Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

(४) साम्राज्य, राष्ट्र, संपत्ती व वीर्यशाली प्रजा प्राप्त व्हावी एतदर्थ अश्वमेध यज्ञ करण्याचा प्रघात असे. यज्ञात स्त्रीपुरुष असा सर्व प्रकारचा समाज जमे. अध्वर्यु, उद्गातृ, होता असे ऋत्विज पुरुष असत व महिषी, यजमान-पत्नी इत्यादी स्त्रिया असत. पैकी वीर्यशाली प्रजा उत्पन्न व्हावी या कामनेच्या सिद्धयर्थ खालील नाटक केले जात असे. अश्वमेधातील घोडा मृत होऊन पडल्यावर तेथे राजपत्न्यांना बोलावून आणीत. राजपत्न्यांपैकी मुख्य जी पट्टराणी ती आपल्या आईला किंवा सपत्न्यांना उद्देशून म्हणे की, बायांनो, हा मेला घोडाच माझ्याशी निजेल; कारण, मला अभिगमनार्थ दुसरा कोणीच की गे नेत नाही. पट्टराणीची ही तक्रार ऐकून, घोडा खडखडून जागा होतो व पट्टराणीला म्हणतो, ये, येथे हे क्षौमवस्त्र म्हणजे सोवळ्याचे वस्त्र अंगावर घेऊन आपण निजू. त्याला रुकार देऊन पट्टराणी म्हणते, मी तुजपाशी गर्भधारणार्थ आले, तूही मजकडे गर्भ पेरण्यास ये, आपण पाय पसरून निजू, घोडा आणि पट्टराणी ही एकमेकांशेजारी पडल्यावर प्रतिप्रस्थाता म्हणतो की, हा घोडा रेतःसिंचन करो व तुझी योनी रेतोधारण करो. असा मंत्र म्हणून, ऋत्विज घोड्याचे लिंग राणीच्या योनीजवळ आणी, आणि म्हणे की, मांडीवर मांडी ठेव, आणि लिंग योनीत घाल. स्त्रियांना लिंग जीव की प्राण आहे. लिंग भोकाला झवते, ते स्त्रियांना प्रिय असते; कारण ते योनी कुटते, आणि स्त्रियांच्या काळ्या भोकातील दाण्याला हाणते. हे नाटक झाल्यावर राणी म्हणते, बायांनो, मला कोणीच झवत नाही, सबब हा घोडा मजपाशी निजतो. त्यावर इतर स्त्रिया म्हणतात, रानात फाट्यांचा भारा उचलताना ढुंगण जसे पुढे करतात तशी तू आपली योनी पुढे उचल व तिचा मधला भाग वाढव. हे सर्व पट्टराणीने केले, तेव्हा घोडा निजला.

सबब जसे लोकांच्या तोंडून त्यांनी पाठ ऐकिले तसेच्या तसेच भ्रष्ट व अर्थहीन पाठ देणे त्यांना भाग पडले. उवट व सायण यांना तर ह्या प्रकरणातील बरेच शब्द व वाक्ये कळली नाहीत. इतकेच नव्हे तर प्राचीन समाजाच्या चालीरीतींचे ज्ञान नसल्यामुळे वाक्याचे भलतेच अर्थ त्यांनी लिहून ठेविले आहेत. उदाहरणार्थ, माता च ते पिता च ते अग्रं वृक्षस्य रोहतः या वाक्यातील वृक्ष या शब्दाचा अर्थ उवट मंचक असा करतो व सायण तल्प असा करतो. उवटकाळी व सायणकाळी स्त्रीपुरुषसमागम मंचकावर किंवा तल्पावर होत असे, सबब वृक्ष म्हणजे मंचक किंवा तल्प असा अर्थ त्यांनी केला ते रास्तच आहे. पाशवावस्थेतील वनचर मनुष्य वानरादी इतर पशुपक्ष्यांप्रमाणे प्रशस्त वृक्षांच्या शास्त्रावर समागम करीत ही कल्पना जर त्यांना अवगत असती, तर त्यांनी वृक्ष या शब्दाचा वाच्यार्थच घेतला असता, यात संशय नाही. असो. प्रकृत स्थल शब्दविषयक किंवा वाक्यविषयक विवेचन करण्याचे नव्हे. शब्द वाक्यविषयक जी थोडीशी टीका येथे केली ती एवढ्याच करिता की, शुक्ल व कृष्ण यजुःसंहितांच्या या प्रकारणांतील चालीरीती अत्यंत प्राचीनतम आहेत हे उत्कटत्वाने भासमान व्हावे. या प्राचीनतम चालीरीतींची नक्कल अश्वमेध यज्ञात यजुःसंहितारचनाकालीन व तदुत्तरकालीन याजक व यजमान संभावितपणे करीत असत व त्या अश्लील नकलेला कोणी नावे ठेवीत नसत. नक्कल जशीची तशी वठली पाहिजे नाही तर इष्टफलप्राप्ती चुकेल, असा सर्व समाजाचा समज असे. आता नकलेचा तपशील दोन्ही संहितात जसा दिला आहे तसाचा तसाच इथे मराठीत पूर्वापरसंबंध दाखविणारी वाक्ये घालून नमूद करतो. प्रथम कृष्णयजुःसंहितेतील पाठ घेतो.

प्रथमा रंभी रानटी ऋषिपूर्वज बहुतेक पशूंसारखे उघडे नागडे असत, पशुपक्षी ज्याप्रमाणे रतिकर्म उघड्यात किंवा झाडाझुडपांवर उरकतात त्याप्रमाणे हे पाशवावस्थ ऋषिपूर्वजही रतिकर्म उघड्यात किंवा झाडाझुडपांवर उरकीत. लिंगाला किंवा योनीला हात लावणे, अभद्र शब्द उच्चारणे इत्यादी अर्वाचीन दृष्टीला दिसणारे गलिच्छ प्रकार ह्या पशुतुल्य लोकांत असत. नंतर सुधारणा होऊन लोकांना अग्नी तयार करता येऊ लागला, तेव्हा अग्नीभोवती हे रानटी लोक रतिकर्म संपादित. वाटेल त्या स्त्रीला वाटेल त्या पुरुषाने रत्यर्थ धरून न्यावे हा त्या काली धर्म समजला जात असे. ज्या स्त्रीला कोणी धरून न नेई ती स्त्री हिरमुसली होई व रडे की आपणास कोणी धरून नेत नाही किंवा रतिसुख देत नाही. अशा स्त्रीस पश्वादीशी अभिगमन करण्याची मोकळीक असे. अशी ही स्त्रीपुरुषसमागमाची पद्धती रानटी ऋषिपूर्वजांत असे. ह्या पद्धतीची नक्कल रानटी ऋषींचे सुधारलेले यजुःकालीन वंशज येणेप्रमाणे करीत. अश्वमेध नावाचा एक यज्ञ असे. या यज्ञाची प्रक्रिया, फलश्रुती व दंतकथा यजुःसंहितेत दिल्या आहेत. पैकी सातव्या कांडाच्या चौथ्या प्रपाठकाच्या एकोणिसाव्या अनुवाकात राजपत्न्यांचा विलाप दिला आहे. शुक्लयजुःसंहितेत हाच विलाप तेविसाव्या अध्यायात दिला आहे. ह्या अनुवाकाला भाष्यकार विलाप म्हणतो, परंतु याला विलास हे नाव उत्तम शोभेल. ह्या विलासात्मक प्रकरणाचे कृष्ण व शुक्ल संहितांत कित्येक पाठ इतके भिन्न आहेत की त्यावरून एक निश्चित अनुमान करता येते, ते असे :-दोन्ही संहिता जेव्हा रचिल्या गेल्या तेव्हा खरे मूळ पाठ कोणते ते संहिताकारांनाही निश्चयात्मक माहीत नव्हते. उदाहरणार्थ, कृष्णयजुःसंहिताकार गृह असा पाठ देतो व शुक्लयजुःसंहिताकार गुद असा पाठ देतो. प्राचीन रानटी ऋषिपूर्वजांचा खरा मूळ पाठ काय होता तो दोन्ही संहिताकारांना माहीत नव्हता. निजल्गुलिति व निगल्गलीति, प्रसुलामि व प्रतिलामि इत्यादी पाठांतरांनाही हाच न्याय लागू आहे. तात्पर्य; ह्या प्रकरणात पूर्वपरंपरागत जी वाक्ये दिली आहेत ती अगदी अपभ्रष्ट होऊन गेलेली आहेत. यावरून असे अनुमान बांधता येते की, यजुःसंहितेचे कृष्ण व शुक्ल असे पाठ जेव्हा रचिले गेले तेव्हा ही पूर्वपरंपरागत वाक्ये इतकी जुनाट व भ्रष्ट होऊन गेली होती की संहिताकारांना खरे पाठ कोणते ते ठरविता येईना.

सोमस्याहं देवयज्यया सुरेता रेतो धिषीय इत्याह सोमो वै रेतोधाः तेनैव रेत आत्मन्धत्ते । सोमाच्या देवयज्येने प्रभूतरेतस् होऊन रेत धारण करीन असे यजमान म्हणतो, कां की सोम रेत उत्पन्न करणारा आहे. त्या सोमरसाने यजमानाच्या ठायी रेत साठते. येथे उत्तानार्थ असा आहे की सोमनामक मादक रस प्राशन केला असता माद येऊन रतिक्रिया मनसोक्त होत असे. सबब प्राचीन ऋषिपूर्वज तो सोमरस यथेच्छ पीत व त्याच्या अमलात मनमुराद निर्भयपणे स्त्रीसमागम करीत. सोमरसाचा हा जो माद आणून यथेच्छ रतिकर्म संपादण्यास समर्थ करण्याचा गुण सोम या देवतेचा आहे असा यजुर्वेदकालीन ऋषींचा समज होता. असाच समज बर्हीसंबंधाने त्या ऋषींचा होता. रानटी ऋषिपूर्वज आगटी व धुमी पेटविताना पेटविल्यावर काटक्या, समिधा, डावल्या, गवत, मद्य इत्यादी ज्या ज्या साधनांचा उपयोग करीत, ती ती सर्व साधने त्या रानटी ऋषीचे वंशज जे ऋक्कालीन व यजुकालीन ऋषी त्यांना देवतारूप वाटत. रानटी साधनांच्या साहाय्याने रानटी पूर्वजांनी घरे, दारे, संपत्ती, गाई, गुरे व विशेषतः प्रजा संपादन केल्या. त्या रानटी साधनांचा रानटी पूर्वज जो सहज उपयोग करीत त्या उपयोगाची नक्कल यज्ञ करणारे यजुःकालीन ऋषी हुबेहूब उठवून देत, आणि ती नक्कल बिनचूक केली म्हणजे फलप्राप्ती हटकून होईल अशी आशा बाळगीत. रानटी पूर्वज लाकडांवर लाकडे घासून अग्नी उत्पादन करीत म्हणून त्या रानटी पूर्वजांचे सुधारलेले वंशजही लाकडावर लाकडे घासून यज्ञार्थ अग्नी संपादन करण्याची नक्कल उठवून देत. सुधारलेल्या वेदरचनाकालीन ऋषींना गोव-या, चकमकी इत्यादी साधने उपलब्ध असत, परंतु त्या नव्या साधनांनी अग्नी भरदिशी न निष्पादिता, ते भोळ्या श्रद्धेने पूर्वजांनी ज्याप्रमाणे लाकडे घासून अग्नी सिद्ध केला त्याप्रमाणे अग्नी सिद्ध करीत. हेतु असा की, पूर्वजांना जी फलप्राप्ती ज्या प्रक्रियेने झाली ती फलप्राप्ती त्या प्रक्रियेवाचून होणार नाही. येथून तेथून सर्व यजुःसंहिता रानटी पूर्वजांच्या कृतीची नक्कल कशी करावी या एका बाबीने भरली आहे. अमुक कार्य करताना किंवा अमुक सामग्री मिळविताना पूर्वजांनी जागती किंवा शक्करी छंद म्हटला, सबब ते कार्य किंवा ती सामग्री मिळविण्याची कामना असल्यास जागती किंवा शक्वरी छंदच म्हटला पाहिजे, नाहीतर कार्य बिघडेल, असे इशारे यजुःसंहितेत जागजागी दिलेले आहेत. तात्पर्य, रानटी पूर्वजांची नक्कल अणुरेणूचीही चूक न होता उठली तरच इष्टकामना परिपूर्ण होईल अशी यजुःकालीन याजकाची समजूत असे. प्रस्तुत कलमातील विवेचन रानटी पूर्वजांच्या प्रजोत्पादनासंबंधाचे आहे, करिता रानटी पूर्वजांच्या प्रजोत्पादनक्रियेची नक्कल यजुःकालीन ऋषी कशी हुबेहूब करीत त्याचा एक मासला देतो.

(३) ऋषींच्या अंगिरस नावाच्या प्राचीन पूर्वजाने गुहेतून अग्नी मैदानातील झोपड्यात आणिला इत्यादी वर्णन मागील कलमात केले आहे. झोपड्यात अग्नी आल्यापासून ते जीवनयात्रेची साधने वृद्धिंगत होऊन सहजच पूर्वी जितकी होणे मुष्कील होते, तीहून जास्त प्रजावृद्धी होऊ लागली, यामुळे अंगिरसाला प्रजापति हे अभिधान सार्थ मिळाले. अग्निसिद्धीचा शोध व प्रजापतिसंस्था स्थापन ही दोन्ही समकालीन झाली. झोपड्यांत अग्नी सिद्ध करता येऊ लागल्यानंतर थोड्या अवधीने प्रजापतिसंस्था स्थापन झाली, अनेक स्त्रिया व एक प्रजापती असा तत्कालीन समाज असे. स्त्रियांच्या पोटी झालेल्या सर्वं प्रजेचा मालक यूथाचा वृषभ म्हणजे रेतःसिंचन करणारा जो प्रजापती तो असे. अनेक प्रजापती ऋषिपूर्वजांच्या समाजात निर्माण झाले. प्रजापती यूथातील स्त्रियांशी समागम अग्निकुंडाच्या समीप करी. त्या काली गाद्यागिर्द्या वगैरे संपन्न साधने आंथरापांघरावयास नसत. रानटी आर्यपूर्वज बर्हि नावाचे तृण अग्निकुंडाभोवती पसरून त्याच्यावर शयन व अभिमेथन करीत. तैत्तिरीयसंहितेच्या प्रथम कांडाच्या सातव्या प्रपाठकाच्या चौथ्या अनुवादात खालील वाक्य आले आहे : " बर्हिषा वै प्रजापतिः प्रजा असृजत ।” या वाक्याचा खरा वाच्यार्थ असा आहे की, बर्हिस नामक गवत आंथरून त्याजवर प्रजापतीने प्रजा उत्पन्न केल्या. रानटी ऋषिपूर्वज बर्हीचा बिछाना करीत, सबब प्राचीन रूढी म्हणून ती पूज्य होऊन बसली व तिचे वर्णन यजुर्वेदकालीन यज्ञकर्ते ऋषी पूज्यभावाने करू लागले. बर्हीच्या देवयज्येने प्रजापती प्रजावान् झाला, या विधानाचा अर्थ यजुर्वेदकालीन ऋषींना समजेनासा झालेला होता. काही अतर्क्य दैवी रीतीने बर्हि घेऊन प्रजापती प्रजा उत्पादन करीत, असा अर्थ यजुर्वेदकालीन ऋषी समजत, परंतु खरा अर्थ आम्ही वर जो सांगितला तो आहे. बर्हि आंथरून रानटी ऋषीपूर्वज त्यांचा बिछान्यावजा उपयोग करीत. उत्तानार्थ हाच आहे. याला याच अनुवाकात एक प्रमाण आहे. या अनुवाकात पुढे खालील वाक्य आले आहे.

ह्या सहाही वाक्यांत अग्नीने उपासकांस प्रजा द्यावी, पुत्र द्यावे, वीरसंतती द्यावी, अशी प्रार्थना केली आहे. पाचव्या वाक्यात तर आमचा हा यज्ञ प्रज्ञावान् होवो, अशी उत्कंठा दर्शविली आहे. प्रजा किंवा पुत्र दोन प्रकारचे असत. (१) पुंस्पुत्र व (२) स्त्रीपुत्र. पुत्र ह्या पुल्लिंगी शब्दाने मुली व मुलगे ह्या दोन्हींचा बोध ऋषिपूर्वजांच्या भाषेत होई. अग्नी प्रजा कशी देई, व यज्ञ पुत्रवान् व प्रजावान् कसा होई ही पृच्छा तृप्त व्हावयाची म्हणजे ऋषिपूर्वजांच्या समाजात पुरातनकाली जी एक चाल प्रचलित असे तिचे वर्णन करणे जरूर आहे. ऋषिपूर्वज थंड हवेच्या प्रदेशात राहत असत. दिवसा श्रमसाहस व स्वारी-शिकार केल्यावर उबा-याकरिता धगधगीत धुमीच्याभोवती येऊन बसत आणि तेथे ते पाशवावस्थ स्त्रीपुरुष ऋषिपूर्वज यभनक्रिया करीत. धुमीभोवती ऊर्फ अग्निकुंडाभोवती अतिप्राचीन आर्य स्त्रीपुरुष यभनक्रिया करीत. या विधानाला पोषक असे कृष्णयजुर्वेदातील व शुक्लयजुर्वेदातील साक्षात् काही मंत्र देतो व काही मंत्राचे तात्पर्य देतो. यजुर्वेदातीलच मंत्रावतरण करण्याचे कारण असे की ह्या वेदाचा मुख्य विषय त्याच्या नावाप्रमाणे यजुस् म्हणजे यज्ञ हा आहे. यजुर्वेदात अग्नी चेतवून यज्ञ कसे करावे, कां करावे व यज्ञांची फलनिष्पत्ती काय, ह्या तीन बाबींचे ख्यापन केलेले आहे, व प्राधान्येकरून अग्नीचे स्तोम गायिलेले आहे.

अग्नीच्या साह्याने हिंस्त्र पशू व दुष्ट शत्रू यांचा प्रतिकार करता येऊ लागला, अग्नीच्या योगाने दाट जंगलाची चरती कुरणे करता आली, सबब अग्नी ह्या अजब वे अतर्क्य वस्तूवर आर्यपूर्वजांचे निरतिशय प्रेम ऊर्फ भक्ती बसली आणि अग्नी हा सुखकर्ता, दुःखहर्ता व विघ्ननिवारिता असा भासू लागला. अग्नी या सर्वतोपरी अत्यंत उपयुक्त वस्तूवर आर्यपूर्वजांची इतकी भक्ती बसली की खाणे, खेळणे, बसणे, उठणे, निजणे व प्रजोत्पादन करणे ते सर्व अग्नीच्या साक्षीने ते करू लागले. हे शेवटले व अत्यंत महत्त्वाचे जे प्रजोपादनाचे कर्म ते अग्निकुंडाभोवताली उबा-याच्या भूमीवर आर्यपूर्वज उरकीत, हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण, यज्ञ म्हणून जी संस्था आर्यपूर्वजांत पुढे उदयास आली तिचा उगम अग्नीकुंडाभोवती प्रजोत्पादनाचे जे कार्य चाले त्याच्याशी संबद्ध आहे. अग्नीपाशी ऋषिपूर्वज वारंवार आग्रहाने काय मागतात ते ऋग्वेदाच्या पाचव्या व सहाव्या मंडळातील चाळता चाळता सहज आढळणा-या काही वाक्यांचे अवतरण करून दाखवितो.
(१) स्यान्नः सू नु स्तनयो विजावा
(२) शग्धि वाजस्य सुभग प्रजावतः
(३) अयं अग्निः सुवीर्य स्येशे
(४) अग्ने तोकं तनयं वाजि नो दाः
(५) गो माँ अग्ने S विमाँ अश्वी यज्ञो
नृवत्सखा सदमिदप्रमृष्यः
इळावाँ इषो असुर प्रजावान् ।
दीर्घो रयिः पृथुबुघ्नः सभावान् ॥
(६) त्वदेति द्रबिणं वीरपेशाः ।

ह्या तीन ऋचातील (१) उल्का, (२) अश्मव्रजाः व (३) विदंत ज्योतिः ही तीन शब्दस्थाने प्रकृतार्थाला उपयुक्त आहेत. पणि नावाच्या शत्रूंनी अंगिरसाच्या अश्मव्रज गाई चोरून नेऊन डोंगराच्या गहृरात दडवून ठेविल्या. त्या गाईंना अग्नीच्या ज्योतीच्या उजेडाने अंगिरसांनी शोधून काढिले, असा दुस-या व तिस-या ऋचात मजकूर सांगितला आहे. अग्निं अर्चयन्तः ज्योतिः अविदन् म्हणजे अग्नीची सिद्धता करून अंगिरसांनी ज्योत तयार केली, आणि अंधारातील गाई त्या ज्योतीच्या उजेडाने शोधून काढल्या. येथे ज्योत म्हणजे चूड, चुडेचा उजेड असा अर्थ घेणे युक्त दिसते. पहिल्या ऋचेत उल्का म्हणजे चूड, कोलीत हा शब्द तर साक्षात् आलेला आहे. तात्पर्य, चूड पेटवून उजेड पाडण्याची कला ऋषिपूर्वजांना माहीत झालेली होती. तसेच मोठमोठ्या दगडांची आवारे करून त्यांत गाई वगैरे मालमत्ता ठेविण्याचाही प्रघात ऋषिपूर्वजांत असे. वरील ऋचांत अश्मव्रजाः हे उस्त्रांचे म्हणजे गाईचे विशेषण आहे. व्रज म्हणजे गोठा, अश्मव्रज म्हणजे दगडांचा गोठा. मोठमोठे हत्तीसारखे दगड सभोवार रांगेने रचून ऋषिपूर्वज गाईंना निवा-याची जागा तयार करीत. त्या जागांना ऊर्फ गोठ्यांना ते अश्मव्रज म्हणत. अश्मव्रजा म्हणजे इतर देशांत स्टोनहेंज म्हणून ज्यांना म्हणतात ते. येणेप्रमाणे झोपड्या, अश्मव्रज, अग्नी व गाई ह्या चार वस्तू तत्कालीन ऋषिपूर्वंजांच्या संस्कृतीची मुख्य चिन्हे असत. अग्नी चाहेल त्या वेळेस मिळावा म्हणून कुंडातून सतत धुमत ठेविलेला असे. अग्निकुंडाच्या भोवतालील जागा गाईच्या शेणाने सारवून बसण्याउठण्यास सोईस्कर अशा केलेल्या असत. दिवसा उपजीविकेची कामेधामे करून रात्री ह्या अग्निकुंडाच्या भोवती ऋषिपूर्वज उबा-याला बसत आणि शिळोप्याच्या करमणुकी करत किंवा मद्यमासांची सिद्धता करीत. सोमवल्लीची दारू व गाईबैलांचे किंवा इतर श्वापदांचे मांस ह्या अग्निकुंडाच्या सान्निध्याने व साहाय्याने निष्पन्न करीत. नंतर मद्यमांसावर यथेच्छ हात मारून, निरनिराळ्या छंदांतली गाणी म्हणून ते एकमेकांना रिझवीत किंवा आपल्या इष्ट देवतेची करुणा भाकीत. ह्या काली ऋषिपूर्वजांचा मोठा आवडता देव म्हटला म्हणजे महदुपयोगी जो अग्नी तो असे. अग्नीच्या साह्याने उघड्या मैदानात झोपड्या करून सुखाने राहता येऊ लागले, अग्नीच्या साह्याने सुग्रास पाकनिष्पत्ती करिता येऊ लागली.

लाकडाच्या अरण्याचा, समिधांचा व शेणकुटाचा उल्लेख वारंवार केलेला आढळतो. परंतु लोखंड व गार यांनी बनलेली जी चकमक तिने अग्नी सिद्ध करण्याचा उपदेश कोठेही केलेला नाही. याचा अर्थ इतकाच की आर्य वनचर अद्याप लोहयुगात येण्यास बराच अवकाश होता, फक्त ज्वालाग्राही लाकडे घर्षणाने पेटवून अग्नी सिद्ध करण्याची कला त्यांना नुकती कोठे सापडली. या युगाला दारुयुग म्हटले असता वावगे होणार नाही. चुडा व उल्का पेटवून रात्री उजेड करण्याचेही ह्या काली त्यांना ज्ञान झाले होते. उल्का ऊर्फ चुडांच्या उजेडाने शत्रूंनी गुहांतून लपवून ठेविलेल्या गाई शोधून काढल्याचे उल्लेख ऋग्वेदात येतात.
(१) तपूंष्यग्ने जुह्य पतंगानसंदितो विसृज विष्वगुत्काः (ऋग्वेद ३००-२).
(२) अस्माकमत्र पितरो मनुष्या अभि प्रसेदुर्ऋतमाशुषाणाः ।
अश्मव्रजाः सुदुघा वव्रे अंत रुदुस्त्रा आजन्नुषसो हुबानाः ।।१३।।
(३) ते मर्मृजत ददृवांसो अद्रिं तदेषामन्ये अमितो विवोचन् ।
पश्वयंत्रासो अभि कारमर्चन् विदंत ज्योति श्चकृपंत धीभिः ।।१४।।
(ऋग्वेद सूक्त २९७)

हाताच्या आंगुळ्या ह्याच कोणी ज्या दहा बहिणी, त्यांना त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने जेव्हा पुत्र झाला तेव्हा अत्यानंद झाला. दोन शीघ्र ज्वालाग्राही लाकडाच्या काटक्या घेऊन व त्या दोन्ही हातांच्या बोटांनी खालीवर घासून ऋषिपूर्वज इतर आधुनिक रानटी लोकांप्रमाणे अग्नी उत्पन्न करीत, या क्लृप्तीचे वर्णन वरील ऋचेत आलेले आहे. ह्या ज्वालाग्राही लाकडाच्या काटक्यांचे रानटी ऋषिपूर्वज समिध् ओषधि इत्यादी नावे देत. समिध् म्हणजे चांगली जळणारी काटकी व ओषधि म्हणजे उष्णता धारण करणारी काटकी. टणक ज्वालाग्राही काटक्या एकमेकांवर घासून यद्यपि वाटेल तेव्हा अग्नी निर्माण करता येत असे, तथापि अचानक हिंस्त्र पशूंचा किंवा दस्यूंचा घाला आला असता, त्याचा उपयोग व्हावयाला विलंब लागे व इजा व्हावयाची ती होऊन जाई. ही अडचण टाळण्याकरिता कित्येक ऋषिपूर्वजांनी झोपड्यांच्या आत किंवा जवळ लहानमोठ्या खाचा खणून त्यात लाकडाचे ओंडके व झाडांची सबंध खोडे सतत जळत ठेवण्याची युक्ती काढली. या खाचांना ते कुंडे म्हणत, कुंडात धगधगीत निखारे साही ऋतूंत रात्रंदिवस तयार असत. त्यांच्या साह्याने आर्यपूर्वज येईल त्या दस्यूचा किंवा पशूंचा निःपात करीत. येणेप्रमाणे कुंडातील अग्नी हे एक ऋषिपूर्वजांना जवळ अप्रतिहत हत्यार बनून गेले. ह्या हत्याराला ऋषिपूर्वज कधीही व कोठेही विसरत नसत; कारण ह्या हत्यारावर त्यांच्या मालमत्तेच्या व जिवाच्या सुरक्षिततेची सारी मदार अवलंबून असे. भयंकर अशा निबिड महारण्यात जावयाचे असो किंवा विस्तीर्ण नद्या-होड्यातून पार व्हावयाचे असो, ऋषिपूर्वज बरोबर अग्नी घेतल्याशिवाय झोपड्याबाहेर एक पाऊलही टाकीत नसत. अरण्यात एकटे राहण्याचा प्रसंग आल्यास, बरोबरच्या अग्नीने एखादे वाळलेले खोड, किंवा बुंधा पेटवून त्याच्या शेजारी अशन, प्राशन, शयन व आसन ऋषिपूर्वज निर्धास्तपणे करीत आणि सिंह, हत्ती, वाघ किंवा लांडगा हिंस्त्रबुद्धीने जवळ आल्यास आगीतील कोलिते किंवा जळजळीत निखारे त्यांच्या अंगावर टाकून त्यांना पळवून लावीत किंवा ठारही करीत. अद्यापही हा परिपाठ हिंदुस्थानात जिवंत दृष्टीस पडतो. बैरागी नावाचे जे नाना जातीय तपस्वी हिंदुस्थानात ठिकठिकाणी अरण्यातून व ओसाड प्रदेशातून हंगामी वस्ती करून राहतात, ते उतरण्याची जागा पसंत केल्याबरोबर पहिले काम जे करतात ते अग्न्यावाहनाचे. म्हणजे धुनी पेटवून तीत आपले त्रिशूळ उलटे करून ठेवतात आणि कोणत्याही व कसल्याही श्वापदाची क्षिती बाळगीत नाहीत; कारण त्रिशूळाच्या लाल इंगळासारख्या टोकांनी धिटाईने जवळ येणा-या व्याघ्रादींना भाजून काढण्याचे सामर्थ्य आपल्याजवळ जय्यत तयार आहे अशी त्यांना खात्री असते. अर्वाचीन बैराग्यांजवळ जसे लोखंडी त्रिशूळ असतात तसे रानटी आर्य पूर्वजांजवळ नसत, कारण खाणीतून लोखंड काढण्याची कला अद्याप त्या वनचरांना अवगत झाली नव्हती. लोखंड व पोलाद माहीत नसल्यामुळे चकमकीचाही शोध अत्यंत प्राथमिक आर्यपूर्वजांना लागला नव्हता. आर्यांच्या सबंध यज्ञप्रक्रियेत म्हणजे यजुसंहितेत चकमकीपासून अग्नी सिद्ध करण्याचे अवाक्षरही नाही.