Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४७
श्री.
१७२५ आश्विन शुद्ध १०
विजयमहामुहूर्तें पत्रें लष्करांत रवाना केलीं त्यांतील मजकूर स्मरणार्थ:-
१ येशवंतराव होळकर सुभेदार यांस कीं, फा। बहुल ४ मंदवारीं कोतवालाचें तळ्यानजीक मुकाम होता. तेव्हां रात्रीं चंद्रोदईं श्रीमहागणपतीचा उत्साह ब्रह्मांडभर त्यामुहुर्तें पांच गजांसह भेटीचा योग श्रीजगद्गुरूंचे शिष्यांचा व श्रीमार्तंडाचे भक्तांचा जाहला. प्रसाद व पत्र मस्तकी वंदून कित्तेक संतोषाचें शब्दरत्नेंकरून परस्पर भूतभविष्यादि वर्तमान श्रवण होऊन, समस्या पूर्ण जाल्या. नंतर, पंचमीस आज्ञेनुरूप होळकरांनीं होळीचा खेळ समाप्त करून, श्रीमंतांचे वाड्यांत जाऊन, आमची माता सीतादेवी वनवासाहून आली, त्यांचे दर्शन घेऊन समाधान करून, बहुमानाचीं वस्त्रें घेऊन, स्वार जाहला, रंग विशिष्ट पुरुष स्वस्थानीं नाहीं, म्हणून राहिला. तों अलीकडे श्रीरामनवमीस व्याचा जन्म, पितापुत्र एक राशीं एकासनीं बसल्या जनकौतुक ! पाटीलबावा रंग खेळतां पाहिलें. परंतु, गोटापर्यंत जाऊन उपहार बहुमानपूर्वक होणें राहिला. त्याचे हेतूपेक्षां शतगुणित होऊन, विश्व पाहून, सत्कीर्ति दिगंतरी जावी हे इच्छा, तें करणेंकरून श्रवण होतील, आपली स्वारी गेल्यामागें तवाई मोठी गुजरली, ते श्रीहरिहरानें रक्षिली ! त्या संधींत लहान शिशु होतें तें श्रीभानूस अर्पण केलें. त्यास घेऊन श्रीमहायात्रेस जावयाकरितां भा शु। १३ सोमवारीं श्रवण नक्षत्रीं वृश्चिक लग्नीं आठां ग्रहांचें बल जाणोन, प्रस्थान केलें. त्याचे तर्तुदीस आपण मनावर घेऊन, अल्पविषय आहे तो, वडिलांचे आज्ञेप्रों हिशेब करून, द्यावयाचा निश्चय केला, असें समजल्यावर इतर आपोआप देतील. त्यांस सूचना मात्र व्हावी. यादी अलाहिदा लिहिली आहे. त्या प्रों कोणास संज्ञा सांगेन पा दूरच्यास पत्र असावें तसें पा. म्हणजे सोबत पाहून, दर्शनास येऊन, नेक सला ज्या मार्गाची असेल तिकडून जाऊ. मर्जी नसल्यास, आमचें घर वसई भांडोन घेतली त्या दिवसापासून वसईच आहे. तिकडे सर्वांस भेटावयासीं जावेंच लागेल. तिकडूनच परभारें सुर्तेवरून श्रीनर्मदा शुक्रतीर्थाजवळ उतरोन, केशनखें पापाश्रित्य आहेत त्यांतें टाकून, पायागडावरून महेश्वर उजवें सोडून श्रीउजनी महाकाळाचें दर्शन घेऊन, पुढें विचार दिसेल तसें करूं. येविशींचे उत्तर पा. आणि वकिलासहि आज्ञा असावी. त्याप्रों ते व आह्मीं वर्तणूक करावयासी येईल.
पत्र १.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४६
१७२५ आश्विन शुद्ध १०
रघोजी भोंसले यांस पुरवणी पांच कलमाची लिहून पाठविली त्याची नकल.
१ खेर्ड्याची स्वारी फते होऊन आलियावर गारपिराचे मुकामीं साडे साहा सुश्लोकें करून लिहून पत्र दिलें होतें. त्यांत सारांश:-हा छळवाद. त्या छळवादें करून अयादवी पृथ्वी जाली. तेथें ईश्वरास माधवाचा पाड काय ? त्याच पत्राचें आश्वासनावरून श्रावणी पौर्णिमेस चंद्रग्रहणीं वृष्टी जाहली, हें विश्व जाणतें. भेटीनंतर ध्यानास येईल. तो विवाद वृंदाकृष्णाचा कुटरूपें लिहिला आहे. त्याणीं आमचें शासन केलें. तसेंच श्रीद्वारकेच्या बेटावर टोपीवाले यांनी तोफा मारिल्या. त्या रागें स्त्रीपुरुषांनी ऐकून मुंबईचे घरास अग्न लाविला. हें विश्व पाहत होतें. तस्मात् अपराध ज्याचा त्याजकडून ईश्वर करवित असतो. त्याजवर पुन्हां सोंगाचे संपादनीस मोठी मजल करून वाघेलीचे मुकामीं एकादशीस आलां. तेथें मी भट पुढें येऊन, प्रथम भेटोन, स्नानसमई सांगोन, या स्वारीचा तीर्थोपाध्या मीच आहें, म्हणोन बोलोन, मागील पत्राचा मजकूर पुसिला. तों नागपुरास राहिले. ह्मणून उत्तर जालें होतें. संगमानजीक साहा महिने मुकाम जाला होता. त्यांत पांच सात वेळां दर्शनास कांहीं गुप्त कांहीं प्रगटपणें कार्यकारण जाणोन आलों. त्या समईं पूर्वपत्राची नकल दाखविली. ते अमात्यासह रामचंद्रपंत वकील वृद्ध यांणीं पाहोन, कांहीं आश्चर्य कांहीं कौतुक मानिते जाले. त्या समईं सिकारी प्रकर्ण दाखविलें व बोलिलो. त्यांत तात्पर्यः-मोठे मोठे शूर शूर सरदार लोक शिकारीस जात असतात. त्यास ज्याणें हेर दाखविली तो बक्षीस मागतो व प्रथम ज्याणें हतियार लाऊन सावज जखमी केलें, लंगडे जालें असतां मागाहून हुताशनीचे खेळासारखें आलें, त्याजवळ विभाग मागता. ह्मणून फिर्याद श्रीनगरीं अमरांचा सेनापतीसमान षण्मुखी सेनासाहेबसुभा, समवेत घिदूर सर्व राजनीत जाणते, चतुर, पंडित तिहीं समुद्राचें एकवटलें. ते राजासीं व छत्रपती व नाना नरेंद्राचेच वंशाचे. इच्छा करणें तें कांहीं मनास आणून जें ज्यांचें उचित तें त्यांचे त्यास देवऊन आपलाले नगरास जाणें उचित. नाहीं तरी, अपराजितमुद्रा सुमुहूर्ते जाहालेली जारीच आहेत. माधवाची माधवांस माधवांत माधवासहित वडिलांचा मान बहु. सचिवाचे रीतीप्रों द्यावयाचा होता तें विपरीत कां जालें ? व घोडा प्रासादिक नजरेचा आला, तो नजरेनें पाहून शिष्यांचेच हवालीं केला. त्याचा खर्च पागेचेच अन्वयें येईल तसा येईल. टोळ पतंगासारिखे अनंत पूर्वेकडून येऊन समुद्रास भेटू गेले. त्याचा प्रश्न केला होता. तेच हे माघारी द्वारकानाथानें पा. उभयदळी प्रचित. सत्यमिथ्या दर्शनांतीं खातरजमा होईल, सांप्रत, वैशाखमासीं गोविंदराव दिवाण वैष्णव यांची भेट भांबवडेयास जाली. सहज बोलतां, श्रीद्वारकेचें प्रकरण निघाले. त्यांत, त्यांचें धन्याचें नांव पुसतां, साहेब वसली ह्मणतां सहज येऊन फसली, असें श्रीगुरुमुखांतून वर्ण निघाले, त्यास साक्ष उभय आहेत. समय विशेषें भेटोन कळवितील, व सिकारी प्रकर्ण लिहान दिल्हें. तें पाहोन कोठें ठेविलें. परंतु मालोजी घोरपडे, आमचे सरकाचे मानकरी, त्यांचे घरीं उमयतां बंधू मेजवानीस गेला. घोडा मर्जीस न आला. ते खूण. त्या समईं सिकारीप्रकर्ण दोन बंद लेहून दिल्हे आहेत. प्रयोजन ज्यास आहे ते पाहू. परंतु प्रसन्नतेनें बोलणें. किंवा तरह तुह्मीं रामभक्त असतां न मिळाला. मी जोसी पातडें घेऊन बहु दिवस फिरलों. त्याचें सार्थक होण्यास लवहि नलगे. परंतु पांथिकाचे छायेचीं झाडे गेलीं. त्यांस बहुकाळ लागेल.
१ श्री माहायात्रेस जावयाचा मजकूर पत्रीं लिहिलाच आहे. त्यांत पितरांसह देवत्रयांस ज्याणीं निरपराध गांजल्याचे दस्तऐवज ज्याचे असतील त्याजकडील संसर्गहि लोगों नये. तरच कळ्यावर
.
१ गयावर्जनाच्या साहा असामी निपुत्रीकी. त्यांची नांवनिसी:-
फडके तीन ३. त्यांत पुत्र असोन त्रिंबक नारायण मनोहर सुभा अ
आचार नाही आणि दत्तपुत्राचा अर्थ हमदाबाद, ज्याणी कोटी तुळशी श्री.
विश्व जाणते, त्यापेक्षां धर्मपुत्रच बरा. द्वारकेचे देसास अर्पण करावयाचा
भानु सतेज होता. त्याचे जाल्या संकल्प केला.
स पुन्हां सतेज होईल. श्रीमंत माधवराव नारायण, आमचा जगत्पिता.
हे चैन पडों देत नाहीं. त्यामुळें मोठी उत्कंठा लागली आहे. घटी युगासम जाते. मी वृद्ध आणि परम संकटीं ! भानूस शिशु अर्पण केलेले. अति: लालनपालन करीत नेलें. पौ, त्यास सुखासनीं बसोन शीतउष्णक्षुधातृषासह सर्व समृध्धी. भयाची बाधा न होतां, मार्गी जातां जातां कालक्षेपार्थ ज्याची जे आवड ते पुरविली पाहिजे जे.
१ वृद्धास रागी, बागी, पारखी, नाडी, और न्याय ! उस पंचको गुरु है
उमजत अंग सुभाव ।। १ ।।
१ बाळास नाना प्रकारचे खेळ पाहिजेत.
१ बुद्धीमुळें समक्ष परोक्ष खेळणारें.
१ नरदा चहूं रंगाच्या च्यार च्यार. परंतु दोन बाजू समान. त्यांत जग न करितां एकटे निर्बळी सांपडलें तरी घेऊन खेळ जमवावा.
१ गंजिफा, चंगा राणी कोण होती ? तिणें कल्पना केली ती मोठ्या मोव्यांनीं मान्य केली. तितक्या सर्व पानांवर नजर ठेऊन आपली आगळीक. १ ढाल तरवार, सर्व शिलेखाना अश्वासह असिषें.
या खर्चास पैका ज्याचा त्यांणीं ठेविला आहे. समजाऊन देईन. त्यास ताकीद मात्र जाली पो. ह्मणजे सव्याज देतील.
१ परसराम नो अनगल सातारकर यांचें कर्ज आपले वडिलांचे वडिलांकडे येणें बा खत. त्यांस त्यांचें घर पुण्यातील माझें कर्जांत गुंतलें आहे. त्यांणीं शिक्यानिशीं आपलें खत दाखविलें. आणि त्यांचें चिरंजीव सदाशीवनाईकही गयावर्जनाकरितां येणार. त्यास, खतांपैकीं. आदा जाला असेल, तो वजा करून बाकी लेखाबा हिशेब होईल तो दिल्या. उभयतां स्वर्गगामी होतसें करावें. श्रीमंत कैलासवासी थोर माधवराव बल्लाळ मुख्यप्रधान स्वामी याणीं कर्जाचा हिशेब चहूं पिढ्यांचा पाहून, त्यांचा हवाला रामचंद्रना परांजपे यांचा देवऊन, फेरिस्ताप्रमाणें खतें पाहून, फाडून टाकून, सर्वांचा निरोप घेऊन रमासहगमन करून, कीर्ती मोठी संपादिली ! त्या काळीं जानेजीबावा थेऊरास आले होतेसें वाटतें. त्यांणींच खत लेहून दिल्हेलें पाहिलें आहे. उदार हात तर पुण्य आणि पुरुषार्थाची सत्कीर्ति लोक गातील. सरदारीस वोढ कधीं नाहीं, ऐसें ऐकिलें ना पाहिलें !
हीं पंच कलमें. यांत प्रचीतीही आहेत. ती राजश्री होळकर सुभेदार यांहीं पाहिल्या उपयोगीं. आणि तिघे एकरूप जाले असल्या कल्याणदायक आहे.
आश्विन शुा १० शके १७२५.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
एणेप्रमाणे सातजण जाऊन विचार करून मुचलका लेहून आणिला मजकूर
बो। यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक देशपांडे पा। सुपे सु॥ ११३२ सन सलास अशरैन मया व अलफ कारणे कतबा लेहून दिल्हा ऐसा जे पा। मजकूरचे देशपांडेपण दरोबस्त आपलें आहे नारो केशव व बाबूराव रामजी हे देशपांडे नव्हेत यास देशपांडेपणासी समंध नाही हे आगांतुक भट होत याचा व आपला मूळपुरुष एक नव्हे ऐसे साबूत करून देऊन न देऊ तर आपणास वतनासी समंध नाही वतना निराळे होऊन हे लिहिले सही छ २१ जिलकाद
सदरहूप्रमाणें मुचलका लेहून दिधलियावरी सभानाईक माहाप्रश्निक यानी पुरसिस केली की तुमचा मूळपुरुष एक नव्हे ऐसे ह्मणता तरी तुह्मी यातीचे ब्राह्मण आहा ब्राह्मणास आचार प्रमाण याचे तुह्मी सुतक धरीत आले आहा की नाही हे सांगणे ऐसें पुसता अग्रवादेमजकूर उत्तर देता चावळो लागले घडीभर ह्मणत की संभाजी मोहित्याचे कारकीर्दीपासून सुतक धरितों घडिभर बोलत की धरीत नाही मग बोलिले की श्नान मात्र करीत असो घडीभर आपणामध्ये परस्परे कलवडो लागेत की हा देवाजी त्रिंबक त्यास मिळाला होता हा धरीत असे यादो रखमाजी बोले की आपण धरिले नाही आपण श्नान मात्र करीत असे तेव्हा सभानाइकानी पुसिले की श्नान तर्हिकाय निमित्य करीत असा त्यास उत्तर दिल्हे की काश्यपगोत्री ह्मणून तेव्हा पुसिले की सुपियामध्ये काश्यपगोत्री गृहस्थ आणित होते त्याचे नावे श्नान का करित नव्हता त्यास उत्तर दिल्हे की हे व आपण एके जागा सांगाते कारभार करीत असो ह्मणोन श्नान करीत होतो परंतु घरी एऊन सावकाश जेवीत असो त्याउपरि पुसिले की सुतकामधे जेऊ नये उपास करावा ऐसे कोण्हे शास्त्री आहे अगर दुनियामध्ये उपास करावयाचा कोठे दंडक तर्ही आहे की काय अथवा पराव्याबराबर एके जागा कारभार केला ह्मणजे उगे च सुतक धरावे ऐसे तर्ही कोठे कोण्हे शास्त्री ऐकिले आहे अथवा कोण्ही करीत तर्ही आहेत ते सांगणे ऐसी पुरसिस करिता सभेपुढे उत्तर देता चावळो लागले मग सभानाइकानी दटाऊन बोलिले की उत्तर माकूल देणे नाही तर फजित पावाल काय असेल ते यथार्थ सांगणे सुतक धरीत आला असिलेस तरी कबूल करणे नाही तर मुनकीर होऊन मुचलका लेहून देणे की तमाम परगणा जमा जाला आहे यानी सुतक धरीत होता ऐसी ग्वाही दिल्ही तर आपणास कुल भावाबदानसी याती निराळे घालावे ऐसे पष्ट वादे पुसता मुलजीम होऊन आपल्या मुखे एकरार केला की होए सुतक धरीत होतो यावरून अग्रवादे यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक खोटे जाले मूळपुरुष एक नव्हे ह्मणत होते ते तकरीर लटिकी तुफान असे दिसोन आले हरदूजण दायमुदये याचा मुळपुरुष एक होए परस्परें भाऊबंद होत देशपांडेपणाचे खावद खरे ऐसे समस्त सभेच्या मते जाले त्यावरी अग्रवादेमजकूर याणी दुसरा कजिया काढिला की आपण वडील भाऊ वडील घर आपले त्यावरी सभानाइकानी पुरसिस केली की वडिलपणाच्या सनदा तुह्माजवळ काय आहेत ते जे वडिलपणाचा दावा करीता त्यास त्याणी उत्तर दिल्हे की ज्या सनदा बाबूरायाने फर्मान वगैरे प्रसगी टाकिल्या आहेत त्या सनदा आमच्या आहेत परतु यानी च बळकाऊन आपणाजवळ ठेविल्या आहेत ऐसे ह्मणता सदरेचा हुकूम जाला की तुमच्या च तकरिरेवरून कजिया फैसल जाला की या सनदामध्ये जैसी नावे असतील त्याप्रमाणे वर्तणूक करणे तेव्हा अग्रवादे मजकुर बोलिले की वाबूरायाचा बाप रामाजीपत काबील होता त्यानी अवरगाबादेस पताजी बोकिला सी वाद करोन खोटा केला आणि ते समई फर्मान पेश अज जुलूस बमोहर हजरत हासील केला तेव्हा आमचा राजो सखाजी त्याजबराबर नेणता होता आणि रामाजी बाबाजीने प्रपच करून नावे आधी विठल माहादेव व त्यामागे त्रिबक गोमदेऊ ऐसी घातली त्यावरी सभानायक माहाप्रश्निक यानी आपले जागा कयास करून नफरमजकुरास पुसिले की राजो सखाजी नेणता होता याकरिता रामाजी बावाजीने प्रपच केला परतु गावास सनद आणिलीयावरी गावी तो तुमचे कारभारी काबील जाणते होते त्यास सनदेचा भोगवटा कैसा चालिला आहे तो जाहीर करणे त्यावरी अग्रवादेमजकूर बोलिले की भोगवटियाचे साक्ष तमाम मोकदम परगणाचे वगैरे कदीम वतनदार माहाराज साहेबी जमा करून आणिले आहेत त्यास ठाऊके आहे ते जैसी शाहिदी देतील त्यास आपण कबूल असो त्यावरी तमाम देसक से सवासे मोकदम वृध वृध मातबर वतनदार उभे करून राजश्री स्वामीनी आपले स्वमुखे बेताळीस पूर्वजाचे सत्यसुकृताची शफथ घालून पूसिले की वडिलपणाचा भोगवटा कैसा चालत आला आहे तो यथार्थवादे सत्य स्मरोन सागणे ऐसे पूसिले त्यावरी तपसिले नावे लिहिली आहेत तेणेप्रमाणे तमाम मोकदम कदीम वतनदार पा। मा।र याणी साक्ष दिल्ही की नारो केशव व बाबूराव रामाजी याचे वडील माहादो लखमदेव त्याणी वडीलपणे कारभार केला त्यासमागमे यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक याचे वडील विष्णु हरदेव त्याचा पुत्र हरि विष्णु उभयतानी धाकुटपणे वतन खाऊन वर्तणूक केली आहे त्यावरी विठल माहादेव याणी वडिलपणाचा कारभार केला त्यामागे त्रिबक गोमदेव देवाजीपताचा बाप धाकुटपणे वर्तला आहे त्यावरी रामाजीबावानी बाबूरायाचे बाप त्याणी वडिलपणे कारभार केला त्यामागे त्रिबक गोमदेव देवाजीपताचा बाप धाकुटपणे वर्तला आहे त्यावरी रामाजीबावानी बाबूरायाचे बाप त्याणी वडिलपणे कारभार केला त्यामागे देवाजी त्रिंबक व रखमाजी यादव धाकुटपणे वर्तले आहेत त्यावरी रामाजीपतामागे बाबूरायानी कारभार वडिलपणे केला आधी मान पान नाव दसकत व तसरीफ बाबूराव घेत गेले आहेत त्यामागे देवाजी त्रिंबक व यादो रखमाजी धाकुटपणे तसरीफ घेत आले आहेत एणेप्रा। पिढी दर पिढी भोगवटा आहे वडील घर दसकत तसरीफेचे खावद नारो केशव व बाबूराव रामाजी होतेत व धाकटे घर यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक याचे होए ऐसी शाहिदी समस्तानी दिल्ही त्यावरून अग्रवादेमजकूर वडीलपणाचा दावा करीत होते ते खोटे जाले वडील देशपाडे दसखत व तसरिफेचे खावद नारो केशव बाबूराव रामाजी खरे ऐसे देशकाचे शाहिदीवरून अग्रवादियाचे एकरारावरून व भोगवटियावरून करार जाले ऐसा इनसाफ जालियावरी सभानाइकानी अग्रवादे यादो रखमाजी व देवाजी त्रिबक यास पूसिले की वडील देशपाडिया कोण व धाकटे घर कोण्हाचे तेव्हा मशारनिलेनी धर्मसभे हुजूर सारे दरबार तमाम देसका देखता आपले जबानी तीन वेळा एकरार केला की आपले वडील मान पान व दसखत व तसरीफेचे खावद नारो केशव बाबूराव रामाजी होत आपण माघारे आपले घर धाकटें ऐसा तीन वेळा एकरार केला त्यावरी सदरेचा हुकूम जाला कीं नारो केशव व बाबूराव रामाजी यास एजितखत लेहून देणे त्यावरून एजितखत तमाम देसक व हालीमवाली याचे शाहिदीनसी अग्रवादियानी लेहून दिल्हें असे सदरहूप्रा। इनसाफ करितां धर्मसभे हुजूर व देशका देखता यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक खोटे जाले व नारो केशव व बाबूराव रामाजी खरे जाले याकरिता मशारनिलेस वादाच्या मुनसुफीचे पत्र करून दिल्हे असें की निवडिलिया करान्याप्रा। पा। सुपेबारामती एथील देशपांडेपण व कसबे सुपाचे कुलकर्ण वगैरे कुलव्रतने वडीलपणे खाऊन वडीलपणाचा लवाजिमा मानपान नावतसरीफ आधी घेत जाणे व दसखत आधी करीत जाणे मशारनिलेमागे यादो रखमाजी व देवाजी त्रिबक याणी धाकुटपणे वर्तोन आपलें देशपांडेपण करावे अग्रवादेमजकुराजवळ दस्तूरखानाच्या वेळेच्या महजराची लिबासी दोमोहरी खोटी नकल होती ते वगैरे झूट्या सनदा होत्या त्या कुल रद करून फाडून टाकिल्या असेत सानीनहाल त्याची प्रती निघाली कोठे तरी झूटी गलथ असे नारो केशव व बाबूराव रामाजी यानी आपले वडीलपण सुखरूप वंशपरंपरेने पिढी दर पिढी अनभऊन देशपांडेपण वगैरे वतने कुल आपली खाऊन सुखरूप असणे हे जयपत्र लिहिलें सही छ २६ रोज माहे जिलकाद श्रावण बहुल त्रयोदसी इंदुवासर श्रीनृपशालिवाहानशके १६४४ सुभकृतनामसंवत्सरे
बलूत्याच्या सह्या निशाण्या
इ. इ. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४५
१७२५ आश्विन शुद्ध १०
रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा यांस ( पत्र ) कीं: बहुत दिवस जाले. दर्शनाभाव म्हणून चातकन्यायें मार्गप्रतीक्षा करीत असतां, पूर्वेकडून हस्तनक्षत्रास वायु घेऊन अमृतवृष्टी करीत असतो. हा स्वभाव. तसेंच श्रवणांत आले. तेणेंकरून परम संतोष जाहला. त्यांत अठराभार वनस्पतीसह जलचरस्थळचरखेचरांसह आनंद जाला. त्यांत मी एक चातक बहुत दिवसांचा तृषार्त. तो तृप्त कसा न होय ? यानंतर उभयपक्षीं हितकारक विजयादशमीचे मुहूर्ते कागद सैन्यांत रवाना केले. त्यांत पांच कलमांची पुा सेनासाहेब सुभा यांस कार्याचा अवसार जाणून अलाहिदा पुरवणी लिहिलीच आहे. त्यांत सामान्यांचा स्वभाव, आपलें कार्याचें स्मरण असावें, दुसरेयाचें विसरावें. तसें आपण न व्हां. उदार चित्तानां तु वसुधैव कुटुंबकं, असें जाणून विस्तारें लिहिलें आहे. श्रवण करून, मागील श्रवणाचें मनन करून, श्री महायात्रेंत जावयाचे साहित्यांत तृते दस्तक व पत्राचें उत्तरे पाठवावयासी आज्ञा होऊन पत्रदर्शन मजला होईल तोच चंद्रचकोरासम आनंद होयसें केलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? लोभाची वृद्धी करीत असावें. हे विनंती. ये विशीचें उत्तर आपले कडील वकील पुण्यास असतील त्यांस खोलून ल्याहावें, ह्मणजे मजशी बोलून समजाऊन उत्तरें दाखवीत असें व्हावें. हें विनंति. पत्र १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४४
( नकल )
१७२५ आश्विन शुद्ध १०
दौलतराव शिंदे यांस पत्र कीं: कैलासवासी पाटील बोवा तेरा वर्षे हिंदुस्तान प्रांतीं राहून श्री मारुती प्रों महापराक्रम करून प्रभुदर्शनास आले त्यासमईं होमहवन करून विध्युक्त भेटी व्हाव्या तें विपरीत जालें. परंतु पाटीलबावा श्रीनृसिंहासारिखा विलोकन करीत बसला आहे. आणि श्रीमंत कैलासवासी माधवराव नारायण मुख्यप्रधान आमचे जगत्पीते कोणी मेले म्हणतात. आह्मी तों कलेवर दहनच केलें. कोणी जिवंत म्हणतात. याचा निश्चय मजला होईना, आपलें त्यांचे परम ऐक्य होतें. निरोप जात येत होते. मी जाण आहें, आणि पाटीलबाबा महाज्ञानी देशीं आले. त्यास पत्रें भविष्याची श्री जगद्गुरूची प्रसादपूर्वक आलीं असतां, कारभारी यांणीं पावों न दिली. याची रुजवात हावी तर त्यांतील कोणी आहे नाहीं हेंहि नकळे. परंतु, राज. श्री कल्याणराव कवेली बापू सांगतां ध्यानास येईल. आपण नातु होतां ते पुत्रत्व पावलां. खर्ड्याची स्वारी फत्ते जाली. त्यापासून मेळविलें किती, हारविलें काय, याचा विचार दीर्घदर्शी यांणी करीत असावा. तसा केलिया अधिकार चिरकाल ज्याचा तेच करतील. मी वृद्ध, मी माहायात्रेस भानूस बाल अर्पण परम संकटीं केलें. त्यास घेऊन जावयाकरितां भा शु। १३ शुक्राचे अस्तापूर्वी प्रस्तान केलें. त्या रवानगीची तर्तूद सेनापतीकडे व ग्रहस्थाकडे ऐवज येणें. त्याचा हिशेब करून पैकीं निमे तूर्त रवानगीस देवऊन बाकी सोईसाईनें घेऊं. बहुत दिवसांचा कारभार, सरदारीस कधीं वोढ नाहीं, असें पाहिलें ना ऐकिलें ! परंतु अगत्य मात्र पाहिजे. आणि ज्याचें वाजवी देणें तें दिल्यानेंच बरें. हें अंतःकरणीं असावें, वरकड अकरा वर्षांचे मजकुराची माहितगारी प्रचीतपूर्वक चिरंजीव राजश्री गोपाळराव हरीबापू व चिरंजीव राजश्री सदाशीवराव बल्लाळ आपले पाग्ये होते.(त्यास) कौतुकानें विचारलें असतां विनंति करीत जातील. माझीं कामें त्रिवर्गांनी चित्तावर घेतल्यास केवळ सुलभ आहेत. हिशेब मात्र वाजवी रीतीनें करावयासी आज्ञा व्हावी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४३
( नकल )
१७२५ आश्विन शुद्ध १०
दौलतराव शिंदे यांस की: कैलासवासी पाटीलबावा तेरा वर्षे हिंदुस्तान प्रांतीं राहून, श्री मारुती प्रमाणें महापराक्रम करून, प्रभुदर्शनास आले. त्या समईं होमहवन करून, विध्युक्त भेटी तें विपरीत जालें ! परंतु, पाटीलबावा श्री नरसिंहासारिखा विलोकन करित बसला आहे आणि श्रीमंत कैलासवासी माधवराव नारायण मुख्य प्रधान आमचे जगत्पिते हे कोणी मेले ह्मणतात. आह्मी तों कलेवर दहनच केलें. कोणी जिवंत ह्मणतात. याचा निश्चय मजला होईना. आपलें त्यांचें परम ऐक्य होतें. निरोप जात येत होते. मीं जाण आहे. आणि पाटीलबावा महाज्ञानी, देशीं आले. त्यास, पत्रें भविष्याचीं श्री जगद्गुरूचीं प्रसादपूर्वक आलीं असतां, कारभारी यांणीं पावो न दिलीं, याची रुजुवात हावी तर त्यांतील कोणी आहेत नाहीं हेंहि न कळे ! परंतु राजश्री कल्याणराव कवेली बापू सांगतां ध्यानास येईल. आपण नातु होता. तें पुत्रत्व पावलां. खर्ड्याची स्वारी फत्ते जाली, याजपासून मेळविलें किती, हारविलें काय, याचा विचार दीर्घदर्शी यांणी करीत असावा. तसा केलीया अधिकार चिरकाळ ज्याचा तेच करतील. मी वृद्ध, श्री महायात्रेस श्री भानूस बाळअर्पण परम संकटीं केलें. त्या घेऊन जावयाकरितां भा शुद्ध १३ शुक्राचे अस्तापूर्वी प्रस्थान केलें. त्या रवानगीची तर्तूद सेनापतीकडे व गृहस्थाकडे ऐवज येणें त्याचा हिशेब करून पैकीं निमे तूर्त रवानगीस देवऊन, बाकी सोई सोईनें घेऊं. बहुत दिवसांचा कारभार. सरदारीस कधीं ओढ नाहीं, असें पाहिलें ना ऐकिलें. परंतु अगत्य मात्र पाहिजे. आणि ज्याचें वाजवी देणें तें दिल्यानेंच बरें, हें अंतःकरणीं असावें. या पत्रांचे उत्तर पुण्यातील वकीलासह मजला असावें. वरकड़ अकरा वर्षांचे मजकुराची माहितगारी प्रचीतपूर्वक चिरंजीव राजश्री सदाशीराव बल्लाळ आपले पाग्ये होते (त्यास ) कौतुकानें विच्यारिलें असतां विनंति करीत जातील. माझीं कामें त्रिवर्गांनी चित्तावर घेतल्यास केवळ सुलभ आहेत. हिशेब मात्र वाजवी रितीनें करावयासी आज्ञा व्हावी. ऐवज सोईवार दाखवून घेईन, सरकारनुकसानी करावयाची नव्हे, एकादा शब्द अयोग्य लिहिण्यांत आला, तरी मी वेड्यासारिखा. केश, नखें, वाढविलींच आहेत. त्याचे बोलण्याचा व लिहिण्याचा राग कोणासही घेऊं नये. मार्गांचें दस्तक आणि उत्तर यावें. ह्मणजे सोबत पाहून दर्शनास येईन. मर्जी नसिल्यास वसईस माझें घर, वसई घेतल्यापासून वसईच आहे. तेथें भेटावयासी जाईन. तेथून सुरतेवरून श्रीनर्मदातीरीं शुक्रतीर्थी केश नखें श्रीत्यपापें आहेत, ती टाकून पायगडाकडून उजनीस माहाकाळ पाहोन पुढे जाऊं. पत्र १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४२
श्रीलक्ष्मीकांत.
१७२५ भाद्रपद वद्य १
राजश्री अमृतरावजी गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. आपणाकरितां विजयादशमीचा पोशाख पाठविला आहे. याची यादी अलाहिदा असे. त्याप्रमाणें घेऊन पावलियाचें उत्तर पाठवावें. रवाना छ १५ माहे जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंती. मोर्तबसुद. शिक्का.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४१
श्री.
१७२५ भाद्रपद शुद्ध १०
सेवेसी विनंती. सेवक बाळाजी रघुनाथ कृतानेक सां नमस्कार विज्ञापना तागायत भाद्रपद शु। १० मंदवार पावेतों मुकाम नागपुर वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपणाकडून बहुत दिवस पत्र येऊन सांभाल होत नाहीं. तेणेंकरून चित्त उदास आहे. तरी, ऐसें नसावें. सदैव......पत्रीं सांभाल करीत जावें. यानंतरः आपली आज्ञा घेऊन स्वार जाहलों ते मौजे आकुळनेराकडून पैठणास आलों. तेथें वर्तमान ऐकिलें कीं, सरकारचीं वस्त्रें व जवाहीर व हत्ती श्रीमंत मन्याबापूपाशीं सेनाधुरंधर या पदाची घेऊन, नागपुरास सदाशिवराम गुणे यांस रवाना केलें होतें. त्यांस, का आंबडापुरीं पूर्वी शरीरीं समाधान नव्हतेंच, कामारी वायूचा उपद्रव होऊन स्वस्तिवडेगांवीं आले. तेथें उपाय केले. परंतु गुणावर न पडता देवाआज्ञा जाहाली. हें आपणांस कळलेंच असेल, त्याहावें ऐसें नाहीं. पैठणाहून दरमजल वर्धा उतरून सारवाडीस आलों. तेथें राजश्री मल्हारजी नाईक जासूद भेटला. त्यास विचारिलें की, तुह्मी पुणें पाहून निघाल्यास फार दिवस जाले असतां मार्गीच ! तेव्हां त्यांनीं सांगितलें की, सदासिवपंताचा काळ वडेगांवी झाला. हें वर्तमान पुणेयास श्रीमतांस लिहून पाठविलें. त्याचें उत्तर येई तोंपावेतों वडेगांवींच होतों. उत्तर आल्यानंतर, हत्ती वगैरे कारखाना घेऊन, नागपुरास जाणें. मागाहून लिहिण्यांत येईल तसे करणे. याजवरून सरंजाम घेऊन जातो. आम्हांस त्यांणी विचारलें, त्यास सांगितलें, त्याप्रांतीं पांच रुा येणें आहेत त्यास फार दिवस जाले, जाऊन उद्योग करावा. नंतर निघोन नागपुरास श्रावण शुा २ स दाखल जालों, रा सेनासाईबसुभा यांची व मुछ्दीमंडळी वगैरे यांची भेट घेतली. पत्रें दिलीं. भाषणें ममतेचींच जाहालीं. आपल्याठायीं लोभच दिसतो. कळावें. सा माहादाजी हरी यांणीं पेशजी कटकची सुभेदारी केली होती. ती हल्लीं राजश्री राजारामपंत करितात. मारनिलेस येथें मागील गोसावी व सावकार यांचा पेंच व अलीकडे पोटास वगैरे घेतलेयाचा गवगवा. नित्य उठोन धरणेंपारणें यांसी संबंध. याजमुळें श्रीमंत बापूसाहेब कृपाळू होऊन, फडनिशीचीं वस्त्रें वैशाखमासीं दिल्हीं. त्यापासून जातच आहेत. अद्याप पावेतों तेथील नेमणूक व कागदपत्र हातास आला नाहीं. त्यास, आतां चहूं दिवसांत येऊन निघोन जातील, ऐसें दिसतें. मीहि त्यांस ऐवजाविसीं जे बोलणें तें बोलिलों. त्यांणी सांगितलें कीं, जो प्रकार आहे तो कोणताहि लोपला नाहीं, दृष्टीस पडतच आहे. सांप्रत पैसा निर्माण व्हावयाचा दिसत नाहीं. रा अनंतभट चितळे यांजवर सरकारचा पेंच आला आहे म्हणोन रोहिले यांच्या पाहाण्यांत आहेत, त्याजकडूनहि सध्यां कांहीं येतां दिसत ( नाहीं ), मामलनी संबंधे पेंच आहे. तो उरकल्यानंतर जें घडेल तें खरें. उरकण्यास वर्ष साहा महिने पाहिजेत. याच अन्वयें सर्व ज्याकडे आपले पांच रुपये यांची दशा कांही चांगली नाहीं. मनुष्यमात्र खराबींत आहेत. त्याहि मध्यें या प्रांतींचा ऐवज वसूल विनादाबा शिवाय होत नाहीं. त्यास श्रीनें कृपा केली आणि श्रीमंत नाना व तात्या यांची कृपा संपादून घेतली, आणि वकीलीचें काम करून घेतलें, आणि पूर्ववतुप्रमाणें चालिलें ह्मणजे पांच रु। सहजांत वसूल होईल, येविशीं पुणेंयास विनंतिपत्रें दोन चार लिहिलीं आहेत, तेथें सविस्तर लिहिलें आहे. आपणांस कळलेंच असेल, कळावें लोभ किजे हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४०
श्री.
१७२५ आषाढ वद्य ११
सेवेसी जिवाजी निराजी कृतानेक सां नमस्कार विनंती विज्ञापना ता। आषाढ वा ११ गुरुवार पावेतों मुकाम पागा कुंभारगांव वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्र पाठविलें, तें पावलें. पत्रीं आज्ञा केली जे, गारदौंड येथें शामसिंग कंपू आहे. त्यास, इंदापुरी राजश्री धुळोजी हुजरे याजकडील विठलपंत आहेत. त्यांनीं दोन वेळा येथील खंडणी घेऊन, मागती स्वार पाठऊन, येथील चौगुली यमाजी बुमाल नेऊन बैसविला आहे. नित्य स्वारांचे खर्च घेतात, त्यास, मनाईचें पत्र घेऊन पाठवितों, ह्मणून लिा. त्यास, अद्याप पत्रें आलीं नाहींत. येथें तों नित्य उपद्रव आहे. आणि अलीकडे, राजेम्हमद तोफखाना आहे, त्याचा चुलतबंधू इभ्रामखान जितींत आहे, त्याजपाशीं पागा आहे. त्यांनीं येथील मोकदमाचे नांवें चिठी लिहून, तमाम कुरण जप्ती आपल्याकडे आहे, कुरणांत पागेचीं घोडीं वगैरे उपसर्ग न देणें, ऐसें लिहून पाठविलें आहे. ते व जिन्नस पत्र पाठविलें आहे, याचे बंदोबस्त लवकर करून पाठवावे. आह्मी येथून जितीस सगुभाईस बोलावयास पाठविला होता. तो पागा घेऊन इभ्रामखान करकंभोसें येथे गेला आहे. त्याचे कारकून होते त्यांनी सांगितलें कीं, भोसेंकडून चिठी आली कीं, तमाम कुरणें जप्ती करणें, त्याजवरून चिठी पाठविली आहे. नागपंचमीस गांवास येणार आहे. तुह्मी येऊन बोलावें, आह्मांकडे गुंता नाहीं, ऐसें सांगितलें. आपण तेथे सर्व बंदोबस्त करून, लवकर पत्रें घेऊन पाठवावीं. पाऊस थोड़ा बहुत पडला आहे. कुरणाची रखवाली करविली आहे. गवत आठपंधरा दिवसांनी होईल, हाल्ली घोड्यांस कडवल मका घेऊन चारितों. चरावयास घोडीं सोडिलीं आहेत. कंपूकडील गारदौंडाहून चिठ्या होऊन, तमाम आसपास कडबा म्हणोन खंडणी घेतात. त्याचेहि लवकर बंदोबस्ताविशीं पत्र पाठवावें. राजेमहमद याचे नांवचें पत्र इभ्रामभाईस मनाई व धुळोजी हुजरे यांजकडील विठलपंत कारकून इंदापुरीं आहे त्यास चिठी पाठवावी कीं, दोन वेळ घांसदाणा घेतला असतां, मागती मुंगीचे राजाचे खंडणी देणें ह्मणून स्वार पाठऊन यमा चौगुला धरून नेला आहे तो सोडून द्यावा, एकंदर गांवास उपद्रव न देणें, म्हणोन धुळोजी हुजरे याचें पत्र घेऊन पाठवावें. खिलारी याचे उपद्रव भारी आहे. दो चौं रोजांनी सगुभाईस राक्षसभुवनास ऐवज वसूल करून आणावयास पाठवितों. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७० ] श्रीराम. ८ ऑक्टोबर १७१३
राजश्री सोनजी घोरपडे हवालदार व कारकून, कोट कोल्हापूर, गोसावी यांसीः -अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य स्ने।। रामचंद्र नीळकंठ हुकमतपन्हा आशीर्वाद व नमस्कार सुहुरसन अरबा अशर मया व अलफ शकरगिरी गोसावी जटाधारो परपरा दुर्गानाथ हे बहुत भले, परमेश्वरपरायण याणें विनंति केली जे, मौजे बहिरेश्वर कसबा हवेली परगणे मजकूर येथें जलशयनस्थल रमणीय आहे, तेथे मठ बांधोन राहावें, पुष्पवाटिका लावून जपतप करून असावें, असा हेत आहे, ऐशास, अतीत अभ्यागत येतील त्यांची व्यवस्था लागेल ये गोष्टीच्या सिद्धीस इनाम दिल्यानें राजश्री छत्रपति स्वामीस व स्वामीच्या राज्यास अभिवृद्धि चितून असो, ह्मणून. त्यावरून मनास आणितां गोसावी गुरुभक्त निस्पृहवृत्तीनें असतात. यांची मठस्थापना करून दिल्यानें श्रेयस्कर. अतीत अभ्यागतास अन्न पावेल तेणेंकरून राज्याचे अभिवृद्धीस कारण आहे. यांस मौजे मजकुरी अर्धा चावर जमीन इनाम देणें. सन इसनेमध्यें आह्मीं व राजश्री हिंदूराव पन्हाळ्यास स्वारीस आलो ते प्रसंगी मौजे मजकुरास मुकाम जाहला. तेव्हां श्रीचें दर्शन घेतलें. बहुत जागृत स्थल आहे. पूर्वी राजश्री थोरले कैलासवासी स्वामीचे वेळेस श्रीचे पूजेस नैवेद्य नंदादीप याची बेगमी होऊन ऊर्जा चालत होती, अलीकडे चालत नाही. ऐशास, हे सनद दिली आहे. जाणिजे. चंद्र २९ रमजान. निदेश समक्ष.