Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे---मिस्तर ईष्टवट याचे रुबरू इंग्रज फरासिसाचे बिघाडाचा बयान नवाब व मध्यस्ताचे बोलत असतां इष्टवट बोलला कीं “इंग्रजाचे बादषाहानें फरासिसासी जंग करण्याचा सरंजाम करून तयारी केली. हे बातमी फरासीसास समजल्यानंतर त्यांनीं आपली मजबुती करून लडाईस सिद्ध जाले, लडाईचे अगोधर इंग्रजाकडील .... .... जाहजें दर्याहून येत असतां फरासीसांना जमियतसुधा जाहाजावर चालून जा .... .... जाहाजें जबरदस्तीनें नेली. त्याजवर येक लडाई इंग्रज फरासीसासीं होऊन इंग्रजांनीं त्यांचीं जाहाजें कांहीं आणिलीं. याप्र।। वर्तमान आलें, '' ऐसें बोलण्यांत. सारांश इंग्रज फरासीसाची लडाई रुबकार आहे. दोंहीकडूनही जमाव, सामान सरंजाम पोख्त. काय घडतें पाहावें. हीं वर्तमानें सरकारांतही मालिट वगैरें कडून आलींच असतील. येथें ऐकिलें त्याची विनंति लि॥ असे. र॥ छ, १५ जिलकाद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार, शके १७१५.

विनंति ऐसी जे–नवाबांनीं बोलण्यांत आणिलें कीं “ विलायतीमध्यें ई. प्रजाचे बादषाहासी व फरासीसासी बिगाड जाला. लडाई मचून राहिली आहे. “ याप्र।। बोलत असतां मध्यस्तांनीं बयान केला कीं “ फरासीस सर्व रयेत येक आवा जमून त्यांनीं आपले बादषाहास जीवें मारिलें. दौलतीचा सर्व कारभार रयेत लोक करितात. दोन टोपीवाले यांसी व फरासीसासी लड़ाई जाली. त्यांत फरासीस गालब पडले, कितेक फिरंगी टोपीवाले यांसी फरासिसाचे........ह्म(ण) णें कीं बादषाहाचें प्रयोजन नाहीं; बादषाहावांचून दौलत सर्वांनीं चालवावी. हा खुलस .... .... केला---बहुत जमले. कमकसर सात आठ ( लाख ) मनुष्य जमून आहेत. जबरदस्ती भारी इंग्रजाचे बादशहास मोटा मनसबा पडला कीं हें खूळ कोणेंही प्रकां तोडलें पाहिजे. यास्तव इंग्रजांनीं वरकड टोपीवाले यांचे बादषाहांस अनुकुल करून घेऊन फरासिसाची तंबी करावी हा नक्षा बांधिला. दक्षण हिंदुस्थानांत जेथें फरासीस आढळेल तो मारून टाकावा. फरासिसाची कतल करावी. याप्र।। बेत केला. सदरहू-अन्वयें ज्याबज्या बंदर जातीचे जनराल व गौरनर यांजला हुकूम पोंहचले. फुलचरीचें मकान फरासीसाचे सिकमांत आहे तें घेऊन बंदोबस्त करावा. याप्र॥ चेनापटणचे गौरनराकडे हुकूम आला आहे. फुलचरीचा इरादा करणार. तेथील जनरलानें ही ........ तयारी केली आहे. इतक्यावर मसलत कोणे ........ कसी जाईल पाहावें हा मोटा हजुमा आहे.” याप्र॥ नवाब व मध्यस्ताचे बोलण्यांत आलें. ईष्टवट जवळ होता, त्याचेंही बोलणें याच अन्वयें पडलें. वर्तमान ध्यानांत यावें, यास्तव विनंति, र।। छ, १५ जिलकाद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-नवाबानीं, मिस्तर ईष्टवट व मीर आलमसमीप असतां, आह्मांसी बोलण्यांत आणिलें कीं " लाड कारनवालीस यांजकडून टिपु सुलतानसमंधी तहनाम्याची याद आली. त्याची नकल मदारुलमहाम यांजकडें पाठवण्याकरितां तुह्माकडें दिल्ही. तुह्मीं रवाना केल्यासही फार दिवस जाले, अद्याप त्याचा जबाब तिकडून आला नाहीं. जबाबाकरितां यांची निकड आहे. त्यास मदारुलमहाम यांजकडून जबाब किती दिवसांत येईल?” याचें उत्तर आह्मीं केलें कीं “ तहनाम्याची नकल इकडून रवाना केली ते मदारुलमहाम यांनीं पाहिली. जबाबही लौकरच तिकडून येईल." याजवर ईष्टवट यानें अर्ज केला कीं “ लाड साहेब यांजला विलायेतीस जाण्याची त्वरा. या जवाबाची इंतजारी करून राहिले आहेत. याजकरितां जबाब लौकर गेले पाहिजेत. येविषंई पैहम तिकडील निकडीचीं पत्रें येतात.” यावरून नवाबांनी आह्मास मागती सांगितले की “ तुह्मी मदारुलमाहम यांस आणीक लेहून जवाब........पोंहचेत ऐसें करावें.” त्यावरून विनंति कीं तहनामेप्रकर्णी जवाब ठरले असतील. रवाना करण्यास सत्वर आज्ञा व्हावी. र॥ छ, १५ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-नवाबाचे समक्ष मध्यस्तांनीं बोलण्यांत आणिलें कीं “मिस्तर बैद इंग्रज............पलटणाचे जमियेतसुधा महेश्वरा........अहिल्याबाई यांनीं तुकोजीराव होळकर............कुमकेकरितां रवाना केला तो मार्गी येत असतां सिंद्याकडील सरदारास बातमी समजल्यावरून त्यांनीं अंबोजी इंगळे यांस पांच हजार फौजेनसी त्याचे तोंडावर रवाना केलें. एक ब एक येऊन इंगळे यांचे फौजेसी व इंग्रजी पलटणासी मुकाबिला जाला, तीनच्यार पलटणें इंग्रजी लोक मारून लुटून ताराज केले. या प्र। वर्तमान आलें. यावरून ताजुब होतो कीं इंग्रजी पलटणें चार असतां पांच हजार सवारांनीं लुटून घ्यावीं असे सर्वथैव घडूं नये. ज्या गोष्टी न घडावयाच्या त्या घडतात. तस्मात् जिकडे येश तिकडे हे सर्व प्रकार होतात.” याप्र।। बोलले. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-होळकर सिंदे प्रकर्णी लढाईचें बोलणें चालत असतां मध्यस्तांनीं बोलण्यांत आणिलें कीं “हजरतीकडून राव सिंदे यांसी दोस्तीचा सिलसिला ठेवण्याची स॥ कीं राव पंतप्रधान यांचे तर्फेनें हिंदुस्तानचे बंदोबस्ताचे कामांत राव सिंदे शाहज्यानाबाद आदिकरून बादषाही कामावर सरगरम. यास्तव त्यांसीं दोस्ती ठेवणें लाजम व सलाह दौलत. बादषाही बंदोबस्तांत राव पंतप्रधान यांजकडून जो मुखत्यार तेथें राहील त्यासीं दोस्ती व ऐगानगतीचा सिलसिला ज्यारी करणें प्राप्त आहे.” याप्र।। नवाबाचें समक्ष मध्यस्तांनीं बोलण्यांत आणिलें. ध्यानांत यावें, यास्तव विनंति. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ट व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-सालगिरेचे नजरांचा .... .... होत असतां नवाबासमीप मध्यस्त व मी व मीरआलम होतों, नवाबांनी आह्मांकडे झुकून बोलण्यास आरंभ केला की * हिंदुस्थानांत राव शिंदे यांजकडील सरदार फौजसुधा आहेत. त्यांसीं व होळकर यांसीं पहिली लढाई मातबर होऊन होळकर यांची सिकस्त जाली. पुन्हा लढाईचे इराद्याने महेश्वराकडून जमीयत कुमकेस आली. त्यासहित होळकर याजपासीं जमा व पोख्त सरंजाम जाला इतक्यावर लढाई जाली असतां कसें घडेल ? हा दाबरोआब सर्वांत दिसो लागला. अशा समयांत सिंदे यांजकडील सरदारासी व होळकरासी सलूखाची ........ ठरून अखबारा आल्यावरून चिता-.... .... जाली होती कीं सरदार आपसांत समजोन म.... .... जाला. सुलह ठरली. हें फार चांगलें जालें. ऐसें असतां मागाहून मल्हारराव होळकर आले. त्यांनीं, आपले वडिलास निर्भर्छनापूर्वक बहुतु कांहीं बोलून, सेवटीं लढाई न करी त्यास फलाण्या शपथा याप्रा ज्या गोष्टी न बोलावयाच्या त्या बोलण्यांत आणून, जंग सुरू केली. सिंदे यांजकडील फौज सरंजाम मजबूत. लडाईचा ताबा न सोसतां होळकराकडील मोड जाला. कितेक सरदार शिपाई लोक बहुतकरून ठार व जखमी झाले. कितेक फरारी होऊन पसपा (?) जाले. त्यांचा पाठलाग सिंदे यांजकडील लोकांनीं केला. लुटले गेले. याप्रा। वर्तमान आलें. त्यावरून वाईट वाटलें, कारण कीं राव पंतप्रधान यांचे दौलतीतींल उभयतां सरदार ......... मातबर आपसांत असा कलह वाहडणें हें स-........ नाहीं. त्यांत एकवेळ लढाई पहिली जाली. ............ फौजैचा जमाव होळ करापासी चांगलाच जम-........ .... दाबाचे पोटीं सलुख ठरला. इतक्यानें दाव सलाबत मोठी होती. ते मल्हारराव यांचे ज्याहेलीमुळें हे खराबी ! मोठा सदमा गुजरला.'' याप्रा नवाब बोलत असतां मध्यस्तांनीं मधीं छुट चालविली कीं “दोनही सरदार उमदा. हजरतीस समान, बलकी होळकर यांची भेट व दाट परिचय आहे. असा कांहीं सिंदे यांजकडील भेटगोष्टींचा दंडकही नाहीं. होळकरावर हे नौबत गुजरली, सबब खफगांस जागा." याप्रा बोलणें झालें. रा छ, १५ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे---नवाबाकडे सालगिरेचे नजरेकरितां आह्मी मध्यस्तासहित गेलों. लालबागेमध्यें बरामद जाले. साहेबजादे सिकंदरज्याहा मीर पोलाद अली व सुभानअली होते. मीर आलम व पागेवाले सर बुलंदजंग आदिकरून तमाम सरदार, मनसबदार, मुतसदी हजर. सर्वांच्या नजरा जाल्या. मध्यस्तांनीं जवाहिराच्या किस्ती व पोषाग ............ दोन च्यार तन्हेचे व मिठाईचे खोन व ............ छेड्या तास बादलीनें मढवून त-हेत-हेच्या तयार केल्या त्या व चेंडू सोनेरी व रुपेरी ........ एक खोन भरून व शेहरा ह्मणजे मुडावली ( मुंडावली ? )यास तास मोत्याची झालर लाऊन तयार केली तें याप्रा खोन आणून गुजराणिले. हा सर्व सरंजाम नवाबांनीं पाहून घेतला. मध्यस्त व मी व मरिआलम समीप होतों. इंग्रजाकडील मिस्तर इष्टवट आला. कंचन्यांचे ताफेही पुढें हजर होते. नजराचे लोकाची दाटी फार. आणि लालबागेंतील मकान आटोपसीर. सबब नाच मना झाला. किल्यांतील विहिरीस मोटा लाऊन त्याचा नहर बांधून आणिला. त्याची चादर झडत होती. पांच सहा घटिकापर्यंत निषस्त राहिली. मध्यस्थ, मी व मीर आलम, ईष्टवट या चौघांसी बोलणें जालें. याचा तपसील आलाहिदा विनंति लिहिल्यावरून ध्यानांत येईल. रा. छ. १५ जिल्काद हे विनंति,

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

राजश्री नाना स्वामीचे सेवेसी.
विनंति ऐसी जे–--इकडील वर्तमान पेशजी........पत्रांची रवानगी केली त्यावरून ध्यानांत ( आलें असेल ). सांप्रत येथील वर्तमान नवाब व मध्यस्ताचे बोलण्यांत आल्याअन्वयें तपसीलें आलाहिदा पुरवणी पत्रीं विनंति लिहिली आहे. त्यावरून अवलोकनांत येईल. उत्तरें रवाना करावयास आज्ञा जाली पाहिजे. र।। छ. १५ जिल्काद हे विनंति.
ब-४

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-नवाबांनीं श्रीमंतास पत्र पेशजी पो।. त्याचा जबाब सरकारांतून रघोत्तमराव यांचे विद्यमानें रवाना जाला. याचा इतला राजश्री गोविंदराव यांणीं इकडे लिहिला आणि जवाबाचा मसावदाही पाठविला. त्या वरून मजकूर समजला. त्यास मसविदा मध्यस्तांस दाखविला असतां त्यांस कांहीं त्यांत गोड वाटावयाचें नाहीं. सबब मसविदा जवळ ठेऊन पत्र त्यांजकडें परभारा आल्याचें वर्तमान समजल्यावरून मध्यस्तांकडें कोन्हरेपंत यांस पाठवून त्यांस विच्यारिलें कीं “जवाब आपल्यापासीं आला कीं नाहीं. " याजवर मध्यस्ताचे बोलण्यांत आलें त्याचा तपसील गोविंदराव यांस लिहिला आहे. मारनिले विनंति करतील. त्यावरून सविस्तर ध्यानांत येईल. र॥ छ. ६ जिलकाद हे विनंति.

लेखांक १७५                                                                    श्री  

यादी प्रांत वाई एथील वतनदारीचे कायदे पूर्वीपासून चालत आहेत एकंदर प्रांत मजकुरातील देहाय बि तपशील १/३

एकूण बंद सुमार तीन →पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा