Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
( शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार )
विनंति उपरि. वाबले प्रकर्णी वगैरे म॥र पेशजी मध्यस्तासी बोलण्यांत
भाल्याचें यापूर्वी लि।। आहे. छ. २३ रोजीं मध्यस्तासमीप रावरंभा असता बाबले संबंधीं पाटिलबाबा व कल्याणराव यांस आपलीं व बाबाराव यांचीं पत्रें देवावीं या प्र।। बोलण्यांत आलें. त्यांनीं रावरंभा यांस विचारलें, हे बोलले “कीं वाबले पानगलीं आले तेव्हां बाजीद होऊन ‘ तीस हजार द्यावे ह्मणजे फारकत देतों’ ऐसें बोलत असतां ते समंई फडक्या न केला हें बजाजी पंतास पुसावें. ” बजाजीपंत बोलले “पंचवीस हजार, आह्मी बाबल्यास घ्या ह्मणत होतों. वाबल्याचे ह्मणणें ‘तीस हजार द्यावे’ या प्र॥ होतें. '' रावरंभा बोलले:-“मागें असा सोयेवार फडचा होत असतां तो राहून हलीं पंचवीस हजार तूर्त द्यावे, फडच्या पुढेंच; तेव्हां ऐवज तरी बाबल्यास किती ह्मणून द्यावा?” आह्मीं बोललों-“ याचा जाबसाल पाटीलबावापासी पडला. बाबाराव यांचे विद्यमानेंच ठराव झाला. त्यांस विचारावें”. त्यावरून, बाबाराव तर दरबारीं नव्हते, हरराव यांस मध्यस्तांनीं विचारलें. “जो फडच्या पंचवीस हजारावर पानगलीं होत होता तो आतां वाबल्या पंचवीस उगेच घेऊन, पुढें पन्नास हजार यावे, पाउण लाख द्यावे हें बोलतो ह्याचें काय” हरराव बोलले. “वाबले कजियेदलाल कोणाचे ऐकावयाजोगे नाहींत." मध्यस्तास ह्मटलें “आपण येविषयीं | पाटीलूबावा, कल्याणराव यांस पत्रें द्यावी.” त्यांचे बोलणे “ कल्याणराव यांस पत्र देतों, पाटीसबावास देत नाहीं. कारण कीं बीडचें कजीये हजारों पडतील; त्याच्या भीड़ा घालतील; यास्तव त्यांस पत्रे लिहित नाहीं. बाबाराव यांनीं राव सिंदे कल्याणराव व आबा चिटणीस याजला पत्रें लेहून द्यावीं ? या प्र॥ हरराव यांस ताकीद केली. ‘आपलेंही पत्र कल्याणराव यांस देतों ' याप्र।। बोललें. पत्रें आल्यानंतर रवाना होतील वाबले यांचीं पत्रें रावरंभा यांस आलीं. त्यांत ' कारभारी याकडोन फडच्या होत नाहीं ' हा गिला करून लिहिलें: पत्रे रावरंभा यांनी आह्मांस दाखविलीं. सारांश रावरंभाचे दौलतीस चांगलें पडावें ह्मणोन केलें. तत्रापि असें पडून त्यांचे गांवीं कांहीं नाहीं; याप्रा।। होतें. मुगुटराव वावले यांनीं आठरा हजारांचे रोख्याकरितां वसिलेदाराकडून मसाद्याबाबत ऐवज येणें येविषयीं वाबल्यांनी आह्मांस पत्रें व याद पाठविली. सरकारचें पत्र मध्यस्तास आलें व हरि नारायेण यांस वाबळ्यांनीं लिहिलें आहे तीं पत्रें मध्यस्तास पावतीं झाल्यावर ठरेल त्या प्रा। लिहिण्यांत येईल रा। छ० २ जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
( शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार )
विनंति उपरि. “वराडचे खुर्द्यामुळें दोन्ही सरकारचें नुकसान, याचा नक्षा ठराऊन सांगतों. याप्रा पेशजी मध्यस्तानीं सांगितल्या अन्वयें इकडून लिहिलें होतें. त्यास खुर्द्याचें लौकर ल्याहावें. मार्गाचे रितीनें उमरखेडचा बंदोबस्त मदारुल्महाम करतील. हें तुह्मी लिहिल्या प्रा। मध्यस्तास सांगितलें यांनीं तिकडील प्रांतीं, खुर्दा, कोणते माहलीं कसी चाल ? याचे पैसे, अधेले, पाठऊन देण्याकरितां सैदमुजवरखान यांस लिहित्यावरून त्यांनीं वसमत, माहूर, वासीम, परबणि, हाटें ? उमरखेड-वराडी-इत्यादिक महालचे पैसे मासल्याकरितां पाठविले. ते पुण्याकडे रवाना कर्ण्याकरितां मध्यस्तांनी आम्हाकडें पाठविले व तमाम प्रांतीं अमुक माशांचा पैसा चालावा हा नक्षाही ठरविला. याच्या यादीही यानीं तयार करविल्या प्रा देणार. ते घेऊन मागाहून रवाना करण्यांत येईल, रा। छ० २ माहे जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
( शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार. )
विनंति उपरि. "रोशनखानप्रकर्णी त।। लिहिल्याप्र।। राजश्री नाना यांजपाशीं पका निर्णय करून लिहितों' ह्मणोन लिहिले. उत्तम आहे ! निर्णय होऊन लौकर ल्याहावें. त्याप्र।। यांसीं बोलण्यांत येईल. सैदमुमुजबरखान यांनीं धोंडो मोरेश्वर यांजला मध्यस्ताकडें पाठविलें. म।।रनिलेंनीं कचें पकें वास्तव्य मध्यस्तास येकांतीं समजाविलें. उदईक धोंडो मोरेश्वर यांस मागती रवाना करणार. पाहावें-कधीं कोठें जाणार ! र॥ छ० २ जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
(शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार. )
पु॥ राजश्री गोविंदराव स्वामींचे सेवेशि,
विनंति उपरि. “बनबरी वगैरे बदोबस्तास बाजू राहून वलि हुसेन खां फौजसरंजाम समवेत जाणार. गजिंद्रगड तालुक्याचाही बंदोबस्त करतील ' याची इतला लिहिण्याविषयी मध्यस्तांनी सांगितल्याप्र।। पेशजी इकडून लिहिले होते. त्याचे उत्तर तुह्मांकडून आले की:---“पापण्णापंत याचा कारकून पांच सहा महिने येथें आला आहे. राजश्री भाऊही होते. मोठे काजी याचे जलसे होऊन टिपू सुलतान यांचे तहप्र।। गांवखेडीं सोडून देविलीं; व तहपासोन वासलातिचा ऐवजही माघारा देविला. सनदापत्रें - कांहीं गुंता राहिला नाहीं. रामराव दोचौं दिवशीं जाणार.” इत्यादिक लि। मध्यस्तास सांगितलें. संतोष पावोन बोललें कीं, “मोठी गोष्ट व चांगली ती जाली. इतका प्रकार तेथें जाला. परंतु, रघोत्तमराव यांजकडून आह्मांकडे ये विषयींचा लेख अद्याप आला नाहीं. येईल.” या प्रा। बोलणें झालें. र॥ छ. २ जिलकाद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
( शके १७१५ वैशाख वद्य १९ मंगळवार.)
विनंति उपरि. मध्यस्ताचे पत्राचा जवाब, राजश्री नानाकडून छ १६ शवालचे रवानगींत पाठविला तो छ. २१ रोजीं पावला, मसविद्यावरुन सविस्तर मार ध्यानांत आला. पत्र मध्यस्तास जबाबाचें प्रविष्ट केलें. कळावें रा॥ छ. २ जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
१/२ सदरहू आन्वये ठाणे प्रा। वाई येथील कौल एकूण कलम १
१/२
१ शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमे ग्रामस्त कसबे वाई याणी ग्रहणकाली कडत जोसी को। मा।र यास प्रतिवषी पासोडी एक व गहू व गुढियाचे पाडव्यास कुडव एक देऊ ह्मणोन पत्र लेहून दिल्हे यास वर्षे आज ता। १४८ होतात कलम १
२ शके १५५६ मधील पत्र विभागाविसीची यासी वर्षे आज ता। १४४ होतात त्यात आन्वय
१ महजर मध्वाजी कृष्ण पडीत हावालदार याचे वेलेचा की नाग जोसी बिन गण जोसी व कडत जोती बि॥ रग जोसी या उभयतामध्ये विभागाचा कजिया लागला होता कडत जोसी ह्मणे की वृत्तीमधे दिवाणात होन पडले आहेत त्याचा विभाग नाग जोसी याणे दिल्हा नाही. याजमुळे विभागास खलेल पडली होती नाग जोसी विभाग दिल्हा ह्मणोन रवा काढीन ऐसे बोलोन दिव्यास सिध्द जाला मग कडत जोसी याणे रवा राहून नारायण भट थिट्यापासील आठरा होनाचा कतबा सोडऊन नाग जोसी यास विभाग दिल्हा ह्मणून त्याजवर आवघ्या दिवाणलोकाची व पाढीची निशाने आहेत कलम १
१ कडत जोसी याणे नाग जोसी याजपासून वीस होन पडले होते ते घेऊन वृत्तीचा विभाग साक्षीनिसीं विभागाचे पत्र करून दिल्हे आहे कलम १/२
१ तिमाजी पताजी याचा कागद सन सबा सलासीन आलफचा कौल मोकदम देह १० यास त्यात कडत जोसी बि॥ रग जोसी व नाग जोसी बि॥ गण जोसी यास जोतीषाकरिता कसबे मा।री गरगशा लागला होता त्याचा निवाडा करून सदरहू गाव कडत जोसी याजकडे दिल्हे आसेत ह्मणऊन यास वर्षे आज ता। १३६ होतात कलम १
१ शके १५८० मध्ये रग जोसी याने बाप जोसी यास ब्राह्मणसभा विद्यमाने देशकुलकर्णीयाचे घरी शफत पुरसर पत्र लेहून दिल्हे की कसबे वाईचे जोतीष वर्षेलीप्रो। आनभवावे मध्वाजीपतावेलेस महजर जाला आहे त्याप्रो। समत मुर्हे व हावेली चे गाव वाटणीप्रो। चालवावे ह्मणोन यासी वर्षे आज ता। १२० होता आहेत कलम १
१ सन समानीन आलफात पिलावा देशमुखीण प्रा। वाई यासी कोन्हेर रगनाथ सरसुभेदार प्रा। कर्हाड माहालनिहाय यानी पत्र पाठविले की शकर जोसी वाईकर यामध्ये व आडकर यामध्ये धोमचे थडीचा वृत्ती समधे कजिया आहे त्यास उभयता तुह्मी सागाल त्यास राजीनामे त्यावरून तुह्माकडे पाठविले आहेत तरी सत्य स्मरोन निवाडा करोन हुजूर लेहून पाठवणे ह्मणोन यास वर्षे आजी ता। ९२ होतात कलम १
१ कौल सुभा प्रो। वाई सु॥ मया अलफाचा त्यात शाम जोसी यजुर्वेदी व आपदेव भट आडकर याचे नावे की तुम्हा उभयतामध्ये धोमचे थडीचा गरगशा होता निवाडा तारोतार उभयतानी निमे निमे घ्यावे म्हणून यास वर्षे आज ता। ७९ होतात कलम १
५ किता पत्रे आज ता। ७३ होतात कलम ५
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
कसबे मा।रचे जोतीषपणाचा व इनामाच्या सदा आपणापासी आहेत कालीवर यास बलूते अद्यापवर नाही कडत जोसी वृत्ती चालवावयास ठेविला त्याचा पुत्र रग जोसी त्याचा पुत्र शाम जोसी त्याचा पुत्र गोविंद जोसी याप्रमाणे पुरुषाचा भोगवटा वतनात त्याचा चालत आला आहे त्यात कडत जोसी याणे सालसूद गुमास्तगारी केली तेव्हा कजिया जाला हे आपणास ठाऊक नाही रग जोसी आपले च वतन ह्मणोन चालऊ लागला ते समई आमचे वडील दरिद्री होते आक्षरहिन्यामुळे वाद सागावयाचा इलाज नव्हता रसूलखानाचे कारकीर्दीस वाद्याने महजर करून घेतला त्यात लिग जोसी याणे शूद्रवर्गाचे जोतीष आनभवावे ह्मणोन लि॥ आहे परतु त्याप्रो। आह्मी आनभविले नाही आलीकडे आक्षेप करावा तरी वादी प्रतिनिधीचे सोइरे यामुळे व नातवानीमुळे आह्माकडून आक्षेप जाला नाही कडत जोसी याचा बाप रग जोसी यास मुतालीक ठेविला होता ते वेलेस त्याचा व त्याचे बापाचा कोणासी कजिया होऊन दिवाणचे आगर जमीनदाराचा कागदपत्र वाईकर जोसी व हरदो खोरीयाचे जोतीषपणाचा त्या दोघाचे नावाचा गगाधर जोसी याजवल असला तरी आपण कजियास खोटे वतन पूर्वीपासून आमचे आहे रग जोसी यास गुमास्ता ठेविलियास आजमासे पावणे दोनसे वर्षे जाली आहेत त्यालीकडे गगाधर जोसी याच्या वडीलाचे वतन ऐसा कागदपत्र निघाला आणि पाचाच्या कयासास आला तरी त्यास आपण मान्य आसो नायकवाडी व सेरीकर व हशम वगैरे लिग जोसी यापवेतो चालत होते सदरहू हकीकत आह्मी लेहून दिल्ही हे जमीनदाराच्या व पाढरीच्या मुखे व सक्राजी सभदेव व आवधुत तिमाजी व लिगोजी बापोजी देशपाडे याचे वशाचे मुखे खरे करून देऊ न देऊ तरी आपल्यास वतनासी समध नाही ह्मणोन १
येणेप्रो। तकरीर लेहून दिल्हेवर प्राचीन कागदपत्र काय आसतील ते दाखवणे ह्मणोन उभयता सरकारातून आज्ञा केली त्याजवरून कागद दाखविले त्यातील खुलासा
१ तुह्माकडील कागद शके १४२४ दुदुभी नाम सवछरे सु॥ सलास तिसा मयामध्ये कसबे मा।री हकीम व गोत मिलोन आक जोसी यास महजर करून दिल्हा की एसोबा बिन रामोबा केजले याणे फिर्याद केली की का। मा।रचे जोतीष आपले ह्मणून रवा काढीन तेव्हा हाकीमाने तेल रवा नेमून दिल्हा एसोबाने रवा काढिला खोटा जाला आक जोसी बिन नारायण जोसी याचे पुरातन वतन ह्मणोन यास वर्षे आज ता। दोनसे श्याहत्तर २७६ होतात
कलम १
१ शके १५०२ मध्ये काय दरणा बि॥ साय दरणा गुरव याणे आपला घर ठाणा बाल जोसी बिन रग जोसी मिरासी प्रा। वाई यासी पाच होन घेऊन विकत दिल्हा त्या खरेदीपत्रावर साक्ष गोविंद जोसी पणदरेकर ऐसे लि॥ आहे वगैरे जणाच्या साक्षी आहेत गोविंद जोसी तो वासुदेव जोसी याचा आजा या पत्रास आज ता। वर्षे १९८ होतात कलम १
१ शके १५०४ गण जोसी याने नारायणभट थिटे कसबे वाई यापासून दिवाणचे तसदीकरिता कर्ज होन १८ घेऊन आपले जोतीषपणाचा विभाग नीम गाहाण ठेविला एविसीचे पत्र लेहून दिल्हे त्यावर साक्षी गोविंद जोसी पणदरेकर ह्मटले आहे वगैरे कोणाच्या साक्षी आहेत यास वर्षे आज ता। १९६ होतात कलम १
२ किता कागद यास वर्षे आज ता। १८२ होतात कलम २
१ महजर सन सबा तिसैन तिसा मयामधील त्यात रामेश्वरभट बिन नारायणभट थिटे वादास उभा राहिला तेव्हा रग जोसी बि॥ नरस जोसी याणे विदित केले की पेशजी पासी भास्कर थिटा यास कसबे वाई येथील जोतीषपणाचे गुमास्तगिरीवर ठेविला होता तो आपले च ह्मणो लागला आणि दिव्यास राजी जाला तेल तापविले मग मागे सरला खोटा होऊन एजितखत लेहून दिल्हे ते पाहून मनसुबी करणे त्याजवरून एजितखत पाहून व गोही साक्ष घेऊन निवाडा केला रामेश्वरभट थिटा खोटा जाला यजुरवेदी खरे जाले ह्मणोन कलम १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
मिती शके १७१५ ज्येष्ठ शुद्ध २ सोमवार.
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी,
विनंति उपारे. तुम्हांकडील पत्रें छ. १६ व छ. १८ रवानगीचीं छ. २१ व छ. २३ शवालीं पावलीं. यांजपैकीं काहीं उत्तरें पहिलीं पाठविलीं. बाकीचीं तयार जालीं. एकादो दिवसांत रवाना होतील. सांप्रत इकडील सविस्तर म।।र मध्यस्तासी बोलणें जालें, याजवर बाबाराव आम्हांकडे आले. याचा त।।, राजश्री नाना यांचे पत्रीं लिहिलें आहे, त्यावरून कळेल. पेशजी इकडून रवानग्या जाल्या त्यांसहित येकंदर पत्रांचीं उत्तरें व तिकडील वर्तमान विस्तारें लेहून पाठवावें. तुमचे पत्राचे जाब उदईक रवाना होतील. र।। छ. ३० सवाल हे विनंति.
माहे १ जिल्काद उर्फ जेष्ठमास छ, २ रोज मंगळवारीं पत्रें डांकेवर रवाना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
त्याचे रवे दिव्य होऊन महजर जाले व आणखी वाद जाहाले व आलीकडे धोमचा वाद जाहाला एक एक वादी चालीस पन्नास वर्षे कैलासवासी सिवाजी माहाराज व आईसाहेबपर्यत(त) होत आला त्याचा महजर व एजितखते जाली आहेत वासदेव जोसी याचे वडीलाचा दाखल कधी च ना गावातील च्यार ब्राह्मण आगातुक आहेत तैसा हा ही याचा वडील विद्येच्यामुळे दिवाणात जात होता यास्तव दिवाण जोसी ह्मणो लागले व याचे शरीरसमधी बहुत ह्मणोन त्यानी आह्मावर उभा केला खोटा जाला आहे परतु शरीरसमधी याणी दिवाणास अर्ज करून पचाग मात्र कोटामध्ये सदरेस सागावे तेथे लग्नमुहूर्त होईल ते आह्मी करावे याप्रमाणे आजपर्यंत चालत आले प्रस्तुत कोट उजाड पडला आहे परतु कोटातील लोकाचे लग्ने जाली तरी आक्षत आह्मी घेत आहो व वासुदेव जोसी याची मुजी व त्याचे वडीलाची लग्ने व मुजी आमच्या वडीलानी घटका घालून लग्नसिध्दी करून आक्षता घेत आले ऐसे आसता वासुदेव जोसी आह्मास ह्मणतो जे आपले मुतालीक आहेत त्यास ही गोष्ट अप्रमाण आह्मी कोणाचे मुतालीक नव्हो वृत्ती पुरातन आमची आहे वडील वडील खात आले त्यास वासुदेव जोसी मुतालीक ह्मणतो याप्रमाणे त्याचे खरे करून दिल्हीयास आपण खोटे ह्मणून १
वासुदेव जोसी याणे लेहून दिल्हे की कसबे वाई व जोरखोरे व जांबुलखोर वगैरे गाव येथील जोतीषपणाचे वतन पुरातन आपले वडील वडील आनभवीत आले त्याची नावे दखल नाहीत आलीकडील पुरुषाची नावे मूळ पुरुष नरस जोसी त्याचा पुत्र लिग जोसी त्याचा गोविंद जोसी त्याचा माहालिग जोसी याचा पील जोसी त्याचा गोविंद जोसी त्याचा कृष्ण जोसी त्याचा आनत जोसी त्याचा लिग जोसी त्याचा हाली आपण वासुदेव जोसी याप्रमाणे आपली वशावल आहे इदलशाई कारकीर्दीस आमचे वडील कसबे मा।रचे जोतीषपण चालवीत होते ते प्रतिष्ठित विद्वान होते त्याणी दिवाण सेवेमुळे गावात फिरावयाची गगाधर जोसी याचे वडील कडत जोसी याचे पुत्र रग जोसी यास पाढरीचे सेवेकरिता ठेविले ते चालवीत आसेत आपले वडील सरकारची सेवा करीत ते वेलेस कजिये पडले होते ते समई याचे वडीली व्यवहार सागून त्याचे निवारण केले हे सेवकपणे होते इदलशाई बुडाली याउपरात हे च धणी होऊन गाव चालवीत होते व आपण दिवाण चाकरी करीत होतो याजवर मोगलाई जाली त्यामुळे मुलूक उजाड पडला भाऊबद परागदा होऊन गेले व आमचे वडील आनत जोसी मृत्यु पावले त्याचे पुत्र दाद जोसी च लिग जोसी यास आक्षर नाही आन्न भक्षावयास नाहीसे जाले तेव्हा गगाधर जोसी याचे वडील खावद ह्मणोन गाव चालऊ लागले रुसुमखान याचे वेलेस आमचे पिते लिग जोसी याणी कजीया गगाधर जोसी व गोपाल जोसी याजपासी केला त्यास देशमुख व देशपाडे व चापसेट कारभार करीत होते ते समई कैलासवासी परशरामपत प्रतिनिधी आमच्या वाद्याचे सोइरे यामुळे त्याणी याजला आज्ञा केली की हे आमचे शरीरसमधी आहेत याचे जोतीषपणाच्या वतनावर स्थापना करणे त्यावरून देशमुख व देशपाडे व चापसेट सेट्यानी ठाणियामध्ये कजिया मनास आणून पैका टका ठाणेदारास देविला व आपण हि घेतला आणि आमचे बापास मा।र देऊन कैदेत ठेऊन गाव जोतीषपणास समध नाही आपण दिवाण जोसी ऐसे शामजी लिगोजीने आमचे पित्यापासून एजितखत लेहून घेतले त्यावर आमच्या पित्याचे हातची सही व देशपाडे याचे बिकलम नाही त्यापासून दिवाण जोसी ह्मणतात यामागे भोगवटा गाव जोसी ह्मणोन होता पूर्वी इदलशाई कारकीर्दीस सक्राजी सभदेव व आवधुत गिरमाजी देशपाडे याणी कजियामुळे जोरखोर व जाबुलखोरे वगैरे गाव अमानत करून मानभाग गगाधर जोसी याचे वडीलापासून घेत होते हे देशपाडे यास जाहीर आहे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
(शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार,)
विनंति उपरि.
१ “शमषुल उमरा बहादुर यांचे षादीकरितां ममईचा जिन्नस खरिदी करविला. याजकरितां पंधरा हजारांची हुंडी त्यांजकडील पाठवावी " ऐसें लिहिलें त्या प्रें।। अजमसाहेब यांसी बोलणें जालें, यांचे ह्मणणें कीं “ ममईचा जिन्नस पांच सात हजारांचा खरिदी करविला. पंधरा हजार कशावरून गोविंदराव यांनीं लिहिलें ?'' त्यास, पांचसात हजाराचा यांनीं आणविल्या प्रों जिन्नस खरीद व्हावा. पंधरा हजारांचें प्रयोजन नाहीं. अधिक खरिदी करूं नये, याचे ऐवजाची हुंडी यांजपासोन घेऊन येकादो दिवसीं रवाना होईल.
१ “मोहराचे खरिदीच्या ऐवजाची हुंडी लौकर यावी; ' ह्मणोन लि'॥. त्यास, येकादो दीवसांत हुंडी खाना होईल.
२ दोन कलमें, र।। छ. २४ सवाल हे विनंति.
छ. ३० रोजीं रवाना टपा.