबब अंगुष्ठ धरिले असता मुलगे होतात अशी भावना झाली. स्त्रीप्रधान टोळी अंगुल्या धरी, सबब अंगुल्या धरिल्या असता मुली होतात असा समज फैलावला, आणि तिसरी टोळी, अंगुष्ठ, अंगुली व मनगट धरी, त्यावरून मनगट धरिले असता मुली व मुलगे दोन्ही होतात अशी समजूत रूढ झाली.

(९) (१) भीष्मांनी वर्णिलेली कृतयुगातील संकल्पावस्था-म्हणजे वेळेस वाटेल त्या स्त्रीपुरुषांचा वाटेल त्या स्त्रीपुरुषांशी समागम होणे-केवळ काल्पनिक अशी भीष्मांनी आपल्या डोक्यातूत काढलेली नाही. अशी संकल्पावस्था अद्यापही वन्य मनुष्यांत आढळते. The indigenous Indians of California, who are among the lowest of human races, couple after the manner of inferior mammals, without the least formality, and according to the caprice of the moment. कॅलिफोर्नियातील मूळ इंडियन, जे सर्वात खालच्या पातळीवरील माणसे आहेत, ते अतिशय कनिष्ठ सस्तन प्राण्याप्रमाणे संभोग करतात. त्यांना काहीही सभ्यता नसते आणि मनाला येईल तेव्हा ते संभोग करतात. (Evolution of Marriage by Letourneau Page 43, 3rd edition ).

(८) केवळ पाशवावस्थेत एक पुरुष व अनेक स्त्रिया असा समाज असे. नंतर यूथावस्थेत अनेक पुरुष व अनेक स्त्रिया सरमिसळ राहून समाज घटला. पुढे आवडनिवड सुरू होऊन मिथुनावस्था हळूहळू अमलात आली आणि शेवटी एक पुरुष आणि एक स्त्री अशी व्यवस्था बहुत प्रयासाने प्रचलित झाली. ती अद्याप भारतीय समाजात पूर्णपणे अमलात यावयाचीच आहे. हाच अर्थ शांतिपर्वाच्या २०७ व्या अध्यायात पुराणेतिहासज्ञ जे भीष्म त्यांनी खालील श्लोकांत वर्णिला आहे.
कृतयुगे ... ... ...॥

न चैषां मैथुनो धर्मो बभूव भरतर्षभ ।।
संकल्पादेवैतेषां अपत्यमुपपद्यते ॥ ३७ ।।
ततस्त्रेतायुगे काले संस्पर्शाज्जायते प्रजा ।।
न ह्यभून्मैथुनो धर्मस्तेषामपि जनाधिप ।। ३८ ॥
द्वापरे मैथुनो धर्मः प्रजानामभवन्नृप ।।
तथा कलियुगे राजन् द्वंद्व मापेदिरे जनाः ॥ ३९ ॥

(१) कृतयुगी स्त्री-पुरुषांच्या मनात आले म्हणजे समागम होत असे. आई, बाप, भाऊ, बहीण, हा भेद नव्हता. हीं यूथावस्था होय. (२) त्रेतायुगात स्त्रीपुरुषांनी अन्योन्य स्पर्श केला म्हणजे समाज त्या स्त्रीपुरुषांना तेवढ्यापुरता समागम करण्यास परवानगी देई. ही आवडीनिवडीची किंवा इष्टा-निष्टावरणावस्था होय. (३) द्वापरयुगी मैथुन-धर्म सुरू झाला. म्हणजे टोळींत जोडप्याजोडप्यांनी स्त्रीपुरुष राहू लागले, परंतु अद्याप या जोडप्यांना स्थिरावस्था प्राप्त झालेली नव्हती. (४) आणि कलियुगात द्वंद्वावस्था परिणतीस आली, म्हणजे विवाहसंस्था म्हणून जीस म्हणतात ती उदयास आली. इतक्या प्राचीन काली समाजशास्त्रीय परंपरा इतकी नामी सांगणा-या भीष्माविषयी सध्या देखील परम आदर उत्पन्न होतो !

(६) मित्राला अगर अतिथीला ऊर्फ पाहुण्याला दासी किंवा स्वस्त्री आदराने समर्पण करण्याची चाल सुदर्शनाच्या कालापासून तो पाणिनीच्या कालापर्यंत एका प्राचीनतम चालीचा अवशेष म्हणून राहिलेली आहे. प्राचीनतम रानटी टोळ्यांत स्त्री हा अर्थ इतर गाई, बैल, घर इत्यादी जिनगीप्रमाणे मालकाच्या म्हणजे पुरुषाच्या मालकीचा समजत असत. स्त्री ह्या वस्तूचा जिनगीत समावेश होत असे. अगदी अलीकडील जो कालिदास तो “ कन्या हि अर्थों परकीय एव" असे म्हणताना स्त्रियांना पर्यायाने अर्थात म्हणजे जिनगीत गोवितो. जिनगीचा म्हणजे मालकीच्या वस्तूचा मालक वाटेल तो विनियोग करू शकतो. म्हणजे विकणे, मारणे, ठार करणे, दान देणे, घालवून देणे, इत्यादी चाहेल तो विनियोग स्त्री या अर्थाचा रानटी माणूस करू शके. स्त्री हा जिन्नस मालकीचा समजला गेल्यावर तिला मित्रास किंवा आदरणीय पाहुण्यांस संभोगार्थ देऊन टाकण्याचा अधिकार सहजच उत्पन्न होतो.

(७) स्त्रियांवर पुरुषाची मालकी केव्हा उत्पन्न झाली ? मनुष्य हा पशुकोटीतील प्राणी आहे व त्याचे अगदी जवळचे सगेसोयरे पशू म्हटले म्हणजे वानर होत. वानरांतील हुप्या इतर लहानमोठ्या वानरांना मारून किंवा हाकलून कळपातील सर्व माद्यांवर प्रजापतित्वाचा हक्क बजावतो. म्हणजे हुप्या बहुपत्नीक असतो. पाशवदशेत माणूसही बहुपत्नीक असावा असे उपमानप्रमाणाने म्हणावे लागते. पुढे कालांतराने लढाया, मारामा-या, मित्रत्व इत्यादी कारणांनी पाशव दशेतील बहुपत्नीक माणसांच्या स्वसंरक्षणार्थ जूट, जमाव किंवा टोळ्या झाल्या. या टोळ्यांत सर्व नर सर्व माद्यांचे म्हणजे सर्व पुरुष सर्व स्त्रियांचे मालक बनले. टोळीतील सर्व स्त्रिया सर्व पुरुषांना सारख्याच उपभोग्य झाल्या. समजा की टोळींतील एखादा पुरुष किंवा काही पुरुष कोणत्याही कारणाने दूरदेशात परागंदा झाले, आणि कालांतराने पुनः स्वतःच्या टोळीची व त्यांची गाठ पडली, तर ह्या पाहुण्यांना टोळींतील स्त्रियांशी शरीरव्यवहार करण्यास कोणतीच अडचण टोळीतील स्त्रीपुरुष समाजाकडून पडणार नाही; कारण पाहुणे आपल्याच टोळीपैकी आहेत, अशी भावना असते. मुळात पाशव माणूस बहुपत्नीक होता. तो टोळ्या करून राहू लागल्यावर बहुपत्नीकत्व व बहुपतित्व टोळ्यांत उत्पन्न झाले. अशा समाजात पुढे आवडनिवड उत्पन्न होऊन मिथुनधर्माने राहण्याची चाल आस्ते आस्ते मागे पडली, परंतु नैसर्गिक पुराणप्रियतेमुळे पूर्वीची बहुपत्नीत्व ही चाल एकाएकी मोडवेना. सबब, जुना मित्र किंवा परागंदा झालेला दूरदेशस्थ पाहुणा आल्यास त्याला स्वतःची नवीन मिथुनधर्मस्थ स्त्री जुन्या यूथधर्मातील सामान्य पतित्वाच्या चालीला मान देऊन आदराने समर्पण करण्यात लोक भूषण व संभावितपणा मानू लागले. ही चाल पाणिनीपर्यंत व पेशवाईपर्यंत थोडीफार अवशिष्ट राहिली. समाजशास्त्रांतील एक नियमच आहे की, चाली मरता मरत नाहीत, मोठ्या पराकाष्ठेच्या चिवट असतात.

(४) यापुढील पायरी म्हणजे अतिथीला स्त्रीनिवेदन न करण्याची. ह्या पायरीचे उत्कृष्ट उदाहरण म्हटले म्हणजे सर्व प्रसिद्ध जमदग्नीचे. जमदग्नीची बायको रेणूका हिने चित्ररथ गंधर्वाकडे नुसते सकामदृष्टीने पाहिले, तेणेकरून कोपाविष्ट होऊन जमदग्नीने आपला मुलगा परशुराम याजकडून तिला ठार केले. मानसिकही व्यभिचार ज्याला खपला नाही, त्या जमदग्नीने अतिथीला स्वस्त्रीसमर्पण कितपत सहन केले असते ते सांगावयाला नकोच. सुदर्शनाच्या कथेत अतिथीला संभोग देणे हे दोघा नवराबायकोंना संमत होते. गौतमाच्या कथेत स्वस्त्रीदान नव-याला पसंत नव्हते, परंतु बायकोला व मुलाला पसंत होते. परशुरामाच्या कथेत बापाला व मुलाला दोघांनाही स्वस्त्रीसमर्पण नापसंत होते, स्वतः स्त्रीला पसंत होते किंवा नाही ते सांगवत नाही.

(५) या पुढील पायरी राम व सीता यांची. रावण अतिथीचा वेश घेऊन सीतेपुढे आला व तिला तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने घेऊन पळाला. अतिथीला स्वशरीर समर्पण करण्याची चाल जर सीतेला मान्य असती, तर रामायणाचा पुढील कथाभाग झालाच नसता. रामाला व लक्ष्मणाला व तत्कालीन तमाम भारतीय समाजाला ही स्त्रीसमर्पणाची चाल बरीच गर्ह्य वाटू लागत चालली होती. तथापि पाणिनिकाली ह्या चालीचा किंचित् अवशेष तुरळक तुरळक राहिलेला होता हे द्वैमित्रि या तद्धितीवरून ताडता येते.