Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

९ आता द्वितीया साधनिकेकरिता घेऊ. द्वितीयेपासून सप्तमीपर्यंतच्या विभक्त्यांची रूपे साधताना प्रथमारंभी असा इशारा देणे इष्ट आहे की, प्रथमेच्या तिन्ही वचनांची रूपे इतर विभक्त्यांच्या रूपांना आधार आहेत. म्हणजे प्रथमेच्या रूपांना कर्म, करण, संप्रदान, अपादान, इत्याद्यर्थक प्रत्यय लागून बाकीच्या विभक्त्यांची रूपे सिद्ध होतात. देव याचे प्रथमैकवचन देवस् याला म् प्रत्यय लागून देवस्+ म्= देवह्+ म् अशी स्थिती होई व ह् चा पूर्वसवर्णांत लोप होऊन ऐवम् असे द्वितीयैकवचनाचे रूप साधे. त्याचप्रमाणे देवौ+ म् = देवौम् अशी स्थिती होऊन अन्त्य म् चा लोप होई व देवौ हे द्वितीया द्विवचनाचे रूप साधे. प्रथमेच्या अनेकवचनाचे देवाँ: म्हणून जे चवथे रूप सांगितले ते आधाराला घेऊन देवाँ:+ म् अशी स्थिती होई व अनुनासिकाचा न् होऊन आणि अन्त्य म् चा लोप होऊन देवान् हे वैदिक रूप बने. म् प्रत्ययाचा अर्थ निर्जीव वस्तू, सजीव किंवा सामर्थ्यवान् वस्तूने असमर्थ किंवा निर्जीव वस्तूवर व्यापार चालविलेली वस्तू.

८ आता त्रिवचनाचें ( कारण रानटी आर्यांना तीनपर्यंतच आंख मोजता येत होते ) ऊर्फ ज्याला पुढे पाणिनी बहुवचन म्हणू लागला व आपण अनेकवचन म्हणतो त्याचे पृथक्करण करू. रानटी आर्य तीन देव दाखवावयाला एकसंख्यावाचक स्= -ह् हा प्रत्यय देव शब्दास तीनदा लावीत. म्हणजे देव + स् + स्+ स् अशी स्थिती प्राप्त होई. पहिल्या स् चा -ह् होऊन पूर्वसवर्ण अ होई आणि तिस-या स् चा -ह् होऊन उपसर्जनीय बने. म्हणजे देव + अ+ स् +: अशी स्थिती होऊन देवास: हे त्रिवचनाचे रूप निर्माण होई किंवा पहिल्या स् चा -ह व अ होऊन दुस-या दोन्ही स् चा -ह् व उपसर्जनीय होई आणि देव + अ+: + : अशी स्थिती बनूनव देवा: हे त्रिवचनाचे दुसरे रूप साधे. देव : या रूपात एक स् आहे, देवौ यात दोन स् आहेत व देवा: यात तीन स् आहेत. या स् प्रत्ययाचा अर्थ एक म्हणून आपण अनुमान बसविले. या अनुमानाला एक प्रत्यक्ष पुरावाही आहे. संस्कृत व सपदि अशी दोन अव्यये अगदी जुनाटांतल्यापैकी आहेत. पहिल्याचा अर्थ एकवेळ व दुस-याचा अर्थ एकदम असा आहे. येथे दोन्ही शब्दात स चा अर्थ एक असा आहे हे निश्चित. अनेकवचनाचे तिसरे रूप देवे. हे रूप देवास: व देवा: या रूपाहून जुने. अस्मे, युष्मे, सर्वे , वगैरे सर्वनामात हे एकारात रूप वैदिकभाषेत येते. हे एकारात रूप पैशाच्या भाषेत आढळते, जसे पुलिशे. याची साधनिका वरच्या दोन्ही रूपाच्याहून निराळी आहे. देवासस् या रूपात स्=ह्= अ असे आदेश होतात. देवे या रूपात स्= ह्=अ=य=इ असे आदेश होऊन देव+स्+स्+स् = देव + अ+इ+इ अशी स्थिती बने व देवे हे रूप निष्पन्न होई. अनेकवचनाचे चवथे रूप देवाँ: याची साधनिका अशी : हृ कोणता ही अवसानीचा अप्रगृहृ स्वर विकल्पे अनुनासिक असे. त्यामुळे देवाह् या रूपातील अन्त्य आ अनुनासिक उच्चारीत, म्हणजे देवाँह् असा उच्चार होई. या अनुनासिकाचा उच्चार न् होऊन देवान्ह् असे रूप होई. अन्त्य ह् चा लोप होऊन देवान् हे रूप बने.

७ -ह् व उपसर्जनीय हे कंठ्य आहेत व त्यांचे अ शीं सावर्ण्य आहे. ह् वर जास्त जोर दिला म्हणजे -ह् ही कंठ्य होतो व त्याचे अ शी सावर्ण्य निपजते. सबब पुनर् + रवि : याचा संधि र् चा अ होऊन, पुन अ रवि := पुना रवि : असा होतो. र् च्या पुढे र् आला असता पाठीमागील स्वराला दीर्घत्व येते म्हणून पाणिनी सांगतो. परंतु ते का येते हे तो सांगत नाही. खरे कारण -ह् चा पूर्वसवर्णीभवन पावण्याचा स्वभाव होय. पुन-ह् रवि: = पुन अ रवि: । हरि : रमते = हरि-ह् रमते = हरिहि रमते = हरी रमते. । गुरु:= गुरुहु = गुरुउ= गुरू रमते. । इ. इ. इ. -ह् चा हा स्वभाव प्रथमेचे द्विवचन साधताना उत्तम दृष्टीस पडतो. स् हा प्रत्यय एक ही संख्या दाखवितो. दोन ही संख्या जुनाट रानटी आर्य दोनदा एक ही संख्या उच्चारून प्रदर्शित करीत. स= -ह् = : हा प्रत्यय एक देव दर्शविण्यास एकदा लावीत आणि दोन देव दर्शविण्यास दोनदा लावीत तेव्हा, देव + स् +स् अशी द्विवचनार्थक स्थिती आली. स चा -ह् होऊन देव + -ह्+ -ह् अशी स्थिती आली. पुढे -ह् ऊर्फ र् असल्यामुळे पहिल्या -ह ला पाठीमागील अ मुळे पूर्व सवर्णत्व येऊन देव + अ + ह् अशी स्थिती झाली. अनेक रानटीभाषात ह् चा व् आणि व् चा उ होत असतो. तोच स्वभाव रानटी आर्यांच्या ही भाषेचा होता. सबब दुस-या -ह् चा उ होऊन देव +अ+ उ अशी स्थिती झाली. र् चा उ होतो हे अतो रो: या सूत्राकत पाणिनी सांगतो. परंतु र् चा उ का होतो हे तो सांगत नाही. स् चा उच्चार जनाट रानटी आर्यांच्या भाषेत -ह् होता व -ह् = ह् चा व् = उ असा बदल ते करीत हे पाणिनीला माहीत नव्हते. पण स् चा र् होतो व र् चा उ होतो हे तो विचक्षण वैय्याकरण पहात होता आणि जे त्याने भाषेत प्रत्यक्ष पाहिले ते त्याने काळजीपूर्वक नमूद करून ठेविले. हा त्याचा आस्थेवाईकपणा सध्या आपल्या फार उपयोगी पडतो. कारण तो जी स्थिती नमूद करतो व जे बदल दाखल करतो त्यावरून भाषेचा पूर्वींचा इतिहास कळण्यास मार्ग होतो. येणेप्रमाणे देव + अ+ उ अशी स्थिती प्राप्त हो उन द्विवचनाचे देवौ हे रूप पाणिनीकाली व वैदिककाली साधे. देवौ म्हणजे दोन देव. देवौ रूप होताना पहिल्या -ह् चा अ होई व दुस-या -ह् चा उ होई. दुस-या -ह् चा ही कित्येक रानटी आर्य पूर्वसवर्णच करीत, म्हणजे देव + अ + अ अशी स्थिती येऊन देवा असे द्विवचनाचे दुसरे रूप बने.

६ अति जुनाट वैदिकभाषेत स् चा उच्चार -ह् सारखा कंठ्य होत असे म्हणून वर सांगितले . या अति जुनाट -ह चा पाणिनीयकाली व वैदिककालीं र झाला. परंतु हा -ह् अत्यंत लुप्त झाला नाही. पदांती पाणिनीयकाली हा ऐकू येत असे. पाणिनीने ससजुषी रु: या सूत्रात पदांतीच्या स् चा र होतो म्हणून सांगितले आहे. स् चा र होणे हा आपल्याला चमत्कार वाटतो. परंतु पाणिनीच्या या र् चा उच्चार -ह् होता हे लक्षात घेतले म्हणजे हा चमत्कारिकपणा वाटत नाहीसा होतो. -ह् तील ह् वर जास्त जोर दिला म्हणजे -ह् ह च्या किंवा उपसर्जनी याच्यासारखा भासतो, आणि र् वर जास्त जोर दिला म्हणजे -ह् रच्यासारखा भासतो. स् चा उपसर्जनीय होतो व स् चा र् होतो. हे जे दोन नियम पाणिनीने दिले त्याचे कारण -ह् चे हे दोन उच्चार होत. येणेप्रमाणे रामस्पासून दोन रूपे होत, राम: किंवा रामह् आणि राम-ह् किंवा रामर.

यैसा भयाचकित जाला ।। युध्दाचा प्रसंग सांडिला ।। पाहातां संग्रामि आटला ॥ नवलक्ष दळभार ॥ ११ ॥ देवगिरीदगडातळवटीं ।। संव्हार जाला जीवयाती ।। नवलक्ष्याचि गणणा समस्ती ।। जाली देखा ।। १२ ।। भुरदास निवटला रणांगणी ।। तयाचा पुत्र दुखवलासे कर्णी ।। तुर्का माहांमदासी निर्वाणी ।। महायुध्द जालें ॥ १३ ॥ बहुत लोटले नावाणिक ।। मग चित्र लोटला सेनानायक ।। त्याणे पळविले पारके पाईक ।। भुरदासपुत्रें ॥ १४ ॥ महाक्षेत्रि पडिले समरंगणी ॥ माहांमदाचि पुरलि आयणी ।। मग गेला रण सांडोनी ।। आपुले सैन्या माजी ।। १५ ॥ मग समस्त क्षेत्रि बळवंत ।। डोरले जैसे वसंत ।। बळें चालिले मारित ॥ सैन्य म्लेंछाचें ।।१६॥ विंधिती बाण निर्वाण ।। दुश्चित म्लेंछाचें मन ॥ मग धरिला तुर्क दारुण ।। महाविर ।। १७ ।। मग जाला हाहाकार ॥ जीवें धरिला महाविर ॥ धरिलिया वरि रणक्षेत्र ।। जालें येथे ।। १८ ॥ ऐसें युध्द जालें निर्वाणी ।। सैन्य पडिले येक क्षोणी ॥ तो विस्तार लीहितां वाग्वाणी । विस्तारेल अति पैं ॥ १९ ॥ व्यास वक्ता संस्कृती ।। कथा बोलिला यथास्थिती ।। ते मी वदलों प्राकृती ।। अज्ञानयागें ।। २० ।। पुनरपि तो माहामद ।। क्षेत्रिया पासोन जाला हस्तगत ।। मिळाला आपुलिया दळा आंत ।। स्वसंगति म्लेंछासी ।। २१ ॥ ऐका श्रोते यथापुर्वक ॥ कथा सांगितली सकळित ।। मोरे होणार गत अगणित ।। महिमा देवाची ॥२२॥ असो मिळोनियां आपुले दळी ।। बुध्दी केलि बरवी ॥ मेळविले पुनरपी ।। महाम्लेंछ ।। २३ ।। मग केला आपुला निश्चये ।। युध्दी घेणे आह्मासिं जये ।। ह्मणोन उठावले महाबळिये ।। क्षेत्रियां वरी ॥ २४ ॥ मारणे किवा मरणे ।। मागें कोण्हि न पाहाणे ।। युध्दासिं मीसळणे ।। महाविर हो ॥ २५ ॥ वाजिल्या भेरि तुतारे ।। रणसींगे अपारे ।। हांका मारिती गजरें ।। घोर शब्द होतसे ॥ २६ ॥ तैसे च क्षेत्रि मिळाले ।। दोन्हि भार आदळले ।। महांमारि पेटले ।। येकमेकां वींधिती ॥ २७ ॥ येश म्लेंछासिं आलें ।। क्षेत्रियांचे दळ आटो लागलें ।। रामरायासीं वधिलें ।। माहामदें ॥ २८ ॥ तेथे जाला हाहाकार ।। रणी पडिला महाविर ।। ईतर ते हि थोर थोर ।। मृत्यु पावले ।। २९ ।। पळापळ सुटलि सैन्यासी ।। म्लेंछ प्रवर्तले महामारेसी ।। प्रेतें नाचति रणभुमिसी ।। सीरे उसळती ।। ३० ।। अशुध्दे चालिला पूर ।। दिवसा पडिला अंधःकार ।। धरणी महाशब्द भुभुःकार ।। शेष दचकला ।। ३१ ।। दिशा चक्र भयानक ।। क्षेत्रि पडले असंख्यात ।। ईश्वरि ईछा यथार्थ ।। रुषिभाषित ॥ ३२ ॥ म्लेंछासि आला जयो ॥ क्षेत्रि पाबले पराभवो ।। युगप्रमाण अन्वयो ॥ सहजें चि आला ।। ३३ ।। ऐसि जालि शांती ।। तृप्त पावली भुतयाती ।। म्लेंछ आपुले बळें राज्यें घेती ।। क्षेत्रियांचीं ।। ३४ ॥ मोहोरे होणार यकाकार ।। म्हणोनि म्लेंछासि आधिकार ।। वशिष्ट सांगोनि गेला महाथोर।। सूर्यवंशासी ।। ३५ ।। ऋषिभाषित यथार्थ ।। भविष्योत्तरि कथिलें सत्यार्थ ॥ रुषि वक्ता पुंण्यमूर्त ।। यथानुक्रमे ।। ३६ ॥ तें उचिष्ट मज लाधलें ।। ह्मणोन अन्वयि आणिलें ॥ भविष्यार्थ बोलिले ।। सत्यमेव ।। ३७ ।। प्राकृत वदलों यथानिती ।। पुराणे मीळति संमती ॥ शैयाद्रिखंडी पुणती ॥ भाषित केलें ।। ३८ ।। ब्रह्मोत्तरखंडिची कथा ।। अन्वयें आणिली यथार्था ।। श्रोते ऐकावि स्वात्महिता ।। पुर्वउत्पन्नता यावत् प्रळये ।। २९ ॥ मी अज्ञान मुढ मंद ।। अन्वयि बोलिलों प्रसिध्द ।। क्षमा मागतों शब्दोपशब्द ।। निवडोनि घ्यावा ॥ ४० ॥ आतां विनती सर्वांसी ।। क्षमा मागतों तुह्मा पासी ।। वेळोवेळा चरणासी ।। लागेन सहजें ॥४१॥ भगवान् दत्त म्हणे ।। श्रोत्यासि विनवी कृपापणे ।। संपुर्ण ग्रंथ येथोन ।। म्या केलासे पूर्ण पैं ॥ ४२ ॥ इति श्रीचिंतामणिकौस्तुभपुराणे ईश्वरपार्वतिसंवादे वंशविवंचनकथानाम चतुर्थोध्यायः ।। ४ ।।

श्रीगणेशायनमः ।। स्वस्त श्रीनृपविक्रमाकसमयांति संवत ५७४ माहे फाल्गुन शुद्ध ९ रविवार ते वर्तमानि माहाराज राजाधिराज सिंहासनमंडित सिंहिंसंग्रामतिलअरीरायविभांड श्रीसवीतावंशभुपति पाठाराज्ञांतिसमांधि मुळपुरुष रामराजा ।। गोत्र भारद्वाज ।। कुळदेवी प्रभावती ।। उपनाम राणे ।। त्या पासोन त्रिपाळराजा ॥ त्याचा पुत्र भानराजा ।। तयाचा पुत्र त्रिंबक-राजा ।। तयाचा पुत्र गोविंदराजा ॥ तयाचा कृष्णराजा ।। त्याचा वंशिक राजा रामदेवराज ।। त्या रामदेवाचें राज्य घटिका चहु मध्ये ४ सुलतान आलावदिनाने घेतलें ।। सेवाटि रामदेवरायासिं पराभविलें ।। तो रामदेवराजा व आणिक राजे देशोदेशिचे ॥ सूर्यवंशि तथा सोमवंशि ॥ राया समागमि पैठणि आले ।। तेथे राजधामि राहिले ॥ त्या रामदेवरायाची जेष्टपुत्र केशव देवगिरी किल्यावर सिंहासनारूढ केला ॥ द्वीतिये पुत्र राजा बिंब उदयपुरासि स्थापिला ॥ तृतिय पुत्र प्रतापशा अलंदापुर पाटणि राज्याधिकार दिधला ।। यैसिया प्रकारें आपले समुदायें ज्याचा तो पुरषार्थें राहिला तदनंतरे शालिवाहन शके १२१० मध्यें पैठणास सुलतान अलावदिन याणे चाल करोन युद्ध केलें ॥ तेथे हि रामदेवराजा तथा आणिक सोमवंशि राजे थोर प्रभु पराभवातें पावले ।। तो वर्तमान देवगिरीस श्रृत जाला ॥ त्याणे तो किल्ला बळकावोन आपले पुरुषार्थे राहिला ॥ तदनंतरें उदयपुरास राया बिंबास वर्तमान श्रृत जाला ।। तेथोन त्याणे चाल करोन गुजराथ काबिज केली ॥ प्रांत सालेरमोलेर नंदनबारे दाहिठें केशवपुर वडानगर पावेतों पावले ॥ आपलें ठाणे बैसविलें ॥ आणि प्रतापशा हा कनिष्ट बंधु ।। सन्निध राजगुरु हेमाडपंत समवेत अलंदापुरास आला ।।

४. वचने मुळीच नसणे हे सर्वात उत्तम. याच सुधारणेकडे मराठी वगैरे भाषा आस्ते - आस्ते जात आहेत. तीन वचनांची दोन वचने झाली, दोहोंचे यापुढे हजारो वर्षांनी एकवचन होईल आणि नंतर वचनाला अजिात फाटा मिळेल. तिहींची दोन वचने व्हावयाला तीन- चार हजार वर्षें लागली. यावरून मुळीच वचने काढून टाकावयाला किती हजार वर्षें लागतील त्याचा अंदाज करावा.

५. हा पोकळ व अनिश्चित अंदाज करीत बसणे जितके उपयोगाचे आहे त्यापेक्षा संस्कृतात जी तीन वचने आहेत त्यांच्या रचनेचा अभ्यास भाषाशास्त्राला जास्त उपकारक आहे. संस्कृतात सात विभक्त्या आहेत व या साती विभक्त्यांना तीन वचने आहेत. म्हणजे एकंदर २१ स्थाने प्रत्ययांची होतात. या प्रत्ययांचा अर्थ काय व ते शब्दांना कसे जुडत गेले याचा शोध करणे मनोरंजन आहे. वैदिक व पाणिनीय भाषा सप्रत्ययावस्थेत असलेल्या आपणाला माहीत आहेत. वैदिकभाषा ज्या अप्रत्यय भाषेपासून निघाली त्या भाषेचा मासला किंचित अवशिष्ट राहिलेला आहे. अप्रत्यय स्थिती फक्त शर्बद एकापुढे एक उच्चारून वाक्य बनत असे, अशी आपण या अवशिष्ट शब्दांच्या प्रमाणावरून कल्पना करतो इतकेच. तेव्हा शोधाचा प्रारंभ सप्रत्यय जी वैदिकभाषा तिजपासून करणे प्राप्त होते. वैदिक भाषेत शब्दांना सात विभक्त्यांत जे प्रत्यय लागतात त्यांची याद पाणिनीने दिली आहे आणि त्याखेरीज सुपां, सुलुक् इत्यादी सूत्रात व आज्जसेरसुक या सूत्रात आणिक विभक्तिप्रत्यय सांगितले आहेत. स्वौजस इत्यादी सूत्रांतील प्रत्ययांना सुपां सुलुक् इत्यादी सूत्रांतील प्रत्यय बहुलत्वाने येणारे अपवाद म्हणून सांगितले आहेत. याचा अर्थ इतकाच की हे अपवादक प्रत्यय वैदिकभाषेत पूर्ववैदिकभाषेतील अवशिष्ट म्हणून राहिलेले प्रत्यय होत. उदाहरणार्थ, वैदिकभाषेत देव या शब्दाचे देवौ असे द्विवचन होत असे. परंतु या देवीरूपाप्रमाणेच किंवा त्याहून ही जास्त प्रमाणात देवा असे द्विवचनाचे अपवादक रूप आढळते. मराठीत देवाने हे तृतीयेचे रूप सरसहा आहे. परंतु ज्ञानेश्वरीत वर इतर जुन्या कवितेत देवे असे अपवादक रूप सडकून येते. हे देवे रूप देवाने या रूपाहून जुनाट आहे. त्याप्रमाणेच वैदिक देवा हे द्विवचनाचे रूप वैदिक देवौ या रूपाहून जुनाट आहे. पूर्वंवैदिक व वैदिकभाषेत अकारात पुल्लिंगी देव शब्द असा
चाले :

एक                     द्वि                          बहु
१ देवस्                देवौ, देवा                देवासस्, देवा :, देवे, देवाँ:
२ देवम्                देवौ, देवा                देवान्
३ ( देवया ) देवेन   देवाभ्याम्                 देवेभिस्, देवै:
४ देवाय               देवाभ्याम्                 देवेभ्यस्, देवे
५ देवात्               देवाभ्याम्                 देवेभ्यस्, देवे
६ देवस्य              देवयोस्                    देवनाम्
७ ( देवा ) देवे       देवयोस्                    देवेषु

या रूपातील प्रत्ययाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू वैदिक भाषेहून दुस-या कोणत्याही सगोत्र जुनाट भाषेचे आपल्याला तपशीलवार ज्ञान नाही. अपवादक प्रत्ययावरून एवढे मात्र अनुमान होते की, वैदिकभाषेहून जुनाट अशी एक जुनाट वैदिकभाषा होती. त्या जुनाट वैदिकभाषेत ज्याअर्थी द्विवचनी आ, अनेकवचनीं असस्, तृतीयेचा अयाच्, सप्तमीचा आल् इत्यादी प्रत्यय आहेत त्याअर्थी हे प्रत्यय ऊर्फ शब्दसंक्षेप जुनाट वैदिकभाषेहूनही अति जुनाट अशा पूर्ववैदिक भाषेतून आले असले पाहिजेत. म्हणजे (१) वैदिकभाषा, ( २) जुनाट वैदिकभाषा व (३) अत्यंत जुनाट पूर्ववैदिकभाषा, अशा तीन भाषा एका पूर्वीं एक होऊन गेल्या असाव्या असे अनुमा होते. पैकी वैदिकभाषा व जुनाट वैदिकभाषा या दोन्ही एकाच भाषेची नवी व जुनी रूपे आहेत, जीपासून जुनाट वैदिकभाषेत व वैदिकभाषेत प्रस्तुत प्रत्यय आले ती अत्यंत जुनाट वैदिकभाषा स्वतंत्र निराळी भाषा होती यात मात्र संशय नाही. ही निश्चित अनुमाने गृहीत धरून प्रत्यंयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. बोलणे वचनासंबंधाचे आहे. सबब, मी असे अनुमान करतो की प्रथमेचे स्, आ, किंवा औ व अस् किंवा असस्, हे प्रत्यय एक, दोन व तीन या संख्यांचे वाचक अनुऋमाने आहेत. स् चा उच्चार पाणिनीय भाषेत किंवा सध्या मराठीत जो होतो त्याहून निराळा उच्चार अत्यंत जुनाट वैदिकभाषेत होत असे जवळजवळ -ह् च्यासारखा स् चा उच्चार असे किंवा जवळजवळ विसर्गासारखा स् चा उच्चार असे ; म्हणजे कंठ्य असे. वैदिकभाषेत, अर्थात् पाणिनीय भाषेत स् चा हा कंठ्य उच्चार जाऊन दन्त्य झाला ; तत्रापि त्याच्या कंठ्यात्वाची आठवण बुजाली नव्हती. पदांती दन्त्य स् चा कंठ्य विसर्ग होतो. असा जो नियम पाणिनी सांगतो त्याचे कारण स् चे मूळचे कंठ्यत्व होय. रामस् पठति= राम : पठति हा जो बदल होतो तो का होतो, तर स् हा मूळचा कंठ्य आहे. म्हणजे स् चा कंठ्य उच्चार वैदिकभाषेत इतरत्र यद्यपि लुप्त होऊन दंत्य झाला होता, तत्रापि पदांती तो कंठ्य उच्चार जसा चा तसा च कायम राहिला. याचा अर्थ एवढाच की, रामस् याचा उच्चार राम : असा वैदिक किंवा पाणिनीय काळी होत असे. दन्त्य स् चा कंठ्य विसर्ग का होतो, हे पाणिनीला माहीत नव्हते. मात्र होतो, हे तो नित्याच्या बोलण्यात पहात होता. सबब, तो चमत्कार त्याने नमूद करून ठेविला. येणेप्रमाणे रामस् = राम: हे रूप सिद्ध झाले. रामस् किंवा राम: याचा अर्थ एक राम.

करतां [ कृते ] (तां पहा)

करताळ [ करतालिका = करताळ (वाद्यविशेष) ]

करतील जा [कुर्यु: ] ( करूं ये पहा)

करतो विरतो [ कुरुते विकुरुते = करतो बिरतोविकृ = बिकर = बिअर = बिर इ. इ. ] बिरतो हा कांहीं तरी जोड शब्द नाहीं. करतो बिरतो म्हणजे बरें करती वाईट करतो. (भा. इ. १८३४)

करपणें [ कृप दौर्बल्ये, कर्पते, कृपयाति. कृप् = करप ] माझें हृदय करपलें = मे हृदयं कर्पते. (भा. इ. १८३३)

करमर [करमर्दिका= करमर (केयदेव-पथ्यापथ्यविबोध)] ( भा. इ. १८३४)

करवंटी [ करोटि ] (करटी पहा)

करवत [क्रकचोऽस्त्री करपत्रं (अमर-द्वितीयकांड-शूद्रवर्ग-३५) करपत्र = करवत्त = करवत. क्रकच=करकच=करकोचा. ऋपत्र = करपत्र ( ? ) ] (भा. इ. १८३३)

करळी [ करालित (fringed with) करालि = करळी ] धोत्राची करळी म्हणजे धोत्राची दशा.

करा जा [ कुर्यात ] ( करूं ये पहा)

करि [ करि हि ] (येइ पहा )

करी [ करीहि ] (एइ पहा)

करील जा [ कुर्यात] ( करूं ये पहा)

करीवँ [ कृत्रिम = करीवँ ]

करूं या [ कुर्याम ] ( करूं ये पहा)

करूं ये [ कुर्याम्. करूं ये = कुर्याम्, होऊं ये
करूं या = कुर्याम, होऊं या
कर जा = कुर्या: व्हा जा
करा जा = कुर्यात व्हा जा
करील जा = कुर्यात् होईल जा
करतील जा = कुर्य: होतील जा ]

करोटी [ करोटि ] (करटी पहा)

करोल १ [क्रूर = करूर = करोर = करोल ] करोल म्हणजे क्रूरकर्मा, साहसी, त्याचा कोठा करोल आहे, पांच शेर दूध पचवितो = तस्य कोष्ठः क्रूरः, पंच पलान् पयसः पाचयति । (भा. इ. १८३४)

-२ [ करवालिन् = करोली = करोल ] करोल म्हणजे तरवार जवळ असलेला, शस्रास्त्रयुक्त. पांचशें करोल शिपाई म्हणजे शस्रास्त्रयुक्त शिपाई.
कर्णफूल [कर्णोत्पल = कर्णफूल. र्णो चा ओ प च्या फ ला ऊ होऊन लागला]

३. वस्तुत: पहाता अनेकवचनाची देखील जरूर नाही. अनेकवचन काढून टाकिले, तत्रापि अर्थाचा बोध नामी होतो. मराठीत ही सुधारणा होऊन गेली आहे. एक पुरुष, दोन पुरुष, शंभर पुरुष या मराठी प्रयोगात अनेक संख्या दोन व शंभर या संख्यावाचक नामांनी दाखविली जात असून, पुरुष या शब्दाने दाखविली जात नाही, हा शब्द जसाचा तसाच रहातो. इथे अडगळ काढून टाकण्याच्या कामी मराठी महाराष्ट्राच्याही पुढे गेली. या कामी इंग्रजी मराठीच्या मागे आहे. two man, hundred man असे प्रयोग न करता two men hundred men असे प्रयोग इंग्रजी करते. ती जेव्हा two man, hundred man असे प्रयोग करण्याची सुधारणा करील तेव्हा मराठीची बरोबरी तिने केली असे होईल. मराठीतील अकारान्त पुल्लिंगी नामाप्रमाणे अनेक वचनाचा प्रत्यय सर्वत्र झुगारून दिला, म्हणजे अनेकवचनाला रजा मिळाली. मग एकटे एकवचन तेवढे राहिले. परंतु त्याला एकवचन हेही नाव मग शोभणार नाही. कारण अनेकांच्या अपेक्षेने एकाची मातब्बरी भासत असते. तात्पर्य , एकवचनाची ही वस्तुत: जरूरी नाही. संख्यावाचक शब्दांनी दोन, वीस, शंभर वस्तू जशा दाखविल्या जातात तशीच एक या शब्दाने एक वस्तू दाखविली जाईल. त्याकरता वस्तुशब्दाला विकार करण्याचे कारण नाही. हे म्हणणे कित्येकांना काल्पनिक व विचित्र वाटेल. परंतु तसे वाटण्याचे कारण नाही. ही सुधारणा म्हणजे वचनाला बिलकुल रजा देण्याची सुधारणा कित्येक भाषात हजारो वर्षांपूर्वीच होऊन गेली आहे. उदाहरणार्थ Oh Rama ! You have Killed one thousand giants Who habitially ate a hundred men, हे इंग्रजी वाक्य वचनांना अजिबात फाटा देऊन येणेप्रमाणे संस्कृत भाषेत बोलता येते :

हे नरशतभक्षकराक्षससहस्त्रमारकराम !
या संस्कृत संबोधक वाक्यात सात शब्द आहेत व त्यापैकी एकाही शब्दाला वचनार्थक किंवा विभक्त्यर्थक विकृती झालेली नाही. या रचनेला सामासिक रचना अथवा वृत्ती अशी संज्ञा आहे. समासात प्रत्ययाचा लोप करून व केवळ प्रातिपदिक अविकृत शब्द उच्चारून अर्थाचा बोध पूर्णपणे करता येतो. ही सामासिक वृत्ती अर्वाचीन संस्कृतात विपूल आहे. तिचा प्रकर्ष पहावयाचा असल्यास तो नैय्यायिकांच्या ग्रंथात हवा तितका बघून घ्यावा. न्यायग्रंथात सबंध पानचे पान एका समासाने व्यापिलेले वारंवार आढळते. तत्रापि शास्त्रीय गहन विषय ध्यानात येण्यास अडचण पडत नाही, कदाचित उलटे सौकर्य येतें. अपरिचितास हे सामासिक बोलणे कसेबसेच वाटेल हे खरे. परंतु हा केवळ अनभ्यस्ततेचा परिणाम आहे. समासाने बोलण्याची सवय केली असता, तेच समस्त बोलणे व्यस्त बोलण्यापेक्षा सुलभ वाटते. सौलभ्य व सोय असल्यावाचून सामासिकभाषा प्रचारात आलीच नसती. याला साक्ष प्राकृत भाषांची. प्राकृत भाषा अविद्वान अशा सामान्य जनांची. परंतु प्रख्यात नाटककार जो भवभूती त्याने दोन - दोन, चार - चार ओळी लांब असे समास आपल्या मालतीमाधव नाटकात योजिलेले सर्व प्रसिद्ध आहेत. हे लंबेलंबे प्राकृत समास तत्कालीन प्राकृतजनांना, श्रोत्यांना व प्रेक्षकांना सहज ऐकता ऐकता समजततील अशी खात्री असल्यावाचून नाटककाराने ते केवळ स्वत:च्या हौसेकरिता घातले असतील हे संभवत नाही. सामासिक बोलणे उलगडवायला बिकट नसून उलट अत्यंत सोपे व शिवाय चमत्कृतिजनक असते. त्यात वचने नाहीत, विभक्त्या नाहीत, लकार नाहीत, कंटाळा येतील अशी वाक्यांवर वाक्ये नाहीत, ते समजावयाला सुबंताचा अभ्यास नको, तिङंताचा नको, काही नको, फक्त शब्दज्ञान असले म्हणजे झाले शब्दापुढे शब्द येऊन अर्थ आस्ते - आस्ते श्रोत्यांच्या मनात उतरत जातो. सर्वात ही सामासिक भाषा अत्यंत शास्त्रीय. पूर्वज रानटी स्थितीत असताना त्यांनी अज्ञानाने ज्या चुकीच्या पद्धती निर्माण केल्या त्या चुका टाळावयाला उत्तम मार्ग म्हटला म्हणजे ही सामासिक भाषा होय. लौकिकभाषेत जिकडे पहावे तिकडे प्रत्ययांचा बाजार. वचन घ्या प्रत्यय, लिंग घ्या प्रत्यय, विभक्ती घ्या प्रत्यय, आत्मने घ्या प्रत्यय, परस्मै घ्या प्रत्यय, भूत घ्या प्रत्यय, भविष्य घ्या प्रत्यय, प्रत्ययांखेरीज बोलणे नाही. प्रत्यय चुकला की अर्थ घसरला. या प्रत्ययांच्या रानातून वाट काढता काढता कोवळ्या बालकांचे तर किती हाल होतात ते विचारू नका. त्याऐवजी, प्रत्ययांना ज्यात अजिबात रजा मिळाली आहे ती अप्रत्यय सामासिकभाषा लहान मुलांना शिकण्याला सोयिस्कर नव्हे ? हींत प्रत्ययच नसल्यामुळे, चुका पायात मोडण्याचा धाकच रहात नाही. ही सामासिक भाषा पद्धती प्रचारात येईल तो सुदिन ! एकदा संख्यावाचक सर्व शब्द भाषेत निर्माण झाल्यावर एकवचन, द्विवचन, त्रिवचन, बहुवचन व अनेकवचन, यांची म्हणजे वचनांची जरूरच रहात नाही. रानटी आर्यांना तीनच वचने माहीत होती. कित्येक रानटी लोकांच्या भाषात दहा- दहा, वीस- वीस वचने आढळतात. हा वचन बाहुल्याचा प्रकार वचनत्रयाच्या इतकाच रानटी स्थितीचा द्योतक आहे.

बाण टाकि अतिचपळ ॥ यका मागें येक प्रबळ ।। दावितसे आपुलें बळ ।। पारकियासीं ।। ६६ ।। प्रथम तो बळियाढा ।। हरिहराचा वरदि गाढा ।। तुळित हातिं मेढा ।। धडधडा टाकि बाण ।। ६७ ॥ आंता वर्तलें क्षेत्रियां कडे ।। कैसे आले विर गाढे ।। ते वर्णिजेति वाडें कोडें ।। नामे तयांची ।। ६८ ॥ येक आले गजा वरी।। येक आले रहंवरी ।। कितेक ते अश्वा वरी ।। ऐसे क्षेत्रि वर्णिले ।। ६९ ।। क्रोधाच्या उल्का सांडिती ।। महापुरषार्थे डुल्लती ॥ वारु नाचवित येती ॥ राजमंडपासीं ।। ७० ।। त्याच्या पराक्रमास नाहि मिती ।। पुढें दिसे ठेंगणि क्षिती ।। ह्मणति तुर्काचि गणणा किती ॥ धोका कायेसा ॥ ७१ ।। ऐसे उठावले रणके सरी ।। वस्त्रें ल्याले परोपरी ॥ टिळे माळा नाना कुसरी ।। धरिल्या देही ।।७२।। टिळे रेखिले कुसरी ।। चंदनमीश्रित नाना परी ।। सुगंध केशरि नाना परी ।। शोभती ।। ७३ ।। चंदनचुवा आणि बुका ।। शरीरी लेपिला बहु निका ।। वस्त्राळंकार केशरि देखा ।। केले ते समईं ॥ ७४ ॥ यैसे आले व्येष्टित फौजा ॥ शस्त्रास्त्रिं तुळिती भुजा ।। समस्ती नमस्कारिला राजा ॥ रामराणा ॥ ७५ ॥ ह्मणति आला हो अंतसमयो ।। वर्जोनि गेला आह्मा श्रीगुरुराव ।। परि युध्द न सांडावें ऐसा भावो ॥ सत्यार्थ चि करावा ।। ७६ ॥ रामदेवराजा ह्मणे सर्वांसी ।। प्रसंग वोडवला दुर्जनासी ।। रणवट बांधणे कवणासी ॥ ऐसें बोलिला ॥ ७७ ॥ मग पाहिल सर्वां कडे ।। प्रतापाचे जैसे मेहुडे ॥ बोलते जाले महावीर गाढे ।। आज्ञा करणे आह्मासी ।। ७८ ॥ तवं पाहिलें भुरदास–प्रभुसी ।। वृद्धविष्णु गोत्र जयासी ।। उपनाम वानठेकर तयासी । काये ह्मणता जाला ॥ ७९ ।। रणवट बांधणे हो तुह्मासीं ।। आरूढावें उत्तम रथासी ॥ ऐसें ह्मणोनियां तयासी ।। गौरविलें बहुतेक ।। ८० ।। कितेकासि दीधले तोडर ॥ यैसे नावाजिले विरें विर ।। प्रतापाचे जैसे डोंगर ।। आरूढले बहनी ॥ ८१ ।। शस्त्राचे घेवोनियां भार ।। मुखीं ह्मणति मर मर ।। माहामदा रणी पडो रे सिर ।। तत्काळ धरणी ।। ८२ ॥ येक क्षेत्रि महाधनुर्धर ।। येक प्रतापि महाशुर ।। बरवा करोनियां श्रृंगार ।। युध्दा लागि प्रवर्तले ॥ ८३ ।। ऐसे उठावले महाधिट ।। येकमेकांसि अलोट ।। घाये वाजति साट ।। तेण्हे भडभडां रुधिर वाहे ॥ ८४ ॥ तेणे जाला हाहाकार ।। रणि मांडला महागजर ।। विरे विर पडले थोर ।। मिरवे तोडर चरणि पैं ।। ८५ ।। खाखाईल्या रणमोहोरी ।। वाजताति रणभेरी ।। नाद उमटला अंबरी ॥ ब्रह्मकटाह होतसे ।। ८६ ।। मांदळा दिधला घावो ।। नाद अतिशयें पाहा हो ।। हा चि त्याचा प्रभावो ।। गुप्त ठावो दाखविला ।। ८७ ।। लागले डफांचे झणत्कार ।। नाना वाद्यांचे गजर ।। काहाळा वाजति गंभिर ।। तेण्हे वीर धांवती ॥ ८८ ॥ जीवित्वाची नाहि आस ।। मृत्यासि जाले उदास ।। महाउग्र सूर्यवंश ।। क्षेत्रि दारुण ॥ ८९ ।। नाचतसे रणधेंडा ।। सीरे होत सेर गण्डा ॥ येक धरोनियां सोंडा ।। हस्ति पेलिती ।। ९० ॥ शस्त्रें वाजति सणसणा ।। बाण सुटती झणझणा ।। तुर्क बहुत आले रणा ।। मृदघटप्राये ।। ९१ ।। क्षेत्रिवंशि राज्यधर ।। महाभारि रणरंगधिर ।। युध्दी भिडति तुर्क अश्वार ।। येकमेकां ।। ९२ ।। माजले रणकेसरी ।। कुंजर घालिती उदरी ।। ऐसि होतसे झुंझारी ।। महामारि मीसळले ॥ ९३ ।। गर्जति क्रोधाच्या बळें ।। घाव हाणति महासळें ।। रणा माजि देति उफाळे ।। वेळोवेळा ।। ९४ ।। पाचारिलें तुर्का आमदासी ।। क्रोधें गिळों शके आकाशी ।। तेथे तुं कोण मज पुढा होसी ।। अमंगळा पापिया ।। ९५ ॥ उडगणा माजि शशी ।। तैसा रामदेवराजा रणमहिसी ।। वर्षला अमित्य बाणासी ।। तुर्का वरी ॥ ९६ ।। घाव हाणति नगारा ॥ भेरिया वाजति सैरावैरा ।। तेणे पडिला भेदरा ।। म्लेंछासीं ।। ९७ ॥ तवं धार्विनला हुशैन ।। बंधुसि आला टाकोन ।। मांडलें युध्द दारुण ।। रणभुमिसां ॥ ९८ ॥ दोन्हि येकवटले सोहोदर ॥ पराक्रमे अतिसुंदर ।। रणी महादुर्धर ।। आड घातलें तेही ।। ९९ ।। हसनाचा यावा सांभाळिला ॥ समुधें वरिच्या वरि तोडिला ।। आपण फिरोन पाचारिला ।। धिरा राउता ह्मणोनी ॥ १०० ॥ दोघां मांडलें निर्वाण ॥ सणसणा वाजति धनुष्यबाण ।। मारिति अतिनीर्वाण ॥ येकमेकां ॥ १ ॥ ऐसें होतसे उभयता झुंज ।। समुधाचा बाण जैसि विज ।। नावेक हृदयांबुज ।। दुखवलें जाणा ॥ २ ॥ तेणे वींधिला सुमध प्रधान ।। मुर्छना आलि तया लागुन ।। तें देखोन चित्र धावोन ॥ आला जवंळी ।। ३ ।। चित्र ह्मणे हसनासी ।। बहु मिरविता पाइकिसी ।। जवं देखिला नाहि शशी ।। तवं प्रकाश उडगणाचा ॥ ४ ॥ मातंगा वरि जैसा केसरी ।। तैसा हुसेनासि क्षेत्री ।। भयभित होउनि वगत्रीं ।। काळिमा चढली ।। ५ ॥ मग चित्रें वधिला हुसेन ।। सैन्या माजि प्रताप गहन ।। पारके विर पळवोन ।। चित्र विजय जाला ॥ ६ ॥ छेदिलें हुशेनाचें सिर ।। रणतुरे बाजिंनलि अपार ।। तवं धाविंनले महाविर ।। माहांमद -तुर्काचे ॥ ७ ॥ तेथे जाला आवर्त ।। येकमेकांते पाचारित ॥ हलकालोळ रणात ।। मांडला तथे ॥ ८ ॥ माहांमदाचा बाप अल्ली ।। सवा मणाचि फिरंग तोळिली ।। हाहाकारें बोंब केली ।। ह्मणे हारपलें पुत्र माझें ।। ९ ॥ यैसे दोनि वधिले सहोदर ।। महापराक्रमि अल्लिचे कुमर । रणि पडले ह्मणोनि उत्तर ।। स्त्रियेसिं काये द्यावें ॥ १० ॥

बहुवचन या शब्दाऐवजी अनेकवचन हा शब्द पाणिनीने योजला नाही. पूर्वाचार्यांची बहुवचन ही संज्ञा कायम ठेविली. बहुवचनाच्याऐवजी अनेकवचन असा शब्द पाणिनी योजिता, तर एकाहून अनेक जे द्विवचन त्याचा निर्वाह झाला नसता, रानटी आर्यांना संख्येचे तीन विभाग माहीत होते. एक, दोन व तीन. आपल्याला संख्येचे दोन भाग माहीत आहेत, एक व अनेक. दोनच भाग माहीत असल्यामुळे आपण एकवचन व अनेकवचन अशी दोनच वचने मानतो. त्याप्रमाणेच संख्येचे तीनच भाग करणारे रानटी आर्य एक संख्येकरिता एकवचन, दोन संख्येकरिता द्विवचन व तीन संख्येकरिता त्रिवचन, ज्याला पुढे बहुवचन म्हणू लागले, अशी वचने मानीत. तात्पर्य, रानटी आर्यांना तीनपर्यंतच संख्या माहीत असल्यामुळे, त्यांच्या भाषेत द्विवचन निर्माण झाले व ते रानटी आर्यांचे वंशज जे वैदिक ऋषि आणि पाणिन्यादि संस्कृत आचार्य त्यांना रूढीस्तव तसेच घेऊन मिरवावे लागले. द्विवचनाच्या उत्पत्तीचे हे असे कारण आहे. पहिल्या कलमात जे दोन प्रश्न विचारले होते त्यापैकी एकाचे उत्तर या दुस-या कलमात दिले. आता मराठीत दोनच वचने कशी आली ते सांगतो.

२. तीन या संख्येहून जास्त संख्या मोजता येऊ लागल्यावर आणि संख्येचे एक व अनेक असे विभाग केल्यावर, द्विवचनाची काहीएक जरूरी राहिली नव्हती. परंतु संस्कृत भाषेत द्विवचन नामे क्रियापदे, वगैरे जिकडे तिकडे पसरल्यामुळे, संस्कृत भाषा मोडल्याशिवाय हा रोग नाहीसा होणे शक्य नव्हते. रोगी मरावा तेव्हा नाहीशा होणा-या रोगांपैकी हा रोग होता. रोगी मारून रोग मारण्याचे हे काम महाराष्ट्रयादि भाषांनी केले ब्राह्मण संस्कृत बोलत, तेव्हा ते मेल्याशिवाय किंवा त्यांना सोडल्याशिवाय म्हणजे त्यांची भाषा सोडल्याशिवाय द्विवचनापासून सुटका होण्यासारखी नव्हती. शुद्ध ब्राह्मण, शुद्ध क्षत्रिय व शुद्ध वैश्य यांचा हेवा करणारे जे व्रात्य ब्राह्मण, व्रात्य क्षत्रिय व व्रात्य वैश्य यांनी अनार्य लोकांच्या सहाय्याने शुद्ध ब्राह्मणादीचा उपमर्द केला व त्यांची शुद्ध संस्कृत भाषा सोडून आपली अशुद्ध, अस्पष्ट व मिष्ट प्राकृत भाषा चालू करताना संस्कृतातील द्विवचन व अनेक लकार वगैरे निरुपयोगी लटांबराला फाटा दिला. नवे, राज्य, नवे लोक, नवे राष्ट्र, नवा धर्म व नवी भाषा जेव्हा निर्माण झाली तेव्हा संस्कृतातील द्विवचनाची ही अडगळ कायमची फेकून दिली गेली. अन्यथा परब्रह्माचे उच्छवसित जे वेद व ज्यातील एक स्वर ही चुकला असता ब्रह्महत्त्या केल्याचे पातक लागणार त्या गीर्वाणवाणीतील लाडके द्विवचन शुद्ध ब्राह्मणादि वर्णांच्या हातून उकिरड्यावर फेकले गेले नसते. तात्पर्य संस्कृतातील निरुपयोगी द्विवचन प्राकृत भाषांनी टाकून दिले. अर्थात् प्राकृताची कन्या जी मराठी तीत द्विवचन साहजिकपणेच आले नाही. फक्त एकवचन व अनेकवचन अशी दोन वचने राहिली.