Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक २५०

श्री
१७०१ पौष शुद्ध

श्रीमंत राजश्री नाईक स्वामीचे सेवेसीः-

विनंती सेवक नारायणराव गोविंद मो जामगांव सां दंडवत विज्ञापना ता पौष शुद्ध त्रितिया इंदुवासरे प्रहर रात्र पावेतों स्वामीचे कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपली आज्ञा घेऊन स्वार जालों, ते शनवारीं येथें दाखल जालों. रविवारीं श्रीमंत पाटीलबावांची भेट घेतली. त्याचा कित्तेक मार तपशीलवार राजश्री बाळाजीपंतनाना बक्षी यांचे पत्रीं लिहिला आहे. त्याजवरून श्रुत होईल. पत्रीं मार लिा आहे, त्याजप्रमाणें सरकारचे पत्राचा डौल यांचे नांवाचा तयार करून आधीं पाठवावा. याचा निग्रह आहे, ऐसें नाहीं. ममतेच्या विचारे सर्व आपले कृपेंकरून होऊन येईल. पत्रदर्शनीं विनंती लिहिल्याप्रमाणे पत्रे पाठऊन द्यावीं. बहुत काय लिहिणे ? कृपा असों दिजे. हे विनंति

पत्रांक २४९.

श्री.
पो मिति पौषशुा १२
श्री. १७०१ मार्गशीर्ष वद्य १०

श्रीमंत राजश्री बाळाजीनाईकनाना स्वामीचे सेवेसीः-

सेवक गोविंद गोपाळ सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता छ २३ माहे जिल्हेजपर्यंत वर्तमान येथस्थित जाणोन स्वकीयें कुशल लेखन करीत असावें. विशेष. सांप्रत आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं त्यास सविस्तर लेहून संतोषवीत जावें. इकडील वृत्त पेशजीं लिहिलें आहे त्यावरून कळों आलें असेल. वरकड साद्यंत यजमान साहेबांचे पत्रावरून विदित होईल. सर्व प्रकारें भरंवसा आपला आहे. चिंरजीव राजश्री नारो गोपाळ योजविसीं आपणांस बहुत लिहिलें. परंतु सरकारांत चार गोष्टी सांगून त्याची रवानगी न जाली. या कार्याची आपणापासून दिवसगत न लागावी. या उपरी सत्वर मार्गस्त करावें, विस्तार ल्याहावा ऐसें नाहीं. तेथें बहुत उपद्रव मांडिला आहे. आपणास कळतच असेल. सारांश, सरकारलक्षांत एकनिष्ठपणें असतां तेथें ऐसा विचार नसावा. असो. आपण श्रम करितां कमी करीत नाहीं. तेव्हां आमचे दैवयोग. आपण काय करितील ? वरकड इकडील मजकुर तरी जलचर सामान सरंजाम करून तयार जाले आहेत. बोलवा व मसलतांतील तो विचार उत्तरदिशेची आहे. घांट व मार्ग इकडील व दक्षिणेकडील कोंडाईवारी व सेंदव्याचा वगैरे तमाम पाहावयासीं गेले आहेत. बारा बेलदार लाऊन नर्मदाचा घांट नीट करावयासीं गेले आहेत. गुंता तयारींत काडीमात्र नाहीं. आपलेकडील भरंवसा धरावा, तर यावेळपावेतों दृष्टोत्पत्तीस कांहीं येत नाहीं! आह्मांस तों तीन जागा सांभाळणेः-एक नर्मदाउत्तरतर, दुसरें दक्षिणतीर, व महीउत्तरतीर तीन्ही ठिकाणीं त्याचा शेजार एक ठिकाणीं असल्यास चिंता नाहीं. सर्व शत्रुपण माथां आलें आहे. दुसरेकडील येथील भरंवसा बाळगावा तरी कळतच आहे ! शहरचा कारभार सावकारी आहे. ऐशियासीं तिकडून कोंडाईकडून आगमन सुरतप्रांती अति सत्वर जाल्यास उत्तम आहे. ह्मणजे उत्तरतीराकडील काळजी नाहीं. जैसें करणें तैसें घडेल. हे गोष्टीस दिवसगत लागली तर दोष न ठेवावा. मग जैसें घडावयाचें असेल तैसें घडेल. सारांश, येथील लक्ष तुह्मासिवाय नाहीं. खातरजमा असों द्यावी. परिणाम मात्र शुद्ध व्हावा नाहींतर एकहि साधन नाहीं. ऐसें जाहल्यास मग विचार कळतच आहे. दुसरें चंदरराव पवार यांचें पारपत्य होऊन पेटलाद व आमोद येथील ठाणीं सरकारचीं बसविलीं. आमोदेस सरंजाम आपले कडील आहे. कारण, कादार यांचे मतें असावा. नाहीं तर कादार यांच्याने ठिकाण धरून रहावत नाहीं. कारण मित्र नजीक शेजार. याजकरितां याप्रों करून बंदोबस्त केला आहे. कादार यांचे विचारें सरंजाम बोलावणें जाहल्यास बोलाऊन घेऊ. पवार नर्मदा उतरून अंकलेश्वरीं पोंचले. तेथून पुढां जाणार. जातील. जातेसमयीं आपलेकडील माहाल व सराइ येथील वोळी धरून नेल्या व गुरें ढोरें घेऊन गेले ! माहालाची खराबी बहुत केली. पुढां सुरतेकडे जावें या मनसब्यांत त्यास, त्यांचे यजमानाचें पत्र आलें की, तेथेंच राहावें. सरंजाम तोफा वगैरे पायदळ आणखी रा करणार. ऐसी बातमी आली. तेव्हां आणवी उपद्याप करावयाचा मनसबा आहे. मग जें घडेल तें पाहावें. रा लक्षमणराव चिटनिस यांसी रजा दिली. ठाणीं कांहीं उठविली. आण आपले कडील जलचर यांणी पा व पाठवणार. मारनिले तेथें आल्यावर सविस्तर समजण्यांत येईल. सारांश, तिकडून आगमन लौकर व्हावें. म्हणजे सर्व गोष्टी उत्तम आहे. बहुत काय लिहिणें ? कृपा करावी. हे विज्ञप्ति.

पत्रांक २४८

श्री.
११७०१ मार्गशीर्ष वद्य ९

राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर गोसावी यासीः-

सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो हरी बल्लाळ आशीर्वाद. विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आपणाकडून पत्रें येतात व राजश्री बाळाजीनाईकनाना सांगतात, त्यावरून सविस्तर कळतें. इकडील कित्तेक मजकूर लोकवार्ता ऐकोन चित्त संशयाविष्ट होत असेल. त्यास, श्रीमंत नानाची कायम मिजाज आहे ? जो आपल्याशीं करार आहे त्यांत दुसरी गोष्ट होणार नाहीं. येविसीं पुर्तेपणीं खातरजमा असावी. आपले दवलतीचें कल्याण व्हावें हेंच इच्छा व तत्प्रत्युक्त साधन तेंच करितों, आपण श्रीमंत राजश्री रावसाहेब यांचे पायांशी एकनिष्ठ. तेव्हां, दुसरेसारखी गोष्ट कैसी घडेल ! कोणी कित्तक बनाऊन सांगतील त्यांजवर न जावें. जो येथील खंबीर आहे, तो बळकट आहे. चिंता न करावी. येविशीं बाळाजीनाईकनाना लिहितील त्यावरून कळेल. रा छ २२ जिल्हेज, बहुत काय लिहिणें, आह्मीं येथें असतां आपण कोणेविसीं चिंता न करावी. हे विनंती.

                                                                                लेखांक ३९६

                                                                                                                                                    १५४४ फाल्गुन वद्य १३

                                                                                                                 68 2रुजू निगावान

5 मा। हुदेदारानि मौजे बेळवडी ता। कर्डी यास मशहूरर प्रती नरसो दामोदर हवालदार व कारकून देहाय पा। पांडियापेडगौ सु॥ सलास इशरैन अलफ बा। खु॥ रा। छ २८ माहे रबिलाखरु साधर जाले तेथे रजा जे बो मुदगलभट बिन कृस्णभट सो। पुणे हुजूर येउनु मालूम केले जे आपणास इनाम बदल धर्मादाउ जमीन चावर एक गज सराइनी १68 दर सवाद मौजे बेलवडी ता। मजकूर पेसजी खुर्दखत सादर आहे जे जमीन मेजून हद महदूद घालूण देण यावरी आपण माहालास गेलो माहाळीचे कारकुनास साहेबाचे खुर्दखत दाखविले यावरी कारकून जमीन मेजून प्रज बाबाजी मुलाना मुजेरी मौजे मजकूर प्रज नेमून दिधळी आहे ये बाबे कारकुनी आपणापासी अर्जदास लेहोनु दीधली आहे तरी स्वामी धर्मपरायण आहेती येणेप्रमाणे खुर्दखत दीधले पाहिजे दरीबाब सरंजाम होय मालूम जाहाले तरी भट गोसावियास इनाम बदल धर्मादाउ जमीन चावर एक १68 गज सरानी यास प्रज बा। अर्दास छ ४ माहे रबिलाखर बाबाजी मुलाना मुजेरी मोजे मजकूर नेमून दीधला असे दुमाले कीजे अवलाद अफलाद चाळवीत जाइजे दर हर साल ताजे खुर्दखताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असेली इनामदार मजकुरापासी फिराउनु दीजे तकरार फिर्यादी येऊन ने दीजे ह्मणौनु रजा रजेबरहु(कू)म अमल कीजे

                                                                                                                                                                                                          326

तेरीख २६
जमादिलोवल

पत्रांक २४७

पौ मिती मार्गशीर्ष वद्य ४ रविवार रात्रौ.
श्री १७०१ मार्गशीर्ष शुद्ध अखेर

राजश्री बाळाजीनाईक स्वामीचे सेवेसीः-

सेवक गोविंद गोपाळ साष्टांग नमस्कार, येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपण कार्तिक शुद्ध १ व सुध पंचमीचीं दोन पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लिा सविस्तर अवगत जाहलें. चिरंजीव राजश्री नारोबानाना यांची काळजी न करावीं. आपल्यावर विश्वास, तेव्हां काळजी कशास करावी, हें तो खरेंच आहे. आमचा अभिमान आपणासच आहे. तेथें आह्मीं उपरोधिक काय ल्याहावे ? आपण आह्मांविशीं बहुत मेहनत करितात, ह्मणोन राजश्री बाळाजीपंतांनीं तपसिलें लिहिलें. त्यास आमचा विचार आपल्याशीं किमपी दुसरी नाहीं. ऐवजाचा भरणा होणें. येथील अर्थ पाहतां आपणांस काय ल्याहावें ! केवळ संकटाचे दिवस प्राप्त जाहले आहेत. चहूंकडून हंगाम एकच माजला आहे. सिबंदीचा पेंच फौज घरीं बसलियामुळें सिबंदी चडली. जलचर नजीक याचा विश्वास नाहीं. यामुळें घरीं बसून राहणें प्राप्त जाहलें. आतां तरी आपलीं पत्रें व सरकारचीं पत्रें आलीं कीं, तह बिघडला. यामुळें केवळ लोकांचे होश ठिकाणीं राहिलें नाहीं. मुलूख, प्रजन्य नाहीं यामुळें खराब जाहला. दुसरें में अरिष्ट उभें राहिलें. पुढें याचा विचार काय करावा? आपण आमचे वचनावर सरकारांत वचनीं गुंतलें. यास पार पाडणार श्री समर्थ आहे. आपण कांहीं चिंत्ता न करावी. ऐवजाचे तजावजींत असों. चिरंजीव राजश्री नाना आपणापाशीं आलियाचें वर्तमान जलदीनें लिहिलें पाहिजे. आमचा अभिमान सर्वप्रकारें आपणास आहे. या अर्थीं आह्मांस काळजी कोणे गोष्टीची नाहीं, येथील सविस्तर यजमानपत्रावरून कळेल. सारांश, ही दौलत वोढीखालीं बहुत आली आहे. कांहीं बाकी राहिली नाहीं. एक एक विघ्न नवेंच उभें राहतें. यांत ईश्वर लाज राखील ते खरी. सरांश, आह्मांस आपले पाशीं खरेपण राहिलें ह्मणजे सर्व जालें. वरकड सविस्तर मागाहून लिहून पा. चिरंजीवाचे येणें आपल्यापाशीं जालें न जाले हे कळत नाही. तरी सविस्तर लिहावें. न जाल्यास येणें होईल तें करावें. आपल्या विचारास करावयाचें तसें करावें. आह्मीं आपल्या आज्ञेशिवाय नाहीं. बहुत काय लिहिणे ? कृपा लोभ किजे. हे विज्ञप्ति.

पत्रांक २४६

पौरा छ १० जिल्हेज
श्री.
१७०१ मार्गशीर्ष शुद्ध ११

रावसो मेहेरबान करमफर्माय मोखलिस बाळाजी पंडत फडनवीस सलमलाहुताला.

बादज पाकै मुलाखत मसरत आयात हत्तीहाद आअरबाद येथील खुषी जाणून आपली षादमानी हमेषा कलमी करीत आलें पाहिजे. दरींविला, बरखुरदार सादत व एकबार तशिांकरीम साहेब यांस सावणूरचा नबाब अबदुल हमीदखान याचे लडकीची निसबत मोरर पाहून नेमदीन छ २५ जिल्कादीं शादीची तारीख मुकरर जाहली आहे. हे खुषी आपले असे, याकरितां कलमीं केलें जातें जे आपण येऊन शादीची खुषी नजरेनें पाहून दिलशाद वे दोस्तीची तरक्की केली पाहिजे, हमेष आपली षादमानीस निगारस करवीत यावें. जियादा लिहिणें काय असे ?

पत्रांक २४५

श्री. (नकल) १७०१ मार्गशीर्ष शुद्ध १०.

राजश्री बाळाजीनाईकनाना भिडे गोसावी यासीं:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो फत्तेसिंग गाइकवाड सेनाखासखेल समशेरबहादर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणेन स्वकीये कुशल लिहित असावें. विशेष. तुह्मी मुजरत अजुरदार समागमें पत्रे पाठविलें तें पाऊन सविस्तर लेखनार्थ ध्यानास आला. आंगराजाकडील मजकूर विस्तारें लिहिला कीं, केलें काय. ऐशीयासी, येथें त्यांतील एकहि प्रकार नाहीं. त्यावर तेथें आपणास दरबारी सांगितलें असेल त्यागोष्टीचा शोध पुरतेपणें मनास आणून कोणाच्या कागदपत्रीं काय, तें साद्यंत ल्याहावें. मारनिले व त्याचे बंधू असे मार्गशीर्ष शुा ३ अलंकारयुक्त राजश्री केशवराव देशमूख समागमें वडनगरास पाठविले आहेत. वरकड तेथें कोणी लबाडी केली असेल, त्याचें ठिकाण लाऊन ल्याहावें. तुमचे विचारासिवाय कांहीं नाहीं, येविशींची खातरजमा बाळाठाकूर याणी केलीच असेल. परंतु इतक्या लबाड्या मधींच होतात ! त्याचा शोध व शिक्यानिस पत्रें व स्वदस्तुर चिठी याचा शोध मनास आणून लिा कीं, पुन्हां हें न घडे. त्याचें पारपत्यही घडल्या कोणी असें करणार नाहीं. मधीचे मधें असें घडल्या घरबूडच होणार. त्यापक्षीं हें ठिकाण लाऊन जरूर जरूर लिा. माझ्या गळ्याची शपथ असे. तर आपण हे गोष्टीची सुस्ती करूं नये. बहुत काय लिहिणें ? रा छ ९ माहे जिल्हेज. हे विनंति.
मार्गशीर्ष वद्य ५ सोमवार रा नारायणराव गोविंद यांजबराबर अस्सल.

पत्रांक २४४

श्री
१७०१ मार्गशीर्ष शुद्ध १०

पुरवणी राजश्री बाळाजीनाईकनाना भिडे गोसावी यांसीः-

विनंति उपरी. आपण बरखोडेविशीं लिहिलें कीं, थोडक्या कामासाठीं राजश्री हरीपंततात्या यांचे चित्तांत संशय पडतो, याजकरितां मल्हारजी फडके यांसी मनाई करून पत्र पाठवावें, त्यांणीं सनद आणिली त्यावरून सर्वास आश्चर्य वाटतें. ऐशियास, आह्मीं जहागिरीची सनद दिली. परंतु फडके यांणीं समक्ष कबूल करून बोलिला जे, मी नाइकास पत्रें दाखवून त्याचे सांगितलेप्रमाणें तात्याचे मर्जीनुरूप घडून आल्यास बंदोबस्त करून घेऊ. तुह्मांस न सांगतां परभारा बखेडा केला. असो. त्याजला माघती पत्र सादर असे. मुजाहीम होणार नाहीं. आपण राजश्री तात्या यांसीं समाधानाचेंच बोलावें. कळावें छ ९ माहे जिल्हेज. बहुत काय
लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती मोर्तबसुद.

पत्रांक २४३

श्री
१७०१ मार्गशीर्ष शुद्ध १०

श्रीमंत राजश्री बाळाजीनाईकनाना भिडे स्वामींचे रोवेसीः-

विनंति उपरी. तुह्मीं पत्र मार्गशीर शुद्ध ४ रविवारचें पा तें मंदवारीं दोन प्रहर रात्रीस पावलें. सातवे रोजीं पावलें. लिहिला मजकूर कळों आला, अटकेंत असतां पत्रें कशीं येतात, ह्मणून लिा. चवकशी तो बहुत आहे. परंतु हें कलियुग ! लहान माणसास द्रव्य दाखीवल्यास न करावयाचें कर्म करितात. यजमान व ते एक जाहले ह्मणून लिा. त्यास, येथें तों कांहींच नाहीं. तेथे आपल्यास प्रत्ययास कैसें आलें, त्याचा शोध पुर्तेपणीं करून लिहून पाठवावें. एरवीं शिके तो असामींवार त्याजपाशीं आहेत. अक्षरें दुस-यासारखीं काढून मधील मध्यें कमें आजपर्यंत करीत आले आहेत. तेहि त्यांचे नित्यांतील आहेत. याजकरितां खरें खोटें कोठून आहे, हें समजलें पाहिजे. याजकरितां चिठी पत्नीं ठिकाणीं पाडावी. यजमान आम्ही बाहेर निघालों. तेथें होते तों दबाब होता. मागें राहणार नाहीं, बखेडा होईल, याजकरितां उभयतां बंधु मार्गशीर शुद्ध ३ चे दिवशीं अलंकार करून केशवराव देशमुख आले होते. त्याजसमागमें सरंजाम देऊन वडनगरास रवाना केलें. तेथें पोंचलेयाचे आपणास पत्र आलें नाहीं. येईल. समागमें आपलेकडील खिजमतगार, ब्राह्मण, कारकून आरबांच्या बैरखा नेहमीं दोन दिल्या आहेत. याशिवाय पोंचवावयाकरितां पागा वगैरे सरंजाम दिल्हा आहे. तो अद्याप आला नाही. कळावें. येविशींची खातरजमा असों द्यावी. आमचा प्राण गेल्यावर मग जें घडणें तें घडेल. आह्मी तुह्मी एकच भाईबंद, स्नेही, धणी, सर्व आपली जोड केली आहे. वरकड त्याग न करितां करणें प्राप्त जाला आहे. तेव्हां आपलेशिवाय दुसरा विचार नाहीं. यजमानानीं लिा आहे, त्याजवरून कळेल. मिती मार्ग शीर शुद्ध १० मंदवार प्रातःकाळ. हे विज्ञप्ति.

                                                                                लेखांक ३९५

                                                                                                                                                    १५४४ फाल्गुन शुध्द ८

                                                                                                                 387

सके १५४४ दुंदभी नाम सवतछरे फालगुण सुध अस्टमी ८ वार गुरुवार सु॥ सलास इसरईन अलफ तेरीख ७ माहे जमादिलोवर ते दिवसी राजश्री रामेशभट व राजश्री चिंतामणीभट गोसावी यासि राजश्री खेलोजीराजे व राजश्री मंबाजीराजे व राजश्री नागोजीराजे व राजश्री परसोजीराजे व राजश्री त्रिंबकजीराजे व राजश्री ककाजीराजे लिहुनु दिधले ऐसे जे तुह्मापासी राजश्री ताबाई आवाने ठेवणे ठेविले होते बितपसील

नख्त एकविससे होनु                                       सोने एकसे आठ तोळे

             २१००                                                             १०८

हे तुह्मी आमचे आह्मासी खडकीस आणौनु दिधले पैकी मालबा रायाचा वाटा मालबासी देउनु वाटे सा आमचे आह्मासी पावले बितपसील

नख्त अठरासे १८००                                        सोने तोळे नऊ ९०68

एणे प्रमाणे आह्मासी पावले तुह्मासी व आपणासि अर्था अर्थ समंध नाही
                                                                                                                      68 2

                                          गोही
एकोजी जैतजी भोसले                                भिकाजी मोहिते
मकुंद गोपीनाथ पत्रप्रमाणे साक्ष                    तिमाजी मोहिते